icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report

मराठवाड्यात 11 वर्षात विकास फक्त दीड टक्का; घोषणांवर सवाल उठले

Latur, Maharashtra:मराठवाड्याच्या विकासाची गती फक्त दीड टक्का ?... घोषणा मोठ्या, प्रगती दीड टक्का... दानवेंचा सरकारला सवाल... ११ वर्षांत विकासाची प्रगती दीड टक्का... दानवेंचा आरोप... मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या... मोठमोठे प्रकल्प जाहीर झाले... मात्र प्रत्यक्षात विकास किती झाला? याच प्रश्नावरून अंबादास दानवेंनी सरकारला घेरलंय... मागील अकरा वर्षांत मराठवाड्यातील जाहीर केलेल्या योजनांची प्रगती केवळ दीड टक्का असल्याचा गंभीर दावा दानवेंनी केलाय... गोदावरी खोऱ्याचं पाणी असो किंवा उजनीचं पाणी... घोषणा झाल्या, मात्र निधी आणि कामांची प्रगती कुठे आहे, असा सवाल करत दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केलीय... अंबादास दानवे
0
0
Report

सातारा की वृद्ध महिला को बेटे नहीं दे रहे साथ: मंदिर में आश्रय, प्रशासन से मदद की मांग

Satara, Maharashtra:सातारा : पतीच्या निधनानंतर दोन मुलांना सांभाळत आयुष्याची लढाई लढणाऱ्या 65 वर्षीय रुक्मिणी सदाशिव भस्मे यांच्यावर आज वृद्धापकाळातच दुर्दैवाची वेळ आली आहे. ज्या मुलांसाठी आयुष्य वेचले, त्याच मुलांकडून आधार मिळत नसल्याने त्यांना सध्या निवाऱ्यासाठी मंदिराचा आसरा घ्यावा लागत आहे. रुक्मिणी भस्मे या मूळच्या पाटण तालुक्यातील मुरूड येथील असून, पतीच्या निधनानंतर त्या मुलांसह सातारा शहरात आल्या. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्या सत्त्वशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. सुरुवातीला मोठ्या मुलाने घर सोडले, त्यानंतर धाकट्या मुलानेही आईची झटकली आहे. दरम्यान, घराचे भाडे थकीत झाले आणि मुलांकडून मिळणारी दरमहा दोन हजार रुपयांची मदतही बंद झाली. त्यामुळे भाडे भरणे शक्य न झाल्याने त्यांना खोली सोडावी लागली. काही दिवस नातेवाईकांकडे आश्रय घेतल्यानंतर त्या पुन्हा आपल्या घराकडे आल्या. मात्र घरासमोर पोहोचल्यावर त्यांना त्यांचा खोलीला कुलूपे दिसली.घरमालकाकडे चौकशी केली असता, धाकट्या मुलाने थकीत भाडे भरले असून, यापुढे पैसे देणार नसल्याचे सांगून आईला घरात ठेवू नका, असे सांगितल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्या पुन्हा एकट्या पडल्या. गेल्या चार दिवसांपासून या वृद्ध मातेला एका मंदिरात आसरा घ्यावा लागत आहे. काही नागरिकांकडून त्यांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. मात्र, राहण्यासाठी कायमस्वरूपी निवारा आणि जवळच्या व्यक्तीचा आधार नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही सामाजिक संस्थांनी या मातेला वृद्धाश्रमात ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, धाकट्या मुलाशी एकदा बोलल्याशिवाय वृद्धाश्रमात जाणार नसल्याचे रुक्मिणी भस्मे यांनी सांगितले आहे. मला माझा संसार मोडायचा नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... 121– रुक्मिणी भस्मे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या मातेला सुरक्षित निवारा आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. बाईट – ज्येष्ठ नागरिक दरम्यान, मुलांचा संपर्क होईपर्यंत काही सामाजिक संस्था या मातेला मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण: जरंगे के उपोषण का आज बारहवें दिन; सरकार से अहम बैठकें जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषणाचा आज बारावा दिवस आहे सरकारकडून प्रयत्न सुरू आहे मात्र मनोज जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही जरांगे यांच्या मागणीनुसार उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी आज पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली तुमच्या सगळ्या मान्य आम्ही मांडणी केली आहे, जरांगे यांनी उपोषण सोडावं असा आवाहन त्यांनी केलं मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा त्यांच्या शैलीत सरकारला फटकारले आहे त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यामधील शीतयुद्ध कायम आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारचे बैठक सत्र गेल्या 24 तासात 4 पेक्षा जास्त बैठका, तोडगा नाही सरकारची मागण्या मान्य असल्याची भूमिका, तर जरांगेचा विरोध कायम गेली 2 दिवस संभाजी नगरात सरकारचे असे बैठकांचे सत्र सुरू आहे, सोमवारी दिवसभर, मंगळवारी सकाळी दुपार संध्याकाळ तर बुधवारी पुन्हा सकाळी बैठक झाल्यात, या बैठकांच्या माध्यमातून जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढल्याचा सरकारचा दावा आहे, नोंदी नुसार प्रमाणपत्र वाटप केल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय तर validity बाबतही सरकारने मोठा दावा केलाय, अवघे 0.3 टक्के प्रमानपत्रांना व्हॅलीडीटी फेटाळ ली आहे त्यामुळं मिळण्याचे प्रमाण जास्त असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे, बळीराजाचा पोळा सण आहे, गणेशउत्सव तोंडावर आहे त्यामुळं जरांगे यांनी समजुतीने घ्यावे आणि तब्येतीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले आहे. जरांगे यांनी मात्र पुन्हा एकदा सरकारचे आवाहन धुडकावून लावत सरकारवर हल्लाबोल केलाय, सरकारला दंगली करायचा आहे, यांचे षडयंत्र सुरू आहे याचा डावात आम्ही फसणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारकडून सबुरीचा भाषेत जरांगे याना आवाहन सुरू आहे मात्र जरांगे तितकेच आक्रमक होत चालले आहे या सगळ्यात तोडगा अजूनही दृष्टीआशेपासून दूर नाही त्यामुळं येणाऱ्या काळात आंदोलन आणखीनच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाल करोळे सह नितेश महाजन जालना...
0
0
Report

