icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बिजली कटने से कालंबनी अस्पताल में पोस्टमार्टम तीन घंटे देरी, प्रशासन पर सवाल उठे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंधारात.. जनरेटरअभावी पोस्टमार्टम ३ तास रखडले! कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही जनरेटर बंद असल्याने एका मृतदेहाचे पोस्टमार्टम तब्बल तीन तास रखडले. एक जनरेटर नादुरुस्त तर दुसरा डिझेलअभावी बंद असल्याने हा गंभीर प्रकार घडला. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधेअभावी मृतदेहाची विटंबना होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0
0
Report

नेनाडे जिला केंद्रीय बँक बचाने का श्रेय किसे मिला—देशमुख बनाम चव्हाण की बहस

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Bank_Pckg Feed on - 2C --------------------------------- Anchor - अवसायानात निघालेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज देऊन तारले होते. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज माफ केले. याच जिल्हा बँकेच्या शाखेच्या एका सोहळ्यात बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून श्रेयवादाची लढाई रंगली. पाहुयात नेमके काय घडले. Vo - शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. राजकारण्यात ताब्यातील या बँकाची ही परिस्थिती का झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून मात्र नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडन्यापासून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी वाचवली की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाचवली यावरून श्रेयवादाची ही लढाई रंगली. कर्जाची परतफेड होत नसल्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक 2007 साली अवसायानात निघाली होती. पण राज्य सरकारच्या सव्वाशे कोटीच्या कर्जामुळे बँक बुडन्यापासून वाचली. याच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकर येथील शाखेचं इमारतीचा लोकार्पण सोहळा काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खासदार भास्करराव पाटील खातागावकर यांनी बँक वाचवण्याचे श्रेय कुणाचे याबद्दल वक्तव्य केले. अवसायानात निघालेल्या या बँकेला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज दिले त्यामुळे बँक असेपर्यंत त्यांचे उपकार मानले पाहिजेत असे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. तर बँक वाचवण्याचे श्रेय विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांनाही जाते असे माजी खासदार भास्करराव पाटील म्हणाले. तर अशोक चव्हाण यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेला किस्सा सांगितला. बँक बंद करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळात आला होता त्यावेळी मी महसूल मंत्री होतो. सर्व मंत्री एकीकडे होते आणि मी एकीकडे. पण विलासरावानी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर बँकेला दिलेल्या सव्वाशे कोटीच्या कर्जाचे रूपांतर अनुदानात केले असे अशोक चव्हाण म्हणाले. पण अशोक चव्हाण यांनी भाषनात विलासरावांना श्रेय दिले नाही. Sound Byte - आ.प्रताप पाटील चिखलीकर Sound Byte - भास्करराव पाटील - माजी खासदार Sound byte - खा. अशोक चव्हाण Vo - बँक बंद न करण्याचा निर्णय विलासरावानी घेतला त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणार की नाही हा प्रश्न झी २४ तासच्या प्रतिनिधिने विचारल्यावर मात्र अशोक चव्हाण हो नक्कीच आभार मानणार असे उत्तर दिले. Boom Byte - खा. अशोक चव्हाण Vo - साखर कारखाण्यांना आणि संस्थांना दिलेले भरमसाठ कर्ज, अवास्तव खरेदी, फुगीर नोकरभरती या आणि इतर कारणामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवसायानात निघाली होती. सहकार खात्याने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन संचालक मंडळाला दोषी धरण्यात आले होते. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. आज सुदैवाने बँक पुन्हा सुस्थीतीत आणण्यात आताच्या संचालक मंडळाला यश आले आहे. पण ही बँक वाचवण्याचे श्रेय घेण्यावरून वाद रंगला असताना बँक का बुडाली याच आत्मचिंतन करनेही गरजेचे आहे.
0
0
Report

