icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर में सावजी समाज ने तुकाराम मुंढे से माफी मांगने के लिए प्रदर्शन किया

Nagpur, Maharashtra:तुकाराम मुंढे यांनी सावजी हलबा समाजाची माफी मागावी, त्यांनी एकदा तरी गोळीबार चौकात यावं, आमच्या घरी जेवण करावं, त्यानंतर बोलावे अशी शब्दात नागपूरात सावजी म्हणजेच हलबा समाजाने तुकाराम मुंढे यांना खुला चॅलेंज दिला आहे. सावجي समाज गेले अनेक वर्ष सावजी मसाल्याची निर्मिती करत आहे. सावजी पूर्णपणे घरगुती मसाला असून त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. त्यामुळे सावजी मसाला आणि जेवणाबद्दल तुकाराम मुंढे यांचा वक्तव्य सावजी समाजाचा अवमान करणारे आहे. तुकाराम मुंढे यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी सावजी समाजाने केली आहे. आज नागपूरातील गोळीबार चौकावर सावजी समाजाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या आया बहिणींनी वर्षानुवर्षे मेहनत करून विकसित केलेलं सावजी मसाला तुकाराम मुंढे यांनी बदनाम केल्याचा आरोप केला. तुकाराम मुंढे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. एवढंच नाही तर सावजी समाजाच्या वतीने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रारही देण्यात येणार आहे.
0
0
Report

पुणे-नाशिक महामार्ग पर भीषण ट्रक दुर्घटना, यातायात ठप्प; देखें क्या हुआ

Chakan, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर मोडून विरुद्ध दिशेला गेला आणि पुणेाच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला. या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली वेगन-आर कार दबली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील वाकी जवळ हा अपघात सकाळी सव्वासहाच्या sुमारास झाला. कंटेनर पुणे लेनवर आल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प आहे; नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहचले असून अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
0
0
Report
Advertisement

डॉ अनिल काकोडकर: कोकण के शिक्षण को देगा नया फ्रेमवर्क

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: डॉ. अनिल काकोडकर पद्मविभूषण, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर की भूमिका कोकण में शिक्षा के फ्रेमवर्क पर केंद्रित है। कोकणाला मोठा शैक्षणिक वारसा; रत्नागिरीने देशाला अनेक विचारवंत दिले – डॉ. अनिल काकोडकर श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठामुळे कोकणातील शिक्षणाला नवे फ्रेमवर्क – डॉ. काकोडकर कोकणातील विचार अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यापीठ महत्त्वाचे ठरेल – डॉ. काकोडकर मानवी क्षमता आणि आकलन किती वाढले, याचे भान ठेवणे आवश्यक – डॉ. काकोडकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात प्रदूषणाचा मुद्दा नाही – डॉ. काकोडकर ‘न्यूक्लिअर एनर्जी इज अ क्लीन एनर्जी’ – डॉ. अनिल काकोडकर जैतापूर प्रकल्पातील फ्रेंच तंत्रज्ञानाची किंमत जास्त; विजेची किंमत आटोक्यात असणे आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परीक्षा पद्धतीत वापर झाल्यास पेपरफुटी रोखता येईल – डॉ. काकोडकर प्रगत तंत्रज्ञान परीक्षा पद्धतीत का वापरले जात नाही, हे कळत नाही – डॉ. काकोडकर ‘एज्युकेशन करायचंय की बिझनेस, हे आधी ठरवावं लागेल’ – डॉ. काकोडकर विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केले, हे तपासण्यासाठी परीक्षा महत्त्वाची – डॉ. काकोडकर शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगले असेल तर परीक्षणाबाबत प्राध्यापकांना निर्णय घेऊ द्यावा शिक्षण व्यवस्थेत विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे – डॉ. अनिल काकोडकर
0
0
Report

