icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चिपळूण विशेष न्यायालय ने 13 वर्षीय बच्ची से दुष्कर्म आरोपी को 20 साल जेल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा तुरुंगवास... अँकर एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला चिपळूणच्या विशेष न्यायालयाने कठोर अद्दल घडवली आहे.. चिपळूणमधील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस.नेवसे यांनी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर याला २० वर्षे सक्तमजুরি आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.. ही धक्कादायक घटना मार्च २०१९ मध्ये घडली होती. पीडित मुलगी साखर आणण्यासाठी जात असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.. जुलै २०१९ मध्ये मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले.तपासणीअंती ती १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले, त्यानंतर या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला.. या खटल्यात विशेष सरकारी वकील adv.अनुपमा ठाकूर यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला..एकूण १४ साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.. समाजात अशा गुन्हेगारांना जरब बसावी,या दृष्टीने या निकालाकडे पाहिले जात आहे..
0
0
Report
Advertisement

रिसोड में खरीप नियोजन बैठक: किसान लाभ के लिए कृषि विभाग की अहम चर्चा

Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली. तहसील कार्यालयात आयोजित या बैठकीत पेरणीचे नियोजन,बियाणे व खतांची उपलब्धता तसेच पीक विमा योजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत शेतकरी हिताच्या दृष्टीने कृषी विभागाला विविध सूचना करण्यात आल्या. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, वेळेवर पेरणी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

पानी संकट गहिरे: अडोळ डॅम पाणीसाठ्यात घट, रिसोड परिसरात तडाखा

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम अडोळ प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत असून पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या रिसोड शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. सध्या आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित राहिला आहे. अजून सुमारे दीड महिना उन्हाळा बाकी असल्याने पाणीपातळीत आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, येत्या काळात पाणीपुरवठ्याच्या अंतरात वाढ होण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
0
0
Report

अकोला के थाथोड नगर में पहाटे आग, दो घर जलकर राख, मदद की मांग

Akola, Maharashtra:अकोला शहरातील ताथोड नगर परिसरात आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. या आगीत दोन घरांतील संसारोपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने बाधित घरमालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
0
0
Report

चंद्रपुर महापालिका आयुक्त ने छह अधिकारियों को नोटिस जारी, हिराई महोत्सव विवाद पर बड़ा कदम

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका के आयुक्त ने छह अधिकारियों को नोटिस जारी किया है। हिराई महोत्सव में अव्यवस्थाओं और राजशिष्टाचार के उल्लंघन के मामले में यह नोटिस दी गई। कार्यक्रम के दौरान स्टेज व्यवस्था, राजशिष्टाचार को लेकर बड़ा विवाद पैदा हुआ था। सांसद प्रतिभा धानोरकर ने प्रोटोकॉल उल्लंघन की शिकायत लोकसभा अध्यक्ष तक पहुंचाई थी। इसके बाद आयुक्त कार्यालय ने संबंधित अधिकारियों को नोटिस दिया है। नोटिस में स्टेज व्यवस्था, राजशिष्टाचार और कार्यक्रम नियोजन में त्रुटियों का हवाला है। नोटिस प्राप्त अधिकारियों में बांधकाम विभाग के इंजीनियर अतुल भसारकर, आशिष भारती और नरेंद्र पवार शामिल हैं; शिक्षा विभाग के सुनील आत्राम; सूचना जनसंपर्क विभाग के युधिष्ठिर रैच; स्टोर विभाग के अहमद सिद्धिकी। इस मामले पर मनपा के भीतर हलचल मची है।
0
0
Report
Advertisement

सह्याद्री के जंगलों में दुर्लभ ब्लैक पैंथर की तस्वीर कैद, रिकॉर्ड बढ़ने लगा

Kolhapur, Maharashtra:सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप मध्ये नुकतेच दुर्मिळ असे black panther (काळा बिबट्या) चा फोटो कैद झाला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील काळे बिबटे (मेलॅनिस्टिक बिबटे) दुर्मिळ, सहजासहजी न दिसणारे आहेत आणि विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांच्या घनदाट जंगलांमध्ये त्यांच्या नोंदींची संख्या वाढत आहे. तिलारी, राधानगरी, रत्नागिरी परिसर ही प्रमुख निरीक्षणे आहेत, जी या जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशातील त्यांच्या अस्तित्वावर प्रकाश टाकतात, जिथे त्यांच्या गडद कातडीमुळे त्यांना उत्कृष्ट छलावरण मिळते. हे बिबटे एक वेगळी प्रजाती नाहीत, तर त्यांच्या जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्यांचा रंग गडद झाला आहे, ज्यामुळे त्यांना घनदाट, ओलसर आणि सावलीच्या जंगलांमध्ये छद्मावरण करण्यास मदत होते.
0
0
Report
Advertisement

प्लास्टिक प्रतिबंध के लिए मनपा का एक्शन मोड: 4,630 किलो प्लास्टिक जप्त

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर मनपा प्रशासन आता पुरते अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवत तब्बल ४,६३० किलो प्लास्टिक जप्त केले. मागील दोन दिवसांत तब्बल २० लाख रुपये किमतीचे १० हजार किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करून प्रशासनाने व्यापाऱ्यांचे धावे दणाणून सोडले आहेत. दरम्यान, आधी स्वतःपासून सुरुवात करा, या उक्तीप्रमाणे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मनपा कार्यालयांमध्येच अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्यास सक्त मनाई केली आहे. आयुक्तांनी काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार मनपा मुख्यालय, सर्व झोन कार्यालये, आरोग्य केंद्रे आणि शाळांमध्ये आता प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पॅकबंद पाण्याच्या प्लास्टिक वाटल्यांऐवजी काचेच्या किंवा धातूच्या बाटल्या वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के राजापुर में 1709 का ऐतिहासिक राजाज्ञापत्र मिला; मराठा प्रशासन का जीवंत प्रमाण

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापुरात सापडले १७०९ मधील ऐतिहासिक राजाज्ञापत्र.. मराठा प्रशासनाचा जिवंत पुरावा!.. अँकर इतिहासप्रमीत प्रेमीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात तब्बल ३१५ वर्षांपूर्वीचे एक ऐतिहासिक राजाज्ञापत्र सापडले आहे. १७०९ सालातील हे पत्र मराठा साम्राज्यातील न्यायनिवाडा आणि शिस्तबद्ध प्रशासनाचा एक भक्कम पुरावा मानला जात है. हे पत्र राजापूरच्या डोंगर गावात दीपक शेलार यांच्या घरी एका जुन्या कापडी पिशवीत सापडले... इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी ही माहिती समोर आणली असून,नाशिकचे मोडीलिपी वाचक रामनाथ रावळ यांनी या पत्राचे वाचन केले आहे.. यहे राजाज्ञापत्र ९ जून १७०९ रोजी (राज्याभिषेक शक ३५) जारी करण्यात आले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या दोन वर्षांनी हे पत्र निघाले आहे.. यात कान्होजी नाईक यांना 'सरदेशमुखी वतनाचे' हक्क बहाल केल्याचा उल्लेख असून,गणोजी नाईक यांनी बळजबरीने घेतलेल्या कारभारावर न्यायनिवाडा करण्यात आला आहे.. याशिवाय महसूल,इनाम आणि वतन व्यवस्थेची महत्त्वाची माहिती यातून समोर आली आहे.. मराठा इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करण्याच्या दृष्टीने हा शोध अत्यंत मोलाचा ठरत आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top