icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी पुलिस का डीजे-मुक्त गणेशोत्सव का आह्वान, 27 मंडलों के साथ बैठक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची बैठक जिल्ह्यात शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श घालून द्या ध्वनीवर्धकांचा वापर करताना आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा पाळण्याच्या सूचना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार बैठकीला रत्नागिरी शहरातील २७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग
0
0
Report

हिंदी मेंheadline: हिंजवड़ी पुणे में सड़क खड्डों और मेट्रो देरी पर IT कर्मियों की नाराज़गी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:हिंजवडी, पुणे मूलभूत सुविधांसाठी मोर्चा काढावा लागत असेल तर काय समजायचं... 20 उद्योगपती आणि 20 उद्योजक जात होते, तिथं त्यांना कचऱ्याची आणि रस्त्याची समस्या आहे. आता हीच समस्या हिंजवडीत आहे. आयटी सेक्टर जात असतील तर, पुन्हा नोकऱ्यांच काय? मेट्रो 2025 ला उद्घाटन होणार होत, आता उदघाटन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रखडल आहे. मुख्यमंत्री पुण्यात आले, पण इथं येऊन आयटी अभियंत्यांशी भेटले नाहीत. रस्त्यावर खड्डे सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यानी ठरवलं तर, सर्व मुद्दे एका दिवशी मार्गी लागतील. आधी मेट्रो सुरू करा. मीसिंगलिंक चा पहिला भाग पहा...100 वर्षांपूर्वी चा रस्ता वाटतोय खड्डयांबाबत ह्यांनी खिशे भरले आहेत, नागरिक रस्त्यावर... बापट यांना झालेली मारहाण चुकीची आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. हुकूमशाही सुरू आहे, ह्या सरकार च कुठलं इंजिन फेल झालं आहे. विशाखा राऊत यांचं, जात प्रमाण पत्र हे शिंदेंनीच रद्द केल आहे (घटममिद्यात) आम्ही कोर्टात जाणार आहोत. हा एकत्रित निर्णय आहे. आम्ही आयटीयन्स सोबत आहोत..उद्याही असू...
0
0
Report
Advertisement

कोयना डैम के वक्र दरवाजे आज पूरी तरह बंद; नदी किनारे गांवों के लिए सतर्कता जारी

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज : कोयना धरणाचे वक्र दरवाजे पूर्णपणे बंद; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम.. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दोन वक्र दरवाजे आज दुपारी १२ वाजता पूर्णपणे खाली आणून सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे.. सध्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे कोयना नदीपात्रात १,०५० क्यूसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र,पाणलोट क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग पुन्हा वाढवला जाऊ शकतो,त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पात्रात उतरू नये असे आवाहन करत स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभागाने दिले आहेत..
0
0
Report

वाशिम के मालेगाव में चोरी की कोशिश, सीसीटीवी फुटेज में पकड़ा गया आरोपी

Washim, Maharashtra:वाशिम : अँकर:वाशिमच्या मालेगाव शहरात पहाटे पाचच्या सुमारास चोरीच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. मुस्लिम वस्तीत चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याला नमाजसाठी उठलेल्या कुटुंबीयांनी पाहिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग केला. चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या. घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. यावेळी शेतातील पिकांच्या आड लपलेल्या सोनू हुसैन इकबाल हुसैन आरोपी ला पोलिसांनी पकडलं. आरोपी मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या आझाद नगर येथील रहिवासी असल्याचं समोर आलंय. मालेगावसह परिसरात आणखी चोरीच्या घटना केल्या आहेत का,याचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
0
0
Report

गडचिरोली में गणेशोत्सव शांतिपूर्ण, पुलिस ने संवाद बैठक के बाद सुरक्षा व्यवस्थाएं तय कीं

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे करण्यात आले. संवाद बैठकीला जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच सामाजिक सलोखा याबाबत sविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. अशा प्रकारची माहिती आढळून आल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आणून द्या, याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या कालावहीत नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असून, गडचिरोली पोलीस दलाकडून संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी गणेश मंडळांनी गडचिरोली पोलीस दलाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

