icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ओबीसी आरक्षण-यूपीएससी घोटाळा: कांग्रेसचा आरोप और सुप्रीम कोर्टी निकालों पर चर्चा

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते (on अभिजित दिपके.. विद्यार्थी गुन्हे मागे घेतले नाही...) -- ते आंदोलन विद्यार्थ्यांसाठीच होते.. ----------मोदींच्या काळात मोठा अन्याय OBCवर होतोय . 2016 ची UPSC परीक्षा झाली... 314 OBC विदयार्थी पास झाले.. मात्र क्रिमीलीअर सर्टिफीकेटवरून त्यांना वगळले --या मुलांना OBC मध्ये टाकून कमी मार्क घेणाऱ्या ओपन विद्यार्थांना घेण्यात आलं... हाय कोर्टचे चार निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने लागले...1000 ते 1100 विद्यार्थी असे अधिकसंख्या दाखवून पोस्टिंग द्या.... जॉइन करा -- मात्र हे सरकार OBC मुलांवर उठणार सरकार आहे...याबाबत सर्वोच्च न्यायलयात अपील केले... नरेंद्र मोदींनी या विद्यार्थ्यांचा गळा घोटायच काम केल -- ओबीसीचा मतदान घ्यायचे मात्र ओबीसीच्या मुलं आयपीएस होऊ नये असे काम करतात हे सरकार मनुवादी आहे... ओबीसीच्या धने ( उत्तराखंड, राहुल गांधी गुन्हा ) हे पागलपणाचे लक्षण आहे. असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आयोजकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.. शुद्धीकरण केले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ---भागवत अमेरिकेत जाऊन वेगळे बोलतात आणि देशात मात्र दलितांवर अन्याय होत असतात.... मनुवादी विचारधारा यांच्या डोक्यात आहे... यांचे दिवस भरले आहे... सत्तेची मस्ती आहे त्यामुळे असे पाऊल उचलतात... (on जात पडताळणी ऑनलाईन ) --- याच स्वागत आहे.. ऑनलाइन प्रक्रियेच मी स्वागत करतो.. (on सुळे ) --- संजय राऊत सर्वोच्च न्यायालयावरून जे बोलले ते पाहिलं.... सुप्रियाताई म्हणताय ते बरोबर आहे.. पक्षाला अशा पद्धतीने घेता येत नाही... राज्यात राष्ट्रवादीला जन्माला घालण्याचं काम शरद पवार यांनी केले. तोच पक्ष तुम्ही फूट पाडून ताब्यात घेण्याचं काम करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जो काही शिवसेनेच्या बाबतीत झाला तो निकाल आता पेंडिंग आहे.. शिवसेनेबाबत तसंच केलं. राष्ट्रवादी निकाल देण्याकरता सर्वोच्च न्यायाल थांबत आहे.. त्याचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने होत असेल तर ते निषेध आहे.सुप्रिया सुळे म्हणताय ते 100% सत्य आहे (on समृद्धी महामार्ग ) -- समृद्धी महामार्ग आता सुरक्षित राहिला नाही... अपघातात अगोदर लोकांचा जीव गेला होता दिवसा दढवळ्या दरोडे पडत आहे.सरकार दरोडेखोरांना संपवणार आहे की सरकारचा वरदस्त यांच्यावर आहे. कायद्याचा वाचक नाही त्यामुळे दिवसाढवळ्या अशा घटना घडल्या नसत्या (on भागवत अमेरिका ) भागवत यांनी अमेरिकेचे बोलले त्याचे स्वागत करतो... मात्र त्यांनी भारतात त्यांनी बोलावे ... अमेरिकेत जे बोलत यावर लोकांनी काम करावं.. उठले सुटले हिंदू-मुस्लीम करत असतात... जो कोणी एकमेकांच्या धर्माविरुद्ध बोलेल तो गुन्हेगार ठरेल.. सहीष्णूता म्हणतात सांगलीत मस्जिदमध्ये इंजिनियर मुलाचा खून करता... (on भागवत Toranto भागवत वक्तव्य ) देशात दिल्ली ते गल्ली हिंदू सरकार आहे... यांची पॉलिसी डुप्लिकेट आहे.. आपल्या विचाराचे लोक बादशहाच्या दरबारात आणि इंग्रजांच्या दरबारातही होते... प्रत्येक धर्माने सहीष्णुतेच्या आधारावर काम करावे.. देशात एक बात आणि हिंदुस्तानच्या बाहेर एक बात करू नये -- बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते ऑन – पावसाची परिस्थिती - राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत पाऊस आला. काही नद्या भरून वाहिल्या, तर काही नद्या भरल्या sुद्धा नाहीत. नद्या वाहायला sुद्धा नाहीत, अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये आहे. विहिरी खोलवर गेलेल्या आहेत. पुढच्या काळात काय होईल, हे आत्ताच सांगता येत नाही. - परभणीतून एका शेतकऱ्याचा फोन आला. “आमचं सर्व काही गेलं असतं,” त्यांनी सांगितलं. पिकांना अळीमुळे संकट आलेलं आहे. दुबार पेरणीला सुद्धा पाणी लागतं. