icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जमीन से बाहर आ रहे ज्वलनशील पदार्थ से लोगों में दहशत, जांच जारी

Jalna, Maharashtra:जालना | जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्याने खळबळ... या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जमिनीतून काळ्या रंगाचे ज्वलनशील पदार्थ अचानक बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले. हे पदार्थ बाहेर पडताना लाव्हा जमिनीतून उसळावा, अशा प्रकारे दृश्य दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. घटनास्थळी सुमारे 11 केव्ही क्षमतेचा विजेचा खांबही आहे. त्यामुळे या प्रकारामागे नेमकं कारण काय आहे, याबाबत अजून माहिती कळू शकलेली नाही. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू होण्याची अपेक्षा आहे.
0
0
Report

चिखली में शिंदे गुट की शिवसेना में जोरदार प्रवेश, भाजपा के नेताओं का पलायन

Buldhana, Maharashtra: बुलढाणा. स्टोरी बुलढाण्यात मी जर भाजपाचे लोकांना 150 कोटींची कामे देऊ शकतो तर चिखलीत का दिली जात नाही. आमदार संजय गायकवाड यांची भाजपा वर टीका. चिखलीत शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा.. विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश.. "गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" उपक्रमाला सुरुवात.. Anvhor - बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजप, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड तसेच मंत्री, प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपा वर टीका करत बुलढणा्ि मधील भाजपचे लोकांना जर 150 कोटींची कामे दिल्या जातात, मग чिखलीत शिवसेनेच्या लोकांना का दिली जात नाही, उलट काम मागायल गेले तर भाजपत प्रवेश करा म्हणतात .. नाहीतर खोटे गुन्हे दाखल करतात .. त्यामुळे आता चिखलीत आम्ही आलो आहे ."गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली असून, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता चिखलीत मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश सुरू झाला असून, हा सपाटा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले... स्पीच बाईट - आ संजय गायकवाड, बुलढाणा ( शिंदेसेना )
0
0
Report
Advertisement

खारात प्रकरण पर मंत्री चंद्रकांत पाटील का बयान; एसआईटी नियुक्त जांच जारी

Sangli, Maharashtra:स्लग - खरात प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया,देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये मास्टर अँकर - अशोक खरात प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये खूप मास्टर आहेत.त्यामुळे एसआयटी नेमली आहे. सातपुते मॅडम सारख्या खूप चांगल्या ऑफिसर नेमल्या आहेत.खूप खणलं जात आहे,आवश्यकता वाटली तर देवेन्द्र जी केंद्रीय तपास यंत्रणाची मदत घेतील,त्याच बरोबर चंद्रकांत पाटील यांच्या कॉल प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावर बोलताना,या संदर्भात देवेंद्रजीं यांनी विधानसभा विधान परिषदेमध्ये एक अतिशय सविस्तर निवेदन केलेला आहे,असे सांगत अधिक बोलणे टाळले,ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
0
0
Report

