icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंदी में: ईद के ठीक पीछे चंद्रमुखी बकरा ‘बादशाह’ ने बाजार में मचाई धूम

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे... भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्या कडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय... या बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरत आहे... मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे... विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत... अनेक ठिकाणी अशा बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याच्या बातम्यांमुळे आता गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या “बादशाह” कडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत या संदर्भात बादशहाचे मालक गजानन जेजुरकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

सांगली में हमाल संघटन ने सरकार के आदेश के खिलाफ अनिश्चित उपवास शुरू किया

Sangli, Maharashtra:सांगली मध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 24 एप्रिल रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्यामध्ये रेशनिंग धान्य पुरवठा मध्ये थेट वाहतूक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे, सरकारच्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामातील आम्हाला यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश रद्द करून त्यामध्ये दुरुस्त करावी, अशी मागणी करत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के राहुड में कर्ज और मौसम बदले से परेशान किसान ने की आत्महत्या

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात राहुड येथे गुलाब निकम यांची गळफास घेऊन आत्महत्या, गावात शोककळा. Anc: नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहूड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (वय ५९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने राहुडसह काटवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुलाब निकम यांची स्वतःची सुमारे तीन एकर शेती कसून पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीच्या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या निकम यांच्यावर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदाच्या हंगामात त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उरलेला कांदा बाजारात विकला असता त्याला मातीमोल भाव मिळाल्याने त्यांच्या आर्थिक कोंडी आणखी तीव्र झाली होती. नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे उरकायचे, या चिंतेने ते सतत विवंचनेत राहत होते. वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना चारा टाकण्यासाठी ते काल गावाशेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले होते मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे his निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन राहुड गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0
0
Report

शंकर महादेवन ने साई दरबार में भजन से भक्तों को मंत्रमुग्ध किया

Shirdi, Maharashtra:प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले… साई दरबारात आल्यानंतर भजन गाण्याचा मोह त्यांना आवरला नाही… आपल्या सुरेल आवाजात त्यांनी साईभजन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले…जगात शांती नांदावी अशी प्रार्थना त्यांनी साईचरणी केली तसेच शिर्डी साईमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानने निमंत्रण दिल्यास आनंदाने भजनाचा कार्यक्रम सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले…दरम्यान, साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी शंकर महादेवन यांचा सत्कार केला…
0
0
Report

अकोला में पेट्रोल-डीजल महंगाई के विरोध में बैलगाड़ी मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आह्वान

Akola, Maharashtra:Anchor : वाढती महागाई आणि सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून बैलगादी, सायकल आणि गाढवाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टीका केली. खाजगी कंपन्यांकडून बांगलादेश आणि नेपाळला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्यामुळे देशात कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
0
0
Report
Advertisement

बीड में नीट पेपर फूटे के विरोध में जिला कार्यालय के बाहर प्रदर्शन

Beed, Maharashtra:बीड: नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. या प्रकरणात शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संपत्ती जप्त व्हावी या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींच्या फोटो फलकावर फुल्या मारण्यात आल्या. नीट पेपर फुटीचे धागेदोरे बीड पर्यंत आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
0
0
Report

