icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण के खड्डों पर कांग्रेस का जोरदार प्रदर्शन; ठेके में 25.70 करोड़ का सवाल

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील खड्ड्यांमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये चिखल टाकून कमळ अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर केडीएमसी मुख्यालयाचे गेट बंद करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखल टाकून त्यात कमळ लावण्यात आले. तसेच अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे फोटो असलेले बॅनर व खड्डे भरा असे फलकही आंदोलनात झळकले. महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी ७० लाख रुपयांचे ठेके दिले असतानाही पावसाळ्यापूर्वी कामे झाली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर खडी डांबर टाकून अधिकाऱ्यांचे येणे-जाणे बंद करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे. बाईट, नवीन सिंग, जिल्हाध्यक्ष काँग्रेस,
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी की बाढ़ ने Wai शहर के महागणपती मंदिर को पानी में डुबो दिया

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा नदीला पूर आला आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरातील ऐतिहासिक महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गणरायाच्या मूर्तीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. तसेच कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहेत. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जांभळी धरणही शंभर टक्के भरले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी नदीपात्र आणि पुलांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

रोहित पवार ने चंद्रकांत पाटिल के फिंगरप्रिंट दावों पर तीखा हमला

Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार ऑन चंद्रकांत पाटल: दिल्लीतील दगडफेक प्रकरणात केलेल्या वक्तव्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. फिंगरप्रिंट आणि तंत्रज्ञानाबाबतच्या दाव्याची खिल्ली उडवत, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना प्रशिक्षण द्यावे, इतकेच नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही हे तंत्रज्ञान शिकवावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपरोधिक निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, दिल्लीतील दगडफेकीनंतर रस्त्यावर पडलेल्या प्रत्येक दगडावरील फिंगरप्रिंट तपासून आरोपी शोधता येतात, असे जर चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसाठी मार्गदर्शनाची मालिका सुरू करावी. गृहमंत्र्यांना गृहविभागाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर ती जबाबदारीच चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेत जाऊन ट्रम्प आणि तेथील प्रशासनालाही हे फिंगरप्रिंट तंत्रज्ञान शिकवावे अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांमध्येही हेच फिंगरप्रिंट लॉजिक वापरून दोषींना शोधून दाखवावे असे टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. रोहित पवार ऑन विद्यार्थिनी आत्महत्या: नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सरकारवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नीट पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, आत्महत्येच्या नोंदीत नीटचा उल्लेख टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत तिने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी आई-वडील किंवा भावाला जबाबदार धरू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात पेपरफुटी होणार नाही, यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत, आत्महत्येच्या प्राथमिक नोंदीत नीटचा उल्लेख करण्यात आलेला नसून तो टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार ऑन शिवेंद्रराजे भिसले: साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवेंद्रराजे हे स्वभावाने चांगले मंत्री असले तरी दबाव आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही ते म्हणाले. मंत्र्याशी जुना परिचय असून त्यांच्या परिवाराबद्दल आदर असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी टीकेची सुरुवात केली. मात्र साताऱ्यात नुकत्याच घडलेल्या कथित सोसायटी ठराव प्रकरणात दबाव आणि गुंडांचा वापर करून ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपसोबत गेल्यावर अशा घटनांचा हा निर्णय शिवेंद्रराजेंचा होता की तिच्या पाठीमागे भाजप नेत्यांचा सल्ला होता याबाबत आपण काही ठाम बोलू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे, मात्र दबावाचे राजकारण करून निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत अशा पद्धतीला लोकांची मान्यता नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
0
0
Report
Advertisement

28 साल बाद गिरफ्तार: जोगेश्वरी पुलिस ने 1998 के आरोपी उमेश गौंडर को पकड़ा

Mumbai, Maharashtra:मुंबईतील जोगेश्वरी पोलिसांनी तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्यात १९९८ साली गुन्हा क्रमांक १०७/१९९८ अंतर्गत घरात घुसखोरी, फसवणूक, मालमत्तेचे नुकसान आणि चोरीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी उमेश मुत्तुस्वामी गौंडर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात अंधेरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता. दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या समन्स वॉरंट पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी डोंबिवली परिसरात राहत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन हजार रुपयांचा दंड, दहा हजार रुपयांच्या रोख जामिनावर आणि पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
0
0
Report

साकीनाका पुलिस ने वर्षों से फरार आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी को गिरफ्तार किया

Mumbai, Maharashtra:मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात २०१० मध्ये गुन्हा क्रमांक ५४९/२०१० अंतर्गत जमावबंदीचे उल्लंघन, शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील सपकाळे नाका परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
0
0
Report

गडचिरोली पुलिस की मदद से लाहेरी में रोगी का हेलीकॉप्टर से तात्कालिक मेडिकल ट्रांसफर

