Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Dec 13, 2025 07:24:04
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 13, 2025 07:04:26
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये एका पक्ष कार्यालयाच्या उदघाटन दिवशी टेंट टाकला होता; दीड महिन्यापासून रस्त्यावर तसाच राहिला आहे. महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करण्यास धजावत नाही. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे गेल्या 22 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. नांदेड शहरातील नाना नानी पार्कसमोरील मुख्य रस्त्यावर उदघाटन प्रसंगी रस्त्यावर टेंट टाकण्यात आला होता. जवळपास 60 फुटाच्या या रस्त्यावर हा टेंट काही भागात बसवण्यात आला आहे. उदघाटन कार्यक्रमानंतर हा टेंट काढला जाईल असं वाटत होते. मात्र दीड महिने उलटूनही हा टेंट रस्त्यात तसाच कायम आहे. महापालिका सध्या शहरात रस्त्यावर अतिक्रमणावर कारवाई करत आहे; पण या अतिक्रमणाकडे महापालिकेचे लक्ष गेले नाही. रस्त्यावर ठीकठिकाणी गाडे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या रस्त्यातील पक्ष कार्यालयाच्या टेंटवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे सेनेने केलीये.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 13, 2025 07:03:44
Pune, Maharashtra:स्लग:- चार बिबटे जेरबंद फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात तीन दिवसात चार बिबटे जर बंद झाले आहेत तर एका बिबट्याने पिंजऱ्या जवळ येऊन पळ काढला आहे दोन दिवसांपूर्वी कीन्ही या गावांमध्ये एका दिवसात दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकले 3क दिवसानंतर याच परिसरात तिसरा बिबट्या देखील जेरबंद झाला तर काही अंतरावर असलेल्या पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय...आतापर्यंत पारनेर तालुक्यात चार बिबटे जेरबंद झालेत...तर याचं तालुक्यात एका बिबट्याने पिंजऱ्याला चकवा दिल्याचेही समोर आले आहे...पिंजऱ्याला चकवा देतानाचा व्हिडीओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरा कैद झालाय...दोन डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता...तर पारनेर तालुक्यातील बिबट्तांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं...दरम्यान चार बिबटे जेरबंद झाल्याने पारनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 13, 2025 06:16:45
Thane, Maharashtra:Thane लोकमान्य नगर याठिकाणी असणाऱ्या करुमेदेव सोसायटी १६ वर्षे जुने बांधकाम या सोसायटीच्या टेरेस वरील रूम हॉलचे प्लास्टर पडले होते. सदर घटनास्थळी मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंतालोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अतिक्रमण विभागाचे कर्मचारी लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते. रूमचे प्लास्टर पडले तेव्हा सदर रूम मध्ये चार व्यक्ती झोपल्या होत्या त्यामधील ०२ व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे येथे प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे Sadar घटनेत मनोज मोरे यांना छातीला दुखापत झाली असल्याने उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे व पुढील कार्यवाही वर्तक नगर पोलीस यांच्यामार्फत सुरू आहे. सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे. टसेच, सदर तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळविणे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 13, 2025 05:36:21
Kolhapur, Maharashtra:कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील रेणुका यात्रेनंतर कोल्हापूरात होणा-या यल्लम्मा देवीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही यात्रा उदं ग देवी उदं च्या जयघोषात आज सुरू आहे. या यात्रेला ओढ्यावरच्या यात्रा म्हणुनही ओळखलं जातं. या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हयातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी मार्गशीर्ष चतुदर्शीला कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीची यात्रा होते. याला कंकण विमोचन सोहळा म्हणुन ओळखलं जातं. श्री जमदग्नीच्या वधानंतर रेणुकादेवीला वैधव्य येते. या विधीसाठी कोल्हापूरातील मानाचे जग कर्नाटकातील सौंदत्तीला रवाणा होतात. तीथली यात्रा झाली की यल्लमादेवी आणि तिच्यासोबत विधवा होऊन देवदासीँ कोल्हापूरात परततात. या सगळ्याचं सांत्वन करण्याचा दिवस म्हणजे यल्लम्मा देवीची यात्रा होय. या यात्रेच्यास येताना भाविक यल्लमादेवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजे दहीभात , अंबिल, वडी -भाकरी , वरना -वांग्याची आणि मेथीची भाजी गाजर , केळी , कांद्याची पात ,लिंबू आणि फळे देवीला अर्पण करतात. हे पदार्थ देवीला अर्पण करुन देवीचे दुख हलक करण्याची प्रथा अनेक वर्षांची आहे. राज्यात अनेक ठिकाणी भरणा-या यात्रा जत्र्यांना वेगवेगळे धार्मिक महत्त्व आहे. असंच महत्त्व कोल्हापूरातील या यल्लाम्मादेवीच्या यात्रेला आहे. त्यामुळचं कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त आवर्जुन देवीच्या यात्रेला हजेरी लावतात.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 13, 2025 05:06:02
Nashik, Maharashtra:गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळ मजुराचा खून करणाऱ्या एकास बिहार, तर दुसऱ्यास उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. दारूच्या वादातून दोघांनी खून केल्याची कबुली दिली. अरविंद ऊर्फ पप्पू पशुपतिनाथ पांडे असे मृत्यू मजुराचे नाव आहे... २९ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळी आढळून आला होता. मुख्य संशयित धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती व मंजय केशव पंडित अशी अटका केलेल्या संशयितांची नावे आहेत. मजुर अरविंदवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत अनोळखी पुरुषाबाबत अंबड, सातपूर एमआयडीसी परिसरात शोध घेण्यात आला.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 05:04:24
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 13, 2025 04:53:46
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऊस कारखान्यांच्या विरोधात सुरू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आले यश - जनहित शेतकरी संघटनेने पुणे साखर आयुक्तालयात समोर केलेल्या आंदोलनाला यश - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाचा दर जाहीर न करणे, ऊसाला साडेतीन हजार रुपये दर देण्याची मागणी, गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी थकीत बिलावर 15 टक्के व्याज देण्याची मागणी करण्यात आली होती - जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख दोन दिवसापासून पुणे साखर आयुक्तालयासमोर करत होते आंदोलन - साखर आयुक्तांनी जनहित शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला दिले आदेश - जिल्ह्यातील कारखानदाराने साडेतीन हजार रुपये उसाचा दर जाहीर करावा अन्यथा कारखाने बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटने कडून देण्यात आला..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 13, 2025 04:53:31
Amravati, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या विधानावर नवनीत राणा यांची जोरदार टीका; तुम क्या थे और क्या हो गये राणा यांचा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “तुम क्या थे, तुम क्या हो गये” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे जी तुम्ही फडणवीसजींना काय बोलता त्यापेक्षा आधी स्वतःला हा प्रश्न विचारा तुम क्या थे और क्या हो गये? असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. हिंदूंच्या बाजूने जेव्हा न्यायालय महत्त्वाचा निर्णय देते, जसे मदुराई येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात दिवा लावण्याबाबत न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय तेव्हा विरोधी पक्षातील नेते त्या न्यायमूर्तींच्या विरोधात जाऊन सह्या करतात. हेच तुमचे खासदार विरोधी पक्षात बसून हिंदूविरोधी भूमिकेचा भाग बनतात आणि त्या पत्रावर सही करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे जी दुसऱ्यांवर टोमणे मारण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील लोकांचे कृत्य पाहा. देशातील हिंदूंच्या भावनांविरोधात जाणाऱ्या भूमिकेचे उत्तर तुम्हालाही द्यावे लागेल अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाईट :– नवनीत राणा, माजी खासदार
0
comment0
Report
Advertisement
Back to top