पिंपरी चिंचवड़ में प्रेम-विवाह के बाद परिवार के दबाव से हत्या की कोशिश, आरोपी गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ के पिंपळे नीलख क्षेत्र में कुटुंब के विरोध के बावजूद interracial love विवाह करने वाले अमोल वीर पर प्रेम-विवाह के राग में उसकी पत्नी के भाईयों ने पिस्तौल और कोयता से जानलेवा हमला किया. अमोल वीर के साथ अनिकेत वीर और दीपक वीर भी घायल हुए. लगभग चार महीने पहले अमोल ने परिवार की मर्जी के खिलाफ विवाह किया था. रोहन लांडगे, संदीप लांडगे, हर्षद लांडगे और अनिल लांडगे ने इस हल्ले को अंजाम दिया; मौके पर पिस्तौल गिर गई थी, जिससे अमोल बच गया. सांगवी पुलिस ने रोहन लांडगे, संदीप लांडगे, HHarshad और अनिल लांडगे को हिरासत में लिया और घातक शस्त्र जब्त किए. प्रकरण में धाराएं प्राणघातक हल्ला और गैर-कानूनी शस्त्र रखने की लगाई गई हैं; आरोपियों से हथियारों की व्यवस्था पर भी जाँच चल रही है. आरोप है कि Amol की पत्नी और परिवार पर राजनीतिक दबाव डालकर उन्हें बचाने की कोशिश की जा रही है; Amol ने आत्मदहन तक की चेतावनी दी.
0
0
Report

Washim के जिल्हाधिकारी ने 2027 तक पानी सुरक्षित रखने की योजना की घोषणा

Washim, Maharashtra:अँकर:राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,जिल्हा परिषद आणि नगर परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जलाशयातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.तसेच नियमापेक्षा अधिक पाणी उपसा होत असल्यास पथके नेमून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांनी सांगितले आहे。
0
0
Report
Advertisement

कांग्रेस का प्रदर्शन: भाजपा नेताओं के खिलाफ आट्रोसिटी कानून की FIR की मांग

Navi Mumbai, Maharashtra:काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्याचा जातीयवादी व अस्पृश्यतावादी प्रकार करणाऱ्या भाजपा नेते व कार्यकर्त्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेली द्वेषपूर्ण FIR तात्काळ मागे घ्यावी या मागण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोकण भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मनुवादी विचारसरणीचा निषेध व्यक्त करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेय. नवी मुंबई
0
0
Report

