icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

सोयाबीन के दाम गिरावट: खरीदारी खतरे में, किसान चिंतित

Washim, Maharashtra:खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र आज हे दर घसरून ६ हजार ६०० रुपयांवर आले आहेत. अवघ्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात सुमारे ९०० रुपयांची घसरण झाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू असून बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीत बाजारभावातील ही घसरण शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकणारी ठरत आहे. आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

पिंपरी चिंचवड के सापों के लिए नगरपालिका ने एसी- कुलर की व्यवस्था

Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये तापमान कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. वाढत्या उष्णतेमुळे माणसांचे हाल होत आहेत; परंतु प्राण्यांची स्थिती वेगळी नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी विशेष व्यवस्था केली आहे: महापालिकेने नुकतेच सरपोद्यानात दोन एसी आणि कुलरची व्यवस्था केली. गेली दहा वर्ष नूतनीकरणाच्या नावाखाठे हे प्राणी संग्रहालय बंद आहे. परंतु या प्राणी संग्रहालयात असलेल्या 23 सापांसाठी गाराठी व्यवस्था केली आहे. आढावा केला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी।
0
0
Report
Advertisement

शेतकरी के साथ ऑनलाइन धोखाधड़ी: 1.94 लाख रुपये की ठगी, विटा पुलिस थाने में शिकायत

Sangli, Maharashtra:अँकर - म्हैस देण्याच्या नावाखाली एका शेतकरयाची तब्बल दोन लाखाचा ऑनलाईन फसवणूक झाली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूज मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. वाळूज येथे प्रमोद बाबर यांनी यूट्यूब चैनलवरती वेगवेगळ्या म्हशी घरपोच देतो, अश्या जाहिरातीची व्हिडीओ पाहिला, त्यानंतर म्हैस खरेदीसाठी त्यांनी संपर्क केला,यानंतर वेगवेगळे व्हिडीओ टाकून जनावरे किती चांगली आहेत, आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोय देऊ शकतो,असे बाबर यांना विश्वास देण्यात आला,यामुळे बाबर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने १ लाख ९४ हजार रुपये ऑनलाइन पाठवले, मात्र पैशाच्या बदल्यात बाबर यांना देण्यात आली नाही उघड सातत्याने त्यांच्याकडून पैसे मागण्याचा सपाटा सुरूच ठेवण्यात आला आणि अखेर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येतात बाबर यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. बाईट - प्रमोद बाबर - शेतकरी ,वाळूज, विटा. बाईट - विपुल पाटील - पोलीस उपअधीक्षक - विटा.
0
0
Report

