icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report
Advertisement

रत्नागिरी जिला मध्यवर्ती सहकारी बैंक महाराष्ट्र में दूसरी बड़ी जिला बैंक बनी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सरत्या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा ९३ कोटी ८९ लाख रुपये झाला असून, नक्त नफा ३२ कोटी नऊ लाख रुपये झाला आहे. बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार, भागधारक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्वासावर सलग १५ वर्षे 'अ' ऑडिट वर्ग व सलग १४ वर्षे शून्य एन. पी. ए. आणि १८ वर्षे सतत नफ्यात असलेली बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँकेचा राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची स्थिती भक्कम असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या जिल्हाभरात एकूण ७६ शाखा असून, १५ शाखांची वसुली १०० टक्के आहे. रत्नागिरी शहर शाखा सर्वात प्रथम क्रमांकावर असल्याचंही चोरगे यांनी यावेळी सांगितलं..
0
0
Report

रबी सीजन में ज्वार के दाम चढ़े, प्रति क्विंटल 4500-5300 रुपये

Pandharpur, Maharashtra:मंगळवेढा बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने इतर भुसार पिकांना मागे टाकत बाजारात आघाडी घेतली आहे. इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, 'मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून, ज्वारीला सुगीचे दिवस झाले आहेत.बाजारात ज्वारीची आवक मर्यादित असली तरी दर्जेदार मालाला मोठी मागणी आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे. यामुळे गव्हापेक्षा ज्वारी अधिक फायदेशीर ठरत आहे
0
0
Report

नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू, पर्यटकों के लिए नया जल पर्यटन केंद्र

Bhandara, Maharashtra:नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू हुई है. नवेगाव बांध तलाव आपल्या सौंदर्याने पर्यटकांना नेहमी मोहणारे असल्याने पर्यटकांची इथे गर्दी नेहमी पाहायला मिळते. मात्र काही वर्षा अगोदर सुरू असलेल्या नौकाविहार पूर्ववत व्हावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती. यावर प्रशासन सुद्धा दाखल घेत अगदी कश्मीरच्या झील सारखी अनुभूती व्हावी म्हणून आगदी कश्मीर मधल्या बोटी सारख्या शिकाराबोटी इथे वापरल्या जात असल्याने हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर बोट आणि इतर बोटीत देखील या ठिकाणी उपलब्ध झाल्याने जल पर्यटनासाठी पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement

गड़चिरोली के सिरोंचा में आदिवासी पानी के लिए भटक रहे, बोरवेल भी सूने

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब-थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या गावात विहीरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकाही बोरवेलमध्ये पाणी नाही. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. नळ योजनांच्या नळात आजपर्यंत पाणी आलेच नसून झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजीगुडम टंचाईग्रस्त गावांच्या यादीत आहेत. झिंगानूर वासियांचे जल संकट कधी दूर होणार असा सवाल विचारला जात आहे. असीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
0
Report
0
0
Report

नागपूर में डिटोनेटर्स बरामद, बारकोड मिटे, वितरक की पहचान प्रभावित

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या दोसर भवन चौकाजवळ एका घराच्या समोरील परिसरात बेवारस पिशवीत सापडलेले 50 डेटोनेटर्स आणि 15 जिलेटिन कांड्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. एसबीएल कंपनीशी संबंधित या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले आहे, त्यामुळे कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला हे स्फोटक पाठवण्यात आले होते, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. डॉ लांजेवार यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेतील बागेत एका बेवारस पिशवीत हे स्फोटक मंगळवारी सकाळी सापडले होते. प्रत्येक डिटोनेटरवर बारकोड आणि त्याचा सिरीयल नंबर छापलेला असतो; त्याच्या माध्यमातूनच उत्पादनक कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला ते पाठवण्यात आले होते आणि कुठून त्याची विक्री झाली होती ते स्पष्ट होत असते. आता या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले असल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. दरम्यान पोलीस दोसर भवन चौक तसेच सेंट्रल एवेन्यू वरील विविध सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून या ठिकाणी पिशवीत स्फोटक ठेवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

बारदाने नहीं मिलने से अमरावती में चना-तुरी खरीद बंद, किसान चालक बनाम महंगाई का सामना

Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बारदाना अभावी अमरावती जिल्ह्यातील शासकीय तुर व चना खरेदी बंद; खाजगी बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणी अँकर :- शासनाच्या हमीदराने होणारी चना व तुरीची शासकीय खरेदी बारदाण्याअभावी रखडली आहे. त्यामुळे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. खुल्या बाजारात चना व तुरीचे दर पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनाने पणन महासंघ नोडल एजन्सी नियुक्त करून शासनाच्याहमीदराणे खरेदी प्रारंभ केली मात्र अनेक शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने ही खरेदी बंद पडली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र खरेदी बंद असल्याने तूर हरभरा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रावर बारदाना पोहोचल्यावर आम्ही खरेदी सुरू करू असं आता सांगण्यात येत आहे. मात्र खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के जिला अस्पताल में रक्त का संकट, रक्तदान की अपील जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्हा रुग्णयालयात रक्त तुटवडा.. आरोग्य यंत्रणेकडून सामाजिक संस्थान आवाहन.. जिल्ह्यातील आरोग्य वस्थेसमोर सध्या रक्त तुटवड्याचे संकट ओढावले आहे.. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.. सध्या केवळ शंभर पिशव्यांचा साठा शिल्लक आहे.. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारासाठी रक्तपुरवठा कठीण होणार आहे.. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदात्यांनी बाहेर पडणे टाळल्याने स्वेच्छ रक्तदानाचे प्रमाण घटले असून रक्ताचा बॅक-लॉग वाढला आहे.. या गंभीर परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कडून सामाजिक संस्था,राजकीय पुढारी आणि तरुण मंडळांना रक्तदानाच्या आवाहन करण्यात येत आहे..
0
0
Report
Advertisement

उजनी के कारंबा कालवे में ओवरफ्लो, सड़क पर पानी फैलाने से यातायात बाधित

Solapur, Maharashtra:सोलापूर - उजनीच्या कारंबा शाखेतील पाणी हिप्परगा पंपहाऊसपासून ओव्हरफ्लो, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी Anc : उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊस जवळ ओव्हर फ्लो झाले असून, ते पाणी थेट ओढ्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना कारंबा नाका ते भोगाव टोल नाका या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ओढया वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top