icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मेळघाट में भीषण जलसंकट: नौ गाँवों को 20 टैंकर पानी, 6 हजार नागरिक प्रभावित

Amravati, Maharashtra:मेळघाटात भीषण पाणी टंचाई, नऊ गावांना 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा; 6 हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांमध्ये नैसर्गिक पाणीस्रोत आटल्याने प्रशासनाकडून तब्बल २० टँकरच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी खालावल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही पाणीटंचाई मेळघाटातील ९ गावांत गावात असून ६ हजार ७६ नागरिक टँकरवर अवलंबून आहे. सध्या चिखलदरा तालुक्यात २० टँकर कार्यरत असून विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक स्रोत आटले त्यामुळे वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी घटली आहे. मोथा, खडीमल, गोलखेडा बाजारसह ९ गावांचा या भीषण पाणीटंचाई समावेश करण्यात आला असून प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असून शासन काय उपाययोजना करते असा सवाल मेळघाटातील आदिवासी उपस्थित करत आहे.
0
0
Report

भंडारा के निजी पुलिस प्रशिक्षण केंद्र के 16 प्रशिक्षु भर्ती सफल, उत्साह का माहौल

Bhandara, Maharashtra:पोलीस भरतीत १६ प्रशिक्षणार्थ्यांची निवड; जल्लोषात यशाचा आनंद Anchor :- भंडारा येथील एका खाजगी पोलीस प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रातील १६ प्रशिक्षणार्थ्यांची नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत निवड झाली. यशाची बातमी समजताच केंद्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षक व पालकांनी अभिनंदन करत मिठाई वाटप केले. यावेळी डिजेच्या तालावर युवकांनी ठेका धरत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून परिसरातून निवड झालेल्या उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
0
Report

कोल्हापुर जिला परिषद में निधि बंटवारे पर सत्ता-विरोधी के बीच गरमाहट, 60-40 चर्चा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सम समान वाटणीची चर्चा असताना सत्तादारांकडून 60 40 सूत्रावर सहमती दर्शवल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगातून सुमारे 76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचे सम समान वाटप झालं पाहिजे अशी भूमिका विरोधी सदस्यांचे असताना, मिळालेल्या निधीतील वाटा सत्ताधाऱ्यांना अधिक देण्याच्या हालचाली सुरू असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

हाईकोर्ट ने कोपेश्वर मंदिर के संवर्धन पर विस्तृत अहवाल मांगा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर इथं असणाऱ्या कोपेश्वर मंदिर कामाचा अहवाल सादर करण्याचा आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. कोपेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2021 मध्ये जाहीर केलेल्या 101 कोटी रुपयांचा निधीचा प्रभावी वापर झाला नसल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या नसल्याचा मुद्दाही याचिकेत नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाशी संबंधित विभागांना कामाचा सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. मदत फाउंडेशनच्या माध्यमातून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर हे पुरातन आणि महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.... उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जन याचिकेत.
0
0
Report

गायब युवक का कंकाल मिलने के दो दिनों में पहचान, पुलिस ने पुष्टि

Akola, Maharashtra:बेपत्ता तरुणाचा सांगाडा सापडला, दोन दिवसांत ओळख पटवण्यात पोलिसांना यश.. अखोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडेलेल्या एका अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत यश आले आहे. हा सांगाडा सोपान धोंडबा खाडे (वय ३२ वर्षे, रा. हराळ, ता. रिसोड, जि. वाशीम) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी अनिकट पोलीस लाईनजवळ हा सांगाडा आढळून झाला होता. सोशल मीडियावरील माहिती आणि तपासाअंती मृताच्या भावाला बोलावण्यात आले. त्यांनी कपड्यांवरून आपल्या भावाची ओळख पटवली. सोपान खाडे हे उपचारासाठी अकोल्यात आले होते, मात्र तिथून ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र हे मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में नाबालिग के साथ अत्याचार, धर्मांतरण के दबाव; भीड़ ने आरोपी के घर जलाया

Jalna, Maharashtra:जालना : तरुणीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून धर्मांतासाठी दबाव, संतप्त जमावाने लावली आरोपीच्या घराला आग जालन्यातील भोकारदन तालुक्यातील एका तरुणीवर नऊ वर्षे अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच, संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती अल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. पुढे धर्मांतरासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संतप्त जमावाचे उद्रेक पाहता घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरोपीला फाशीची शिक्षा आणि कठोर शासन व्हावे यासाठी आज विविध सामाजिक तसेच हिंदू संघटनांनी आक्रोश मार्चाचे आयोजन केले आहे. गावातील हनुमान मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
0
0
Report

