icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नेरुल में दो छात्राओं को बिजली का झटका, महावितरण की लापरवाही पर चहुंओं सवाल

Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ एलपी जवळ दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. विद्युत वाहिनी अचानक कट झाल्यामुळे दोन मुलींना विजेचा धक्का लागला असून विद्यार्थिनींवर डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दरम्यान सदर दुर्दैवी घटना महावितरणच्या निष्काळजीपणा मुळे घडली असून विद्याथीनींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. नवी मुंबई मनपा महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या तबेबतीची विचारपूस केली असून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
0
0
Report

परशुराम घाट का गैबियन खतरे में: पेढ़े गाँव पर मंडराया संकट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. झी २४ तास ने मुंबई - गोवा महामार्गवरील चिपळूणनजीकच्या परशुराम घाटातील गॅबियन वाला पहिल्याच पावसात गेलेले तडे ही बातमी दाखवली होती.. या बातमीची प्रशासनाने दाखल घेऊन सध्या मातीने हे तडे भरले जातायत.. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोणीही नाही फक्त कामगार या ठिकाणी काम करीत आहेत.. परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव असून जवळपास हजारो लोकांची वस्ती आहे.. त्यामुळे गॅबियन वाला तडे गेल्यामुळे ही सध्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे पेढे गावावरती एक प्रकारचं संकट उभे राहिलेय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report

Beed Family Sword Attack over Four-Acre Farm Sparks Bloodshed in Beed

Beed, Maharashtra:बीड: चार एकर शेतीसाठी रक्तरंजित संघर्ष! पुतण्याने तलवारीच्या वारात काकाचे बोटं छाटले, चुलत भाऊ गंभीर..! पुतण्याने चुलत्यावर तलवारीने हल्ला करत हाताची बोटं छाटली तर चुलत भावालाही गंभीर जखमी केलं. बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर येथील या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २४ जून रोजी रुई शहाजानपूर येथे ही रक्तरंजित घटना घडली. रामू सोपान घुमरे यांच्या मालकीच्या चार एकर शेतीच्या विक्रीवरून कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद अखेर हिंसक झाला. आरोपानुसार, पुतण्या अतुल घुमरे याने तलवारीने चुलते रामू घुमरे यांच्यावर हल्ला करत त्यांच्या हाताचं बोट छाटलं. त्यानंतर चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे यांच्यावरही तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर दोन्ही जखमींना प्रथम बीड जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. तब्बल आठवडाभर उपचार घेतल्यानंतर दोघेही घरी परतले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना गंभीर असतानादेखील पोलिसांनी योग अशी कारवाई केलीच नसल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंुबाने केला आहे. त्यामुळेच पीडित कुटुंब पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून बसले आहे. पीडित जखमी शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील उपचार पूर्णपणे झाल्यानंतर त्यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी अतुल घुमरे याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी काल रात्रीपासून आरोपींची शोध मोहीम सुरू केली आहे. लवकर आरोपीना अटक करू अशी ग्वाही बीड पोलिसांनी दिली आहे. चार एकर शेतीच्या वादाने रक्ताच्या नात्यांवर तलवारीची धार फिरली... रक्ताच्या नात्यांमध्ये वैर इतकं टोकाला पोहोचलं ki एकाच कुटुंबातील चार सदस्य रक्तबंबाळ झाले. आता या प्रकरणात पोलिसांची पुढची कारवाई आणि आरोपींना कधी अटक होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महेंद्रकुमार मुधोळकर ZEE 24 तास बीड..
0
0
Report
Advertisement

सांगली जिला परिषद ने कृषि दिवस बड़े उत्साह से मनाया; किसानों को सम्मान और मार्गदर्शन

Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एक जुलै कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते sन्मान करण्यात आला आहे.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात अलनिनोचा पिकांवर होणारे परिणाम आणि घ्यावयाची काळजी याबाबत कृषी संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन देखील देण्यात आले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती देखील यावेळी साजरी करण्यात आली.
0
0
Report

Kolhapur में अवैध गर्भपलन रैकेट का पर्दाफाश, 4 गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाच्या अवैध रॅकेटविरोधात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भोगावती परिसरातील एका केंद्रावर टाकलेल्या छाप्यात गर्भलिंग चाचणीसाठी वापरले जाणारे मशीन, औषधांचा साठा जप्त करण्यामुले चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती इथ अवैधरित्या गर्भलिंग निदान सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस आणि आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. या कारवाईत गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे मशीन, काही गोळ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी महेश पाटील, अनिल टिपूगडे, सुनील पाटील और श्रीमंत पाटील या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महेश पाटील हा राधानगरी तालुक्यातील रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच या रॅकेटचे इतर जिल्ह्यांशी काही संबंध आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

