icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जामखेड में संत वामनभाऊ महाराज के पालखी की पहली रिंगण, भक्तों की भारी भीड़

Ahilyanagar, Maharashtra:संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण जामखेड येथे हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले...दोन अश्वांसह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला...हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री महाराज लाखो वारकऱ्यांना समवेत घेऊन पंढरीच्या दिशेने दिंडी घेऊन निघाले आहेत...दरम्यान मोठ्या उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला.
0
0
Report

तापी नदीत आत्महत्या: शिरपूरात मोठे आरोप, कंपनीवर तपास सुरू

Dhule, Maharashtra:शिरपूर तालुक्यात तापी नदीत आत्महत्या करणाऱ्या तरुणांमुळे वातावरण तापले. संदीप गिरासे या 28 वर्षीय तरुणाने कंपनीतील अन्यायामुळे आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तापी पुलावरून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि ते व्हायरल झाले. शिरपूर जवळील गिधाडे तापी नदी पुलावर उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली. अहिल्यापूर गावातील संदीप उदेसिंग गिरासे वय 28. व्हिडिओ कंपनी मालकासह पाच जण त्रास देत असल्याचा आरोप; आत्महत्येस प्रवृत्त करणारे गुन्हा दाखल करण्याची मागणी. दोन दिवसांपूर्वी त्याने तापी नदीपात्रात उडी घेतली होती; आज मृतदेह आढळला. गावकऱ्यांचा शिरपूर शहर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलने.
0
0
Report

अकोला महापालिका में अवैध जात प्रमाणपत्र मामले में तीन नगरसेवक निलंबित

Akola, Maharashtra:अकोला महापालिकेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक १६ (ब) येथील अमरीन सदफ सय्यद नाझीम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), प्रभाग क्रमांक २ (अ) येथील सीमा अंजुम शेख अनिस (एमआयएम) आणि प्रभाग क्रमांक १ (अ) येथील शेख अब्दुल्ला शेख सलीम (काँग्रेस) यांचा समावेश आहे. या तिन्ही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तिन्ही नगरसेवक आरक्षित जागांवरून निवडून आले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संबंधित नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी हा आदेश जारी केला आहे. या कारवाईमुळे अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजप प्रणीत शहर विकास आघाडीच्या संख्याबळावरही परिणाम झाला आहे. कारण निलंबित सदस्यांमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या आघाडीतील दोन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपच्या आणखी एका नगरसेवकावरही अशाच प्रकारच्या कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

अयोध्या राम मंदिर चोरी के विरोध में रत्नागिरी में शिवसेना की महाआर्ति

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरट्यांचा सर्वनाश कर चोरीप्रकरणी रत्नागिरीत ठाकरे गटाकडून निषेध; महाआरतीद्वारे व्यक्त केला संताप.. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात आंदोलन करण्यात आलं.राम आळी परिसरातील श्रीराम मंदिरात महाआरती करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मुख्य महाआरती करण्यात आली. ही महाआरती शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. चोरट्यांचा सर्वनाश कर अशी प्रार्थना प्रभू श्री रामाच्या चरणी केल्याचं प्रमोद शेरे यांनी सांगितलं.. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थितांनी चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. महिला आघाडी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांचाही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता.
0
0
Report

जालना में बरसात की कमी से कपाशी-सोयाबीन फसलें खराब, किसान चिंतित

Jalna, Maharashtra:जालना : पावसाची उघडीप, सोयाबीन पिवळी पडून करपण्याचं प्रमाण वाढलं,कापशीही पावसाअभावी करपायला सुरुवात,पावसाअभावी पिकांनी मानाही टाकल्या(पॅकेज) जालना जिल्ह्यात पावसानं गेल्या 8 दिवसांपासून उघडीप दिलीय.त्यामुळे कपाशी पीक करपतंय तर सोयाबीन पीक देखील पिवळं पडून करपायला लागल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. जालना जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून पाऊस गायब झाल्यानं खरीप हंगाम संकटात सापडलाय.यंदा जिल्ह्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी बरोबरच सोयाबीनच्या पेरणावर जास्त जोर दिलाय.रिमझिम पावसावर लागवड केलेलं कपाशी पीक उगवून जमिनीबाहेर डोकं काढताच पावसाअभावी ही पिकं करपायला सुरुवात झालीय.जमिनीत ओलावा नसल्यानं कपाशी बियाण्यावर असलेलं आवरण देखील जमिनीत निर्माण झालेल्या कोरडाव्यामुळे खाली पडायला तयार नाही.अनेक शेतकऱ्यांचं कपाशी पीक दोन पानावर असतानाच करपायला सुरुवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता वाटू लागलीय.पावसाने दिलेल्या उघाडीपामुळे पेरणीवर केलेला खर्च देखील वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय. सोयाबीन पिक देखील पावसाअभावी पिवळं पडू लागल्याचं. पानं पावसाअभावी पिवळी झालीयत. जमिनीत ओलावाच नसल्यानं सोयाबीन पीक माना टाकतंय. उन्हामुळे सोयाबीन जळत असल्यानं शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडलेत.पाऊसच नसल्यानं आता ही पिकं वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय जिल्ल्ह्यात पावसाअभावी पेरलेली पिकं संकटात सापडलीच मात्र 40 टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत.त्‍यामुळे शेतकऱ्यांना पेरलेली पिकं जगवण्याबरोबरच राहिलेली पेरणी करण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा.मात्र लवकर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची तलवार कायम राहणार हे नक्की.
0
0
Report

