icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोथरुड में बदमाश गैंग का कोयता हमला, युवक गंभीर रूप से घायल

Pune, Maharashtra:कोथरुडमध्ये कुख्यात गुंड घायवळ टोळीचा राडा, तरुणावर फिल्मी स्टाईल कोयत्याने वार!!! पुणे- शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कोयताधारी टोळीने राडा घातला. मध्यवर्ती कोथरुड परिसरात कोयता गॅंगने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकण हॉटेलसमोर घडली आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने दोन वर्मी घाव घातले आहे. त्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला आहे. फिल्मी स्टाईल मुळशी पॅटर्न प्रमाणे धावपळ करत टोळक्याने तरुणावर वार केल्याने खळबळ उडाली आहे. अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. कोथरुड ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, फिल्मी स्टाईल कोयता हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान, एका कुख्यात टोळी प्रमुखाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे संबंधित टोळीशी निगडित असलेल्या साथीदारांनी तरुणाला भर रस्त्यात कोकण हॉटेलजवळ गाठले. हाताने मारहाण केल्यानंतर लपवलेले कोयते बाहेर काढून थेट हल्ला चढवला. कोयत्याचे दोन वार अमितच्या डोक्यात लागले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

चंद्रपूर के पलसगाव जंगल में बेशुद्ध कर पकडते वक्त टाइगर की मौत; पोस्टमार्टम शुरू

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातील पळसगाव जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू, या हल्लेखोर वाघाला जेरबंद करून निसर्गमुक्त केल्यानंतर पुन्हा हल्ल्याचे वर्तन आढळल्यावर जेरबंद करण्याची सुरू होती कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव जंगलालगत लोकवस्तीच्या परिसरात आज एका वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले जात असताना त्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात या वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. 28 जून रोजी चोरगाव परिसरात या वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले होते. प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद दलाने ४ जुलै त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते. त्यानंतर नियमानुसार वाघाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या वाघाने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून संबंधित वाघाच्या हालचालींवर वन विभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. आज या वाघाला आमिष बांधून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वाघास बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल मागविण्यात येत आहे. हा वाघ अशक्त दिसत होता. त्यातच बेशुद्धीच्या इंजेक्शनची मात्रा अधिक झाल्याने मृत्यू ओढविला असल्याचे सांगितले जात आहे.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत रामनगर राम मंदिर में रामरक्षा पठण, ऊर्जा और संघ-राजनीति पर चर्चा

Nagpur, Maharashtra:नागपूर: नागपूरात दाखल झाल्यानंतर शिवसेना UBT नेते, खासदार संजय राऊत लगेच रामनगर राम मंदिरात पोहोचले आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवि वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर संजय राऊत यांचा रामरक्षा पठण या मंदिरातच होईल अशी प्रतिक्रिया दिली गेली. रामनगर राम मंदिरात प्रवेश करताच मी रामाच्या प्रेमात पडलो, येथे सकारात्मक ऊर्जा असल्याची भावना व्यक्त केली. आम्ही राम रक्षा पठणच करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा संघाचे पदाधिकारी असतील तर सुद्धा आम्ही निमंत्रण देणार. राम सर्वांचे आहे; नेते आल्याजात राहतील, परंतु कार्यकर्ते राम रक्षा पठणात येतील. रामनगर राम मंदिरात रामरक्षा पठण करण्यास कोणतीही हरकत नाही परंतु मंदिराबाहेर नसून प्रभु श्रीरामांसमोरच व्हावे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सत्काराचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शांततेत होणार आहे. शिवसेनेचे विदर्भातून ४-५ हजार कार्यकर्ते येण्याची शक्यता व्यक्त केली गेली.
0
0
Report

एसआईआर सर्वेक्षण के दौरान 68 वर्षीय वृद्ध महिला की मौत, परिजनों ने अधिकारी पर आरोप

