Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445201

दारव्हा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा प्रतिनिधी-ईश्वर राठोड, दारव्हा

Sept 27, 2025 09:01:21
Shelodi, Maharashtra
हैदराबाद गॅझेटीयर व सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी २६ सप्टेंबर रोजी दारव्हा येथे बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने समाजबांधव, भगिनी, तरुण-तरुणींची उपस्थिती या मोर्चात पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषा, नृत्य व "एक गोर सव्वा लाखेर जोर"घोषणांनी शहरातील वातावरण भारून गेले.मोर्चा गोळीबार चौकात पोहोचला, जिथे तो सभेत परिवर्तित झाला.सभेत अनेक मान्यवरांनी आपल मनोगत व्यक्त केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:39:20
Parbhani, Maharashtra:अँकर - यंदाच्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे, हाता तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय, गोदावरी, दुधना,पूर्णा,पैनगंगा या नदीच्या पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती वाया गेली असून शेतीचा जिवंत स्तर खरडून गेलाय,त्यामुळे शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. तर पिकांचा अक्षरशः चिखल झालाय. त्यामुळे अन्नदाता शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याच नाव घेत नाहीये. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. आता पुढचं वर्ष कसं काढायचं लेकरा बाळाची शिक्षण,मुला मुलींची लग्न कशी करायची याची चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे. या शेतकऱ्याच्या परिस्थितीवर परभणी येथील ग्रामीण कवी राजकुमार नायक यांनी केलेली टीव्हीवाले साहेब जरा ऐका धीराणं - भिजलेल्या सोयाबीनची बातमी कराणं ही कविता समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. या कवितेच्या माध्यमातून राजकुमार नायक यांना आता सरकारपेक्षा पत्रकार अधिक जवळचे वाटतायेत,टीव्हीवाल्यांनी आपली दुःख मांडली तरच शेतकऱ्यांना मोबदला मिळेल अशी आशा आहे,त्यामुळे कवितेच्या माध्यमातून कवी मीडियाला शेतकर्यांची दुःख दाखविण्यासाठी आर्त हाक घालीत आहेत. या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुःख मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केलाय... बघुयात ग्रामीण कवी राजकुमार नाईक यांची टीव्हीवाले साहेब जरा ऐका धिराणं भिजलेल्या सोयाबीन ची बातमी करा ना धमाल कविता.... कविता लावणे- राजकुमार नायक- ग्रामीण कवी,परभणी
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 27, 2025 10:38:44
Nashik, Maharashtra:*भूषण गवई भाषण पॉईंट्स* - नाशिक न्यायालयाची अतिशय सुंदर आणि आधुनिक इमारत आपल्याला मिळाली - माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यात एवढी सुंदर इमारत पाहिलेली नाही - आतून पूर्ण कार्पोरेट लूक, शासकीय इमारतीत प्रवेश करत अस कुठेच वाटत नाही - चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या चेंबरपेक्षा नाशिकच्या मुख्य न्यायाधीशांचे चेंबर मोठे आहे - ज्या इमारतीचं भूमिपूजन करण्याची आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद - या इमारतीसाठी अनेकांचं योगदान - लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच काम सुरू होणार आहे - महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयीन विकासाठी सकारात्मक राहिलेत - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मदत केली - आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तितकेच सकारात्मक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी येता आलं नाही - न्यायालयीन वास्तू उभारतांना सर्वांना सामावून घेण्याचा विचार केला - नाशिकच्या इमारतीत केवळ न्यायाधीश आणि वकीलच नाही तर पक्षकारांसाठी देखील सुविधा - *शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण नाशिकची इमारत पहिली तर नाशिककरांनी आपल्या खटल्यासाठी नव्हे तर सुंदर इमारत पाहण्यासाठी तरी कोर्टाची पायरी चढावी, कोर्ट पाहायला यावं* - महाराष्ट्रात सुरू असलेला लीगल एज्युकेशन प्रोग्राम देशभर सुरू करण्याचा विचार - भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य, बंधुत्व, समता दिलीय - *बाबासाहेब आंबेडकर नेहमीच महात्मा फुलेंना त्यांचे गुरु मानायचे* - फुले शाहूंचे विचार फार थोर - ४ नोव्हेंबर १९४८ ला बाबासाहेबांनी राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट समितीला दिला - काही अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या, काही ना मंजूर केल्या गेल्या - बाबासाहेब म्हणाले, एक व्यक्ती, एक मत या आधारावर राजकीय लोकशाही स्थापन झाली - मात्र जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही उपयुक्त ठरणार नाही - राजकीय स्तरावर आपण समान आणली, मात्र सामाजिक स्तरावर चार