Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 18, 2025 07:24:43
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग डोंगराळे प्रकरणात आजपासून सुनावणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आज पहिली सुनावणी। डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती। या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनांतून होत आहे। १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आज आरोपी विजय खैरनारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आक्रोश मोर्चाच्या दिवशी घडलेल्या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला हजर केले होते। आज विशेष सरकारी वकील उज्वल निकम प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणार की पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार, याकडे सर्वांचे लक्ष。
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 18, 2025 07:18:30
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 07:05:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाट पत्रकार परीषद पॉइंटर. ऑन राष्ट्रवादी आघाडी शक्यता. मुंबई में आनेारी निवडणूक शिवसेना भाजप महायुती बीच लढणार है यह जवळपास निश्चित हुआ है. ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करेल त्यांच्यााशी युती नाही असे भाजपने स्पष्ट केले. त्यांचा निर्णय आहे आमचा विरोध करायचे कारण नाही. मराठी माणूस, मुंबई या विषयावर निवडणूक लढविली जाईल. महायुतीचा भगवा मुंबईवर कसा फडकेल. नवाब मलिक आमचे शत्रू आहे हे आम्ही जाहीर केले आहे. त्यांच्यामुळे युती तुटत आहे. त्यांनी शरद पवार सोबत करावी किंवा कुणासोबत करावी. त्यांचा पक्ष आहे. नवाब मलिक जेल मधून सुटून आल्यावर आम्ही सांगितल्यावर अजितदादा यांनी ऐकले होते. एखाद्याने केलेला गुन्हा हा त्यांच्या कुटुंबावर टाकता येत नाही. इतर भूमिका वठवली तर त्यांच्या विरोधात देखील भूमिका घेऊ. ऑन प्रताप सरनाईक विधान - उठाव केला तेंव्हा अनेक नगरसेवकांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, 55 पेक्षा अधिक नगरसेवकांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. शिंदे यांनी एखादा शब्द दिला तो पूर्ण होतो. त्यांचं विधान असे नसावे.. ऑन ubt Ubt सर्व जगा लढवावी लागतील, त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही. आमच्या माहिती प्रमाणे मनसेला ज्या जागा पाहिजे त्या कितपत ubt सोडेल त्यावर ही युती अवलंबून आहे. नसता राज ठाकरे ऐकणार नाही. ऑन संजय राऊत - संजय राऊत यांचा आत्मविश्वास मोठा आहे ते काय बोलतील नेम नाही. आकडे सांगत नाही मात्र बातमी बनवणे त्यांचा धंदा आहे. पोकळी , वावड्या उठवणे , भीती पोटी केलेलं संजय राऊत यांचे वक्तव्य आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभे राहतात. हा महाराष्ट्राला आलेला अनुभव आहे. ते मुंबई मध्ये चमत्कार घडवतील ही भीती त्यांना आहे. ड्रग्स तस्कर यांना घेऊन डान्स करणारे लोक तुम्ही आहात, कर्जत, कसारा मध्ये तुम्ही पार्टी करायचे तुम्ही काय drugs प्रकरणावर बोलता... मंगेश कुडाळकर आदेश. - त्यांनी जो निधी वापरला आहे. तो लोक हिताचा आहे. त्यांचा आणि यांचा काहीही संबंध नाही. ऑन कोकाटे. - कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यावर अजितदादा निर्णय घेतील. त्यांचा खाते काढले आहे मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती... ऑन सातव प्रवेश... - ते अस्वस्थ होत्या, त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून त्यांनी प्रवेश केला. विरोधी पक्षासाठी त्यांनी प्रवेश केला नाही. एखादी महिलेला त्रास दिला जातोय आणि तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी महिलेने त्रास सहन करायचा का? ऑन विरोधी पक्ष नेता. - लोकांनी यांना नाकारले, यांचा संख्याबळ होऊ शकले नाही.त्याच आमचा दोष काय? विरोधीपक्ष नेते पद देता येत नाही. चहाच्या बहाण्याने देता का विरोधी पक्ष नेते पद म्हणता, लाचारीची काहीतरी सीमा असते. नियमानुसार काम होते हे आम्ही दाखवून दिले.... ऑन जी.प.निवडणूकित अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही. - आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्थगिती मिळाल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला वेठीस ठरू नये म्हणून निर्णय घेतला असावा . काही झाल्यास शासन निर्णयावर शासन विचार करूही शकते. कायद्याची चौकट सर्वांना बंधनकरण आहे. अधिकाऱ्यांनी कुणाचेही अर्ज बाद करावे असे होणार नाही.. ऑन जलील नोटा उधळण प्रकरण वक्तव्य. - इम्तियाज जलील किंवा ओवेसीं ही हैदराबादची पिलावळ आहे. आविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. बाकी सर्व गुलाम, आम्ही नवाब, ही त्यांच्या मुकुमशाही पद्धतीची रचना आहे. तुम्ही नवाब घराण्याचे आहे तर तुम्ही सातरा वर्षे काय केले... नोटा उधळले ही तुमचे छंद आहे का? दलाली करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे तुमचे छंद आहे. स्वाभिमानी मुस्लिम तुमच्यासोबत राहणार नहीं. आता हैदराबादला जा, लोकांनी तुम्हाला बाद केले आहे. नोटा , करंसी उधळणे हा गुन्हा आहे. त्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे असे मी आयुक्तांना सांगणार आहे. ऑन दानवे X पोस्ट - राष्ट्रपतीला नेमा, सुप्रीम कोर्टाला नेमा, काहीही माहिती नाही, अकलीचा तुमचा काहीही संबंध नाही. उंटावर बसून शेळ्या हाकलू नका, अर्धा किलोमीटरवर कोर्ट आहे. रिट दाखल करा.... ट्विट करणारे थकले. ऑन इम्तियाज मुस्लिम मतासाठी वक्तव्य - विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कुणाच्या मतावर निवडून आले होते. दलाली करणारे. ही सभा घ्यायला पैशे देतात हे लपलेले नाही. तुमचा बाजार आता उठायला लागले आहे. Mim ही दलालांची टीम आहे. ऑन पैठण उमेदवार जादू . सुया लिंबू वरून निवडणूक जिंकत असतील तर प्रचार कशाला केले असते. अशी अंधश्रधा बाळगतात हा निव्वळ मूर्खपणा आहे. ऑन सुप्रिया. हा प्रश्न जर तर चा प्रश्न आहे, याला अर्थ नाही. ते काल कोणत्या कारणाने भेटले हे धनंजय मुंडे सांगतील, अजित पवार किंवा धनंजय मुंडे हेच सांगू शकतील. ऑन अजित पवार नको. - ज्या मुद्द्याला घेऊन मुंबई मध्ये निवडणूक होत असेल आणि त्यालाच ठोस पोहोचत असेल तर युती होणार नाही. त्या स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. ऑन भाजप ताकद वाढली वक्तव्य - महायुतीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नका, आमची ताकद घटली असेल, त्यांची वाढली असेल मात्र असे वक्तव्य नको, टळले पाहिजे. ऑन भाजप ४५ वर्ष वरील उमेदवार नको. - तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांची नीती आहे.त्यावर आम्ही बोलणे उचित होणार नाही.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 06:49:13
