icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कन्हान नदी में नागपुर महिला की मौत, प्रेमी दोस्त पर शक; आत्महत्या या हत्या?

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव अश्विनी उर्फ आशी डे असे आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत महिलेचा कन्हान येथील एका पुरुष मित्रासोबत वाद सुरू होता. या संदर्भात तिने यापूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती. तसही, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये खबऱ्या म्हणून काम करत होती ..अशी माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आशीचा मृत्यू अपघाती, आत्महत्या की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मृत महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, तिच्या संपर्कातील व्यक्ती तसेच इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून सखोल तपासणी करण्यात येणार असून, या तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

नदी में लोहे की साकव टूटने से बैल की मौत, 7 अन्य पशु घायल

Ratnagiri, Maharashtra:गुहागर-रत्नागिरी गुहागरात साकव कोसळून बैलाचा मृत्यू. सात जनावरे जखमी. ग्रामस्थांनी वाचविले. नदीवरील लोखंडी साकव तुटून त्याखाली ८ जनावरे अडकल्याची दुर्घटना गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाण वाडी येथे घडली. या दुर्घटनेत दिलीप नारायण लिंगात यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून सात जनावरे जखमी झालीत. जखमी झालेल्या जनावरांना नदीतून बाहेर गावकाऱ्यांनी काढली. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा लोखंडी साकव सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता,काही दिवसांपूर्वी साकवाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नवीन साकवासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून अधिकाऱ्यांनीही पाहणी केली होती. ही दुर्घटना घडली त्यावेळी साकवावरून जनावरे जात होती. साकाव तुटल्याने सर्व जनावरे नदीत पडून साकवाखाली अडकली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच sाकवाचे जड लोखंडी साहित्य जनावरंवर कोसळल्यामुळे बचाव कार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
0
0
Report

बुजुर्गों को पुलिस अफसर दिखाकर लूटने वाला अंतरराज्यीय ठग गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : वृद्धांना पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय भामट्याला अटक करण्यात संभाजी नगर पोलिसांनी यश मिळवले आहे. आफताब ऊर्फ फईम अहमद शेख असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल २६.५ तोळे सोने, चोरीची दुचाकी असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने पळून जाताना एकामागून एक तीन रिक्षा बदलल्या, मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आफताब हा अचूक मराठी बोलत असल्याने तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांचा विश्वास संपादन करायचा. टक्कल लपवण्यासाठी तो बनावट विग वापरत असे. 'तुम्हाला लॉटरी लागली आहे' किंवा 'मी पोलिस अधिकारी आहे' अशा थापा मारून तो एकटे असलेल्या वृद्धांकडील दागिने हातचलाखीने लंपास करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
0
0
Report