कंपार्टमेंटमध्ये विभागला गेलाय - एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाणं शक्य नाही - बाबासाहेब म्हणायचे, सामाजिक आणि आर्थिक समानता आणत नाही तोवर देशाचा लोकशाहीचा भव्य डोलारा कार्यरत राहण्यास अपेक्षित यश येणार नाही - मागील 75 वर्षात देशाचा प्रवास अतिशय सकारात्मक - पार्लमेंटने असे अनेक कायदे केले की ज्यामध्ये सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केलाय - 1973 नंतर भारतीय न्यायव्यवस्थेने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतलेत - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते, की देशाच्या सर्वात गरीब नागरिकाला कमी वेळात आणि कमी पैशात न्याय मिळेल असं काम सर्वोच्च न्यायालय आणि सर्व देशभरातील न्यायालयात होत आहे किंबहुना ते व्हावं ही अपेक्षा
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 27, 2025 10:19:35
Mumbai, Maharashtra:मार्केटिंग स्टोरी  अँकर -- मुंबईत BKC त प्रॉपर्टी एक्स्पो सुरू आहे.यात किच कंपनीचे कार्पोरेट आणि घराला लागणाऱ्या साहित्याचे स्टॉल लावण्यात आलं आहे.अभिनेता अजय देवगण कीच  चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.कीच चे साहित्य ४२ देशात निर्यात केले जाते.कीच चे साहित्य ज्यात रेलिंग,बाथरूम साहित्य,डिजिटल लॉक, दरवाजे त्याचे साहित्य असून आंतरराष्ट्रीय मानकानुसार तयार करण्यात आले आहेत.दिल्लीतील सेंट्रल विस्टा,बुलेट ट्रेन या ठिकाणी रेलिंगचे साहित्य वापरण्यात येते आता सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी लागणे साहित्य देण्यात येत असल्याचे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भरत हपानी यांनी सांगितले आहे.अभिनेता अजय देवगण यांचे चित्रपट सृष्टीत १९९१ मध्ये पदार्पण झाले आणि कंपनीची स्थापना १९९२ मध्ये झाल्याने त्याला ब्रँड ॲम्बेसेडर करण्यात आल्याचेही भरत हपानी यांनी सांगितले. Byte - भरत हपानी मॅनेजिंग डायरेक्टर कीच  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ८२ Slug -- Kitch Marketing story 
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 10:19:26
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 10:19:17
Hingoli, Maharashtra:अँकर- हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ४ वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अलर्ट‌ देण्यात आला असून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड‌ जिल्ह्याला रेड अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळापैकी 19 मंडळात माध्यरात्री अतिवृष्टी झालीय, वसमत आणि हयातनगर मंडळात 128 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर सकाळ पासून पावसाला खंड नाहीये, आज दुपारी चार वाजे पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सर्व धरण, साठवण तलाव तुडुंब भरले असून सर्व नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक महत्त्वाचे महामार्ग बंद पडलीयेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय, वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात मधुमती नदीचे पाणी शिरल्याने गावातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे.. हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी १९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हयातनगर मंडळात १२८.८ मिलीमिटर, वसमत १२८.८, आंबा ११२, गिरगाव ६७.५, हट्टा ७३, टेंभूर्णी ७८.३, कुरुंदा १०४.८, औंढा ७७.८, हिंगोली ८०, सिरसम ८०, डिग्रस कऱ्हाळे ७१.३, माळहिवरा ८०, कळमनुरी १०३.८, वाकोडी १०७, डोंगरकडा ७०, येहळेगाव ७१.३, साळणा ६६.३, जवळा ६६.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 27, 2025 10:08:46
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे कापसाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतात फुटलेला कापूस ओला राहून सडत आहे, त्यामुळे बोन्ड सडण्याचे प्रमाण वाढले आहे. Vo 1 : दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ‘सीतादही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या तोडणीला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाचा जोर कमी न झाल्याने आणि हवामान अनुकूल न ठरल्याने कापसाची तोडणी सुरूच होऊ शकलेली नाही. शेतात पिकलेला व फुटलेला कापूस ओलसर राहिल्यामुळे कापसाची गुणवत्ता घटली असून बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळण्याची शक्यता नाही. Byte : सचिन बोदडे , शेतकरी Vo 2 : याशिवाय, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततचा पाऊस, ओलसर हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोग व कीड नियंत्रणात येत नाही. कपाशी पिवळी पडली असून शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. Byte : मनोज गावंडे , शेतकरी. Vo 3 : कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. मात्र, यंदा अतिवृष्टी, बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी हंगामभर कर्ज काढून शेती करतात. परंतु पिकाचे उत्पादन घटल्याने व बाजारात भाव न मिळाल्याने त्यांना कर्ज परतफेडीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.परिस्थिती लक्षात घेता अकोला जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली जात आहे. शेतकरी संघटना व स्थानिक नेतेही शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी, अशी जोरदार मागणी करीत आहेत. Byte : दिलीप नाईक , शेतकरी . Final Vo: या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 27, 2025 10:08:21