भ्रष्टाचार के आरोप, राजनीति का बाज़ार: ओबीसी के लिए 100% छात्रवृत्ति की मांग तेज

Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार देश पूर्ण उध्वस्त झालाय... 7.7 GDP दाखवताय.. बेशरम की अमर्याद झाली आहे - डिझेल पेट्रोल रांगा लागल्या.. बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे.. एक्स्पोर्ट इम्पोर्ट मध्ये मोठी घट आहे... - -- अशा परिस्थितीत आपली पाठ थोपटून घेणे आणि देशाला उध्वस्त करताय --- कॉकरोच जनता m पार्टीने आंदोलन उभे केले... आता युवा शांत बसणार नाही... -- या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे.. आणि ते परिवर्तन होईल... त्याची सुरुवात झाली आहे सरकारला जावे लागेल -- देशाच्या खुर्चीवर बसलेली जी प्रवृत्ती आहे... ती हिटलरच्या विचाराची आहे... त्यामुळे जो सत्यासाठी लढतो आहे.. सच्चाई sाठी रस्त्यावर येतो आहे.. त्याला दाबण्याचं काम करताय -- यामध्ये सीबीएससी मध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली... 17 वर्षाच्या पोराला सोडत नाही.. त्यामुळे स्वाभाविक आहे (on मराठा OBC ) --- या सरकारची भूमिका कधीच OBC बाजूनं राहिली नाही. मत घेण्यापुरत..म्हणजे गाईचे दूध काढण्यापुरत ..वासराला गाईचा स्तनाला लावण आणि मग ओढून घेणं... अशी ओबीसी बाबत या सरकारची प्रवृत्ती आहे ---- सर्वांनाच या सवलती दिल्या गेल्या... ओबीसी या स्पर्धेत कसा टिकू शकेल... --- जेवढे तुम्ही सारथीला देतात तेवढे आम्हाला देतात... या सवलती देताना देशातील ओबीसी 50% पेक्षा जास्त आहे --- सारथी प्रमाणे पैसे मिळत असेल तर एवढ्या मोठ्या समाजाचा कसा विकास होईल --- त्यांना देण्याचा विरोध नाही.. एससी, एसटी प्रमाणे आम्हाला 100% स्कॉलरशिप स्वलती द्या -- आणि गरीब समाजा यांची कुचंबणा होउ नये ( उमेदवार माघार ) -- राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं वाटेल ते खरेदी करता येतं... अशी खात्री भारतीय जनता पक्षाला झाली आहे. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा देश विकला गेला आहे -- घेणाऱ्या देण्यावर दोघांवरही कारवाई दकेली पाहिजे.. चौकशी झाली पाहिजे --- सुधीर मुनगंटीवार कालच म्हणाले की या निवडणुकीत जे चालतं ते पाहून या निवडणुकाच होऊ नये -- नगरसेवक निवडून येतो तो कोणत्याच पक्षाचा नसतो -- 70 टक्के लोक विकले जातात -- 30 टक्के इमानदार --- पैसे किती मिळवावे पाच लाख, दहा लाख, पंधरा लाख -- हे पैसे आले कुठून -- जे उमेदवार दिले ते विकल्या गेले --- आपल्याच पक्षाचे लोक आपल्याच आपल्या लोकांना पैसे मागत आहे... भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पैसे मागितले --- विधान परिषदेचे राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तराचे झाले आहे -( काँग्रेस नेत्यांनीच पैसे दिले... दगाबाजी केली... मी जिथे सांगेल तिथेच मतदान करा..शैलेश अग्रवाल यांचा आरोप ) --= हे मी ऐकले आहे... काही नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये काँग्रेसच्या एका नेत्याने दिले... -- माझ्या एका नगरसेवकाने हे सांगितले... हे पैसे ठेवा मी सांगतले त्यालाच मतदान करा तोवर हे पैसे ठेवा.. हे पैसे कुठून आले कोणाचे होते हे काही त्यानी सांगितले नाही.. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40- 45 काँग्रेसच्या नगरसेवकांना एका नेत्याने पाच -पाच लाख रुपये वाटल्याची जोरदार चर्चा आहे.. -- त्याबाबत माझे पुरावे नाही ही चर्चा आली कुठून... आणि झाली कुठून हे मला सांगणं मला उचित वाटत नाही -- शैलेश अग्रवाल यांच्याकडे ही माहिती असेल त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे द्यावी -- मी पुरावा नसताना देण उचित नाही
0
0
Report

रत्नागिरी: वैभव नाइक पर एसीबी जांच, अपसंपदा मामले में कणकवली नगरपंचायत को पत्र

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरी एसीबीकडून चौकशीच्या फेऱ्यात अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या दोन गाळ्यांसंदर्भातील एसीबीने मागवली माहिती विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत कि दोन गाळे स्वतंत्र आहेत, अशी माहिती एसीबीने मागवली रत्नागिरी एसीबीच्या पोलिस उपअधिक्षकांचं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र २००२ आणि २००६ मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची केली होती खरेदी २०२२ सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फेत सुरु आहे चौकशी
0
0
Report
Advertisement

तीन वर्षाचा चिमुकला पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू: गावात शोक

Malegaon, Maharashtra:मामाच्या गावी सुट्टीनिमित्त आलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना देवळा तालुक्यातील दहिवड धोबीघाट येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा महेश अहिरे (वय ३ वर्षे, रा. वायगाव, ता. बागलाण) हा उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या मामाच्या गावी दहिवड धोबीघाट येथे आला होता. घराजवळील आंब्याच्या झाडाखाली बसून तो आंबे खात होता. आंबे खाल्ल्यानंतर हात खराब झाल्याने तो जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, कृष्णाचे मामा जीवन देवरे व आजोबा बापू देवरे हे पाण्याच्या टाकीजवळ आले असता त्यांनी कृष्णा पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती कृष्णाला मृत घोषित केले. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून चिमुकल्या कृष्णाच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घरांच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्या, विहिरी व इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षित ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे तसेच अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
0
0
Report