एकबुर्जी जलप्रवाह परियोजना में सिर्फ 8% जल शेष, तात्कालिक पानी आपूर्ति की मांग

Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन १२ कोटी रुपये खर्चून उभारलेली 'वाशिम शहर तातडीची पाणीपुरवठा योजना' तात्काळ सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक पुरण बदलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २०१८ मध्ये कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरण अशी सुमारे १२ किलोमीटर जलवाहिनी उभारण्यात आली असून, या योजनेद्वारे पैनगंगा नदीतील पाणी एकबुर्जी धरणात सोडता येते. सध्या नदीत पाणी उपलब्ध असूनही या योजनेचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप बदलानी यांनी केला आहे. एल निनोची शक्यता आणि धरणातील कमी जलसाठा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पैनगंगा नदीतून पाणी उपसा करून एकबुर्जी प्रकल्पात सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

जमीन के विवाद से रक्तरंजित अंत: लातूर में रिश्तों के बीच खून, आरोपी ने किया कबूल

Latur, Maharashtra:जमीन के विवाद से रक्तरंजित अंत... सावत्र पुतने ने ही अपने सावत्र चाचा की हत्या कर दी। पुलिस स्टेशन में ही आरोपी ने कबूल किया कि उसने कासार शिरसी के पास स्थित खेत के सांडवे पर डंफर पत्थर उठाकर चाचा राजेंद्र शामराव चव्हाण के सिर पर वार किया। घटना Nilanga तालुका के हरीजवगा गांव में घटी, जहाँ पुराने जमीन-वास विवाद के कारण दोनों के बीच तनाव बना रहा। पुलिस ने प्रथम परीक्षण में बताया कि मृतक और आरोपी के बीच जमीन के मालिकाना हक को लेकर लंबे समय से विवाद था। आरोपी मोरली चनप्पा चव्हाण ने पढ़ाई-परदेशी मजदूरी के बाद गाँव लौटने के कुछ महीनों बाद ही घटना को अंजाम दिया। हत्या के बाद उसने घटनास्थल से भागने की बजाय पोलीस स्टेशन जाकर कबूलनामा दिया, और शव का पोस्टमार्टम कराकर मामले की तहकीकात शुरू कर दी गई है। इस घटना ने मामले की व्यापक जाँच की존 आवश्यकता पर भी प्रकाश डाला है कि जमीन के लिए रिश्तों को क्यों नुकसान पहुंचाया जाता है, और नातों की मर्यादा बनाये रखने के लिए कानून-व्यवस्था का सहारा कब लिया जाए।
0
0
Report

CBI की टीम अब लातूर में, NEET पेपरफुटी के नए खुलासे सामने?

Latur, Maharashtra:लातूरमध्ये पुन्हा CBI ची एन्ट्री होणार...? देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता पुन्हा लातूरच्या दिशेने वळतोय का? आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती... पाच लाखांच्या व्यवहाराचे धागेदोरे... आणि आर्थिक व्यवहारांचा तपास... या सर्व पार्श्वभूमीवर CBIची टीम पुन्हा लातूरमध्ये दाखल होणार आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात स्पेशल रिपोर्ट मधून... देशभरात खळबळ उडालेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBIकडे आला. लातूरमधील खाजगी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह अनेक आरोपींना अटक झाली. CBIने लातूरमध्ये अनेक दिवस तळ ठोकून चौकशी केली. विद्यार्थी, पालक, डॉक्टर आणि क्लासेसशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली. आता या तपासात नवे पुरावे समोर येत असल्याने तपास पुन्हा लातूरकडे वळल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, CBIने जप्त केलेल्या आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे 36 फोटो आणि केमिस्ट्री विषयाचे 132 प्रश्न आढळले आहेत. यापैकी 111 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी तब्बल पाच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचाही संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह आणि त्यामागील नेटवर्कचा शोध घेण्यावर CBI चा भर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर CBIची टीम पुन्हा लातूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तपासाचा पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा मानला जात असून, आणखी काही संशयितांची चौकशी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि डिजिटल पुराव्यांचा तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभर गाजलेल्या या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर पुलिस ने पान टपरी पर ड्रग तस्करी के आरोप पर सील कर दिया

