Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Mar 07, 2026 14:48:17
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे: जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत असून याबाबत आढावा शासनामार्फत घेण्यात आला. शासनाकडे याचा अहवाल आला असून हवामानातील बदलांमुळे पिकावर परिणाम झाला असून ८५ टक्के पिक नुकसान झाले आहे. शासनाकडे याचा अहवाल देण्यात आला आहे. येथील शेतकरी मुंबईत मला भेटायला आले. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. त्यानुसार नवीन टेक्नॉलॉजी येईल का ? किंवा नवीन संशोधन केंद्र कडून मार्गदर्शन होईल का? त्यानुसार, मी माहिती घेऊन बारामतीत एक “एडीटी” (एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट) म्हणून संस्था आहे. १९५७ संस्था स्थापन असून यांनी आधुनिक कृषी संशोधन केंद्र उभारले आहे. त्यावेळी मी त्या संस्थेला येथील आंबा स्थितीची माहिती दिली. यावर १० दिवसात अहवाल करून मला तो सादर केला आयओटी , ड्रोन, डिजिटल प्रणाली, चांगल्या दर्जाची औषधे या प्रमुख मुद्द्यावर स्पष्ट माहिती दिली. आपल्याकडे अवकाळी पाऊस, फूल कीड, बुरशी याचा प्रादुर्भाव फळवर होतो. अचूक हवामान माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल. फुलोरा, फळधारण, किड, औषध व्यवस्थापन, मातीची आर्द्रता यांचा अभ्यास होईल. उपग्रह तंत्रज्ञानद्वारे फळ संशोधन करण्यात येईल. या प्रकल्पाचा खर्च प्रति हेक्टर ४५ हजार रुपये : साडेचार कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून होईल. सरकारकडून बागायतदार वर्गाला मदत होईल. भविष्यात असे संकट शेतकरी वर्गावर येऊ नये म्हणून प्रयत्नशील; बारामती संशोधन केंद्राची मदत घेणार हा राजकीय विषय नाही. सर्वांनी सहकार्य करावे. आता शासनाकडे याची माहिती असून कोणी मोर्चा काढावा हा त्यांचा प्रश्न शेतकरी नेते राजू शेट्टी मला मुंबईत भेटले हा प्रश्न तुमचा आमचा नसून येथील सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. कोकणातील शेतकऱ्याला मदत शासन करणार, तरीही मोर्चा काढायचा असेल तर योग्य, मी सुद्धा मोर्चात जाणारा आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना हा प्रश्न माहिती आहे. आखाती देशात आपला आंबा जातो, ते ही संकट आहे. कालही अर्थसंकल्पात येथील शेतकऱ्यांना मदत झाली. हवे तर मी १२ तारीखाच्या मोर्चात येतो. माझ्या नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ नये. देवभाऊंचे सरकार येथील शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार. आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी अधिवेशनात यावर लक्षवेधी मांडली आहे. मोर्चा जायला हरकत नाही. शासन म्हणून हरकत नाही. शेट्टीसाहेब भेटले त्यांच्याशी चर्चा झाली. लोकशाहीत ज्यांना मोर्चा काढायचा असेल त्यांनी नक्की काढावा. मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरळीत सुरू झाली आहे. उद्या मी मुंबईत त्याच बोटीने जाईन. मोर्चा काढण्यामागे राजकीय हेतू असेल. मी कोणाशीही बोलायला तयार फळ संशोधन केंद्र बागायतदारांना योग्य माहिती देत नाही, ही बाब किंवा तक्रार मला माहिती आहे. या केंद्राची कामे चांगली नसून याबाबत बागायतदारांनी तक्रारीकेल्या आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 14:32:32
Jalna, Maharashtra:FEED NAME | 0703ZT_CSN_JALIL_BYTE(1 FILE) छत्रपती संभाजीनगर | इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया... ON रोजगार मेळाव्याचे आयोजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की मी 50 लाख नोकऱ्या देऊ मात्र अशा पोकळ घोषणा खूप होतात, जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती महाराष्ट्रात अनेकदा अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती पण खऱ्या अर्थाने किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या याचा आकडा कधीच समोर आला नाही, आणि नोकऱ्या दिल्या की नाही दिल्या तेही माहित नाही मात्र माझ्या वतीने मी वारंवार तरुणांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत राहिलेलो आहे, अनेक कंपन्यांना आम्ही विनंती करतो आणि त्यातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करतो .... ON एमआयएम नगरसेवकांवर कारवाई होणार? जेव्हा लोक आपले प्रतिनिधी निवडतात तर ते घरी बसण्यासाठी नाही निवडत, त्यांची अपेक्षा असते माझ्या अडचणीच्या काळात ते लोकप्रतिनिधी आहे ज्यांना मी निवडून दिलेला आहे ते माझ्यासाठी धावून येईल आता जो काही प्रकार घडला होता (पैठणगेट येथील अतिक्रमण कारवाई) जेव्हा मारामारी झाली होती, मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं