icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण में डंपिंग साइट पर फिर आग, दमकल के चार वाहन आग बुझाने में जुटे

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा एकदा आग लागलीय. कल्याण पश्चिमेच्या बारवे गावाच्या परिसरात हाच कचरा प्रकल्प आहे. याआधी ४ दिवसापूर्वी कल्याण मधील आधारवाडी डम्पिंगला आग लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या बारवे कचरा प्रकल्पाला आग लागलीय. आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांकडून ही आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या तरी स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.
0
0
Report

कोंढवा में हिंदुओं के खिलाफ विवादित बयान और हिंदू राष्ट्र की चर्चा

Oras Bk., Maharashtra:ऑन कोंढवा ( कराची ) — कोंढव्यामध्ये दुर्बिण घेऊन हिंदूंना शोधावं लागत. ह्या लोकांना आमचं हिंदू राष्ट्र 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीने जे भागांवर ह्यांच लक्ष आहे त्यात कोंढवा आहे. आमच्या भाजपा पदाधिकाऱ्याने जे काही म्हटलं आहे ते चुकीचं नाही. सगळ हिरव करण्याचा हिरव्या सापांचा प्रयत्न आहे. ते सत्य सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्याने केलाय त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ऑन राज ठाकरे शिवीगाळ ( परप्रांतीय ) ---- प्रत्येक नेत्याला मान असतो त्यामुळे नेत्याला शिवीगाळ करण चुकीच आहे. ऑन नाना पटोले ( फडणवीस टीका ) --- मराठी भाषेचा आग्रह झाला पाहिजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. मराठी भाषेचा आग्रह करत असताना हिंसा कशाला ? हिंसा फक्त हिंदूंवर का ? कधी महम्मद अली रोड, नल बाजार, मालेगाव, भिवंडी, नया नगर या ठिकाणी हिंसेची भाषा करून दाखवा ना आणि मग बघा हिरवे साप कसे वळवळतात नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका समजलेली नाही त्यांनी अवेळी तोंड उघडू नये ऑन अबू आझमी ( मराठी शक्ती विरोध ) ---- आम्ही मराठी शाळा सुरू करू, शिक्षक भरती करू पण तुमचे जे काही गोल टोपी दाढीवाले आहेत. त्यांना थोड मराठी शिकवा उद्याची अजाण मराठीत करा. मदरसा मध्ये मराठी शिकवा मराठी शाळा आम्ही निश्चितपणे सुरळीत करू पण तुम्ही मदरशांमध्ये मराठी शिकवण सुरू करा
0
0
Report
Advertisement

वर्धा अस्पताल में सुरक्षा गार्ड पर हमला, वीडियो वायरल हो गया

Wardha, Maharashtra:वर्ध्यात रुग्णालयात सुरक्षा रक्षकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल अँकर- वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला वार्डात 28 एप्रिलच्या मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला. रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
0
0
Report

रांजणगाव के महागणपति की चंदन लेप से सजावट, मंदिर 31 जुलाई तक बंद

Shirur, Maharashtra:आज १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन! या दुहेरी मुहूर्तावर राजभरात उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे आध्यात्मिक नगरीतही एक विशेष सोहळा संपन्न झाला आहे. आज वैशाखी पौर्णिमा. उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि ग्रीष्म ऋतूचा दाह कमी व्हावा, या भावनेतून शिरूरमधील श्री महागणपतीला दरवर्षीप्रमाणे यंदाही 'चंदन लेप' लावण्यात आला आहे. शालिवाहन शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सरातील या पवित्र दिवशी बाप्पाचे हे रूप अत्यंत लोभस आणि शीतल दिसत आहे. "गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली जात आहे. वाढत्या तापमानापासून बाप्पाला थंडावा मिळावा, यासाठी संपूर्ण मूर्तीला चंदनाचा उटी लावून सजवण्यात आले. यावेळी बाप्पाची महापूजा देखील करण्यात आली.यावेळी बाप्पाचे रूप मनमोहक असेच दिसत होते मात्र यंदा बाप्पाचे विलोभनीय रूप भाविकांना पाहता आले नाही कारण विकास कामामुळे 31 जुलै पर्यंत अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर बंद ठेवण्यात आलंय..
0
0
Report

