icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण के डम्पिंग ग्राउंड में आग, धुएं से लोगों को सांस लेने में परेशानी

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा एकदा आग लागलीय. आगीमुळे शहरात धुराचे लोट.. कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा आग लागलीय. कल्याण पश्चिमेच्यातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला याआधी ४ दिवसापूर्वी आग लागली होती कल्याण मधील पुन्हा आज दुपारी आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांकडून आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या तरी स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असुन धुराचे लोट पसरल्याने आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.
0
0
Report

अरनी के सहकारी बैंक से 1.5 लाख रुपये चोरी, सीसीटीवी में कैद बदमाश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी येथे सहकारी सोसायटीचे पीक कर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची दीड लाखांची रोख दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे. सायखेडा येथील शेतकरी नामदेव शिंदे यांनी बँक ऑफ इंडिया आर्णी शाखेतून दीड लाखाची रक्कम विड्रॉल केली, त्यानंतर पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असतांना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलीस तपास करीत आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के हापूस में इथ्रेल का खतरा, सेहत पर असर की चेतावनी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सावधान! इथ्रेलच्या फवाऱ्याने पिकतोय रत्नागिरीचा हापूस; चकाकीवर जाऊ नका, आरोग्याला बसतोय फटका!.. अँकर intro रत्नागिरीच्या हापूसचा सुगंध आता जगभरात दरवळू लागला आहे. पण हा सुगंध आणि नैसर्गिक चव धोक्यात आली आहे.आंबा झटपट पिकवण्यासाठी वापरलं जाणारं 'इथ्रेल' रसायन ग्राहकांसाठी विष ठरू पाहतंय. इथ्रेलमुळे आंबा किती लवकर पिकतो आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? पाहा हा रिपोर्ट... कोकणात सध्या हापूसचा हंगाम जोरात आहे. मात्र, नैसर्गिक अढी लावून आंबा पिकवण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी आणि बाजारात वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक व्यापारी 'इथ्रेल' या रसायनाचा आधार घेत आहेत. इथ्रेलचा स्प्रे केल्यावर अवघ्या ४८ तासांत कच्चा आंबा पिवळाधमक दिसू लागतो.पण ही घाई ग्राहकांच्या जिवावर बेतू शकते. रसायनांच्या अतिवापरामुळे केवळ फळाची चवच बदलत नाही,तर ते थेट आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांना इजा पोहोचवत आहे. ग्राहक म्हणून आपण हा फरक ओळखणं गरजेचं आहे. नैसर्गिक आंबा हा सगळीकडून सारखा पिवळा नसतो आणि तो हातात घेतल्यावर त्याचा देठापाशी सुगंध येतो. याउलट इथ्रेलचा आंबा पिवळा असला तरी चवीला आंबट असू शकतो.
0
0
Report
Advertisement

13 वर्षीय बालिका के साथ 45 वर्षीय नराधम के अत्याचार के बाद विधायक नीलम गोरे अस्पताल पहुँचीं

Palghar, Maharashtra:पालघर जिले के कसा थाना क्षेत्र के अंतर्गत एक तेरह वर्ष की बच्ची के साथ 45 वर्ष के नराधम ने अत्याचार किया. आज विधान परिषद की उपसभापति विधायक नीलम गोरे ने कसा उप जिल्हा अस्पताल पहुँचकर पीड़िता और परिवार वालों से मुलाकात की. महाराष्ट्र में घटी चारों घटनाओं की निंदा है और इस मामले में ऐसे नराधमों को मदद करने वालों पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, साथ ही कठोर कानून बनाकर अपराधियों को कठोर सजा मिले. चारों निंदनीय घटनाओं की जानकारी लेकर आवश्यक कानून बनाने पर नीलम गोरे ने विचार व्यक्त किया.
0
0
Report

मुख्यमंत्री मेरी प्यारी बहन योजना की मार्च-अप्रैल की किस्तें थमी, महिलाओं की मुश्किलें बढ़ीं

Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहे, त्यामुळे अनेक महिलांची प्रतीक्षा वाढली आहे. मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्याने महिलांच्या अडचणी वाढल्या आहे. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरीदेखील चार महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाही. सरकारने दर महिन्याला नियमित पंधराशे रुपये खात्यात जमा केल्यास महिलांना आर्थिक नियोजन करता येईल व आपल्या गरजा भागवता येतील अशी अपेक्षा यवतमाळच्या लाडक्या बहिणीनी आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांचेशी बातचीत करताना व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

वाशीम बेलखेडा में तारों से आग, 195 संतरे पेड़ जलकर नष्ट; किसान मदद मांग रहा

Washim, Maharashtra:वाशीम: बेलखेडा येथे बबन चव्हाण या शेतकऱ्याची एक हेक्टरमधील संत्रा बाग विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत काही झाड जाळले तर जी काही झाडं राहिलेली झाडं पूर्णपणे करपू गेली आहेत.या आगीत 195 झाडांचे नुकसान झाले आहे.सात वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.घटनेला महिना उलटूनही सर्वेक्षण होऊन मदत मिळालेली नाही.दरम्यान,खरिप हंगाम जवळ आल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून शासनाने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. बाईट:बबन चव्हाण शेतकरी,बेलखेडा
0
0
Report

नीता केळकर ने राष्ट्रपति से महिलाओं व बच्चों के लिए फांसी त्वरित अमल की मांग

Sangli, Maharashtra:महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांतील फाशीच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करा - नीता केळकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी अँकर - महिलां व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कार आणि खूनासारख्या गुन्ह्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणी भाजपाचे नेत्या नीता केळकर यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.दयेचे अर्ज ना मंजूर होऊन देखील फाशीची शिक्षा देण्यात येत नाही,त्यामुळे याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी आणि देशातल्या 3 हजार आणि महाराष्ट्रातल्या वीस हुन अधिक फाशीची शिक्षा झालेली खटले प्रलंबित आहेत,त्यामुळे पिढी त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रपतींनी अंमलबजावणी करावी अशी मागणी नीता केळकर यांनी नसरापूर घटनावरून केली आहे,त्या सांगलीमध्ये बोलत होत्या.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर जिला खेल संकुल में खेलो इंडिया गर्मी प्रशिक्षण शिविर शुरू, 100+ खिलाड़ी

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 0605ZT_CHP_SUMMER_SPORT ( single file sent on 2C) टायटल: - क्रीडा विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे खेलो इंडिया अंतर्गत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू, १०० हून अधिक खेळाडू सहभागी. अँकर:-- जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडूंना आधुनिक व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा स्टेडियम येथे सकाळी व सायंकाळी शिबिर सुरू असून, यात व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, जलतरण, कराटे, बास्केटबॉल, बॅडमिंटन व वुशू या खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, खेळाडूंना कौशल्य विकास, समुपदेशन, चर्चासत्रे व परिसंवाद तज्ञ मार्गदर्शकांकडून घेतले जात आहेत. १२ वर्षांवरील ते १९ वर्षांखालील मुली-मुलांसाठी असलेल्या या शिबिरात १०० hून अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत. बाईट १) संदीप उईके, तालुका क्रीडा अधिकारी, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

चंद्रपुर नगरपालिका के ठेकेदार कर्मियों के आंदोलन की मांग मान ली गई; आज लौटे

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेसमोरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन अखेर मागण्या मान्य, आजपासून कामावर रुजू कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार वाढीव वेतन देणे, डम्पिंग यार्डमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचे मागील सहा महिन्यांचे वेतन तातडीने अदा करणे, तसेच कंत्राटी कामगारांच्या पगारातून ईएसआयची रक्कम कपात करणे, या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. आज संबंधित मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यानंतर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, हे कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
0
0
Report

भंडारा में आंधी-बारिश से किसानों के धान को नुकसान, मुआवजे की मांग तेज

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार झोडपून काढलं. कालचा सर्वात जास्त पाऊस हा तुमसर, मोहाडी तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात बहुतेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पीक लागवड केली आहे. आता चार दिवसात शेतकरी धान पीक कापणार होते. इतक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे धान भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आतातरी शासनाने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top