icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी बाढ़, 400 नागरिक सुरक्षित स्थानांतरित; प्रशासन अलर्ट

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने तरुणांच्या मदतीने 400 नागरिकांचे स्थलांतर केले असून या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू राहिल्यास पुराचा धोका आणखी वाढणार असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वर असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्याधिकारी ओंकार पवार यांनी दिली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे.
0
0
Report
Advertisement

نवी मुंबई नगरपालिका کی صفائی ریلی سے بچوں میں پلاسٹک سے मुक्त महाराष्ट्र کا پیغام

Navi Mumbai, Maharashtra:स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मधील सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या अभियानांतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिंडी यात्रा काढत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अश्या सामाजिक संदेशाची जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मनपा आयुक्त अधिकारीगणांच्या सह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
0
0
Report

अकोट में नीट पेपरफुटी के विरोध में प्रदर्शन, प्रधान से नैतिक जिम्मेदारी और इस्तीफे की मांग

Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. एकूणच, नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार্জच्या निषेधार्थ अकोटमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.
0
0
Report
Advertisement

तीनों नावें मौसमी मछली पकड़नी पाबंदी के उल्लंघन में वरसोवा डॉक से पकड़ी गईं

Mumbai, Maharashtra:दिनांक २० जुलै २०२६ रोजी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार, वर्सोवा खाडीबाहेर तीन ट्रॉलर्स (नौका) नांगर टाकून उभ्या असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास तिकडे जाऊन खात्री करण्यात आली असता, सदर तीन नौकांनी मासेमारी करून आल्याचे व मासळी उतरवण्याच्या तयारीत असल्याचा संशय आले. त्या अनुषंगाने वर्सोवा जेटी येथे परवाना अधिकारी वर्सोवा व सुरक्षारक्षक यांनी रात्रभर गस्त घालून सदर नौका येत आहेत किंवा कसे, याबत खातरजमा केली. परंतु, त्या दिवशी वारा आणि पाऊस अत्यंत मुसळधार असल्यामुळे सदर नौका जेटीवर न थांबता, खाडीच्या आतल्या दिशेने साधारणतः रात्री ३:०० वाजता गेल्याचे निदर्शनास आले. अंधार व प्रतिकूल हवामानामुळे काहीही स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्या नौका नेमक्या कुठे गेल्या आहेत हे पाहणे शक्य झाले नाही. तसेच, वर्सोवा येथे गस्ती नौका उपलब्ध नसल्यामुळे देखील एवढ्या रात्री कोणतीही नौका पाठलागासाठी उपलब्ध होणे शक्य झाले नाही. त्याप्रमाणे पुढच्या दिवशी सकाळी सदर नौका कुठे आहेत याचा sविस्तर तपास घेतला गेला. सागरी पोलीस, महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) आणि परवाना अधिकारी वर्सोवा यांनी संयुक्त धाड या नौकांवर टाकून सर्व तपासणी केली. तपासणी दरम्यान या नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच काही नौकांवर आवश्यक ते कायदेशीर कागदपत्रे देखील आढळून आली नाहीत. या प्रकरणी तपासणी केलेल्या त्या तीन नौकांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. *पहिली नौका - अमनाथ (AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2615 & ०४/०१/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* श्री. महेंद्र पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, गोमा गल्ली, जरीमरी कृपा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) २. *दुसरी नौका - जय बाबा अमरनाथ (JAY BABA AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2683 & १३/०२/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* सौ. नेत्रा विक्रंत कोळी, रुम नं. ५, आनंदी सदन, बुधा गल्ली नं. १, सत्यजित बार जवळ, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* ससून डॉक (Sasoon Dock) ३. *तिसरी नौका - जरीमरी तिसाई (JARI MARI TISAI)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2170 & १९/१२/२०१९ मालकाचे नाव व पत्ता: श्री. विलास पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, पांडुरंग रामले मार्ग, जरीमरी कृपा, गोमा गल्ली, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ मासेमारी मूळ बंदर: न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) सदर नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम व अधिनियम, १९८१ नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून तात्काळ प्रतिवृत्त दाखल करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नागपूर में कांग्रेस के नेताओं का बड़ा प्रदर्शन: सरकार पर दबाव बढ़ा

