icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिंदे गुट की गुंडागिरी पर सवाल, सुरक्षा की मांग तेज

Shirdi, Maharashtra:माझ्या डोळ्यादेखत माझ्या मुलाची निर्घुण हत्या.. माझ्यावर ओढवलेल्या दुःखात श्रीरामपूरकरांनी माझी खूप मदत केली.. अशी घटना परत घडली नाही पाहिजे.. माझ्या कुटुं布ाला आता संरक्षणाची गरज... मुलगा वारल्यावर बापाची अवस्था काय होते हे ज्यांचा मुलगा वारला त्या बापाला विचारा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा वारला आहे , त्यांना विचारा बापाचं दुःख काय असतं... शिंदे गटाच्या माजी आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना माझा प्रश्न , अश्या खुनी लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात कसे ठेवता... एकनाथ शिंदे यांचे राज्यात खूप चांगलं काम मात्र या लोकांची गुंडगिरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची तुमची जबाबदारी... शिंदेच्या शिवसेनेत असणाऱ्या या गुंडाचा एन्काऊंटर करा , हद्दपार करा आणि पक्षातून काढून टाका... शिंदे गटात असलेल्या सागर बेगवर नाव न घेता निशाणा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मयत आकाश दुबैया याच्या वडिलांची आर्त हाक...
0
0
Report

कर्जमाफी के नए फैसले पर किसान सभाओं की आलोचना, 2 लाख रुपये प्रोत्साहन की मांग

Shirdi, Maharashtra:राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किसान संघाच्या वतीने सत्कार होत आहे. भाजपशी संलग्न असलेल्या किसान संघाकडून हा गौरव करण्यात येत असतानाच, दुसरीकडे किसान सभेने सरकारवर टीका केली आहे. मागील कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा कर्जमाफी देण्याचा निर्णय हा पहिल्यांदाच घेतल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचा दावा किसान सभेने केला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याचे सांगत, ही रक्कम किमान दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी केलीय...
0
0
Report

चंद्रपुर में वेतन के गुस्से ने ट्रक को सिलिंडर से भर कर चुरा लिया

Chandrapur, Maharashtra:१८ हजारांच्या थकीत पगाराचा संताप, चंद्रपुरात ट्रक चालकाने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवला, २४ तासांत पोलिसांचा मोठा उलगडा, 2 आरोपी अटकेत, 1 फरार अँकर : मेहनतीचा घाम गाळूनही वेळेवर पगार न मिळाल्यास एखादा कर्मचारी किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण चंद्रपुरात समोर आलं आहे. पत्नीच्या बाळंतपणासाठी खर्च म्हणून आवश्यक असलेली १८ हजार रुपयांचे थकीत वेतनाची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवून नेला. एवढंच नाही, तर ट्रकमधील गॅस सिलिंडर विकून मालकाला आर्थिक फटका देण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलीस तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा करत राजेंद्र काळे आणि कुणाल घुरुडे या चंद्रपुरात राहणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. चोरीला गेलेले 342 गॅस सिलिंडर, विक्रीतून मिळालेली लाखो रुपयांची रोकड आणि ट्रक जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील सिलिंडर विकत घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा येथील मोहित पोद्दार नामक आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मेहनतीचा मोबदला वेळेवर न मिळाल्याने निर्माण झालेला संताप आणि त्यातून घडलेला हा गुन्हा सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में 1135 बोगस सोयाबीन बीज से किसानों को नुकसान, बारिश नहीं

Washim, Maharashtra:वाशीम:\n\nअँकर:वाशीम जिल्ह्यात 1135 वाणाच्या बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तामसी येथील शेतकरी अर्जुन कव्हर यांनी 26 जून रोजी केलीली पेरणी उगवली नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पाऊसाने खंड दिल्याने दुबार पेरणीनंतरही पीक उगवण्याची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वारंवार पेरणीमुळे बियाणे, मशागत आणि मजुरीचा वाढलेला खर्च शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे.
0
0
Report

