445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर की सड़क पर खड्डे ने नगरसेवक नाराज़ होकर सड़क पर ही किया विरोध
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तुलसी नगर, वृंदावन नगर आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आज तुकूम प्रभागाचे नगरसेवक राहुल विरुटकर हे याच मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह घसरून पडले. या घटनेनंतर त्यांनी संतप्त होत आपली दुचाकी रस्त्यातच ठेऊन आंदोलन सुरू केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी घटनास्थळी येऊन रस्ता दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत वाहन हटवणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने गड़चिरोली के आदिवासी छात्रों को प्रेरित किया; राजभवन में भावपूर्ण स्वागत
Gadchiroli, Maharashtra:टायटल:---मोठी स्वप्ने पाहा... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश, राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचे आत्मीय स्वागत, भविष्यातील ध्येय जाणून घेत साधला मनमोकळा संवाद अँकर:-- मोठी स्वप्ने पाहा, शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत नाव, गाव, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयाविषयी विचारपूस केली. देशाच्या प्रथम नागरिकांशी झालेला हा संवाद विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा प्रेरणादायी क्षण ठरला. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली शैक्षणिक सहलीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. काल राष्ट्रपती भवनात पोहोचताच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांचे नाव, ते कोणत्या गावातून आले आहेत, कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहेत आणि भविष्यात काय बनण्याची इच्छा आहे, याची उत्सुकतेने विचारपूस केली. दिल्ली शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार तसेच राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देत आहेत. या भेटींमधून विद्यार्थ्यांना देशाची लोकशाही व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षणाच्या संधींची व्यापक माहिती मिळत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
चंद्रपुर के मित्रनगर में पत्थर से युवक की हत्या, इलाके में हड़कंप
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहरातील मित्रनगरात दगडाने ठेचून युवकाची हत्या,परिसरात खळबळ ॲंकर :---- चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मित्रनगर परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष अरुण भेंडे रा. पाला, जि. अमरावती असे मृताचे नाव असून, अज्ञात हल्लेखोराने बाईकवर येत त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.0
0
Report
Advertisement
पुणे ग्रामीण पुलिस ने इंटरराज्य केबल चोर गिरोह का पर्दाफाश किया; 12 मामले उजागर
Shirur, Maharashtra:पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य केबल चोरट्यांच्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे, मध्य प्रदेशातील या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील काही दिवसांपासून नदीपात्र परिसरातून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत सिंचनाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे सापळा रचून या आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
शाहू महाराज के विचारों पर सरकार की कार्रवाई, मंत्री-आमदार बगावत?
Kolhapur, Maharashtra:*आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस* ज्यांनी समतेचा संदेश दिला त्यांची आज जयंती त्या राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने सरकारने पावले टाकावीत शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था, पाऊस उशिरा आल्याने आलेल्या समस्या यासाठी सरकारने शाहू महाराजांच्या विचारावर कारभार करावा *On संजय दिना पाटील* सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय संजय पाटील असे बोलू शकत नाहीत ते थेट बोलतात की पाच जणांचा खून झाला होता राजकीय घटना घडल्यावर पत्रकार येतातच तुम्हाला हवे असतील तर पत्रकारांना भेटता, त्यांना पाहिजे असता तर नाही भेटणार असं राजकारणात होत नाही पत्रकारांना संयमाने सामोरे जावे लागते, जी भाषा त्यांनी वापरली त्याला राज्य सरकारचा वरदहस्त आहे या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे, असा संदेश द्यायचा असेल तर संजय पाटलांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी सत्तेतील लोकांनी काही बोललं काही वागलं तरी चालेल हा संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे *On महाविकास आघाडी आमदार बैठक* जे आमदार गैरहजर होते त्यांनी कारणे दिलेली आहेत काहीजण बाहेरगावी होते, अचानक 23 जून ची तारीख 24 जूनला ठरल्याने काही आमदार येऊ शकले नाहीत त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे ठाकरे गटाचे आमदार जातील असे वाटत नाही ज्यांना जायचं होतं ते 2022 लाच गेले आहेत *On ऍम्ब्युलन्स* सरकारने ऍम्ब्युलन्स खरेदी करण्याबाबत जाहीर केलं होतं मात्र टेंडर कोणाला द्यायचं यावरून देखील दबाव सुरू आहे टेंडर कोणालाही द्या पण लोकांना लवकर सेवा द्या इतकीच आमची अपेक्षा *On मुश्रीफ* ठेकेदारांचा अधिवेशन झालं त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो रस्त्यात किती खड्डे, पडले कोणाचे बिल तटले. एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही जिल्हा