icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष चयन के दौरान पुलिस ने पत्रकारों को रोका

Satara, Maharashtra:सातारा - आज देखील जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सातारा पोलिसांची आडमुट भूमिका पहायला मिळत आहे. सभापती पदाचा वृत्तंकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारती पर्यंत देखील जाऊ दिले जात नाही. मागे 20 मार्च ला देखील जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडी वेळी देखील याच पद्धतीने पोलिसांनी आडमुठ भूमिका घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. वास्तविक पाहता वृत्तांकना पासून पोलिसांनी पत्रकारांना रोखने इतपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report
Advertisement

वाशीम में गारपिट से टरबूज व कांदों की फसलें भारी नुकसान

Washim, Maharashtra:वाशीम जिले में काल झालेल्या गारपिटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाशीम तालुक्यातील केकत उमरा येथील शेतशिवारात बिजवाई कांदासह टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रीसाठी तयार असलेली टरबूज पिके गारांच्या तडाख्याने फुटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत असताना या गारपिटिने संकट अधिकच गडद केले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
0
0
Report

बीड़ के केज क्षेत्र में गारपात के साथ आंधी-बारिश, तेलंगाना में भी तूफानी मौसम

Beed, Maharashtra:बीड: केज परिसरात गारपीट तर, तेलगाव मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी ANC - बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले आहे. केज परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडालेली दिसून आलीय. गेल्या काही दिवसात होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले अनेक पिकं गेल्याचं पाहायला मिळाले.प्रामुख्याने यामध्ये आंबा,गहू ज्वारी यास भाजीपाल्याचाही समावेश आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.
0
0
Report

दिंडोरी कुएं में गाड़ी गिरने से 9 मौत, नातेवाईकों ने मालिक खिलाफ कार्रवाई मांग

Nashik, Maharashtra:विहिरी मालकावर कारवाई करा मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे मागणी नाशिकच्या दिंडोरी मधील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका विहिरीत चार चाकी वाहन पडून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय... ह्या मृत्यूमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त करत केलीये... चौफुलीत असलेल्या विहिरी भोवती कुठल्याही कडे बांधलेले नाहीत, जाळी बांधलेली नाही आणि कुठला ही बोर्ड ही लावलेला नाही... यामुळे नातेवाईकांनी विहिरी मालकावर आणि नगरपंचायतीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे... गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असून यावर दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केलाय... यामुळे विहिरी मालकावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक केलीये... यासंदर्भात अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में लक्ष्मी ऑरगॅनिक के खिलाफ महाआंदोलन, PFAS विरोधी मार्च 6 अप्रैल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लोकेशन - midc lote रत्नागिरीत पेटणार संघर्षाची मशाल!.. 'लक्ष्मी ऑरगॅनिक'विरोधात ६ एप्रिलला धडकणार महामोर्चा.. अँकर.. खेड तालুক्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील 'लक्ष्मी ऑरगॅनिक' कंपनीविरोधात आता जनक्षोभ उसळला आहे..मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या PFAS उत्पादनाविरोधात येत्या ६ एप्रिलला एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचकोशी पर्यावरण समितीच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारला गेला आहे.. केवळ रत्नागिरीच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांतील विविध संघटना आणि नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चाला पाठिंबा देण्याच्या सूचना केल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.. Bt उपोषणकर्ते.. Vs दिपक पाटील ( लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे वरिष्ठ उत्पादन विभाग उपाध्यक्ष)..
0
0
Report

अवकाली बारिश ने लातूर के टमाटर किसान बर्बाद, 1.5 लाख रुपए का नुकसान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांचे कंबरडे मोडले... खराब झालेले टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ... लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलंय… पण या पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना… अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे एका शेतकऱ्याने अक्षरशः रक्ताचं पाणी करून उभं केलेलं टोमॅटो पीक आता उकिरड्यावर फेकून दिले आहे.... दीड लाखांचा खर्च… दिवस-रात्र केलेली मेहनत… आणि मोठ्या आशेने घेतलंलं पीक… पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे…
0
0
Report
Advertisement

प्रकाश महाजन ने अंजलि दमानीया کی गिरफ्तारी और कॉल डिटेल्स کی जांच کی मांग की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंजली दमानियांना यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरात प्रकरणात आरोप केले आहे, याबाबत दमानिया याना अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.. दमानी यांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कोणी दिले याची चौकशी करा.. अंजली दमानिया या स्वतःला काय पोलीस महासंचालक समजतात का .त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात..हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.. असेही महाजन म्हणाले.. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला घोका आहे .. त्यांना कॉल डीटेल्स मिळतात कसे याची चौकशी करा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता आहे असेही महाजन म्हणाले...
0
0
Report

२१ लाख कर्ज के दबाव में २६ वर्षीय युवक ने छत्रपती संभाजी नगर में आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:२१ लाखांचे कर्ज काढून घेतलेला ट्रक चोरीला गेला... दीड वर्ष उलटूनही पोलिसांना तो शोधता आला नाही. मात्र, दुसरीकडे बँकेचे हप्ते फेडण्याचा तगादा सुरूच राहिला. या दुहेरी कोंडीत अडकून कर्जबाजारी झालेल्या २६ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजी नगरात   सुसाइड नोट लिहून आपली जीवनयात्रा संपवली. संदेश दिनकर गवळी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव  आहे,... संदेश हा आई-वडील, दोन भाऊ आणि बहिणीसह जयभवानीनगरमध्ये राहायचा. तो टँकरचा व्यवसाय करायचा. गुरुवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना त्याने नैराश्यातून विष प्राशन केले. ही माहिती समजताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान संदेशची प्राणज्योत मालवली.
0
0
Report

वाशीम के किसान दीपक वारकड ने जैविक खेती से खर्च घटाकर आत्मनिर्भरता दिखायी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील खरोळा येथील शेतकरी दीपक वारकड स्वयंपूर्ण व शाश्वत शेतीचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी बायोगॅस, सेंद्रिय खतनिर्मिती आणि एकात्मिक शेतीचा प्रभावी वापर करून खर्च कमी केला आहे. जनावरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करून घरगुتي इंधनाची गरज भागवली असून, त्यातून मिळणाऱ्या स्लरीचा वापर सेंद्रिय खतासाठी केला जातो. १६ एकर शेतीत फळबागा, भाजीपाला व नगदी पिकांद्वारे त्यांनी वर्षभर उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहेत. नैसर्गिक शेतीतून ते दरवर्षी सुमारे २० लाखांचे उत्पन्न मिळवत आत्मनिर्भर झाले आहेत. त्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक शेतकरी व विद्यार्थी भेट देत आहेत, कमी खर्चात शेती फायदेशीर करण्याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top