445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई के बोरिवली पूर्व होटल के खाने में कॉकरोच, वीडियो वायरल
Mumbai, Maharashtra:जेवणाच्या ताटात चक्क कॉकरोच आढळला मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातील सुस्वागत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या नॉनव्हेज पदार्थाच्या प्लेटमध्ये चक्क कॉकरोच आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकाने जेवण मागवल्यानंतर प्लेटमध्ये कॉकरोच दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहक संतापला. त्यानंतर ग्राहकाने प्लेटमधील कॉकरोचचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हॉटेलमधील अन्नाच्या स्वच्छतेचा आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, ग्राहकांनी हॉटेलमधील अन्नपदार्थ घेताना त्यांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.0
0
Report
BMC की कार्रवाई पर Borivali Goregaon बीच होटल में स्थानीय विरोध
Mumbai, Maharashtra:बोरिवली गोरेगाई बीच क्षेत्र के होटल पर BMC की कार्रवाई; locals विरोध मुंबई के बॉरिवली गोरेगाई बीच क्षेत्र में एक होटल पर नगर निगम (BMC) की टीम ने कार्रवाई की खबर सामने आई है. उस होटल पर कार्रवाई करते समय पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, यह सवाल अब स्थानीय लोग उठा रहे हैं. BMC की कार्रवाई के दौरान होटल में आग लगने का आरोप भी locals ने किया है. इस कार्रवाई के क्षेत्र के कुछ स्थानीय नागरिकों ने विरोध किया है, जबकि महापालिका ने किन नियमों के आधार पर यह कार्रवाई की, इसकी स्पष्टता दी जाए, ऐसी मांग की जा रही है. कारवाई से पहले आवश्यक कानूनी प्रक्रिया और पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, इसकी जांच करने की मांग locals ने की है. इस बीच, इस पूरी घटना पर BMC प्रशासन की आधिकारिक भूमिका क्या है, साथ ही होटल के खिलाफ कब-क्या कार्रवाई की गई, इसका सभी को इंतजार है.0
0
Report
सूखे से मालेगांव के किसान परेशान, सरकार से हेक्टेयर पर एक लाख मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: मालेगाव तालुक्यातील धनकुटे परिसरात पावसा अभावी शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः सुकून गेली असून. चुकलेली पिकं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. मोठा खर्च करून वाढवलेलं खाते येणे आधीच करपून गेल्यानंतर शेतकरी पूर्णतः खचले असून पुढचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यामुळे आता मालेगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरकारने हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
लातूर के स्कूल ने पर्यावरण-पूरक गणेश मूर्ति से संदेश दिया
Latur, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी शाळेत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसोबत महत्त्व, नैसर्गिक साहित्याचा वापर आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रबोधनानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. आकर्षक आणि कल्पक पद्धतीने तयार केलेल्या या गणेशमूर्तींमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दिसून आली. गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असला तरी पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना ‘आम्ही पर्यावरणपूरक गणपती बसवतोय, तुम्हीही पर्यावरणपूरक गणपती बसवा’, असे आवाहन केले.0
0
Report
आंबा घाट पर शिवाई बस‑कार टक्कर, जान बची, यातायात एकतरफा चला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात शिवाई बस आणि कार यांच्यात धडक झाली. सुदैवाने जीवितहानी नाही. नागपूर-मिऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात आज सकाळी सातच्या sुमारास काळकधरा नजीक एसटीची शिवाई इलेक्ट्रिक बस आणि कार यांच्यात धडक झाली. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या शिवाई बसने वळणावर समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. कारमध्ये चालकासह सहा प्रवासी होते, पण सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार बाजूला करण्याचे काम सुरू केले. सध्या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत0
0
Report
गणेशोत्सव की तैयारी महंगाई के बावजूद भक्तों का उत्साह, मूर्तियों की बुकिंग हाउसफुल
Shirur, Maharashtra:गणेशोत्सवासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरांचा फटका यंदा गणेशमूर्तींनाही बसला आहे. तरीही भक्तांच्या उत्साहात आणि श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून येत नाहीये. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गणेशमूर्तींचे बुकिंग हाऊसफुल झालंय. वाढती महागाई आणि वाहतूक खर्च यामुळे किंमती वाढल्या असल्या, तरी बाप्पावरील अथांग श्रद्धेपोटी भक्तांनी कारखान्यांमध्ये आगाऊ नोंदणी करून मूर्ती सुरक्षित केल्या आहेत. अवघ्या काही तासांत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर घुमणार आहे. या सर्व परिस्थिती चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