खेड में पूल बहने से एसटी बस सेवा बंद, छात्र पैदल 5–10 किमी

Shirur, Maharashtra:खेड/पुणे अतिवृष्टीने वेताळे ओढ्यातला पूल वाहून गेला असून उर्वरित पूलही धोकादायक ठरला आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली आहे। धोकादायक पूलामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद ठेवली आहे। अनेक विद्यार्थ्यांना दररोज पाच ते दहा किलोमीटर पायी चालत शाळा- महाविद्यालय गाठावे लागत आहे। शेतकऱ्यांनाही शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। आजारी नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती महिलांनाही अडचण. एकीकडे धोकादायक पूल दुसरीकडे बंद एसटी सेवा, नागरिक विद्यार्थी अडकले।
0
0
Report
Advertisement

मीरा रोड पर स्कूल इमारत के टॉप फ्लोर में आग, दमकल ने जल्दी नियंत्रण पाया

Vasai-Virar, Maharashtra:एन.एल. डालमिया शाळेच्या इमारतीच्या टॉप फ्लोअरला आग सुदैवाने जीवितहानी टळली मीरा रोड येथील हरे कृष्णा मंदिराजवळ शाळेच्या इमारतीच्या टॉप फ्लोअरला बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी वेगाने कारवाई करत अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कूलिंगचे काम सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. प्राथमिकल माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे. सुदैवाने ही घटना शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या टॉप फ्लोअरवरील काही भागाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, नुकसानाचे नेमके स्वरूप आणि कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
0
0
Report

अनसिंग–रामनगर तांडा मार्ग पर पुल व सड़क निर्माण की मांग, उपवास तीसरे दिन जारी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील अनसिंगजवळील रामनगर तांड्यातील ग्रामस्थांनी पक्का रस्ता आणि पुलाच्या बांधकामाच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.अनसिंग–रामनगर तांडा मार्गावरील तुटलेला पूल व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची त्यांची मागणी आहे. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे,रुग्णवाहिकेला तांड्यापर्यंत पोहोचणे आणि पावसाळ्यात वाहतूक करणे अत्यंत कठीण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी सांगितले.मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

चेंबूर में पेड़ गिरने से 11 वर्षीय छात्र की मौत, जाँच की मांग तेज

Mumbai, Maharashtra:चेंबूर मध्ये झाड कोसळून ११ वर्षीय विधान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याचा चौकशी अहवाल सादर झाला असून यात पालिका अधिकाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. यावर जोरदार टीका होत आहे. विहानच्या कुटुंबाने आम्ही या अहवालामुळे दुःखी आहोत, पुन्हा इतर संस्था आणि तज्ञांची कमिटी बनवून याची चौकशी व्हायला हवी, भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी आमची ही मागणी आहे. आम्ही प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष देत आहोत. त्यांनी चौकशी पुन्हा केली नाही तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय नाही. अशी भावना व्यक्त केली आहे. तर त्यांच्या शेजारी आणि स्थानिक आमदार तुकाराम काते आणि नगरसेविका समृद्धी काते यांनी ही या चौकशी अहवाल बाबत नाराजी व्यक्त केली असून आपण श्रीवास्तव कुटुंबाचा मागे उभे आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
0
0
Report

