icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में चार नीलगायें कुएं में गिरीं, वनविभाग ने चारों को सुरक्षित बाहर निकाला

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील सुरकंदी शेतशिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या चार नीलगाई विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या नीलगाईंना बाहेर काढण्यासाठी twoर व जाळ्याच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. काही वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर वनविभागाला मोठे यश मिळाले असून, चारही नीलगाईंना सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
0
0
Report

हाथचलाखी से महिलाओं को धमकाकर शोषण: खरात के पुलिस के समक्ष खुलासे

Nashik, Maharashtra:चमत्कार-वशीकरण नव्हे, हातचलाखीने महिलांना धमकावल्याची दिली कबुली सूत्रांची माहिती... अँकर भोंदू खरात याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याची, 'दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए' अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात, ती केवळ आपली हातचलाखी असल्याचेही त्याने मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलय... खरातने पोलिस कोठडीत अनेक खुलासे केले. मात्र केलेल्या कृत्याचे समर्थन करताना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या 'ट्रिक्स'ला त्याने विज्ञानाचे नाव दिले आहे..मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले, ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचे त्याने मान्य केले. खरात आता कबुलीत वारंवार विज्ञान युगाचा संदर्भ देत आहे. जे काही केले, ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही क्लुप्त्या वापरून केल्याची कबुली खरातने दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये...
0
0
Report
Advertisement

जिला परिषद में विषय समितियों के सदस्य चयन अंतिम चरण में, 15 अप्रैल को सभा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १५ एप्रिलला विशेष सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नियमानुसार अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. जि. प.ची निवडणूक ५ फेब्रुवारीला झाली व ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर १८ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आणि २ एप्रिलला विषय समित्यांचे सभापती निवडले गेले. जि. प. अधिनियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष निवडल्यानंतर महिनाभराच्या आत सर्वसाधारण सभा घेऊन त्यात विषय समित्यांचे सदस्य निवडले जाणे अपेक्षित असते. स्थायी समितीचे सभापती हे अध्यक्ष असतात, सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, तर पंचायत समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. यात ८ जि. प. सदस्यांची निवड केली जाणार आहे
0
0
Report
Advertisement

जालना में 30 ई-बसेस जल्द शुरू होंगी: CM को भेजा गया प्रस्ताव

Jalna, Maharashtra:जालना | जालना शहरात ई-बसेस सुरू होणार जालना महापालिकेला मिळणार 30 ई-बसेस माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची माहिती अँकर | जालना शहरात महापालिकेच्या वतीने लवकरच ई-बसेस सुरू केल्या जाणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात ई बसेस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 30 ई -बसेस देण्याची मागणी मागणी करण्यात आली आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना पत्र लिहून जालना महापालिकेकडून प्रस्ताव बोलावून घेण्याचे निर्देश दिलेत.माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि महापौर वंदना मगरे यांनी जालना महापालिकेला ई-बसेस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.त्यानुसार नगरविकास विभागानं देखील हालचाली सुरू केल्यायत. त्यामुळे जालना महापालकेच्या परिवहन विभागात लवकरच या 30 ई-बसेस दाखल होणार आहेत.तर महात्मा फुले मार्केटच्या उभारणीसाठी सुद्धा 30 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून या मार्केटच्या उभारणीसाठी देखील 30 कोटींचा निधी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. बाईट : कैलास गोरंटयाल, माजी आमदार,जालना
0
0
Report

यवले में IPL-जैसा रोमांच: 16 टीमों के साथ समीर भुजबळ का खास प्रयास

Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नाने प्रकाश झोतामधील वाय.पी.एल या क्रिकेट स्पर्धांच्या सामन्यांचा थरार येवले करांना अनुभवायला मिळत आहे . एकूण 16 संघांनी यात सहभाग घेतला होता. साखळी सामन्यांना आता सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे या सामन्यासाठी महिलावर्ग देखील गर्दी करत असून आय पी.एल सुरू असताना वा.यपी.एल स्पर्धा पाहण्यासाठी तरुणाई देखील गर्दी करत आहे या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्थानिक यूट्यूब चैनल वर देखील करण्यात आले आहे
0
0
Report

अकोला में हनीट्रैप से लूट करने वाले गिरोह का Civil Lines पुलिस ने पर्दाफाश किया

Akola, Maharashtra:अकोल्यात हनीट्रॅपच्या माध्यमातून लूट करणाऱ्या टोळीचा सिव्हिल लाईन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने तरुणाला जाळ्यात ओढून त्याची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाअंती या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.या टोळीने अशाप्रकारे काहींना लुटण्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ सांडपाणी केंद्र में दिखावे के आरोप, बिल रोकने पर हंगामा

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिका के वडाळ गाव के 45 एमएलडी क्षमता वाले सांडपाणी प्रक्रिया केंद्र में पूरी क्षमता से चालू न रहते हुए बिल बकाये के आरोप लगाए गए। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले ने निरीक्षण किया और बिल थामने का निर्णय लिया। निरीक्षण के दौरान लैब में मौजूद ठेकेदार की संतान ने कुछ भी बताये बिना वहां से निकल गये। इन कारणों से ठेकेदार की अनियमितता पर प्रश्न उठे। वडाळ गाव में इस केंद्र को ओम इंडस्ट्रीज ठेकेदार को जनवरी 2026 से 2028 के लिए चलाने की मंजूरी दी गई है, जिसमें ठेकेदार को मासिक 8 लाख रुपये दिए जाते हैं, पर केंद्र अक्सर बन्द रहने की शिकायत की गई थी।
0
0
Report

चंद्रपुर नगरपालिका चुनाव: सुधीर मुंगंटीवार ने बीजेपी कार्यकर्ताओं को पार्टी में फिर शामिल करने की घोषणा

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची घोषणा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आ. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात पार पडला भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकदरम्यान जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये एबी फॉर्म वाटपावरून मोठा राडा झाला होता. एबी फॉर्म न मिळाल्यामुळे भाजपच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी अपक्ष किंवा इतर पक्षाच्या चिन्हावर महानगरपालिका निवडणूक लढविली होती. मात्र आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अशा भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची मोठी घोषणा केली.
0
0
Report
Advertisement

पटना में लक्ष्मी ऑर्गनिक कंपनी के खिलाफ भारी मोर्चा, पर्यावरण संरक्षण की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विराट विरोधात मोर्चा.. अँकर लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी व तिच्या पी फास उत्पादनाच्या विरोधात आज कंपनीवर मोर्चाचे काढला जातोय .. कोकण नागरी संघर्ष समिती लोटे,पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोर्चा काढण्यात आला आहे.. कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.. घातक रसायनांच्या उत्पादनावर तत्काळ बंदी पर्यावरणाला व मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प तातडीने बंद करावेत अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.. या मोर्चात महिला युवक व शेतकरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ विविध संस्था सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे..
0
0
Report

सांगली में एक दिन में तीन हत्या, कानून-व्यवस्था पर उठे सवाल

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात एका दिवशी तीन खुन झाले आहेत. कवलापूर मध्ये एक खून तर कुपवाड मध्ये दोन खून झाले आहेत. कवलापूर यात्रेमध्ये धक्का लागल्याने एका युवकाचा खून झाला. विश्वेस कल्लाप्पा सुतार वय 32 असे यात्रेतील खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर कुपवाडमध्ये घरामध्ये घुसून दगडू केंगार वय 55 या इसमाचा खून झाला. त्याचबरोबर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील एका देशी दारूच्या दुकानात एकाचा खून झाला. लावपाठ तीन घटनांमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या खुनाच्या घटनांमुळे पोलिसांची कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंڈवडे उडाल्याची टीका होत आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top