icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बुलढाणा में रोहित पवार बनाम गायकवाड समर्थकों के बीच हाई-व्होल्टेज ड्रामा

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात राजकीय पारा चढणार! रोहित पवार विरुद्ध गायकवाड समर्थक आमनेसामने? उद्या बुलढाण्यात राजकीय 'हाय-व्होल्टेज' ड्रामा; रोहित पवारांच्या वाचन आंदोलनामुळे वातावरण तापणार.. ठळक मुद्दे: पुस्तकाच्या सार्वजनिक वाचन: 'शिवाजी कोण होता' या गाजलेल्या पुस्तकाचे रोहित पवार सार्वजनिक वाचन करणार आहेत. त्यांच्यासोबत या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी देखील उपस्थित राहणार आहेत. गायकवाड समर्थकांचा इशारा: रोहित पवारांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गायकवाड समर्थकांनी पोलिसांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'अपशब्द खपवून घेणार नाही': निवेदनात म्हटले आहे की, "रोहित पवारांचे शहरात स्वागतच आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जरूर वाचावेत. मात्र, वाचनाच्या बहाण्याने आमदार गायकवाड यांच्याबद्दल अपशब्द काढल्यास ते सहन केले जाणार नाही." रोहित पवारांची एन्ट्री आणि दुसरीकडे स्थानिक समर्थकांचा इशारा, यामुळे उद्या बुलढण्यात मोठा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा चोख पोलीस बंदोबस्त राहणार यात शंका नाही , या 'हाय व्होल्टेज' राजकीय नाट्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
0
0
Report

घोटी में अवैध आश्रम, पानी चुराने और प्रसाद के लालच पर बड़ा खुलासा

Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या घोटी मधल्या भोंदू बाबा मनोहर भोसले याचे कारनामे, आश्रम मधील बांधकामे बेकायदेशीर, पाझर तलावात केले अतिक्रमण, स्वतःच्या शेतात शेततळे करून शेतकऱ्यांचे पाणी पळवले, तर आलेल्या भाविकांना 2 हजार रुपयांना विकला जातो पेरूचा प्रसाद मनोहर भोसले याने उंदरगाव मधून आपला गाशा गुंडाळल्यानंतर मागील पाच वर्षापासून घोटी गावामध्ये 27 एकरामध्ये आपला आश्रम चालू केला. या आश्रमासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नाही इथे बेकायदेशीर बांधकामे त्याने केली आहेत घोटीचे सरपंच विलास काका राऊत यांनी ही आश्रम बंद करावा तसेच इथली बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकावीत अशी मागणी केली आहे तसेच गावातील पाझर तलावाचा वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर मनोहर भोसले यांनी दबाव टाकण्याचे हेतूने माझ्या वाढदिवसाला 90 आमदार आले होते पुढच्या वाढदिवसाला 145 आमदार येतील तसेच राज्यातील एका नेत्याला मुख्यमंत्री बनण्यासाठी आपण 50 आमदाराची जोडणी करून देऊ असं सांगितल्याच्या बाताही त्याने मारल्या होत्या. मनोहर भोसले याने आपल्या शेती शेजारी पाझर तलावामध्ये पाच ते सहा एकर जागेत अतिक्रमण केला आहे या ठिकाणी नारळाची बाग लावली आहे आंब्याची झाडं लावली आहेत घर तयार केलेला आहे जनावरांसाठी गोठा तयार केलेला आहे तसेच या पाझर तलावाच्या भरावाच्या शेजारी शासकीय जागेत 30 फूट व्यासाची भली मोठी विहीर सुद्धा त्यांना तयार केलेली आहे यामुळे येथील नागरिकांना जाण्याचा रस्ता सुद्धा त्यांना बंद केला होता. आता फक्त वीस फुटांपैकी पाच ते सहा फूट रस्ता हा शिल्लक राहिलेला आहे या रस्त्यामध्ये भोंदू मनोहर मामाने अतिक्रमण केल्याचं ग्रामस्थांची तक्रार आहे दहिगाव उपसा सिंचन योजनेतून इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी पाझर तलावात पाणी सोडले जाते मात्र मनोहर भोसले कडून त्याच्या दोन ते तीन एकर मोठ्या शेततळ्यामध्ये या शेतकऱ्यांच्या वाट्याच पाणी उपसा करून हे पाणी साठवलं जातं आणि शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही शेतकऱ्यांचे पाणी पळवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध राहत नाही. एकीकडे मनोहर भोसले च्या 27 एकरामध्ये हिरवीगार बागायत जमीन दिसते तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात ल्या पिकाला पाणी नसल्याचे चित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय घोटी गावातल्या आश्रमाच्या शेजारचे शेतकरी सांगतात अमावस्येला या ठिकाणी शेकडो वाहन येतात आणि या वाहनांच्या पार्किंग साठी मनोहर भोसले कडून 200 300 अशा पद्धतीची पार्किंग फी आकारली जाते तसेच या आश्रमाच्या बागेतील पेरू दोन हजार रुपयांना प्रसाद म्हणून विकला जातो आंबेही अशाच पद्धतीने मनोहर भोसले हा आपला प्रसाद आहे म्हणून भाविकांना विक्री करत असतो या माध्यमातून सुद्धा त्याने लाखो रुपयांची माया जमवली आहे अशा पद्धतीचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे
0
0
Report
Advertisement

