icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई प्रकल्प लाभार्थियों को जमीन का مالکाना हक पाने का सोना मौका—सरकार का अध्यादेश

Navi Mumbai, Maharashtra:आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रकल्पग्रास्थ्यांच्या घरांसाठी आयोजित बैठकीत प्रकल्पग्र स्वास्थ्यांना मोठा दिलासा देणारी माहिती दिलेय. शासनाने अध्यादेश काढत सिडकोच्या प्रचलित दरानुसार प्रकल्पग्र Heathांच्या अडीच गुंठा जागेसाठी 15 टक्के आणि 5 गुंठा जागेसाठी 25 टक्के रक्कम भरून मूळ जागा आपल्या नावे करण्याची संधि राज्य सरकारने दिलेय. आमदार मंदा म्हात्रे यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करत पूर्वीचे वाढीव दर कमी करुन आणले असून आता तरी प्रकल्पग्रस्थान्नी या संधीचे सोने करावे काही नेते आम्ही मोफत करू अश्या अफवा पसरवतील मात्र त्याफसव्या आश्वासनांना बळी पडू नये अन्यथा आपली जमीन आपल्या नावे कधीच होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report

इंदापूर मराठा सेवकों की कार दुर्घटना, रामचंद्र जमदाडे की मृत्यु, अन्य घायल

Rui, Maharashtra:इंदापूरच्या मराठा सेवकांच्या carला बीडमध्ये अपघात.... रामचंद्र जमदाडे यांचा अपघातात मृत्यू.... शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार Anchor _मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेलेल्या इंदापूर तालुक्यातील मराठा सेवकांच्या गाडीला बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघात झाला यात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील रामचंद्र शंकर जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष पांडुरंग माने आणि बिपिन नारायण मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न कोणत्याही आंदोलनात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सरडेवाडी गावासह इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली असून रामचंद्र जमदाडे यांच्यावर आज रविवारी सरडेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील,कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे,माजी संचालक वामनराव सरडे यांसह सरडेवाडी गावाचे ग्रामस्थ,विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि मराठा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार मनوج जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रामचंद्र जमदाडे, बिपिन मोरे आणि संतोष माने हे स्विफ्ट कारमधून अंतरवाली सराटी येथे गेले होते. जरांगे पाटील यांच आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर हे मराठा सेवक परतीचा प्रवास करत होते. याचवेळी मांजरसुंबा घाट ओलांडून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर पुढे आल्यानंतर मध्यरात्री दोनच्या sुमारास त्यांची स्विफ्ट car रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारमधील रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
0
Report

चाकण बाजार में कांदा कीमत 6–12 रुपए; किसानों को राहत चाहिए

Shirur, Maharashtra:केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठका आणि चर्चांचा सपाटा सुरू असला, तरी प्रत्यक्ष बाजार समित्यांमधील परिस्थिती बदललेली दिसत नाही. एकीकडे शेतकरी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे कांद्याचे लिलावांमध्ये कांद्याला प्रति किलो केवळ ६ ते १२ रुपये किलो दर मिळत असल्याचे समोर आले. खत, बियाणे, मजुरी, औषधे आणि डिझेलच्या खर्चामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी किमान २० ते २१ रुपये किलो दर मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
0
0
Report
Advertisement

मंचर में सर्वपक्षीय महामोर्चा: किसानों के हक के लिए बड़ा प्रदर्शन

Shirur, Maharashtra:Anc:गेली काही दिवस झाले, घामाचं दाम मिळेनासं झालंय! कांद्याचे बाजारभाव मातीमोल झालेत आणि बळीराजा पुरता संकटाच्या खाईत लोटला गेलाय. आता याच अन्यायाविरोधात, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुण्याच्या मंचरमध्ये ठिणगी पडणार आहे! येत्या २ जून रोजी मंचरमध्ये 'सर्वपक्षीय महामोर्चा'चा विराट एल्गार पुकारण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या या जनआक्रोशात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय, कारण या महामोर्चात दिग्गजांची फौज मैदानात उतरणार आहे. मोर्च्यात सामील होणारे प्रमुख नेते: शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष) हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस) खासदार: निलेश लंके, डॉ. अमोल कोल्हे आमदार: सचिन अहिर, रोहित पवार, अशोक पवार बाबाजी काळे, शरद सोनवणे यांच्यासह स्थानिक नेते आणि हजारो संतप्त शेतकरी! कांदा उत्पादकांच्या या थेट सवालाला आता सरकार काय उत्तर देणार? या महामोर्चानंतर तरी कांद्याला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय! प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report
Advertisement

मालेगाव समेत ग्रामीण इलाकों में शाम की तेज बारिश, गर्मी से राहत, किसानों में उम्मीद

Nashik, Maharashtra:मालेगावसह ग्रामीण भागात पाऊस पडला... पावसाच्या सरींनी उकाडा झाला कमी... 44° डिग्री उन्हाच्या तडाख्याने मालेगाव करांना दिलासा. मालेगाव शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आज सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, शेती कामांसाठीही या पावसाचा काही प्रमाणात फायदा होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता वर्तवली आहे
0
0
Report