नाना पटोले बोले: सरकार ने उद्योगपतियों का कर्ज माफ किया, किसानों के नाम पर धोखा

Bhandara, Maharashtra:लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेांचा सरकारवर हल्ला Anchor राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च केल्याची तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात केली जाते. मात्र, सरकारने कथितरित्या दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याची जाहिरात सरकारने कधी केली का? असा सवाल उपस्थित करतानाच ‘लाडक्या बहिणिंना बेईमान भावांनी फसविले’ असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे हनुमान चालीसा पठण व श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना पतोले म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगते, तसेच लाडक्या बहिणीना १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांतून केली जाते. मात्र, दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याचे सांगितले जाते. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जासाठी दहा-बारा वर्षे वापरता आली असती, असे त्यांनी म्हटले.‘त्या दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याची जाहिरात टीव्हीवर दाखवली का? तुम्ही पाहिली का?’ असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. ‘लाडकी बहीण’ योजनेवरही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडून बहिणींना मिळणाऱ्या विविध योजनांपैकी अनेक योजना एक-एक करून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत, ‘हे बेईमान भाऊ आहेत, बहिणीचे सख्खे भाऊ नाहीत. लाडक्या बहिणींच्या नावाने या बहिणींना फसविले,’ अशी टीका नाना पटोले यांनी सरकार वर केली.
0
0
Report

नेवाशा में हिंदू जनआक्रोश मोर्चे पर पुलिस ने अनुमति नहीं दी, तनाव बना

Shirdi, Maharashtra:नेवाश्यात हिंदू जनआक्रोश मोर्च्यादरम्यान गोंधळ. जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी. शहरातून पोलिस प्रशासनाने मोर्चा काढू न दिल्याने आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. हिंदुत्ववादी आ. गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारे यांना पोलिस प्रशासनाची मोर्चा न काढण्याची विनंती. शहरात तेढ निर्माण होऊ नये यामुळे शहरातून मोर्चा काढू नका - पोलिस प्रशासनाची भूमिका. अर्धा तास आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जाहीर सभा सुरु. काही वेळ नेवाश्यात तणावाचे वातावरण. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. नवीन मार्गाच्या मागणीसाठी मागितलेली परवानगी नाकारली. पूर्वी दुसऱ्या मार्गाने परवानगी दिली होती पोलिसांनी परवानगी
0
0
Report

नेवासा में अतिक्रमण विरोधी मोर्चा, हिंदू आक्रोश के साथ दोषियों पर कार्रवाई की मांग

Shirdi, Maharashtra:Anc - अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज नेवासा येथे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मारहाणीच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे.या मोर्चाला हिंदुत्ववादी नेते आ.संग्राम जगताप, आ.गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नेवासा शहरातून निघणाऱ्या या मोर्चाचा नगरपंचायत चौकात समारोप होणार आहे.विशेष म्हणजे, या मोर्चाच्या समारोपावेळी प्रमुख नेते नेमकी काय भूमिका मांडतात..? मोर्चा सुरू होण्य अगोदर हिंदुत्वादी संघटनांनी मोठी गर्दी या मोर्चासाठी केल्याचं बघायला मिळत आहे... हिंदूजनआक्रोश मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

लातूर में पुलिस प्रताड़ना से महिला ने आत्महत्या, परिवार ने आरोपीयों से कार्रवाई की मांग

Latur, Maharashtra:लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा गावात धक्कादायक घटना घडली आहे... पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे... महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून, दोषी पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे... याच मागणीसाठी नातेवाईकांनी औसा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे... सध्या हे आंदोलन सुरू असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. रात्रीपासूनच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
0
0
Report

क्लस्टर मुद्दे पर शिंदे बनाम गणेश नाइक का संघर्ष तेज, बड़े घर का वादा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत दहीहंडी निमित्त क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणसोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देत तेथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्लस्टर वर भाष्य केलेय. तुम्हाला हक्काची मोठी घरे दिल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. मोठं घर देण्याचं पुंण्याचं काम केलं पाहिजे. मोठं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार करेल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे क्लस्टर वरून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
0
0
Report

No hospital access on tough roads, now another woman’s death

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top