नाशिक के बागलाण में भीषण गर्मी से फार्म हाउस की 500 से अधिक मुर्गियां मर गईं

Nashik, Maharashtra:- नाशिकच्या बागलाणमध्ये उष्णतेने दगावल्या सहाशेच्यावर कोंबड्या... नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासन येथील युवा शेतकरी निलेश कोर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुकूटपालन व्यवसाय सुरू केला आहे... शेतात सहा हजार कोंबड्यांचा फार्म हाऊस तयार केला असून उन्हाच्या बचावासाठी त्यांनी शेडवर व्यवस्थाही केली आहे दरम्यान उन्हाचा तडाखा कायम असल्याने थंड वातावरण असलेल्या मोसम परिसरात सद्या तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे... या उष्णतेने या फार्महाऊस मधील तब्बल सहाशेच्या वर कोंबड्या दगावल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. दरम्यान या परिसरात सद्या वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अफाट वृक्षतोड होत असल्यानेच उष्णता वाढल्याचे बोललं जातं आहे.
0
0
Report
Advertisement

मानसी नाइक ने मराठी के पक्ष में बोला: मुंबई को कॉसमोपोलिटन बनना चाहिए

Yeola, Maharashtra:मराठी ही भाषा गोड है ती सर्वांना आपलंसं करून घेते आपण मुंबईत राहत असेल तर आपल्याला मराठी ही आलीच पाहिजे मुंबई हीकॉस्मोपोलिटीयन सिटी आहे तरीसुद्धा मराठी ही आलीच पाहिजे मात्र हे सर्व अनसेड आहे असे वक्तव्य मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक hime येवल्यातील एक मे महाराष्ट्र दिनी शोभायात्रा प्रसंगी केले आहे मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक ही येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित ढोल झांज पथक शोभायात्रेसाठी येवल्यात hajar झाली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना मानसी नाईक ने मराठी भाषेवर आपले मत व्यक्त केले
0
0
Report

मराठी सम्मान के लिए रिक्षा-टॅक्सी चालकों के लिए मराठी अनिवार्यता; राजा शिवाजी की फ़िल्म मुफ्त शो

Mumbai, Maharashtra:शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतला. याला काही संघटनांनी विरोध देखील केला मात्र आता शिवसेनेच्या वतीने उत्तर भारतीयांना मराठी भाषेच्या सन्मान ठेवण्यास प्रवृत्त करण्यासाठी आजच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी हा चित्रपट मराठीत मोफत दाखवला जात आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने चांदिवली मधील उत्तर भारतीयांसाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज पासून या विशेष शो चे साकीनाक्यातील मॅक्सेस सिनेमा येथे आज पासुन पुढील सात दिवस हे मोफत शो दाखवले जाणार आहे. उत्तर भारतीय संघाच्या वतीने या शो चे नियोजन करण्यात आले आहे. ६६ वर्ष महाराष्ट्र दिनाला पूर्ण झालेली असतान ा६६ मोफत शो दाखवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठी आणि उत्तर भारतीय यांना प्रेरणा मिळेल अशी भावना या बाबत आमदार दिलीप लांडे आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष रामप्रसाद दुबे यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

