445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चांदोली डैम में पानी का स्तर घटा; 41.49% पाणीसाठा, बाढ़ जैसी स्थिति की आशंका
Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणात पाणी साठ्यात घट झाली आहे. सध्या 41.49% इतका पाणीसाठा आहे. गतवर्षाच्या तुलनेत दीड टीएमसी पाणीसाठा अधिक असला तरी तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत असल्याने धरणातून अधिक पाणी सोडण्याची मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातल्या 49 पाझर तलावांपैकी 22 पाझर तलाव हे कोरडे पडले आहेत. चांदोली धरण मध्ये सध्या 11.49 टीएमसी इतक्या पाणीसाठा आहे.0
0
Report
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प के शेष सीमा पर किसान मोर्चा: बिबटियों के हमलों से फसलें खतरे में
Sangli, Maharashtra:स्लग - बिबट्याचे हल्ले व वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांची थेट सहयाद्री व्याघ्र प्रकल्पावर धडक.. अँकर - बिबट्या पाळायची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी थेट सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली येथील सहयाद्री व्याघ्र प्रकल्पात शेतकरयांनी आंदोलन केले आहे. मनसेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सहयाद्री प्रकल्पात जाऊन धरणे आंदोलन केलं,सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या वाघांमुळे चांदोली अभयारण्यातील बिबट्या व हिंस्र प्राणी,हे नागरी वस्तीत शिरून हल्ले करत आहेत, तसेच शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे देखील मुश्किल बनले आहे, यामुळे सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला कुंपण घालावे,वनविभागाचे असणारया कायद्यात दुरुस्ती करून शेतकरी व ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, अशा मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर,सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला धडक देत,जंगल सत्याग्रह छेडण्याची घोषणा करत मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही पाऊल उचललं नाही,तर मनसे स्टाईलने आंदोलन करू ,असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला आहे. बाईट - तानाजी सावंत - जिल्हाध्यक्ष, मनसे,सांगली.0
0
Report
नाशिक मार्ग पर बोलेरो कार में आग, परिवार की सूझबूझ से बची बड़ी आपदा
Lasalgaon, Maharashtra:विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर लासलगाव-विंचूर दरम्यान पालखेड कालव्याजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील योगेश न्याहारकर हे नाशिक येथे मुलीचा पेपर आটोपल्यानंतर कुटुंबासह लासलगाव मार्गे घरी परतत होते यावेळी अचानक बोलेरो गाडीमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत पत्नी व दोन मुलींना गाडीतून खाली उतरवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे0
0
Report
Advertisement
देहूरोड में अज्ञात हमलावरों की गोलीबारी: एक की मौत, इलाके में तनाव
Varsoli, Maharashtra:देहुरोड शहरातील अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू, परिसरात तणाव…देहुरोड शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात रमेश रेड्डी याच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
कल्याण स्टेशन परिसर में रिक्षा चालकों पर कार्रवाई, परमिट-गणवेश चेक
Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशन परिसरात आज रिक्षा चालकांवर कारवाई. परवाने, गणवेश, परमिट नसणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांची मोठी पळापळ झाली. अनेक महिन्यानंतर अशा प्रकारची कारवाई झाल्यानंतर प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र या कारवाईत सातत्य असायला हवं मागणी केली जातीय.0
0
Report
विधान परिषद चुनाव में भाजपा के पाँच पद, उम्मीदवारों की भीड़; निंबाळकर ने इनकार किया
Pandharpur, Maharashtra:विधान परिषद चुनाव में भाजपा के पाँच पद, उम्मीदवारों की भीड़; निंबाळकर ने इनकार किया0
0
Report
Advertisement
सोलापुर के भोंदू बाबा मनोहर भोसले और सहयोगी की कोठडी बढ़ी; आश्रम से पावतियाँ बरामद
Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे माढा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी २ मे पर्यंत पोलीस सुनावली आहे. मनोहर भोसले यांच्या घोटी येथील आश्रमात 421 पावत्या सापडलेले आहेत. प्रत्येक पावती 11000 रुपयांची आहे. या तीन ते चार महिन्याच्या कालावधी या पावत्यांसोबत या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने ही पोलीस कोठडी दिली आहे.0
0
Report
सरकारी गायरान जमीन छोड़ किसान: घर-खेत पर रेल्वे कब्जा, काला झंडा, आत्महत्या की धमकी
Kalyan, Maharashtra:सरकारी गायरान जमीन छोड़ शेतकऱ्यांच्या घरावर आणि बागायती जमिनीवर रेल्वे प्रशासनाचा घाला! कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावरून मानिवलीचे शेतकरी आक्रमक; घराघरांवर काळे झेंडे लावून अधिकाऱ्याला काळे झेंडे दाखवून नोंदवला सरकारचा निषेध. जमीन गेली तर आम्ही आत्मदहन करणार शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला इशारा0
0
Report
विदर्भ में तापमान 45 डिग्री के पास पहुंचा: आज के शहरों का तापमान
Nagpur, Maharashtra:विदर्भात उष्णतेची तीव्रता मात्र पारा थोडा घसरला आज अकोला, अमरावती आणि वर्धाला पारा 45 अंशावर विदर्भातील जिल्ह्यांत आजचे तापमान अकोला :- 45.2 अमरावती- 45.2 वर्धा--45.0 यवतमाळ-44.0 चंद्रपूर -44.8 नागपूर -44.4 वाशิม -43.6 भंडारा:- 42.0 बुलढाणा:- 42.3 गडचिरोली :- 44.0 गोंदिया :- 42.20
0
Report
Advertisement