Mumbai, Maharashtra:मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी परिसरात एसआयआर सर्वेक्षणादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. ६८ वर्षीय एका वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयआर सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ६८ वर्षीय महिलेला पहिल्या मजल्यावर येण्यास सांगितले. वृद्धापकाळामुळे चालण्यात अडचण असूनही त्या पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि रक्तदाब वाढल्याने त्या जागीच पडल्या उपस्थितांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेची शारीरिक परिस्थिती लक्षात न घेता त्यांना वर बोलावल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में नाबालिग दुचाकी चालकों के अभिभावकों को पुलिस ने कड़ी फटकार दी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेत आज चक्क अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांच्या पालकांचा पोलीस अधीक्षकांनी क्लासच घेतला. मागील आठवडाभरात वाहतूक नियंत्रण शाखेने चंद्रपूर शहर- जिल्ह्यात मिशन मोडवर कारवाई करत दुचाकी चालवणाऱ्या 65 अल्पवयीन मुला-मुली विरोधात कारवाया केल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रस्ते अपघातात एक मृत्यू ओढवत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला यावर नियंत्रण आणण्याची कामगिरी सोपविली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या आवारात पोलीस अधीक्षकांनी अल्पवयीन दुचाकी चालवणारे मुले- मुली आणि त्यांच्या पालकांना या संदर्भातले कायदे, गुन्हा घडल्यास उद्भवणारी स्थिती आणि 25 हजार रु. चा जबर दंड याबाबत सविस्तर माहिती दिली. आपल्या, रस्त्यावरील नागरिकांच्या आणि पालकांसाठी अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी चालवायला देऊ नका असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
0
0
Report

डोंबिवली अस्पताल डॉक्टर-नर्स मारहाण केस: रमेश म्हात्रे को 50 हजार के जमानत मिली

Kalyan, Maharashtra:"डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; न्यायालयाकडून ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर" डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर. कल्याण न्यायालयाचा निर्णय; ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन. रमेश म्हात्रे यांची वैद्यकीय स्थिती आणि इतर बाबींचा विचार करून न्यायालयाचा आदेश. सरकारी पक्षाचा विरोध; जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. 121 आरोपीचे वकील के एस काझी
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में सीमा विवाद: वन विभाग ने किसानों की फसल ट्रैक्टर से बर्बाद कर दीं

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर नवी आगळीक, तेलंगणा वनविभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरविले अँकर:- महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूरसह सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर (खुर्द), कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर अचानक कारवाई करत वृक्षलागवडीचे कारण देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढला असून, शेतकरी न्याय आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
0
0
Report

बदलापुर में स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज, पुरानी मीटर लौटाने की मांग

Ambernath, Maharashtra:"स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या" बदलापूरातील संतप्त ग्राहकांची मागणी याच लोकांनी सोनिवली येथील महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला. आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या अशी मागणी त्यांनी केलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर नको असल्याचा निर्णय घेऊ शकतात मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केलाय. गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात सातत्याने जनआंदोलन सुरू आहे. लोक थेट महावितरण कार्यालय गाठून आपला रोष व्यक्त करतायेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी नगर में करोड़ों विकास फंड से आधुनिक शॉपिंग सेंटर, स्कूल-परिसर का कायाकल्प संभव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे पत्रकार परिषद रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मंजूर. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत माहिती पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर. नगर विकास विभागाकडून शासन निर्णय (GR) जारी. प्रभाग क्र. १५, आरक्षण क्र. ५८ येथे ७ कोटी रुपयांचे भव्य शॉपिंग सेंटर उभारणार. स्थानिक व्यापाऱ्यांना आधुनिक बाजारपेठ व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार. नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सुधारणा कामांसाठी ४.८० कोटी रुपये मंजूर. पालिका शाळांच्या इमारतींचे बांधकाम व नूतनीकरणासाठी ७ कोटी रुपयांचा निधी. पानवल पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद. नगर परिषदेच्या नाट्यगृहातील अग्निशामक व्यवस्था व संबंधित कामांसाठी १.७५ कोटी रुपये मंजूर. विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार. या निधीमुळे रत्नागिरी शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार: नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे
0
0
Report

डोंबिवली के शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टरों पर हमला: शिंदे बोले कार्रवाई कड़ाई से