नागपुर में ऑनलाइन दोस्ती से नाबालिग के साथ गैंगरेप जैसी वारदात, आरोपी गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी अवस्थेत दिघोरी परिसरातील एका घरातून मिळाली आहे... तिच्या हातावर चाकूची गंभीर जखम असून शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा ही आढळल्या आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाण्यातील निर्भय उर्फ आकाश पाखरे या 19 वर्षीय तरुणाने मुलीला दिघोरी परिसरातील त्या खोलीत बोलावून जखमी केले आणि तिच्यासोबत बळजबरी ही केली... निर्भय पाखरेची पीडित अल्पवयीन मुली सोबत तीन वर्षापासून ऑनलाइन ओळख होती... त्याच ओळखीतून दोघांमध्ये मैत्री जुळली होती... दोन ऑगस्ट रोजी निर्भय पाखरेने पीडित मुलीला भेटायला बोलावले होते... दोन ऑगस्ट च्या संध्याकाळपर्यंत पीडित मुलगी मोबाईल द्वारे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि मी मैत्रिणीकडे आहे असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते... मात्र 2 ऑगस्ट चे रात्री तिचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर कुटुबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी दोन आणि तीन ऑगस्ट च्या मध्यरात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली... बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केलं... मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपी निर्भय पाखरे आणि पीडित मुलगी दिघोरी परिसरात असल्याचे पोलिसांना प्राथमिकरित्या कळले होते... पोलीस त्या भागात शोध घेत असताना एका झोमॅटो डिलिव्हरीवर शोध पथकातील पोलिसांचा संशय बळावला... पोलिसांनी ती डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो बॉय ला विश्वासात घेऊन घराचा पत्ता विचारल्यावर आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला... झोमॅटो डिलिव्हरी बॉय च्या मदतीने पोलीस पथकाने जेव्हा त्या घराचा दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत होती... आरोपी तरुणाने तिच्या हातावर चाकूने गंभीर वार केल्याचे आणि गेल्या काही तासात वारंवार तिला मारहाण केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले... पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती धोक्या बाहेर आहे... पोलिसांनी आरोपी निर्भय पाखरेला अटक केली असून तो ठाण्यातील एका अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील मुलगा असल्याचे समोर आले आहे... निर्भयने पीडित मुलीला जखमी करण्यासाठी वापरलेले चाकू आणि मारहाण करण्यासाठी वापरलेल्या इतर वस्तू ठाण्यातूनच सोबत आणल्या होत्या की नागपुरात आल्यानंतर खरेदी केल्या याचा तपास पोलीस करत आहे... एवढेच नाही तर कोणत्याही ओळखी शिवाय त्याने नागपुरात खोली भाड्यावर कशी घेतली याची चौकशीही पोलिसांकडून केली जात आहे...
0
0
Report

सोलापुर में देवेंद्र फडणवीस को सोलापुरी चादरी से विशिष्ट सम्मान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला विशेष सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूरकरांच्या वतीने अनोखी भेट. सोलापुरी चादरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो साकारत त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा करण्यात आला उल्लेख. आ. देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट. सोलापुरी चादर आणि त्यावरील कल्पकता पाहताच मुख्यमंत्र्यांनी केले समाधान व्यक्त
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में CJP की कोर कमिटी बैठक शुरू, आंदोलन की रणनीति तय

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पासून CJPच्या कोअर कमिटीची सीजेपीची २ दिवसीय बैठक आहे, या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगण्यात येताय, अभिजीत दीपकेच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी सौरभ दास आणि CJP चे सहकारी संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी रात्रीच दाखल झालेत. या बैठकीत CJPची पुढील दिशा, ध्येय-धोरणे आणि आंदोलनाबाबतची भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे. सोबतच सीजेपीचे काही लोक देशभर दौरा करणारे या दौऱ्याची आखणी सुद्धा या बैठकीत होणार आहे दरम्यान ही सगळी लोकं अभिजीतच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने औक्षण करून सगळ्यांचे स्वागत केले
0
0
Report

ठाणे महापालिका के नौ विभाग अध्यक्ष निर्वाचित; मुंब्रा में भगत की जीत

Thane, Maharashtra:Thane flash ठाणे पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान; मुंब्र्यात बिनविरोधची परंपरा खंडित,राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी... Anchor:- ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीत आठ प्रभाग समित्यांवर अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असून, मुंब्रा प्रभाग समितीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी झाल्या आहेत.ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेल्या अध्यक्षांमध्ये वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर येथे निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी येथे मिनल संख्ये, वर्तकनगर येथे जयश्री डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा येथे सिद्धार्थ ओवळेकर, उथळसर येथे नारायण पवार, कळवा येथे विजया लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांचा समावेश आहे.मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 'एमआयएम'चे अन्साशी नफीस अहमद आणि 'राष्ट्रवादी'च्या (शरद पवार गट) दिपाली भगत यांच्यात लढत झाली. यात दिपाली भगत यांना १०, तर अन्सारी यांना ४ मते मिळाल्याने भगत यांना विजयी घोषित करण्यात आले. या सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
0
Report

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील के निधन पर कोल्हापुर में राज ठाकरे ने श्रद्धांजलि दी

Kolhapur, Maharashtra:पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९१वर्षी निधन झाले. राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरातील कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
0
0
Report
Advertisement

