icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा आरक्षण पर फिर से हमले: जरंगे पाटील विखे पाटलांना निशाना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण वरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत, यावेळी मराठा आरक्षण उपसमितीवर हल्लाबोल करीत त्यांनी ज्यांच्यावर स्तुतीसुमन उधळली त्या विखे पाटील यांना लक्ष्य केले आहे. विखे पाटलांनी अध्यक्ष पदावरून नाव घालवले अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली असल्यामुळे येणाऱ्या काळात जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात तर नाही ना या चर्चा उधाणलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची आंदोलन संपूर्ण राज्याने पाहिली आहे. त्यात मुंबईचा अखेरचा आंदोलन, हैदराबाद गॅजेट निर्णय व उपसमितीचे काम यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं आणि सरकारवर विश्वास दर्शवला, परंतु जरांगे आता पुन्हा सरकारवर नाराज आहेत आणि त्यांनी थेट विखे पाटळांना हल्लाबोल केलंय. मराठा आरक्षण उपस्थिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. उपसमितीच्या अध्यक्ष पदासाठी विखे पाटील नाव करण्याची शक्यता होती, परंतु त्यांनी नाव घालवलं. मराठा समाजाच्या हक्कांसाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं जरांगे पाटील म्हणाले. धाराशिव येथे भीम जयंती कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटलांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे; मी अध्यक्ष राहिलेच पाहिजे असे काहीही नाही, मात्र आम्ही जे काम केले त्याचा अहवाल जरांगे यांना पाठवला असल्याचे विखे पाटील म्हणाले. जरांगे पाटील आतापर्यंत विखे पाटील आणि मराठा आरक्षण उप समिती या सगळ्या बाबत समाधानी होते, मात्र अचानकच त्यांनी आता हल्लाबोल सुरू केलाय. गेल्या काही दिवसं जरांगे पाटलांची ही धडपड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता हल्लाबोल आणि लवकरच आंदोलन या भूमिकेत जरांगे नाही ना, या बाबत पुन्हा एकदा मराठवाड्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.
0
0
Report

जालना बैंक घोटाले का नया खुलासा: रायचंद कुरंगळ पर चौंकाने वाला आरोप

Jalna, Maharashtra:जालना : मोतीराम अग्रवाल जालना को ऑपरेटरी बँक घोटाळ्यातील आरोपी रायचंद कुरंगळ याचा आणखी एक घोटाळा उघडकीस, शेतमाल तारण ठेवलेला नसताना तारण ठेवल्याचं भासवून पुर्णवादी नागरी सहकारी बँकेलाही ८ कोटी १२ लाखांना गंडा करण्या प्रकरणी कादीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापकासह रायचंद कुरंगळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जालन्यातील बँकिंग क्षेत्रांत पुन्हा खळबळ उडाली आहे. पूर्णवादी बँकेची शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी वेअरहाऊस पावतीवर कर्ज देण्याची योजना होती. यासाठी 'पंचमुखी वेअरहाऊस'चे मालक रायचंद कुरंगळ याच्याशी करार केला. तारण मालाच्या जबाबदारी कुरंगळ याची होती. मात्र, ४ जून २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५ या काळात कुरंगळने बनावट पावत्या तयार करून बँकेची दिशाभूल केली. २० एप्रिल २०२६ रोजी बीड येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक जालन्यातील तीनही गोडाऊनची प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा तिथे तारण ठेवलेला माल पूर्णपणे गायब असल्याचं दिसून आलं. या प्रकरणात आरोपींनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तारण मालाचा अपहार, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला कोट्यवधींचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात शाखा व्यवस्थापकाची भूमिका संशयास्पद आढळून आली असून देवळे यांनी कुरंगळने दिलेल्या पावत्यांवर ३२ कर्ज खाती मंजूर केली. त्यापैकी २४ खाती अजूनही प्रलंबित आहेत. जेव्हा बँकेने पडताळणीचे आदेश दिले, तेव्हा देवळे यांनी कुरंगळसोबत गोडाऊनला भेट देऊन तारण माल जागेवर असल्याचं भासविणारे बनावट फोटो सादर करून मुख्य कार्यालयाची फसवणूक केली.
0
0
Report