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. - आमच्या पक्षाकडून पाच प्रश्न केले, राजीनामा, विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे व्हावे, महिलांशी गैरवर्तन केले त्यावर गुन्हे दाखल व्हावे, - सोमन वंगचुक याना 27 दिवस वाट पाहावी लागली हे अपयश केंद्र सरकारचे आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनास महत्व देत नाही अशी सरकारची मस्तीची भूमिका दिसून आली. ही विकृत आणि हुकुमशाही मानसिकता आहे, On ड्रग विनयभंग - विनयभंग झाला, रक्षक म्हणून सर्वांना दोष देत नाही. पण ही विकृती पोलीस विभागातील कीड आहे..ती स्वच्छ करण्याची गरज आहे. सत्तेचा उपयोग या पदाचा उपयोग आंदोलन उग्ररूप येतं की नाही,आंदोलनाला हाताळण्याची भूमिका पोलिसांची अपेक्षित आहे मात्र पोलिसांनी महिलांवर अत्याचार केला.... दिल्ली मुंबईत पाहिलं पोलीसवाले ड्रगची पुडी टाकू... अशी धमकी देत आहे.... याचा अर्थ पोलिसांकडे ड्रग आहे. आणि पोलीस पुडी टाकून कोणालाजी अडकवू शकतात. हे आता महाराष्ट्रात स्पष्ट झाल आहे. एखाद्याचा बळी घेऊन अडकवायचं असेल..तर पोलिसांकडचं ड्रग आणतात आणि त्या अडकवतात..* - *धमकी देऊन महाराष्ट्र पोलिसांचा खऱ्या रूपाने पुढे आणलं की काय अशी भीती आता वाटू लागतली आहे. पोलीस मंडळी चांगले आहे, अधिकारी चांगले आहे... मात्र या सगळ्यावर धाक पाहिजे तो गृह विभागाचा धाक कमी झाला का ? त्यामुळे पोलीस सुसाट वागत आहे का.. त्याने हा प्रकार केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे? आणि निलंबन पाहिजे... काँग्रेस या सगळ्यांमध्ये शांत बसणार नाही.* On सिव्हिल ड्रेस आंदोलन/ परवानगी - *या राज्यात बेरोजगारी वाढली तरुणांना भविष्य सुरक्षित वाटत नाही... परीक्षेची तयारी मेहनत करून शिक्षण प्रणालीवर विश्वास राहिला नाही... पेपर फुटीला सरकारचे समर्थन आहे, सरकार पुरस्कृत पेपर फुटत आहे.. तरुणानं आता भडकले आहे ते राजीनामा घेतल्याशिवाय शांत होणार नाही....* On म्बब्स 1 वर्ष सक्ती - एमबीबीएस मुलावर सरकार म्हणून खर्च केला जातो... त्यातून त्यांनी दोन वर्ष सरकारी ग्रामीण रुग्णालय सेवा द्यावी असा निर्णय काँग्रेस सरकारने काढला होता... सरकारने पहिले एक वर्ष पाच लाख रुपये डिपॉझिट घेऊन कमी केले... आता ते ही कमी केले... मग ग्रामीण भागात डॉक्टर मिळणार नाही? कारण शहरात व्यवसाय मिळतो. ओढा शहरात असतो.... प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कोण मिळणार तिथली सेवा राम भरोसे असणार ka? याचा पुनर्विचार सरकारने करावा अशी मागणी सरकारकडे करू... On कारागृहात ड्रग - महाराष्ट्र गृहाच्या अतिरिक्त सचिव यांच्याशी चर्चा झाली.... महाराष्ट्रातील जेलचे प्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. कारागृहात मोबाईल मिळते. जेल सुप्रींटेनडेंट जर मजबूत असेल तर अश्या घटना घडणार नाही. कारागृहात मोबाईलचा वापर होत आहे... बाहेर आणि आत मध्ये धाक राहिलेला नाही... गुन्हेगारांना जेलचे भीती वाटत नाही.... अशी सरकारची अपेक्षा असते. दुर्दैवाने हे सगळ भ्रष्टाचाराचे अड्डे होत असेल तर महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेची धज्जा उडाली आहे असं म्हणावं लागेल. On हर्षवर्धन सपकाळ ठाकरे आंदोलन - आंदोलन हे काही घटकांसाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी आहे. कोणाला कुठेही जाता येईल त्यात बंधन नाही. आंदोलन हुकूमशाही आणि सरकारच्या विरोधात