icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोयना डैम का जलस्तर 83 टीएमसी पहुँचा; अन्य डैमों में विसर्ग जारी

Satara, Maharashtra:*सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 83 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धोम धरणातून 1 हजार 668 क्युसक, तर उरमोडी धरणातून 500 क्युसेक आणि कन्हेर धरणातून 3 हजार 217 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 88 मिलीमीटर, तर नवजा येथे 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पश्चिम भागात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.
0
0
Report

सिक्किम में ड्यूटी के दौरान सीमा सुरक्षा बल के इंजीनियर खुशाल मांडवकर का निधन

Chandrapur, Maharashtra:सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना वरोऱ्यातील सीमा रस्ते दलात कार्यरत अभियंता खुशाल मांडवकर यांचे निधन बीआरओ अंतर्गत जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GR EF)मध्ये जेई (सिव्हिल) (सूबेदार) म्हणून कार्यरत असलेले खुशाल देवराव मांडवकर यांचे सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना उपचारादरम्यान निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर चुंगथांग (जि. मंगन) येथील ३२७ फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी १६ वर्षे शिस्त, निष्ठा आणि धैर्याने देशसेवा बजावल्याचा उल्लेख बीआरओने केला आहे. त्यांच्या पार्थिवावर वरोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में रेड अलर्ट: स्कूल बंद, बारिश ने बनाई हलचल

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुटी मात्र पावसाची हुलकावणी चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या रेड अलर्टमुळे जिल्हा प्रशासनाने आज शाळा महाविद्यालये, अंगणवाडीसह सर्वच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मॉन्सून आगमनापासून आतापर्यंत केवळ 28 टक्के एवढाच पावस पडला आहे. हा पावस शेत पिकांसाठी देखील अपुरा असून पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आजही पावसाने हुलकावणी दिली आहे. शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने बच्चे कंपनी आनंदात आहे. नक्की रेड अलर्ट प्रत्यक्षात येतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

शिंदे गुट में बड़ी इनकमिंग, नवी मुंबई एयरपोर्ट का नाम दि. बा. पाटील के नाम रखने की शिवसेना की मांग

Navi Mumbai, Maharashtra:उलवे विभागात शिवसेना शिंदे गटात मोठी इनकमिंग झाली असून वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 21 गाव समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। यावेळी शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न लोकनेते दि. बा. पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड 21 गाव युनियनचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात येईल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठपुरावा करत असून त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता त्यामुळे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळावं ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याची प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेय。
0
0
Report

नागपूर में मुसलाधार बारिश ने एक परिवार के जीवन को तहस-नहस कर दिया; नुकसान भरपाई की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूरात मंगळवार झालेल्या मुसळधार पावसाने एका कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले... हातावर पोट असलेल्या मेस, खानावळ व्यावसायिकाच्या घरात आणि खानावळीत पाणी शिरलं... तयार अन्न, धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि उदरनिर्वाहाचं साधनही पाण्यात वाहून गेलं. नागपूरच्या स्नेहा नगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी जीव वाचवला. आता डोळ्यांसमोर उभं आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्नं आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता... प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी.
0
0
Report

लातूर पेपरफुटी विवाद में कांग्रेस नेता पर पुलिस केस: राजनीति गरमाती

Latur, Maharashtra:MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला आहे... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे....
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र CET-MPSC पेपर फूटे मामले में दादा भुसे से इस्तीफे की मांग; Tower पर प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:महाराष्ट्रातील CET व MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनाम्ता द्यावा, अशी मागणी करीत यवतमाळ मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मंगरूळ साखर कारखाना येथे असलेल्या या टॉवरवर सकाळीच युवक काँग्रेसचे दहा ते पंधरा कार्यकर्ते हाती काँग्रेसचा झेंडा घेऊन चढले. सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत आहे. CET व MPSC पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिकता जोपासत राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
0
0
Report

पुणे-मुंबई हाईवे विस्तार पर 5–6 हजार करोड़ खर्च, टोल से वसूली योजना

Pimpri-Chinchwad, Maharashtra:मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर ...जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.... महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग सहा पदरी व्हावा या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केलंय...या साठी तब्बल ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे. सध्या २०३५ पर्यंत असलेली टोलवसुलीची मुदत आणखी १० ते १५ वर्षांनी वाढवली जाऊ शकते. याचीच माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी...
0
0
Report

लातूर पेपरफुटी विवाद: सपकाळ के खिलाफ मामला दर्ज, पवार ने आरोप लगाए

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून आता राजकीय वाद पेटला है... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे
0
0
Report
Advertisement

चिपळूण में ग्रामीण एकजुटता से भातलावणी पूरी, मरीजों को राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या खेर्डीत फुलला माणुसकीचा हिरवा अंकुर; ग्रामस्थांकडून सामूहिक भातलावणी.. संकटाच्या काळात माणुसकी और एकजुटी किती मोठा आधार ठरू शकते, याचं एक प्रेरणादायी उदाहरण चिपळूण तालुक्यातील खेर्डी-देऊळ-वरचीवाडीत पाहायला मिळालं आहे.. मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ आप्पा शेवेकर यांच्या शेतीतील भातलावणीचे काम अडकू नये, म्हणून संपूर्ण गाव एकत्र आलं.. महिला, पुरुष और युवकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता एकत्र येत श्रमदानातून शेवेकरांच्या शेतातील भातलावणी अवघ्या काही वेळात पूर्ण केली.. ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आजाराशी लढा देणाऱ्या शेवेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, कोकणातील पारंपरिक एकोपा और ग्रामीण संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे..
0
0
Report

करंजी घाट के किसान दो महीनों से बारिश नहीं मिलने से संकट का सामना

Ahilyanagar, Maharashtra:पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत तरी राज्यातील अनेक भागांमध्ये म्हणावा असा पावस झालेला नाही अहिल्यानगरच्या करंजी घाट परिसरातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत या परिसरात सुरुवातीपासून अत्यंत कमी पाऊस झाला थोड्या पावसावर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली मात्र चांगला पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं मोठं आव्हान उभा राहिला आहे करंजी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत या फळबागांना उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात शेततळे देखील तयार करण्यात आली आहेत मात्र चांगला पाऊस पाऊस नसल्याने शेततळ्यांनी देखील तळ गाठला आहे परिसरातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top