Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 05:31:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:संपूर्ण प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गा विरोधात इटकरे ग्रामस्थांचे आंदोलन, शक्तीपीठ प्रतिकृतीचे दहन. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गा विरोधात इटकरे येथे आंदोलन झाले. ग्रामपंचायतीसह विविध संस्था आणि शेतकऱ्यांच्या वतीने प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत महामार्गाच्या प्रतिकृतीचे दहन झाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये वाळवा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 06, 2026 05:31:02
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या कोसरा (पवनी तालुका) येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली; संपूर्ण घर भस्मस्त, रोख रक्कम व दागिने सहित अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान. गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु जुने घर मातीचे आणि लाकूडाचे असल्याने काही वेळातच आगीने परिसर प्रखरपणे व्यापून टाकला. पांख, पोलिस, अग्नीशामक दलाला पाचारण केले गेले. पवनी नगर पालिका आग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली; मात्र नुकसानाच्या थक्क करणाऱ्या स्वरुपात काहीही वाचवता आले नाही. दरम्यान, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पोलिस निरीक्षक धनंजय पाटील व गावचे तलाठी आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 06, 2026 05:18:45
Chendhare, Maharashtra:तुम्ही दिलेल्या सामग्रीतून निष्कर्षानुसार, मुंबई गोवा महामार्गावर प्रवासासाठी आता टोल भरावा लागणार असल्याची अधिसूचना येण्याची शक्यता प्रखरपणे सांगितली गेली आहे. १३ वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा तर, प्रवाशांकडून टोल वसुलीची तयारी सुरू असल्याची माहिती दिली गेली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी उभारलेले टोलनाके कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या बद्दल अधिसूचना जारी होण्याची शक्यता महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली आहे. हे टोलनाके सुरू झाल्यास कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागतील. निधीची कमतरता, ठेकेदाराची निष्क्रियता, भूसंपादनातील अडचणी यामुळे हे काम रखडलं आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 06, 2026 05:03:56
Pandharpur, Maharashtra:अमेरिका इजराइल और इराणच्या युद्धाचा द्राक्ष निर्यातावर परिणाम, पंढरपूर तालुक्यात कोट्यवधींची द्राक्षे शेतात पडून, कवडीमोल दराने द्राक्ष विकण्याचा पर्याय सध्या रमझान हा मुस्लिम धर्मियांचा धार्मिक महिना सुरू आहे. या काळात विविध प्रकारच्या फळांना मोठी मागणी असते. आखाती देशात महाराष्ट्रातून द्राक्ष सुद्धा निर्यात होतात. मात्र सध्या असलेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे फळे निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी साठी पाठ फिरवली आहे. याचा अर्थिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील सुरेश टिकोरे यांचा बारा एकर निर्यात क्षम द्राक्ष बागेचा प्लॉट आहे. आठ दिवसात ही द्राक्षे दुबईच्या बाजारात निर्यातदार व्यापाऱ्याच्या माध्यमातून विक्री साठी जाणार होती. प्रति किलो शंभर रुपये दर ठरला होता. द्राक्ष तोडणीसाठी साठी मजूर व्यापारी येणार होते. पण युद्धाची तीव्रता वाढली आणि व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी करायला नकार दिला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. सध्या टिकोरे यांचा दोन कोटी रूपयांची द्राक्षे बागेवर पडून आहेत. आता स्थानिक बाजारपेठेत ही द्राक्ष कवडीमोल दराने विकावी लागणार आहे. याचा परिणाम चाळीस लाख रूपयांचे प्राथमिक नुकसान त्यांना दिसत आहे. निर्यात होणारी द्राक्षे आता मिळेल त्या दराने स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव लक्ष्मी टाकळी या परिसरातून अनेक शेतकरी द्राक्ष निर्यात करतात. मात्र युद्धाच्या परिस्तिथी मुळे कोट्यवधी रुपयांची द्राक्षे बागेत आहेत.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 06, 2026 05:02:58
Amravati, Maharashtra:बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट दिसायला सुरुवात; प्रशासनासोबत जनता दरबार घेत बच्चू कडू जाग्यावर सोडवत आहे समस्या, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना दिलासा अँकर :- शेतकरी कर्जमाफीची आठवण देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींचा संघर्ष पुढे आणण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मेळघाटात मेळघाट संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या संघर्ष यात्रेचा आज सहावा दिवस आहे. मेळघाटात बच्चू कडूंची यात्रा सुरू असताना बच्चू कडू प्रशासनासोबत मेळघाटातील आदिवासींचा जनता दरबार घेत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यावरच सोडवत असल्याने बच्चू कडू च्या संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे बच्चू कडू च्या मेळघाट संघर्ष यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचा नऊ तारखेला चिखलदरा येथे समारोप होणार असून मेळघाटातील आदिवासींनी मोठ्या संख्येने समारोपय सभेला एकत्र येण्याचा आव्हान बच्चू कडू यांनी