शिंदे के साथ सत्ता की बहुमत चुनौती, ऑपरेशन टाइगर पर राजनीतिक संग्राम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर *संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन आपचे 7 खासदार भाजपाकडे ऑपरेशन टायगर चर्चा - आमचे जे सहा-सात खासदार भाजपात गेले ते राज्यसभेचे, राज्यसभेत बहुमत असायला अजून 18 खासदारांची गरज आहे. - म्हणून आम्ही ऑपरेशन टायगर करतोय असं नाही. आमच्या संपर्कात सगळेजण आहेत हे आम्ही नाकारत नाही ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही. - मात्र योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार शिंदे यांच्याकडे आहे. असे सांगून ऑपरेशन होत नाही मात्र योग्य वेळी राजकीय भूकंप पाहायला मिळेल. ऑन विधान परिषदसाठी शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत. - विधान परिषदेमध्ये दोन जागा आहेत यासाठी दहा-बारा इच्छुक उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे. - आता त्यात एक नंबर कोण दोन नंबर कोण असे कयास मीडियाच्या माध्यमातून लावले जात आहेत. - अशी आतापर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो. ऑन मराठी सक्तीला विरोध - निरुपम - महाराष्ट्र मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. मात्र निर्णय घेऊन उद्याच मराठी बोल असा आग्रह धरणे योग्य नाही. यावर काय निर्णय घ्यायचा ते प्रताप सरनाईक हे शिंदे साहेबांना बोलून घेईल. ऑन संदीप देशपांडे - संजय निरूपम - भैया मुंबई बंद करू शकत नाही. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे. मराठी पाट्या सर्व मुंबई मध्ये लावण्यात आला आहे. - काही लोकांना वाटतं आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल - मुंबईत हिंदी भाषिकांचा कब्जा होईल असे वाटत मात्र तसे होणार नाही. - महानगरपालिकेत हिंदी महापूर होईल असे वाटत होतं पण काही होणार नाही. - मुंबई हे मराठी माणसाचीच आहे त्यासाठी कोणतेही तडजोड आम्ही करणार नाही. ऑन बकासुर सारखी भाजप झाली आहे - संजय राऊत - संजय राऊतला डिप्रेशन आले आहे. कुणाच्या बाजूने बोलावा हा त्याच्यासाठी मोठा विषय झाला आहे. - अजित दादाची राष्ट्रवादी शरद पवार गटातून फुटली बाजूला झाली. शरद पवारांची आजची भूमिका काय आहे हे संजय राऊतला माहित नाही. - उबटामध्ये जे अंतर्गत आता भांडण आहेत त्यामुळे उबाटाची सध्याची स्थिती काय आहे ते त्यांना सांगता येत नाहीत. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट आणि काँग्रेसचे काँग्रेसच आहे ते कधी कुठे जाईल त्याचा काही नियम नाही. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट याचा इतराने जर फायदा घेतला तर त्याला बकासुरमन कितपत योग्य आहे. - आता संजय राऊत ने कितीही बडबड केली तरी हे समीकरण काय ते आता रोखू शकणार नाहीत ऑन संजय राऊत - उद्धव ठाकरे दुखी आहेत - उद्धव ठाकरे का दुःखी आहेत. त्याचा कारण संजय राऊत यांना माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे दुखी असल्याने संजय राऊत का दुःखी हेही माहिती आहे. यांची काराने वेगळी आणि दाखवता वेगळी.. ऑन बागेश्वर धाम शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य - या महाराजांनी महाराज गिरी सोडून राजकारणात करावं, प्रत्येक जण उठतो राजकारणात धडे देत आहे शिवाजी महाराज थकले होते तुम्हाला माहित आहे का शिवाजी महाराज थकले होते? - काही कथोगल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. ऑन सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर.... - सुनेत्रा पवार यांचे बोर्ड लावले हे कार्यकर्त्यांचे भावना असते. प्रत्येकाला वाटत आपला नेता मोठा व्हावा. - आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पहायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. ऑन बागेश्वर धाम वक्तव्य चार मुले जन्माला घाला एक आरएसएसला द्या - चार मूल पैदा करावे की सहा आता ही यांनी ठरवावे का ? - अशा प्रकारचे वक्तव्य करून समाधानी काय दिशा द्यायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ऑन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा - संजय गायकवाड यांनी त्यासंदर्भात कायद्याचे स्पष्टीकरण दिल आहे. परंतु नियमानुसार जी काय असेल ती कारवाई पोलीस करत आहेत. ऑन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकू हल्ला - शहरामध्ये गुन्हेगاريةचे प्रमाण वाढतय, कुणाचं प्रमाण वाढते मी पोलीस आयुक्तां सुद्धा सांगितल आहे की शहरामध्ये गुंडगिरी ड्रगचे प्रमाण खुनाचे प्रमाण वाढतात. - पोलिसांचा धाक या शहरांमध्ये राहिला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑन उद्धव ठाकरे विधान परिषद उमेदवारी. - उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषद मध्ये जायचं आहे त्यांची ती मानसिकता आहे. - काँग्रेसवाले म्हणतात उद्धव ठाकरे असतील तर आम्ही विचार करू राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही पाठिंबा देऊ ह्या सगळ्या बातम्या फक्त चाललेल्या आहेत. - अखेर उद्धव ठाकरे हेच विधान परिषद चे उमेदवार असणार आहेत ते स्वतः इच्छुक आहेत. - किती काही झालं तरी ही निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार आहेत. ऑन भाजप आय एम ए निवडणूक - पक्ष वाढविण्यासाठी सर्वच मदत करत आहे. ही सर्व पुढील निवडणुकriची तयारी आहे. हे भाजपने केले त्यात काही गैर नाही. ऑन मनसे पदाधिकारी गुन्हे दाखल - मनसेने आंदोलन केलं म्हणून संजय निरूपण यांनी यांनी विरोध केला की काय म्हणून संजय निरुपम च्या विरोधात आंदोलन. - हा आता राजकीय डावपेच त्या ठिकाणी चालला आहे. - महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे हा आमचा सुद्धा आग्रह आहे. ऑन सोलापूरच्या मनोहर बाबाला अटक नेत्यांचे सोबत फोटो - बाबा असतील भविष्यकाळातील प्रत्येक माणूस राजकीय नेत्याशी संबंधित असतो. - त्यांचा असलेला एखादा कार्यक्रम असेल त्यांची असलेली एखादी भेट असेल हे स्वाभाविक आहे. - जसं खराब प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले दुष्कृत्य यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. - युपी बिहारचे बाबा इकडे फिरत असतात आणि ते फोटो काढतात आणि त्या फोटोच्या आधारे मग ते इतरांना ब्लॅकमेल करतात असं झालं आहे. - आता राजकीय पुढारी सुद्धा बाबा सोबत फोटो काडताना घाबरतील आणि फोटो देणार नाहीत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के लाडघर समुद्र तट पर बैलगाड़ी दौड़ ने दर्शकों में मचाया धमाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार नुकताच रंगला.. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनाऱ्यावर रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने रविवारी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा अनुभव दिला. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर वेगाने धावणाऱ्या बैलगाड्यांनी उपस्थितांची मने जिंकली. परिसरातील अनेक नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने शर्यतीत चुरस निर्माण झाली होती. अंतिम फेरीत ओंकार आरेकर यांच्या बैलगाडीने अप्रतिम वेग आणि नियंत्रण राखत प्रथम क्रमांक पटकावला. मनीष मोरे यांनी द्वितीय तर सुनील सुर्वे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली.
0
0
Report

