445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तमिलनाडू के व्यापारी लूट कांड: महाराष्ट्र में चौघे गिरफ्तार, 13 लाख कैश बरामद
Sangli, Maharashtra:तमिळनाडूतील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. चार दिवसांपूर्वी जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या तमिळनाडूतील सेलम येथील व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून लुटण्याचा प्रकार घडला होता. बंदुकीचे धाक दाखवत 13 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती, अखेर या लुटीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावत, चौघांना अटक करून त्यांच्याकडून 13 लाखांच्या रोकड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सदर गुन्ह्यातील तीन जण अद्याप फरार असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक तुषआह दोशी यांनी व्यक्त केला आहे0
0
Report
शिखर पहारिया भाजपा में शामिल होने पर स्वागत के संकेत, सोलापुर भाजपा ने कहा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिखर पहारिया जर भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल - भाजप शिखर पहारिया यांनी लावलेल्या बॅनरवर भाजपच्यावतीने देखील प्रतिक्रिया देण्यात आलीय ‘या बैनरच्या माध्यमातून शिखर पहारिया सुशीलकुमार शिंदेना वेगळे संकेत देऊ इच्छित असतील, ते जर भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल’0
0
Report
ल Lasalgaon महावितरण कार्यालय के विरोध में किसान आक्रोशित, रोज़ाना लोडशेडिंग के खिलाफ प्रदर्शन
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव महावितरण उपविभागीय कार्यालयांच्या अंतर्गत टाकळी-विंचूर, कोटमगाव, मरळगोई, गोंडेगाव, पाचोरा यासह परिसरातील सुमारे ४० ते ४२ गावांमध्ये ऐन सणासुदीच्या काळात दररोज सायंकाळच्या वेळेत अतिरिक्त लोडशेडिंग केले जात असून त्यात बिबट्यांचे होणारे लहान-मोठे हल्ले त्यामुळे करत शेतकरी आक्रमक झाले आहेत महावितरणच्या या कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी लासलगाव येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली मात्र, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रेय पुंडे हे कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला दरम्यान, चांदवड विभागाचे मुख्य अभियंता तिवारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत निषेध व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत महावितरण च्या एकही अधिकारी व कर्मचाऱ्याला फिरवून देणार नसल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला0
0
Report
Advertisement
सोलापुर में अक्टूबर की गर्मी सप्टेंबर में ही दिखी
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात ऑक्टोबरची हिट सप्टेंबर मध्येच जाणवायला सुरवात. शहर - जिल्ह्यात एल निनोचा प्रभाव अधिक गडद. जिल्ह्यात एकीकडे पावसाची दडी तर दुसरीकडे उन्हाचा कहर. सोलापूरकर अनुभवतायत भर पावसाळ्यात उन्हाळा. गेल्या दोन दिवसात तापमानात 3.4 अंशाची वाढ.0
0
Report
निफाड में पालतू कुत्तों के विरोध के बाद अधिकारी के खिलाफ केस
Niphad, Maharashtra:अँकर:-निफाड शहर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नगरसेविका रूपाली रंधवे व त्यांचे पती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून निषेध व्यक्त केला होता दरम्यान या घटनेनंतर मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी रंधवे दांपत्यासह पाच जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कर्मचाऱ्याला मारहाण करणे, प्राणी संरक्षण कायदा असे विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास निफाड पोलीस करत आहेत0
0
Report
सोलापुर में मोदी के जन्मदिन पर बैनर से राजनीतिक हलचल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाने भाजपा कार्यालयाबाहेर लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारीया यांनी लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर - सोलापूरातील भाजप कार्यालयात बाहेरच शुभेच्छांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने शिखर पहारिया यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत - 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदार संघात शिखर पहारिया निवडणूक लढण्याची रंगली होती चर्चा - मात्र ज्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेले असे सुशीलकुमार शिंदे यांच्या नातू शिखर पहारिया यांनीच मोदींचे बॅनर लावल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात - भाजप शहराध्यक्षांच्या वतीने शिखर पहारिया यांच्या बॅनरमुळे आश्चर्य व्यक्त करत भाजपमध्ये आल्यास स्वागतच असल्याची व्यक्त केली भावना0
