icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

देवगांव के किसान ने बिबट्या से बचाने के लिए बंदिस्त गोठा बना लिया

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव... द्राक्ष, ऊस आणि दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाणारे हे गाव. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मीपरिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक वेळा पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याने मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. याच धोक्याचा विचार करून दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या गाईंच्या सुरक्षेसाठी आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा उभारला आहे. मजबूत लोखंडी जाळ्या आणि सुरक्षित दरवाजांमुळे रात्रीच्या वेळी जनावरे पूर्णपणे सुरक्षित राहतात. बंदिस्त गोठा असल्याने जनावरांना उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी गोठ्यामध्ये मोठे फॅन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हवा खेळती राहते आणि जनावरांनाही आरामदायी वातावरण मिळते. बिबट्यांच्या वाढत्या धोक्यामुळे आता देवगावातील इतर शेतकरीही अशाच प्रकारचे सुरक्षित गोठे उभारण्याचा विचार करत आहेत. वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढत असताना सुरक्षिततेचा हा उपाय इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
0
Report

सातारा में गरीब किसान की बैलजोड़ियों के लिए समाज ने दी 1.15 लाख रुपये

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पाटण तालुक्यात बोर्गेवाडी येथील एका गरीब शेतकऱ्याच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने बैलजोडी दगावल्याने मोठे संकट ओढावले होते. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत या शेतकऱ्याचा बेंदूर सण गोड केला आहे. अवघ्या दिवसात जमा झालेल्या मदतीतून तब्बल १ लाख १५ हजार रुपयांची नवीन बैलजोड़ी शेतकऱ्याला भेट देण्यात आली. पाहूया हा माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास... व्हॉईस ओव्हर – 1 पाटण तालुक्यातील बोर्गेवाडी येथील यशवत बोर्गे हे अत्यंत गरीब शेतकरी... काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने त्यांची बैलजोडी दगावली आणि ऐन शेतीच्या हंगामात त्यांच्या संसाराचा आधारच हिरावला गेला. शेतीची सर्व कामे ठप्प झाल्याने बोर्गे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते. व्हॉईस ओव्हर – 2 या घटनेची माहिती मिळताच गावा शेजारील फडतरवाडी या गावातील एका छोट्या श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाजाला मदतीचे आवाहन केले. या एका आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो दानशूर नागरिकांनी अवघ्या काही दिवसात मदत गोळा झाली आणि नवीन बैलजोडीसाठी लागणारा संपूर्ण निधी जमा झाला. व्हॉईस ओव्हर – 3 यानंतर बेंदूर सणाच्या शुभमुहूर्तावर यशवंत बोर्गे यांनी स्वतःच्या पसंतीने तब्बल १ लाख १५ हजार रुपयांची नवीन, देखणी बैलजोडी खरेदी केली. ही बैलजोडी त्यांच्या गोठ्यात सुपूर्त करण्यात आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. बैलांना पूजन करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही या माणुसकीच्या कार्याचे कौतुक केले. संकटात सापडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याला समाजाने दिलेला हा आधार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बाईट यशवंत बोर्गे (शेतकरी) श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानचे प्रतिनिधी शंकर साळुंक्हे मदत करणारे ग्रामस्थ एका आवाहनाला हजारो हात पुढे आले... अवघ्या काही दिवसात निधी उभा राहिला... आणि बендूरच्या पवित्र दिवशी एका गरीब शेतकऱ्याच्या गोठ्यात पुन्हा बैलांच्या घंटांचा नाद घुमला. संकटात साथ देणारी ही माणुसकीच समाजाची खरी ताकद असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
0
0
Report
Advertisement

जुन्नर के 14 नंबर क्षेत्र में जहरीली रसायनों वाले कुल्फी कारखाने का भंडाफोड़

Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील '१४ नंबर' परिसरात बनावट आणि घातक रसायनांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या एका कुल्फी और आईस्क्रीम कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, या कारखान्यात दूध किंवा साखरेचा अजिबात वापर न करता केवळ घातक रसायने, लिक्विड डिटर्जंट आणि रंगासाठी थेट पेंटचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारखान्यातील कामगार आणि मालक घटनास्थळावरून पसार झाले असून 'संचिता कुल्फी' (Sanchita Kulfi) या नावाखालahi हे विषारी आईस्क्रीम बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याप्रकरणी कडक कारवाई करून हा कारखाना तात्काळ सील करावा, तसेच दुकानदारांनी या ब्रँडची कुल्फी विक्रीसाठी न ठेवता तात्काळ फेकून द्यावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव से पहले चिपळूण उड्डाणपुल खुला, कोकणवासियों को ट्रैफिक राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाअपूर्वी कोकणकरांना मोठा दिलासा! चिपळूण उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, ट्रॅफिकमधून लवकरच सुटका.. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅफिकच्या समस्येतून कोकणकरांची अखेर सुटका होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, कामाला कमालीचा वेग मिळाला आहे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येत्या गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत खुला केला जाणार आहे.. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखकर,जलद आणि विनाअडथळा होणार आहे.. सततच्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे..
0
0
Report
Advertisement