Chandrapur, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील रुग्णाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ वैद्यकीय स्थलांतर, जिल्हा रुग्णालयात दाखल, तातडीच्या हालचालींमुळे वाचला जीव. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच भामरागड तालुक्यातील मौजा लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी ( 35 ) यांची प्रकृती विषबाधा अथवा सर्पदंश कारणाने गंभीर झाली. मदतीची माहिती मिळताच त्यांना तातडीने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गडचिरोली पोलीसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले. शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

पानी के लिए आमरण उपोषण: रत्नागिरी के कुटगिरी-येडगेवाडी में नया गतिरोध

Ratnagiri, Maharashtra:कुटगिरी-येडगेवाडी पाण्यासाठी आमरण उपोषण; चर्चahi निष्फळ, संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी-येडगेवाडी येथील धनगर समाजाच्या पाच कुटुंबांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी देवरुख पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शासकीय विहिरीवरून टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन तोडल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.दरम्यान,उपसभापती,प्रभारी गटविकास अधिकारी,सरपंच तसेच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कुटगिरी-येडगेवाडी गावात जाऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यानंतर उपोषणकर्त्याशी पहाटे सहा वाजेपर्यंत चर्चाही झाली.मात्र,कोणताही समाधानकारक तोडगा निघाल्याने उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

धुले में तीव्र वर्षा से बाढ़, कन्नेर नदी में पिता-पुत्र लापता

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात पाऊसाने हाहाकार माज्वला आहे. आंबोडे येथे कन्नेर नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेल्याची घटना समोर आली असून, त्यांना शोधाण्याचे कामं सुरु आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातील आंबोडे गावात कन्नेर नदीला आलेल्या पुरामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. नदीकाठावर असलेल्या श्रीराम नाश्ता सेंटर या दुकानातील पिता-पुत्र पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्यांची नावे आनंदा पारखे (वय ६०) आणि त्यांचा मुलगा दिनेश आनंदा पारखे (वय २५) अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

प्याज की कीमतों में गिरावट: सरकार की खरीद योजना फर्जी, किसान परेशान

Lasalgaon, Maharashtra:एकीकडे शासकीय कांद्याच्या दरात 210 रुपयांची वाढ होईल 2335 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी सुरू असताना दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारच्या तुलनेत आज शुक्रवारी कांद्याच्या जास्तीत जास्त घरात दीडशे रुपये द्यायची घसरण होत कांद्याचे दर 2470 रुपयांपर्यंत खाली आले तर सरासरी कांद्याला दोन हजार रुपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे श्रीलंका आणि आखाती देशात अद्यापही कांद्याला मागणी नाही तसेच देशांतर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिना सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीत घट झाली असत मुळे कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहे तर शासकीय कांदा खरेदी फसवी योजना असून तीन हजार रुपये भावंतर योजना जाहीर करत केंद्र व राज्य सरकारने बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कांद्या च्या बाजारभावातील फरक द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
0
0
Report

चंद्रपूर समेत राज्य में ड्रग्स व साइबर क्राइम पर गृहमंत्री ने लिया आढ़ावा

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूरसह राज्यात ड्रग्ज व्यापार और सायबर गुन्हे आहेत महत्वाचे मुद्दे, जिल्ह्यातील गुन्हे विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली आढावा बैठक अँकर:-- राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गृह विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील गुन्हे स्थिती आणि अनुषंगिक बाबींचा आढावा घेतानाच त्यांनी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने गेल्या काही काळात ड्रग्ज व्यापार आणि सायबर विषयक गुन्हे कमी करण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती घेतली. देश व राज्यातही ड्रग्ज व्यापार आणि सायबर गुन्हे हे महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंदर्भात प्राथमिकता दिली जात असल्याचे भोयर म्हणाले. बाईट १) पंकज भोयर, गृहराज्यमंत्री
0
0
Report

कोकण के कुंभार्ली घाट पर खड्डों का कहर, यात्रियों की जिंदगी खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कुंभार्ली घाटाची ‘चाळण’! कोट्यवधींचा निधी खड्ड्यांत; कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क धोक्यात!.. कुंभार्ली घाटात सध्या प्रवाशांचा प्रवास अक्षरशः 'जीवघेणा' ठरतोय! कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गाची भीषण चाळण झाली असून, रस्त्यावर तब्बल पाच ते सात फुटांचे अवाढव्य खड्डे पडले आहेत.. मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात घडत आहेत. प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून या मृत्यूच्या सापळ्यातून प्रवास करावा लागतोय.. प्रशासकीय हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा थेट फटका सामान्य प्रवाशांना सोसावा लागतोय.. आता प्रश्न हाच उपस्थित होतोय की,एखादा मोठा अपघात होऊन बळी जाण्याची प्रशासन वाट पाहतंय का?.. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top