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नद्या कोरड्या आहेत. ही परिस्थिती पाहता भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. आतापासून सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी काम केलं पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन पुढची योजना केली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने उभं राहिलं पाहिजे. राज्याची तिजोरी सदा उघडी असली पाहिजे. (on महागाई वाढली आहे) - महागाई वाढली आहे. दूध, साखर वाढलेली आहेत. पेट्रोल 112 रुपये झालेलं आहे. खाण्याचं तेलसुद्धा वाढलेलं आहे. डाळ वाढली आहे. गॅस सिलेंडरसुद्धा वाढलेला आहे. यामुळे सर्वसामान्य गावातील माणूस रस्त्यावर आलेला आहे. गावात लाकडावर भोजन बनवण्याची व्यवस्था आता होऊ लागली आहे. सरकारची मानसिकता नाही आहे गरीबाच्या घरी सिलेंडर मिळावं म्हणून... दूध महागल्यामुळे लहान मुलांनासुद्धा याचं संकट पाहावं लागणार आहे. मध्यमवर्गीयांची परिस्थिती सध्या गंभीर झाली आहे. ( आदिवासी -- खाजगीकरण ) - लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट संघाशी संबंधित आहे. अनेक आश्रमशाळा आहेत, संघाच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. डुपिकेट देशप्रेमींना सांगावं लागेल .. आदिवासी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू असेल, तर ही सुरुवात आहे. - शाळेमध्ये प्रवेश कराल, त्यांचे व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून संघाची माहिती दिली जाणार, नॉनव्हेज खाऊ नका, व्हेज खा, असे सांगण्यात येईल.... ड्रेस कसा असावा, हे रुजवण्याच्या काम करतील त्यानंतर त्यांच्या डोक्यात संघाचे विचार रुजवण्याचं काम करतील. आदिवासी विद्यार्थ्यांवरकंट्रोल मानकर ट्रस्ट करेल. या माध्यमातून एक षडयंत्र सुरू आहे. (ऑन – लोकसेवा आयोग MPSC ) - २०२५ राज्य उत्पादन शुल्क जी परीक्षा, पेपर लीकच्या तक्रारी आहेत. असा आहे की, १०० गुणांचा पेपर होता, विद्यार्थ्यांना ८४ मार्क कसे मिळू शकतात? एमपीएससीमध्ये होऊ शकत नाही. शंभर टक्के गोंधळ निर्माण झालेला आहे. - ज्या व्यक्तीने पेपर लिक केला त्याच्याकडे शंभर कोटींची संपत्ती सापडली गेली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या ज्यांच्याकडे संपत्ती सापडली तो सत्ताधारी पक्षाच्या माणसाशी संबंध आहे... - ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे.एमपीएससीच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहणार नाही. ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय सेवेत पैसे घेऊन लिक करून सिलेक्शन होत असेल, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल. महाराष्ट्राच्या टॅलेंटला व्हॅल्यू नसणार. येणाऱ्या काळात फार मोठी अराजकता निर्माण होईल. - एमपीएससीवर बोर्ड आहे. एमपीएससी मधील संचालक मंडळ आहे, हे इमानदार आहेत की नाही, त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करून यामध्ये पारदर्शकता आणावी. अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं लागेल.
0
0
Report

