icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सच्चिदानंद महाराज की कानूनी नोटिस से राष्ट्रवादी कांग्रेस में नया विवाद

Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सच्चिदानंद महाराज यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर पक्षात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप सच्चिदानंद महाराज यांनी केला आहे. या आरोपांना पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवेळी सच्चिदानंद महाराज स्वतः उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता. त्यामुळे आता अचानक नोटीस पाठवण्यामागे दुसऱ्या कुणाचा तरी 'मास्टरमाईंड' असल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधाराचा शोध घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

सोलापूर में ज्ञानेश्वर पालखी के स्वागत के लिए भव्य कमानी, मोदी-फडणवीस की प्रतिमाओं सहित

Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास विभागाने भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक आणि भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. या कमानींमुळे पालखी मार्गाचे सौंदर्य खुलले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधत ग्रामविकास विभागाच्या वतीने पालखी मार्गावर विविध ठिकाणी भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींवर श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा , वारकऱ्यांची वाद्ये तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारकरी वेषातील प्रतिमा लावल्या आहे.त्यामुळे पालखी मार्गाला आध्यात्मिकतेसोबतच आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात 19 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रवेश करणार आहे. त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी आणि वारीचे वैभव अधिक उठावदार करण्याच्या उद्देशाने या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
0
0
Report

नवी मुंबई में अनैतिक संबंध के चलते पति की हत्या, पत्नी और प्रेमी ने गला घोंटा

Navi Mumbai, Maharashtra:ऐरोलीतील महिला सुनिता कुशवाह हिचे तिचा रिक्षावाला प्रियकर राहुल प्रजापती सोबत अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधाना अडसर ठरत असलेल्या पती बलीराम कुशवाह याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने गळा दाबून गळ्यावर वार करत हत्या केली. हत्येनंतर पुरावे मिटविण्यासाठी बलीराम च्या मृतदेहाचे 3 तुकडे करून ते गोणीत आणि चादीरीत गुंडाळून प्रियकर राहुलच्या रिक्षातून गवळीदेव डोंगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. हत्येच्या 8 महिन्यांनी बळीराम च्या भावाने पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत दोघांचे जुने कॉल डिटेल चेक करून दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता जबाबात विसंगती आढळल्याने पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी हत्येची कबुली दिली. पोलीस मृतदेहाचा शोध घेत असून घटनेला 11 महिने उलटले असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत याप्रकरणी पोलिसांनी सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर ATS ने 126 करोड़ के घोटाले के मामले में तीन आरोपी गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: आंतरराष्ट्रीय संघटना और पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर ATS कडून कारवाई - तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर आलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी सोलापुरातील आरोपींचे आर्थिक संबंधित समोर आलेत. - सोलापुरातील 3 आरोपींनी 10 कोटी 50 लाखाचा निधी आंतरराष्ट्रीय संघटनेला दिल्याचे तपासात उघड - याप्रकरणी अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - आरोपींच्या मोबाईल मध्ये पाकिस्तानातील 70 पेक्षा अधिक लोकांचे नंबर तसेच 4 व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड - बोगस धर्मादाय संस्था नोंदणी करून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. - सोलापुरातील नागरिकांकडून निधी गोळा करत हे पैसे संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेला दिल्याचेही समोर आलेय. - आंतरराष्ट्रीय संघटनेला दिलेला हा निधी देश विघातक कृत्यासाठी वापरला गेला असल्याची शक्यता असल्याने एटीएस कडून ही कारवाई करण्यात आली.
0
0
Report

पत्नी हत्या मामला: सलमान खान के मोहम्मद खान पर आरोप, आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी हसीनबानो हिची लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळत हत्या केल्याचा प्राथमिक आरोप आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी स्वतः वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी कारमधून हसीनबानोचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक चौकशीत चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याचे समोर आले असून, घटना घडली तेव्हा दाम्पत्य तीन लहान मुलांसह प्रवास करत होते. कारमध्ये अन्य कोणाचा सहभाग होता का, यासह सर्व बाबींचा कारंजा शहर पोलीस सखोल तपास करत आहेत.
0
0
Report