आर्वी में ढोलताशा आंदोलन: घरकर वृद्धि के खिलाफ तेज़ नागरिकों ने किया प्रदर्शन
Wardha, Maharashtra:वर्धा आर्वीत ढोलताशा आंदोलन; नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात संताप घरकर पाचपट वाढीविरोधात नागरिक रस्त्यावर पाणीटंचाई, कचरा व स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब बाळा जगताप यांच्या नेतृत्वात संयुक्त आंदोलनाला मोठा प्रतिसाद अँकर - आर्वी नगरपरिषदेच्या कथित हुकूमशाही कारभाराविरोधात आज आर्वी शहरात जोरदार ढोलताशा आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते तथा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेने केलेल्या घरकरात तब्बल पाचपट वाढ केल्याचा आरोप करत, ही करवाढ अन्यायकारक आणि जनतेचे आर्थिक शोषण करणारी असल्याचे आंदोलकांनी म्हटले. करवाढीच्या तुलनेत नागरिकांना मूलभूत सुविधा अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने ही वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच शहरातील तुंबलेले नाले, वाढती डासांची समस्या, अनियमित कचरा संकलन, काही भागांतील तीव्र पाणीटंचाई, तसेच घरकुल योजनेतील विलंब या प्रश्नांवरही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवावी, नियमित पाणीपुरवठा करावा आणि गरजूंना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.0
0
Report
पुणे में इंडस इंड बैंक रिकवरी एजेंटों ने क्रेडिट कार्ड वसूली के नाम पर मारपीट
Pune, Maharashtra:पुण्यात इंडस इंड बँकेच्या रिकव्हरी एजंट्सच्या गुंडांनी क्रेडिट कार्ड वसूली साठी एका ग्राहकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केलीय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय...याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्या वसुली एजंट्सना ताब्यात घेतलं असून रितसर गुन्हा दाखल केलाय पण या निमित्ताने बँकांच्या वसुली एजंट्सच्या गुंडागर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय0
0
Report
कल राज्य सरकार कृष्णा डायवर्षण प्रकल्प को मंजूरी देगा, सोलापुर को मिलेगा फायदा
Pandharpur, Maharashtra:कोल्हापूर सांगली पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त असणारा कृष्णा डायवर्षण प्रकल्पाला उद्या राज्य सरकार कडून मंजुरी मिळणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. कृष्ण नदी आणि तिच्या उप नद्यांमधील 52 TMC वाहून जाणारे पाणी बोगद्याचा वापर करून उजनी धरणात आणले जाणार आहे. यांप्रकलपासाठी पंधरा हजार कोटी रूपयांचा निधी राज्य शासन देणार आहे. त्यामुळे सोलापूर या मराठवाड्यातील दुष्काळी भागाला फायदा होणार आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में आंबे के नुकसान पर 22 हजार रु प्रति हेक्टेयर मुआवजा घोषित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा बागायतदारांना जाहीर झालीय हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग ऍक्शन मोडवर जिल्हा कृषी विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू आंबा शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन माहिती संकलनाचं काम सुरू १५ मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंब्याचं ९० टक्के आहे नुकसान, तर काजूचं ७० टक्के नुकसान पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी साह्ययक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जातात शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्ह्यात आंबा आणि काजूचे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र जाहीर झालेली मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं मदत वाढवून देण्याची मागणी0
0
Report
रुचिता घोरपडे को नगराध्यक्ष महासंघ के अध्यक्ष पद की नियुक्ति
Ambernath, Maharashtra:नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडींची घोषणा: रुचिता रुचिता घोरपडे यांची निवड. रुचिता घोरपडे बदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष. राज्यातील 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे नेतृत्व या महासंघाने केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. या महासंघात अंबरठाenच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड झालीय. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे विषय सरकार दरबारी मांडणा, प्रशासनावर अंकुश ठेवणं, नगराध्यक्षांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महासंघाची स्थापना झाली. गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे महासंघाची कार्यकारणी निवड नव्हती. आता सर्व नगरपालिका निवडणुक झाल्यामुळे अध्यक्षपदासह कार्यकारणी निवड मार्ग मोकला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षांना महासंघचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.0
0
Report
चंद्रपुर के धानोरा में वर्धा नदी में तीन लोग डूबे, खोज अभियान जारी
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीत तिघे बुडाले, शोधकार्य सुरू अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील खामोना गावचे राजू हरिचंद्र कोडापे हे बहिणीच्या गावी धानोरा येथे आले होते. आज दुपारी वर्धा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात घसरले. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांची १२ वर्षीय मुलगी अर्पिता कोडापे आणि १४ वर्षीय भाची प्रियांका मडावी यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तिघेही खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, शोधमोहीम सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.0
0
Report
Advertisement