वाशीममें वर्षा कम, जल प्रकल्प सूखे; किसानों पर असर की आशंका

Washim, Maharashtra:वाशीममध्ये वर्षा कमी झाली असून जलप्रकल्प क्षेत्रांत पाणीकमीपणामुळे अर्धवट भरणं झाली नाही. अनेक प्रकल्पांचा मोठा भाग अजूनही कोरडा पडलेला असून पाण्याअभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर आगामी काळातही पावसाचे प्रमाण कमी राहिले तर शेतकरी यांच्या सिंचनावर थेट परिणाम होईल. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता येणाऱ्या पावसाकडे लागले असून लवकरच दमदार पाऊस होऊन प्रकल्प भरावेत, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
0
0
Report

ग्लासगो राष्ट्रमंडल खेल: सर्वेश कुशारे ने ऊंची कूद में भारत को रजत दिलाया

Niphad, Maharashtra:स्कॉटलैंड के ग्लासगो में आयोजित राष्ट्रमंडल खेलों में महाराष्ट्र के नाशिक जिले के निफाड तालुका के देवगांव निवासी सर्वेश कुशारे ने ऊंची कूद स्पर्धा में भारत के लिए रजत पदक जीतकर देश का गौरव बढ़ाया है। सर्वेश की इस ऐतिहासिक उपलब्धि पर पूरे परिवार में खुशी का माहौल है। उनके पिता अनिल कुशारे ने कहा कि बेटे की इस उपलब्धि पर हमें गर्व है और आज हमारी खुशी का ठिकाना नहीं है। ज़ी न्यूज से बातचीत के दौरान सर्वेश के पिता अनिल कुशारे, माता सुलोचना कुशारे और पत्नी रोहिणी कुशारे भावुक हो गए। कठिन परिस्थितियों और संघर्ष के बीच सर्वेश ने यह मुकाम हासिल किया है। बेटे की सफलता का ज़िक्र करते हुए तीनों की आंखें नम हो गईं।
0
0
Report

चंद्रपुर में जल निकासी के मुद्दे पर जेन झी का आक्रोश, अधिकारी चुप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात नागरी सुविधांबाबत जेन झीचा आक्रोश आता नजरेस पडत आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मार्गावर एक मोठा नाला गेली अवरुद्ध झाल्याने वर्षभरापासून रस्त्यावर पाणी वाहत आहे. परिणामी दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या मार्गावरून शहरातील आयुक्त, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शंभरावर अधिकारी रोज ये-जा करतात. वाहणाऱ्या गटाराच्या बाजुला हॉटेल, व्यवसायिक प्रतिष्ठाने, फळांची दुकाने आहेत. मात्र परिस्थिती दिसत नाहीत बदलत. या भागातच व्यवसाय करणाऱ्या काही जेन झी प्रतिनिधींनी ही समस्या मार्गी लागावी यासाठी सतत पाठपुरावा चालवला आहे. मात्र या मागणीला महापौर प्रतिसाद देत नाहीत, आयुक्तही मौन आहेत. केवळ बांधकामाच्या साहित्य या ठिकाणी टाकून देत थातूरमातूर काम करत असल्याचा देखावा केला जात आहे. हे काम कुठे पूर्ण होणार? स्मार्ट सिटी तयार करण्याचे जाऊ द्या मात्र एवढी गटाराची समस्या तरी सोडवा अशी कळकळीची मागणी जेन झीने यासंदर्भात पुढे रेटली आहे.
0
0
Report
Advertisement

आषाढ़ी यात्रे के बाद पंढरपुर में सफाई कार्य तेज, 2000 कर्मी जुटे

Pandharpur, Maharashtra:आषाढी यात्रे नंतर पंढरपुरात स्वच्छतेचे काम वेगाने सुरू झाले आहे. शहराच्या विविध भागात सूमारे दोन हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक स्वच्छतेचे काम करत आहेत. काल पासूनच स्वच्छता सुरू झाली आहे. आज गोपाळपूर, चंद्रभागा नदी, दर्शनरांग, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर यासह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. एकाच दिवसात सुमारे सव्वादोनशे टन कचरा गोळा करून त्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली आहे. कचरा वाहतूक करणार्यासाठी जवळपास 50 वाहनांचा वापर केला जात आहे. शहरातील नागरीकांचे आणि वारकर्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तातडीने स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.
0
0
Report

SIR पुनरिक्षणात चिपळूण विधानसभा महाराष्ट्रात प्रथम, 100% काम पूर्ण

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी मतदार यादी पुनरिक्षणात चिपळूणची ऐतिहासिक कामगिरी; SIR अभियानात राज्यात प्रथम, 100 टक्के काम पूर्ण भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात रत्नागिरी जिल्ह्यातील 265-चिपळूण विधानसभा मतदार संघाने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मतदार यादी पुनरिक्षणाचे 100 टक्के काम पूर्ण करणारा राज्यातील हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. 336 मतदान केंद्रांवरील सुमारे 2 लाख 71 हजार मतदारांच्या नोंदींचे यशस्वी पुनरिक्षण पूर्ण झाले असून, आता 8 ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top