icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दिलचस्प खुलासा: लातूर सीबीआय पेपरफुटी जांच तेज, डॉ. मनोज शिरूरे के संबंध बने केंद्र

Latur, Maharashtra:लातूर PKG स्किप्ट ::- नीट पेपरफुटी प्रकरणात तपासाचा फास आवळला.... लातूरमध्ये सीबीआय तपासाला वेग डॉ. मनोज शिरूरेच्या संपर्कांची चौकशी; काही पालकही सीबीआयच्या रडारवर? पी. व्ही. कुलकर्णी कनेक्शनची पडताळणी; तपासात नवे धागेदोरे समोर लातूरमध्ये सीबीआयची कारवाई वाढली; आणखी चौकशीची शक्यता.... नीट पेपरफूटी प्रकरणात सीबीआयचा तपास आता आणखी खोलात जाताना दिसत आहे. डॉ. मनोज शिरूरे याला अटक केल्यानंतर तपास केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. लातूरमध्ये रात्री उशिरापर्यंत सीबीआयची कारवाई सुरू होती. आर्थिक व्यवहार, कथित लाभार्थी आणि संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्यावर तपास यंत्रणांचा भर असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट... डॉ मनोज शिरूरे यांच्या पत्नीची CBI कडून चौकशी... डॉ मनोज शिरूरे यांनी आपल्या पाल्यांसाठी पेपर विकत घेतला होता... डॉ मनोज शिरूरे ला अटक झाल्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. लातूरमध्ये विविध ठिकाणी तपास यंत्रणांची हालचाल वाढली असून प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित साखळी उलगडण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहे. डॉ . शिरूरे यांच्या पत्नीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय डॉक्टर नातेवाईकाच्या घरावरही तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींमधील संपर्क आणि व्यवहारांची माहिती तपास यंत्रणा तपासत आहेत. वैभव बालकुंदे रिपोर्टर या संपूर्ण प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. कथित आर्थिक लागेबांधे, पैशांचा व्यवहार आणि पेपर विकत घेतलेले पालक कोण ? याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाची व्याप्ती आता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे..... वैभव बालकूंदे ZEE 24 TAAS
0
0
Report

रत्नागिरी, कोकण में मानसूनपूर्व सरी शुरू; गर्मी से नागरिकों को राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी कोकणात मान्सूनपूर्व सरींची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा अँकर : हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात आज सायंकाळपासून मान्सूनपूर्व सरींना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

शिरूर में वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने किसानों को बड़ा नुकसान

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलंय, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिट हि झालीय, वादळी वाऱ्याच्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून विद्युत वाहक खांब तसेच फळबाग हि जमीन दोस्त झाल्यात, वादळी वाऱ्याच्या या पावसाने शेतीमालाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय, मात्र या मान्सूनपूर्व पावसाने खरिप हंगामापुर्वींच्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे.
0
0
Report
Advertisement

ठाणे में ड्रग्स गिरोह पठाण गैंग के पांच गिरफ्तार, 34 करोड़ की हेरोइन जप्त

Kalyan, Maharashtra:ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड कल्याण पोलिसांकडून तब्बल ३४ कोटी १८ लाखांची हिरोईन अमली पदार्थ जप्त मुख्य पुरवठादारासह पाच आरोपी अटक, मुख्य आरोपी अमजद पठाण वर मर्डरचा गुन्हा दाखल, जामिनीवर असल्यानंतर ही करायचा ड्रक्स सप्लाय. नाशिकहुन यायचं हिरोईन कल्याणच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ९ किलो ७६८ ग्राम वजनाची तब्बल ३४ कोटी १८ लाख रुपयांची हीरोइन अमली पदार्थ जप्त केलंय. तसेच या अमली पदार्थाच्या मुख्य पुरवठादारासह एकूण पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकहून या सगळ्या ब्राऊन शुगरचा पुरवठा कल्याण शहरात केला जायचा आणि कल्याण शहरा मार्गे मुंबई हे अमली पदार्थ पाठवलं जायचं. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांची गस्त सुरू होती. याच वेळेस या पथकाला कल्याण पश्चिमेच्या सांगळेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर स्मशानभूमी जवळ सकाळी ७.२०च्या दरम्यान दोन इसम बॅग घेऊन संशयास्पद रित्या हालचाल करतांना दिसले. पोलिसांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शिवाय त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात हीरोइन हा अमली पदार्थ पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कासिम अब्दुल सत्तार वसईकर, आणि कृष्णा हरेमनी या दोघांना अटक केली. चौकशी दरम्यान यातील वसईकर यांच्या शहापूरच्या घरावर पथकाने झाडाझडती घेतली असता तिथे देखील १ कोटी ८५ लाख ८५ हजारांचे हिरोईन अमली पदार्थ जप्त करण्यात आले. शिवाय तपासा दरम्यान या अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार अमजद युसूफ पठाण असून तो गणेश जंगमार उर्फ अण्णा याला हे सगळे अमली पदार्थ देत होता. शिवाय पठाण याला अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकापर्यंत पोहोचवण्याचं काम वसईकर आणि त्याचे साथीदार करत होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पुरवठादार अहजद पठाण, गणेशन उर्फ अण्णा, सद्दाम शेख अशा एकूण पाच जणांना अटक केलीय. अमजद पठाण याला दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पूर्वी अहमद पठाण आणि कासिम वसईकर त्याचबरोबर सद्दाम शेख यांच्यावर मुंबई आणि उपनगरांच्या विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर नार्कोटिक्स सेल मुंबईत देखील यांच्या विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अमली पदार्थात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. दरम्यान या रॅकेटमध्ये आणखीन मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय जात आहे. संजीय जाधव (अप्पर पोलीस आयुक्त)
0
0
Report