त्याच्या बाबतीत तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती तुम्ही करा. त्याच कोणीही समर्थन करणार नाही पण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे एक तर चूक कोणाची आहे हे स्पष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे 2014 ला केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी एक कायदा काढला, आणि तो कायदा सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकाांना बंधनकारक आहे, की त्यांनी त्या फेरीवाल्यासाठी जागा निर्माण करावी, नियमाप्रमाणे आहे त्यामुळे आपली महानगरपालिका काही वेगळी आहे का? की विदेशातील आहे ज्यांना तेथील नियम लागू होतात पहिले आपल्याकडे आयुक्त एकटेच होते, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला असता तर, फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण केली असती तर, त्यामुळे तुम्ही तसं का नाही केलं मलाही माहित आहे की शहागंज परिसरात आणि इतर ठिकाणी देखील नेहमी जिथे फेरीवाल्यांना अडचण होत आहे फेरीवाले कशासाठी उभे राहतात तर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उभे राहतात *फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण होत नाही याचा अर्थ हा होतो की महानगरपालिका किंवा पोलीस आयुक्ताचा एखादा कर्मचारी असू द्या त्या कर्मचाऱ्यांसाठी हे फेरीवाले म्हणजे एटीएम मशीन असते* *तुम्ही कधीही जायचं त्याला इथून उठ म्हणायचं मग तो तुम्हाला विनंती करतो शंभर पाचशे रुपये देतो* शहागंज परिसरात एक पोलीस चौकी आहे, ज्यावेळी तिथे महाराज झाले तेव्हा तिथे पोलीस वाले का नव्हते चूक जर महानगरपालिकेची आहे, आणि तुम्ही फक्त त्या फेरीवाल्यांवर जबरदस्ती करत होते त्यामुळे आमचे लोक तिथे गेले, कुणाची भाषा कशी होती ते मला माहित नाही मात्र तुम्ही तेरा लोकांवर गुन्हे दाखल केलेत त्यामुळे मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो, हे पोलीस आयुक्तांनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही समजून घ्यावे "आमचे जे नगरसेवक त्या ठिकाणी नव्हते त्यांची देखील नावं त्या एफ आय आर मध्ये टाकण्यात आले त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून ते टाकण्यात आले?" सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला जबरदस्ती केली आहे का?, पराभव झालेल्या उमेदवारांनी तुम्हाला ही सक्ती केली का? याचा अर्थ हा आहे की कुठे काही झालं तर आमच्या नगरसेवकांनी घरी पळून जावं आणि गोधडीत लपून बसावं त्यामुळे एका प्रकारे तुम्ही दबाव टाकण्याचे काम करत आहेत, त्यामुळे तुम्ही नियमप्रमाणे जी कारवाई करायची ती करा आम्ही पण न्यायालयात जाऊ आणि न्यायालयामार्फत तुम्हाला प्रश्न विचारू की फेरीवाल्यांसाठी जागा तुम्ही का तयार केली नाही ON अपात्र कारवाई ठीक आहे नियमाप्रमाणे त्यांनी एफ आयआर केलेली आहे , मात्र आता पोलीस आयुक्तांनी त्याची चौकशी करायला हवी त्याचबरोबर आयुक्तांनी याची देखील चौकशी करावी की कुणाच्या सांगण्यावरून हे नाव एफआयआर मध्ये ऍड केले पोलिसांनीच नाव टाकले त्यामुळे तुम्ही काही चौकशी केली ka ki या एफ आय आर मधील नावे असणारे नगरसेवक त्या ठिकाणी होते ka? त्यामुळे जर खोटी एफ आय आर दाखल झाली असेल तर त्यांच्यावर देखील आता कारवाई करा असं एका बाजूने नका होऊ देऊ कायदा काणून आम्हाला देखील कळतो
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 14:31:49
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड, सागाव परिसरात एका उभ्या कारला आग लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणारे रोहित रमेश सरोज यांची मारुती कंपनीची कार दोन अज्ञात इसमांनी जाणीवपूर्वक पेटवून दिली. पहाटे गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच रोहित खाली आगी दिसल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. सर्व CCTV मध्ये कैद झाला थरार. फुटेजमध्ये दोन तरुण मास्क घालून स्कुटीवर आलेले दिसत आहेत. त्यातील एकाने गाडीजवळ जाऊन काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला आणि गाडी पेट घेतली. आरोपींचा शोध पोलीस करत असून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सांдиपन शिंदे यांनी घटनेची दखल घेतली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 14:00:22