वैकुंठ पाटील ने अधिकारियों की कड़ी जाँच की, किसानों तक योजनाएं पहुंचाने का संकेत

Chendhare, Maharashtra:वैकुंठ पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा अन्यथा कारवाई अटळ. फिल्डवर उतरण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. तालुका स्तरावर कृषी मेळावे घेण्याबाबत चर्चा. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अन्यथा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील कृषी योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांचा आढावा घेताना पाटील यांनी अधिकाऱ्यांना ‘फिल्डवर उतरा’ अशा सूचना केल्या. जिल्ह्यात तालुकावर कृषी मेळावे घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
0
0
Report
Advertisement

बीड़ में किसान ने बांध पर गवत जलाया, कार जलकर खाक

Beed, Maharashtra:बीड:बांधावरील गवत जाळण्यासाठी शेतकऱ्याने बांध पेटवला; सावलीत उभी असलेली चार चाकी गाडी जळून खाक\n\nAnc:एका शेतकऱ्याने शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले. याच दरम्यान झाडाच्या सावलीमध्ये पार्क करण्यात आलेली चार चाकी गाडी जळून खाक झाली. घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा येथे समोर आलीय. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्याची शेतामध्ये लगबग सुरू होती. याचवेळी बांधावर वाढलेले सुके गवत आणि पालापाचोळा शेतकऱ्याने पेटवून दिला. झाडाखाली पार्क केलेली गाडी निदर्शनास न आल्यानं ही गाडी जळून खाक झाली. गाडी सीएनजी आणि पेट्रोल असल्याने भीषण पेट घेतला.
0
0
Report

कोल्हापुर में अवैध निर्माण पर हाई कोर्ट ने नगरपालिका के दावे को मान्य किया

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहराजवळील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील तब्बल 5 लाख 25 हजार 22 चौरस फूट इतकी जमीन कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या जमिनेवर उभारलेल्या टोलेजंग इमारती आता बेकायदेशीर ठरल्या आहेत. सद्यस्थितीत या जागेवर अंदाजे 1 हजार कोटीची बांधकामे झाल्याचा अंदाज आहे. शहरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील निगडेवाडी पर्यंत कोल्हापूर शहराचे हद्द आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने 2000 साली जकात नाका सुरू केला होता, त्याबरोबरच ट्रक टर्मिनस आणि कचरा डेपोसाठी जागा आरक्षित ठेवली होती. त्यानंतर देखील त्या ठикाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिली, परिणामी कोल्हापूर महानगरपालिकेने या बांधकामावर हातोडा चालवला. पण उचगाव ग्रामपंचायतने संबंधित जागा आमच्या मालकीचे असल्याचे सांगत न्यायालय धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने 27 मे 2014 रोजी जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई थांबवली, पण आत्ता मात्र उच्च न्यायालयाने संबंधित जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या परिसरात झालेली सर्व बांधकामे आता अनधिकृत ठरली आहेत. त्यामुळे कोल्हापुर महानगरपालिका या बांधकामावर कधी हातोडा चालवणार हे पहावं लागणार आहे..
0
0
Report

गोवंडी-मानखुर्द लिंक रोड पर गैस सिलेंडर ब्लास्ट, भारी आग फैल गई

Mumbai, Maharashtra:घाटकोपर मानखुर्द लिंक रोड अनधिकृत पार्किंग साइड वर सिलेंडर ब्लास्टची घटना समोर आली आहे. मुंबई येथील गोवंडी परिसरातील अनधिकृत पार्किंग साइडवर LPG गॅस सिलिंडरचा साथ जमा करून ठेवण्यात आला होता आणि अचानक या गॅस सिलेंडर मध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. घटना स्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग कशा मुळे लागली आहे या अद्याप पर्यंत कळू शकले नाही आहे. गोवंडी येथील एका अनधिकृत पार्किंग स्थळी सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
0
0
Report
Advertisement