NEET पेपरफुटी के बावजूद लातूर का विश्वजीत डॉक्टर बनने का सपना जिंदा रखे

Latur, Maharashtra:लातूर PKG डॉक्टर होण्याचं स्वप्न... त्यासाठी दिवस-रात्र अभ्यास... तीन वर्षांचा संघर्ष... पण या संघर्षात अशी एक किंमत मोजावी लागली... जी कोणालाही हादरवून टाकेल... NEET च्या तयारीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं... पाहूयात याच संदर्भातील पाहुयात स्पेशल रिपोर्ट... एका बाजूला NEET पेपरफुटी प्रकरणामुळे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे... तर दुसऱ्या बाजूला लातूरचा विश्वजीत तेलंगे डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वेदनांशी झुंज देत आहे... गेली तीन वर्षे NEET परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत... सततचा अभ्यास... आणि स्वतःच्या आरोग्याकडे झालेलं दुर्लक्ष... या सगळ्यात विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या... आयुष्य अचानक बदललं... पण वेदना, उपचार आणि संघर्ष यांच्यातही डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र त्याने जिवंत ठेवलं आहे..परिस्थिती इतकी गंभीर झाली की विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या... उपचारासाठी रुग्णालय, डायलिसिस, औषधं आणि वेदनांचा प्रवास सुरू झाला... पण एवढ्या संकटानंतरही त्याने हार मानली नाही... आजींनी किडनी दान करून त्याला नवजीवन दिलं... आणि उपचार सुरू असतानाही त्याने अभ्यास थांबवला नाही... कारण डॉक्टर होण्याचं स्वप्न आणि पांढरा कोट घालण्याची जिद्द त्याने अजूनही जिवंत ठेवली आहे... बाईट – विश्वजीत तेलंगे – विद्यार्थी या भागातील माहिती आणखी स्पष्ट करण्यासाठी VO 02, VO 03 इत्यादी विभागांमध्ये आयुष्य, कुटुंबीयांची माहिती, वैद्यकीय खर्च, शासनाकडून सवलतीची मागणी या गोष्टींचा समावेश आहे. यातNEET पेपरफुटीमुळे गुणवत्तेवर प्रश्न, आजारपण, वेदना आणि संघर्ष यांचं वर्णन आहे. डॉक्टर्स होण्याचं स्वप्न जिवंत ठेवणाऱ्या विश्वजीत च्या या संघर्षात मेहनत, जिद्द आणि संघर्षाची ही कहाणी अनेक प्रश्न उपस्थित करते... मात्र डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची लढाई अजूनही सुरूच आहे... वैभव बालकुंदे Zee 24 TAAS Latur
0
0
Report

बीड के गेवराई में गानों के आवाज को लेकर दो गुटों में भिड़ंत, घायल

Beed, Maharashtra:बीड: भय इथले संपत नाही; गेवराई तालुक्यातील गंगावाडी शिवारात रात्रीच्या सुमारास एका गटातील व्यक्तीने गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले यानंतर दुसऱ्या गटातील लोकांनी शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही गटातील लोक आमनेसामने आले. लोखंडी गज, दगड, लाठ्याकाठ्या आणि कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये 10 ते 11 जखमी झाले तर जखमींमध्ये लहान मुलांच्या समावेश असून गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही गटातील लोकांच्या फिर्यादीवरून एकुण 14 लोकांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तलवाडा पोलीसांकडून तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

