icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वन विभाग ने विहिरी में फँसे बिबटे को सुरक्षित बाहर निकाल कर नैसर्गिक आवास में छोड़ दिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घुसूर गावात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला يश आले आहे. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विशेष पिंजरा आणि आवश्यक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. या यशस्वी मोहिमेनंतर बिबट्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.
0
0
Report

हर्सूल तालाब से पानी उपसा जल्द बंद, जायकवाड़ी जलापूर्ति शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल तलावातील पाणी उपसा लवकरच बंद होणार आहे, आता जुन्या शहराला जायकवाडी धरणातील पाणी पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षी तुडुंब भरलेल्या हर्सूल तलावातील पाण्याचे महापालिकेने वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याने जून महिन्यातही तलावात तब्बल १९ फूट जलसाठा शिल्लक आहे. नक्षत्रवाडी ते हर्सूलदरम्यान टाकण्यात आलेली १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांत तलावातील पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या जलवाहिनीद्वारे शहरातील नागरिकांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध होणार आहे. हर्सूल तलावातील पाणी उपसा बंद झाल्याने परिसरातील भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होणार असून विंधन विहिरधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
0
0
Report

अमरावती में मानसून पूर्व बुवाई तेज, किसान बुवाई के लिए आशंका से जूझ रहे

Amravati, Maharashtra:अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात; शेतकऱ्यांना पेरणीचा हंगाम निघून जाण्याची भीती अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात झाली असून काही शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीने मान्सूनपूर्व पेरणी केली असल्याचे दिसत आहे. राज्यात जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी मान्सून दाखल झालेला नाही. समाधानकारक वर्षा झाली नसतानाही काही ठिकाणी पाऊस झाला नाही तरी पेरणी चालू आहे. कृषी विभागाने प्रलंबित अडथळ्यांमध्ये 70% पेक्षा अधिक पाऊस झाल्यास पेरणी करण्याचे निर्देश दिले, परंतु पेरणीचा हंगाम हातातून निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी पारंपरिक पद्धतीने कपाशीची पेरणी करत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावर आढावा आमचे प्रतिनिधी अनिरुद्द दवळे यांनी घेतला.
0
0
Report
Advertisement

हिंगोली में वर्षा नहीं, किसान खरिप की बोआई पर मंडरा रहा संकट

Hingoli, Maharashtra:अँकर- जून महिना संपत आलाय, पण आकाशात ढगांचा मागमूसही नाही पावसा बरस रे अशी आर्त हाक मराठवाड्यातील शेतकरी करतोय हिंगोली जिल्ह्यात तर परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली,घरात बियाणे आणून ठेवली, पण पाऊसच गायब असल्याने पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. खरिपाच्या सोयाबीनवर संपूर्ण वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पावसाअभावी अश्रू आले आहेत. जिल्ह्यात आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सध्या दररोज सकाळी उठून चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हातान्हात घाम गाळून जमीन तयार केली खरी, पण पाऊस नसल्याने मायबाप धरणीमाता आता कोरडीठाक पडली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर में मंचूरियन में मिला पाली का पिल्ला, खाने से युवती की हालत बिगड़ी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात मंचुरियनमध्ये आढळलं पालीचं पिल्लू. मंचुरियन खाऊन तरुणीची तब्येत बिघडली. उल्हासनगराच्या सुभाष टेकडी परिसरात मोना पठारे ही तरुणी वास्तव्याला आहे. सायंकाळच्या सुमारास तिने सुभाष टेकडी मच्छी मार्केट परिसरातील मोरे चायनीज भेळ वाल्याकडून मंचुरियन घरात आणलं. हे मंचुरियन खात असतानाच त्यात पालीचं मेलेलं पिल्लू असल्याचं तिला आढळलं. त्यामुळे तिने पुन्हा एकदा मंचुरियन वाल्याला जाऊन सांगितलं असता त्याने चटणी टेस्टिंगसाठी पाठवतो, पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, असं तिला म्हटलं. यानंतर रात्री या तरुणीची तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अशाप्रकारे निष्काळजीपणा करून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चायनीज भेळ आणि मंचुरियन विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
0
0
Report

दिवा क्षेत्र के 39 अनधिकृत गोडाउनों पर निष्कासन अभियान; सर्वे जारी

Thane, Maharashtra:दिवा परिसरातील ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई सर्वेक्षण मोहीमही सुरू ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत शनिवारी (दि. २० जून २०२६) शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरात असलेल्या ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी नमूद केले.
0
0
Report

शिर्डी में भगवा वादळ के बीच हिंदू समाज का सड़क प्रदर्शन

Shirdi, Maharashtra:साईंंच्या शिर्डीत भगवे वादळ. शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा. पश्चिम बंगालमधून कुटुंबीयांसोबत साई दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर विनयभंग. साईबाबा संस्थानच्या 500 रुम भक्तनिवासातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याने संताप. (मुलगी हिंदू तर आरोपी मुस्लिम आहे) अमन पठाण असे कर्मचाऱ्याचे नाव; शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक. अहिल्यानगरचे आ.संरंग्राम जगताप, भाजप नेते सुजय विखे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग सांचे सह सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर. शिर्डी शहरातून मुख्य मार्गावरून काढण्यात आला मोर्चा. मोर्चानंतर सभेचे आयोजन.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में अवैध मद्यपान अड्डे पर छापा, 4 ग्राहक गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 4 ग्राहकांसह मालिकाविरुद्ध गुन्हा दाखल, मोठा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरच्या पथकाने ताडोबा व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यासाठी आवश्यक ते साहित्य/सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आढळून आले. कारवाईदरम्यान 4 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष खोबरागडे, हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोहिमेत देशी दारु, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या बाटल्यासह मोठा दारू साठा जप्त करण्यात आलाय.
0
0
Report

अमित शाह ने पश्चिम महाराष्ट्र के लिए 1500 करोड़ रु को-ऑपरेटिव प्लांट की घोषणा

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अत्याधुनिक को-ऑपरेटिव्ह संयंत्र उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. या संयंत्रामध्ये साखर, इथेनॉल आणि सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून होणारा नफा महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आणि साखर कारखान्यांना बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
0
0
Report
Advertisement

इचलकरंजी के लिए नई पानीपुरवठा योजना: शाह-फडणवीस की घोषणा से फाइनल मंजूरी

Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.. या योजनेसाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृष्णा नदीकाठावरील नवे दानवाड येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाल्याने, शहरवासीयांचा अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी सभेत शहराच्या पाणीप्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांनी घोषणा करावी अशी मागणी या कार्यक्रमा केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली.
0
0
Report

निफाड़ तालुक के पूर्व भाग में बारिश शुरू, किसानों को मिली राहत

Niphad, Maharashtra:अँकर:-निफाड तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आणि नागरिक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. अखेर पावसाचे आगमन झाल्यामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि विशेषतः बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आता परिसरातील रखडलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मावळ के अंबी MIDC में पुष्पक एग्रो कंपनी में भीषण आग

Varsoli, Maharashtra:Anchor: मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरातील वराळे येथील पुष्पक अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आंबी एमआयडीसी अग्निशामक दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top