icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ नगरपालिका पर वंचित बहुजन आघाडी के नगरसेवक ने स्वखर्च दवा छिड़काव शुरू किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषदकडून शहरातील स्वच्छता कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नीरज वाघमारे यांनी स्वखर्चातून प्रभागात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात मोकळ्या मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व झाडी झुडपे वाढलेली आहेत, त्यात साप व इतर सरपटणारे प्राणी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाला सूचना करून देखील स्वच्छतेची कुठलीही कामे केल्या जात नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. त्यामुळे त्यांनी स्वतः तणनाशक, फवारणीसाठी आवश्यक पंप तसेच कुशल कामगारांची व्यवस्था स्वखर्चातून केली. पंपाच्या पुढील व मागील बाजूस "यवतमाळ नगरपालिकेचा जाहीर निषेध" असे फलक लावून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाईट : नीरज वाघमारे : नगरसेवक
0
0
Report

मनिषनगर में 3 वर्षीय श्रेयश की कार से कुचलकर मौत; चालक गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:नागपूर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, मनिषनगरात ३ वर्षांच्या श्रेयशचा कारखाली दुर्दैवी मृत्यू. मन पिळवटून टाकणारी या दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. यामध्ये श्रेयश पंकज अष्टनकर अस तीन वर्षीय चिमुकल्याच मृत्यू झालाय. अंगणाला लागून असलेल्या किराणा दुकानात खेळत असताना हा चिमुकला मुलगा अचानक रस्त्यावर आला. काही कळायच्या आतच बाजूने आलेल्या कारने त्याला धडक देत चाकाखाली आला य. गंभीर दुखापती झाल्याने चिमुकला जागीच गतप्राण झाला. बेलतरोडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मनिषनगर येथील आश्रय सोसायटीत खेळत असताना हा चिमुकला मुलगा रस्त्यावर पोहोचला. त्यावेळी कार चालक निघत असताना अचानक समोर आला, मात्र कार चालकाला लक्षात येईपर्यंत तो चाकाखाली येऊन गेला. दरम्यान तात्काळ अपघातानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
0
0
Report
Advertisement

नंदूरबार भाजपा के भीतर संघर्ष तेज, विजय चौधरी के खिलाफ आरोपों के बाद हड़पट्टी की मांग

Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजपातील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कटर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडेही विजय चौधरी यांना पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report

अजित पवार की जयंती पर सांगली में राष्ट्रवादी का अभिनव सफाई अभियान

Sangli, Maharashtra:अजित पवार यांच्या जयंती सप्ताहनिमित्त सांगली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्यावतीने एक दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरातल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारयांनी स्वच्छता मोहीम राबवली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या सह राष्ट्रवादी कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते,यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी कामगार आघाडीच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मान करत अजित पवारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

चालीसगांव में ग्रामीण अस्पताल समेत विकास कार्यों का उद्घाटन

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव पालकमंत्री गुलाबराव पाटळ यांचे पॉइंटर ऑन चाळीसगाव विकास कार्यक्रम.chal5isgav city में rural hospital, पंचायत समिति कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन विभाग विभागातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.chal5isgav तालुक्यात सुंदर असा कार्यक्रम आणि उद्घाटन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला चालीसगाव आता पुढे आला असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी सुंदर काम या ठिकाणी केलेला आहे. ग्रामविकाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन तर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून मी स्वतः विकास कामे देण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाचे मी खूप अभिनंदन करतो. ऑन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वादावरून समझौता जळगाव जिल्हा एक विचाराचा आहे. महायुतीमध्ये भाजपचे 5 आमदार शिंदे गटाचे 5 आमदार तर राष्ट्रवादीचा एक आमदार असे असताना आपसात वाद न करता जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. असं जर झालं तर सर्व आमदारांची एकता राहील. ऑन पालकमंत्री यांना कार्यक्रमात न येण्याबाबत पोस्ट व्हायरल मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जल जीवन च्या माध्यमातून टाकळी गावाला पाण्याची योजना दिली होती. सहकारी आमदार आहे. पालकमंत्री असल्या कारणामुळे विकास कामांच्या उद्घाटनासाठी तेथे आला पाहिजे. काहींना वाटलं असेल त्यांना झालेला गैरसमज मी दूर करेल. ऑन मोदी आणि शरद पवार भेट (सत्तेत जाणार) त्मला काही माहीत नाही ...शरद पवार साहेबाना विचाराव लागेल... मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिशीला वक्तव्य..
0
0
Report

खेड की जगबुडी नदी में गिरा कंटेनर देवणे पुल तक पहुँचा, पैकेट नदी में बिखरे

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी जगबुडीतील कंटेनर अखेर देवणे पुलाजवळ; नदीत विखुरलेल्या मॅगीच्या पॅकेटांनी वेधले लक्ष अँकर खेडमधील जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत देवणे पुलाजवळ येऊन थांबला आहे. दोन दिवसापूर्वी चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान आज कंटेनरमधील मॅगीच्या बॉक्समधून पाकिटे नदीपात्रात विखुरल्याने परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून बचाव पथकाने तो दोरांच्या सहाय्याने सुरक्षित बांधून ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
0
Report
Advertisement

