icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम: खरीफ कर्ज वितरण में देरी से किसान नाराज, एकर के बदले नकद मांग

Washim, Maharashtra:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यात पीक कर्ज वितरणास सुरुवात झाली असली, तरी प्रक्रियेतील अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र, बँकांकडून दररोज केवळ 30 हजार रुपयेच वितरित केले जात असल्याने उर्वरित रक्कमेसाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. कडक उन्हात ही धावपळ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीपासाठी एकरकमी रक्कम आवश्यक असताना टप्प्याटप्प्याने कर्ज मिळत असल्याने नियोजन बिघडत असून शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. हीच पद्धत 30 तारखेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे अडचणी कायम राहणार असल्यामुळे एकरकमी रोख देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
0
0
Report

शिरूर में चिमಣಿ संवर्धन अभियान: छात्रों ने घरटों में चिमणियां आश्रय बनाकर जागरूकता फैलायी

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या वाढलेल्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संवर्धन व्हावे व त्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय. शिरूर तालुका पर्यावरण मंडळाच्या माध्यमातून “चिमणी संवर्धन अभियान” अंतर्गत हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हस्ते चिमण्यांसाठी घरटी तयार केली. तयार केलेली ही घरटी शाळेच्या परिसरातील झाडांवर तसेच इमारतीच्या विविध ठिकाणी बसवण्यात आली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात चिमण्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांन चिमण्यांचे महत्त्व, त्यांचे घटते प्रमाण आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज याबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होत असून समाजातही सकारात्मक संदेश जात आहे.
0
0
Report
Advertisement

शिंदे की शिवसेना में नगरसेवक चयन पर बवाल, उपमहापौर के विरोध में प्रदर्शन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेतला वाद संपता संपत नाही असे चित्र आहे, गेल्या आठवड्यात श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीतही बराच वाद झाला होता, त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकावरन पुन्हा शिवसेनेत वाद पेटला आहे. शिंदेंच्या कोट्यातून एकच स्वीकृत नगरसेवक होणार होता, तो झाला मात्र नाराज झालेल्या उमेदवारांना थेट उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात आंदोलनाचा हत्यार उपसला; आंदोलन करत त्यांच्या फोटोला जोडे मारले. राजेंद्र जंजाळ यांनी पक्षपात केला जातिवाद केला आणि आम्हाला डावल्याचा आरोप आहे आणि त्यानुसार त्यांनी क्रांती चौकात जंजाळ आणि शिवसेना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुळात नाराज कार्यकर्ता पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा निकटवर्तीय असल्याचा सांगण्यात येतंय, त्यामुळे राजेंद्र जंजाळ यांनी या आंदोलनामागे पालकमंत्री तर नाही ना असं नाव न घेता टोला लगावलाय. दोन आठवड्यांपूर्वी संभाजीनगर मध्ये शिवसेनेची बैठक झाली होती, श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक सर्व नेत्यांची बैठक घेतली होती त्यातही धुसफूस दिसली होती; त्यानंतर त्यांनी कान उघडणी केली आणि वाद संपेल असं वाटत होतं, मात्र अजूनही ही अंतर्गत धुसफूस सुरू आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेला वादाचा जबर फटका बसलाय, ही धुसफुुस उर्वरित शिवसेना ही धुळीस मिळवेल अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे, त्यामुळे या धुसफुशीला वेळीच रोखण्याची गरज व्यक्त होतेय.
0
0
Report

कल्याण स्टेशन पर लोकल ट्रेन 15–20 मिनट देर से, यात्रियों में भारी जाम और नाराज़गी

Kalyan, Maharashtra:मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरा असल्याने कल्याणच्या रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आजही पंधरा ते वीस मिनिटं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिरा ना धावत असल्याने नागरिकांचा संताप काल डोंबिवली मध्ये लोकल ट्रक वरून लोकल ट्रेन चा डब्बा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती तर आज देखील सकाळपासूनच पंधरा ते वीस मिनिटं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत असल्याने नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
0
0
Report

सोलापुर में AI से IT छात्रों को भ्रष्ट प्रमाणपत्र: पुलिस एक्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर मार्गाने प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा - सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटी कंपन्यामधील मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई - कंपनीचा सूत्रधार अशपाक अत्तारसह आठ जणांवर गुन्हा दाखल - सोलापुरात अशपाक अत्तारने सासऱ्याच्या घराला ऑफिस बनवून रिमोट शेअरद्वारे चालवत होता रॅकेट - एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत लाखो रुपये उकळल्याचा अंदाज - अशपाकच्या कंपनीचे फ्रान्स, अमेरिकेपर्यंत कनेक्शन असण्याचा पोलिसांना संशय - सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरु असून आणखी नवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय बाईट - श्रीशैल गजा ( पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा, सोलापूर शहर )
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में लड़कियों की बिक्री, ऑडियो क्लिप से BJP नेता का नया खुलासा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील मुलींच्या विक्री प्रकरणाला दुजोरा देणारी दुसरी ऑडिओ क्लिप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी पुढे आणली आहे. पहिल्या ऑडिओ क्लिप मध्ये जी मुलगी मुलींच्या विक्री रॅकेट बाबत बोलत होती मात्र पोलीस तपासात सहकार्य करीत नव्हती त्याच मुलीच्या या मोबाईल संभाषणाच्या क्लिप मध्ये तिने मुलींची बनावट आधारकार्ड द्वारे होत असल्याची कबुली दिली आहे. या रॅकेट मध्ये अनेक जन सहभागी असल्याचे ती सांगत असून बऱ्याच एंजट ची नावे आणि मुलीचे फोटो तिने मोबाईल मधून डिलीट केल्याचे तिने सांगितलं. त्यामुळे मुलींच्या विक्री प्रकरणाची तांत्रिक दृष्ट्या तपासणी करून त्या मुलीची चौकशी करण्याची मागणी भाजप ने केली आहे.
0
0
Report

