icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंदापुर में मराठा समर्थकों ने पुणे-सोलापुर हाईवे रोक दिया, सड़क पर जाम

Rui, Maharashtra:मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ इंदापुरात पुणे-सोलापूर महामार्ग रोखला; वाहनांच्या लांबलचक रांगा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे जिएक ल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव पाटी येथे मराठा बांधवांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. सकाळपासूनच मराठा समाज बांधव हिंगणगाव पाटीवर जमले होते. जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनापूर्वीच पुणे ग्रामीण पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलन स्थळापास्थून दोन्ही बाजूला 500 मीटर अंतरावर बॅरिकेटिंग करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, महामार्ग बंद केल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना काही काळ खोळंबा सहन करावा लागला.
0
0
Report

मिरज में कार तोड़फोड़: चार युवक गिरफ्तार; शहर से धिंड काढी गई

Sangli, Maharashtra:स्लग - मिरजेतील गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी चौघांना अटक, शहरातून धिंड काढली गेली. अँकर - सांगलीच्या मिरजेत भल्या पहाटे दहशत माजवत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. चौघा तरुणांना अटक करत त्यांच्याकडून धारदार शस्त्रास्त्रे जप्त करत याचा तरुणांची मिरज शहरातून धिंड देखील काढण्यात आली आहे. शहरातील शास्त्री चौक परिसरामध्ये चौघा तरूणांकडून बुधवारी पहाटेच्या सुमारास पाच वाहनांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर मिरज पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या चौघा तरुणांच्या टोळीला अटक करत शहरातून धिंड काढली.
0
0
Report
Advertisement

सीना-माढा उपसा योजना के पानी नहीं मिलने से किसानों का अनशन तीसरे दिन जारी

Pandharpur, Maharashtra:Anchor -माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. गावातील क्रांती चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, पाणी मिळाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही उपळाई बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. परिसरात सध्या पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनले आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वारंवार आश्वासने मिळूनही पाणी न आल्याने अखेर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास शेतकरी तयार नसून, “सीना-माढा योजनेचे पाणी उपळाई बुद्रुकपर्यंत प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत माघार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. उपोषणाला गावातील शेतकरी, नागरिक आणि विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेऊन उपळाई बुद्रुकला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

कोल्हापुर साइबर पुलिस ने लगभग 1 करोड़ 25 हजार मूल्य के गुम मोबाइल बरामद कर मालिकों को सौंपे

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर सायबर पोलिसांनी सुमारे 1 कोटी 25 हजाराचे मोबाईल हस्तगत केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी गहाळ झालेले मोबाईल तपास करत कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत केलेत. गहाळ झालेले मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी आज मालकांच्या स्वाधीन केले है. इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच गहाळ झालेले मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत करून मालकांच्या स्वाधीन केल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. गोवा, आंध्र प्रदेश आणि शेजारील कर्नाटक राज्यातून यातील बहुतांश मोबाईल पोलिसांनी तपास करत हस्तगत केले आहेत.
0
0
Report

समृद्धि महामार्ग पर अपहरण कोशिश, युवक को पकड़कर यूपी ले जाने की योजना नाकाम

Shirdi, Maharashtra:समृद्धी महामार्गावर अपहरणाचा थरार.. पुण्यातून तरुणाचं अपहरण ; थेट उत्तर प्रदेशात नेण्याचा कट.. समृद्धी महामार्गावर पोलिसांचा आरोपींना पकडण्यासाठी ३ किलोमीटर थरारक पाठलाग.. महामार्ग पोलिसांनी कार अडवून अपहरणाचा कट उधळला... अपहृत तरुणाची सुखरूप सुटका ; ६ संशयित पोलिसांच्या ताब्यात... अपहरण करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट... अर्टिगा कारमधून तरुणाला घेऊन आरोपींचा होता नागपूरच्या दिशेने पलायनाचा प्रयत्न... बाभळेश्वर महामार्ग पोलिसांची सतर्कता ; कोपरगावात कारसह आरोपी ताब्यात... पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू...
0
0
Report
Advertisement

पंढरपुर के सामान्य अस्पताल में MRI-सोनोग्राफी बंद, मरीज निजी अस्पतालों की राह देख रहे

Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील सामान्य रुग्णालयात MRI आणि सोनोग्राफी तपासणी मशीन बंद, गोर गरीब रुग्णांना दाखवला जातो खाजगी रुग्णालयाचा रस्ता पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी रोज हजारो भाविक येतात. त्यांच्या आणि पंढरपूर परिसरातील रुग्णांसाठी अद्यावत सामान्य रुग्णालय आहे. आलेल्या रुग्णासाठी वेगवेगळ्या तपासणी यंत्र सामुग्री आरोग्य विभागाने दिली आहे. मात पंढरपूर मधील सामान्य रुग्णालयातील MRI आणि सोनोग्राफी तपासणी मशीन सध्या बंद असल्याचा अनुभव उपचारासाठी आलेल्या अनेक नागरिकांना येत आहे. यामुळे स्वस्तात उपचार होण्या ऐवजी अशा रुग्णांना खाजगी रुग्णालयातून तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो आहे.
0
0
Report

