icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नंदुरबार में विजय चौधरी ने महाराष्ट्र संयोजक पद से दिया इस्तीफा; ऑडियो कांड गरम

Dhule, Maharashtra:Anchor :- नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विजय चौधरी यांच्याविरोधातील नाराजी वाढत असताना त्यांनी भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. पक्षाने आतापर्यंत अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली असून त्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. डॉ. हिना गावित यांचाबरोबर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यास भाजपातील एका गटाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे.
0
0
Report

कराड के एमआईडीसी में बिबट्या फिडर से टकराकर बिजली के झटके से मौत

Satara, Maharashtra:कराड, सातारा – साताऱ्यातील तासवडे एमआयडीसी येथे बिबट्याचा वावर दिवसेंन दिवस वाढत असून पहाटे एक बिबट्या तासवडे एमआयडीसीतील लाईटच्या फिडर असलेल्या जाळीत अडकला होता. जाळीतून बाहेर निघण्यासाठी बिबट्या लाईटच्या फिडरवरती चढला अन् तेथून उडी मारण्याच्या प्रयत्न करताना शाॅक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याला विजेचा शाॅक लागताच शाॅटसर्किट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तात्काळ एमआयडीसीतील सुरक्षा रक्षकांनी फिडरकडे धाव घेतli असता त्यांना बिबट्या त्याठिकाणी अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर वनविभाग तसेच तळबीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला खाली उतरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
0
0
Report

वारणा और कृष्णा नदियां उफान पर, हरिपूर संगम पर पानी बढ़ा; प्रशासन सतर्क

Sangli, Maharashtra:स्लग - वारणा आणि कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या,नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे.तर कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहेत.वारणा नदीमध्ये चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पडणारा पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील हळूहळू वाढ होत आहे,कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम आहे. त्यामुळे हरिपूर येथील संगमावर दोन्ही नद्यांचा पात्र विस्तीर्ण बनले आहे,दुथडी भरून दोन्ही नद्या वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में ऑरेंज अलर्ट के बीच तेज बारिश, शहर जलमय

Akola, Maharashtra:हवामान विभागाने २९, ३० आणि ३१ जुलै रोजी अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, शहरात जोरदार पाऊस होत असला तरी धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पर्जन्य झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे अकोला शहरावरील पाणीटंचाईचे संकट कायम असून, प्रशासनाचे लक्ष आता धरण क्षेत्रातील पावसाकडे लागले आहे.
0
0
Report

रत्नागिरी के कुटगिरी धनगर बाड़ी में विवाद, 5 परिवार पानी से महरूम

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी.. रत्नागिरीच्या कुटगिरी धनगरवाडीत वैयक्तिक वादातून ५ कुटुंबांची 'कोंडी'!.. नळपाणी योजनेची पाईपलाईन कापली, विहिरीचा रस्ताही बंद;..अबालवृद्धांचा पाण्यासाठी आक्रोश.. एव्हढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या विहिरीकडे जाणारी पाऊलवाटही बंद करून टाकली आहे.. त्याचाद्वारे या दुष्टकृत्यामुळे वाडीतील तब्बल ५ कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा थेंब अन् थेंबासाठी वंचित राहिली असून,पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आक्रोश सुरू आहे.. विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.. ऐन पावसाळ्यात/उन्हाळ्यात पाण्याच्या मूलभूत हक्कापासून ताटकळत ठेवणाऱ्या या प्रशासकीय अनास्थेविरोधात आणि दडपशाही विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे..
0
0
Report

पश्चिम विदर्भ में भारी जलसंकट, अभी भी जोरदार बारिश की उम्मीद

Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 42 टक्के जलसाठा असल्याने अद्यापही बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत। त्यामुळे आगामी काळात दमदार पावसाची आवश्यकता कायम आहे। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अद्यापही कोरडाच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात sध्या केवळ 52 टक्के पाणीसाठा आहे। या धऱणातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो। यंदा पुरेसा पाऊस न झाल्यास रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामानाचा अंदाज आणि पुढील काही आठवड्यांतील पावसावरच पश्चिम विदर्भातील जलस्थिती अवलंबून राहणार असून दमदार पावस न झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे अजूनही पश्चिम विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के लोही गांव से देव गौ माता चोरी; सीसीटीवी में कैद, गिरोह सक्रिय?