सोलापुर के बोरामणी शिवार में 36 किलो गांजा जप्त; अंतरराज्य ड्रग गैंग का भंडाफोड़

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त - छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथून गांजा बोरामणी मध्ये येताच पोलिसांनी टाकली धाड - सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई - 36 गड मधून गांजा आणणाऱ्या तीन जणांना ठोकल्या बेड्या - सदर आरोपींना न्यायालयाने सुनावली 9 जून पर्यंत पोलीस कोठडी - गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू
0
0
Report

चंद्रपूर के टाडोबा के पास रानटी हाथी कळप प्रवेश, ग्रामीण और पर्यटन चिंता में

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में प्रविष्ट हुए रानटी हाथी कळप ने टाडोबा के करीब प्रवेश किया है. सावली तालुक्यातील मुरमाडी-गोलाभूज भाग के विस्तीर्ण तालाब क्षेत्र को निवास स्थली चुना गया है. यह कळप गडचिरोली जिले के रहने के बाद पिछले 5 दिन से वैनगंगा नदी पार कर चंद्रपूर के मुरमाडी-गोलाभूज क्षेत्र में मुक्काम पर है. ग्रामवासियों के नुकसान के भय से वनविभाग ने गांव में 25 प्रशिक्षित जवान तैनात किए हैं. निगरानी के लिए ड्रोन से नजर रखी जा रही है और कळप को गांव के नजदीक आने से रोकने के लिए पेटते टेंभे, तीखे धुएँ और लाउडस्पीकर का उपयोग किया जा रहा है. यदि कळप Tadoba में प्रवेश करता है, तो वहाँ के पर्यटन और स्थानीय जिंदगी पर असर पड़ने की संभावना है.
0
0
Report
Advertisement

भारतीय जनता पार्टी पर आरक्षण विभाजन का आरोप, दीपक केदार ने यात्रा शुरू की

Yeola, Maharashtra:महाराष्ट्र राज्यात एस सी घटकांमध्ये आरक्षणाचा वर्गीकरणाचा प्रयास भारतीय जनता पक्ष कडून केला जात असल्याचा गंभीर आरोप करून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारे यांनी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली असून येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसृष्टी स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आरक्षण बचाव नारा देण्यात आला प्रसंगी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report

हिंगोली के सेनगाव शासकीय वस्तीगृह की मरम्मत: सिमेंट के बजाय मिट्टी-खड़कट से कार्य

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सेनगाव येथील शासकीय मागासवर्गीय वस्तीग्रहाची इमारत धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आहे पायाभूत कामांच्या ठिकाणी माती मिश्रित खडक टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी या शासकीय वस्तीगृहात शिक्षण घेत असतात मात्र इमारत धोकादायक बनली आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा दुरुस्तीचं काम सुरू असताना खाली सिमेंट काँक्रीटचे काम न करता केवळ माती मिश्रित खडक टाकून दुरुस्तीचे काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेल काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
0
0
Report

ACB ने भू-करमापक सहित दो आरोपियों को लाच के साथ गिरफ्तार किया

Chandrapur, Maharashtra:शासकीय कार्यालयांत सर्वसामान्यांची अडवणूक करून मलिदा लाटणाऱ्या लाचखोरांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दणका दिला आहे. नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भू-करमापक रंजीत रामचंद्र कनोजकर आणि त्याचा खासगी पंटर जयंत दीपक कामडी या दोघांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार राहत असलेली जागा आणि त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या घराच्या जागेचा फेरफार वडिलांच्या नावावर करावयाचा होता. या अधिकृत कामासाठी तक्रारदाराने नागभीड भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र, हक्काच्या कामासाठीदेखील भू-करमापक रंजीत कनोजकर याने चक्क १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणीकेली. लाच देण्याची अजिबात नसल्याने इच्छा तक्रारदाराने थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक लाचखोर भूकरमापक विभागाकडे रंजीत कनोजकर लेखी तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. भूकरमापक कनोजकर याने स्वतः पैसे न घेता, तळोधी येथील त्याचा खासगी माणूस जयंत कामडी याच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यास तक्रारदाराला सांगितले. नियोजनानुसार, तक्रारदाराने लाचेची १० हजार रुपयांची रक्कम आरोपी जयंत कामडी याच्या हातात देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. मुख्य सूत्रधार भू-करमापक रंजीत कनोजकर यालाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top