संविधान बचाने के लिए कांग्रेस का आह्वान; राम मंदिर और धर्म के मुद्दे तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले, काँग्रेस नेते बाईट - भाजप विशेष करून जे सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने आरएसएस चालवत आहे त्यांना संविधान मान्य नाही संविधान त्यांना मान्य नाही तर डेलीमिटेशन संविधानिक व्यवस्थेच्या ठाच्याला ते संपवायला निघाले त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकतीने संविधानाच्या बाजूने उभा राहील ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आमचे नेते राहुल गांधीांनी ती भूमिका स्पष्ट केली आहे ....आमचा प्रयत्न आहे की आमचे इंडिया अलाईनचे जेवढे लोक आहे त्यांना हे कळते कळत नसेल असं नाही त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सर्व पक्षाने एकत्रित यावं ही भूमिका आमची आहे राम मंदिर असेल त्यातली चोरी असेल देशभरातील हिंदूच्या देवळातले असे अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदू धर्माच्या लोकांना त्यांची दिशाभूल करण्याची प्रयत्न सुरू आहे त्यांच्या परिश्रमाचे पैसे लुटले जात आहे ज्या आरएसएसला भाजपला संविधान मान्य नाही ते दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे ... नाही ऐकलं तर ईडी सीबीआय याचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे हे सगळ्यांना दिसत आहे अंतर्मनातली जी भावना असते ती प्रत्येक व्यक्तीला आपलं देणं लागतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून देन लागतात ज्या संविधानामुळे तुम्ही आमदार खासदार झाला मंत्री झाला ते संविधानाच नसेल तुम्हाला आमदार खासदार काय ग्रामपंचायत मेंबर सुद्धा होता येणार नाही एवढा आम्ही म्हणू शकतो आणि तीच आमची भूमिका आहे (ऑन जयंत पाटील ,मुख्यमंत्री भेट -) मला असं वाटत नाही मी विधानसभेत त्यांना विचारलं जयंत पाटील यांनी सांगितले की असं काही नाही (ऑन शिंदे दिल्ली दौरा-) महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फूट झाले तेव्हा त्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिली आहे त्यावर अजूनही निर्णय झाला नाही कायदेशीर बाबी तुम्ही त्याला म्हणता आहे पक्ष विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्यावर कारवाई करता आली असती पण त्यावर का पडदा घातला ते कळत नाही... सुप्रीम कोर्टाची बाब आहे आमदार आणि खासदार पळून गेले नसते (ऑन राम रक्षा- ) देशातील सर्वसामान्य लोकांनी अयोध्येतील मंदिराच्या घटनेचा निषेध केला आहे आरएसएसचे लोक भाजपचे लोक त्या ठिकाणी बसून त्यांनी दानपेटीच लुटली हे खतरनाक लोक समोर आले आहे... त्यामुळे यांचा निषेध केला पाहिजे यासाठी राम रक्षा पठण केला जात आहे राम हे आमचं दैवत आहे या पापी लोकांना यांच्या भावना लोकांच्या भावना श्रद्धा यांना ठेच पोहोचवली ..घामाचा पैसा यांनी लुटला त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम देशपातळीवर सुरू झाली आहे (ऑन कॉंग्रेस जागरण -) काँग्रेस सुद्धा जागरण यात्रा काढत आहे ती काढलीच पाहिजे कारण हा धर्माचा आणि आस्थेचा प्रश्न आहे , ज्याप्रमाणे हिंदूंच्या मंदिरात लूट आरएसएस आणि भाजपने सुरू केली आहे त्या विरोधात सगळ्या हिंदू धर्मांनी एकत्रित आले पाहिजे असा मला वाटतं ऑन आरएसएस भूमिका - त्यामध्ये संघ इन्व्हाल्ड आहे त्यांनी काय भूमिका घेतली हे महत्त्वाचा नाही एवढ्या दिवसांनी त्यांना जाग आली त्या ठिकाणी सगळे आरएसएसचे पदाधिकारी आहे वीस पंचवीस दिवसानंतर त्यांनी निषेध केला.. ते चालणार नाही त्यांनी रजिस्टर केलं पाहिजे त्या व्यवस्थेला चारिटी म्हणून रजिस्टर झाला पाहिजे ते संघ रजिस्टर का करत नाही त्याला आता शंभर वर्ष पूर्ण झाली आहे त्यांनी रजिस्ट्रेशन का नाही केलं जनतेच्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही या सगळ्या घटना पुढे आले आहे अमित शहा आणि मोदी यावर बोलणारच नाही कारण त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काही नाही उलटा चोर कोतवाल को दाटे असा चित्र तयार झाला आहे (ऑन सुप्रिया - ) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि काँग्रेसने त्याला प्राधान्य दिला आहे 31 टक्के आरक्षण महिलांना विधानसभेमध्ये द्यावं त्यासाठी कायदा पारित केला घटना दुरुस्ती केली ते आमच्या सरकारने 2024 मध्ये घटनादुरुस्ती केली तेव्हा त्याला दुरुस्ती केली नाही अनेक महिला खासदार आमदार सत्तेमध्ये पाहता आले असते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये केला आहे हळुवारपणे त्याला 50% करता आला असता पण तो केला नाही पण तो करत नसेल तर त्याबद्दलची भूमिका त्यांना स्पष्ट करावं लागेल त्यांना महिलांना टार्गेट करायचं नाही न्याय द्यायचा नाही महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल 3500 कोटी रुपये कोणाला दिले तेच दिसत नाही बहिणीच्या नावाने राज्याचे तिजोरी लुटली ते सुद्धा आता काल-परवा लक्षात आलं महिलांना पुढे करायचं मग आरएसएस मध्ये महिलांना स्थान का नाही महिलांचं त्यांना काही देणं घेणं नाही हे त्यांचा धोरण आहे (ऑन अर्थखात -) सरकारचा भाग आहे त्यांनी काय काय करावे त्यांनी कोणाला मारामारी करावी त्यांचा भाग आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे विधानसभेमध्ये भांडतात आणि नंतर सख्खे भाऊ दाखवतात पण खरी गोष्ट ही आहे की त्यांच्यामध्ये तीन तिघाडा काम बिघडा झाले आहे महिलांसाठी योजना करण्या पेक्षा त्यांची जेजुरी कशी लुटता येईल यासाठी काम सुरू आहे (ऑन फडणवीस दिल्ली जाणार का?- ) फडणवीस, बावनकुळे यांना मोठे संधी भेटते आहे विदर्भात जर मोठे पद राहत असेल तर कोणाला आनंद होणार नाही माझा काय सल्ला असणार दोन्ही आमचे मित्र आहे दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहे
0
0
Report
Advertisement