नाशिक के खरात मामले ने महिलाओं पर मानसिक शोषण का सच उजागर किया

Nashik, Maharashtra:अँकर नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे...या प्रकरणातील पीडित महिलांच्या मनावर झालेल्या जखमा आता समोर येऊ लागत आहेत मानसिक छळ, भीती आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या या महिलांची ‘इनसाइड स्टोरी’ आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत... V/O १ राज्यात खळबळ उडवणाऱ्या भोंदू खरात प्रकरणातील पीडित महिला सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील तब्बल ८ ते ९ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घटनाक्रमामुळे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीमुळे या महिलांना आता स्वतःच्या घरातच लपवून राहण्याची वेळ आली आहे...ही फक्त शारीरिक शोषणाची गोष्ट नाही तर ही आहे मानसिक जाळ्याची एक धक्कादायक कहाणी बहुतांश महिला त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात असताना भावनिक आधाराच्या शोधात असतात आणि नेमकं हाच कमकुवतपणा ओळखून खरात त्यांचा विश्वास जिंकत असे “तुम्ही खूप खास आहात” अशा गोड बोलण्याने तो महिलांच्या मनात स्वतःबद्दल विश्वास आणि आकर्षण निर्माण करत असे एकदा का हा विश्वास निर्माण झाला की तो ‘गुरू’च्या रूपात त्यांच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण मिळवत असे आणि मग ‘मन आणि शरीर शुद्धी’च्या नावाखाली त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे.....पीडित महिलांना आतून चुकीचे वाटते, पण लगेच मन दुसरीकडे वळते. इतके दिवस विश्वास ठेवला मग चुकीचे कसे असेल, हा अंतर्गत संघर्ष महिलांना अडकवून ठेवतो. संस्कार, आज्ञाधारकपणा, आवाज उठवण्यापासून रोखल्याने या पीडितांची मानसिक गुंतागुंत वाढलीये...कुटूंबाने पीडित महिलांना समजून घेणं आणि त्यांना धीर देणं महत्वाचं आहे...पीडित महिलांनी मन मोकळं करून बोल पाहिजे अस मत मनसोपचार तज्ञांनी व्यक्त केलाय.... नागरिकांनी देखील समाज भान राखणं गरजेचं आहे या व्हिडिओ बद्दल चर्चा करणे आणि हे व्हिडिओ व्हायरल करणे हे थांबवलं पाहिजे यामुळे अनेक महिलांना मानसिक त्रास होत असल्याचं मत डॉक्टर सोननिस दिलीये... बाईट- डॉ. हेमंत सोननिस .... मनसोपचार तज्ज्ञ GRX * *खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना मानसिक धक्का* * *८ ते ९ महिलांनी घेतली मानसोपचार तज्ज्ञांची मदत* * *व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने नैराश्य वाढले* * *‘गुरू’च्या नावाखाले भावनिक शोषण* * *पोलिसांकडून अज्ञात स्थळी चौकशी* vio/02 तज्ज्ञांच्या मते शोषण झालेल्या महिलांनी स्वतःला दोष देऊ नये ही चूक नाही, तर विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आहे, ही जाणीव स्वीकारणे ही सावरण्याची पहिली पायरी आहे आपल्या जवळच्या व्यक्तींचा आधार घ्या समुपदेशन घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे सहानुभूतीने पाहा...त्याच बरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कुठल्याही तक्रारदार महिलांनी टेन्शन घेऊ नये असं मत आणि अनिसच्या वतीने करण्यात येत आहे... अनिस तर्फे आम्ही या महिलांचे समुपदेशन करू आणि यासाठी एसआयटी आणि पोलिसांनी आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी देखील आणि सुरू करण्यात येते आहे.... बाईट-प्रा. आशा लांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष, नाशिक अंनिस vio/03 नाशिकमधील हे प्रकरण केवळ गुन्ह्याचं नाही तर समाजातील मानसिक आणि भावनिक शोषणाचं भीषण वास्तव दाखवणारं आहे... अनेक नागरिक महिलांच्या अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर बिनधास्त व्हायरल करताना दिसताय.. याबाबत 65 पेक्षा जास्त व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केलीये तर साडेतीन हजार पेक्षा जास्त लिंक पोलिसांनी डिलीट केले आहेत... मात्र तरीदेखील अनेक लोक ह्या अत्याचारांचे व्हायरल व्हिडिओ करणाऱ्यांना सदबुद्धी येवो हीच माफक अपेक्षा..
0
0
Report
Advertisement

भोंदू बाबा अशोक खरात पर लैंगिक अत्याचार: गर्भपात की दवाएं डॉक्टरों के साथ?

