icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मौसम के कहर से सायन पनवेल मार्ग पर ट्रैफिक जाम, चालकों की परेशानी बढ़ी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे, जुईनगर येथे खारघर तुर्भे टनलचे कामं सुरु असून टनल मधून निघणाऱ्या माती सायन पनवेल महामार्गा शेजारून जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात आलेय. नाल्यात माती टाकल्याने नालायचा मूळ प्रवाह बंद पाडून पाणी सायन पनवेल महामार्गावर येतं आहे. सायन पनवेल महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेय. वाहन चालकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असून, याचा आढावा घेतला आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के घुग्गुस में महामाया कोल वॉशरी बंद, 700 परिवार बेरोजगार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरालगत घुग्गुस परिसरात असलेली महामाया कोल वॉशरी अचानक बंदण्यात आल्याने 700 कुटुंबांवर बेरोजगारीचं संकट, प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यात त्यांनी इथल्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस जवळची महामाया कोल वॉशरी अचानक बंद झाल्यामुळे 700 कुटुंबांवर बेरोजगारीचं संकट कोसळलंय. महामाया कोल वॉशरी मुळे प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या भागाचा दौरा केला होता. विशेष म्हणजे विधानसभेच्या या अधिवेशनात देखील महामाया कोल वॉशरी वर कारवाई न झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उचलण्यात आला होता. त्यामुळे प्रदूषण विभागाने या कोल वॉशरी ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच कोल वॉशरी व्यवस्थापनाने ही कोल वॉशरी तातडीने बंद केली आहे. मात्र यामुळे या भागातील 700 कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळलं आहे. घुग्गुस परिसरातील इतर प्रदूषणकारी उद्योग राजकीय नेत्यांना दिसत नाही का असा सवाल या मजुरांनी उपस्थित केल्याय. बाईट १) ,२) बेरोजगार झालेले मजूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

नवी मुंबई मनपा सिटी मोबिलिटी प्लान के तहत उड़न पुल बनेंगे

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा राबविणार सिटी मोबिलिटी प्लॅॅन, वाशी ते घणसोली दरम्यान होणार उड्डाणपुल. नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी नवी मुंबई मनपातर्फे सिटी मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलााय. त्यानुसार रबाळे, पावणे, फायझर आणि किल्ले जंकशन येथे उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. यासोबतच वाशी ते कोपरखैरणे मार्गावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाशी मधील ब्लूडायमंड चौक ते घणसोली दरण्यांना उड्डाणंपुल उभारण्यात येणार असून या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
0
0
Report

चंद्रपुर बाळ विक्री मामले में दो महिला नेता गिरफ्तार, सांसद-राजनीतिक लिंक पर उठे सवाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर शहर में कुछ दिनों पहले सामने आए बच्चों की बिक्री मामले में दो महिला नेताओं को गिरफ्तार किया गया है। ये महिलाएं एक राजनीतिक दल से जुड़े होने की जानकारी के अनुरूप सामने आईं। एक महिला ने अपने पेट से जन्मी दो बच्चों की बिक्री की घटना मई में चंद्रपुर में सामने आई थी। इसके बाद यह समय के साथ क्रियाकलाप शुरू हुआ कि लिव इन और अनैतिक संबंधों से जन्मे नवजात बच्चों की बिक्री चल रही है या नहीं।_ram_नगर_पुलिस_कथन_के_अनुसार_आरोपी_महिला_को गिरफ्तार किया गया। न्यायालय ने दोनों महिला नेताओं को न्यायिक हिरासत में भेज दिया है। परीक्षण-गोपनीयता के कारण पक्षों के नाम प्रकाशित नहीं किए गए। इस मामले में 15 वर्षीय पीड़िता के विरुद्ध अत्याचार करने वाले आरोपी और माता-पिता सहित बच्चों की खरीद-फरोख्त से जुड़े लोग भी जांच के दायरे में हैं।
0
0
Report
Advertisement

भास्कर भगरे: NCP में फूट-परिवार नहीं, पवार के नेतृत्व में सभी एकजुट

Niphad, Maharashtra:पिंपळगाव बसवंत येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारच्या फूट किंवा पक्षांतराबाबत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत केवळ पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबतच चर्चा झाली असून, कुणी पक्ष सोडणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार अशी कोणतीही चर्चा झालेली नाही मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एकत्र असून, राजकारणात विविध चर्चांना उधाण येत असते कामानिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्या तरी त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे , प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे पक्ष संघटनेसंदर्भातील तसेच भविष्यातील सर्व निर्णय घेण्याके अधिकार शरद पवार यांना देण्यात आले असून, ते जो निर्णय घेतील त्यामागे पक्षाचे सर्व खासदार ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही खासदार भास्कर भगरे यांच्या व्यक्त केला
0
0
Report