जालना बैंक घोटाळे-23 करोड़ 33 लाख लोन घोटाळ्यात 5 आरोपी गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना : मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव बैंक घोटाळा प्रकरण अपडेट ( पॅकेज) मुख्य आरोपीचे दलाल म्हणून काम करणाऱ्या आणखी 3 आरोपींना अटक,आता पर्यत 5 आरोपींना अटक आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बॅंकेतील घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी हा स्पेशल रिपोर्ट. जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँकेला तब्बल 23 कोटी 33 लाखांचे ऋण उचलण्यात आल्याचे तथ्य, वेअरहाऊसमध्ये शेतीमाल उपलब्ध नसताना दाखवून ही फसवणूक केल्याची माहिती; या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला, आतापर्यंत मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केलीय. रायचंद कुरंगळ याचे दलाल म्हणून काम करणाऱ्या आणखी तिघांना अटक; रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे अशी तिघांची नावे. न्यायालयासमोर हजर केल्यावर 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. आतापर्यंत पोलिसांनी मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बॅंकेतील 23 कोटी 33 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणात 5 जणांना अटक केलीय. आता बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाच्या दृष्टीने तपास सुरू; कोणत्या मोहऱ्यांचा सहभाग आहे अंतीम तपासाआंती स्पष्ट होईल.
0
0
Report

कोकण किनार पर अगले तीन दिन भारी बारिश: येलो अलर्ट, किसान चिंतित

Oras Bk., Maharashtra:कोकण किनारपट्टीला पुढील तीन दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. तळकोकणात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे चिंतेत असलेले आंबा बागायदार या अवकाळी पावसामुळे चिन्ताग्रस्त झालेत. कोकणात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलय.
0
0
Report
Advertisement

लातूर चाकूर में पती के संबंधों के बदले पुतने की हत्या: अनिता स्वामी गिरफ्तार

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज चाकूरमध्ये पतीचे कथित अनैतिक संबंधांवरून सूड घेऊन पुतण्याचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। त्यानुसार आरोपी अनिता स्वामी हिला अटक केली गेली आहे आणि तपासात या गुन्ह्यामागचा थरारक कट स्पष्ट झाला आहे। चाकूरमध्ये दोन चिमुकली मुलं बेपत्ता झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली; सात वर्षाचा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते, परंतु वेळ झाल्यानंतर ते परत न आले. पोलिसांनी तात्काळ बेपत्त्या तक्रार नोंदवली आणि शोधमोहीम सुरू केली. परिसरात शोध सुरू असतानाच देवांशचा मृतदेह उजळबं रोडवरील एका पडक्या वाड्याजवळ ट्रॅक्टरच्या टायरांच्या आडोशाला आढळला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. तपासादरम्यान घरातीलच एका व्यक्तीची साक्ष संशयाच्या भोवऱ्यात आली; फिर्यादीची वहिनी अनिता स्वामी हिच्या वर्तनामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. मोबाईल फिशिंग, काही काळ घराबाहेर आणि चौकशीत विसंगत माहिती याअधारे तपास पुढे नेण्यात आला आणि या तपासातून एक धक्कादायक सत्य समोर आले: अनिता स्वामीनेच संपूर्ण कट रचल्याचं स्पष्ट झालं, पतीच्या कथित अनैतिक संबंधांवरून निर्माण झालेल्या वादातून तिने पुतण्याचा अपहरणाचा बनाव करून निर्दयतेने खून केला, आणि दुसऱ्या महिलेवर आरोप फुकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा कट उघड झाला; आरोपी अनिता स्वामीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेत एका निष्पाप मुलाचा जीव गेला आणि नात्यांवरील विश्वासाला धक्का लागला.
0
0
Report

पवनी में कुलर में पानी भरते समय बिजली का झटका: लिपिक मोहित हटवार की दर्दनाक मौत

Bhandara, Maharashtra:कूलर मध्ये पाणी घालताना विजेच्या धक्क्याने पवनी येथील पंचायत समिती लिपिकाचा दुर्दैवी मृत्यू पवनी येथील तरुणाचा कुलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत झाल्याची घटना घडली आहे या घटनेत २६ वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पवनी येथील भाईतलाव वार्ड येथे घडली आहे. मृत तरुण पवनी पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत होता. मोहित घरात असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकत होते. यावेळी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी आणि आई-वडील असा आप्तपरिवार आहे. ऐन तरुण वयात एका कर्तव्यदक्ष लिपिकाचा असा अंत झाल्याने पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

सांगली में सरकारी कर्मचारियों की बेमुदत हड़ताल, 18 मांगों पर सरकार से जवाब मांग

Sangli, Maharashtra:स्लग - विविध प्रलंबित मागण्याांसाठी सांगलीत शासकीय-निमशासकीय कर्मचारयांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.. अँकर - राज्य सरकारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी बेमूदत संपावर गेले आहेत. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केला आहे. सुधारणीत राष्ट्रीय पेन्शन योजना तातडीने लागू करावी, निवृत्तीचे वय 60 करण्यात यावे, केरळच्या धर्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्यावा, राज्यातील कर्मचाऱ्यांचे रिक्त असणारी पदे भरण्यात यावेत, विविध 18 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून जोपर्यंत मागण्यांच्या बाबतीत सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत नाही,तो पर्यंत आंदोलन सुरूचं राहील,असे इशारा यावेळी देण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय,निमशासकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top