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 27, 2025 10:01:06
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 27, 2025 10:00:11
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:49:22
Nagpur, Maharashtra:Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On नुकसान * आता झालेला अंदाजे नुकसान 50 लाख हेक्टरच्या जवळपास आहे.. * पावसामुळे मराठवाड्यातील जिल्हे उद्बसत झाले, जनावर वाहून गेले, शेतकरी,जमीन उध्वस्त झाली.. * शेतीतील कांदा, मका टोमॅटो, पाऊस आणि येलो मॅजिक रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला.. * शंभर टक्के पीक नष्ट झाली..त्यामुळे आता केवळ आम्ही पंचनामे करू असे म्हणण्यापेक्षा शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवून केंद्राची टीम बोलवा.. आणि मदत बोलवा... On बावनकुळे * त्यांना माझे म्हणणे आहे...पंजाबमध्ये आम आदमीची सरकार आहे. त्यांना 50 हजार रुपये हेक्टर मदत शक्य आहे तुम्हाला का नाही... * मग लोकांना तोंड दाखवायला कश्याला बांधावर गेलात.. इथे शंभर टक्के नुकसान झाल्याने मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे... * पंजाब सरकारला शक्य आहे ते तुम्हाला के शक्य नाही.. तुम्ही गोट्या खेळताय का..? On राहुल गांधी दौरा... * आम्ही महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे.. ज्यावेळी त्यांची दौरा ठरेल त्याची काही नक्की माहिती सांगता येणार नाही.. On लक्ष्मण हाके नाराज * लक्ष्मण हाके यांना काल मी बोललो, त्यांच्या कार्यकर्त्यांना हल्ले, प्रचंड मारहाण होत आहे. * ओबीसी मरत असताना सरकारची मदतीची मानसिकता नाही.. * सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली.. * मराठा समाजाच्या काही खोडसाळ, विचित्र मुलाकडून मारहाण झाली.. * मात्र त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही... कायद्या हातात घेऊन चालू असलेली दादागिरी का थांबविली जात नाही... * बीड मध्ये होणाऱ्या मेळाव्यात हाकेना का बोलवलं नाही.. तो मेळावा सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे का..? * भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.. On बीड ओबीसी मेळावा रद्द * त्या भागातील शेती उध्वस्त होत असताना.. मेळावा रद्द केला.. ही चांगली गोष्ट आहे..याचा आम्ही स्वागत करतो.. On आय लव्ह मोहम्मद, महादेव * नितेश राणेंना मंदिर मज्जिद तेच हव, आणि भाजपला देखील तेच पाहिजे.. कोणी बोर्ड लावला त्याच्यावर कारवाई करून वाद संपवायला पाहिजे.. * परंतु जाणून बुजून असे धंदे आपणच करायला लावायचं, आणि आपसात भांडण लावायचे आणि सत्तेची पोळी खायची असे हे चालबाज आहे... * काही न करता हिंदू मुस्लिम , मोहम्मद ,महादेव करत राहिला तर लोक मदत करत राहतील.. म्हणून हे सगळं सरकार पुरस्कृत आहे असा आमचा थेट आरोप आहे..
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 09:35:23
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_TRIBAL_MORCHA ( single file sent on 2C)  टायटल:-- आदिवासी आरक्षणात बंजारा- धनगर समावेशाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आदिवासी समाज संघटनांनी काढला भव्य मोर्चा, आदिवासी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्याना मदत करणाऱ्या मंत्री- आमदारांना आंदोलकांनी दिला इशारा अँकर:-- राज्यातील आदिवासी आरक्षणात अन्य समाजाच्या समावेशा विरोधात आंदोलनाची धग बघायला मिळत आहे. आदिवासी आरक्षणात बंजारा धनगर जात समूहाच्या समावेशाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आज आदिवासी समाज संघटनांनी एका संयुक्त मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा आदिवासी समाज कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. राजुरा उपविभागातील आदिवासी संघटना कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यात या प्रश्नाला वेगळी किनार आहे. आदिवासी आरक्षणातील घुसखोरांना मदत करणाऱ्या समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना आंदोलकांनी मोर्चा काढून सज्जड इशाराच दिलाय. बाईट १) मयपाल मडावी, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top