icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राजापूर-रत्नागिरी में शिवसृष्टी ढहाने पर ठेकेदार के खिलाफ सख्त कार्रवाई के निर्देश

Ratnagiri, Maharashtra:राजापूर-रत्नागिरी.. पहिल्याच पावसात शिवसृष्टीचे बांधकाम कोसळले.. ठेकेदारावर कारवाईचे आदेश.. राजापूर शहरात पर्यटन संचालनालयामार्फत १ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या 'शिवसृष्टी' प्रकल्पाचा काही भाग पहिल्याच पावसात खचून कोसळला.. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत, राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.. या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.. तसेच,या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालयाकडे तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..
0
0
Report

संगमेश्वर, रत्नागिरी में गव्यों के उत्पात से धान की फसल को भारी नुकसान

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर/ रत्नागिरी कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; भातलावणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. भातलावण्याची कामे सुरू असतानाच गव्यांकडून शेतात घुसून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत वारंवार वन विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे सेना ने नागेश पाटील आष्टीकर को चुनौती देने के बाद आक्रामक रुख दिखाया

Nanded-Waghala, Maharashtra:बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला आव्हान दिल्यानंतर आता ठाकरे सेना देखील आक्रमक झालीये. वाय प्लस सुरक्षा बाजूला करून नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदार संघात फिरावं ऑपरेशन तुडवा कसं असते त्याची प्रचिती नागेश पाटील अष्टीकर यांना येईल असे प्रति आव्हान ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आष्टीकर यांना दिले. खासदार आष्टीकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अंजनखेड येथे झाला होता. त्यांनतर झालेल्या सभेत खासदार आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला इशारा देत मी प्रत्येक गावात येणार आहे समोर येऊन दाखवा असा इशारा दिला होता. त्याला आता ठाकरे सेनेने उत्तर दिले आहे.
0
0
Report

नाशिक के पिंपळगाव जलाल में रेलवे गेट 72 के पास भारी पानी से परेशानी

Yeola, Maharashtra:अँकर : नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील रेल्वे गेट क्रमांक 72 येथील रेल्वे पुला खालील बोगद्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पाणी इतके साचते की विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य होते आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तरी रेल्वे गेट क्रमांक 72 सुरू करण्यात येावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

लातूर में बैल जोड़ी की खरीदारी पर उठे सवाल, गोशाला में बैल क्यों रोके?

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... डे लाईव्ह... लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्यावर आईन पेरणीच्या तोंडावर मोठं संकट ओढवलं आहे... बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परत येत असताना काही गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून बैल अडवले. त्यानंतर या प्रकरणी कासार शिरशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैल गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. हे बैल शेतीसाठीच खरेदी केले होते, असा दावा राम बिराजदार यांनी केला आहे. इतकेच नाही, तर गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना बैलजोडी नसल्याने शेतीची कामे कशी करायची, असा सवाल हा शेतकरी उपस्थित करत आहे.
0
0
Report
Advertisement

ज़ी 24 तास की रिपोर्ट के बाद लातूर किसान को बैल वापस मिले

Latur, Maharashtra:लातूर डे लाईव्ह... पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी अडवली... गुन्हा दाखल.. अखेर ZEE 24 TAAS च्या बातमीमुळे शेतकऱ्याला बैल मिळाले परत. पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे... अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी नव्या आशेने शेतात उतरला आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील शेतकरी राम बिराजदार यांच्या आयुष्यात याच काळात मोठं संकट उभं राहिलं. शेतीसाठी खरेदी केलेली बैलजोडी... कत्तलीच्या संशयावरून अडवली गेली... त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला... बैल गोशाळेत ठेवण्यात आले... आणि आपल्या कष्टाच्या साथीदारांना परत मिळवण्यासाठी त्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागले. अखेर राम बिराजदार यांना ZEE 24 TAAS च्या पाठपुराव्यानंतर त्यांची बैलजोडी परत मिळाली. मात्र, या घटनेनंतर राज्यात अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडल्याचा दावा करत काही शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अतिउत्साहातून शेतकऱ्यांचेच बैल अडवले जातात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, खोटी तक्रार करून किंवा चुकीची माहिती देऊन निष्पाप शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0
0
Report