शिरूर की सड़क पर प्रसूति: महिलाओं की मदद से बना लेबर रूम, माता- baby सुरक्षित

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भागात आज एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णालय गाठण्यापूर्वीच नियतीने रस्त्यावरच तिची वाट अडवली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, तिला पुढच्या एका मिनिटाचाही प्रवास करणं अशक्य झालं. आणि अशातच शिरूरच्या रणरागिणी धावून आल्या... रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाखाली परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा अडोसा केला. एका रस्त्याचं रूपांतर तात्पुरत्या 'लेबर रूम'मध्ये झालं. केवळ महिलाच नाही, तर माहिती मिळताच डॉक्टरांनीही क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली आणि त्या कठीण परिस्थितीत प्रसूती शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडली. महत्त्वाचं म्हणजे या धावपळीत आणि तणावाच्या वातावरणात माता आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आधुनिक काळात आपण डिजिटल होत असलो, तरी माणुसकीचा ओलावा आजही जिवंत आहे, हेच या घटनेने सिद्ध केलंय.
0
0
Report

बार्शी भगवंत महोत्सव में आनंद Shinde की सुरों की महफिल, हजारों की भीड़

Solapur, Maharashtra:सोलापूर - बार्शीतील भगवंत महोत्सवात रंगली आनंद शिंदेंच्या सुरांची मैफिल, गाण्यांच्या कार्यक्रमाला बार्शीकरांचा तुफान प्रतिसाद बार्शीचे दैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीकरांसाठी भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या भगवंत महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांमध्ये पावसाचा व्यत्यय येत असताना सुद्धा आनंद शिंदे यांच्या खास शैलीतील नवे जुने गाणे ऐकण्यासाठी जवळपास 25 हजारापेक्षा जास्त बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती.
0
0
Report
Advertisement