Ambernath, Maharashtra:डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण डॉक्टरांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, दोषींना पाठीशी घालणार नाही! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आम्ही करणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून कायद्यानं आपलं काम केलं आहे. डॉक्टरांवरील हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. उल्हासनगरमध्ये कामगार हॉस्पिटलच्या पाहणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आले होते. डोंबिवलीच्या मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
0
0
Report

किसानों का विरोध: शक्तिपीठ महामार्ग रद्द करने के लिए 18 जुलाई को भारी प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:*राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना बाईट मुद्दे* *ऑन सद्बुद्धी दिंडी* *शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी 18 जुलैला सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत* *वाखरी ते पंढरपूर दरम्यान ही सद्बुद्धी दिंडी असेल* वेगवेगळ्या मार्गाने शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सरकार करतय मात्र 13 ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे वसमत येथे कर यांचे बेकायदेशीर त्या भरून घेतलेले फॉर्म शेतकऱ्यांनी पेटवून दिले आहेत, द्रोण सर्वे शेतकऱ्यांनी थांबवले आहेत महिलांनी विट्याजवळ पहाटेच्या सुमारास भूसंपादनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पळवून लावला आहे *18 तारखेला शक्तिपीठ विरोधात सर्वपक्षीय मेळावा होईल, मेळावा संपल्यानंतर वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर पर्यंत सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत* *त्या नंतर पंढरपूर मधील नामदेव पायरीला अभिषेक घालणार आहोत* *ऑन शेतकरी लग्न* *सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याची शेती तोट्यात चालली आहे* हे सांगायला ज्योतिषाची सुद्धा गरज नाही *हे सगळ्यात आधी शेतकऱ्यांच्या मुलींना कळालं आहे* *त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुली शेतकऱ्यांसोबत लग्न करायला तयार नाहीत* नाशिक मधील आमचे एक कार्यकर्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं आश्रम चालवतात या आश्रमातून केलेल्या एकाही मुलीने शेतकऱ्यासोबत लग्न केलं नाही *ज्या शेतीमुळे आपल्या बापाला जीव द्यावा लागला ती शेती करणाऱ्या शेतकरी सोबत लग्न करायचं नाही असा विचार या मुली करत आहेत* *त्यामुळे शेतकऱ्यांचं लग्न हा एक सामाजिक प्रश्न झालेला आहे* शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण सरकार ज्यावेळी बदलेल त्याचवेळी ही परिस्थिती सुधारेल *ऑन कर्जमाफी* *सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे* *राज्याची आर्थिक स्थिती माहिती असताना जबाबदार पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिल* *हे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हतं* *मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थिती माहिती असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून कर्जमाफीचा आश्वासन देत मत मिळवली* *मात्र कर्जमाफीसाठी ज्या अटी शर्ती निकष लावले आहे ते पाहता सांगितलं घागर भर आणि दिलं पेलाभर अशी स्थिती आहे* *ऑन cag अहवाल* *रिझर्व बँक, नीती आयोग आणि कॅगने सुद्धा राज्याच्या आर्थिक स्थितीत वित्तीय तूट होत असल्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे* *त्यामुळे हे राज्य वेगाने आर्थिकदृष्ट्या आजारी राज्य होत चाललं आहे* असं असताना सवंग लोकप्रियतेच्या घोषणा थांबलेल्या नाहीत *आमदनी चौवनी आणि खर्चा रुपया अशी राज्याची स्थिती असेल तर राज्याची आर्थिक शिस्त कशी राहील* *ऑन राष्ट्रवादी* शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत *त्यांच्या पक्षाबद्दल जो संभ्रम आता राजकीय वर्तुळात आणि लोकांमध्ये निर्माण झाला आहे त्याची स्पष्टता शरद पवार यांनीच केली पाहिजे* *सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सत्तेच्या बाजूने सगळेच चालले आहेत यात शरद पवार यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे* *सगळे गेले तरी आम्ही मात्र जनतेसोबत सामान्य माणसासाठी लढत राहू* या सगळ्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला की नाही मला माहित नाही *शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी असा निर्णय जर घेतला तर ते जनतेच्या मनातून उतरतील,जनता त्यांना पुन्हा थारा देणार नाही*
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top