सूखे में एक गाँव एक गणपति: मूर्ति और वृक्ष मुफ्त, अनावश्यक खर्च से बचाव

Sangli, Maharashtra:स्लग - दुष्काळी परिस्थितीत एक गाव एक गणपती साजरा करण्याचा उपक्रम.. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन ह.भ.प.तुकारामबाबा महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत एक गाव एक गणपती अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना श्री संत बागडे बाबा महाराज मठाकडून गणेश मूर्ती व वृक्ष मोफत भेट स्वरूपात देण्यात येणार असून दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा तुकाराम बाबा महाराजांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में स्कूल पोषण आहार की जांच: किचन में गंदगी और चूहों के मिलने पर कार्रवाई के आदेश

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची टीम भंडारामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिधाची अंमलबजावणीची आढावा घेतला गेला. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आयोगाच्या पाहणी समितीने जिल्ह्यातील चार शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना दिला जाणारा जेवण अधिकारी स्वतः चाखून पाहिला आणि तपासणी केली. मात्र, दोन शाळांच्या किचनमध्ये अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला; किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि काही ठिकाणी चूह्यांच्या आळ्या आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकाराबाबत संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ही पाहणी राज्य अन्न आयोगाच्या팀ने यांद्वारे घेतली असून कोणतेही लाभार्थी अन्नाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले. महाविकास आघाडी राज्य शासनाच्या आरोग्य व पोषण योजनेच्या घटकांबाबत गुणवत्तेची खात्री करण्यासाठी ही चौकशी राबविण्यात आली.
0
0
Report

डिंभे-मानिकडोह बोगद्याविरोधी वळसे पाटील: डावा कालवा चालू ठेवल्यास बोगद्याची गरज नाही

Manchar, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगद्याला वळसे पाटलांचा विरोध; “डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालवा, बोगद्याची गरज नाही” ANC: डिंभे-माणिकडोह धरणाच्या बोगद्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आधी हा पर्याय तपासावा, अशी त्यांची भूमिका आहे. VO: डिंभे-माणिकडोह बोगद्याला आमचा आधीपासूनच विरोध असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. डिंभेचा डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालला तर बोगदा करण्याची गरज नाही, असं अधिकाऱ्यांचं टेक्निकल मत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना पाणी मिळालं पाहिजे, मात्र चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यास विरोध राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. पुढेही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री यावर मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report
Advertisement

आयफोन के लालच में अल्पवयस्क पोते ने बुजुर्ग के घर से गहने चुराए

Yavatmal, Maharashtra:पोलिसांना आव्हान ठरलेली घरफोडी ही, फिर्यादीच्या अल्पवयीन नातवानेच केल्याचा ऊलगडा यवतमाळच्या वणी पोलिसांनी केला आहे. आयफोनच्या हव्यासापोटी नातवाने आजोबांच्या घरातील कपाट फोडून तब्बल सहा लाख 72 हजार रुपयांचे 52 ग्राम सोन्याचे दागिने चोरले. या विधिसंघर्षग्रस्त बालकाला हा गुन्हा करण्यासाठी दोन युवकांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे पोलिसांनी  विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड दानव याला ताब्यात घेतले. तर सुरज गेडाम हा फरार आहे.  विधी संघर्ष बालकाला आयफोन चे प्रचंड आकर्षण होते, महागडा आयफोन कसा घ्यायचा हा प्रश्न त्याच्यापुढे होता, ही हौस भागवण्यासाठी पैसे लागणार असल्याने, त्याने चोरी करावी यासाठी मित्रांनी त्याला प्रवृत्त केले.
0
0
Report

कोकण में गणेशोत्सव के दौरान रिक्शा मंहगाई पर नियंत्रण: जिलाधिकारी ने आधिकारिक दरपत्रक लगाने के निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:गणेशोत्सवात कोकणात रिक्षांच्या मनमानी भाडेवाढीला चाप; थांब्यांवर अधिकृत दरपत्रक लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांची वाढीव भाडे आकारून होणारी लूट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.. उत्सवाच्या काळात प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये,यासाठी प्रत्येक रिक्षा थांब्यावर अधिकृत दरपत्रकाचे फलक तातडीने लावण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.. गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला हे आदेश दिले.. याशिवाय,आरटीओने रिक्षाचालकांची तातडीने बैठक घेऊन मीटर तपासणी पूर्ण करावी,अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top