पेट्रोल संकट के बीच महाराष्ट्र में चुनावी बहस तेज, सरकार पर सवाल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन पेट्रोल तुटवडा.... तीन महिन्यापासून प्रश्न आहे मात्र मधल्या काळात निवडणूक होत्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सुख समाधानसारखं आल्यासारखं दाखवलं,राज्यात ग्रामीण भागात देखील रंग लागल्या आहे.मशागतीचे काम असल्याने इंधन गरजेचे आहे.सरकारचे हे अपयश आहे.अमृत काळाचा गोष्टी मारायच्या आणि दोन लिटर इंधन मिळत नाही. - ऑन इंधन काळाबाजार महाजन... ही बोलबच्चन कातडी बचाव भूमिका आहे.काळाबाजार होत असेल तर तुमची यंत्रणा झोपली का?काळाबाजार करणार हे सरकारच आहे.यामुळे फालतू भूमिका मांडणे सरकारने थांबवले पाहिजे होते. परवा माझी स्वतःची गाडी रात्री एक पर्यंत रांगेत होती.मी काँग्रेस वाला आहे का? शेतकऱ्यांना राजकारणी म्हणू नये - ऑन नितेश राणे..... दहशत वाड्यांचे अड्डे असेल मदरश्याला सरकार का मदत करते?सरकार झोपले आहे का? - ऑन पुणे महिला बेपत्ता.... ही पुण्याची परिस्थिती आहे संभाजीनगर मध्ये रोज तीन महिला बेपत्ता होतात.मुंबईत यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे.यावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात?सरकार फक्त बोटचेपी भूमिका घेत आहे. - ऑन विधान परिषद शिंदे मागणी... विधान परिषद निवडणुकीत कोंडी वाढत जाणार आहे.सरकार मध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची मोठी कोंडी झाली आहे. - ऑन चित्रपट महामंडळ निवडणुक मेडिकल कॉन्सिल निवडणुकांमध्ये तसेच चित्रपट निवडणुकीत भाजप वा सत्ताधार्यांनी नेत्यांची जायची का गरज आहे.सगळीकडे नाक खुपसायची सवय आहे.या गोष्टी अराजकतेकडे जात आहे. - ऑन वडेट्टीवार मतदार संघ... निवडणूक दूर आहे,निवडणूक आयोग अस बोलत असतो.सत्ताधारी पक्षाचे असेल तर झाकून ठेवतील विरोधक असतील तर पकडतील. जय पवार पोस्टर... - प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत आहे.अजित दादा असताना मुलांना संधी मिळाली नाही आता मिळते आहे. - ऑन पोलिस/ नितेश राणे.... पोलिसांनी काय खाव हे राणे नि ठरवायचं का? तू कोंबडा खातो ते चालते का? हुतात्मा स्मारक त्याची दुरवस्था आहे सत्य आहे मात्र त्याचीअवहेलना होऊन नये अशी अपेक्षा आहे... - ऑन मोटेगावकर..... नीट ची तयारी करणाऱ्यांना पाणी शिंपडण्याचे गोष्टी करत असेल तर कठीण आहे - ऑन शिंदे उडघटनाला गैरहजर यावर मी काय बोलणार? माझ्या माहितीप्रमाणे ते दिल्लीला गेले आहे.त्यांच रूसने नेहेमीच आहे. ऑन गडकरी.... गडकरी नेहेमी अस बोलत असता चांगले काम करणारे ओळखे जातात,त्यांच्याच पक्षातील लोकांना ते बोलले असणार आहे. - ऑन वाळू वाहतूक... सत्ताधारी पक्षाचे लोक वाहनांवर फोटो लावून रात्री बे रात्री वाळू वाहतूक होते.पोलिस हप्ते वसुलीत व्यस्त आहे. - ऑन मोदी सरकार १२ वर्ष.... १२ वर्ष चांगले गेले आहे.अब नाही महेंगाइ की मार,पेट्रोल डिझेल १०० पार गेले आहे.खत २५०० पर्यंत गेले आहे.यामुळे मोदींचे १२ वर्ष बेमिसल आहे. - ऑन कांदा.... महाविकास आघाडीची चांदवड येथे कांद्यासाठी आंदोलन होणार आहे त्यासाठी मी जाणार आहे.या नंतर मंत्रालयात आंदोलन करू..
0
0
Report
Advertisement

नाशिक केंद्रीय जेल में आरोपी संग अधिकारियों की पार्टी का वीडियो वायरल, जांच शुरू

Nashik, Maharashtra:नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांचा एका संशयित आरोपीसोबत पार्टी करतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागं झालंय... या प्रकरणाची आता अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली असून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तीन तुरुंग अधिकाऱ्यांना सात दिवसांत या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत... नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आलेला गौरव मिश्रा या संशयित आरोपी सोबत या अधिकारी यांनी पार्टी करतानाचे व्हिडिओ viral झाले आहेत.. मिश्रा एका फसवणूक गुन्ह्यात तुरुंगात होता... जामिनावर बाहेर आल्यानंतर गौरव मिश्रा याच्यासोबत काही कारागृह अधिकाऱ्यांनी कथित दारू पार्टी केल्याचा वीडियो सध्या viral होत आहेत.. आता कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे... व्हायरल व्हिडिओमध्ये हिरालाल भामरे, जगदीश ढुमने आणि अशोक मलवाड हे तीन अधिकारी दिसत असल्याची माहिती समोर आली आहे... विशेष म्हणजे ही पार्टी कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाबाहेर झाल्याचंही सांगितलं जात आहे... दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार असल्याची माहिती नाशिक कारागृह प्रशासनाचे मुख्य अधीक्षक यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना के वडिगोड्री किसान महावितरण के 11 केवी उपकेंद्र पर टाले, आपूर्ति बाधित

Jalna, Maharashtra:जालन्यातील वडीगोद्रीत शेतकरी आक्रमक, महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राला ठोकले टाळे जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील 11 केव्ही उपकेंद्राअंतर्गत नालेवाडी,रेणापूरी, गोंदी,शहागड,टाका या गावातील शेतीपंपाला होणारा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसापासून खंडित करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वडीगोद्री येथील महावितरणच्या 11 केव्ही उपकेंद्राच्या कार्यालयाला टाळे ठोकले.. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून आक्रमक शेतकरी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसलेले आहेत.दरम्यान जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालय सुरू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top