445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर पुलिस ने गैंगस्टरों के धड़पकड़ के साथ रोड शो; यश उर्फ गणपत सहित गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपुरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत कुख्यात गुंडांची धिंड काढत वर्दळीच्या रस्त्यांवर रोड शो केला. - गोरेवाडा–पिटेसूर मार्गावर ऑटोचालकाची हत्या व लुटीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी यश ऊर्फ गणपत गावंडेसह साथीदारांची मानकापूर पोलिसांनी धिंड काढली. - आरोपींनी चाकूच्या धाकावर अनेकांना लुटत ऑटोचालक मोहम्मद काशिद यांची हत्या केली होती. - दुसरीकडे, कमाल चौकातील शनिचरा मार्केट परिसरात गँगवॉर करणाऱ्या गुंडांचा पाचपावली पोलिसांनी भर पावसात रोड शो केला. - ज्या भागात या गुंडांची दहशत होती, त्याच भागात पोलिसांनी त्यांना फिरवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. - गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला.0
0
Report
नाफेड-एनसीसीएफ खरीदे कांदे विदेश भेजेंगे, देश में बिकने पर किसान आंदोलन की धमकी
Niphad, Maharashtra:नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात आलेला कांदा देशांतर्गत बाजारात विकू नये. हा कांदा परदेशात निर्यात करावा, अशी त्यांची मागणी आहे. संघटनेच्या मते, जर हा कांदा देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी आणला गेला, तर आधीच घसरलेल्या कांद्याच्या दरांवर आणखी परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. याचबरोबर संघटनेने कठोर इशारा देत म्हटले आहे की जर नाफेडने देशांतर्गत कांदा विक्रीचा निर्णय घेतला, तर राज्यभरातील नाफेडच्या गोदामांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. गरज पडल्यास गोदामे फोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
तांदळ भरे ट्रक चुराने वाला आरोपी गिरफ्तार, 18 लाख का माल जप्त
Bhandara, Maharashtra:तांदळाचा ट्रक पळविणारा आरोपी गजाआड.... १८ लाखाचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्यात दररोज नवनवे चोरीचे प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशातच चक्क चालकाला मारहाण करून आणि झाडाला बांधून ३० टन तांदळाने भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केला असून तांदळ आणि ट्रक असा एकूण १८ लाख १३ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातील चाकघाट येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ भरून ट्रक गोंदियातील सडक अर्जुनीकडे निघाले होते. १६ जुलैच्या रात्री प्रचंड थकवा आल्याने चालकाने सावरी येथील बस स्टॉपजवळ ट्रक उभा केला आणि ते झोपी गेले. १७जुलैच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका भामट्याने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचा दरवाजा ठोठावला. नवीन यांनी दया दाखवून पाण्याचा बॉटल पुढे केली, पणत्याच क्षणी त्यांच्यासोबत चित्रपटासारखा भयानक थरार घडला. त्याच्या पाठीमागून आलेल्या आणखी ३ दरोडेखोरांनी नवीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना जबर मारहाण करत खाली उतरवले, चाकूचा धाक दाखवून जवळच असलेल्या एका झाडाला हातपाय दोरीने बांधून फेकून दिले. यानंतर आरोपी १० लाखाचा ट्रक आणि ८ लाखांचा तांदूळ घेऊन सुसाट फरार झाले. ड्रायव्हरने याची तक्रार रावणवाडी पोलिसात दिली. गुप्त माहितीसारखेलाही पोलिसांनी शोध घेत अवघ्या दोन दिवसांत कोहका येथील आरोपी संजयकुमार दमाहे (२०) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी दरोड्यात वापरलेला १० लाख रुपये किमतीचा १ टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण १८ लाख १३ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.0
0
Report
Advertisement
बारिश के कारण वायरल फीवर-डायरिया मरीजों की संख्या अस्पतालों में बढ़ी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाळ्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे छत्रपती संभाजी नगर शहरात व्हायरल फीव्हर आणि जुलाबाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप अन् व्हायरल फीव्हरने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ७ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यात ताप, सर्दी, खोकल्यासोबतच जुलाबाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत त्यामुळे सरकारी आणि खासगी दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे.0
0
Report
किहीम ग्रामपंचायत ने संयुक्त कचरा प्रबन्धन केंद्र का लोकार्पण कर स्वच्छता अभियान तेज किया
Chendhare, Maharashtra:किहीम येथे कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण. किहीम ग्रामपंचायत व याज फाऊंडेशन यांचा उपक्रम. ग्रामस्थांना मोफत डसबिनचे वाटप. अँकर - रायगडच्या अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकल्पामुळे किहीम ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची दीर्घकालीन समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून गाव स्वच्छ व पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण पिनाकीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थाना डसबिनचे वाटप करण्यात आले. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.0
0
Report
139 एकड़ जमीन अधिग्रहण के चलते एयरपोर्ट विस्तार पर किसान विरोध तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तब्बल १३९ एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, 'जमीन संपादनाचा योग्य मोबदला रेडीरेकनर किंवा बाजारमूल्याच्या चारपट मिळावा, शैक्षणिक पात्रतेनुसार पाल्यांना नोकरीत प्राधान्य मिळावे आणि पुनर्वसनाचे लाभ दिले जावेत,' अशी आक्रमक मागणी विमानतळ विस्तारीकरण कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न न झाल्यास बलिदान झाले तरी हटणार नाही, असा थेट इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळं विमानतळ जमीन भूसंपादन वाद वाढत जाणार असेच चित्र दिसतेय...0
0
Report
Advertisement