असेल त्याच पक्षाचे बंधनाचा विषय येत नाही. तिथे कोणी जावा आणि आंदोलन मजबूत करावे. On कर्जमाफी यादी/ - *पूर्ण यादी येत असेल तर आनंद आहे. कीतिची यादी येते त्यावर आमचं लक्ष आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.... ---------------- महाराष्ट्रात 45 लाख खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. यात खरेदी विक्री करायची आहे तो जाहिरात देतो मात्र खाजगी कंपनीचे चोचले पुरवण्यासाठी महाराष्ट्रात एक कंपनी पुढे आली. त्या कंपनीचा सॉफ्टवेअर घेऊन पोर्टल करून खरेदी विक्री करणाऱ्यांनी नोटीसी पोटी चार हजार रुपये भरावे लागणार आहे... यातून 800 कोटी रुपये वसूल होते. 900 कोटी रुपये सरकारकडे जातील आणि 900 कोटी रुपये त्या खाजगी कंपनीकडे जाईल. 25 कोटीचा सॉफ्टवेअर तयार करून पाच वर्षाचा करार करण्याचा प्रपोजल पुढे आले आहे...* - कायद्यात खरेदी विक्री तयार असेल तर जाहिरात देण्याची गरज नाही. मात्र कमिशन काढण्यासाठी नवीन धंदा सरकारने आला आहे... IGR आणि महसूल सचिव यांच्याशी बोललो. 45 लाख सेल दीड होतात, 1800 कोटी गरिबांचे लुटण्यासाठी एजन्सी कम्पनी सरकारला घेऊन पूढे येत आहे... गरिबांचे पाकीट कापण्यासाठी आले आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे.. लूट होऊ देणार नाही.. आधी चक्कर हे प्रपोजल नेणारे आणि स्वीकारणाऱ्या नसेल तर हे दुर्दैव आहे. - *किती कर्जमाफी होते हे आम्ही आता बघू अशी 532 ची यादी आली... धाराशिव जिल्ह्यात गंभीर प्रकार घडला आहे...कृषी साहित्य दिल्याचा 21 कोटी रुपये काढून गेले... त्यांना ते साहित्य दिलेच नाही. धाराशिव जिल्ह्यात हा प्रकार आहे.. यादीत मृत शेतकऱ्यांचे 16 नाव आहे. 21 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये घोटाळा करून काढून घेतले.. सरकारच लक्ष टक्केवारी घेऊन चूप बसत आहे..* On दोन राष्ट्रवादी - त्यांचं त्यांनी बघावं आम्हाला काही देणं घेणं नाही... पुढे काय होतं आम्ही ज्योतिषी नाही.. ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांनाच हा प्रश्न विचारला तर बरं होईल.
0
0
Report

विटा में जंतर-मंतर समर्थक धरना; शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से इस्तीफा मांग

Sangli, Maharashtra:जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ विटा येथे धरणे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि बलाठीhandler? च्या निषेधार्थ सांगलीच्या विटा मध्ये देखील आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विविध सामाजिक संघटना, पुरोगामी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांना एकत्रित येत तिरंगा रॅली काढत धरणे आंदोलन केले. यावेळी दिल्ली आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनामुळे विटा शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती.
0
0
Report

नाशिक के चांदोरी में बाढ़ की विकट स्थिति, राहत व रेस्क्यू जारी

Niphad, Maharashtra:नाशिक के निफाड तालुक्यातील चांदोरी में पूर परिस्थिती गंभीर होत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे गावातील नागरिकांना परिसरातील मंगल कार्यालय शाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असून त्यांच्या अन्नपाण्याची व आरोग्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्याचं काम युद्ध पातळ सुरू आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top