शिंदे सरकार के मंत्रिमंडल से नाराज MLA ने बदली की मांग की

Kolhapur, Maharashtra:सरकार स्थापन होताना शिंदे सेनेत ज्यांना मंत्रीपदे दिली नाहीत त्यांच्यात आता खदखद सुरू आहे. कोल्हापूरात आमदार राजेश क्षीरसागर आणि पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्यात यावरून संघर्ष सुरू आहे. ज्यांना मंत्र्यांनी चांगले काम आणि संघटना वाढीसाठी काम केले नाही त्याना बदलण्याची गरज आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलीय. या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड बघून अडीच वर्षांनी मंत्रीपदे बदलण्याचा दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी पाळावा अशी मागणी त्यांनी केलीय. पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या पेक्षा आपल्या दारात लोकांची कामासाठी रांग असते त्यामुळे जे राज्याच्या हिताचे काम करत नाहीत त्याना बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय.
0
0
Report
Advertisement

सुप्रिया सुळे ने भीमाशंकर में विकास-उद्योग और किसान नीति पर सरकार को घेरा

Shirur, Maharashtra:खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद पॉईंटर... भीमाशंकर परिसरातील दुरवस्था व भाविकांचे हाल: भीमाशंकर येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि अर्धवट पडलेली विकासकामे यावर तीव्र नाराजी व्यक्त केली; यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. चाकण एमआयडीसी आणि उद्योगांचे स्थलांतर: पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे चाकणसह राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप केला. दावोस दौऱ्यांवर टीका करत स्थानिक उद्योगांना 'रेड कार्पेट' देण्याची आणि चाकणच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. शेतकरी प्रश्न, कांदा व sakhar धोरण: केंद्र政府च्या अस्थिर आयात-निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला. sakhareche धोरण आणि shetmālalā योग्य भाव न मिळण्यावरून सरकारवर टीका केली. अंगणवाडी पोषण आहार व दूध भेसळ प्रकरण: लहान मुलांच्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आंबेगाव व परिसरात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे स्वागत करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांचे आंदोलन व पेपरफुटी: आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, एमपीएससी व इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. आंदोलने व सरकारच्या भूमिकेवर टीका: मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध घटकांना आपल्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागत असून, सरकार संवाद साधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला.
0
0
Report
Advertisement

यवत में ओबीसी मोर्चे को पुलिस ने अनुमति नहीं दी, हाके ने रुख दिखाया

Rui, Maharashtra:ओबीसींच्या मोर्चा मुंबईकडे एक सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. पोलीसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी नाकारली असून लक्ष्मण हाके यांना नोटीस दिली गेली आहे. यवत पोलीस ठाण्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. आम्ही मोर्चावर ठाम असून मुंबईकडे जाणार असल्याचे हाके यांनी म्हटले. जरांगे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारला त्यांनी आरक्षण दिले असल्यामुळे मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील आझाद मैदान येथे पोलिसांची परवानगी आवश्यक असून ती मिळाली नाही त्यामुळे हाके यांच्या मोर्चाला अद्याप परवानगी दिली नाही. ज्या गाड्या या मोर्चाला जाणार आहेत त्यामुळे कायदा व्यवस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; नव्याने अर्ज करून मागणी करण्याचा विचार दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

धुळे में शरद पवार को कृतज्ञता सम्मान, श्रद्धेय नेता उपस्थित

Dhule, Maharashtra:धुळे शहरातील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळेस शास्त्रज्ञान डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांचा कृतज्ञाता सन्मान केला. यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. संस्थेने केलेल्या या सत्कार सोहळ्या बद्दल शरद पवार यांनी आभार व्यक्त करत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी इतिहास संशोधनांमध्ये मोठे योगदान दिलं असून, त्यांचे योगदान हे येणारे पिढ्यासाठी मार्गदर्शक आहे, असं शरद पवार यांनी सांगितल. तर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना, अनेक संस्थांना शरद पवार यांनी मदत केली, मात्र त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही, असं सांगितले.
0
0
Report

अनुमति न मिलने के बावजूद ओबीसी महामोर्चा 1 सितंबर को पटस से मुंबई रवाना

Pune, Maharashtra:परवानगी नाकारली तरीही १ सप्टेंबरचा ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणारच असा निर्धार ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. तसेच नियोजनात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक तारखेला सकाळी दहा वाजता ओबीसी समाजबांधवांनी पाटस टोल नाक्यावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही हाके यांनी केले आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विविध प्रश्नावरती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाने महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा पाटसहून निघणार असून तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र सोशल मीडियामध्ये काही ओबीसी समाजाचे विरोधक या मोर्चा संदर्भात अफवा पसरवत आहेत. असा आरोप हाकेंनी केला दरम्यान पाटस येथे पोलीस प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाली असून कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत हा मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