SIT ने नाशिक की मल्टिनॅशनल कंपनी के खिलाफ चौथी पीड़िता से पूछताछ की

Nashik, Maharashtra:एसआयटी'ने मल्टिनॅशनल कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब एसआयटी ने घेतलाय... या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली. कंपनीत स्थानिक पातळीवर नेटचे पासवर्ड देखील अश्लील भाषेत दिले जात होते. यातून अनेकदा धार्मिक भावना देखील दुखावल्या जात होत्या, अशी आपबिती या पीडितेने सांगितली. पिढीत तीन वर्षांपूर्वी कंपनीत ट्रेनी कंर्मचारी म्हणून लागली होती. तेव्हा रजा मेनन याने छळ केला, तो अश्लील भाषेत संभाषण करू लगला. याविषयी पिढीतेने ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्याकडे तोंडी तक्रार केली, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, मात्र यामुळे चिडलेल्या रजा याने अटकेतील आरोपी दानिश, तसेच तौसिफच्या सोबतीने माझा अधिक छळ सुरू केला. माझा डिजिटल पाठलाग केला, तसेच माझ्याबाबत नको ती अफवा कंपनीत पसरविली, असा जबाब पीडितेने दिला आहे... मल्टिनॅशनल कंपनीत या संशयितांनी कशा पद्धतीने या महिलांना त्रास दिला पाहूया या रिपोर्ट मधून.... मल्टिनॅशनल कंपनीच्या नाशिक शाखेत संशयित आरोपींविरोधात पिडीत तरुणींनी कंपनीच्या ऑपरेशन हेडसह अनेकांकडे तक्रार देऊनही त्यावर कारवाई का केली जात नव्हती ? आरोपींचा कंपनीत एवढा दबदबा का होता ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या संशयित आरोपींची कंपनीत अन्य कोणाकडे तक्रार केल्यास ते कशा पद्धतीने सूड घ्यायचे याबाबत देखिल एका पिडीत महिलेने पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले असून तिने तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीतच कंपनी प्रशासनाविरोधातच यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..... *संबंधित तरुणी तिन वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने कंपनीत रुजू झाली असतांना प्रशिक्षण काळात तिला या आरोपीनी कसा त्रास दिला बघुयात -* - ट्रेनिंग रुममध्ये एकटी असताना रझा मेमन याने मला माझ्याजवळ येवून नाव व पत्ता विचारले, त्यानंतर त्याने मला एक शाब्दिक कोडे देवून त्याचे उत्तर तु मला टिम्सवर मेसेज कर असे सांगून माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मी यापुढे देखील तुला असे कोडे देईल परंतू हि गोष्ट आपल्या दोघांमध्येच सिक्रेट ठेव असे सांगितले - रझा मेमन हा माझ्या टिमशी संबंधित नसताना सुध्दा त्याचे असे वागणे मला त्या वेळी विचित्र वाटले. परंतू मी त्या वेळी ऑफिसमध्ये नवीन असल्याने दबावामुळे कोठेही याची वाच्यता केली नाही. - मी एकटी असताना रझा हा जाणीवपूर्वक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा, नको असलेला स्पर्श करायचा म्हणून मी घाबरुन तिथून निघून जात असे - असे वारंवार घडू लागल्याने मी त्यानंतर जून 2023 मध्ये रझा यांच्या विचित्र वागण्याबाबत क्वालिटी / ट्रेनिंग मैनेजरकडे तोंडी तक्रार केली मात्र रझा मेमनची नीतीमत्ता पहिल्यापासून चांगली नसल्याचे सांगून मी एकटी राहणार नाही याची मला काळजी घेण्यास त्यांनी सांगितले - रझा मेमन बाबत मी आमच्या कंपनीच्या टीमलीडर महिलेलाही सांगितले असता त्यांनी मला सांगितले की, तू गृपमध्ये राहत जा, एकटी नको राहू. - दरम्यान मी रझा मेमनची तोंडी तक्रार केली आहे याचा राग मनात ठेवून रझा याने तिचे एका मुलासोबत नाव जोडून आमचे अफेअर असल्याबाबत ऑफिसमध्ये प्रचार करुन माझी बदनामी केली - रझा हा माझ्या वैयक्तीक आयुष्यात लग्नाचा संदर्भ घेत "शादी के बाद रात में सोना पडता हैं, रात में इतना क्या करती है ।" असे बोलून विचित्र पाहत हसायचा - रझा मेमनची हिंमत वाढल्याने ते आमच्या ऑफिस मधील मुलींची नेहमी छेड काढत असे. - गुढीपाडव्याला मी ऑफिसमध्ये साडी नेसून आले असतांना शाहरुख हा माझ्या जवळ मुददाम येवून बसला आणि माझ्याकडे एकटक विचित्र नजरेने रोखून पाहत बोलला की, "आज कुछ अलग ही दिख रही हो, आज कहीं चले क्या?"
0
0
Report
Advertisement