500 रुपये की लालच से 18 एकड़ खेत में आग, किसान को लाखों का नुकसान; आरोपी गिरफ्तार

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात केवळ 500 रुपयांच्या लालसेपोटी तब्बल 18 एकर शेतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत संत्रा, सिताफळ, आंबा, बांबू यांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. हिवरखेड येथील शेतकरी मुकुंद उर्फ पंकज अग्रवाल यांच्या चिचारी शिवारातील शेताला गुरुवारी दुपारी आग लावण्यात आली. मित्र शेर खान यांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर अग्रवाल घटनास्थळी पोहोचले असता शेतात भीषण आग लागलेली दिसली. या आगीत शेकडो फळझाडे, सुमारे 3500 बांबू, गोठा, खताची पोती, ड्रिप व स्प्रिंकलर साहित्य जळून खाक झाले. नुकसान अंदाजे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमेश मंगल कासदेकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका व्यक्तीने 500 रुपये देऊन आग लावण्यास सांगितल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 326 फ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. दरम्यान ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा चिचारी आणि चंदनपुर गावांनाही मोठा धोका निर्माण झाला असता. महसूल आणि कृषी विभागाने दुसऱ्या दिवशी पंचनामा करून मदतीचे आश्वासन दिले आहे.
0
0
Report

कोकण में अणुऊर्जा प्रकल्प पर भाजपा का विरोध, शिवसेना के खिलाफ स्पष्ट टिप्पणी

Ratnagiri, Maharashtra:chiplun - Ratnagiri भास्कर जाधव अनुऊर्जा प्रकल्प भाजप ने कोकणात आतापर्यंत एकही प्रकल्प आणलाय असं एक तरी उदाहरण द्या शिवसैनिकांनो या प्रकल्पाच्या संदर्भात फार काही एक्साइड होऊ नका भाजप असा कोणताही प्रकल्प आणणार नाही कुठं गेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प रिफायनरी प्रकल्पाच्या वेळेस मी आमच्या पक्षातील लोकांना सांगत होतो की नका बोलू या प्रकल्पाच्या संदर्भात कुठे गेला प्रकल्प आले का त्यांनी आम्ही प्रकल्पाच्या बाजूने आणि शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात म्हणजेच तरुणांच्या नोकरीच्या विरोधात त्यांना चित्र उभं करायचा आहे आणि त्याला तुम्ही बळी पडताय कुठे गेली बारसू ची ग्रीन रिफायनरी अणुऊर्जा प्रकल्प हा 2012-13 ला आला होता त्याचा पुढे काय झालं तुम्ही नवीन कुठला प्रकल्प आणताय त्यामुळे भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये लोकांच्या विकासासाठी कुठलाही प्रकल्प आणणार नाही जो प्रकल्प येणारच नाही त्याच्या विरोधात मला काही बोलण्याची आवश्यकता नाही
0
0
Report