भेसळ दूध पर कार्रवाई से ग्रामीण अर्थव्यवस्था में उछाल

Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू झालेल्या कठोर कारवाईचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम आता ग्रामीण अर्थकारणावर दिसू लागलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर ग्राहकांचा कल पुन्हा दर्जेदार आणि शुद्ध दुधाकडे वळला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे, इतकंच नाही तर दुधाळ म्हशी आणि गायींच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. भेसळीच्या दुधावर तुकाराम मुंढे याची कारवाई, शुद्ध दुधाची वाढली मागणी. दुधाळ जनावरांच्या किमतीत मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाला नवी संजीवनी. मुऱ्हा आणि जाफराबादी म्हैशीच्या किमतीत तब्बल 40 ते 50 हजाराची वाढ. दुधाचे दर स्थिर राहिले आणि शुद्ध दुधाला अशीच मागणी कायम राहिली तर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय पुन्हा एकदा फायदेशीर ठरू शकतो. अनेक तरुणही शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे. एका कारवाईमुळे फक्त भेसळ रोखली गेली असं नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच नवं चैतन्य मिळालं आहे. पण त्याचा फारसा आर्थिक फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाहीये, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी करत आहेत. जनावरांच्या खरेदी-विक्रीपासून पशুখाद्य, औषधे, वाहतूक आणि दुग्ध संकलन केंद्रांपर्यंत संपूर्ण साखळीला याचा आर्थिक लाभ होत आहे. परंतु प्रत्यक्षात फायदा शुद्ध दुधाची निर्मिती करणाऱ्याला झालेला दिसत नाही.
0
0
Report

91 वर्ष की आयु में डॉ. डी. वाय. पाटील का निधन; कोल्हापुर में अंतिम दर्शन और अंतिम संस्कार की तैयारी

Kolhapur, Maharashtra:देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. शिक्षण, राजकारण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची ओळख देशभर होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कोल्हापूरातील यशवंत निवास या निवासस्थानी नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. उद्या 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास, कसबा बावडा इथ त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजाता अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरातील लाईन बाजार इथल्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0
0
Report

भारत में बच्चों के लिए अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड द्वारा स्वास्थ्य जोखिम: अमेरिकी अध्ययन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बाजारात लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या अनेक पॅकेज्ड खाद्यपदार्थांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासानुसार, ६ ते ३६ महिन्यांच्या मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या तब्बल ८१ टक्के खाद्यपदार्थांचा समावेश 'अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड' या प्रकारात होतो. एवढेच नव्हे, तर जवळपास निम्मे पदार्थ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पोषण निकषांवरही अपुरे ठरले आहेत. हे संशोधन तूर्तास फक्त अमेरिकेत झाले असले तरी जगभरात असलाच प्रकार होत असल्याचे पुढं आलं आहे त्यामुळं हे पदार्थ तुम्ही खात असाल वा मुलांना देत असाल तर सावधान प्रोसेसस्ड अन्न पदार्थ खाताय सावधान प्रोसेसस्ड अन्न पदार्थमुळे अनेक आजारांना आमंत्रण लहान मोठे सगळ्यांना आजाराचा गंभीर धोका लहान मुलं पाकिटातील पदार्थ खातात आता घरोघरी प्रोसेस फूडचे पाकिटे येतात मात्र हे सगळे पदार्थ खायला जरी चांगले वाटले तरीसुद्धा हे तुमच्या आरोग्याला अपायकारक आहे सातत्याने या पदार्थांबरोबर जागरूकता केल्यावरही हे पदार्थ खाण्यात वाढ झाली आहे आणि त्यामुळे हे पदार्थ खाणे हा थेट जीवाशी खेळ असल्याचं आता पुन्हा एकदा नव्याने पुढे आलाय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरातील २१ किराणा दुकानांमधील २,७८३ पॅकेज्ड टॉडलर फूड उत्पादनांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये फळांचे पाउच, मॅकरोनी अँड चीज, ओट बार्स, चीज पफ्स, पीनट बटर पफ्स यांसारख्या उत्पादनांचा समावेश होता. संशोधनात काय आढळले? १७% उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त होते. २५% उत्पादनांमध्ये सोडियम (मीठ) अधिक होते. ११% उत्पादनांमध्ये चरबीचे प्रमाण शिफारशीपेक्षा जास्त होते. १२% उत्पादने आवश्यक ऊर्जा घनतेच्या निकषांवर अपयशी ठरली. अनेक पालकांचा असा समज असतो की लहान मुलांसाठी विकले जाणारे सर्व पदार्थ पोषणदृष्ट्या सुरक्षित असतात. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने पॅकेजवरील घटक आणि पोषणमूल्यांची माहिती काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, आयुष्याच्या पहिल्या एक हजार दिवसांतील आहार हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जास्त साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळं लहान पानापासून मधुमेह, रक्तदाब असले आजार बळावत आहेत..", लठ्ठपणा आणि वजन वाढणे: अल्ट्रा-प्रोसेसेड अन्नामध्ये पोषकतत्त्वे अतिशय कमी आणि 'एम्प्टी कॅलरीज' जास्त असतात. यामुळे भूक पटकन भागते पण काही वेळातच पुन्हा भूक लागते, ज्यामुळे ओव्हरईटिंग होते. हृदयविकाराचा धोका: या पदार्थांमधील ट्रान्स फॅट्स आणि अतिप्रमाणातील मीठ मुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढतो. टाइप-२ मधुमेह : प्रोसेसेड पदार्थांमध्ये रिफाईन्ड साखर व मैद्याचा वापर जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते व 'इन्सुलिन रेझिस्टन्स' तयार होतो. पचनसंस्थेचे आजार: प्रक्रिया दरम्यान अन्नातील नैसर्गिक फायबर निघून जातात. यामुळे बद्धकोष्ठता , ॲसिडिटी आणि आतड्यांचे आरोग्य बिघडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. थकवा आणि मूड स्विंग्स: अशा अन्नामुळे शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते, पण थोड्याच वेळात ऊर्जेची पातळी खालावते . यामुळे दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report
Advertisement