Chandrapur, Maharashtra:ड्रग विकाल तर संपूर्ण मालमत्ता होईल सील, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी ड्रग तस्करीत थेट सहभाग असलेल्या पान टपरीला ठोकले सील, महानगरपालिका और अन्न औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करत कायदेशीर मार्गाने बंद व्हावी यासाठी आदेश प्राप्त झाले आहेत. आज पोलिसांनी हा मालमत्ता प्रक्रिया पूर्ण कर सील केली. ड्रग तस्करीत सहभागी व्हाल तर अशाच पद्धतीने मालमत्ता सील केली जाईल असा वचक निर्माण व्हावा यासाठी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. कायदा आपले काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

नवी मुंबई नगरपालिका: 56 लाख खर्च कर 3 Scorpio खरीदने کا प्रस्ताव

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाच्या आरोग्य समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापतींना नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्यांचे डोहाळे लागले असल्याने 56 लाख रुपये खर्च करुन 3 नवीन स्कॉर्पिओ गाड्या खरेदीचा प्रस्ताव आगामी महासभेत येणार आहे. यावरून मनसेने सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केलेय. एकीकडे पंतप्रधान अवास्तव खर्च टाळण्याचे आवाहन करत असताना नवी मुंबई मनपा 3 इंधन गाड्या खरेदी करत पैश्याचा अपव्यय करत आहे. याविरोधात खेळण्यातील गाड्या आम्ही सभापतींना भेट देणार असून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी थांबविण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेय.
0
0
Report
Advertisement

Vadettiwar questions government on Alninno prep; ban on smart glasses-pens crackdown

Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अलनिनो तयारी बाबत सरकारला विचारले प्रश्न, केंद्र सरकारने स्मार्ट पेन -स्मार्ट चष्म्यावर घातलेली बंदी म्हणजे त्यांना वाटत असलेली भीती असल्याचे प्रतिपादन वडेट्टीवार on कमी पाऊस यंदा अलनिनोमुळे कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यासाठी म्हणून सरकारने काय उपाययोजना केल्या हे माहीत नाही. विदर्भात तरी अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. धानरोवणी खोळंबलेली आहे. सोयाबीन पावसा अभावी पिवळे पडत चालले आहे. चार दिवसात पाऊस आला नाही तर खरीप हंगाम संकटात येणार आहे. यासाठी सरकारने कुठली पावले उचलली याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. वडेट्टीवार on Ban on स्मार्ट चष्मा ज्या ज्या मुळे सरकारला भीती वाटते त्या सर्वांवरच सरकार बंदी आणत आहे. उपोषण, आंदोलन, भाषण, टीका यासह सरकारला भीती असलेल्या सर्व बाबी बंद केल्या जात आहेत. लोकशाही मार्ग गुंडाळून ठेवत हुकूमशहा मार्गाने देश चालवायचा असल्याने स्मार्ट चष्मा, स्मार्ट पेन आदींवर बंदी घातली जाते.
0
0
Report

अकोला में नकली बीज, पीजीआर और बायो उत्पादनों के खिलाफ किसान संगठन का ऐतिहासिक प्रदर्शन

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे, पीजीआर, बायो उत्पादने आणि निकृष्ट खतांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिटकवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभर जोरदार चर्चा रंगली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेने जिल्हा कृषी अधिकारीांना निवेदन देत अकोला जिल्ह्यात बोगस पीजीआर, बायो उत्पादने, निकृष्ट खते आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप केला. या उत्पादनांमुळे बियाण्यांची उगवण न होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संघटनेने जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करून त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्या प्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने नुकसान भरपाई कंपन्यांकडून मिळवून द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. या आंदोलनाची सध्या अकोला जिल्हाभर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
0
0
Report

य_evla के पांच गांवों में अघोषित लोडशेडिंग, बिबटियों के हमले और मरीजों की आपात स्थिति

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील चिचोंडी, पारेगाव, रायते, बदापूर, निमगाव मढ या गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून रात्रीच्या वेळी महावितरण कडून अघोषित भारनियमन केले जात आहे या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून चोरा देखील होत आहे अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांमध्ये वयोवृद्ध माणसे असून अनेकांना विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे अशा परिस्थितीत रात्रीचा सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे संदर्भात महावितरणच्या कार्यालयात फोन केल्यानंतर तेथील संबंधित ऑपरेटर वायरमन व अधिकारी हे फोन उचलत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चिचोंडी सब स्टेशन वर धडक मोर्चा काडून दोन दिवसात विजेची समस्या सुटली नाही तर सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top