Kalyan, Maharashtra:डोंबिवली च्या विष्णू नगर पोलीस ठाण्यामध्ये असलम विरोधात पोक्सो विरुद्ध गुन्हा दाखल. असलम बरोबर निकाह होणारच आणि इतक्यात हिंदूवादी संघटना पोलीस सोबत लग्नाच्या ठिकाणी पोचली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोक्सा बलात्काराचा गुन्हा दाखल. अल्पवयीन असताना इडो व्हिडिओच्या माध्यमातून मैत्री झाली. जवळपास तीन वर्षे प्रेमसंबंध होते. १८ वर्षे होताच लग्न करण्याचे ठरविले. लग्नासाठी काजी आणि साक्षीदार पोहचले. यावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धडक दिली. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. अखेर या प्रकरणात अरमान शेख या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्सा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत तरुणीही डोंबिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. डोंबिवलीत राहणारी एक तरुणी मध्यवर्गीय कुटुंबातील आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ती एका अरमान शेख नावाच्या तरुणासोबत लग्न करणार होती. अरमानने मुस्लिम पद्धतीने लग्न करण्यासाठी सगळी तयारी करुन ठेवली होती. काजी आणि साक्षीदार बोलाविले होते. त्याच वेळी हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले. हिंदू धर्माच्या मुलीशी लग्न करतो यावरुन प्रचंड गोंधळ झाला. हे प्रकरण शांतीनगर पोलिस ठाण्यात पोचले. हे प्रकरण डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने शांतीनगर पोलिसांनी तरुण तरुणीला विष्णूनगर पोलिस ठाण्याकडे पाठविले. अखेर या प्रकरणात पिडीत तरुणीच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख यांच्या विरोधात ब्लॅकमेल करुन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, मैत्री केली. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवले. ब्लॅकमेल करुन लग्नासाठी तगादा लावित होता. अरमान शेख याला पोलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरु केला. अरमान हा व्यवसायाने टेलर आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 13:17:31
Manchar, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या मंचर शहरातील पांडवकालीन बारव व दर्ग्याच्या जागा मालकीचा वाद गेले अनेक दिवस सुरू असून राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या वादग्रस्त परिसराला भेट दिल्याने व त्याठिकाणी हिंदू देवी देवतांचे फोटो लावण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद आता उफाळून आला आहे. त्यामुळे मंचर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वादग्रस्त पांडवकालीन बारव व दर्गा परिसरात आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही समाजाची बैठक बोलावून कायदेशीर बाबीने पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे .मात्र सध्या तरी या दर्गा आणि पांडवकालीन बारव येथे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 07, 2026 13:04:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्यांपैकी जवळपास आठ बिबटे उन्हात असल्याने त्यांना त्रास होत असल्याचं वन्य जीवप्रेमी अमित गायकवाड यांनी म्हंटले होते...याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी प्रतिक्रिया देताना पारनेर तालुक्यातील नर्सरीत आठ बिबटे नसून केवळ एकच बिबट्टा होता असा दावा केलाय...मात्र हा दावा वन्यजीव प्रेमी गायकवाड यांनी खोडून काढलाय...आम्ही स्वतः संबंधित नर्सरीत गेलो त्यावेळी तिथे आठ बिबटे असल्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत...माध्यमात बातम्या येताच उपवनसंरक्षक यांनी आम्हाला बोलावून घेऊन तिथे सहा बिबटे होते आणि ते आजच जुन्नरला पाठवण्यात आल्याचे सांगितले...मतलब माध्यमांना एक बिबट्या असल्याचे सांगितले आणि आम्हाला सहा सांगितले म्हणजेच ते काहीतरी लपवा- छपवी करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय...शिवाय उपवनसंरक्षक यांनी बिबटे जुन्नरला सोडल्याबाबत एकही पुरावा दिला नसल्याचे गायकवाड यांनी म्हंटले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 07, 2026 12:35:22
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात बालगुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांचा जल्लोष करत व्हिडिओ शूट केला. या पार्श्वभूमीवर वाढत्या बालगुन्हेगारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. यादव नगर परिसरातील दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलांचा “किंग इज बॅक” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता होताच त्यांच्या मित्रांनी त्यांनी स्वागत करत असा जल्लोष केला आणि इतकच नाही तर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केले. गुन्हेगारीचे समर्थन करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाल गुन्हेगारी कशाप्रकारे वाढीस लागत आहे हे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही विधी संघर्षग्रस्त मुलं कोल्हापुरातील यादव नगर परिसरातील