अनिल देशमुख मामले में NIA चार्जशीट पर सवाल, परमवीर सिंह को नाम से बाहर रखने पर बहस

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - अनिल देशमुख, माजी गृहमंत्री - चार वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फ़ोटके बॉम्ब ठेवण्यात आले. त्यावेळी तपास केला. मी गृहमंत्री होतो. ATS ने जेव्हा तपास केला, त्यावेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाइंड असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर शंभर कोटींचे आरोप लावले. त्यानंतर हा तपास ATSकडून NIA कडे तपास गेला. NIAच्या तपासात अनेक पुरावे मिळाले. - मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही बोलताना सांगितले की, NIA नेही परमवीर सिंग बाबत सर्व पुरावे असतानाही आरोपी केले नाही. मुंबई पोलीस आयुक्त असताना त्यांनी आपल्या कार्यालयातून कारस्थान केले. परमबीर सिंग यांच्या विरुद्ध इतके सारे पुरावे असतानाही... NIA ने चार्जशीट दाखल करताना आरोपी म्हणून परमवीर सिंग यांचं नाव नाही हे आश्चर्यकारक आहे? परमबीर सिंग यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? याचा तपास होणे आवश्यक आहे. - पोलीस घोटाळा.. समता नगर PS - अतिशय आश्चर्य वाटते की, अशा पद्धतीने पोलीस नसतानाही वेतन देण्यात आले. ही अत्यंत गंभीर प्रशासकीय बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची गृहखात्याने चौकशी केली पाहिजे. पोलीस खात्यात नसतानाही पगार देण्यात आला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस खात्यात भरतीसाठी आमचे तरुण मेहनत घेतात, परीक्षा देतात आणि नियुक्तीची वाट पाहतात. मोठ्या प्रमाणात नवीन भरतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत पोलीस नसतानाही पगार देण्यात आला असेल, तर त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. - डी. वाय. पाटील यांच्या निधन (शोक संवेदना) - डी. वय. पाटील यांनी त्रिपुराचे आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले. तसेच महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे कार्य केले. महाराष्ट्राबाहेरही त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो.
0
0
Report

अभिजीत दीपके को Z+ सुरक्षा देने की मांग, हत्या के खतरे की आशंका

Nagpur, Maharashtra:अभिजीत दीपके यांना झेड प्लस सुरक्षा द्या.. त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे सारखी हत्या होऊ शकते... राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कास्ट्राईब महासंघाने केली मागणी.... कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सी जे पी चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या जीविताला धोका आहे... त्यांचीही डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते.. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी "महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ"ने केली आहे.... अभिजीत दिपके फक्त शिक्षण क्षेत्रातील घोटाळे आणि भ्रष्टाचार बद्दल आवाज उचलत नाही आहे, तर ते शिक्षण क्षेत्रात अपेक्षित व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्नरत आहेत... यापूर्वीही ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न केले, त्यांची हत्या करण्यात आली डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखीच अभिजीत दिपके यांचीही हत्या होऊ शकते असं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे... त्यामुळे महासंघाने राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राच्या गृह विभागाला पत्र पाठवून दिपके यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे... दिपके आज लाखो लोकांच्या अपेक्षांचे प्रतिनिधी बनले आहे... अशात त्यांची सुरक्षा महत्त्वाची असून दिल्लीतील जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर त्यांना धमक्या मिळत आहे.. त्यामुळे सरकारने दीपके यांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घ्यावा आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विदर्भ अध्यक्ष अरुण गाडे यांनी केली आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top