Akola, Maharashtra:एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला काखेत घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला–बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत.शेगाव दर्शनासाठी पायदळ वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची पिल्ले दिसून झाली. या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायदळ प्रवास करतात. बिबट्याची पिल्ले दिसताच काही भाविकांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन केल्याचेही समोर आले आहे. याच दरम्यान एका व्यक्तीने पिल्लाला काखेत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे. वन विभागाकडून पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच त्यांच्याशी छेडछाड करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Dec 18, 2025 06:35:41
Karjat, Maharashtra:*रायगड ब्रेकिंग* सुधाकर घारे यांचं आमरण उपोषण 12 तासांनंतर स्थगित टाटा पॉवर प्रशासनाकडून मागण्या मान्य. ..2 महिन्यात गावचे पुनर्वसन होणार. कर्जत तालुक्यातील भिवपुरी परिसरात सुरू असलेल्या टाटा पॉवर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं होत मात्र 12 तासानंतर या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संबंधित कंपनी प्रशासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील भивपुरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तापकीर वाडी, धनगर वाडी गावातील घरांना या कंपनीच्या नवीन कामात उत्खनन करण्यात येणाऱ्या कामात ब्लास्टिंग मुळे तडे जात होते. त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी या गावकऱ्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासमवेत हे आमरण उपोषण सुरू करून कंपनी प्रशासनाला धारेवर धरलं होत अखेर 12 तासानंतर या प्रकल्प व्यवस्थापकांनी उपोषण कर्त्यांचा मागण्या मान्य करत येत्या 2 महिन्यात गावचे पुनर्वसन करू शिवाय स्थानिकांना येथील कामात रुजू करू अस लेखी आश्वासन दिल आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 18, 2025 05:47:52
Beed, Maharashtra:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अगदी सिनेस्टायिल पद्धतीने अटक केली आहे. बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून गुन्हेगारी वस्तीवर छापा टाकला. ड्रोन कॅमेरा द्वारे रेकी करून शंभर पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेेरा टाकत चोरट्यांना अटक केलीये. धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे चोरटे आश्रय घेत होते. त्यामुळे येथे जाण्यास पोलीस देखील धजावत असे. मात्र बीड आणि धाराशिव पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने टोळी सदस्यांना अटक केली. मागील काही दिवसात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त্রाचा धाक दाखवत लूटमार केली जात होती. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये दहशत होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 05:33:25
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 05:19:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारी जाचातून किडनी विकल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला. पीडित शेतकरी रोशन कुडे याची डावी किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात उघड झाले. काल रात्री उशिरा पोलिसांना कुडे याचा वैद्यकीय अहवाल मिळाला. वैद्यकीय अहवालात किडनी काढण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याने अब पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे. फिर्यादी शेतकऱ्याने चेन्नई येथील एका डॉक्टरने त्याला कंबोडिया येथे जाण्यात मदत केल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. पीडित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार चेन्नई मधील या डॉक्टरने कोलकाता येथे त्याच्या माणसाच्या मदतीने वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर कंबोडिया पर्यंत नेण्यात मदत केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा डॉक्टर या रॅकेटचा भाग आहे का आता या दिशेने तपास होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 05:17:29
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 18, 2025 05:04:27
Amravati, Maharashtra:AMT_FARMER_LOSS चार फाईल आहे अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित ४३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित; शेतकऱ्यांना ई-केवायसी चा फटका अँकर :- अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या तब्बल ४३ हजार २३३ शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे मंजूर असलेली मदत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेली नाही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे ५५६ कोटी ७३ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली असून आतापर्यंत ५ लाख ५४ हजार २६५ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली आहे. मात्र आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहे. ई-केवायसी न झाल्यामुळे निधी वितरणात अडथळे येत असून जिल्हास्तरावर विशेष मोहिम राबवून शेतकऱ्यांनी तातडीने आधार संलग्न बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 18, 2025 04:35:50
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 04:04:14
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 18, 2025 04:03:58
0
comment0
Report
Advertisement
Back to top