icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ATS raids on 157 locations, over 100 questioned

Nagpur, Maharashtra:नागपूर (पंकज भोयर 121... गृहराज्यमंत्री ) शोधात भट्टी नावाचा आतंकवादी पाकिस्तानमध्ये बसून महाराष्ट्रात आतंकवादी कारवाई करण्याच्या प्रयत्नात होता --- समाजमाध्यमातून त्यांनी काही तरुणांना हाताशी घेण्याचा प्रयत्न केला --- काही जणांच्या खात्यात पैसेही दिले आणि त्या पैशांच्या माध्यमातून प्रलोभन दाखवून या प्रकारचे कृत्य करून घेण्याचा प्रयत्न करत होता --- परंतु वेळीच ATS ला माहिती मिळाली.. 157 ठिकाणी छापे... आणि ताब्यात घेऊन 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली --- समाज माध्यमातून त्या लोकांचे विचार कसे आहे हे अगोदर हेरण्यात आले... त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले त्यांना प्रललोभीत करण्यात आले.. असं कृत्य करणार का? --- वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी होती (on संभाजीनगर स्लीपर सेल ) --- संभाजीनगर असो विदर्भातील इतर काही जिल्हात कारवाई होतेय.. चौकशी होतेय... चौकशीनंतर अजून विस्तृत माहिती पुढे येईल
0
0
Report

नीलोबाराय की दिंडी आज पंढरपुर के लिए प्रस्थान, हजारों वारकरी शामिल

Ahilyanagar, Maharashtra:विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत अहिल्या नगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय यांची दिंडी आज प्रस्थान ठेवल आहे राज्यातील मानाच्या दिंड्यांपैकी नवव्या क्रमांकाची असलेली ही दिंडी गेल्या अनेक वर्षांपासून आपली परंपरा जपत आहे निळोबारायांच्या दिंडीमध्ये पन्नास ते साठ हजार वारकरी सहभागी होतात पिंपळनेर पंचक्रोशी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अनेक गावातून वारकरी या दिंडी मध्ये सहभागी होतात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार काशिनाथ दाते यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी या दिंडी प्रस्थानासाठी उपस्थित होते
0
0
Report

बीड जिला अस्पताल में लिफ्ट बंद, गंभीर मरीज को नीचे ले जाना पड़ा—वीडियो वायरल

Beed, Maharashtra:बीड जिला अस्पतालातील लिफ्ट सुरू नसल्याने रुग्णाला झोळीतुन करावे लागले दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर नेले जात होते. मात्र लिफ्ट सुरू नसल्याने त्यांना झोळीत टाकुन पायऱ्यावरून घेऊन जावे लागले. याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ सोबत जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू नसल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ वरून जिल्हा rुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
0
0
Report
Advertisement

बुलढाणा के किसानों के लिए बोगस सोयाबीन बीज: 12 दिनों में भी नहीं उगे

Buldhana, Maharashtra:बुलढाणा सोयाबीनचे बियाणे बोगस , 12 दिवस झाले तरी उगवलेच नाही.. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार Anchor - पेरणीयोग्य पाऊस पडल्याने बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या... आणि पिक उगवायला सुरुवात झाली मात्र मोताळा तालुक्यातल्या रोहिणखेड शेतशिवारात याउलट चित्र पाहायला मिळतंय.... शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवूनच न आल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट आलेले आहे...क Kiman 200 शेतकऱ्यांना या बोगस बियाणाचा फटका बसलाय... त्यात शेतशिवारातून शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी.... Wkt - मयूर निकम ,प्रतिनिधी शेतकरी
0
0
Report

सांगली से पंढरपूर: आंखों पर पट्टी बांधकर पर्यावरण संदेश के साथ सायकल यात्रा शुरू

Sangli, Maharashtra:स्लग - पर्यावरण वाचवा संदेश घेऊन,डोळ्यावर काळी पट्टी बांधून दोघा विद्यार्थ्यांची आषाढी सायकलवारी.. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगली ते पंढरपूर डोळे बांधून सायकल वारी दोघा विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. पर्यावरण वाचवा असा संदेश देत सांगलीतील ऋतांबरा नागमोती आणि राजवीर नागसेन 14 वर्षीय विद्यार्थ्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून पंढरपूर सायकल वारी सुरू केली आहे. 130 किलोमीटरचा अंतर त्या दोघांकडून सायकल वरून पार करण्यात येणार.सांगली ते पंढरपूर डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केल्या जाणाऱ्या वारीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.
0
0
Report