एमपीएससी अध्यक्ष के खिलाफ रोहित पवार का निशाना, प्रथमेश देशमुख की आत्महत्या पर सवाल
Dharashiv, Maharashtra:धाराशिव एमपीएससी के अध्यक्षों पर आमदार रोहित पवार यांच्या टीका, तर प्रथमेशच्या आत्महत्येला व्यवस्था जबाबदार अशा प्रकारचा भ्रष्ट अधिकारी एमपीएससीचा अध्यक्ष असेल तर अशा लाखो प्रथमेश सारख्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहील, की पेपर फुटणार नाही याची शाश्वती कोण देणार एमपीएससी अध्यक्ष तुमचे मित्र आहेत तर त्यांचे पुनर्वसन आमदार,खासदार म्हणून कुठेतरी करा परंतु त्यांना एमपीएससीच्या ठिकाणी ठेवू नका जोपर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षाचा राजीनामा होत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी एक चांगला माणूस येत नाही तोपर्यंत आमचा एमपीएससीचा लढा सुरूच राहील रोहित पवार on जरांगे राजकारणामध्ये अनेक नेते खालच्या थरांना जाऊन महिला विषयी बोललेले आहेत जरांगे पाटील यांचे बोलणं ग्रामीण भाषा आहे त्यामुळे ते मनावर न घेता राज्य सरकारने यामध्ये तोडगा काढावा असे मत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी रोहित पवार यांनी व्यक्त केले रोहित पवार on प्रथमेश सुसाईड ही सगळी परिस्थिती पाहता प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येला व्यवस्था जबाबदार असल्याचेही रोहित पवार म्हणाले Byte- आमदार रोहित पवार0
0
Report
CNG पंपों पर लंबी कतारें: गणेश उत्सव के चलते कोकणकरों को परेशानी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेश उत्सव साठी कोकणकर मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत.. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना सीएनजी तू तेवढ्याच मोठ संकट उभे राहतेय.. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना एकीकडे वाहतूक कोंडीतून सुटका झाल्यावर सीएनजी साठी वाहन चालकांना तासा-तास रांगेत उभे राहावे लागतेय.. आधीच आठ ते दहा तास प्रवास करून येणारे कोकणकर पुन्हा सीएनजी साठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहत आहेत.. सीएनजी पंपा वरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला चिपळूणमध्ये पाहायला मिळतायत.. याचाच आढावा घे्तलाय सीएनजीच्या पेट्रोल पंपावरून आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
भायंदर के सुजाता इंडस्ट्रियल स्टेट में विवाद में मजदूर की मौत, आरोपी हिरासत में
Mira Bhayandar, Maharashtra:भायंदरच्या नवघर रोड परिसरातील सुजाता इंडस्ट्रियल इस्टेटमधील घटना भांडी बनवणाऱ्या कंपनीत दोन कामगारांमध्ये वाद वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये मारहाण अनवर नावाच्या कामगाराचा मृत्यू रामू नावाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आरोपीवर उपचार सुरू; उपचारानंतर चौकशी वाद नेमका कशामुळे झाला, हे तपासानंतर स्पष्ट होणार अँकर: भाईंदरच्या नवघर रोड परिसरातील सुजाता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये दोन कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. भांडी बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या अनवर आणि रामू यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये अनवरचा मृत्यू झाला असून रामूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.0
0
Report
Advertisement
मराठा आरक्षण पर सरकार की स्पष्टता नहीं, विनायक राऊत का कड़ा हमला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी उद्धव ठाकरे सेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत ... जरांगे पाटील उपोषण मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार केला तर त्यांना हे उपोषण झेपणारे नाही त्यांनी सरकारच्या नादी लागू नये सरकारनं मराठा आरक्षण संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी उपोषण सोडण्याची जबाबदारी सरकारचीच आहे सातत्याच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे आणि ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही मुख्यमंत्री फडणवीस सणामध्ये विघ्न आणण्याचा प्रश्नच येत नाही सध्या डीजेचा विषय गाजत आहे नागपूर पनवेल अशा ठिकाणी डीजे वरती गणेशोत्सवात बंदी घालायची दुसरीकडे आपलं धोरण स्पष्ट करायचं नाही मुख्यमंत्रीांनी ते पहिल्यांदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे मैलेलं मढे उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे विनायक राऊत यांची टीका ज्यांना खरेदी विक्री करून आपला पक्ष चालवण्याची सवय झालेली आहे त्यांना स्वतःच्या निर्मितीवरती विश्वास नाही त्यामुळे संपत्ती आणि पैशाचा वारेमाप वापरून दुसऱ्याचे प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायचे हा काही जणांचा धंदा त्यााला ही जनता विटली आहे जनता अशा लोकांना नक्की धडा शिकवेल वरिष्ठ नेतृत्व सध्या पक्ष बांधणीकडे बारकाईने लक्ष देत आहे गांभीर्याने सर्व गोष्टींचा विचार केला जातोय इतर पक्षात असं होत नाही प्रत्येक जिल्हा न्याय आम्ही दौरे लावले आहेत ओबीसी आरक्षण प्रत्येक समाजाला जे जे आरक्षण मिळालं आहे त्या दिल्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत हात घालू नये ही आमचीही भूमिका आहे त्या व्यतिरिक्त जे काही द्यायचं असेल त्याबाबतचा ठोस निर्णय मराठा समाजाकरता सरकारने घ्यावा ओबीसींचं आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला द्यावं या मताचे आम्हीही नाही ऑन वडेट्टीवार धमकी विजय वडेट्टीवार नेमकं काय बोलले आहेत ते मी ऐकलेलं नाही परंतु जाणूनबुजून एखाद्याला कोणी बदनाम करायचं ठरवलं तर साहजिकच त्याच्या कार्यकर्त्यांना ते आवडत नाही त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येत असेल0
