icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला में सूखे से सोयाबीन फसल डूबी, किसानों ने तात्कालिक मदद की मांग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप पिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील विरहित परिसरात पावसाच्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. ऐन फुलोऱ्यात असलेली सोयाबीनची उभी पिके पाण्याअभावी जागेवरच वाळून जात असल्याचं चित्र आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून फुले आणि शेंगाही सुकू लागल्या आहेत. पिकांना पाणी देऊन वाचवण्याचे शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी अपुरा आणि खंडित वीजपुरवठा त्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पाऊस आणखी लांबला तर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आता पाऊस झाला तरी करपलेल्या पिकांना त्याचा कितपत फायदा होईल, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.पावसाअभावी केवळ पिकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या आशाही कोमेजू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

नागपुर में विदर्भ ओबीसी बैठक: दिल्ली आंदोलन की रणनीति तय

Nagpur, Maharashtra:ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक. जातिनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम आणि राज्यस्तरावरील ओबीसींच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची रणनीती ठरणार. हिवाळी अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या दिल्लीतील देशव्यापी आंदोलनासह राज्यभरात तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर आंदोलनाची आखणी. केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्वतंत्र कॉलम न देऊन ओबीसी समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. या अन्यायाविरोधात देशभरातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोष खदखदत असून दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी 'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने राज्यभर व्यापक जनजागरण करण्यात येत आहे सकाळी १०:३० वाजता नागपूर येथील MTDC हॉटेल, सिव्हिल लाइन्स येथे विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने १३ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे देशातील ६५ संघटनांच्या झालेल्या बैठकीतील निर्णयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर होणाऱ्या आंदोलनाची ठोस भूमिका व तारखा निश्चित करण्यात येतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आणि आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारचा पुढाकार स्पष्टपणे दिसत असताना, दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या महाज्योती', वनार्टी' संस्थांना लोकसंख्येच्या आधारावर निधी आणि इतर मॅट्रिकपूर्व तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींबाबत सरकारकडून सुरू असलेली जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढूपणा आता ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही, असा इशारा सकल ओबीसी महामोर्चाने दिला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींप्रमाणेच ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि राज्य स्तरावर ओबीसींना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम आखला पाहिजे, यावर या बैठकीत सखोल विचारमंथन होणार आहे.
0
0
Report
Advertisement

श्रीरामपुर के जानता राजा गणेशोत्सव में मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने ढोल पर थिरककर मचाई धूम

Shirdi, Maharashtra:Anc - श्रीरामपूरच्या ‘जाणता राजा’ गणेशोत्सव मंडळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळाला.ढोलपथकाच्या दमदार वादनाने विखे पाटलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.ढोल-ताशांचा आवाज आणि तरुणाईचा जोश पाहून पालकमंत्र्यांनाही मोह आवरला नाही.थेट ढोलपथकात शिरत विखे पाटलांनी ढोल हाती घेतला आणि तालावर ताल धरला.पालकमंत्र्यांचा हा उत्साही अंदाज पाहून उपस्थितांनीही जोरदार दाद दिली.सध्या विखे पाटलांच्या ढोल वादनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय...
0
0
Report
Advertisement
Advertisement

वाशिम में सूखा घोषित, खरीफ फसलें बर्बाद—किसानों को राहत की मांग तेज

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report

सातारा के कोयना में प्रकाश भोसले ने तापोला-अहिर पुल की हूबहू प्रतिकृति बनाई

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील तेटली येथील प्रकाश भोसले यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी 'तापोला-अहिर पुला'चा हुबेहूब देखावा साकारला आहे. पुलाची रचना, आकार आणि परिसराचे बारकावे अचूक टिपून तयार केलेली ही आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक मोठी गर्दी करत आहेत. विभागातील विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्र्यांवरील प्रेमापोटी साकारलेला हा कल्पक देखावा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
0
0
Report

प्रतापगढ़ किले में मशाल महोत्सव की तैयारी तेज, उदयनराजे भोसले ने पूजा की

Satara, Maharashtra:सातारा: किल्ले प्रतापगड येथे १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवाच्या तयारीला आता जोरदार वेग आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे किल्ले प्रतापगड येथील मशाल महोत्सव समितीच्या मावळ्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हस्ते विधीवत मशाल पूजन पार केले. या पूजनानंतर उदयनराजेंनी मशाली तयार करणे, गडाची स्वच्छता, भव्य स्टेज उभारणी आणि महाप्रसाद अशा सर्व पूर्व तयारीचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि शौर्याला अभिवादन करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त हजेरी लावत असतात.
0
0
Report
Advertisement

8 महीने की चिमुकली के लापता होने से नांदगांव में हलचल, पुलिस जांच तेज

Nashik, Maharashtra:नांदगाव(नाशिक) विशाल मोरे - 8 महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याने खळबळ... नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथील (दि. 17) मध्यरात्रीची घटना.. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान आई - वडिलांच्या अंथरुणावरून चिमुरडी गायब.. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणेसह स्थानिकांकडून चिमुरडीचा कसून शोध सुरु.. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी तळ ठोकून.. या प्रकरणी नांदगाव पोलिसात चिमुकलीच्या वडिलांनी दिली अपहरणाची फिर्याद.. केवळ आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने विविध प्रश्न व शंका केल्या जाताहेत उपस्थित...
0
0
Report

पुणे में गणेश दर्शन: बेलबाग चौक पर AI कैमरे से भीड़ की गिनती शुरू

Pune, Maharashtra:पुणे पाच दिवसांमध्ये पंधरा लाख भाविक.... बेलबाग सह महत्त्वाच्या चौकात एआय द्वारे मोजणी.... गणेश उत्सवाच्या उत्साहात मध्यवर्ती पुण्यात गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे... 14 सप्टेंबर पासून पाच दिवसात 15 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे गर्दीचे अचूक प्रमाण समजून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी बेलबाग सहप्रमुख चौकात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे बसवले आहेत या हेडकाऊंट प्रणालीमुळे गर्दीचा प्रत्यक्ष आकडा उपलब्ध होत असून त्यानुसार बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेत बदल केले जात आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top