असून ते तथाकथित “रावण ग्रुप”चे सदस्य असल्याची चर्चा आहे. या ग्रुपमधील अनेक सदस्यांनी आपल्या हातावर “रावण गँग” असे एकसारखे टॅटू काढले असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मुलांवर यापूर्वीही विविध गुन्ह्यांचे आरोप असल्याचे समोर येत आहे. एक गुन्हा केल्यानंतर जास्तीत जास्त काय होणार… बालसुधारगृहात काही काळ ठेवले जाईल आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने मुक्तता होईल, अशी मानसिकता काही बालगुन्हेगारांमध्ये तयार होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे वाढत्या बालगुन्हेगारीमागे एक मोठे कारण आहे. पालक आणि मुलांमधील संवाद कमी होणे, चुकीच्या संगतीत जाणे आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर यामुळे अनेक मुले चुकीच्या मार्गाला लागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनाकडे, त्यांच्या मित्रपरिवाराकडे आणि सोशल मीडियावरील त्यांच्या हालचालींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. एकदा ka एखादा तरुण बालगुन्हेगारीच्या विळख्यात अडकला, तर त्यातून बाहेर पडणे अनेकदा कठीण ठरते. बालसुधारगृहातही अनेक बालगुन्हेगार एकत्र राहतात. त्यामुळे तेथेदेखील त्यांच्यात संपर्क वाढतो आणि बाहेर आल्यानंतर अशा मुलांच्या टोळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाज, पालक आणि प्रशासन यांनीही एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एक अर्थाने बालगुन्हेगारी ही केवळ कायद्याची समस्या नसून ती समाज आणि कुटुंब व्यवस्थेसाठीही मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तनाकडे वेळेवर लक्ष दिले तरच त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 07, 2026 12:20:54
Navi Mumbai, Maharashtra:इस्रायल अमेरिका और इराण च्या युद्धा मुळे फळ निर्यात ला मोठा फटका बसला आहे.... रमजान च्या महिन्यात आखाती देशात , द्राक्ष, कलिंगड, दाळिंब, आंबा, केळी, पपई, खरबूज सारख्या फळांना फार मोठ्या प्रमाणात मागणी असते... जे एन पी टी मध्ये केळी चे 200 कंटेनर, आणि द्राक्ष चे 200 कंटेनर बाहेर काढावे लागले आहेत... आता हा सगळा माल आपल्या देशात विकावा लागणार आहे स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जो समुद्री मार्ग आहे तिथे इराण चा कबजा असल्यामुळे शिप पुढे जात नाही आहेत ...आखाती देशातील , इराण, इराक दुबई,मस्कत, बहरीन, सउदी अरेबिया या ठिकाणी माल जात असतो .. सध्या युद्ध परिस्थिती मुळे रस्त्यात सुद्धा 400 ते 500 कंटेनर अडकून पडले आहेत..येणाऱ्या 8 ते 10 दिवसात हापूस ची आवक पण होणार आहे आणि जर परिस्थिती नाही सुधारली तर हा सगळा माल लोकल मार्केट मध्ये विकावा लागणार आहे और शेकऱ्यांना जर यातून प्रोडक्शन कॉस्ट पण सुटली नाही तर फार मोठ नुकसान शेतकरयांच् होणार आहे...फक्त फळ नाही तर भाज्यांची देखील मोठ्या प्रमाणत निर्यात होत होती त्यामुळे जर येत्या 8 ते 10 दिवसात युद्ध शांत नाही झालं तर भाज्यांवर देखील परिणाम जाणवेल आखाती देशातून आपल्या देशात खजूर, सफरचंद  मोठ्या प्रमाणात येतात मात्र युद्ध परिस्थिती मुळे तिथे देखील हा माल अडकून पडला आहे आपण येत्या काही दिवसात जर हे संकट नाही संपलं तर फार मोठं नुकसान होणार आहे .
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 07, 2026 11:54:35
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे येथे गव्हाच्या पिकाला भीषण आग लागल्याची घटना घडली.शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज तारांमधील घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.या आगीत ४ एकरांतील उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ओंकार वानखेडे, दत्ता वानखेडे, सिताराम वानखेडे आणि दामोदर काळे यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले,तर श्रीराम वानखेडे यांच्या शेतातील ड्रीप सिंचन पाईपलाईनही जळाली.परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 07, 2026 11:54:16
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 11:51:15
Junnar, Pune, Maharashtra:मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले. मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर व शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठी प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार गुजरातमधील Greens Zoological Rescue and Rehabilitation Center (Vantara) येथील २५ सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. आज पहिल्या टप्प्यात १० नर व १० मादी अशा २० बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top