भंडारा में कलाकारों का मोर्चा, बारिश में ढोल-ताश के बीच जिलाधिकारी कार्यालय पहुंचा प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.... "कलावंतांना न्याय द्या"च्या घोषणा Anchor :- भंडारा जिल्ह्यात विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनोखे आंदोलन केले. भर पावसात ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत आणि गाणी गात कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "कलावंतांच्या समितीत कलावंतांनाच प्राधान्य द्या", "2025-26 मध्ये कलावंतांची निवड का झाली नाही?" तसेच "समितीत कलेक्टर किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ नकोत" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने तातडीने निर्णय घेऊन कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
कल्याण डोंबिवली में बारिश से जनजीवन प्रभावित, जलभराव की आशंका तेज
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली मध्ये सकाळपासून पावसाची संततधार अधून मधून पावसाच्या जोरदार सरी. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये काल पावसाची ये जा सुरू होती मात्र रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासूनच पावसाची संततदार सुरू आहे तर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर सकल भागामध्ये पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
संभाजीनगर में बायोमेट्रिक उपस्थिति से डमी एडमिशन रोकने की तैयारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची घसरलेली उपस्थिती आणि डमी अडमिशनला चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची २ हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होत नसल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. महाविद्यालयीन वेळेतच अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विस्तार अधिकारी आता उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन अध्यापनाचे कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करणार आहेत. प्राथमिक स्तरावर केलेल्या कार्यवाहीचा अहवालही तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
अलिबाग-रेवस मार्ग पर चिडीपाडा की मोरी ध्वस्त, बड़ा हादसा टला
Chendhare, Maharashtra:अलिबाग -रेवस मार्गावरील चिडीपाडा येथे खचलेल्या मोरीला अखेर मोठे भगदाड पडले असून मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून मोरी धोकादायक असल्याचे संकेत मिळत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मागील आठवड्यात भगदाड पडलेल्या मोरीत पडून एकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात असून तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.0
0
Report
यवतमाळ में बायो-बीज के फर्जीपन पर छह मुकदमे, कंपनियों के खिलाफ कार्रवाई
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याप्रकरणी सहा गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपनी विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. दारव्हा, बाभूळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळ मध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला, ते बियाणे शेतकऱ्यांना विक्री केल्या गेले. ज्यात त्यांची फसगत झाली. जिल्ह्यात लाखो हेक्टर वरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं.0
0
Report
बोरीवली के दौलत नगर हिंदू श्मशान घाट से राख चोरी: नागरिकों में हंगामा
Mumbai, Maharashtra:बोरीवली दौलत नगर हिंदू स्मशानभूमीतून राख चोरी, नागरिकांचा हंगामा. बोरीवलीच्या दौलत नगर येथील हिंदू स्मशानभूमीतून राख चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला जागीच पकडले. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की काही लोक येथून राख चोरून ती मुंबईपासून दूर नेत होते आणि त्यातून सोने काढत होते. पकडलेल्या व्यक्तीच्या चौकशीतून तो एका विशिष्ट समाजाचा असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
देहू संस्थान ने पंजीकृत वारकऱ्यों के दुखद निधन पर एक लाख मदद की घोषणा
Varsoli, Maharashtra:Headline: वारकऱ्यांसाठी देहू संस्थानचा मोठा निर्णय आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्या नोंदणीकृत वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी निधन झाल्यास, संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. देहू संस्थानने स्पष्ट केले आहे की, ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, या आर्थिक मदतीसाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. संबंधित वारकरी हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत दिंडीत सहभागी असणे आवश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.0
0
Report
नगर मनमाड महामार्गावर ट्रक ने बाइक टक्कर, महिला की मौत
Shirdi, Maharashtra:नगर मनमाड महामार्गावर अपघात कोल्हार परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेला जवळपास दीडशे फूट ओढत नेले अपघातात दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला घेतले ताब्यात अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक मंदावली0
0
Report
मालाड कुरार पुलिस ने तलवारधारी युवक को रंगेहात पकड़ा, बड़ा हादसा टला
Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई; तलवारधारी तरुणाला अटक करून मोठी दुर्घटना टळली मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका तलवारधारी तरुणाला रंगेहात अटक केली आहे. राधेय राजेंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात होणारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथील नुतन स्कूलजवळ दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू होती. याच दरम्यान आरोपी राधेय राणे हातात उघडी तलवार घेऊन विरोधी गटावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे धावला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पांचाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अत्यंत हुशारीने आणि जीवाची पर्वा न करता आरोपीला झडप घालून पकडले. त्याच्याकडची तलवारही जप्त करण्यात आली.0
0
Report
Advertisement
