icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई में PAP फ्लैट घोटाले में 47 लोगों पर 5.57 करोड़ की ठगी, FIR दर्ज

Mumbai, Maharashtra:ब्रेक Hotline FIR मुंबईत SRA PAP फ्लॅटच्या नावाखाली 5.57 कोटींच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR नोंदवून तपास सुरू केला. 2017 पासून अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली, माटुंगा परिसरात PAP फ्लॅट देण्याचे आमिष. ४७ ग्राहकांकडून एकूण 5,57,50,000 जमा केल्याचा आरोप. SRA चे वाटपपत्र, कलेक्टर पत्र, NOC, वीजबिलांसह शासकीय कागदपत्रे कथित बनावट असल्याचा आरोप. SRA कार्यालयातील पडताळणीत कागदपत्रे शासकीय नोंदींशी जुळत नसल्याचा दावा. शैलेश काकण, रुपेश वेलेंकर, अभिषेक गुजर, विश्वनाथ जाधव यांच्यासह अनेकांविरोधात गुन्हा. विश्वनाथ जाधव हा पूर्वी शिवसेना आमदाराचा वैयक्तिक सचिव, तर सध्या काँग्रेसच्या एका विद्यमान खासदाराचा पीए असल्याचा तक्रारीत उल्लेख. 25 लाखांत घर मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केल्याचा आरोप. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू.
0
0
Report

नाशिक में खड्डे खत्म: महापालिका ने काम शुरू किया, मंत्री महाजन का एक्शन

Nashik, Maharashtra:नाशिक - - रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांनी पाच नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग - नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास महापालिकेकडून सुरुवात - शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग - कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग अँकर नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे पाच नागरिकांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शहरभर खड्डे बुजवण्याच्या कामांना वेग देण्यात आला असून, कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाहूया आमचा यांचा हा विशेष रिपोर्ट.... रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. केवळ खड्डे बुजवणेच नव्हे, तर रखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांनाही आता वेग देण्यात येत आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः रस्त्यावर उतरले...या नंतर नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आता रस्त्यावरती उतरले असून आज त्याची पाहणी करत लगेच रस्ते बुजवण्याचे काम हाती घेतले आहे... स्वतः मनपा आयुक्त या सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरती उतरले असून शहरभर फिरत रस्त्याच्या कामाची पाहणी करत असतानाही पाहायला मिळत आहे.....येत्या 8 दिवसात संपूर्ण शहरात पडलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवले जाते असं शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी स्पष्ट केलं...तर शहरातील सगळी काम लवकर पूर्ण होतील असा विश्वास मनपा आयुक्त यांनी केलाय.... बाईट- मनीषा खत्री मनपा आयुक्त... बाईट- संजय अग्रवाल...शहर अभियंता.. मनपा यावेळी गिरीश महाजन यांनी एमएनजीएलच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार बैठकीसाठी बोलावूनही अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार त्यांनी केली. सोमवारी एमएनजीएल अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेच सोडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....आठ दिवसांत नाशिक शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या पाच नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्याचेही त्यांनी सांगितले. गिरीश महाजन – कुंभमंत्री विशेष म्हणजे, झी 24 तासने आठवडाभरापूर्वी या परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. मात्र, तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.... बाईट -स्थानिक नागरिक बाईट- स्थानिक नगरपालिका‌व खड्ड्यांमुळे गेलेले पाच जीव पुन्हा परत येणार नाहीत. मात्र, यानंतर तरी प्रशासन कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ते उभारते का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

नाशिक की सड़कों में खड्डे मुक्त करने के लिए मंत्री गिरीश महाजन का निरीक्षण

Nashik, Maharashtra:अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे रस्त्यावरती उतरले असून सध्या ते नाशिक शहरात तीन मखमलाबाद रोड परिसरात असलेला ग्रीन कॅसल सिग्नल येथे खड्ड्यांची आणि रस्त्याची पाहणी केलीये... गिरीश महाजन हे ईमेजिएलच्या कामावर नाराजी व्यक्त केली असून दोन ते तीन वेळा त्यांना बैठकीसाठी बोलवले तरी ते उपस्थित राहिले नसल्याची देखील तक्रार केलीये.... सोमवारी एम एन जी एल च्या अधिकाऱ्याची बैठक होणार असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.... अनेक नगरसेवकांची तक्रार एमनजीएल बद्दल आहे शहरात अनेक ठिकाणी च्या कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत.... आठ दिवसाच्या आत हे संपूर्ण रस्ते खड्डे मुक्त होतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे.... त्याचबरोबर जे पाच नागरिक खड्ड्यांमुळे मृत्यू मुखी पडले आहेत त्यांचे देखील घरी सांत्वन भेट घेतले असल्याचा गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.....यासंदर्भात गिरीश महाजन अशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.....
0
0
Report
Advertisement

