Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Feb 22, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे... मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे... ग्रामपंचायत कडून तसा ठराव करण्यात आला आहे मात्र, देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे... त्यामुळे हिंदू-मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.... मात्र, मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता... या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले होते... अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे... गेली वर्षात मुस्लिम व्यापार्‍यांना विरोध करणारा ठराव 327 मतांनी हा संमत झाला होता. यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कथन केली जाते ही कथन आता कमी झाली असली तरी काही प्रमाणात होत आहे आणि ही मुस्लिम समाजाकडून होत असल्याने मुस्लिम समाजाला व्यवसाय करू देण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे... ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे संजय मरकड यांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे... तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 22, 2026 05:45:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आर्थिक अडचणीमुळे पोटच्या दोन बालकांना एका आईने 40 हजार रुपयांना दत्तक दिल्याचा प्रकार.. अँकर - पैसे घेऊन पोटची दोन मुलांची एका आईने बेकायदेशीर रित्या दत्तक विक्री केल्याची घटना घडली आहे.सांगलीच्या मिरजेमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आईसह चौघां जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखল झाला आहे.मिरजेच्या सुभाषनगर येथील एका आईने आपल्या दोन बालकांना कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे चाळीस हजार रुपयांना विकल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाली होती,त्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर यामध्ये मनीषा जाधव याईने माधवनगर येथील दोघा दाम्पत्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे आपली दोन पुरुष जातीची बालक दत्तक दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आईसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट - किरण चौगुले - पोलीस निरीक्षक मिरज शहर.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 22, 2026 05:01:02
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 22, 2026 04:47:52
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 22, 2026 04:03:30
Beed, Maharashtra:माजलगावातील सिमरी पारगाव येथे शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत ट्रॅक्टरसह एक एकर ऊस जळून खाक झाला. ट्रॅक्टरचा चालक पाणी प्यायला गेला असता ट्रॅक्टरच्या हेडमधून ठिणगी किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेलाय. ऊसाचा फड कोरडा असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. ट्रॅक्टर पूर्णतः जळून खाक झाला तर शेतातील सुमारे एक एकर ऊस आगीत भस्मसात झाला. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.यानंतर सदरील शेतकऱ्याने तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 22, 2026 04:00:45
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, खाजगी इसमाच्या माध्यमातून 1 लाख 30 हजारांची लाच घेतल्याने अटक, घर बांधकाम विस्तार मंजूरीसाठी मागितली लाच अँकर:--चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. खाजगी इसमाच्या माध्यमातून 1 लाख 30 हजारांची लाच घेतल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. शुभम वरघट असे या आरोपी अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराने आपल्या घर बांधकाम विस्तार मंजूरीसाठी प्रकरण दाखल केले होते. यासाठी अभियंत्याने एकूण 2 लाख 30 हजारांची लाचेची मागणी केली होती. यातील 1 लाख रु. ची रक्कम त्याने मध्यस्थ दिनेश समुंद याच्या माध्यमातून आधीच स्वीकारली होती. उर्वरित रकमेसाठी त्याने तगादा लावला होता. एसीबीने शहरातील वर्दळीच्या भागात मध्यस्थाने शिल्लक रक्कम स्वीकारताना सापळा रचून कारवाई केली. चंद्रपूर मनपात नवे कारभार आते पदारूढ झाल्यावर लाचखोरीचे हे प्रकरण उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 22, 2026 03:52:31
Amravati, Maharashtra:अमरावतीत महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून शासकीय वाहनाचा गैरवापर; पत्नी मुलीला शाळेत सोडणे आणण्यासाठी गाडी वापरल्याचा आरोप. अँकर :- अमरावतीत महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याच उघड झालं आहे. यामध्ये अमरावती महानगरपालीकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याच स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य आरोग्य अधिकारी विशाल काळे यांचा हा प्रताप असून त्यांच्या पत्नी आणि मुलीला शाळेत सोडणे आणण्यासाठी गाडी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सांगितले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणातून करदात्यांच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 22, 2026 03:50:20
Nashik, Maharashtra:सीसीटीव्हींमुळे नियमभंग ८० टक्के घटले अँकर नाशिक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक 'डिजिटल पोलिस' प्रणालीचा प्रभाव पहिल्याच आठवड्यात स्पष्टपणे दिसून आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शुक्रवारपासून शहरातील ४० हून अधिक सिग्नल चौकांवर रेड लाइट व्हायोलेशन डिटेक्शन (आरएचव्हीडी) आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांमध्ये तब्बल ७९ ते ८० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ४०,९३४ वाहनचालकांनी नियम मोडले होते, तर २१ फेब्रुवारी रोजी ही संख्या थेट ८,५२२ वर आली आहे. ८०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाल सिग्नल तोडणारी वाहने क्षणार्धात टिपली जात असून काही सेकंदांतच संबंधित वाहनधारकाच्या मोबाइलवर ई-चालानाचा संदेश पाठवला जात आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 22, 2026 03:50:06
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात पुन्हा एक बाळ विक्री प्रकरण उघड..... डॉक्टर नितेश वाजपेयीनेच मोहदुरा येथील दाम्पत्याला विकले होते बाळ.... वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहगाव(देवी) येथून बाळ घेतले ताब्यात.... 4 लाख 70 हजाराला झाली होती बाळाची विक्री.... भंडाऱ्यात बाळ विक्रीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी डिसेंबर 2025 मध्ये भंडाऱ्याच्या मोहदुरा येथील दाम्पत्याला सुमारे 4 लाख 70 हजार रुपयांत नवजात बाळ विकल्याची माहिती आहे. Varthi पुलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव (देवी) येथून महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बाळ ताब्यात घेतले. यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी गोंदिया येथील नवजात बाळ विक्री प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात दोन दिवसां आधी आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. आज पुन्हा तसाच बाळ विक्री प्रकरण पुढे आल्याने या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 22, 2026 03:03:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाला होता तो पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत असतानाच शनिवारी दुपारी नवीन जायकवाडी पंपहाऊस येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने नवीन योजनेवरील पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने शहरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत होणार आहे. काही दिवसापूर्वी मुख्य जलवाहिनीतील गळती आणि पंपिंग स्टेशनमधील विद्युत बिघाडामुळे पाणी उपसा प्रभावित झाला होता. त्यामुळे पाण्याची सायकल दोन दिवस पुढे गेली. ती सायकल पुन्हा बसवण्यासाठी मनपा पाणी पुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. पाण्याच्या टॅन्करवर आरटीओने कारवाई सुरु केल्याने तीन दिवस टँकर बंद होते. त्यामुळे नो नेटवर्क भागातील पाणी पुरवठा अधिक विस्कळीत झाला आहे. पाणी उशिरा येत असल्यामुळे कामगार वर्ग आणि गृहिणींची मोठी गैरसोय होत आहे. टँकर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 22, 2026 03:02:48
0
comment0
Report
Advertisement
Back to top