सोलापुर में भीषण गर्मी, मॉनसून नहीं, पारा 37.4°C तक पहुंचा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सोलापूरकर अनुभवतायत आहेत कडक उन्हाळा, जिल्ह्यातून पाऊस गायब तर तापमानाचा पारा पोहोचला 37.4° वर - ऐन पावसाळ्यात सुद्धा सोलापूरकर अनुभवतायत कडक उन्हाळा - पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सोलापूरच्या तापमानाचा पारा पोहोचला 37.4 अंशांवर - पुनर्वसु नक्षत्राने सोलापूरकरांची केली घोर निराशा - कडक उन्हामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही तर दुसरीकडे खरीपाचा हंगाम हातातून निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत - वाढत्या उन्हामुळे सोलापूर शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी
0
0
Report
Advertisement

जुन्नर के टीकेकरवाड़ी में पुष्पावती नदी का भव्य झरना, पर्यटक मोहित

Shirur, Maharashtra:जुन्नर/पुणे। गेल्या आठवड्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुन्नर तालुक्यातून खळखळून वाहणाऱ्या पुष्पावती नदीला टीकेकरवाडी येथे भव्य धबधब्याचे स्वरूप आले असून, या निसर्गरम्य दृश्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. जुन्नर तालुक्यातील टीकेकरवाडीच्या पश्चिमेला असलेल्या नेतवड गावाजवळ मांडवी आणि पुष्पावती नद्यांचा संगम होत असल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टिकेकरवाडी येथे उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे पुष्पावती नदी परिसरात भव्य धबधब्याचे मनमोहक दृश्य निर्माण झाले आहे. पाण्याचे उडणारे तुषार आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे।
0
0
Report

राम मंदिर रामरक्षा पठण को लेकर संजय राउत की मंदिर ट्रस्ट से चर्चा

Nagpur, Maharashtra:खासदार संजय राऊत यांनी रामनगरातील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांना फोन करून 18 जुलै च्या राम रक्षा पठाण साठी सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. काल रात्री संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क साधून 18 जुलैला उद्धव ठाकरे आणि इतर शिवसैनिकांना रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण करायचे आहे, त्यासाठी मंदिर ट्रस्टने सहकार्य करावे अशी विनंती संजय राऊत यांनी केल्याची माहिती रवी वाघमारे यांनी दिली. धार्मिक भावनेतून शुद्ध मनाने राम रक्षा पठण करायचे असल्यास कोणालाही आमची अडचण नाही, मात्र हे करत असताना त्याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये. आपल्या राजकीय विचाराच्या मंदिराच्या बाहेर ठेवून यावं असंही मंदिर ट्रस्टने संजय राऊत यांना सांगितल्याचे रवि वाघमारे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासून रामनगर येथील राम मंदिरात यायचे... मंदिराच्या सहाशे सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक सदस्य आहेत.. त्यामुळे फडणवीस सदस्य आहेत म्हणून उद्धव ठाकरे राम रक्षा पठण करण्यासाठी या मंदिरात येत असावेत असे आम्हाला वाटत नाही असे रवि वाघमारे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राम मंदिराच्या शेजारीच असलेल्या एनआयटीच्या पटांगणावर भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन केले आहे... मुळात ते महायज्ञ मंदिराच्या बाहेरील एनआयटीच्या पटांगणावर आहे... मात्र, त्या आयोजनामुळे मंदिरात चे पावित्र्य आणि गरिमा कायम राहील अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टने व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

Ambabai मंदिर में अवैध संवर्धन पर Kolhapur के संतप्त लोग, नेता हर्षल सुरवे ने किया विरोध

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अशास्त्रीय पद्धतीने केल्या जात असलेल्या संवर्धन प्रक्रिये बाबत कोल्हापूरकर संतप्त झाले आहेत.. अंबाबाई देवीच्या भक्ताने देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.. शिवसेनेचे स्थानिक नेते हर्षल सुर्वे यांनी देखील संवर्धनाच्या प्रक्रियेबाबत संताप व्यक्त केला आहे.. संवर्धन प्रक्रिया राबवत असताना पुरातत्वीय निकशांचे सरळ सरळ उल्लंघन केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.. काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागली हा त्याचाच भाग असल्याचा आरोप शिवसेना नेते हर्षल सुर्वे यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