0
Report
Advertisement
वाशिम में बारिश नहीं: खरीफ संकट, किसानों ने उध्वस्त सोयाबीन को लेकर प्रतिकात्मक अंत्ययात्रा निकाली
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला आहे.मालेगाव तालुक्यातील राजुरा शेतशिवारात सोयाबीन पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.याच संतापातून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी उध्वस्त सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत राजुरा स्मशानभूमीत अंत्यविधी केला. व्हीओ:पावसाअभावी सोयाबीनची पिकं वाळून गेली.शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यातच पिकांनी माना टाकल्या. डोळ्यांसमोर उभं पीक करपताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप आहे.राजुरा येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी उध्वस्त सोयाबीन चा प्रतिकात्मक अंत्यविधी करून शासनाचं लक्ष वेधलं.हेक्टरी एक लाख रुपये मदत, पीक विम्याचा लाभ,कृषी पंपांचं वीज बिल माफ करावं आणि कर्जमाफी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बाईट : दामू इंगळे, युवा प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व्हीओ:सोयाबीनसोबतच तूर, कापूस,उडीद आणि हळद पिकांवरही दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गावपातळीवर शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी येत नाहीत,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दामू इंगोले यांनी दिला आहे. तर संतप्त शेतकऱ्यांनी आम्ही मेल्यानंतरच आमच्या खात्यात पैसे टाकणार ka असा सवाल शासनाला केला आहे. खरिपाचे पीक हातचं गेलं पावसाअभावी आता रब्बीचे सुद्धा पीक येणार नाही त्यामुळे वर्षभर संसाराचा काढा कसा हाकायचा या विवंच निश्चित शेतकरी पडले आहेत त्यामुळे शासन येत्या काळात या शेतकऱ्याकडे लक्ष देणार का व हाताश झालेला या बळीराजाला उभ करण्यासाठी मदत करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. बाईट:कुडलिक सानप,शेतकरी बाईट: गजानन टोंचर,शेतकरी0
0
Report
नवी मुंबई पुलिस ने सुरक्षा बढ़ाने के लिए वाशी-कोपरखैरणे में रूट मार्च किया
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था बळकट रहावी तसेच शहरता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेबाबत आश्वस्त करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वाशी ते कोपरखैरणे दरम्यान रूट मार्च काढला. पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज असून गैरप्रकार करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल असा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने सामान्य नागरिकांना दिलाय. Byte -: विजय खरात पोलिस उपायुक्त0
0
Report
अहिल्यानगर केंद्र में डॉक्टर ने पांच साल की बच्ची के साथ अयोग्य कृत्य किया, गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर केंद्र में डॉक्टर ने पांच साल की बच्ची के साथ अयोग्य कृत्य किया, गिरफ्तार0
0
Report
Advertisement
कराड में मोदी के जन्मदिन पर 2 हजार छात्रों ने मानवी नक्शा भारत बनाया
Satara, Maharashtra:कराड, सातारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कराडला वेणूताई चव्हाण कॉलेजच्या भव्य पटांगणावर 2 हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार केला. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर असा सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तसेच कराड शहरातील विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.0
0
Report
इंदापुर में निजी डॉक्टर ने घर पर फांसी लगा कर आत्महत्या की, कारण अस्पष्ट
Rui, Maharashtra:पुण्याच्या इंदापूरात डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या... आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट... पुण्याच्या इंदापूर शहरात एका खाजगी डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टर अवधूत खबाले असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मागील दोन महिन्यांपुर्वी संबंधित डॉक्टरच्या वडिलांचं निधन झालं होतं तेव्हापासून ते तणावात होते त्यातूनच त्यांनी गळफास घेतला असावा असा अंदाज वर्तविला जातोय.0