गांधीनगर उपकार्यालय में 24 लाख 25 हजार 940 रुपये की गबन, जांच तेज

Nashik, Maharashtra:नाशिक मनपाच्या कर वसुलीतील २४ लाख हडपले पंचवटीपाठोपाठ गांधीनगर उपकार्यालयातही गैरव्यवहार उघड पंचवटी विभागीय कार्यालयातील कर वसुलीतील अफरातफरीचे प्रकरण ताजे असतानाच आता पूर्व विभागांतर्गत गांधीनगर उपकार्यालयातही त्याच पद्धतीने घोटाळा उघडकीस आला आहे. येथील नागरी सुविधा केंद्रात कार्यरत कनिष्ठ लिपिक शशिकांत थोरातने घरपट्टी आणि पाणी पट्टीपोटी जमा झालेल्या रकमेपैकी २४ लाख २५ हजार ९४० रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ३० नोव्हेंबर २०२१ ते १८फेब्रुवारी २०२२ या कालावधीत गांधीनगर उपकार कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीपोटी एकूण ४६ लाख ४५ हजार ९९३ रुपये जमा झालेहोते. मात्र, कनिष्ठ लिपिक थोरातने युनियन बँक ऑफ इंडियामधील मनपाच्या खात्यात केवळ २२ लाख २० हजार ५३ रुपयेच भरले
0
0
Report
Advertisement

Lasalgaon ST डिपो में स्मार्ट कार्ड घोटाला: बुजुर्ग यात्रियों से अधिक वसूली

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एसटी आगारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विविध शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वृद्ध प्रवाशांची लूट होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी नियुक्त केलेल्या महिला एजंटकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. साधारण दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये मिळणारे स्मार्ट कार्ड तब्बल अडीचशे रुपयांना दिले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याबाबत प्रवाशांनी थेट आगार प्रमुखांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत आगार प्रमुखांनी तत्काळ कारवाई करत संबंधित एजन्सीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहे. यासोबतच, ज्या प्रवाशांकडून जादा पैसे घेतले गेले आहेत, त्यांना ते पैसे परत करण्याच्या स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

गेवराई में शिवाजी महाराज का पुतला हटाने के साथ भारी सुरक्षा, ट्रैफिक समस्या दूर

Beed, Maharashtra:बीड: गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर हलविण्यात आला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शिवप्रेमी, पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली. सर्वांच्या सहमतीने पुतळा अन्य योग्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने संयमाने भूमिका घेतली. दरम्यान, पुतळा हलविण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
0
0
Report

गर्मी में कुएँ से पिल्ला बचाने वाले विनोद धोंगडे की बहादुरी, गांव में भारी प्रशंसा

Washim, Maharashtra:अशीच एक हृदयस्पर्शी घटना वाशिम जिल्ह्यातील जाऊळका येथे घटना घडली.पाण्याच्या शोधात भटकत असताना एका मांजराचे छोटे पिल्लू विहिरीत पडले.विहिरीत अडकलेल्या त्या निष्पाप जीवाने बाहेर येण्यासाठी केलेली धडपड जीवघेणी ठरत होती हे लक्षात येताचं प्राणीमित्र विनोद धोंगडे या तरुणाने धाडस दाखवत थेट विहिरीत उतरायचा निर्णय घेतला.स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या पिल्लाला स्थानिकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढत त्याला जीवनदान दिले.या मानवतावादी कृतीमुळे गावकऱ्यांनी विनोद धोंगडे यांचे कौतुक केले असून त्यांच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.या घटनेतून उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
0
0
Report

चंद्रपूर शहर के रामाळा तालाब में मछलियों की मौत, दुर्गंध से नागरिक परेशान

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू होत आहे. या मृत माशांमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याच परिसरात हजारो चंद्रपूरकर सकाळ -संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. गेली काही वर्षे रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भात विविध प्रकल्प सुरू आहेत. यात संरक्षक भिंतीसह मलनिस्सारण प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे. या तलावात दोन बाजूंनी येणारे रोजचे हजारो लिटर सांडपाणी तलावातील प्राणवायू संपवण्यास कारणीभूत ठरले आहेत. यावर उपाययोजना असलेली कामे मात्र आराखड्यानुसार होत नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. शहरातील एकमेव शिल्लक राहिलेल्या गोंडकालीन रामाळा तलावाला वाचविण्यासाठी काटेकोर उपाय योजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top