ओबीसी प्रदर्शन: जातिनिहाय जनगणना और आरक्षण बचाने की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिला कार्यालय के सामने आज सकल ओबीसी समाज और ओबीसी हक्क संरक्षण परिषदे की ओर से विभिन्न मांगों के लिए धरना प्रदर्शन किया गया। ओबीसी की देशभर में जातिनिहाय जनगणना करानी है, ओबीसी आरक्षण संरक्षण उपसमिति रद्द करनी है, जनसंख्या के अनुपात में आरक्षण लागू करें, तथा आंदोलन के कार्यकर्ताओं के विरुद्ध लगे मुकदमे वापस लेने सहित प्रमुख मांगें सामने आईं। अनुसूचित जाति–अनुसूचित जनजाति के समान ही ओबीसी की भी औपचारिक जातिनिहाय जनगणना करानी चाहिए—ऐसी ठोस भूमिका आंदोलनकर्ता ने रखी। ओबीसी महाराष्ट्र राज्य के प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे के नेतृत्व में यह आंदोलन हुआ। शासन इसे तात्कालिक सकारात्मक निर्णय दे, अन्यथा राज्यभर में तीव्र आंदोलन शुरू किया जाएगा—इस चेतावनी के साथ।
0
0
Report
Advertisement

नागपुर महाल हिट एंड रन में बुजुर्ग की मौत, कार अब तक नहीं मिली

Nagpur, Maharashtra:नागपूर महाल हीट अँड रन प्रकरणी 25 दिवसांनंतर वृद्धाला धडक देणारी ती कार आणि आरोपींचा अजून शोध लागला नाही... मुकुंद बाभरे या 72 वर्षीय वृद्धाला 7 जूनला बडकस चौकाकडून आयचित मंदिरकडे सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान बेदरकारपणे कार चालवणाऱ्याने उडविले... या अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला -- अपघाताला सुमारे पंचवीस दिवस झाले तरी अजूनही धडक देणारी ती कार शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही महत्त्वाचं म्हणजे बळकस चौक ते आयचीत मंदिर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय लगतचा परिसर आहे.... अतिशय संवेदनशील भाग आहे.... मात्र तेथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अजून पर्यंत पोलिसांना धडक देणारा कारचा शोध घेण्यात यश मिळालेले नाही... धीम्या तपासगतीमुळे अनेक सवाल उपस्थित होत असताना पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही सुरू असल्याचा दावा केलाय... दरम्यान व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या या परिसरातील सीसीटीव्हीच्या दर्जाबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे... सीसीटीव्ही कुचकामी असल्याचा आरोप होतोय या हीट अँड रन प्रकरणाच्या तपासाबाबत आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडून
0
0
Report

कर्जमाफी समेत अन्य मांगों पर किसान रोड जाम, आसेगाव पूर्णा टी-पॉइंट

Amravati, Maharashtra:कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक; आसेगाव पूर्णा टी-पॉईंटवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको असेगाव पूर्णा टी-पॉईंट येथे लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. सरसकट शेतकरी कर्जमाफी, पिकविमा योजनेचा लाभ, शेतीमालाला हमीभाव तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्या अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतुकीवर काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाम लागला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
0
0
Report
Advertisement

साखर उद्योग संकट से जिल्हा बैंकों को बड़ा आर्थिक खतरा: पूर्व मंत्री की चेतावनी

Shirur, Maharashtra:राज्यातील आणि देशातील साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीत असून, यामुळे जिल्हा बँकांवरही गंभीर आर्थिक संकट ओढवू शकते, असा थेट इशारा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. वळसे पाटील यांनी बँकेच्या आर्थिक ताकदीचा हिशोब मांडताना सांगितले की, १९९१ मध्ये जिल्हा बँकेत ३५० कोटींच्या ठेवी होत्या, ज्या आज साडेसतरा हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. मात्र, बँकेने एकट्या साखर उद्योगाला ७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. जर कारखाने अडचणीत आले आणि हे पैसे वसूल झाले नाहीत, तर जिल्हा बँका मोठ्या चक्रव्यूहात अडकतील. यासोबतच, यंदा 'अल निनो'च्या सावटामुळे राज्यात दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते आणि जागतिक घडामोडींमुळे आर्थिक मंदीचा धोकाही निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top