केला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 04:50:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेच्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे CEO विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केली आहे. वारंवार सूचना देऊनही दिव्यांग ओळखपत्र व यूडीआयडी कार्ड सादर न केल्याने 14 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 13 शिक्षक व एक शिपाई कर्मचारीाचा समावेश आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी आणि सवलत लाटल्याचा प्रकार राज्यात समोर आल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेत चौकशी सुरू झाली होती, त्यानुसार जिल्हा परिषदेकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिव्यांग ओळखपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र 13 शिक्षक व एका शिपाई कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड सादर न केल्याने जिल्हा परिषदेकडुन त्यांच्यावर निलंबित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 06, 2026 04:46:37
Amravati, Maharashtra:दहावी पेपर चोरीप्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित; दोन विद्यार्थ्यांसह पालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे मुख्य आरोपी असलेले गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 06, 2026 04:20:56
Pune, Maharashtra:मावळमध्ये शिवजयंती दिनी दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या शिवभक्तांची नावं होती. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेंव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली, त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले. तेंव्हा शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंती च्या दिवशी शोककळा पसरली..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 06, 2026 04:02:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील नवे दानवाड येथे प्राचीन घाटाचे अवशेष सापडले आहेत. कृष्णा नदीच्या काठावर खोदकाम सुरू असताना काहींन दगडी पायऱ्यांचे प्राचीन अवशेष दिसून आले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले असता प्राचीन घाटाचे अवशेष समोर आले. हा घाट नेमका कोणत्या कालखंडात आणि कोणाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला, याचा शोध सध्या घेतला जातोय. मात्र घाटावर असलेल्या कृष्ण मंदिरामुळे हा घाट अतिशय प्राचीन काळातील असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कृष्णा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी प्राचीन घाट आढळतात, त्यामध्ये आता नवे दानवाड येथे सापडलेल्या घाटाचीही नव्याने भर पडली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 06, 2026 04:02:00
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 06, 2026 04:00:20
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात आज पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडी. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज होणार आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून काही तालुक्यांमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः उमरगा आणि कळंब पंचायत समितीत राजकीय हालचालींना वेग झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीनुसार राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उमरगा पंचायत समितीत सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही पक्षांकडे जवळपास समान सदस्यसंख्या असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत सदस्यांची मनधरणी सुरू असल्याची चर्चा आहे. तर कळंब पंचायत समितीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात समसमान सदस्यसंख्या असल्यामुळे सभापती पदाची निवड अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कोणत्या गटाला अतिरिक्त पाठिंबा मिळतो, यावरच सत्तेचा निर्णय अवलंबून राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण ८ पंचायत समित्या असून सभापती पदाच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी आपले सदस्य एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान ९ मार्च रोजी निकाल लागल्यानंतर काही पंचायत समिती सदस्य सहलीवर गेले असल्याने, या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:45:16
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 06, 2026 03:35:03
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव/पुणे धामणी परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास महावितरण विभागाने नकार दिल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाले असून शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहिला आहे,परिसरातील शेतकऱ्यांनी नऊ शेतकरी गट स्थापन करून डिंभे धरणाच्या कालव्यातून एकूण नऊ उपसा सिंचन योजना राबविल्या त्यासाठी कर्ज काढली व योजना पुर्ण केल्या परंतु पाणी उपसा मोटार पंपासाठी विज कनेक्शन महावितरण विभागाच्या वतीने दिले जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांना उपोषण करत आंदोलन सुरू केलंय, लाखो रुपये खर्च करून विद्युत पंपच सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेेत
0
comment0
Report
Advertisement
Back to top