विश्वजीत कदम की चुटकी: पडळकर ट्रम्प-लेवल नेता, महाराष्ट्र में हलचल

Sangli, Maharashtra:गोपिचंद पडळकर म्हणजे 'डोनाल्ड ट्रम्प' लेव्हलचे नेते;आ.विश्वजीत कदमांचा गोपिचंद पडळकर यांना मिश्किल टोला अँकर - गोपीचंद पडळकर,हे महान नेते असून पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प लेव्हलचे नेते आहेत असा खोचक टोला काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी विश्वजीत कदम यांच्यावर टीका करताना विशाल पाटलांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नव्हती,हे माहीत होतं,पण तरी देखील त्यांनी हवा करण्याचा प्रयत्न केला होती,अशी टीका केली होती,यावरुन बोलताना कदमांनी,पडळकर हे खूप महान नेते आहेत,ते थेट 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे नेते आहेत,आम्ही भारतात आणि महाराष्ट्रात राहणारे छोटे लोक आहोत, त्यामुळे त्यांच्या लेव्हलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही,"असा खोचक टोला लगावला आहे,सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या नागठाणे येथे बोलत होते. बाईट - विश्वजित कदम - आमदार - काँग्रेस.
0
0
Report

विटा में मातंग समाज का मुंडण आंदोलन, उपवर्गीकरण लागू करने की मांग

Sangli, Maharashtra:Sng_mundan_andolan स्लग - अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी विट्यात मुंडण आंदोलन.. अँकर - अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरण लागू त्या मागणीसाठी सांगलीच्या विटा येथे मातंग समाज बांधवांकडून मुंडण आंदोलन करण्यात आले आहे.विटा शहरातल्या तहसील कार्यालयासमोर मातंग समाज बांधवांच्या वतीने उपवर्गीकरण लागू करण्यासाठी निदर्शने करण्यात आली यावेळी मुंडन करत राज्य सरकारने तातडीने तेलंगणा व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर उपवर्गीकरण लागू करावं, अशी मागणी करत या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे。
0
0
Report
Advertisement

धाराशिव में 400 जिल्हा परिषद स्कूल ढहने से शिक्षा व्यवस्था पर सवाल

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले में शिक्षण व्यवस्था का धक्कादायक सच सामने आया है. अतिवृष्टि के बाद तक़रीबन 1168 में से 400 जिल्हा परिषद स्कूल ढह चुके हैं. गले तक टपकते छतों और जर्जर क्लासरूम में विद्यार्थी जीवन बचा कर पढ़ाई कर रहे हैं. शासन ने बड़ा पैकेज घोषित किया है, लेकिन नौ महीने बीत जाने के बाद भी काम शून्य दिख रहा है. धाराशिव जिले के कई गाँवों में जिल्हा परिषद के स्कूलों की हालत बेहद चिंताजनक है. दीवारें फटीं, छत टपक रही है और क्लासरूम खतरे की चपेट में हैं. बार-बार मांग करने के बाद भी प्रशासन ठोस कार्रवाई नहीं कर रहा है, जिससे ग्रामीणों में गुस्सा है. कई सालों से स्कूलों की हालत खराब है. बार-बार कहने के बाद भी मरम्मत नहीं हो रही. समय पर काम न होने पर आंदोलन की चेतावनी दी जा रही है. इन खतरनाक इमारतों में पढ़ते समय विद्यार्थियों के मन में भय है. कई जगह विद्यार्थियों को क्लास में बैठना भी खतरे के समान है. इसलिए पुराने इमारतों को गिराकर नई शालाएं बनाने की माँग उठती है. वहीं जिल्हा परिषद प्रशासन कुछ स्कूलों की मरम्मती का दावा कर रहा है. बाकी स्कूलों के प्रस्ताव वरिष्ठ अधिकारियों के पास भेजे जाने की बात कही गई है. एक तरफ ‘उन्नत शिक्षा’ के दावे, दूसरी तरफ विद्यार्थियों को मौलिक सुविधाएँ नहीं मिल पा रहीं. विद्यार्थियों की सुरक्षा سوال के घेरे में है और प्रशासन तात्कालिक कदम उठाएगा या नहीं यह बड़ा सवाल है.
0
0
Report