रोहित पवार केस में आयोग पर सवाल, answersheet विवाद से तनाव बढ़ा

Navi Mumbai, Maharashtra:रोहित पवार byte पॉईंटर ऋषिकेश सामान्य परिवारातील विद्यार्थी. 44 हजार विद्यार्थी इंटरव्हिव्ह साठी 505 विद्यार्थी सिलेक्ट झाले. आयोग परीक्षेचे पेपर देते किती मार्क झाले ते सांगते मात्र या परीक्षेत ठराविक लोकांनाच answersheet दाखवली गेली. या परीक्षेलाच का नाही दिल्या answersheet हा आमचा प्रश्न. योगेश पाटिल उर्फ लोकेश पाटील हा नावाबाबत confuse असलेला मुलगा त्यावर किटो विश्वास ठेवायचा हा एक मुद्दा. आता पर्यंत आयोगाला 100पेक्षा जास्त ई-मेल तक्रारीचे आलेत. ऋषिकेश ला टार्गेट केलं जात की काय असार प्रश्न पडतोय. आवाज दाबला जातोय का. गौरव पाटील चा आवाज दाबलं गेला ऋषींकेश ला गौरव चे वडील भेटले त्यांनी भीती व्यक्त केली. आयोगाने म्हटलंय आम्ही FIR करणार आहोत. 150 जागासाठी प्रतीक्षा होती. सगळे चुकलेत असे नाही पण जे लोकं चुकलेत त्यांचे मोबाईल तपासा तपास करा. कौठल्य नावाची एजन्सी नंदुरबारची त्याचा जो पाटील आहे त्याचा मोबाईल तपासा. सायंटिफिक पद्धतीने तपास करा फक्त आम्हाला 15 ते 20 दिवसांनी आल्यावर पोलीस तपास सुरु आहे अशी उत्तरे नकोय अन्यथा इथेच तरुणांना घेऊन मोठं आंदोलन करणार. आयोगा बाबत जी शंका निर्माण झालेय विद्यार्थ्यांमध्ये ती डेंजरस. ज्या विद्यार्थ्यांना शंका आहे त्यांनी आयोगाला ई-मेल द्वारे कळवा अन्यथा आम्हाला कळवा आम्ही ती माहिती आयोगाला देऊ. बाईट - रोहित पवार - आमदार
0
0
Report

महाराष्ट्र गुजरात का बड़ा भाई बन गया; 2047 तक देश کا नंबर वन बनेगा

Mumbai, Maharashtra:महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. अखेर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे हे मान्य केले, तसे स्पष्ट केले आहे. तेव्हा गुजरातने आणि इतर राज्यांनी सुद्धा महाराष्ट्रा बरोबर वागताना मोठा भाऊ याप्रमाणेच वागले पाहिजे. प्रत्येक क्षणी महाराष्ट्राचा मान, सन्मान हा केला पाहिजे. नम्रतेने वागले पाहिजे. इतर राज्यांपेक्षा विकसित भारताच्या दृष्टीने 2047 पर्यंत महाराष्ट्र हा इतरांपेक्षा मोठाच असेल नंबर वन असेल. महाराष्ट्र हा नेहमीच मोठा होता, आहे, आणि राहील.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी: छात्रों का आंदोलन भटक गया, सरकार से स्पष्ट जवाब की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत. आंदोलनेमध्ये घुसखोरी झाली. नीट चे पेपर फुटायला नाही पाहिजेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन भरकटलं. विजय हा पक्षाचा नाही नेत्यांचा नाही, विद्यार्थ्यांचा आहे. काल ज्याप्रकारे भाषण झाली त्यावरून विजय चाच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्या आंदोलनात राजकारण आल त्यावरती आमचा आक्षेप. विद्यार्थ्यांच्या मनातील भावना सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. चर्चाही एका दिवसात दोन दिवसात संपत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत हे मान्य केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणांमध्ये सर्व प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात बदल होणार पण झाला का. पंतप्रधानांच्या घराच्या इथं कोणी जावे याचे काही नियम आहेत परंतु ते न पाहता राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळी विद्यार्थ्यांनी यावं असं आवाहन करत होते. हे कितपत योग्य आहे. आपल्या पराजयाचे खापर दुसऱ्या वरती फोडण्याची विरोधकांची सवय अजून गेलेली नाही.
0
0
Report

गणेश खाड़े ने सुरज साखरे को मारने की सुपारी दी; जांच जारी

Kolhapur, Maharashtra:Kop Golibar भाजप कार्यकर्ता सुरज साखरे गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी गणेश रमेश खाडे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गणेश खाडे याचे वडील रमेश खाडे हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीला उभे होते. त्यांच्या विरोधात सुरज साखरे यांनी प्रचार केलेला होता तसेच गणेश खाडे याने देवकर पाणंद येथे रस्त्याचे काम घेतलेले होते. ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सुरज साखरेने बंद पाडले. त्यामुळे महापालिकेने त्याला ब्लॅक लिस्ट देखील केले होते. यामुळे खाडे यांचे खूप नुकसान झाले होते. या दोन्ही गोष्टीचा राग मनात धरून गणेश खाडे याने राकेश कारंडे यास सुरज साखरेला मारण्याची सुपारी दिली. सुरुवातीस पिस्टलसाठी त्याने ऍडव्हान्स १ लाख दिला होता. असंही तपासात निष्पन्न झाला आहे. दरम्यान नेमकी किती रुपयाची सुपारी दिली होती याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे
0
0
Report

चंद्रपुर में एसीबी ने भद्रावती वनक्षेत्र कर्मियों पर छापा, 20 हजार रिश्वत मांगने का आरोप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भद्रावतीच्या वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड घातली आहे. हा तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत होता. या ट्रॅक्टरवर वनपथकाने कारवाई पूर्ण केली. या कारवाईतील प्रक्रिया पूर्ण करून ट्रॅक्टर लवकर सोडवण्यासाठी पथकातील सदस्यांनी 20 हजार रुपये लाच मागणी केली. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी इसम ललित नागपुरे अशा तिघांना एसीबीने या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एसीबी चंद्रपूर करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top