सिया गोयल और चेतन चौधरी की अदालत में पेशी, पांच दिन की पुलिस हिरासत खत्म

Varsoli, Maharashtra:Headline : सिया-चेतनला न्यायालयात हजर केलं जाणार, पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय तपासलं? केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठди संपणार आहे. त्यामुळं आज या دوघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. न्यायाधीश ए एम विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडेल. सियाने तिचा युक्तिवाद वकीل विपुल दूशिंग हेचं करतील असं न्यायालयात म्हटल्यानं आता वकील आशुतोष श्रीवास्तवांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील. तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड कामकाज पाहतील. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपासण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले जाणारेत. ग्राफिक्स इन *पाच दिवसांची रिमांड कशासाठी घेण्यात आली अन कोणते धागेदोरे हाती लागले?* १) कट कुठे रचला? - पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत बसून कट रचला गेला, त्या ठिकाणी सियाला नेहून तपास करण्यात आला. २) हत्येचा सराव कुठे झाला? - पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येचा कसा सराव करण्यात आला? हे जाणून घेण्यासाठी सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली. ३) डिलीट डेटा रिकव्हर - फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला. - डिजिटल पुराव्यांचा तपास केला गेला. ४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा? कबुली किंवा चर्चा झाली का? - गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन कोणाला भेटले का? कोणाशी संवाद साधला का? त्यांच्याकडे हत्या आणि कटाबाबत काही सांगितलं ka? याची चौकशी करण्यात आली. ५) घटनाक्रमाची पुनर्रचना - सियानंतर चेतनसोबत क्राईम सिन रिक्रियेशन करण्यात आलं. - चेतनचे गेट येनेलिसिस करुन सबळ पुरावा मिळवला. ६) लोहगडावर कोणाशी संवाद साधला का? सीसीटीव्हीतील दृश्यात काय घडलं? - हत्येदिवशी लोहगडावर सिया आणि चेतनने कोणाशी संवाद साधला का? - सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दृश्यात सिया आणि चेतनने नेमका कोणता संवाद साधला? याची चौकशी करण्यात आली. ७) आधीही हत्येचा प्रयत्न? - 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का? हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. ८) केतनचा पासपोर्ट - खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलवर जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न झाला. ९) नव्या साक्षीदारांचे जबाब - काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी. १०) लोहगडची आधी रेकी? - हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने किती वेळा रेकी केली? या कटासाठी किती वेळा भेटले? याची चौकशी ११) आणखी कोण सहभागी? कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? - सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली. १२) हत्येदिवशीच्या वस्तू जप्त - सियाने हत्येदिवशी वापरलेले कपडे घरी ठेवले होते, तिला मार्केटयार्ड येथील घरी नेहून कपडे जप्त केले - चेतनची हत्येदिवशीची पॅन्ट जप्त करण्यासाठी पावलं उचलली गेली. End vo : पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रिमांडच्या बारा कारणांची उत्तरं शोधण्यात आली. यातून जे धागेदोरे हाती लागलेत, ते आज न्यायालयात सादर केले जातील. यातून काय धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
0
0
Report
Advertisement

लोणावळे के भुशी डैम में ओवरफ्लो, भारी बारिश से पर्यटन बढ़े

Varsoli, Maharashtra:लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यात मागील 48 तासांत तब्बल 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा दिमाखात वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लोणावळ्यातील वर्षाविहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले असून पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. भुशी धरतं ‘ओव्हरफ्लो’ झाले.
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड़ में बारिश जारी, सुबह ट्रैफिक जाम से आमजन परेशान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात अखेर पावसाने सातत्यपूर्ण हजेरी लावत शहरवासीयांना काहीसा दिलासा दिलाय. शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शहराच्या विविध भागात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. काही भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी ही कोसळल्या. सतत पडत असलेल्या पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर कामाला जाण्याची वेळ आणि शाळेत जाण्याची वेळ एकच असल्याने सकाळी काही भागात ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरात सुरू असलेल्या पावसासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी
0
0
Report

गोहागर गोल्डनमैन केस: दो आरोपियों को जन्मठेप की सजा, 12 साल बाद फैसला

Ratnagiri, Maharashtra:गुहागर/ रत्नागिरी गुहागरच्या गोल्डनमॅन विश्वास खरे खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप; १२ वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अँकर रत्नागिरि जिल्ह्यातील गुहागर येथील बहुचर्चित गोल्डनमॅन तथा कासव संरक्षक विश्वास महादेव खरे यांच्या खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. चिपळूण अतिरिक्त सत्र न्यायालयाने या prकरणातील दोन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावत तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावे, मोबाईल सीडीआर आणि इतर साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. या निकालामुळे खरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याचा धाक कायम राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
0
0
Report

नागपुर में एक रात में दो हत्याएं, नए पुलिस कमिश्नर के बाद अपराधी सक्रिय

Nagpur, Maharashtra:नागपूर - उपराजधानी नागपुरात हत्याकांडाची मालिका सुरुच, एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत महिलेची आणि सराईत गुन्हेगाराची हत्या झालीय. नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आल्यानंतर खून सत्र सुरूच, शहरात सलग 3 खूनांच्या घटना. गणेश प्रेमलाल बोरकर असे भांडवाडीत मृतकांचे नाव आहे... त्याच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून धारधार शस्त्राने हत्या करण्यात झालीय. गणेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. याच जुन्या वादातून हत्यां झालाचा अंदाज असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत गादा गावाजवळील फार्महाऊस परिसरात रस्त्याच्या कडेला गुरुवारी रात्री भाग्यश्री नावाच्या महिलेचा मृतदेह आढळला. भाग्यश्री असे मृतक महिलेच नाव आहेय. भाग्यश्रीच्या पतीवर हत्येचा संशय आहेय. याआधीच फुटाळा परिसरातंही एकाची हत्या करण्यात आली होती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top