Nashik, Maharashtra:भोंदू बाबा अशोक खरात यांनी केलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत अनेक गंभीर बाबी समोर येत आहे....खरात ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता या महिलांना गर्भपात होण्यासाठी काही औषध गोळ्या देत असल्याची माहिती समोर आली आहे... याबाबत एसआयटी पथकाला सखोल चौकशी करताना अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत यात भोंदू बाबा अशोक खरात याला मदत करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी एसआयटी ने चौकशी केलीये.... भोंदू अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकातर्फे सोनोग्राफी सेंटरसह एक महिला व पुरुष डॉक्टरची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. खरातवर दाखल गुन्ह्यांपकी दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी ही तपासणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आता सुरू असून, याच गुन्ह्यात खरातला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत न्यायालयात सबळ पुरावे सादर करता येवो, या अनुशंगाने दोन दिवसांत ही तपासणी करण्यात आली. एसआयटी पथक खरातची पोलिस कोठडी वाढवून मिळावी यासाठी न्यायालयास विनंती करणार असून, खरातने पीडितेचा कुठे गर्भपात केला याचा तपास सुरू आहे. त्यामुळे सोनोग्राफी सेंटर तसेच डॉक्टरची केलेली चौकशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे... याबाबत देखील नाशिकच्या डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काही डॉक्टर आपल्या सामाजिक भान विसरून काही बाबाबुवांच्या नादी लागून चुकीचे काम करतात हे करणं चुकीचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या औषध दिली जातात त्यासाठी डॉक्टरने लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर च दिली जातात... आणि अशा प्रिस्क्रिप्शन कोणी गोळ्या औषध लिहून देत असेल तर ते साफ चुकीचं असल्याचं नाशिकच्या प्रसिद्ध असलेल्या स्त्री रोग तज्ञ मनीषा जगताप यांनी सांगितले... गोळ्या दिल्याने पेशंटला त्रास होऊ शकतो त्यामुळे हे करणं चुकीचं असल्याचं जगत डॉक्टर मनीषा यांनी म्हटले... अशा पद्धतीने आपल्या डॉक्टर पदवीचा गैरवापर कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटले.... बाईट- डॉ ..मनीषा जगताप स्त्री रोग तज्ञ भोंदू बाबा अशोक खरात यांनी मी देवताचा अवतार आहे आणि मी तुम्हाला सुख समृद्धी देऊ शकतो तुमचं जेवण सफल करतो असं म्हणून अनेक महिलांवर अत्याचार करत लैंगिक शोषण केला आहे... लैंगिक शोषण केल्यानंतर महिला जर गर्भवती झाली तर हाच भोंदू बाबा त्यांना गर्भपात होण्यासाठी काही गोळ्या औषध देत होता ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ज्या डॉक्टर अशोक खरातला अशा गोळ्या पुरवत होता अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करत त्या डॉक्टरांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन च्या वतीने करण्यात आली आहे.... बाईट- कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह अनिस.... काही डॉक्टर आपलं सामाजिक भान विसरून बुवाबाजीच्या नादी लागून अशा पद्धतीने भोंदू बाबांचा असाच साथ देत असेल तर डॉक्टरांना देव समजणारा रुग्ण हा कोणाकडे विश्वासाने पाहिल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे....ज्या डॉक्टरांनी भोंदू बाबा अशोक खरात याची साथ दिलीये त्या डॉक्टराची कसून चौकशी SIT ने केलीये... आता या चौकशी मधून काय निष्पन्न होईल हे पाहावं लागेल...
0
0
Report

सीबीडी विभाग ने 68.85 लाख रुपये का माल लौटाते हुए 17 मामलों में बरामदगी की

Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर परिमंडळ-२ अंतर्गत असलेल्या सीबीडी, नेरुळ, एनआरआय सागरी आणि विमानतळ पोलिस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावून परत मिळविलेला तब्बल ६८ लाख ८५ हजार रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल बेलापूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला. यात एकूण १७ गुन्हे आणि ३८ गहाळ प्रकरणांमधील एकूण ६८ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि मोबाईल संच मालकांना परत करण्यात आले. यात २४ तोळे ३४ ग्रॅम सोने आणि ५३० ग्रॅम चांदी. तसेच १ रिक्षा आणि १२ दुचाकी. त्याचप्रमाणे ३७ मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा समावेश आहे. नागरिकांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
0
0
Report

वाशीम के जिजाऊ सांस्कृतिक भवन की जल्द मरम्मत न होने पर आंदोलन की चेतावनी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेने 2003-04 मध्ये लाखो रुपये खर्चून जिजाऊ सांस्कृतिक भवन उभारले होते.मात्र, गेल्या आठ वर्षांपासून या भवनाची दुरवस्था झाली आहे.भवनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांना खाजगी सभागृहांचा आधार घ्यावा लागत आहे.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना छोटे-मोठे सामाजिक कार्यक्रम या भवनात आयोजित करणे कठीण झाले आहे. प्रशासनाकडून या सांस्कृतिक भवनाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून,तातडीने दुरुस्ती करून भवन पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.जिजाऊ सांस्कृतिक भवनाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय भीम टायगर सेनेकडून देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