सोलापुर में शराबी विवाद के बाद 21 वर्षीय युवक की हत्या, आरोपी गिरफ्तार

Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग - सोलापूरात झोपेत पाय लागल्याच्या कारणावरून 21 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या ( PKG ) - सोलापुरात शिल्लक कारणावरून तरुणाचा दगडाने ठेचून खून - धक्कादायक घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ - 21 वर्षीय तरुणाच्या हत्तेनंतर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो अवघ्या 21 वर्षाचा आहे. सदर घटनेप्रमाणे पोलिसांनी संशयित आरोपी सोमनाथ नागनाथ जवळकोटे याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. महेशच्या घरात मावस भावाच्या लग्नकार्याची तयारी सुरू होती महेश कामाला गेला असा आमच्या सर्वांचा समज होता मात्र त्या ठिकाणी नेमके काय घडले ते आम्हाला देखील समजले नाही अशी प्रतिक्रिया मृत महेशच्या नातेवाईकांनी दिली आहे. अत्यंत शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हे हाणामारी पर्यंत पोहोचले. दोघेही तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की त्यामध्ये एकाला अक्षरशः आपला जीव गमवावा लागला आहे. आरोपी सोमनाथ जवळकोटे याने यापूर्वी पाच वर्षांपूर्वी शिवशक्ती चौक येथे वादातूनच एकाचा खून केल्याची माहिती समोर येते. आणि शनिवारच्या दिवशी देखील त्यांनी किरकोळ वादातूनच पुन्हा एकदा खून केलाय. आरोपी सोमनाथ जवळकोटे याला न्यायालयाने 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आरोपीचा कसून तपास करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

कृषि सेवा केंद्रों की हड़ताल से किसानों को खाद-बीज-इलाज की कमी का खतरा

Akola, Maharashtra:राज्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्का देणारी बातमी आज राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली असून अकोल्यातही सुमारे पंधराशे कृषी सेवा केंद्र चालक अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला आहे. अकोल्यात कृषी सेवा केंद्र चालकांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. परवाना नियमांमध्ये सुलभता, वाढती कागदपत्रे, तसेच खत आणि बियाण्यांच्या वितरणातील अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या संपामुळे शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या संपामुळे शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात असल्याबुद्ध आहे, लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सरकार आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्यात लवकरच तोडगा निघतो का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

गर्मी में गर्भवती महिलाओं के लिए सावधानी, पानी अधिक पिएं और गर्मी से बचें

Kolhapur, Maharashtra:राज्यात अक्षरशः सूर्य आग ओकत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, याचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होत असल्याचं दिसून येत आहे. शरीरातील पाण्याची कमतरता, चक्कर येणे, तसेच रक्तदाबातील चढ-उतार या समस्या गर्भवती महिलांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. गर्भधारणेच्या पहिल्या ते तिसऱ्या महिन्यांपर्यंत अति उष्णतेचा धोका अधिक असतो. त्यानंतर चौथ्या ते नवव्या महिन्यांदरम्यान उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होत असतात. वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढणे, सूज येणे, तसेच काही प्रकरणांमध्ये अकाली प्रसूतीचा धोका निर्माण होऊ शकतो. उन्हाळ्यात गर्भवती महिलांना होणारे त्रास: - शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास गर्भाशय आकुंचन पावू शकते, त्यामुळे अकाली प्रसूतीचा धोका वाढतो. - उष्णतेमुळे रक्तदाबात चढ-उतार होऊन अशक्तपणा किंवा भोवळ येऊ शकते. - उष्माघात होण्याची शक्यता, ज्यासाठी तातडीने उपचारांची गरज भासू शकते. - आईच्या शरीरातील पाण्याची कमतरता आणि वाढलेले तापमान यामुळे गर्भाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. यश कुशल मार्गदर्शनाखाली उन्हाळ्यात गरोदर महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. आहारात फळे आणि द्रव पदार्थांचा समावेश वाढवावा. बाळाची हालचाल कमी जाणवल्यास किंवा कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य काळजी घेतल्यास गर्भवती महिला आणि बाळ दोघेही सुरक्षित राहू शकतात.
0
0
Report