80 तोला सोने के ठगी: बैंक लॉकर से नकली सोना रखने वाला मिला गिरफ्तार

Nanded-Waghala, Maharashtra:ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्विस मॅनेजरनेच डल्ला मारला. हा डाव उघड केस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये खरे सोने काढून घेऊन 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. नांदेडमध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. नांदेड शहरातील डॉक्टर लेन भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले होते. आठ ग्राहकांनी लॉकर मध्ये ठेवलेले 391 ग्राम सोने हे बँकेच्या कॅश इन्चार्ज असलेल्या आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे यांच्या ताब्यात होते. या दोघानी बँकेच्या लॉकरमधील 414 ग्रॅम सोने काढून घेतले आणि लॉकरमध्ये बनावट सोने ठेवले. दोघांनी 805 ग्राम लंपास केले होते. या सोन्याची किंमत 85 लाख 81 हजार रुपये एव्हढी आहे. सोने कमी असल्याच्या तक्रारी आल्या नंतर बॅक व्यवस्थापकाने तपासणी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के पालकमंत्री प्रताप सरनाईक के साथ महायुती की पारी में अहम फैसले

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रायगड पालकमंत्री ---- शपथविधी झाल्यापासून पालकमंत्री म्हणून आम्ही भरत गोगावले यांच्याकडेच बघत होतो. महायुती म्हणून दोन पावलं मागे पुढे यावं लागत. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचा विजय होईल 7 जागा आग्रही ----- काही देवाणघेवाण असतात काही राजकीय समीकरण असतात. महायुती मध्ये मागण काही मोठी गोष्ट नाही. मागच्या वेळेस आम्ही ज्या पाच जागा लढलो त्या कायम ठेवाव्यात आणि दोन अतिरिक्त जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची मागणी होती. मात्र भविष्यात अजून काही गोष्टी आम्ही आमच्या वाट्यामध्ये पाडून घेऊ लक्षमण हाके --- स्वतःला मोठे नेते म्हणवणाऱ्यांनी लोकांनी काही गोष्टींमध्ये तोंडाला कुलुप लावण गरजेच असत. प्रसाद लाड यांच्या सारख्या व्यक्तीबद्दळ अस बोलणं योग्य नाही
0
0
Report

नाशिक के बागलाण में मध्यरात्रि अघोरी पूजा, सीसीटीवी फुटेज से पर्दाफाश

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाणमध्ये मध्यरात्री स्मशानात अघोरी पूजा... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..., संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद... Anc: नाशिकच्या सटाणा शहरातील जुन्या अमरधाममध्ये मध्यरात्री कथित अघोरी पूजा झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत येऊन तांत्रिक विधी केल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या सोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन कथित अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा" अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

मान्सून में कोकण रेलवे: 15 जून से समय बदला, वंदे भारत-तेजस के फेरे घटे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वंदे भारत तेजसच्या फेऱ्यात 15 जून पासून कपात.. कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक.. गाड्यांच्या वेळा ही बदलणार.. कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून काळातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वेने 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे.. या कालावधीत मुंबई,पुणे,नागपूर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकावरून धावणाऱ्या कोकण मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.. वंदे भारत,तेजस आणि एलटीटी-मडगाव एक्सप्रेसच्या फेऱ्यावरही कपात करण्यात आली आहे.. मान्सून काळात या मार्गावर सर्व गाड्यांसाठी ताशी 75 किलोमीटरची कमाल वेग मर्यादा लागू केली आहे.. कोकण रेल्वे मार्गावर मुसळधार पाऊस,दरडी कोसळण्याचा धोका,बोगदे आणि घाट विभागातील सुरक्षितता यामुळे मान्सून वेळापत्रकात गाड्यांचा वेग नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.. या गाड्यांच्या वेळा बदलल्या.. 1) वंदे भारत एक्सप्रेस- मुंबईहून सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी सुटून दुपारी 4 वाजता मडगावला पोहोचेल.. 2) तेजस एक्सप्रेस - सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुटून सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी मडगावला पोहोचेल.. 3) जनशताब्दी,मांडवी,तुतारी,मत्स्यगंधा,नेत्रावती,दुरांतो,गरीब रथ तसेच मंगळूरु आणि केरळकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळात बदल कारण्यात येईल.. कोणकोणत्या गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यात पाहूया- 1) वंदे भारत - 6 दिवसांवरून 3 दिवस 2) तेजस - 5 दिवसांवरून 3 दिवस 3) एलटीटी-मडगाव - 4 दिवसांवरून 2 दिवस..
0
0
Report

रत्नागिरी में अवैध शस्त्रों पर पुलिस कार्रवाई: सात हथियार, 29 कारतूस जप्त, आठ गिरफ्तार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..crime अवैद्य शस्त्रांवर पोलिसांची कारवाई.. सात बंदुकांसह 29 काडतूसे जप्त.. आठ जणांना बेड्या..जिल्ह्यात धडक मोहीम.. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने अवैद्य शस्त्राविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.. या मोहिमेअंतर्गत 2026 मध्ये पोलिसांनी तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले.. या कारवायांमध्ये गावठी कट्ट्यासह सात अवैद्य शस्त्रे आणि 29 जिवंत काडतूसे जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.. या प्रकरणी एकूण आठ संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.. एकूण 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
0
0
Report

कल से सभी बस स्टॉप पर प्रसाधन गृह मुफ्त, 78 हजार पेड़ लगाए जाएंगे

Oras Bk., Maharashtra:उद्या पासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत असणार आहेत. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एस टी महामंडळंच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला कोकणातील बस स्थानकांची प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी बस स्थानकाची सरनाईक यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत उपनेते संजय आंग्रे माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली त्यासोबत 78 हजार झाड लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. सीएनजी पुरवठा बाबत आपण असमाधानी असून येत्या काळात एस टी बस इलेक्ट्रिक बस मध्ये रूपांतर केले जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top