नियोजनचा निधी keवळ सत्ताधाऱ्यांना मिळतो *On शक्तिपीठ जिल्हा परिषद ठराव* जनभावना बघितली तर शक्तिपीठ महामार्ग गरजेचा नाही मुड्दाम कोण विरोध करतं, विकासाला विरोध करतं म्हणून कोणाचा विरोध नाही शेतकरी या प्रकल्पातून उध्वस्त होणार आहे , त्याची कल्पना सर्वपक्षीय लोकांना आहे *On गोकुळ बिनविरोध* बिनविरोधात संदर्भात आपल्याशी कोणती चर्चा झालेली नाही काँग्रेस म्हणून आम्ही 30 जून रोजी एकत्र ठराव दाखल करत आहोत लढाई करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे *On मुश्रीफ संताप* शक्ती प्रदर्शन करत एक गटाने ठराव दाखल करणे हे किती योग्य होते ठराव तारकांनी स्वतंत्रपणे ठराव करून दाखल करणे असे ठरले होत निर्माण झालेला गोंधळ हा गर्दीमुळेच झाला आहे अधिकाऱ्यांवर किती दबाव टाकायचा हे महायुतीतील नेत्यांनी ठरवलं पाहिजे ठराव दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली आहे म्हणजे दररोज 100 ठराव दाखल केले तर नोंदणी आणि पोहोच देता येते काल झालेल्या गर्दीमुळे कोणी ठराव दिला? त्यावर कोणाची सही आहे? ठराव तारकांनीच ठराव दिला याचा पत्ता लागणार नाही दररोज जाऊन ठराव दिले तरच प्रशासनाला खातरजमा करता येईल ज्यावेळी तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले याचा आकडा समोरिल निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला ठराव मसुदा पुन्हा छापून ठराव दाखल करत आहेत त्यामुळे दीडशे ते 200 दुबार ठराव येण्याची शक्यता आहे हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाण्याची भूमिका आहे कायदा आणि सुव्यवस्था मोडून प्रशासन अधिकाऱ्यांना काय मिळणार आहे ते सत्तेतील लोकांनी ठरवले पाहिजे0
0
Report
बदलापुर नगरपालिका ठेकेदार को नोटिस, दो माह वेतन न मिलने पर ब्लैकलिस्ट की चेतावनी
Ambernath, Maharashtra:कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे अग्निशामक दलाचे कंत्राटी कर्मचारी पुरते हवालदिल झाले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत बदलापूर नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला दोनवेळा नोटीस बजावली असून, पगार न दिल्यास थेट 'काळ्या यादीत' टाकण्याचा कडक इशारा नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी दिला आहे. बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलात कर्तव्य बजावणाऱ्या 32 कंत्राटी फायरमनचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने रोखून धरले आहेत. दोन-दोन महिने पगार न मिळाल्याने ते प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या त्रासाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर विरोधात नगरपरिषदेने त्याला आतापर्यंत दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिकेकडून कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही त्याने कर्मचाऱ्यांचे पगार जमा न केल्याने प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
Advertisement
अबिटकर बोले: शाहू महाराज की जयंती पर स्वास्थ्य और विकास योजनाओं पर जोर
Kolhapur, Maharashtra:प्रकाश आबिटकर बायट मुद्दे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे शाहू महाराज यांच्या विचाराचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे कोल्हापूर पासून देशापर्यंत शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेतली जाते आबिटकर ऑन संजय दिना पाटील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बोलताना काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत अनावधानाने घडलेल्या घटनेबद्दल संजय दिना पाटील यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे आबिटकर ऑन रुग्णवाहिका आरोग्य विभाग, महानगरपालिका, एन एच ए आय यांच्या रुग्णवाहिकेचे काम व्यवस्थित सुरू आहे प्रश्न केवळ योग्य ठिकाणी योग्य रुग्णवाहिका असणे याबत आहे तातडीने रुग्णवाहिका मिळाली पाहिजे याबाबत समन्वयांवर काम करणे गरजेचे आहे ते काम योग्य पद्धतीने झाल्यानंतर कुठेही अडचण येणार नाही आबिटकर ऑन अमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण नशा मुक्त अभियान सुरू केलं आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे ही समस्या संपूर्ण राज्यभर आणि देशभर आहे कठोरातील कठोर कारवाई केली जाईल शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा अमली पदार्थ खपवून घेतला जाणार नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आबिटकर ऑन ऑपरेशन टायगर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर राज्यभरातले लोकप्रतिनिधी यांचा विश्वास आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडे आमदार खासदारांचा ओढा वाढला आहे येणाऱ्या काळातील अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील आबिटकर ऑन गोकुळ दूध संघ गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत काल हसन मुश्रीफ साहेब यांनी त्यांचे ठराव सादर केले प्रत्येक पक्ष आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करत राहणार आहे त्यामध्ये काहीही गैर नाही आबिटकर ऑन शाहू महाराज स्मारक राजर्षी शाहू महाराज यांचे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ते सर्व ठिकाणी विकास करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये घेतलं जाईल0
0
Report
रायगढ़ के 28 डैमों में जल भंडार 18.82% तक पहुंचा, किसानों को राहत
