icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

नागपूर विमानतळ के ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की मंजूरी: कार्गो हब से क्षेत्रजगत को फायदा

Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळ हस्तांतरण के संदर्भ में ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की चर्चा चल रही है। नागपूर विमानतळ का आधुनिक संस्करण इमारत बनकर सामने आएगा और इस परियोजना के लिए केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार के प्रस्ताव को मंजूरी दी है। कार्गो हब योजना कई वर्षों से लंबित थी, अब बोर्ड ने स्वीकृति दे दी है और यह प्रोजेक्ट आगे बढ़ रहा है। नागपूर मध्य भारत का प्रमुख विमानतळ बनेगा और एक अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट से क्षेत्र की अर्थव्यवस्था को विविध प्रकार से लाभ होगा, किसानों और उद्योगों को भी फायदा पहुंचेगा। केंद्र और महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ अधिकारी इस पहल के सफल क्रियान्वयन की दिशा में आगे बढ़ रहे हैं।
0
0
Report

भारत-पाकिस्तान पर बॉम्ब के दावों के बीच नेताओं का आरोप-प्रत्यारोप

Mumbai, Maharashtra:संजय राऊत तुमच्याकडे दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलले आहेत माझ्याकडे कोण आंदोलन करायला आले त्यावर बॉम्ब टाकेन भारत पाकिस्तानवर बॉम्ब टाकायला विचार करत आणि हे महसा बोलत आहे हे म्हणत आहे मी 5 लोकांना ठार केले आहे त्यांच्या बोड्या कोठे आहे याची चौकशी झाली पाहिजे यांना बॉम्ब आतंकवादी यांनी दिले आहेत का एकनाथ शिंदे यांचा बॉम्ब चा कारखाना आहे का दादागिरी कोणी करायची नाही तुम्ही तुमच्या अवकादित रहा शिर्डीत 2500 आमचे कार्यकर्त्यांना अटक करून ठेवले होते त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या कड बॉम्ब आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आता आम्ही बॉम्बचा कारखाना शोधू कुठे आहे तो राम मंदिरात दान पेट्या पळविल्या जात आहे यावर लक्ष दिले पाहिजे
0
0
Report

नागपूर विमानतळ अब जीएमआर ग्रुप के हवाले, नया टर्मिनल और सुविधाओं के साथ चेहरा बदलेगा

Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळाचा धुरा आज जीएमआर ग्रुप कडे सोपवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमानाचालन मंत्री नायडू व मिहान इंडिया लिमिटेड आणि जीएमआर समूहाचे अध्यक्ष जी एम राव यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा नागपूर विमानतळावर होणार आहे. त्यामुळे आता नागपूर विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जागतिक दर्जाची सुविधा नागपूर विमानतळावर तयार होणार आहे. पुढील काही वर्षात नवीन टर्मिनल सह अत्याधुनिक सुविधा नागपूर विमानतळावर उभारल्या जाणार आहे
0
0
Report
Advertisement

मावळ में मृग किडा दिखा: पावस के संकेत से खेती में नया संदेश

Varsoli, Maharashtra:निसर्ग आपल्या संकेतांमधून ऋतूंचे आगमन आधीच सांगत असतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा दूत म्हणजे मृग किडा. मान्सूनची चाहूल लागताच किंवा मृग नक्षत्र सुरू होताच हा लाल मखमली किडा जमिनीवर दिसू लागतो. त्यामुळे अनुभवी शेतकरी आता पेरणीची वेळ झाली, असा अंदाज बांधतात. महाराष्ट्रात हा किडा गोसावी, बिरबबोटी या नावांनी ओळखला जातो. मखमली लाल रंगाचा हा किडा केवळ पावसाचा संदेशवाहक नसून शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो. शेतीला हानी पोहोचवणाऱ्या इतर लहान कीटकांच्या अळ्या खाऊन तो पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतो. मात्र, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे हा दुर्मीळ होत चालला असून वर्षातून अवघे दहा ते पंधरा दिवसच त्याचे दर्शन घडते. त्यामुळे निसर्गाच्या या अनोख्या दूताचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे..
0
0
Report
Advertisement

लातूर के वडगाव में महावितरण के अधिकारियों के खिलाफ महिलाओं-ग्रामवासियों का प्रदर्शन

Latur, Maharashtra: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या वडगाव येथे महावितरणच्या कारभारा विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय. घरांमध्ये वीज मीटर बसविण्यात आलेले नसतानाही हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. मीटरच नाही तर बिल कशाचे? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. अनेक घरांना मीटर नसतानाही थकबाकी दाखवून अव्वाच्या सव्वा रकमेची बिले देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, ही बिले तातडीने रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे....
0
0
Report
Advertisement

सातारा में कास डहरण ऊँचाई बढ़ाने से जलवाहिनी पूरी, 24x7 पानी सप्लाई संभव

Satara, Maharashtra:सातारा शहराच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कास धरण उंचीवाढ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. कास धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचविण्यासाठीची जलवाहिनी पूर्णत्वास आली असल्यामुळे येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेलाही चालना मिळणार आहे. यावेळी पॉवर हाऊस, सांबारवाडी आणि आनावळे येथील विविध कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
0
0
Report

शिरूर में सूखा: गर्मी ने जलस्रोत और चारे को किया प्रभावित; मानसून कब?

Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस न बरसल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान ४५ अंशाच्या पार गेल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. पाण्याअभावी हक्काचा चाराही करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस कधी पडतो आणि खरिपाच्या पेरण्या कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

एमआईएम को बढ़ा निधि, भाजपा नेता नाराज; महापौर ने बजट आंकड़े बदले

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या स्थायी समितीने हिंदुत्वाचा आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या नगरसेवकांना अवघा ५ लाखांचा निधी दिला होता. भाजप नगरसेवकांना प्रत्येकी ५५ लाखांची खैरात वाटली होती. मात्र, अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देताना महापौर समीर राजूरकर यांनी सभापतींनी मांडलेली आकडेवारी पूर्णपणे बदलली. एमआयएमला वाढीव २० लाखांचा निधी दिला. यामुळे भाजप नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीकडून मनपाचा ३,३५४ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना ५ लाखांचा निधी दिला होता. हा निर्णय महापौरांनी बदलला आहे.. कुणी कोर्टात गेले तर फटका बसेल म्हणून महапौरांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top