चाकण MIDC सड़क दुर्घटना में महिला की मौत, चिखल पर बाइक फिसली, चालक फरार

Chakan, Maharashtra:चाकण MIDCच्या रस्त्यांचा आणखी एक बळी, रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली अन अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्यानं महिलेचा मृत्यू, अपघातानंतर चालक फरार चाकण पोलीस चालकाचा शोध घेतायेत. अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचं सानवी पांचाळ असं नाव असून त्यांचं वय 42 होतं. भोसरीतील इंद्रायणीनगर मध्ये राहणाऱ्या सानवी स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होत्या. ड्युटी संपवून त्या घरी निघाल्या होत्या. पावस सुरु असल्यानं चाकण midc मधील अंतर्गत सिमेंटच्या रस्त्यावर चिखल झाला होतं, यामुळं रस्ता निसरडा झाला होता. याचं मार्गावरून घरी निघाल्या सानवी यांची दुचाकी घसरली, गाडीचा तोल गेला अन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी एक अवजड वाहन मागून येत होतं. काही कळायच्या आत सानवी अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्या, या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक अवजड वाहनासह पसार झालाय, चाकण पोलीस चालकाचा शोध घेतायेत. या दुर्दैवी घटनेनंतर चाकण आणि midc अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकतर इथल्या मार्गावर खड्डयांनी साम्राज्य केलंय तर जिथं म्हणायला चांगले रस्ते आहेत, ते चिखलामुळं निसरडे झालेत. पाच फेजमध्ये विस्तारलेल्या चाकण midc मध्ये जगातील नामांकित कंपन्यांसह जवळपास दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये रोज दहा लाखांहून अधिक कर्मचारी ये जा करतात. पण इथल्या रस्त्यांची अवस्था पाहता, त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सानवी यांच्या प्रमाणे अनेकांचे जीव याआधी ही गेलेत, अनेक कामगार जायबंदी ही झालेत. सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या चाकण midc मध्ये प्रशासन मूलभूत सुविधांची पुरवू शकत, ही मोठी शोकांतिका आहे. आता आणखी कोणाचा जीव जाण्याआधी सरकार आणि प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में नकली खाते घोटाला: 60 करोड़ से अधिक लेन-देन, शाखा प्रबंधक गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात याचे बनावट बँक खाते आणि आर्थिक व्यवहार प्रकरण...समता पतसंस्थेच्या राहाता शाखा व्यवस्थापकाला पोलिसांनी केली अटक...शिर्डी पोलिसांनी शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला केली अटक...समता पतसंस्थेत उघडली होती अशोक खरात नॉमिनी असणारी शंभर खाती...57 भक्तांची कागदपत्रे वापरून उघडली गेली 100 खाती...खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार...बनावट खाते प्रकरणात अशोक खरात आहे शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...खरात पाठोपाठ राहाता शाखेच्या मॅनेजरलाही ठोकल्या पोलिसांनी बेड्या...मॅनेजरच्या अटकेने बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता...
0
0
Report

शिरूर के अण्णापूर में यूरिया की दबी दरारें, किसानों की लंबी कतारें और तंगी

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या चित्र पाहायला मिळतंय. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन शेतीच्या हंगामात खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तासन्‌तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने दुकानदारांना अखेर अर्धे शटर बंद करून व्यवहार करावे लागत आहेत. कृषी विभाग आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे बळीराजा कमालीचा हैराण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी प्रशासनावर सडकून टीका करत तात्काळ खत पुरवठा करण्याची मागणी केली आहे
0
0
Report

नागपुर पहुँची मंडल जनजागृती यात्रा, ओबीसी कॉलम के लिए जनगणना में मांग तेज

Nagpur, Maharashtra:नागपुर ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मंडल जनजागृती यात्रा भंडारा येथून नागपुरला दाखल झाली. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास समाजाचे मोठे नुकसान होईल, असा दावा आयोजकांनी केला आहे. ही यात्रा ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि ओबीसी संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. सरकारने जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अन्यथा यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागपुरात या मंडल यात्रेचे स्वागत करण्यात आले नागपूरहून यात्रा आज रात्री वर्धा येथे मुक्कामी असेल
0
0
Report
Advertisement

1.05 लाख रुपये के MD के साथ आरोपी कव्वा गिरफ्तार—पुलिस ने दावा

Mumbai, Maharashtra:मा. पोलीस उपायुक्त उत्तर परिमंडळ 3 श्री गजानन राजमाने, सहा. पोलीस आयुक्त दहिसर दहिसर विभाग मुंबई. श्री जयराज रणवरे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब बनकर, पो. नी. चव्हाण कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ATC officer API युवराज इनामदार, ATC पथक HC 041013/सणस, PC 112958/ वेदांते ,pc 140816/कोकणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे मुंबई यांनी 1.05 लाख रुपये किंमतीचा एम डी हा अंमली पकडून कारवाई केली असून नमूद गुन्ह्यातील आरोपी -हिरेन पांगजीभाई कावा उर्फ कव्वा 33 वर्षे रा.ठी. रूम न. 404 गुफा दर्शन बिल्डिंग, दत्तपाडा रोड, रोड नंबर 01, राजेंद्र नगर ,बोरिवली पूर्व मुंबई हा अभिलेखावरील सोनसाखळी चोर असून त्याचेविरोधात चोरी मारामारी असे गुन्हे आहेत. फोनवर ऑर्डर घेउन तो प्रत्येक वेळी माणूस बदलून तो एम डी देत असे त्यामळे तो प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी होत असे.मात्र 28/07/2026 वेळ - 18.00 वा तो मेघमहल बांधकाम साईडच्या बाहेरील फुटपाथ, दत्तपाडा रोड, रोड नंबर 01, राजेंद्र नगर , बोरीवली पूर्व मुंबई. या ठिकाणी तो स्वतः येऊन माल देऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे मुंबई गु.र. क्रमांक - 539 /2026 कलम- 8(क) सह 22 एन.डी.पी.एस. 1985 अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. तपासी अधिकारी सपोनि युवराज इनामदार व ए.टी.सी.पथक, पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