ताडोबा-अंधारी प्रकल्प में रील बनाने पर चंद्रपुर के वारोरा विधायक करण देवतळे पर पांच हजार रुपये का जुर्माना

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात रील बनवणे पडले महागात, प्रकल्प प्रशासनाने देवतळेंना ठोठावला पाच हजारांचा दंड , नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडोबा प्रशासनाची कठोर कारवाई अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान रील बनवणे महागात पडले. प्रकल्प प्रशासनाने देवतळेंना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात भेद न करता कठोर कारवाई केली आहे. वन्यजीव संरक्षण आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मोबाईल वापरावर बंदी अत्यंत महत्त्वाची आहे. ताडोबाच्या सफारी दरम्यान कोअर आणि बफर क्षेत्रात जवळ मोबाईल बाळगण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या कठोर कारवाईचे स्वागत केले जात आहे.
0
0
Report

इंदोरी के तोलानी मॅरिटाइम इंस्टिट्यूट में बास्केटबॉल स्टैंड गिरने से छात्र की मौत

Varsoli, Maharashtra:इंदोरी के तोलानी मॅरिटाइम इंस्टिट्यूट में दुर्दैवी घटना; विद्यार्थी का अपघाती मृत्यु हुआ है. इंदोरी में तोलानी मॅरिटाइम इंस्टिट्यूट में अत्यंत दुर्दैवी घटना घडली है. विशाल वर्मा इस विद्यार्थी के डोक्यावर बास्केटबॉल स्टँड कोसळल्याने वह गंभीर घायल हुआ. घायल अवस्था में उसे तातडीने तळेगाव येथील मायमेर हॉस्पिटल में दाखल किया गया. मगर, उपचार शुरू होने से पहले ही उसका दुर्दैवी मृत्यु हुआ. इस घटना के बाद संस्थे के परिसर में विद्यार्थियों में भीतिए के वातावरण फैल गया है, सुरक्षा पर प्रश्नचिन्ह स्थापित हुए हैं. दौरान, घटना की जानकारी मिलते ही आंबी एमआईडीसी पॉलिस घटनास्थली दाखिल हुए हैं और पुढील तपास शुरू है.
0
0
Report

शालेय पोषण आहार के लिए आंदोलन: दादा भुसे के कार्यालय के बाहर महिलाओं का मोर्चा

Malegaon, Maharashtra:*पोषण आहार शिजवण्याऱ्या महिलांचा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर मोर्चा - भीक मांगो आंदोलन करत केला निषेध... - आठ महिन्यांपूर्वी आश्वासन देऊनही पूर्तता न केल्याने केले आंदोलन - जमा झालेले पैसे करणार शिक्षण विभागाला मनिऑर्डर गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार शिजवण्याऱ्या महिलांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यलायावर भीक मांगो आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज हा मोर्चा सुरू करण्यात आला संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे आयटकचे हिम्मत गवई यांच्यासह इतर प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत हे भीक मांगो आंदोलन करण्यात आले यावेळी मंत्री दादा भुसेच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन कर्त्याना येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न केला जर मोर्चा काढला तर साहेब फुली मारतील असे भुसेच्या महिला व इतर कार्यकर्त्यांनी सांगितले लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार असताना मंत्री महोदयांनी असा प्रकार करणे चुकीचे आहे असे मत सौ सोनवणे यांनी व्यक्त केले विशेष म्हणजे याआधीही आम्ही जून मध्ये मोर्चा काढला तेव्हाही मंत्री साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची भेट करून देऊ असे आश्वासन दिले होते मात्र 9 महिने उलटून गेले तरी काहीच कारवाई करण्यात आली नाही आताही आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे यानंतर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू व यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला. यावेळी महिलांनी गावातील लोकांकडून भीक जमा केली व ती शिक्षण विभागाला मनिऑर्डर करण्यात येईल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top