चंद्रपुर में बाघ हल्ले में चार महिलाएं मारी गईं, मानव-वन्यजीव संघर्ष तेज

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- राज्याच्या इतिहासातली मानव -वन्यजीव संघर्षातील सर्वात मोठी घटना, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू ,तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांच्या एका गटावर वाघाचा हल्ला, सर्व महिला घरच्या एकमेव कर्त्या असल्याने गावात तणावाची स्थिती, पोलीस व वनपथक हाताळत आहे परिस्थिती व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज वाघ हल्ल्याच्या घटनेने हादरला. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या कवडूबाई दादाजी मोहुर्ले-45, अनुबाई दादाजी मोहुर्ले-46, संगीता संतोष चौधरी-36, सुनीता कौशिक मोहुर्ले-33 गुंजेवाही गावातील रहिवासी या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसेलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू दाखल झाली आणि पंचनामा करून मृतदेह सिंदेवाही येथे रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना सांगताना सोबतच्या महिला देखील थरथरत होत्या. बाईट १) ,२),३),४),५) प्रत्यक्षदर्शी व्ही. ओ. २) चंद्रपूरसह विदर्भाच्या जंगलांमध्ये तेंदूपाने अर्थात बिडी वळण्यासाठी आवश्यक असलेली पाने तोडण्याचा हंगाम वन विभाग जाहीर करते. यंदा अनेक शासकीय अडथळ्यानंतर हा हंगाम नुकताच जाहीर झाला. ग्रामीण भागातील गरीब घटकातील कुटुंबांना हा संपूर्ण वर्षासाठी पुरणारा आर्थिक स्रोत आहे. म्हणून जिल्ह्यातील खेडेगावातील कुटुंबेच्या कुटुंबे सकाळी चार वाजेपासून नेमलेल्या भागात पाने तोडणीसाठी जातात. ठेकेदार आणि वनखाते मिळून त्यांना यासाठी रक्कम देत असतात. गेली काही वर्षे मानव -वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत म्हणूनच वनविभागाने संघर्षग्रस्त भागातील काही क्षेत्रात तेंदूपाने तोडणी थांबवली आहे. मागील वर्षी याच तालुक्यातील मेंढा माल जंगलात अशाच पद्धतीने पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता. यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेनंतर वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून वाघ जेरबंद करण्याच्या हालचाल सुरू केल्या आहेत. बाईट २) कुमार स्वामी, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी व्ही. ओ. ३) मयत झालेल्या महिला आपल्या घरच्या एकमेव कर्त्या होत्या. कौटुंबिक कारणांनी त्यांना आपले घर मोलमजुरी करून चालवावे लागत होते. मयतांमधील सुनिता मोहूर्ले यांना दोन लहान मुली आहेत तर पतीचे आधीच निधन झाले आहे. मयतांमध्ये कवडूबाई आणि अनुबाई या दोन सख्ख्या बहिणी होत्या. आज या गावामध्ये घटनेनंतर आक्रोश आहे. गेल्या काही महिन्यात या भागात वन्यजीव हल्ल्यात 7 मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षात 2026 या वर्षात 19 मृत्यू झाले आहेत. या भागात मानव- वन्यजीव संघर्षाची स्थिती भयावह असताना मंत्री- अधिकारी कुणीही येऊन विचारपूस करत नाही. त्यामुळे आता उपाययोजना करा अन्यथा घटना झाल्यास कायदा हातात घेऊ असा थेट इशाराच या भागातील नागरिकांनी दिला आहे बाईट ३) अभिजीत मुप्पीडवार ,स्थानिक नागरिक व्ही. ओ. ४) वाघ वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास मयताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. हे हल्ले आता नित्याची बाब झाली असल्याने ग्रामीण चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील स्थिती दहशतची झाली आहे. यावर एकत्रित उपाययोजना न केल्यास स्थिती चिंताजनक होत जाणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

डॉलर एक सौ पर मोदी सरकार के खिलाफ सावजी का चौंकाने वाला पत्र

Buldhana, Maharashtra:बुलढाणा डॉलर १०० रुपयांवर गेल्यास स्वखर्चाने दिल्लीत मोदींचा सत्कार करणार; माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे पंतप्रधानांना उपरोधिक पत्र Anchor : देशातील वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरती किंमत यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अजब आणि कमालीचे उपरोधिक पत्र पाठवले आहे. "देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या दिवशी एका डॉलरची किंमत १०० रुपये होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावी," अशी खोचक मागणी सुबोध सावजी यांनी या पत्राद्वारे केली आहे. सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि राजकीय भूमिकेवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पत्रात म्हटले आहे की, "भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या दिवशी एका डॉलरची किंमत १०० रुपये होईल, तो दिवस देशासाठी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा असेल. आपल्या ‘विश्वगुरू’ नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ आणि देशातील भाजपशासित राज्यांमुळे भारत देशाला हा बहुमान मिळणे आता निश्चित झाले आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला हा बहुमान मिळवता आला नाही." पंतप्रधानांना लिहिल्या्या या पत्रात सावजी यांनी भाजपच्या राजकीय अजेंड्यावरही थेट निशाणा साधला आहे. "देशात जातीयवाद, धर्मवाद आणि जुमलेबाजी यावर आपण सरकारे आणत आहात, याचाही देशवासियांना खूप मोठा अभिमान आहे," असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. एका डॉलरची किंमत १०० रुपये होणे ही गोष्ट गोरगरीब आणि अडाणी जनतेला आभाळाएवढी मोठी वाटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. "जे काम ७० वर्षात काँग्रेस करू शकली नाही, ते तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. ज्या दिवशी डॉलर शंभर रुपयांवर पोहोचेल, त्या दिवशी आम्ही आपल्या पदाला साजेसा असा जाहीर मानसन्मान आणि बहुमान दिल्लीत येऊन स्वखर्चाने करणार आहोत. त्यासाठी आपण आम्हाला वेळ आणि तारीख द्यावी," अशी मागणी करत सुबोध सावजी यांनी पत्राचा शेवट केला आहे. बाईट : सुबोध सावजी (माजी राज्यमंत्री )
0
0
Report