Chendhare, Maharashtra:स्लग - जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ...... दोन दिवसात साठा १८.८२ टक्क्यांवर ....... शेतकरी , नागरिकांना मोठा दिलासा ...... अँकर - रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील २८ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण साठा १८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा साठा सुमारे १३ टक्के होता. वावे धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून सुतारवाडी, आंबेघर, भिलवले आणि मोरबे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठ्यामुळे पिण्याचे पाणी व भातशेतीबाबत दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने sाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.0
0
Report
रेलवे ट्रैक टूटने से मध्य रेलवे बाधित, कई लोकल ट्रेनें धीमी गति से चल रहीं
Kalyan, Maharashtra:रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत कल्याण स्थानक के पास रेल्वे रुळाला तडा गेलाय. त्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे .अनेक लोकल गाड्या यामुळे धीम्या गतीने धावत आहेत. विशेष करून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झालाय. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून पुढे चालायला सुरुवात केली. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलंय.0
0
Report
Advertisement
वाशिम में खरीफ पेराई गति पकड़, पिछले तीन दिनों की बरसात से किसान खुश
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाला वेग आला आहे.शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणी सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सोयाबीन,तूर,मूग आणि उडीद या पिकांची पेरणी सुरू असून,अनेक ठिकाणी ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी केली जात असून कपाशीची लागवड केली जातं आहे.जूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते.मात्र,मागील तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे शेतकरीांना मोठा दिलासा मिळाला असून,पुढील काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरणीही पूर्ण होण्याची शक्यता आहे.0
0
Report
सोलापुर में दो नक्षत्रों के चलते गधों के लग्न की खबर चर्चा में
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात दोन नक्षत्रे कोरडी केल्याने बळीराजा चिंतेत, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात आले गाढवाचे लग्न - संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन नक्षत्रे कोरडी गेल्याने बळीराजा प्रचंड चिंतेत - वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये लावण्यात आले गाढवाचे लग्न - एक नर आणि एक मादी अशी दोन गाढव निवडत त्यांना स्वच्छ धुऊन वधू-वरासारखे सजवून गावातून काढण्यात आली मिरवणूक - पापरी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात मिरवणुकीत संपूर्ण गावकरी सहभागी - अंतर पाठ धरून अक्षता टाकत लग्न लावल्यानंतर गावकऱ्यांसाठी साबुदाण्याचा आखण्यात आला बेत - वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी लावण्यात आलेले गाढवाचे लग्न संपूर्ण जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय0
0
Report
शिंदे ने विमुक्त समुदाय के सशक्तिकरण हेतु संजय राठोड की नियुक्ति की
Yavatmal, Maharashtra:शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या या नेमणुकीतून देशातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टीकोन दिसून येत आहे. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. या समाजांना एकत्रित नेतृत्व आणि सक्षम संघटन देण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी शिवसेनेने सोपविली आहे.0
0
Report
Advertisement
खुराणा ट्रैवल्स की बस रेलवे पुल के पास दुर्घटनाग्रस्त, चालक समेत तीन यात्री गंभीर घायल
Washim, Maharashtra:वाशिम शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलानजीक आज सकाळी खुराणा ट्रॅवल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. कारंजावरून वाशिमकडे येत असताना भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला जात चिकन,मटण व पानपट्टीच्या टिनपत्र्यांच्या दुकानांचा चुराडा केला. अपघातात दुकानांतील लोखंडी रॉड आणि लाकडी बल्ल्या बसच्या चालक केबिनमध्ये घुसल्याने चालकासह केबिनमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना वशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानाही या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
पहली बरसात में येवला की सड़कों पर जलजमाव, गड्ढे दिखे, मरम्मत पर सवाल
Yeola, Maharashtra:यंदाच्या पहिल्याच पावसामुळे येवला शहरातील शनि पटांगण परिसरात रस्त्यांवर व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे अलीकडेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवरही पाणी साचल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, विंचूर चौफुली येथे शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एका ठिकाणी मोठा खड्डा असल्याने पाण्याखाली खड्डा दिसत नसल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
अंगणवाड़ी जाने से इनकार पर मां ने बेटी को लाठी से मारा; वीडियो वायरल
Navi Mumbai, Maharashtra:अंगणवाड़ी जाने से इनकार करने पर पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे राहणाऱ्या एका महिलेच्या चिमुकलीला अंगेणवाडीत जावले न जावले म्हणून तिची लाथ मारण्यात आली, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई-बाबत संताप व्यक्त केला जातो आहे.0
0
Report
Advertisement
