445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शहापूर के शेणवा गांव में विशाल नाग रेस्क्यू—सुरक्षित बचाया गया
Thane, Maharashtra:शहापूर शेणवा गावातील नाग रेस्क्यू.. शहापूर तालुक्यातील शेणवा गावात एका विहिरीत 3 दिवसांपासून अडकलेल्या भल्या मोठ्या नागाला स्थानिक सर्प मित्र रमेश डिगोरे यांनी जीवदान दिलं आहे. स्नेक हुकच्या मदतीने नागाला सुरक्षित बाहेर काढून रानात सोडण्यात आलं. "शहापूरच्या शेणवा परिसरात मागील 3 दिवसांपासून एक भला मोठा नाग शेतातील विहिरीत अडकून पडला होता. विहिरीची भिंत ओली आणि निसरडी असल्याने नागाला बाहेर पडता येत नव्हतं. गावकऱ्यांनी याची माहिती सर्पमित्र रमेश डिगोरे यांना दिली. रमेश यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्नेक रेस्क्यू हुकच्या मदतीने ऑपरेशन सुरू केलं. नाग झाडाच्या फांदीला विळखा घालून लटकला होता. अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रमेश डिगोरे यांनी नागाला सुखरूप बाहेर काढलं आणि जवळच्या जंगलात सोडून दिलं. "पावसाळ्यात असे प्रकार वाढतात. सर्पमित्र रमेश डिगोरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की साप दिसल्यास त्याला मारू नये, तर तज्ज्ञांना बोलवावं. प्राण वाचवण्याच्या या कार्याबद्दल रमेश डिगोरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
कल्याण-डोंबिवली में बारिश तेज: आधे घंटे में पानी सड़कों पर जम गया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची विश्रांती तर अधून मधून जोरदार सरी.. कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री पासून पावसाच्या विश्राती नंतर पुन्हा पावसाला सुरवात तर अधून मधून जोरदार सरी बरसत असल्याने अर्धा तासाच्या पावसात कल्याण डोंबिवलीतील अत्रे नाट्यगृहाच्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात पावसाचा जोर कमी होताच पाणीच्या निचरा देखील होत आहे.0
0
Report
आदित्य ठाकरे के नेतृत्व पर सचिन अहिर का मोड़; रोचक बयान, राम मंदिर महाआरती की तैयारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग --- माजी आमदार वैभव नाईक ऑन टू द पॉईंट ( सचिन अहिर ) ऑन आदित्य ठाकरे नेतृत्व -- सचिन अहिर यांना दिलेला शब्द आदित्य ठाकरेंनी पाळलाय, सत्ता नसणे हा आदित्य ठाकरेंचा दोष नाही. महाराष्ट्रातील आश्वासक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे जवळ पहिलं जात. सचिन अहिर यांनी उपसभापती पद मिळाल्यानंतर पक्षप्रवेश केल्याचे जग जाहीर आहे. आता आदित्य ठाकरेवर आरोप करण हास्यास्पद आहे. ऑन आदित्य ठाकरे आमदार बनविण्यात माझा वाटा --- आदित्य ठाकरे यांच्या विजयात सुनील शिंदे यांच्या मोठा वाटा आहे. अहिर यांच्यामुळे आदित्य ठाकरे निवडून आले हे सांगणं चुकीचं ठरेल ऑन ठाकरेंचे लोक टीका --- जे कधीच नव्हते आमचे त्यांची आस का धरावी या शब्दात संजय राऊत यांनी सांगितले आहे. सचिन अहिर यांच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या संघटना बांधणीकडे वेळ देत आहोत ऑन आम्हाला भविष्य आहे --- आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व वाईट आहे किंवा आदित्य ठाकरे विश्वासात घेत नाहीत म्हणून सचिन भाऊंनी साथ सोडली नाही तर कार्यकर्त्यांना पद मिळवितासाठी त्यांनी साथ सोडली. आणि हे त्यांनी मान्य केलंय ऑन ठाकरेंसाठी सगळ केलं --- Sत्तेवर जायचं असेल तर लवकर निर्णय घ्यावा लागले असा विचार करून सचिन अहिर यांनी व्यावहारिक निर्णय घेतलाय. त्यांच्या इतर आरोपांना आता काही अर्थ राहत नाही ऑन ठाकरे आंदोलन --- आम्ही आंदोलन नाही तर राम रक्षा पठण रामंदिर किंवा हनुमान मंदिरात करणार आहोत. राम मंदिर व्हाव म्हणून हजारो कोटी रुपये गोळा झालेले त्याचा हिशोब नाही. शिवसेनेणे दिलेल्या चांदीच्या विटांचा हिशोब नाही त्यामुळे हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही आज महाआरती करणार आहोत. ऑन नितेश राणे ( उद्धव ठाकरे टीका ) --- नितेश राणेंना हा अधिकार नाही. राम मंदिर साठी लढा सुरू होता तेव्हा हे राजकारणात नव्हते. तेव्हा नितेश राणे काही काळ काँग्रेस मध्ये सत्ता उपभोगत होते. ह्याचं रामंदिरासाठी काय योगदान आहे. आमच्या वर बोलण्याचा त्यांना हक्क नाही byte --- वैभव नाईक, माजी आमदार ठाकरे गट0
0
Report
Advertisement
चंद्रपुर जिले के ताडोबा-अंधारी बफर क्षेत्र में किसान की मौत के पीछे आया बाघ जेरबंद; वन विभाग की सफल कार्रवाई