जरांगे से मिलने से पहले लाड को धमकी: पुलिस ने 2 मराठा आरोपी गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भाजप नेते प्रसाद लाड मनोज जरांगे च्या भेटीला छत्रपती नगरात आले मात्र भेटीपूर्वी संभाजी नगरात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला, लाड रात्री मुक्कामी आले , मात्र आल्या आल्या 2 मराठा आंदोलकांनी लाड याना फोन वर धमकी दिल्याचा आरोप लाड यांनी केलाय, आरोपींनी लाड यांच्या फोन वर फोन केला मात्र फोन पीए ने घेतला त्यात दोघांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा लाड यांनी आरोप केलाय...यात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... जरांजेच्या भेटी पूर्वीच लाड याना धमकीचे कॉल्सजीवे मारण्याची धमकी, अर्वाच भाषेत शिवीगाळ लाड थांबले असलेल्या हॉटेल बाहेरून 2 जण ताब्यात भाजप आमदार प्रसाद लाड ज्या हॉटेल मध्ये थांबले होते तिथं आज असा पोलीस बंदोबस्त होता, 60 वर पोलीस कर्मचारी 4 पोलिस निरीक्षक, 2 एसीपी, एक डीसीपी असा हा फौज फाटा लाड यांच्या सुरक्षे साठी तैनात होता, करण म्हणजे प्रसाद लाड आज जरांगे ची भेट घेणार होते त्यासाठी ते रात्री संभाजी नगर मुक्कमी आले रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या पीए ला एक कॉल आला आणि त्यात थेट भेटीसाठी आले म्हणून प्रचंड शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आला असा लाड यांनी आरोप केलाय पोलिसांनी रात्रीतून तपास सुरू करत धमक्या देणाऱ्या 2 जणांना हॉटेल परिसरातूनच ताब्यात घेतले, गणेश उगले, आणि योगेश शेळके धमोरीकर असे दोघांचे नाव आहे दोघेही मराठा आंदोलक आहेत.. याबाबत स्वतः लाड यांनीच माहिती देत हा सगळा प्रकार उघड केला... यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या धमकी प्रकारचा निषेध केला तर याबाबत पोलीस योग्य कारवाई करतील असे संजय शिरसाठ म्हणाले... जरांगे यांनी या प्रकरणात मोठ्या माणसांनी आंदोलकांच्या भावना समजून घ्यावे असे आवाहन केले आहे, भावनेच्या भरात लोक चूक करतात त्याना माफ करावे असे जरांगे पाटील म्हणाले... लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली त्यातून फारसा तोडगा सध्या निघाला नाही मात्र भेटी आधी धमकीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा मात्र चांगलाच रंगला...
0
0
Report

ऑनलाइन फॉर्म गड़बड़ी से दहावी विद्यार्थी परेशान: सरकार ने क्या किया?