नाशिक में खड्डों से पाँच मौत, प्रशासन ने सड़क कामों की समीक्षा शुरू की

Nashik, Maharashtra:नाशिक शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. नाशिक शहरात रस्त्यांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिका आयुक्तांकडून पाहणी करत आढावा घेतला जातोय. नाशिकमधील रस्त्यांचे अर्धवट कामे आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. अखेर नाशिक शहरात खड्डेमय रस्त्यांमध्ये अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहेत. कुंभमेळा मंत्रांकडून प्रशासनासोबत सलग झालेल्या बैठका नंतर आता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहेत. महापालिका आयुक्त या स्वतः नाशिक शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या आणि खड्डेमय रस्ते बुजवण्याच्या कामांची पाहणी करत आहेत. आढावा घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

बारामती में सुनेत्रा पवार ने शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर का उद्घाटन किया

Rui, Maharashtra:बारामती सोमेश्वरनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार* बारामती_AB_*बारामती सोमेश्वरनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार* ( बारामतीच्या सोमेश्वर नगर मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याचं उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं.या प्रसंगी त्या बोलत होत्या.) *हिंदी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज....* *२२ जुलै हा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आणि भावनिक असा आहे...सुनेत्रा पवार यांना बोलताना कंठ दाटून आला* सुरवातीला मी दादांना विनम्र अभिवादन करते. *आपण अनेक वर्षापासून दादांचा वाढदिवस साजरा करत आलो होतो परंतु यावर्षी त्यांची जयंती साजरी करावी लागेल असं कोणालाही वाटलं नाही.* दादांच महाराष्ट्राच्या विकासातील सहभाग पाहून महाराष्ट्र सरकारने सर्व शासकीय निमशासकीय विभागात त्यांची जयंती साजरी केली. त्यांच्या कार्याचा सर्वत्र स्मरण करण्यात आलं. आज राज्यात सर्व ठिकाणी समाधान शिबीर राबवले जात आहे. प्रांतिक बारामती हे दादांची कर्मभूमी आहे बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकास हे त्यांचे स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिलेले आपण पाहिले. दादांनी तालुक्यात एकही अशी जागा सोडली नाही की तिथे चांगलं शिबीर करता येणार नाही, दादांनी बारामती नाही तर राज्यातील प्रत्येक ठिकाण चांगलं करण्यासाठी काम केले. आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्यांना श्रद्धांजली ठरेल. आज या शिबिराला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय आहे. *बारामती विधानसभा मतदारसंघात दादांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाने सुमारे ८८ पूर्णांक 88 कोटी रुपयांचा निधी पाणंद रस्त्याचे काम झाले आहे, प्रगती पदावर आहे* *23 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली पुणे जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना फायदा झाला* महसूल विभागा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील निगडित विभाग आहे. बारामती तालुक्यात शेत रस्ते निर्माण केले जात असल्याने बारामती तालुक्यात वादविरहित शेती होणार आहे. आजच्या शिबिरामुळे लोकांना वारंवार शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, प्रशासन घराघरात पोहोचेल हीच खरी लोकाभिमुख प्रशासन प्रणाली आहे. *जाता जाता मला आनंदाची बातमी सांगायची आहे आज राष्ट्रीय अभियान अंतर्गत बारामतीसाठी तीस खटांचे क्रीटीकेअर ब्लॉक मंजूर झाला आहे, स्मार्ट व्हिलेज साठी राज्यातील 75 गावांची निवड झाली आहे त्यातील 10 गावे बारामती तालुक्यातील आहेत* सोमेश्वर कारखान्याने जर जागा उपलब्ध करून दिली तर वित्त आयोग किंवा स्वनिधीतून कचरा प्रक्रिया केंद्र हा प्रश्न मार्गी लावला जाईल. जनतेचा वेळ आणि पैसा वाचवणे हाच या शिबिराचा उद्देश आहे त्यामुळे जनतेने याचा लाभ घ्यावा. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने हे शिबिर उद्या देखील या ठिकाणी चालू ठेवावे असे सूचना मी प्रांताधिकारी यांना करते.
0
0
Report
Advertisement
Advertisement

रत्नागिरी में सर्पदंश से ठेकेदार कर्मी की मौत, भाजपा ने 5 लाख की मदद दी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत सर्पदंशाने निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भाजपची ५ लाखांची मदत.. रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचारी काशीनाथ गोताड यांचं गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर साफसफाई करताना सर्पदंश होऊन दुर्दैवी निधन झालं.. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेची दखल घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार,भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी गोताड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.. तसेच भाजपकडून ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
0
0
Report

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में ऑनलाइन नोंदणी 3 अगस्त से शुरू

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी नित्य पूजा, पाद्य पूजा , तुळशी अर्चन पूजा और महा नैवद्य सहभाग योजनेसाठी 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून भाविकांसाठी नित्य पूजा , पाद्य पूजा , तुळशी अर्चन पूजा, आणि महानैवद्य सहभाग योजना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 04 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पूजांची नोंदणी 3 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्या पासून https://www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर सुरू होणार आहे. भाविकांनी इतर कोणत्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन नायब तहसीलदार प्रवीणकुमार घम यांनी केले आहे
0
0
Report