मराठी राजनीति में एकता का आह्वान: सुप्रिया सुळे के बयान से शिंदे-ठाकरे तनाव पर असर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत ( राजकीय) On सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनीही घेतलेली सकारात्मक भूमिका आहे कुठल्याही कुटुंबामध्ये वाद असू नये अशी माझी भूमिका आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी सर्व राष्ट्रवादी पवार कुटुंबीयांची आहे शरद पवार राष्ट्रवादी यांचे नेतृत्व सुप्रियाताई सुळे करत आहेत सुप्रिया सुळे या संवेदनशील आहेत कुठह कुटुंब राजकारणामुळे दुभंगू नये अशी माझी वैयक्तिक भावना आहे ऑन रवी राणा शिंदे साहेबांनी रवी राणा यांना कधी बोलवलं हे मला माहित नाही मला कुठे असं ऐकिवात नाही की शिंदे साहेबांनी रवी राणा यांना फोन केला होता असूदेखी शकेल मी साहेबांबरोबर 24 तास नसतो शिंदे साहेबांनी फोन केला असेल असं मला वाटत नाही भाजप पक्षाशी निगडित असलेल्या नेत्या्द्या शिंदे साहेबांनी फोन करू शकतील त्यांना फोन केला असेल असं मला वाटत नाही तरीपण तुम्ही एकदा रवी राणा यांना विचारा ऑन प्रवीण तरडे अभिनेत्यांनी पण आता बच्चू कडू यांच्यावर बोलायचं बच्चू कडू असा नेता आहे की 25 वर्षा या माणसाने संघर्ष केला आहे बच्चू कडू यांनी राजकीय साथ शिंदे सहेबांना दिली आहे काही लोकांना हा निर्णय रुचत नसेल पण ही लोकशाही आहे ऑन राज ठाकरे मला मराठीच्या राजकारणात अजिबात जायचं नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे ही आमची सक्ती नाही ही आमची भूमिका आहे मराठी बोलता आलं तर वाईट काय आहे सर्वसामान्य परप्रांतीयनी मराठी शिकलं तर यात फरक काय पडतो.. महाराष्ट्रात येणारे क्लास वन अधिकारी मराठीचा पेपर देतात आणि नंतर अधिकारी होतात ऑन टिपू सुलतान प्रेरणास्थान हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे टिपू सुलतान चे गोडवे गाणं ते किती शूर होते नव्हते हे मला माहिती नाही ऑन काँग्रेस माघार काँग्रेसने रणांगणातून अनेक वेळा माघार घेतली आहे रणांगणातून देखील जनतेने त्यांना माघारी पाठवला आहे ज्यांनी सलग 90 निवडणुका हरण्याचा विश्वविक्रम केला आहे त्या पक्षांना हेच करावं आणखीन काय करू शकतात ऑन संजय राऊत संजय राऊत यांना स्वप्नातच राहू दे त्यांना बोलल्याशिवाय पर्याय नाही उद्धव ठाकरे सेना अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी संजय राऊत बोलतात संजय राऊत बोलल्याने उद्धव ठाकरे सेना जिवंत आहे असं वाटतं संजय राऊत बोलले नाहीत तर त्या पक्षाचं अस्तित्व काय ते कधी एकमेकांशी कॉलर देखील पकडतात ऑन नितेश राणे उद्धव ठाकरे यांना इच्छा होती म्हणून ते मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री झाले म्हणूनच गुवाहाटीचा उठाव झाला
0
0
Report
Advertisement

नाशिक के मालेगांव में वन्यप्राणी तस्करी का केंद्र बन गया

Nashik, Maharashtra:स्टोरी नाशिक (मालेगाव) विशाल मोरे नाशिकचे मालेगाव बनले वन्यप्राण्यांची तस्करी करण्याचे केंद्र नंदुरबार मध्येही वन्यप्राण्यांची मोठी तस्करीची टोळीतील संशयित आरोपी मालेगावचे मालेगावातही चिंकारा, आणि मोराचे मांस विक्री करणारा सराईत गुन्हेगाराला अटक आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने वन्यप्राण्य तस्करी बाबत आंदोलन केल्यानंतर वनविभागाकडून ही पहिली कारवाई नाशिकचे मालेगाव हे वन्यप्राण्यांची तस्करीचे केंद्रच बनले असल्याचे आता उघड झाले आहे. नंदुरबार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हा, जंगली पोपट, तितर असे वन्यजीवांची आयशर मध्ये भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आड तस्करी केली जात असताना छापा टाकला असता त्यातील संशयित आरोपींची टोळी ही नाशिकच्या मालेगावची होती. यावरून आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने मोठे आंदोलन वनविभागाच्या कार्यालय बाहेर केले होते. वनविभागाने मालेगावच्या चुनाभट्टी भागात धाड टाकून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या मुद्दस्सर अहमद अकील अहमद याला अटक केली आहे. त्याच्याकडून चिंकाराचे मांस, दोन मृत मोर, १८ जिवंत काडतुसे आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुद्दस्सर हा सराईत गुन्हेगार असून नांदगाव, येवला आणि चाळीसगाव परिसरातही शिकारीत त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. चिंकाराचे मांस १२०० रुपये किलो दराने विकले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली असून, न्यायालयाने आरोपीला 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनात वन्यप्राण्यांची तस्करी, बेकायदेशीर जंगल वृक्ष तोड कोट्यवधींचा होत असलेला भ्रष्ट्राचार हा प्रमुख मुद्दे होते. आता वनविभाग याकडे कस लक्ष देत आणि वन्य जीवांच्या तस्करीचे मालेगावचे ही केंद्र कस उध्वस्त करत हे येणाऱ्या दिवसात समजेल.
0
0
Report