जयंत पाटील पर सुरेश धस का खुला आरोप: जियो टैगिंग से महाराष्ट्र लूट

Beed, Maharashtra:बीड : जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. भाजप आ सुरेश धस मविआ सरकार मध्ये जलसंपदा मंत्री असताना जिओ टॅगिंग चा जी आर काढला महाराष्ट्राची लूट झाली.. महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. किती वाटा आहे. कोण डायरेक्टर सगळ काढणार - सुरेश धस जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी डवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. दादागिरी नवंटंकी तिकडे चालवायची इकडे नाही. देवांनी तुम्हाला जेवढे डोके दिले त्याच्यापेक्षा एक टक्का आमच्या देवांनी सुद्धा जास्त दिले. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील आम्ही नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन डवचण्याचे काम करता. आम्ही तुमच्याकडे येऊन डवचू अस. म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिले. दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अधिवेशनात आरोप केलं होते त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट इशारा दिला आहे. पुढे बोलताना माविआच्या सरकार मध्ये कोण जलसंपदा मन्त्री होते. ज्यांच्या कालावधी मध्ये जिओ टॅगिंग चा जी आर काढला. त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट झाली. पुढच्या अधिवेशनात पहिल्यांदा पहा तसेच महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. कोणाचे रजिस्टेशन आहे. त्यांच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे. कोण डायरेक्टर आहेत हे सुधा पहिल्या दिवशी कळेल जयंत पाटील यांना कळेल अस खुलं आव्हान सुरेश धस यांनी दिले आहे. बाईट- आ सुरेश धस (भाजप आमदार)
0
0
Report
Advertisement

आहिल्यानગર में बारिश कमी से फसलें संकटग्रस्त, किसान स्पिंकलर से पानी दे रहे

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अचानक पाठ फिरवल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पेरणीनंतर जोमाने उगवलेली पिके आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून ती वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या विहिरींचे पाणीही स्प्रिंकलरद्वारे शेतात सोडण्याची वेळ आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबला , तर विहिरीही कोरड्या पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पिके वाया जाण्याचाच नव्हे तर शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा खर्च आणि मेहनतही पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असून, चिंताग्रस्त बळीराजा आता फक्त आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. राहता तालुक्यातील अनेक शेतकरी शेतातील पिकांना वाचवण्यासाठी स्पिंकलरच्या साहाय्याने पाणी देत असल्याचं चित्र समोर आलं असून शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report

चंद्रपूर में बारिश नहीं मिलने से कपास-सोयाबीन और सब्ज़ियाँ डूबीं, दुबार बुआई का खतरा

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड कापूस -सोयाबीन आणि भाजीपाला पिकेही कोमेजली, पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची भीती , धान पिकांची तर अत्यंत वाईट अवस्था चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसल्याने 15 दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि धान ही महत्त्वाची तातडीने पेरणी करण्याची पिके आहेत. त्यातील सोयाबीन पेरणी उत्तम स्थितीत झाली मात्र धान पिकांसाठी योग्य तो पाऊस न झाल्याने धानाची रोबणी होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसात सतत ऊन आणि पावसाने दिलेला खंड यामुळे आता जिल्ह्याच्या विविध भागातील भाजीपाला पिके देखील कोमेजली आहेत. पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास कापूस- सोयाबीन यासह सर्वच पिकांची दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या सापळ्यात अडकणार असून खरीप हंगाम वाया जातो की काय असे मोठे संकट ओढवले आहे.
0
0
Report

आदिवासी क्षेत्रों में SIR मोहिम की अवधि 15 दिन बढ़ाने की मांग

Shirdi, Maharashtra:राज्यभरात सध्या मतदार पुनर्निरीषण अर्थात SIR मोहीम राबविण्यात येत आहे.. जुलै अखेरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट आहे.. मात्र आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये SIR ला आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे.. पावसाळा सुरू असल्याने, अकोले सारख्या दुर्गम भागात डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी BLO ना मोठी कसरत करावी लागणार आहे.. त्यामुळे SIR पासून कुणीही वंचित राहू नये यासाठी आदिवासी तालुक्यांमध्ये SIR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी लहामटे यांनी केली आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top