ठाणे जिले के लिए चार दिन का ऑरेंज अलर्ट जारी, महापालिका सतर्क

Kalyan, Maharashtra:ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; केडीएमसीची यंत्रणा हायअलर्टवर महापौर व आयुक्तांकडून कमांड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा सखल व पूरप्रवण भागांवर विशेष नजर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये महापालिकेचे आवाहन. तर आपत्कालीन मदतीसाठी 0251-2211866 आणि 1800-233-0045 या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन. कळघाल्डील दोन्ही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देत पूरप्रवण आणि सखल भागांवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.दरम्यान, हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

तुळजाभवानी देवी की इनामी जमीन घोटाला: 4121 एकड़ जमीन निजी हाथों में

Dharashiv, Maharashtra:धाराशिव तुळजाभवानी देवीची हजारो हेक्टर इमानी जमीन परस्पर लाटली. महसूल मंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. अधिकाऱ्याने संगणमत करून 4हजार121 एकर जमिनीची खरेदी विक्री केली. मंदीर महासंघाची राज्य सरकारकडे तक्रार. भक्ताने दान केलेल्या सोने चांदीच्या घोटाळ्यानंतर आता तुळजाभवनी देवीच्या इनामी जमिनीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. निजाम सरकारने तुळजाभवनी देवीला दिलेल्या इनाम जमिनी नियमबाह्य पद्धतीने खाजगी व्यक्तीच्या नावाने हस्तांतरित केल्याचा आरोप होतो आहे. जवळपास 4हजार 121 एकर जमीन नियमबाह्यरित्या खाजगी व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे राज्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तुळजाभवानी देवीच्या इनामी जमिनी घोटाळ्याची यापूर्वीही अनेक घटना उघड झाल्या होत्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान तत्कालीन निजाम सरकारने तुळजाभवनी देवी मंदिर सुमारे 4 हजार121 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही . याला कुळ कायदा ही लागू होत नाही. असे असताना देखील अधिकाऱ्यांनी संगणमत करून ही जमीन परस्पर नियमबाह्य पद्धतीने खाजगी व्यक्तींना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत नेमकं काय सत्य बाहेर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
0
0
Report

अमरावती में पति ने पत्नी को रिश्तेदार के हवाले कर बार-बार अत्याचार; जांच शुरू

Amravati, Maharashtra:पत्नीला नातेवाईकाच्या हवाली करून तिच्यावर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह दोन आरोपींविरुद्ध रहिमापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीनेच एका नातेवाईकाकडे सोपवले त्यानंतर संबंधित नातेवाईकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी रहिमापूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा प्रकार घडला याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

एल-नीनो के असर से येवला तालुक में पेयजल संकट, 117 स्थानों पर टैंकर पानी दे रहे

Yeola, Maharashtra:एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने परिणामी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे ४७ गावे आणि ७० वादी-वस्त्यांसह एकूण ११७ ठिकाणी शासनाच्या वतीने ४७ टँकरद्वारे दररोज ८४ फेऱ्या करून सुमारे ७० ते ८० हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे येत्या पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून टँकरच्या संख्येतही वाढ करावी लागू शकते, अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली
0
0
Report
Advertisement

मनरेगाकी 38 हजार से अधिक काम अपूर्ण, VBजी रामजी योजना से 125 दिन रोजगार

Amravati, Maharashtra:मनरेगातील 38 हजारांहून अधिक कामे अipment अपूर्ण; कालपासून व्हीबी जी रामजी योजनेची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे. मनरेगाला पर्याय व्हीबी जी रामजी योजना पर्याय ठरणार असून अंपूर्ण विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून निधी आणि पूर्णत्वाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ग्रामीण रोजगारासाठी नवा कायदा लागू करण्यात आला आहे. दरम्यान काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता नव्या योजनेत महत्त्वाची तरतूद करत पेरणी ते कापणीतील सार्वजनिक कामे 60 दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन असणार आहे. अमरावतीत हजारो विकासकामे रखडली असून नव्या योजनेमुळे ही कामे पूर्ण होणार का याची उत्सुकता वाढली आहे. व्हीबी जी रामजी योजनेने ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून मनरेगानंतर ग्रामीण रोजगाराचा नवा अध्याय. 125 दिवसांच्या हमीची घोषणा करण्यात आली आहे.
0
0
Report

वर्धा के आष्टी में भारी बारिश, बेलोरा गांव का संपर्क टूट गया

Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग आष्टी तालुक्यात पावसाचा हाहाकार; बेलोरा गावाचा संपर्क तुटला नर्सिंगपूरमध्ये शाळेत पाणी; बकऱ्या गेल्या वाहत Anchor - वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे बेलोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.दरम्यान, नर्सिंगपूर येथेही पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने शाळेच्या परिसराचे मोठे नुकसान झाले. तसेच पाण्याच्या वेगवान प्रवाहात काही बकऱ्या वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top