icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालेगाव में जल आपूर्ति बाधित, पाइप लाइन लीक के कारण आपूर्ति तुरंत बंद

Nashik, Maharashtra:पाणी पुरवठा विस्कळीत… पाणी गळती मुळे पाणी पुरवठा विस्कळीत.. मालेगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्र येथून येणाऱ्या १२०০ एम.एम. पाईप लाईन वर रात्री १:३० वाजेचे सुमारास मिलन हॉटेल जवळ पाणी गळती सुरु झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र येथून सुरु असणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे नियोजित असलेला पाणी पुरवठा सुरु करता येणे शक्य होणार नाही. पाईप लाईन दुरुस्ती करुन पाणी गळती बंद झालेनंतर पाणी पुरवठा सुरु करणेबाबत नियोजन करण्यात येईल. असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले.
0
0
Report

बोगस बीज से किसानों को दुबारा बोआई संकट, मांग तात्कालिक कार्रवाई और मुआवजा

Akola, Maharashtra:राज्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सभागृहात मांडत दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई, विक्रीवर बंदी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, तूर आणि कपाशीची बियाणे उगवली नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले. काही सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच बियाणे न उगवलेल्या शेतांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना कंपन्या आणि शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी अधिवेशनात लावून धरली आहे.
0
0
Report

डॉक्टर मारहाण मामले में शिवसेना शिंदे गट के नगरसेवक समेत पांच पर मामला दर्ज

Kalyan, Maharashtra:डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर गुन्हा दाखल, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल कुल्यम डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ तासानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक रमेश म्हात्रे, आणि त्यांच्या चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री रमेश म्हाठे आणि त्यांच्या समर्थकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि महिला नर्स यांना मारहाण केली होती, याचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते.
0
0
Report
Advertisement

भद्रावती तहसीलदार-नायब तहसीलदार के खिलाफ गंभीर आरोपों पर मामला दर्ज

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल तक्रारीनुसार, मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या मौजा कुरोडा येथील सर्वे क्रमांक ८६ व ८७ या शेतीचा फेरफार कोणताही स्थगिती आदेश नसतानाही करण्यात आला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी त्यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळेच पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप श्रीमती वंदना मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
0
0
Report

आंबोली घाट मार्ग पर बड़े पत्थर गिरे, दुर्घटना टली, यातायात बहाल

Oras Bk., Maharashtra:आंबोली घाटमार्गात भले मोठे दगड कोसळले रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच घडला प्रकार सुदैवाने जीवितहानी टळली : एक मार्गी वाहतूक सुरू सिंधुदुर्ग ---- आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरु होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवाने त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असल्याने दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

देहू की वारी में नन्ही बच्ची ने काठवट वाडा से परंपरा जिंदा रखी

Varsoli, Maharashtra:देहूच्या पालखी सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या वारीत सहभागी होत असतो. मात्र यंदा देहू नगरीत एका चिमुकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोबाईलच्या युगात हरवत चाललेले पारंपरिक 'काठवट वाडा' हे खेळणे ती अगदी उत्साहाने खेळताना दिसली. विशेष म्हणजे, हा खेळ तिला तिच्या आजीकडून शिकायला मिळाला आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा अशाच प्रकारे जतन होत असल्याचे हे सुंदर चित्र देहूच्या वारीत पाहायला मिळाले. भक्तीबरोबरच संस्कार आणि लोकपरंपरा जपणारी ही चिमुकली सध्या भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
0
0
Report

तुकोब की पालखी के सामने मुस्लिम मुलानी परिवार का ताशा वादन प्रेरणादायक परंपरा

Varsoli, Maharashtra:Head line: तुकोबांच्या पालखीत मुस्लिम मुलाणी कुटुंबाचा मान ताशाच्या तालातून सर्वधर्मसमभावाचा संदेश Anchor : संतीं चा वार ? भक्तीची परंपरा ? आणि सर्वधर्मसमभावाचा जिवंत संदेश! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जातात. त्यापैकीच एक अनोखी परंपरा म्हणजे पालखीसमोर ताशा वाजविण्याचा मान मुस्लिम मुलाणी कुटुंबाकडे आहे. तब्बल चार पिढ्यांपासून हे कुटुंब ताशाच्या दमदार तालातून तुकोबांची सेवा करत आहे. पालखीच्या अग्रभागी नगारा आणि चौघड्याच्या निनादात ताशाचा दणदणाट घुमत राहतो आणि त्याच तालावर भक्तीचा सोहळा अधिकच रंगतो. धर्माच्या सीमा ओलांडून सेवाभाव आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या मुलाणी कुटुंबाची ही परंपरा वारीतील सर्वधर्मसमभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त करत, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार मुलाणी कुटुं Barked.
0
0
Report
Advertisement

नदी में डूबे दो युवक; एक की मौत, दूसरा खोज जारी CCTV में कैद

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला असून दुसऱ्याचा मृत्यू झालाय. मयत तरुणाचे नाव सुमित पवार असे आहे तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे असे आहे. सुमित पवार, नयन म्हातार्े आणि इतर आठ जण हे वाघाची वाडी नदी, धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते. नदीपात्रात नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे भवऱ्यात अडकला. यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले. यावेळी त्याच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. तर वाहून गेलेल्या नयन म्हात्रे याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.
0
0
Report
Advertisement

तेज़ मॉनसून से टमाटर और मिर्च की फसल को खतरा, किसान चिंतित

Niphad, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, कोटमगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, त्यामुळे टोमॅटो आणि मिरची पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो व मिरची ही पिके कमी पाण्यावर चांगली येणारी असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळे कुजणे, रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लागवड केली असून, मुसळधार पावसामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टोमॅटो व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
0
0
Report

लासलगांव क्षेत्र में भारी बारिश ने फसलें और जल संचय को दी राहत

Lasalgaon, Maharashtra:Anchor:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे या दमदार पावसामुळे लासलगावजवळील कोटमगाव येथील मानवनिर्मित तलाव शंभर टक्के भरला आहे कोटमगाव रेल्वे पुलाखालून शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गाढवे नाल्यात आल्याने काही काळ पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या पाण्याच्या ओघामुळे मानवनिर्मित तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top