0
Report
पंढरपूर में गुटखा-मावा बिक्री जारी, प्रशासन की कारवाई पर सवाल
Pandharpur, Maharashtra:अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाई राज्यात अनेक ठिकाणी सुरू असताना पंढरपूर शहर आणि तालुक्यात मात्र बंदी असणारा गुटखा आणि मावा सर्रास पणे विकले जात आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. पंढरपूर विभागातील अन्न औषध प्रशासन विभाग मात्र अशा गुटखा आणि मावा विक्रीवर कारवाई करताना दिसत नाही. कारवाईचे भय नसल्यानेच पंढरपूर मध्ये असे पदार्थ विकले जात आहेत0
0
Report
करमाळा सरकारी बैठक में जातिवादी अपशब्द: मंडळ अधिकारी और तलाठी के खिलाफ FIR
Pandharpur, Maharashtra:करमाळयात शासकीय बैठकीत जातीवाचक अपशब्द; मंडळ अधिकारी, तलाठ्यावर गुन्हा करमाळा पोलिसांत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल शासकीय बैठकीदरम्यान जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप करीत महिला मंडळ अधिकारीाने दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर व तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित महिला मंडळ अधिकारी म्हणून करमाळा तालुक्यात कार्यरत असून आरोपींसोबत शासकीय कामकाजाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क होता. २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित शासकीय बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बैठकीत महसूल विभागातील कामकाजासंदर्भात चर्चा सुरू असताना राजकुमार पांडेकर यांनी आक्षेप घेतल्याचे तसेच त्यानंतर वाद निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही आरोपींनी अंगावर धावून येत धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने तत्काळ पोलिसांत तक्रार देता आली नाही, असे फिर्यादीने नमूद केले आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकाराची माहिती देऊनही अपेक्षित कारवाई न झाल्याने अखेर १० सप्टेंबर २०२६ रोजी करमाळा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या आधारे करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आहे. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.0
0
Report
Advertisement
साईं मंदिर परिसर में CISF सुरक्षा पर आठ सप्ताह में निर्णय लेने की तैयारी
Shirdi, Maharashtra:साई मंदिर आणि परिसरात CISF सुरक्षा पुरवण्याबाबत आठ आठवड्यात निर्णय घ्या... उच्च न्यायालयाचे CISF चे डायरेक्टर जनरल यांना निर्देश... साईभक्तांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती उच्च न्यायालयात जनहित याचिका... 2025 मध्ये साई संस्थानने CISF च्या डायरेक्टर जनरल यांना पाठवले होते सुरक्षा पुरवण्याबत पत्र... मात्र संस्थानच्या पत्रावर अद्याप कुठलीही कारवाई नाही... न्यायालयाच्या निर्देशानुसार साई मंदिराला CISF ची सुरक्षा मिळणार का..? याकडे लक्ष...0
0
Report
रत्नागिरी में 3200 अतिरिक्त बसों के साथ कोकण में गणेशोत्सव की धूम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात लालपरीचा धडाका; एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार ३,२०० जादा बसेस!.. अँकर लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईकर चाकरमान्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने कोकणात तब्बल ४ हजार २२० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे... यापैकी सर्वाधिक ३ हजार २०० गाड्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.. गुरुवारपासून मुंबईतून सुटलेल्या या ताफ्यापैकी काल ५०० गाड्या जिल्ह्यात आल्या असून,आज १ हजार २०० तर उद्या सर्वाधिक १ हजार ५०० जादा गाड्या दाखल होतील.. या सर्व गाड्या स्थानिक आगारांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या असून, येत्या १९ सप्टेंबरला गौरी-गणपती विसर्जनानंतर याच गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडल्या जातील.. तसेच परजिल्ह्यातील चालकांना रस्ता समजण्यासाठी कशेडी ते खारेपाटण दरम्यान महामार्गावर विशेष दिशादर्शक पथकेही तैनात करण्यात आली आहेत चिपळूणच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
जरांगे पाटील मुंबई जाने का फैसला करेंगे; हाईकोर्ट मोर्चा और मुख्यमंत्री उत्सव से हलचल
Nagpur, Maharashtra:1) जरांगे पाटील मुंबईला जाण्याबाबत निर्णय घेणार 2) मुख्यमंत्री उत्सव आंदोलन 3) हायकोर्टाचा मोर्चा 4) हाके धक्काबुक्की0
0
Report
Advertisement