पाटील के बयानों के बीच महिलाओं को अधिकार दिलाने की नीति पर राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय मंत्री सी आर पाटील, - गुजरात में प्रधानमंत्री रहते हुए गृह मंत्री के समय महिलाओं को स्थान दिया गया था.. महिलाओं को अधिकार और विश्वास दिलाने का संदेश देश के सामने प्रस्तुत किया गया। - 2001 की जनगणना के अनुसार 2009 में लागू हुआ, पर अब कांग्रेस और विरोधियों ने कहा है कि महिलाओं को अगले 9 वर्षों तक अवसर नहीं मिलेंगे। - प्रधानमंत्री मोदी ने कहा था कि संसद में इस विषय पर भाजपा द्वारा लिया गया कोई लाभ नहीं होगा; किसी राज्य को नुकसान न हो, यह कहा गया। - कई महिला राजनेताओं को टिकट दिया गया, पर देश की महिलाओं को अवसर देने पर विरोध हुआ.. सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, ममता बानर्जी जैसे उदाहरण। - महिलाओं को अधिकार देने के मुद्दे पर कांग्रेस, सपा और टीएमसी ने विरोध किया, पर पीएम मोदी ने सचेत प्रयास जारी रखा ताकि विधेयक लागू हो सके; फड़ाब से बिल पास नहीं हुआ फिर भी हर्ष का उत्सव माना गया। - देश के विकास में महिलाओं की भूमिका बढ़ने के बावजूद राहुल गांधी के बयानों को लेकर हलचल रही; विपक्ष ने समय वाया बताया। - प्रधानमंत्री ने संकल्प लिया है कि महिलाओं को अधिकार दिलाए बिना नहीं रहेंगे। On काँग्रेस विरोधी दल - पिछले 70 सालों में 4-5 महिलाएं मुख्यमंत्री बनीं, भाजपा ने भी महिलाओं को सम्मान देने का प्रयास किया; मुख्यमंत्री बनना संभव था, फिर विरोध क्यों? इसका उत्तर देश देगा। - पप्पू यादव की पत्नी संसद रहीं, बिहार में माहौल बदला; महिलाओं के शोषण की घटनाएं पहले से अधिक हुईं। On राहुल गांधी वक्तव्य - 2069 में आबादी 54 करोड़ थी; अब 140 करोड़ है. परिसीमन में सीटें बढ़ेंगी, दक्षिण भारत में संख्या बढ़ने पर अमित शाह ने प्रयास किया है। - इन आरोपों में तथ्य नहीं बताए गए कि भाजपा को लाभ मिलने के लिए ऐसा किया गया। On मालिक्कार्जुन खरगे वक्तव्य आतंकवादी - प्रधानमंत्री को आतंकवादी कहना कांग्रेस की प्रवृत्ति है; आतंकवाद और नक्सलवाद से लड़ना बड़ा मुद्दा है; कांग्रेस के समर्थक जगह घट रहे हैं, ऐसा माना जा रहा है। On पश्चिम बंगाल निर्वाचन आरोप - मतदान के लिए मनमर्जी से व्यवस्था की जा रही है; निर्वाचन आयोग इसे व्यवस्था बना रहा है; विरोध करना गलत है।
0
0
Report

महाराष्ट्रभर रिक्षा-टॅक्सी चालक के लिए मराठी अनिवार्य; विरोध शुरू, 4 मई चेतावनी

Mumbai, Maharashtra:१ मेपासून महाराष्ट्रभर परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे… या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच आता विरोधाचाही सूर उमटू लागलाय… येत्या ४ मे रोजी या निर्णयाविरोधात बंड पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे… मात्र, भांडुपमध्ये याच निर्णयाला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय… मराठीच्या स्वागतासाठी मनसे रस्त्यावर उतरताना दिसते आहे.मनसेच्या वतीने रिक्षाचालकांना ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा’ अशा आशयाचे स्टिकर लावत मराठी बोलण्याचा इशारा दिला जातोय…
0
0
Report
Advertisement

हड़ताल से अंबेगांव तहसील में ग्रामीण जनता परेशान, कामकाज ठप्प

Ambegaon, Maharashtra:राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पेच आता अधिकच गडद झालाय. जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा आज तिसरा दिवस आहे. 17 लाख कर्मचाऱ्यांनी मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत कामकाज ठप्प केल्यानंतर, याचा मोठा फटका पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिक कामासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत मात्र संपामुळे कामच होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. आंबेगाव तहसील कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी.
0
0
Report

सांगली में सड़क मरम्मत के विरोध में कांग्रेस का रास्ता रोको आंदोलन—मंगेश चव्हाण नेतृत्व

Sangli, Maharashtra:सांगली में सड़क दुरुस्ती के लिए काँग्रेस नगरसेवकांक'च्यावतीने रास्तारोको आंदोलन किया गया है। शामरावनगर येथे गेल्या दीड वर्षांपासून गटारीचे काम सुरू असल्याने, मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना दुखापत होत आहे. पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर हा रास्ता रोको सुरू होता, दरम्यान शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मार्ग मोकला केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top