icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गडचिरोली में गर्मी के कहर से पानी की कमी: सैकड़ों चमगादड़ों की तड़फड़ कर मौत

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- वाढत्या तापमानाचा कहर, पाण्याअभावी शेकडो वटवाघळांचा तडफडून मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागील घटना अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्णतेची सर्वात मोठी झळ आता पक्षी आणि वन्यजीवांना बसत आहे. पाण्याअभावी तब्बल 500 हून अधिक वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरोंचा तालुक्यात समोर आलीये. सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. मात्र जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागे वन विभागाच्या कंपाउंडमधील झाडांवर शेकडो वटवाघळाचे वास्तव्य आहे. मात्र वटवाघळांनी पाण्यासाठी अक्षरशः जीव सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, दरवर्षी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात पाण्याची सोयच नसल्यामुळे शेकडो वन्यजीवांचा बळी गेल्यानं वन विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

लातूर में विलासराव देशमुख की 81वीं जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम

Latur, Maharashtra:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलास बाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित राहून त्यांनी विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याप्रती आदरभाव व्यक्त केला. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत बाभळगाव परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

वसई बोळींज अस्पताल में भारी गड़बड़, विपक्ष ने किया पर्दाफाश

Vasai-Virar, Maharashtra:वसई पालिकेच्या बोळींज रुग्णालयाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांकडून रुग्णालयातील वस्तुस्थितीचा भांडाफोड. कोट्यावधीची सामग्री, औषधे अनेक वर्ष धुळखात पडून. विरार महानगरपालिकेच्या बोळींज माता बालसंगोपन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिमेकडील बोळींज रुग्णालयात भेट दिल्या नंतर भयानक वास्तव समोर आले आहे ... कोट्यावधीं किंमत असलेली सामग्री, औषधे, प्रोटीनचे डबे, अनेक वर्ष धूळ खात असलेल्या अवस्थेत आढळून आले. रुग्णालयाच्या या इमारतीला लिकेज होऊन पाणी गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.. तसेच विविध उपकरणे धुळखात पडले आहेत. बेड खुर्च्या.. रुग्णांसाठी देण्यात येणारे बेडशीट असताना सुद्धा रुग्णांना ते देण्यात येत नव्हते.. त्यांना घरून कपडे आणायला सांगितले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी केला आहे.
0
0
Report

खेड ग्रामपंचायत की सरपंच लता फरांदे निलंबित, 17 लाख की वित्तीय गड़बड़ी की पुष्टि

Satara, Maharashtra:साताराः खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल पावणे सतरा लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे. खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि त्यानंतर सादर करण्यात आलेल्या फेरचौकशी अहवालात सरपंचांवर ठेवण्यात आलेले काही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले असून तक्रारदारांनी सरपंच यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
0
0
Report

अण्णा हजारे: कांदा उत्पादन लागत के बराबर भाव मिलने चाहिए

Ahilyanagar, Maharashtra:केंद्र सरकारने कांद्याच्या दरात वाढ केली आहे, 1580 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव दिला जाणार आहे...मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कांद्याचा उत्पादन खर्च मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे...यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शेतीमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर असले पाहिजे असं अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे...शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ही दुर्दैवी आहे,एकीकडे कृषीप्रधान भारत देश म्हणतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही...शेतकरी जेवढा खर्च करतो त्यात भर घालून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय.
0
0
Report
Advertisement

अधिक मास में पंढरपुर: VIP घुसखोरी पर प्रशासन की कड़ी कार्रवाई

Pandharpur, Maharashtra:अधिक मासानिमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग चार किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे दरम्यान दर्शन रांगेमधील घुसकोरी करणाऱ्या व व्हीआयपी दर्शन देणाऱ्या कर्मचारी किंवा खाजगी एजंटांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकीएन एस यांनी आज पंढरपूरात दिली. मागील दोन-तीन दिवसांपासून दर्शन रांगेमध्ये भाविकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्तिकीऐन एस यांनी प्रत्यक्ष दर्शन रांगेची पाहणी करून भाविकांची संवाद साधला. अधिकमासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. कमी वेळेमध्ये सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शनाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी व्हीआयपी दर्शन बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हीआयपी दर्शन देणाऱ्या व घुसखोरी करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी सांगितले.
0
0
Report

पटाखा हिंदी में: रत्नागिरी के लिए 30 जून तक HSRP अनिवार्य, उल्लंघन पर 1000 रुपये का जुर्माना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जुन्या वाहनांना ३० जूनपर्यंत HSRP नंबरप्लेट बंधनकारक.. न बसवल्यास १ हजार रुपये दंड.. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ४२३ पात्र वाहनांपैकी १ लाख ५१ हजार १९१ वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यात आली आहे, तर १० हजार ३५६ वाहनांचे काम प्रक्रियेत आहे. मात्र, अद्याप ४९ हजार ८७६ वाहनधारकांनी यासाठी बुकिंग केलेले नाही. या सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत HSRP नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना थेट १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला असून वाहनधारकांनी मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
0
0
Report

कळंबस्ते-धामणंद मार्ग की दुर्दशा पर शिवसेना का आक्रामक प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक.. सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला जाब!.. कळंबस्ते-धामणंद मार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता, शिवसैनिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला धारवर धरलं.. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची तात्काळ डागडुजी करा, खड्डे बुजवा आणि रस्त्याची साफसफाई करा,असा थेट जाब प्रशासनाला विचारण्यात आलाय.. प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत,तर तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे..
0
0
Report
Advertisement

प्रणिती शिंदे के नेतृत्व में काँग्रेस का मार्केट यार्ड चौक पर रास्ता रोको शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर - शेतकऱ्यांचे विविध प्रश्नां संदर्भात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात शेतकरी आणि जनसामान्यांच्या विविध प्रश्नांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाला करण्यात आली सुरुवात कांदा, सोयाबीनला योग्य भाव मिळालाच पाहिजे याचसोबत इंधन दरवाढ कमी झाली पाहिजे यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
0
0
Report

संगमेश्वर में सोन पुल के अंतिम चरण के बाद 15 जून से एक-तरफा यातायात शुरू

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पर संगमेश्वर के पास यातायात जाम जल्द खत्म होगा. सोनापुल पुल पर काम अंतिम चरण में है और 15 जून तक एक-तरफा पुल पर यातायात शुरू हो पाएगा. इसे राष्ट्रीय महामार्ग विभाग ने मंजूरी दी है. इससे संगमेश्वर बस स्टेशन के सामने होने वाले यातायात जाम से बारिश के मौसम में राहत मिलेगी. कई वर्ष से सोन पुल का काम धीमी गति से चल रहा था, जिसके कारण रोज यातायात जाम का सामना करना पड़ता था. एक किलोमीटर का सफर तय करने में दो घंटे लग रहे थे, जिससे स्थानीय चालक नाराज़ थे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top