Chandrapur, Maharashtra:टाडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या वाघाला वन विभागाने यशस्वीपणे जेरबंद केले. चोरगाव परिसरातील वन विभागाची कारवाईची माहिती समाविष्ट असलेला घटक आता समाप्त झाले आहे. वाघ पकडण्यासाठी आमिष बांधण्यात आला; वाघाने त्या आमिषाची शिकार केली; परंतु जंगलात ओढून नेली. त्यानंतर पुन्हा मजबूत पद्धतीने दुसरे आमिष बांधण्यात आले. वाघ पुनः आमिषाजवळ आल्यानंतर ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या देखरेखीखाली शूटर अजय मराठे यांनी डार्ट गनद्वारे त्याला अचेत dili. सुमारे दोन वर्षांच्या या वाघाला बेशुद्धावस्थेत सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. तपासणीत वाघाची प्रक्रीती समाधानकारक आढळल्याने त्याला ताडोबा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) येथे हलविण्यात आले.0
0
Report
अलंदी में पालखी प्रस्थान की तैयारी: 300 लोगों के सहयोग से सब कुछ तैयार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान की लगबग तयारी हो रही है। इस तयारी का एक अहम हिस्सा पालखी रथ के साथ जाते समय मुलायम आरती के सामान, चांदी के दागिने, वस्त्र आदि का व्यवस्थित प्रबंध है। यह व्यवस्थापन पूरा हो चुका है। पालखी के साथ मंदिर समिति के लगभग 300 लोग मौजूद रहते हैं। उनके लिए छोटी से लेकर तंबू, भोजन और संपूर्ण साहित्य की भी तैयारी कर ली गई है। व्यवस्थापन कौशल के इस उत्तम उदाहरण के बारे में हमारी प्रतिनिधि कैलास पुरी ने श्रीधरपंत से बातचीत की।0
0
Report
चिपळूण में दुर्लभ मास्क्ड बूबी पक्षी मिला, वन विभाग ने सुरक्षित रेस्क्यू किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणात दुर्मिळ 'मास्क्ड बूबी' समुद्री पक्ष्याची नोंद; वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दुर्मिळ समुद्री पक्षी 'मास्क्ड बूबी' (Sula dactylatra) आढळून आला आहे. खरवते येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा पक्षी अशक्त अवस्थेत विद्यार्थ्यांना दिसून आला. विद्यार्थ्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक रेश्मा कावळे यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याचे सुरक्षित रेस्क्यू केले. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चिपळूण परिसरात या दुर्मिळ समुद्री पक्ष्याची नोंद झाल्याने पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में सनमार्ग Mind Wellness केंद्र का उद्घाटन, मोहन भागवत और पंकज भोयर शामिल
Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुर स्थित सनमार्ग माईंड वेलनेस केंद्र का उद्घाटन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत के हाथों हुआ। कार्यक्रम में राज्य के गृह राज्यमंत्री पंकज भोयर की प्रमुख उपस्थिति रहने वाली है। मानसिक स्वास्थ्य के बारे में समुपदेशन और विभिन्न उपचार सुविधाएं उपलब्ध कराए जाने के उद्देश्य से यह केंद्र शुरू किया जा रहा है। उद्घाटन समारोह में विभिन्न क्षेत्रों के मान्यवर, डॉक्टर, सामाजिक संस्थाएं और नागरिकों की उपस्थिति रही/रहेगी।0
0
Report
लोणावळा में 24 घंटे में 267 मिमी बारिश, इस सीजन की सबसे भारी बारिश
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीये. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावलाय. लोणावळा आणि परिसरात आत्तापर्यंत 1090 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी अशी अपेक्षा लोणावळाकरांना आहे.0
0
Report
ताम्हिणी घाट में भारी बारिश, पेड़ गिरने से सड़क पर यातायात बाधित
Chendhare, Maharashtra:ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.0
0
Report
Advertisement
सतत बारिश से मुळा-भंडारदरा डैम में पानी बढ़ा, किसान में उम्मीद जगी
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील 600 एमसीएफटी क्षमतेचे पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता थेट मुळा धरणाच्या दिशेने वाहू लागले असून मुळा धरणाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दुसरीकडे, भंडारदरा धरणातही पाणीसाठा 29.30 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 24 तासांत तब्बल 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने निळवंडे, आढळा आणि वाकी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