0
Report
तुळजाभवानी के पलंग को लेकर घोड़ेदेगांव में तनाव, पुलिस ने तैनाती की
Shirur, Maharashtra:तुळजाभवानीच्या शिवकालीन पलंगावरून काल चांगलाच वाद निर्माण झाला. पलंगाच्या मार्गक्रमणावरून दोन गट आमनेसामने आले आणि वाद इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री उशिरापर्यंत या पलंगाचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली असून, घोडेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे तुळजाभवानीचा हा पारंपरिक पलंग तयार केला जातो. पलंग तयार करण्याचा मान असलेल्या ठाकूर कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने यंदा पलंग तयार करण्यास काहीसा उशीर झाला. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी घोडेगाव येथील शनैश्वर मंदिरात विधिवत पूजा करून हा पलंग तयार करण्याची परंपरा आहे. त्यानंतर ऋषी पंचमीला हा पलंग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतो. जुन्नर, अहिल्यानगर मार्गे प्रवास करत हा पलंग दसऱ्याच्या दिवशी तुळजापूर येथील तुळजाभवनी मंदिरात पोहोचतो. मात्र यंदा पलंग तयार झाल्यानंतर त्याच्या पुढील मार्गक्रमणावरून वाद निर्माण झाला. पलंग पुढे नेण्याचा मान असलेल्या पलंगे कुटुंबीयांकडून तो जुन्नरला घेऊन जाण्याचा आग्रह करण्यात आला. तर घोडेगावच्या ग्रामस्थांनी हा पलंग किमान दोन दिवस घोडेगावमध्येच ठेवावा, अशी भूमिका घेतली. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री उशिरा तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून काय खुलासा किंवा निर्णय येतो, त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरल्याची माहिती आहे. सध्या या पारंपरिक पलंगाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वादामुळे घोडेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवकालीन परंपरेशी जोडलेला तुळजाभवानीचा हा पलंग दरवर्षी मोठ्या श्रद्धेने घोडेगावातून तुळजापूरकडे रवाना होतो. मात्र यंदा त्याच्या मार्गक्रमणावरूनच वाद निर्माण झाल्याने या परंपरेला गालबोट लागले आहे. आता तुळजाभवनी मंदिर ट्रस्टच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे0
0
Report
Advertisement
नवी मुंबई ऐरोली में पानीपुरी विक्रेता की घिनौनी प्रथाएं वायरल, पुलिस ने हिरासत में लिया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील ऐरोली मध्ये परप्रांतीय पाणी पुरीवाल्याचा किळसवाणा प्रकार. ग्राहकांनी खाऊन फेकलेल्या कागदी प्लेट पुन्हा पुसून वापरात आणण्याचा प्रकार. हात पुसण्यासाठी घाणेरड्या कपड्याचा वापर. पाणीपुरी वाल्याचा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. विडिओ वायरल झाल्यावर पाणीपुरी वाल्याला दिले पोलिसांच्या ताब्यात. ग्राहकांनी व्यक्त केला संताप.0
0
Report
सोसायटी सभाभवन में वकील पर हमला, सरपंच समेत 5 पर मामला दर्ज
Chakan, Maharashtra:सोसायटीच्या सभेत वकिलाला मारहाण; निघोजे सरपंचासह पाच जणांवर गुन्हा निघोजे येथील 'कॅपिटल सिटी' को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हाऊसकीपिंगच्या थकीत बिलाचा जाब विचारल्यावरून एका वकिलाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभेत अॅड. बभिषण पडवळ यांनी हिशोबाचा तपशील विचारला असता वाद उफाळून आला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीशी अश्लील वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निघोजेच्या सरपंचांसह पाच जणांविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
सोलapur के तुलशी ग्रामवासियों ने गणपति के सामने खाली घागरी से पानी मांग
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान कमी असल्याने सप्टेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसापासून 12 ग्रामस्थ पिण्याचे पाणी मिळावे यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तुळशी ग्रामस्थानी आता थेट गणरायाला पाण्यासाठी साकडे घातले आहे. गणपतीच्या मूर्ती समोर अनेक जण वेगवेगळ्या सजावटी करतात. पण पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थानी थेट गणपती समोर आता रिकाम्या घागरींची आरास केली आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या सजावटीची चर्चा होत आहे. किमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गणेशाने बुद्धी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली आहे0
0
Report
Advertisement