चंद्रपुर के डीनदयाल कैंसर अस्पताल में शिकायत-सुझाव पेटी शुरू, मरीजों से फीडबैक

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूरच्या अत्याधुनिक दीनदयाल कर्क रुग्णालयात तक्रार आणि सूचनापेटीची सुरुवात, जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातून येणाऱ्या रुग्णांचा फीडबॅक मिळावा यासाठीची सुविधा, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला उपक्रमाचा प्रारंभ चंद्रपूर शहरात टाटा आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या अत्याधुनिक दीनदयाल तर कर्क रुणालयात आता रुग्णांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. या रुग्णालयातील सर्व सुविधा गरीब आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातून रुग्ण इथे दाखल होत असून इथल्या सुविधांबाबत सतत फीडबॅक मिळावा यासाठी रुग्णालयात तक्रार आणि सूचनापेटीची सुरुवात करण्यात आली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे पंडित दीनदयाल कर्क रुग्णालयातील सेवा अधिक सुकर, सुलभ आणि रुग्णाप्रति स्नेहपूर्ण होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

अल निनो से पानी की कमी महंगाई के बीच किसान पोळा सण की जंग

Yavatmal, Maharashtra:पावसाअभावी दुष्काळ आणि महागाईच्या सावटात शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करावा लागत आहे. हवामानावर अल निनो चा प्रादुर्भाव झाल्यामुळे पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहे. अशा बिकट परिस्थितीत कृषी संस्कृतीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा आला आहे. उधार उसनवारी करून शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळा सण देखील साजरा करायचा आहे, बैलांना सजावटीचे साहित्य हे देखील महागले असल्याने जमेल तशी आर्थिक तजवीज करून शेतकरी पोळा सण साजरा करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे हे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना देखील फटका बसला आहे.
0
0
Report
Advertisement

दोनोंळी: मुंबई-गोवा महामार्ग पर अवजड वाहनों पर प्रतिबंध, चाकरमाणों को राहत

Ratnagiri, Maharashtra:दापोली- रत्नागिरी.. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासन सज्ज.. मंत्री भरत गोगावले.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत और सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली है.. माणगावचा कुछ भाग वगळता उर्वरित महामार्ग वाहतुकीस योग्य असून, तिथे हलक्या वाहनांची ये-जा सुरू ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दापोली येथे दिली.. सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून,या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे..
0
0
Report

रोहित पवार के नेतृत्व पर भाजपा विधायक पडळकर का निशाना; पेपर फूट पर सरकार सख्त

Sangli, Maharashtra:स्लग - एमपीएससी आंदोलनवरून गोपीचंद पडळकरांची,रोहित पवारांवर टीका.. अँकर - एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं लीडरशिप करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न गेल्या चार वर्षापासून सुरू आहे,अशी टिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एमपीएससी विद्यार्थी हे हुशार आणि बुद्धिमान असून,त्यांच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.मात्र रोहित पवारांनी राजकीय हेतूने आंदोलनाकडे बघू नये,असा सल्ला देत,एमपीएससी बाबत झालेल्या आंदोलनात केवळ रोहित पवारांचीच वाहवा झाली,विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठेचं आले नाहीत,असा टोला देखील लगावत,पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील कडक कायदा आणत आहे,असे देखील गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार- भाजपा. अँकर - पेपर फुटी प्रकरणी विरोधकांपेक्षा सरकार अधिक आक्रमक आहे,संबंधित आरोपींना तुरुंगात टाकण्यात आला आहे. पेपर फुटी प्रकरणी सात सदस्य समिती देखील गठीत करण्यात आली असून यापुढे पेपर फुटू नयेत म्हणून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.समिती लवकरच सरकारला अहवाल देईल आणि हे सरकार विद्यार्थ्यांच्या सोबत आहे,असे देखील स्पष्ट केले
0
0
Report

लातूर में सूखा घोषित कराने के लिए दानवे ने सरकार पर जोरदार हमला

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा... दानवेंची सरकारकडे मागणी....पिकं उद्ध्वस्त, तरी दुष्काळ जाहीर का नाही ?.... दानवे ची सरकारवर जोरदार टीका...... मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय... पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली असताना सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये केलाय... शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिल्याचं सांगत दानवेंनी तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय... एवढंच नाही तर पावसाअभावी शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकार गप्प का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केलाय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top