पाँच घंटे बाद प्रशासन ने आश्वासन देकर टाकी पर बैठे किसान का आंदोलन खत्म कराया

Latur, Maharashtra:पाच तासांनंतर प्रशासनाला जाग… टाकीवरील शेतकऱ्याचे आंदोलन अखेर मागे… अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रूकमाजी नरवटे टाकीवरून खाली उतरले… पेट्रोलची बाटली घेतली पोलिसांनी ताब्यात… महसूल व भूमी अभिलेख अधिकारी घटनास्थळी.. आंदोलक शेतकऱ्याची समजूत… न्यायाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे… अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील शेतकरी रूकमाजी नरवटे यांच्या शोले स्टाईल आंदोलनानंतर तब्बल पाच तासांनी अखेर भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे… अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक शेतकऱ्याची समजूत काढली आणि त्यांना पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरविण्यात आले… दरम्यान, त्यांच्या जवळील पेट्रोलची बाटलीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे… अधिकाऱ्यांनी योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रूकमाजी नरवटे यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे…
0
0
Report
Advertisement

ग्राम रोजगार सहायकों ने 18 महीने से बकाया वेतन के विरोध में एक दिन का धरना दिया

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी रखडलेल्या मानधनाच्या प्रश्नावर आंदोलन पुकारले आहे. गेल्या १८–१९ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आणि वाढत्या प्रशासकीय जाचामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांनी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. थकीत मानधन तात्काळ जमा करावे,अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ग्रामरोजगाराचे सहाय्यक पद अर्धवेळ असतानाही दिवसातून दोन वेळा कामगारांची हजेरीची घेण्याचे सक्ती आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे नाराजी वाढली आहे. ३० मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू असूनही शासनाने निर्णय न घेतल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

कोल्हापुर में हिंदू लड़कियाँ टार्गेट, Love Jihad के आरोप, SIT जांच शुरू

Kolhapur, Maharashtra:आमदार गोपीचंद पडळकर बाईट मुद्दे शिरोली गावामध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन आलो. तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला धमकावल्याचे पाहायला मिळाले काही पीडित महिलांची देखील भेट घेतली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक त्यांच्यासोबत देखील चर्चा केली, SIT माध्यमातून या सर्व प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत, नवीन गोष्टी आम्ही एस पी साहेबांच्या कानावर घातले आहेत. यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. शाहरुख देसाई हा कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे. तो एमएसईबी मध्ये इंजिनीयर म्हणून नोकरीस आहे. त्याच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. शाहिद हा जिहादी प्रवृत्तीचा व्यक्ती, त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. आमच्या सर्वांची शंका अशी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा-वीस मुलींना टार्गेट करण्यात आले आहे. हे सर्व करत असताना त्यांना सपोर्ट कोण करत आहे, त्याचा तपास झाला पाहिजे. व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचे कारण काय.. ज्या मुली सापळ्यात अडकल्या आहेत त्याच मुलींच्या माध्यमातून पुन्हा मुलींना टार्गेट केलं जात आहे, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत त्या मुळात पोलिसांनी जावं. हिंदू मुलींना जाळ्यात अडकवणे आणि त्यांचा छळ करणे ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. एक प्रकारे हे संघटित गुन्हेगारी करतात... त्यामुळे यांच्यावर संघटित गुन्हेगाराप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे. जेव्हा हे सर्व विषय पुढे येतात त्या वेळेला त्याला राजकारणाचा रंग दिला जातो.. आमच्याकडची एक मुलगी जयसिंगपूर मध्ये पळवून आणले, सध्या तो तरुण महिनाभर बाहेर फिरत आहे... तो गरीब असताना महिनाभर हॉटेलमध्ये कसं काय राहू शकतो.. हॉटेलमध्ये हिंदू मुस्लिम कपल आल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे, पोलिसांना त्याची कल्पना दिली पाहिजे. हा सर्व षड्यंत्राचा भाग आहे हे पोलिसांनी लक्षात घ्यायला पाहिजे.. मदरशामध्ये नेमकं काय शिक्षण घेत याची चौकशी व्हायला पाहिजे, आमच्या शाळा उघड्यावर आहेत.. त्यांच्या शाळेत काय चालतं हे तुम्ही जाऊन पाहू शकता.. सरकारने धर्मांतर संदर्भात कायदा आणला, लवकरच लव्ह जिहाद संदर्भात कायदा येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या तरुणांना मदत करणारे तेच तेच वकील आहेत..
0
0
Report

यवतमाल के मारेगाव में अर्धाकृती शिवाजी मूर्ति रात में 설치, प्रशासन ने हटवा दी

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मारेगाव शहरातील मार्डी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. सकाळी ही बाब लक्षात येताच नगरपंचायत प्रशासनाने हा पुतळा हटविण्याची कारवाई सुरू केली, त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त करीत मोठा जमाव केला. प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, रस्त्यावर ही आंदोलन करून हा पुतळा हटवू नये अशी मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटविला व मारेगाव नगरपंचायत कार्यालय परिसरात तो ठेवण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top