सरकार ओबीसी-मराठा आरक्षण मुद्दे पर सकारात्मक बातचीत कर रही है

Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन जरांगे पाटील उपोषण... सरकार तोडगा... विखे पाटील जरांगे यांच्याशी बोलता येत सरकार जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. एक-दोन दिवसात तोडगा निघेल... ऑन खासदार सुप्रिया सुळे पक्ष स्थापना.. पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल... ऑन लक्ष्मण हाके ओबीसी मोर्चा मुंबई हाके यांच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा होईल मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल ऑन सुनेत्रा पवार निवडणूक मध्यस्थी लक्ष्मण हाके राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहे तो जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल, ऑन छगन भुजबळ छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करू ओबीसी आणि मराठा यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबाबत सरकार सकारात्मक आहे. जातीय सलोखा जपलं पाहिजे गुण्या गोविंदाने काम केलं पाहिजे सरकारची भूमिका ऑन हाके आरक्षण गेलं लखा्मण हाके आणि भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून समजून घेईल ऑन जरांगे पाटील मागणी प्रमुख विखे पाटील यांना जबाबदारी दिली है ते यातून नक्की तोडगा काढतील... ऑन कर्जमाफी यादी कागदपत्र जसे पूर्ण होतील केवायसी पूर्ण होतील त्याप्रमाणे यादी लागतील शेतकरी बांधवांना सांगतो काळजी करू नका सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिला आहे ते नक्की पूर्ण होईल... शेतकरी अडचणीत आहे पाऊस पडत नाही... चार आठ दिवसात पाऊस नाही पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल... पिकावर शेतकऱ्याने स्वप्न रंगवले आहेत ऑन बायोमेट्रिक कोणालाही वंचित ठेवणार नाही .. ऑन मयत शेतकरी मयत शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वंचित ठेवणार नाही... ऑन सुप्रिया सुळे शेतकरी कंबरड मोडलं याबाबतीत मी माहिती घेतली नाही माहिती घेतल्यावर मी बोलेल.... ऑन सुप्रिया सुळे सरकार धोरण ताई देशाच्या ज्येष्ठ नेते आहेत ते काय बोलल्या ते मी ऐकून घेतले नाहीत.... माहिती घेतल्यावर मी त्यावर बोलेल...
0
0
Report

पुणे महापालिका के कनिष्ठ इंजीनियर भर्ती पेपर लीक: पुनःपरीक्षा की मांग

Pune, Maharashtra:कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा; फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पुरावे समोर आल्यानंतर तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “तीन उमेदवारांवर कारवाई झाली म्हणजे गैरप्रकार केवळ त्यांच्यापर्यंत मर्यादित होता, असे कसे मानता येईल? प्रश्नपत्रिका आणखी किती जणांपर्यंत पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची सखोल चौकशी झाली आहे का? त्याच निकालाच्या आधारे नियुक्त्या करणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,” असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात महापालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत खात्रीदायक माहिती असल्याचा दावा करत, “प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावर असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही. भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेतली नाही, तर तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.
0
0
Report

पुणे में गणेशोत्सव के दौरान ध्वनि प्रदूषण रोकथाम की मांग, नागरिक मोर्चा निकला

Pune, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सव डिजेमुक्त व्हावा, यासाठी अभिनव चौकात काही जागरूक पुणेकर जमा झालेत. डिजे आणि डॉल्बीच्या आवाजाला आता सहन होत नाही तो बंद झालाच पाहिजे असे या ज्येष्ठ नागरिका्चा म्हणणं होतं. आयोजक संघटनेनं आजचा मोर्चा रद्द केला असूनही पुणेकर डिजेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. अभिनव चौक ते शनिवारवाडा हा मोर्चा निघत आहे. ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी केली जावी, एवढीच आमची मागणी आहे. सण उत्सवात ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. उत्सव हवा प्रदुषण नको.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top