विठूर दर्शन में शॉर्टकट बंद, VIP दर्शन पर नियंत्रण, दो नायब तहसीलदार नियुक्त

Pandharpur, Maharashtra:विठोबाच्या शॉर्टकट दर्शनाला आता लागला ब्रेक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निघाला आदेश विठू रायाची आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची गर्दी पंढरपूरमध्ये वाढत आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना जलद आणि सुलभ दर्शन होण्यासाठी आता घटनात्मक पदावरील व्यक्ती वगळता इतर कोणालाही दर्शनाला सोडले जाणार नाही. शॉर्ट कट दर्शन बंद झाल्याने वारकऱ्याना आता जास्त वेळ दर्शन रांगेत ताटकळत बसावे लागणार नाही. जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांच्या आदेशानंतर आता प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी व्हीआयपी दर्शन वर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन नायब तहसीलदार यांची नियुक्ती केली आहे.
0
0
Report

जूहू समुद्रकिनारे कचरा: विपक्ष पालिका पर सवाल, एकजुट होकर सफाई की मांग

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक चित्र समोर आलं आहे. नाले वेळेत साफ न केल्याचा फटका थेट समुद्राला बसल्याचा आरोप होत आहे. निळाशार समुद्र काळवंडला असून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचल्याचा दावा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज जुहू समुद्रकिनाऱ्याची पाहणी करत महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. मुंबईची शान मानला जाणारा जुहू समुद्रकिनारा सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. नाल्यांतील कचरा वेळेत साफ न केल्यामुळे तो थेट समुद्रात वाहून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी काळवंडले असून किनाऱ्यावर तीन ते तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जुहू समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी महापालिकेच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली. मुंबई महापालिकेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पेडणेकर यांनी स्वच्छतेसाठी मोठा निधी खर्च होत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात कर्मचारी दिसत नसल्याचा आरोप केला. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे मुंबईकरांना प्रदूषित समुद्र आणि अस्वच्छ किनाऱ्यांचा सामना करावा लागत असल्याचाही त्यांनी आरोप केला. राजकारण बाजूला ठेवून मुंबईच्या स्वच्छतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं सांगत, केवळ फोटो आणि रील्स नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या आरोपांवर महापालिका किंवा सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जुहू समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे मुंबईच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, आता प्रशासन यावर काय पावलं उचलतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report

भूम दूध भेसळ मामला: छह महीनों में 23 करोड़ 470 हजार लीटर मिलावटी दूध

Dharashiv, Maharashtra:भूम दूध भेसळ प्रकरणात महाधक्कादायक खुलासा! सहा महिन्यांत 23 कोटी 4 लाख 70 हजार लिटर भेसळयुक्त दूध विक्रीचा संशय. या प्रकरणामुळे खव्याचे क्लस्टर उद्ध्वस्त होण्याची भीती...... अँकर भूममधील दूध भेसळ प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सहा महिन्यांत 23 कोटी 4 लाख 70 हजार लिटर भेसळयुक्त दूध विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट... श्रीगणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक, भूम भेसळ केलेल्या दुधात फॅटचे प्रमाण टिकवण्यासाठी निकृष्ट दर्जाची दूध पावडर, पाम तेल आणि निरमा वापरल्याचा संशय आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा दुधामुळे मूत्रपिंड, यकृत आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. तपासात हा गोरखधंदा गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचेही समोर आले आहे. भूममधील दूध भेसळ प्रकरणाने राज्यभरातील दूध सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top