Dhule, Maharashtra:शिक्षण विभाग दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा सत्वपरीक्षा घेत असल्याचा दिसून येत आहे, अकरावी साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट व वेळ खाणारी असल्यामुळे विद्यार्थी व पालक हैराण झालेले आहेत. ज्या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरायचा आहे ती तासंतास स्ट्रीम होत असून अनेक ठिकाणी ती संथ गतीने सुरू आहे. कॅप वन व कॅप टू चे अर्ज भरण्यासाठी गव्हर्नमेंट कडनं जी वेबसाईट देण्यात आलेली आहे ती चालत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढलेले आहेत. आधीच शासनाने एक दिवस मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी दिलेले आहे. मात्र मुदतवाढ देऊनही वेबसाईट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तासंतास एकेक अर्ज भरण्यासाठी लागत असल्यामुळे वेळ वाढवून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. तसंच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था विकसित केली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण, बुलेट यात्रा और मंत्री-आमदार पर जमकर हमला: भास्कर जाधव की सरकार पर निशाना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सरकारविरोधात असंतोष वाढतोय; मराठा आरक्षणापासून बुलेट प्रवासापर्यंत भास्कर जाधवांचा हल्लाबोल.. अँकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण,मनोज जरांगे यांचे आंदोलन,मुख्यमंत्र्यांचा बुलेट प्रवास आणि आमदारांच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.. मराठा समाजाची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करत,सरकारविरोधातील असंतोष आता स्पष्टपणे दिसू लागल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.. On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक.. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा या मूळतः शिवसेनेच्या आहेत.स्वर्गीय अनंत तरे येथून सातत्याने निवडून येत होते.सुनील तटकरे यांनी आपल्या भावाला आणि मुलाला निवडून आणले, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी किंवा आपला मतदार वर्ग वाढवण्यासाठी त्यांनी ठोस काम केले नाही. स्वतःच्या कुटुंबातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसत नाही.. On नोज जरांगे यांचे उपोषण.. मनोज जरांगे यांनी नेमका कोणावर विश्वास ठेवला आहे, हे तपासण्याची गरज आहे.मुख्यमंत्री त्यांना खरोखर आरक्षण देतील का, हा प्रश्न आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मत्स्यविकास मंत्र्यांची जुनी क्लिप पाहावी; त्यात मुख्यमंत्री आरक्षण देणार नाहीत, असे वक्तव्य रेकॉर्डवर आहे.मराठा समाजाची आणि मनोज जरांगे यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे.अंतरवली येथील आंदोलन कोणी घडवून आणले,लाठीचार्ज कोणी केला आणि अचानक मनोज जरांगे प्रकाशझोतात कसे आले, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे.. On कॉकरोच पार्टी.. महाराष्ट्रातील आणि देशातील सत्ताधारी पक्षांना आता कोणी पराभूत करू शकणार नाही, असा भ्रम झाला आहे.निवडणुकीनंतर काय परिस्थिती असेल,हे आत्ताच सांगता येणार नाही; मात्र सरकारविरोधातील असंतोष हळूहळू स्पष्टपणे दिसू लागला आहे. On मुख्यमंत्र्यांचा बुलेट प्रवास.. मुख्यमंत्री बुलेटवरून मंत्रालयात आले, मात्र त्या बुलेटचे एव्हरेज किती असते आणि त्यांच्या ताफ्यात किती दुचाकी सहभागी होत्या,हेही पाहायला हवे.एका चारचाकीत चार लोक प्रवास करू शकतात. त्यामुळे हा इंधन बचतीचा प्रयोग नसून उधळपट्टीचाच प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.. On आमदार-मंत्र्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी.. जे आमदार गुवाहाटीला गेले होते,त्यांच्याकडे आधीच दोन ते अडीच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याची ही एक संधी असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला..
0
0
Report

विटा में भोंदुओं ने नरबळी-गर्भपात के झांसे से महिला से ठगी, तीन गिरफ्तार

Sangli, Maharashtra:स्लग - शिवाजी महाराज अंगात येत असल्याचे सांगत नरबळी व गर्भपातीच महिलेला सल्ला,तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल.. अँकर - आमच्या अंगात शिवाजी महाराजांसह अनेक थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुं बाला नरबाळी व गर्भपातचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे.याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून तिघा भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्यात आली,तसेच अघोरी उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर,संकेत निकम आणि सुरज उपाध्याय या तिघां विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट - धनंजय फडतरे - पोलीस निरीक्षक - विटा पोलीस ठाणे. बाईट - विवेक भिंगारदिवे - कार्यकर्ता,अंनिस - विटा
0
0
Report

गवार भाव सिर्फ 1 रुपये प्रति किलो, किसान ने रस्ते पर गवार फेंककर किया विरोध

Dhule, Maharashtra:गवारला भाव अवघा १ रुपया किलो मिळाल्याने, संतप्त शेतकऱ्याने दीाड क्विंटल गवार रस्त्यावर फेकल्यावंगी घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून साक्री तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला अवघा १ रुपया किलो दर मिळत असल्याच्या संतापातून तब्बल दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कारंडे हे आपला गवार विक्रीसाठी पेरेजपूर फाट्यावर घेऊन गेले होते. मात्र व्यापाऱ्याने मालाला १०० रुपये क्विंटल असा दर सांगितल्याने ते संतप्त झाले. गवार लागवडीसाठी ६०० रुपये किलोचे बियाणे, महागडी खते, औषधे तसेच मजुरीवर मोठा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनासाठी हजारो रुपये खर्च करूनही बाजारात खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत गवारचे दर अचानक घसरल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शशप) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी संताप व्यक्त करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top