इचलकरंजी महापालिका में 22 करोड़ घनकचरा ठेकों को लेकर भाजपा गुटों की खुली जंग

Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय. आमदार राहुल आवाडे गट आणि माजी आमदार सुरेश हळवणकर गट यांच्यातील सुप्त संघर्ष आता महापालिकेच्या कारभारावरच परिणाम करत असल्याचं चित्र आहे. तब्बल 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले असून, आता हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपचे सत्ताधारी आवाडे गट आणि हळवणकर गट एकमेकाच्या विरोधात. 22 कोटींच्या घनकचरा ठेक्यावरून संघर्ष तीव्र आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कारभारावर हळवणकर गटाचे गंभीर आरोप, आयुक्तांची बदली करण्याची हळवणकर गटाची मागणी आयुक्तांचे काम चांगले त्यांना कायम ठेवण्याची आवाडे गटाची भूमिका आवाडे आणि हळवणकर गटाचा वाद पोहोचला वरिष्ठापर्यंत. VO 1 :- इचलकरंजी महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष स्थायी समितीच्या बैठकीत 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यानंतर आवाडे गट आक्रमक झाला आणि दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे समोर आले. याच वादातून महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यावरही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. हळवणकर गटाने आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली. तर आवाडे गटाने शहराच्या विकासासाठी आयुक्तांचे काम समाधानकारक असल्याचे सांगत त्यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली. VO 2 :- वाद अधिक चिघळल्यानंतर हळवणकर गटाच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत आयुक्तांविरोधातील तक्रारी मांडल्या. नगरसेवकांना वेळ दिला जात नाही, अवमानकारक वागणूक मिळते, विकासकामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही गटांना एकत्र बोलावून समन्वय साधण्याचे आश्वासन दिले . येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान या वादासंदर्भात बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी, दोन जिवंत माणसे जिवंतपणे काम करतात.. झोपा काढत नाहीत. त्यावेळी काहीतरी असतं. त्यामुळे पेल्यातील वादळ पेल्यात संपेल असं सांगून या वादावर अधिकच भाष्य करणे टाळले. VO 3 :- इचलकरंजी महापालिकेतील हा वाद आता केवळ दोन गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो थेट राज्याच्या वरिष्ठापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच या प्रकरणात काय निर्णय घेतात आणि भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष कसा मिटवला जातो, याकडे आता संपूर्ण इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. पण या संपूर्ण राजकीय संघर्षात शहराचा मूळ प्रश्न मागे पडल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे के बयान पर मोदी-शाह के साथ संजय राऊत पर तीखी बहस

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन महसूल दिन -- प्रगतशील राज्याच्या दिशेने आमचं राज्य वाटचाल करतय. त्यात महसूल विभागाचं महत्वाच काम आहे. महसूल विभागात प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी कौतुक करण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी महसूल दिन साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महसूल विभागाच योगदान वाढेल असा मला विश्वास आहे. ऑन नरेंद्र मोदी व्हिडिओ --- हा आमच्या पंतप्रधान साहेबांचा मोठेपणा आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाच नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंकृत माणसाकडे आहे. मोदी साहेब आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी मनाचा मोठेपणा दाखवलाय. हे क्वचितच असेल. आदरणीय पंतप्रधानानी एक आदर्श घालून दिलाय मला त्यांचा अभिमान वाटतो. ऑन संजय राऊत --- आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंकृतपना काय असतो हे दाखवलं संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचा जीव केला पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी היתה. पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर जाव आणि संस्कृत पणाचे सल्ले द्यावेत ऑन संजय राऊत ( अमित शहा तडीपार गुंड) --- संजय राजाराम राऊत 420 आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळ प्रकरणी जो जेल मध्ये जाऊन आलाय तो 420च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडी मध्ये पैसे खाणाऱ्या 420 ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये. ऑन परीक्षा विधेयक --- नीट बाबत जो प्रकार घडला त्यानंतर Modi साहेबांनी शब्द दिलाय असा प्रकार परत देशात होणार नाही. आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कापतील असा आदर्श बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेय. त्यावर आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी शिक्कामोर्तब केलाय ऑन काँग्रेस आणि वंचित आंदोलन ( अमित शहा ) --- कारण ते रस्त्यावरचे लोक आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल पाहिजे होत. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम अमित शहा साहेबांनी केलेय. म्हणून आपण सुरक्षित आहोत. रस्त्यावर उतरून फुलांचा हार अमित शहा यांना घातला पाहिजे तुम्ही राजकीय नेते नंतर अगोदर तुम्ही घरात सुरक्षित आहात ते देशाचा गृहमंत्री कणखर आहे. ऑन दिपके ( आंदोलन ) आंदोलन करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ऑन फिश टॅक ( सोलापूर ) --- रिपोर्ट मागवला आहे. सोमवारी रिपोर्ट येईल त्यावर आम्ही अभ्यास करू आणि कारवाई करू मच्छीमारांच नुकसान होऊ नये म्हणून आमचं खात पावलं उचलेल. ऑन जुहू चौपाटी ( कचरा ) -- संबंधित यंत्रणेने यावर लक्ष घालावं
0
0
Report

सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकर में आग, स्थानीय लोगों की सूझबूझ से बड़ा नुकसान टला

Rui, Maharashtra:सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकरला आग; स्थानिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्याजवळ सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या धावत्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत फवारणी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top