खोपोली-वे वाकण फाटा महामार्ग पर पानी से ट्रैफिक ठप
Chendhare, Maharashtra:खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक ठप्प पालीजवळील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात0
0
Report
देवळी-देवळी मार्ग का वळण पुल बह गया, यातायात दो दिन से बंद
Wardha, Maharashtra:देवळी तालुक्यातील चिकणी जामाणी येथील वळण पुल उखडला. दहेगाव-देवळी मार्गावर वाहतूक बंद. दोन दिवस सतत पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यातील देवळी-दहेगाव मार्गावर असलेला चिकणी जामाणी येथील वळण पुल पावसाने वाहून गेला. या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील गावाकऱ्यांची नियमित वाहतूक होती. मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देवळी येथून पुलगाव जाण्यासाठी दहेगाव मार्गानेच जावे लागते. महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने पुलगाव पोहचतात. परंतु गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसात वळण पुल उखडला आणि वाहून गेला. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचं काम सुरु आहे. कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने काम केलं जात आहे, तरीही येथील गावाकऱ्यांनी बांधकाम व महसूल प्रशासनाला कळविले. याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
Advertisement
रामटेक के नेरला में 40 नाग पिल्ले पकड़े, वन विभाग ने सुरक्षित जंगल छोड़ने के लिए छोड़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमणे यांच्या घरामध्ये तब्बल ४० नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे स serpमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व ४० नागांची पिल्लांची कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याच्या प्रयत्न करू नये, परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.0
0
Report
बारिश से भाजी बाजार में सप्लाई कम, ताजा सब्जी की कीमतें आसमान छूने लगीं
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.गोबीचा दर ४० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत वाढला असून, टोमॅटो ६० रुपये तर चाकवत ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे.याशिवाय भेंडी, वांगी, गवार, कारले, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि बाजारातील आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाला आहे.दुसरीकडे, वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या भाजीपाला खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे.0
0
Report
सवतसडा धबधबा बन गया Koan में पर्यटकों का नया पसंदीदा; चिपळूण का हॉट स्पॉट
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी..सह्याद्रीच्या कुशीत उंच कड्यावरून फेसरणारा सवतसडा धबधबा ठरतोय पर्यटकांची पहिली पसंती.. अँकर intro वरुणराजाच्या आगमनाने सध्या संपूर्ण कोकण परिसर निसर्गाच्या विविध रंगांनी नटला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचा अनुभव घेता येत आहे.सह्याद्रीच्या नागमोडी घाटरस्त्यांवरून जाताना उंचावरून कोसळणारा चिपळूणजवळील 'सवतसडा धबधबा' सध्या पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पाहुयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट... दाट झाडीझुडपांमधून आणि काळ्या कड्यांवरून फेसाळत येणारे हे पांढरेशुभ्र पाणी पाहताच,महामार्गावरील वाहनांचे ब्रेक आपोआप सवतसड्यापाशी लागतात.निसर्गाच्या या अथांग रूपावर आधारित एका कवीने सुंदर ओळी लिहिल्या आहेत... "उंच कड्यावरून कोसळते पांढरे शुभ्र हे पाणी, हिरव्यागार रानात घुमते निसर्गाची गाणी... सवतसड्याच्या या रूपावर पर्यटक झाले दंग,पावसाच्या या सरींनी चढवला आनंदाचा रंग!" एकूणच काय तर, सह्याद्रीच्या कुशीतून उंच काड्यावरून फेसळणारा हा 'सवतसडा' धबधबा सध्या कोकणातील पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.जर तुम्हीही या पावसाळ्यात सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल,तर चिपळूणचा सवतसडा तुमचा वीकेंड नक्कीच खास करेल. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता चिपळूणकडे वळत राहतील हे नक्की..0
0
Report
Advertisement