बारिश से मुक्तागिरी में धबधबों की रौनक, तीर्थयात्रियों की भीड़

Amravati, Maharashtra:पावसाळ्यात बहरले मुक्तागिरीचे, धबधबा प्रवाहित; मंदिरात पर्यटकांची गर्दी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वसलेल्या मुक्तागिरी तीर्थक्षेत्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून आले आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून धबधबे दिमाखात कोसळताना दिसत आहे. धुक्याची चादर आल्हाददायक वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे मुक्तागिरी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मुक्तागिरी येथील प्राचीन जैन मंदिरे आणि परिसरातील निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम पाहण्यासाठी दररोज पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहे. डोंगरकड्यांवरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह ढगांनी वेढलेला परिसर आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मुक्तागिरीतील निसर्गाचे हे देखणे रूप अनुभवण्यासाठी विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे दाखल होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement

लातूर में चोरी के आरोप: खेत से पाइप वायर चोरने पर तीन बच्चों की पाबंदी बांधकर मारपीट, मामला दर्ज

Latur, Maharashtra:बोरची वायर चोरल्याचा आरोप... 3 लहान मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण... लातूरच्या खरोळा गावातील घटना... रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल... मुलांवर चोरीचा गुन्हा दाखल तर मारहाण करण्यावर ही गुन्हा दाखल.... लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे शेतातील बोरचे वायर चोरल्याचा आरोप करत शेतात तिन लहान मुलांना खांबाला बांधून दोघांनी बेदम मारहाण केलाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय, याप्रकरणी रेणापूर पोलिसात चोरी करणाऱ्या तिघांवर आणि त्या लहान मुलांना मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
0
0
Report

मालशेज घाट में बारिश के बाद प्रकृति का नवजीवन, पर्यटकों का उत्साह

Shirur, Maharashtra:Anc:सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाचा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे! गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य पूर्णपणे बहरले असून, पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धबधब्यांचा जोर ओसरला आहे, ज्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला आहे. ​पाऊस कमी झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी काहीशी ओसरली असली, तरी स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदार येणाऱ्या पर्यटकांचे उत्साहाने स्वागत करत आहेत. विशेषतः येथील निसर्गरम्य वातावरणात गरमागरम खमंग भाजलेले मका खाण्याचा आनंद पर्यटक आवर्जून घेत आहेत. ​निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आणि येथील स्थानिक स्वादाचा आस्वाद घेण्यासाठी सह्याद्रीचा हा परिसर नक्कीच भेट देण्यासारखा आहे!याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... झी मिडीया जुन्नर पुणे...
0
0
Report
Advertisement

राजापूर पंचायत समिति ने अणुऊर्जा परियोजना के विरोध में प्रस्ताव पारित किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. अणुऊर्जा प्रकल्पाला मंजुरी नको. राजापूर पंचायत समितीचा ठराव. राजापूर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प विरोधातील ठराव मांडला गेलाय. स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असल्यामुळे प्रास्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये असा एकमुखी ठराव केलाय. यामुळे तालुक्यातील माडबन येथे उभारला जात असलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे बारसू-सोलगाव परिसरातील अणुऊर्जा प्रकल्पाचेही भवितव्य अधांतरीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
0
Report

चिपळूण उड्डाणपुल 95 पिलर: गणेशोत्सवापर्यंत 90% काम पूर्ण

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाआधी चिपळूण उड्डाणपूल पूर्ण होणार.. काम अंतिम टप्प्यात, गणेशोत्सवापर्यंत काम संपण्याची अपेक्षा.. जिल्ह्यातील सर्वात लांब ९५ पिलरचा पूल.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आणि चिपळूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या अंतरातील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ९५ पिलरचा असलेल्या उड्डाणपूलाचे ९०% काम पूर्ण झाले आहे.. आगामी दोन महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्त चाकरमान्यांसाठी हा पूल खुला व्हावा यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासन प्रयत्न करत आहेत..
0
0
Report

अकोला रेलवे स्टेशन के शौचालयों में गंदगी, यात्रियों ने प्रशासन पर सवाल उठाए

Akola, Maharashtra:एकीकडे भारतीय रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानक स्वच्छतेचे मोठे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अकोला रेल्वे स्थानकावरील चित्र या दाव्यांना छेद देणारे आहे. स्थानकावरील प्रतीक्षालयातील शौचालयांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता झालेली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि असुविधेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियान आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या अकोला रेल्वे स्थानकातील शौचालयांची अशी दयनीय अवस्था रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तातडीने या शौचालयांची स्वच्छता करून नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी झाली आहे. अन्यथा स्वच्छतेचे दावे आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील दरी आणखी स्पष्ट होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top