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या लोही गावातून देव गायीला कार मध्ये कोंबून चोरी झाली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने लोही गावातून देव गायी चोरीला गेल्या आहेत. पहाटेच्या सुमारास चार जण कार घेऊन गावात पोहोचले, त्यांनी देव गायीला कारच्या मागच्या बाजूला कोंबून कारंजा लाडच्या दिशेने पलायन केले. लोही गावातील या देव गायींना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून त्या गावातील एका जुन्या गढीत वास्तव्यास असून दिवसभर गावात फिरून अन्न-चारा घेतल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात. या आधीही गायी चोरी गेल्याने, गो तस्करांची संघटित टोळी परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.
0
0
Report

चाँदवड-मनमाड मार्ग पर गड्ढे: कार हादसे में दो की मौत, प्रशासन से जवाब मांग

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड- मनमाड रोडवर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून वारंवार तक्रारी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, काल रात्रीच्या sमuarस स्विफ्ट गाडीचा अपघात होऊन दोन जण ठार झाले आहे,अपघात इतका भीषण होतं की खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या पलीकडे नाल्यात पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले,या अपघातात मनमाड येथील सागर बेदाडे व त्याचा ड्रायव्हर दोन्हीही ठार झाले आहे,त्यामुळे आता तरी प्रशासनाने चांदवड- मनमाड रोडवरील खड्डे बुजवावे यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे,दरम्यान चांदवड पोलीस याचा अधिक तपास करत आहे.
0
0
Report
Advertisement

कोयना धरण में भारी बारिश से जलस्तर बढ़ा; शाम पाँच बजे छह दरवाजे खुलेंगे

Satara, Maharashtra:सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूटाने उघडण्यात येणार असून, ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण ६,१२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्यानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

65 लाख रुपए के गुवाहाटी दौरे पर उल्हासनगर महापालिका में विवाद

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद शहर विकास रखडला,नगरसेवकांचा ६५ लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास? गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी झाला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असतानाही तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. उल्हासनगर महापालिका के नगरसेवकांसाठी गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन झाले होते. महापालिकेच्या सचिव कार्यालयानुसार, या दौऱ्यासाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा खर्च मिळून सुमारे ७४ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक कुटुंबीयांसह गुवाहाटी दौऱ्यावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने मात्र हे प्रशिक्षण मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास आणि नियोजन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.मात्र,आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर सुमारे ७०० कोटी रुपयांचे ओझे असताना, शहरातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी प्रश्न प्रलंबित असताना एवढा खर्च करून गुवाहाटीत प्रशिक्षण घेण्याची गरज काय होती, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी या खर्चावर आक्षेप घेत, शहराची आणि महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ६५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने विचार करायला हवा होता, असे म्हटले आहे. या खर्चाची सविस्तर माहिती विरोधी पक्ष म्हणून मागविणार असून, शहरातील विकासकामे रखडलेली असताना एवढा खर्च का करण्यात आला, याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शहरात रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असताना नगरसेवक नातेवाईकांसह गुवाहाटीला गेले.आसाममध्ये पूरस्थिती असताना नेमके कोणते प्रशिक्षण दिले जात होते,असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत असल्याचे प्रशासन सांगते, मग ६५ ते ७० लाख रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात आला आणि जनतेच्या पैशाचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही मनसेने उपस्थित करत या प्रकाराचा निषेध केला आहे. रोहित साळवे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष बंडू देशमुख मनसे जिल्हाध्यक् चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
0
Report
Advertisement

येवला के अंदरसुल में बंद घर से सोने-चांदी और नकदी चुराने के बाद चोर फरार

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील अंदरसुल येथील फळांचे व्यापारी चांद भाई सय्यद यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन पोबारा केला नंतर पाठीमागच्या गल्लीत बंटी भालेराव यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चांदीचे दागिने व जुन्या काळातील नाणे दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या घटनेची माहिती पोलिसांना समजतात येवला तालुका पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला व पुढील तपासाचे सूत्र फिरवली असुन. मालेगाव येथील श्वान पथक मागवण्यात आले आहे.
0
0
Report

1 अगस्त से 12 समुद्री मील से बाहर मछली पकड़ने की अनुमति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राज्यातील मच्छीमारांना १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही विभागाने दिला आहे.
0
0
Report

येवला में पानी से जुड़ी भारी खुशखबरी: गंगासागर तालाब पूरी क्षमता से भरा

Yeola, Maharashtra:गेल्या दोन महिन्यापूर्वी येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावात पाणीसाठा कमी झाल्याने शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसआड करण्यात आला होता मात्र सध्या नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पालखेड धरणातून फोर फ्लो च्या पाण्याने गंगासागर तलाव भरून मिळावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती त्यानुसार पाटबंधारे विभागाने येवल्याच्या गंगासागर तलावात आवर्तन सोडले असून या आवर्तनाने गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे त्यामुळे आता येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून या तलावातील पाण्याचे जलपूजन नुकतेच संपन्न झाले याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी सह इतर मान्यवर उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top