मंगलवेढ़ा में विवाह धोखा: अविवाहित युवक से 2.7 लाख की ठगी

Pandharpur, Maharashtra:_solapur जिल्ह्यातील मंगळवेढा येथे लग्नाची आस धरून बसलेल्या एका अविवाहित तरुणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, विवाहित महिलेला अविवाहित मराठा तरुणी म्हणून सादर करत त्याच्याशी लग्न लावून देत तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची केल्याचा फसवणूक धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतर काही दिवसांतच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने हा संपूर्ण बनाव समोर आला मंगळवेढा येथील विनायक अवताडे याचे लग्न जमत नसल्याने त्यांनी नातेवाईक नवनाथ लेंडवे यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सुरेखा सूर्यवंशी यांच्याशी संपर्क झाला. १६ एप्रिल रोजी उदगीर येथे भेट झाल्यानंतर, 'कुसुम' नावाची मुलगी मराठा समाजातील असून, लग्नासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी लग्नासाठी २ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून विनायक व त्यांच्या नातेवाईकांनी रोख व ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण रक्कम सुरेखा सूर्यवंशी यांच्या ताब्यात दिली. त्याच दिवशी रात्री उशिरा लातूर येथील गणपती मंदिरात साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर नववधूला मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे आणून नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पु/Eय विवाह सोहळा पार पडला. नवीन संसाराची सुरुवात होत असतानाच गुरुवार, २३ एप्रिल रोजी पहाटे संशयास्पद घटना घडली. घरामागे आलेल्या कारमध्ये बसून नववधू पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. पाठलाग करून मंगळवेढा येथील अवताडे पंपाजवळ वाहन अडवले. यावेळी विनायक आणि नातेवाईकांनी केलेल्या चौकशीत धक्का-दायक माहिती समोर आली. संबंधित महिला विवाहित असून, तिला मुलेही आहेत. तिचे खरे नाव कुसुमबेन बेमाभाई घाटाड असल्याचे उघड झाले. यानंतर वाहनासह सर्वांना मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३१८ (४) व ३ (५) अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---- Byte - दत्तात्रय बोरिगिड्‌डे पोलीस निरीक्षक विनायक अवताडे फसवणूक झालेला तरुण
0
0
Report
Advertisement

नितेश राणे चिखल फेक केस में निर्दोष मुक्त, 504 के तहत सजा

Oras Bk., Maharashtra:नितेश राणे चिखल फेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिख्लमेय झाली होती, त्यावेळी अभियंता प्रकाश खेडेकर यांना नितेश राणे यांनी बोलावलं होतं. त्या परिसराची पाहणी करत असताना शेडेकर यांच्यावर चिखल फेक, व मारहाण करण्यात आली अशी त्यांची तक्रार होती. भारतीय दंड अधिनियम 353, 504, 506 गुन्हा दाखल झाला होता. सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, परंतु 504 सार्वजनिक शांततेचा भंग होणे या पाचशेच्या गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे. एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंड शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार आहोत.
0
0
Report

मोबालगाॅव में शिवप्रेमियों का प्रदर्शन, शिवाजी महाराज के अपमान पर सख्त कार्रवाई की मांग

Nashik, Maharashtra:*Breaking... नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे बागेश्वर बाबा व संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींचे मालेगावात निदर्शने नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध आ. संजय गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीचा निषेध शिवप्रेमींकडून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलकांचा संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मोठ्या संख्येने शिवप्रेमी व विविध संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
0
0
Report

महंगाई के खिलाफ कोल्हापुर में रेशन दुकानदारों के साथ धडक मोर्चा

Kolhapur, Maharashtra:महागाई विरोधात आज रेशनबचाव समितीच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.. रेशनदुकानदारांसह शेकडो ग्राहकांनी भर उन्हात रस्त्यावर उतरून महागाई विरोधात निषेध व्यक्त केलायं..महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणं मुश्कील झालंय..त्यामुळे सरकारने नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर द्यावा , रेशनकार्डवर 5 लिटर राॅकेलसह तुरडाळ ,साखर, गोडतेल , हरभरा डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू द्याव्यात या मागण्या करण्यात आल्या..यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला..दरम्यान सरकारने तातडीने रेशनदुकानदारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top