जिला परिषद बैठक: आमदार अंबादास दानवे ने शिक्षा-स्वास्थ्य-निर्माण पर बड़ा फोकस

Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर| आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषदेत घेतली आढावा बैठक, बैठकी नंतरची प्रतिक्रिया... जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करायला मी आलो होतो जलजीवन मिशन आणि पिण्याचा पाण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षणाचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आरोग्याचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा एक आढावा घ्यावा आणि सध्या स्थिती काय आहे हे जाणून घ्यावे यासाठी ही बैठक होती. नवीन इमारत खर्च जिल्हा परिषद इमारत झाले म्हणजे फर्निचर व्हायलाच हवे, रिकाम्या जागेवर सतराच्या टाकून तर नाही बसू शकत ना, इमारतीवर जर एवढा खर्च होत असेल तर त्या इमारतीला साजेस फर्निचर देखील करायला हवे, त्यामुळे याला सपोर्ट आणि विरोध करण्याचं कुणाचं काही कारण नाही शाळांची दुरावस्था मात्र इमारतीवर खर्च शाळा दुरुस्त करणे महत्त्वाचे आहेत, मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य रस्त्यावर बसू शकत नाही, तेच नीट बसले नाही तर इतर गोष्टी नीट कशा होतील शाळेच्या दुरुस्तीसाठी DPDC असेल CSR असेल इकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो जिल्ला परिषदेच्या इमारतीला CSR नाही मिळणार, शाळेला मिळू शकतो त्यामुळे विरोधाला विरोध करण्यात कुठलाही अर्थ नाही, त्यामुळे इमारत जर झाली तर फर्निचर तर चांगलं केलं पाहिजे ढोलेरा प्रकल्प ट्विट प्रकल्प चांगल्या पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या आहेत ते जर बेजबाबदारपणे वागत असतील त्यामुळे त्या संदर्भात आवाज उठवण्याचा काम माझ आहे, ते मी काम करतोय ट्रॅव्हल्स महिला गैरवर्तन या ज्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आहेत, यातील जो स्टाफ आहे त्यांचं काय व्हेरिफिकेशन केलेलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे की शिकलेले आहेत, यांना कुठली ट्रेनिंग आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एक संभाजीनगरची भगिनी गोव्याला गेले असताना तिला रात्री साडेचार वाजता राजधानी ट्रॅव्हल्स ने येताना त्रास दिला गेला, त्या महिलेने सकाळी मला हे कळवलं त्यानंतर मी पोलीस ठाण्याशी बोललो आरटीओच्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केला परंतु माझी यातली भूमिका अशी आहे की खाजगी बसचे जे चालक असतील कंडक्टर असतील किंवा क्लीनर असतील यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अतुल चव्हाण राजीनामा अतुल चव्हाण हे चीफ इंजिनियर राहिलेले व्यक्ती आहेत, घाटीच्या प्रकरणावरून बोलले म्हणून राजीनामा देणारे ते नाहीत राजीनामाची त्यांची वेगळी प्रशासकीय कारण असू शकतात वैयक्तिक कारणे असू शकतात त्यामुळे एवढे मी दाव्यासह सांगू शकतो की गाठीच्या प्रकरणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला नाही जिल्ला परिषद निधी आमदारांना देणार जिल्ला परिषदेचा निधी हा कुणाच्या मालकीचा नाही, पालकमंत्र्यांच्या तर मुळीच नाही DPC चा सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो, त्यामुळे जेवढा पालकमंत्र्यांना अधिकार आहे तेवढाच जिल्हा परिषद अध्यक्षांना अधिकार आहे मी स्वतः आमदार असून माझं मत असं आहे, जो निधी जिल्हा परिषदेचा आहे तो जिल्हा परिषदेला सरळ वितरित करायला हवा सध्या तर ऑगस्ट महिना सुरू आहे आतापर्यंत हे काम व्हायला हवे होते, जिल्हा परिषदेत एवढ्या दिवस बॉडी नव्हती, त्यामुळे आता निवडून आलेले आपले लोकं आहेत, त्यामुळे त्यांना सक्षम मना जिल्हा परिषदेचा निधी जो आहे त्याचं नियोजन त्यांना करू द्या असं माझं मत आहे आमदाराला आमदार निधी पण, डी पी डी सी चा निधी पण हे कशासाठी, बाकीचे निधी पालकमंत्र्यांनी आमदारांना द्यावेत मात्र जिल्हा परिषदेचा निधी देणं मला तरी वाटतं चुकीचा आहे उद्धव सेनेला अद्याप कार्यालय नाही कार्यालय तर मिळायलाच हवेद, दुसऱ्या पक्षांना मिळतात मात्र आम्हाला नाही त्यामुळे हा प्रश्न तर असणारच शिंदे गटाला कसं काय कार्यालय मिळाले, कार्यालय देण्याचा जर नियम नसेल तर शिंदे गटाला कसे काय मिळाले? नाही मिळाली तर रस्त्यावर मंडप टाकून बसू अध्यक्षाच्या कामावर खुश आहात का? मला असं वाटतं पाच वर्षाचा कालावधीच्या व्यक्तीचा आहे त्याचा तीन महिन्यात परीक्षा घेणे चुकीचे असं मला वाटतं
0
0
Report
Advertisement