पळशी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में डॉक्टर समय पर नहीं पहुँचे, मरीजों को भारी परेशानी

Satara, Maharashtra:सातारा : कोरेगाव तालुक्यातील पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार समोर आला असून दुपारचे १२ वाजले तरी मेडिकल ऑफिसरच हजर नसल्याने रुग्णांना ताकरण्ट बसावे लागले. उपचारासाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाचे आरोग्यसेवेचे केंद्र मानले जाते. मात्र संबंधित आरोग्य केंद्रातच डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “मेडिकल ऑफिसरच वेळेवर येत नसतील तर रुग्णांकडे लक्ष कोण देणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

संगली महापालिका ने बिना निविदा नालेसफाई ठेका दिया? समाजसेवी संजय कांबळे ने आरोप लगाए

Sangli, Maharashtra:स्लग - महापालिकेच्या नालेसफाईचा ठेका वादात ! विना निविदा,पुन्हा ठेका दिल्याचा आरोप.. सांगली महापालिकाेकडून संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही नाले साफाई वादात सापडण्याची शक्यता आहे. विना निविदा महापालिकेकडून गतवेळच्या ठेकेदाराला,पुन्हा नाले सफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केला आहे. गतवेळीच्या ठेक्यामध्ये ठेकेदार असणाऱ्या कंपनीला अधिकच कोट्यावधी रुपयांचा बिल देखील वेगवेगळ्या हेड खाली देण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी देण्यात आलेल्या नालेसफाईच्या ठेक्याच्या चौकशी करून टेंडर काढून नालेसफाईचा ठेका देण्यात यावा अशी मागणी देखील संजय कांबळे यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में 60 साल बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज शुरू, जीआर जारी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याबाबत निघाला जीआर, सोलापूरकरांच्या 60 वर्षांच्या लढाल्या मोठे यश - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याचा मार्ग मोकळा - मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा ताबडतोब गुरुवारच्या दिवशी निघाला जीआर - जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याचा मार्ग अखेर मोकळा - तातडीने जीआर काढल्याबद्दल आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मानले आभार - शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलपुर दौऱ्यात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याबाबत केली शब्दपूर्ती
0
0
Report

प्रवीण तरडे का नया चित्रपट: नसरापूर प्रकरण से प्रभावित परिवारों को उम्मीद

Solapur, Maharashtra:सोलापुरात नसरापूर प्रकरणावरून अभिनेते प्रवीण तरडे पुन्हा एकदा संतप्त\n\n- देऊळ बंद - 2 चित्रपटाच्या ट्रिझर लॉन्चिंगवेळी नसरापूर प्रकरणावरून व्यक्त केल्या भावना\n\n- नसरापूर सारख्या प्रकरणांमध्ये दुर्दैवी बळी ठरलेल्या बालकांच्या पालकांना आशेचा किरण म्हणून नवा चित्रपट काढण्याची केली घोषणा\n\n- देऊळ बंद या चित्रपटाचे आणखी 11 भाग येणार असून यापैकी एका चित्रपटांमध्ये नराधमांना चेचण्यासाठी स्वतःहा स्वामी येणार आहेत\n\n- मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागं केलं\n\n- आता फिल्ममेकर म्हणून नराधमांना असे मृत्यू दिसतील की पुन्हा ते पाहून कोणी काही करण्याचे धाडस करणार नाही असा चित्रपट असेल\n\n- चित्रपटात नराधमांना शिक्षा देताना कायदा वगैरे काही नसेल तेव्हा स्वामीक्षा देईल आणि स्वामींची शिक्षा ही भयानक असते\n\n- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देऊळबंद - 2 या चित्रपटाचे ट्रिझर लॉन्चिंग वेळी प्रवीण तरडे यांचा आक्रमक पवित्रा
0
0
Report

जालना चंदनझिरा में धारदार हथियार से युवक की हत्या, पुलिस जांच शुरू

Jalna, Maharashtra:जालना : चंदनझिरा परिसरातील एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील एकता चौकात एका 35 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू आरसूड असे मयत तरुणाचे नाव असून तो चंदनझीरा भागात त्याची सासरवाडी आहे. माहेरी पत्नीला घेण्यासाठी तो चंदनझिरा भागात माहिती समोर आली आहे. आरसुड याचा सासरा आणि मेहुण्यासोबत वाद होता. अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. एकता चौक परिसरात आल्यानंतर हल्लेखोरांनी अडसूळ याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चंदनझिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top