बारिश में गड्ढे: कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा हाईवे पर नागरिकों ने सड़क पर आंदोलन किया

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात प्रवासी, भागातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांचा संयम सुटला आहे. भर पावसात, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गगनबावडा तालुक्यातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय राष्ट्रीय महामार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भर पावसात ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यात आला. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
0
0
Report

नाशिक में रोड मरम्मत: खड्डे फिर से उखड़े, नागरिक नाराज

Nashik, Maharashtra:काल रस्त्यावरचे खड्डे बुजवले.... आज पुन्हा रस्ते उखडले.... अँकर नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन जागं झालं असून प्रशासनाच्या वतीने नाशिक मखमलाबाद रोड परिसरात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतलं होतं.... काल या रस्त्याची संपूर्ण रस्त्याची दुरुस्तीच काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होतं... हा संपूर्ण रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी सगळे प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या रस्त्याची पाहणी करून गेले होते त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या रस्ता दुरुस्त केला... मात्र 24 तास उलटून गेले नाहीत हा रस्ता पुन्हा खड्डेमुळे झालाय....यामुळे या कामाचा निष्कृष्ट दर्जा समोर आला असून नागरिकांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे....खडी मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे बुजवले आहेत हे पावसामुळे पुन्हा उकडून गेलेत आणि यामुळे पुन्हा रस्ता जायचे ते झाल्याचे तक्रार नागरिकांनी केली... यासंदर्भात मखमलाबाद रोड परिसरातून आढावा घेत नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

नागपुर में युवक कांग्रेस का E20 विरोध प्रदर्शन, पुलिस ने बेरिकेड लगाकर रोका

Nagpur, Maharashtra:नागपुर में युवक काँग्रेस का E20 विरोध प्रदर्शन जोरदार रहा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के विरोध में घोषणाबाजी करते काँग्रेस के कार्यकर्ता सड़कों पर उतरे. काँग्रेस शहर कार्यालय देवडिया भवन से गडकरी वाडा महाल तक मोर्चा निकाला गया था. लेकिन पुलिस ने बेरिकेट लगाकर चिटणीस पार्क पास युवक काँग्रेस कार्यकर्ताओं को रोक लिया. गडकरी के घर से लगभग 700-800 मीटर दूर होने के बाद भी पुलिस ने रोकथाम की. रोकने के बाद कई कार्यकर्ता बेरिकेट पर चढ़कर गडकरी के विरोध में और E20 के विरोध में घोषणाबाजी करते रहे. इसके बाद पुलिस ने कार्यकर्ताओं को हिरासत में लिया.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top