icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के कर्मचारियों की वसाहती में घटिया निर्माण, महिलाओं ने प्रशासन पर बड़ा आरोप

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम; कर्मचाऱ्यांच्या गृहिणींचा आरोप पावसाळा सुरू होताच क्वार्टर्सला लागली गळती; रस्ते उखडले, नाल्या तुंबल्याने वसाहतीला नरकयातना प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवाव्यात संतप्त गृहिणींची मागणी अँकर :- अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडला असून प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. अवघ्या चार-पाँच महिन्यांतच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व देखभालाची कामे झाली होती. मात्र पहिल्याच पावसात हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांच्या पत्नी व गृहिणींनी केला आहे. सध्या वसाहतीमधील रस्ते पूर्णपणे उखडले असून बसवलेले पेव्हर ब्लॉक बाहेर निघाले आहेत. इतकेच नव्हे तर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी क्वार्टर्समध्ये गळत आहे. कॉलनीमध्ये लहान पाईपलाईनमुळे पिण्याचे पाणी येत नाही अंधाराचे साम्राज्य असूनही पुरेसे स्ट्रीट लाईट्स नाहीत आणि अंतर्गत नाल्या तुंबल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वसाहतीची ही दुरवस्था दूर करून प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बाईट :- एकूण ३, कर्मचारी पत्नी
0
0
Report

इचलकरंजी में सराईत अपराधियों के खिलाफ पुलिस ने धावा कर दी, दो गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींची शहरातील विविध भागांत धिंड काढली. खंडणी, चोरी, खून, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक झालेल्या आरोपींना पोलिसांनी नागरिकांसमोर फिरवत गुन्हेगारीविरोधात कडक संदेश दिला. इचलकरंजीतील रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत सहा वेळा कारवाई करण्यात अल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एका वाहनचालकाला अडवून त्याच्याकडील वाहन आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट यांची भोनेमाळ, जवाहरनगर, गणपती कट्टा आणि परिसरातील इतर संवेदनशील भागांत धिंड काढली. या कारवाईमागचा उद्देश शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश देणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
0
0
Report

1 जुलाई 2026 से चिपळूण पोस्ट विभाग स्वतंत्र, पोस्ट सेवाओं में तेज़ी

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणकरांसाठी आनंदाची बातमी; १ जुलैपासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' सुरू उत्तर रत्नागिरीतील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२६ पासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' कार्यरत होणार आहे. या नव्या विभागात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरील पोस्टल कामांसाठी नागरिकांना रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार असून पोस्टल सेवाही अधिक जलद आणि प्रभावी होणार आहेत.
0
0
Report
Advertisement

नीट के बाद टीईटी पेपर लीक: रत्नागिरी में कांग्रेस ने सख्त जांच की मांग

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी नीटनंतर आता टीईटीचा पेपर फुटला; सखोल चौकशीची रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप करत, सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन सादर केले. यावेळी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.
0
0
Report

भर बारिश में चिचोंडे गाँव में शेड नहीं, villagers की कठिनाई बढ़ी

Chendhare, Maharashtra:अँकर - म्हसळा तालुक्यातील चिचोंडे गावात भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली है. गावातील एका व्यक्तीचे निधन झाले त्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशान भूमीवर शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी सह इतर धार्मिक विधी करावे लागले. म्हसळा तालुक्यातील पाभरे गावातील ही वाडी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून इथं स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यात आला. मात्र ठेकेदाराने त्यावर शेडचे काम केले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते आहे. याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केलीय. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील हे गाव है.
0
0
Report
Advertisement

केतन अग्रवाल हत्या मामले में नया अपडेट: जुपिटर बाइक पुलिस ने की जप्त

Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. चेतन पुण्याहून लोहगडवर ज्या ज्युपिटर दुचाकीवरून आला होता, ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले महत्त्वाचे वाहन म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी आधीच संपूर्ण कट रचला होता. चारचाकी वाहनाने प्रवास केल्यास सोमाटणे फाटा आणि उर्से टोलनाक्यांवर वाहनाची नोंद होऊन पोलिसांना चालक व वाहनाचा माग काढणे सोपे जाईल, ही शक्यता लक्षात घेऊन चेतनने चारचाकीऐवजी ज्युपिटर दुचाकीने पुणे ते लोहगड असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे पोलीसानी याच MH 12 BW 1274 क्रमाका च्या दुचाकी वाहनावर मोबाईल वर बोलताना आढळल्याने १००० रुपयाचा दंड देखील आकारला आहे. ठरल्याप्रमाणे चेतन लोहगडवर पोहोचला. त्यानंतर केतनची हत्या करून तो त्याच दुचाकीवरून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. टोलनाक्यांवरील नोंदी टाळण्यात आरोपी यशस्वी झाले असले, तरी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चेतन आणि सिया यांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केला. रात्री उशिरा पोलिसांनी शोधमोहीम राबवून ही ज्युपिटर दुचाकी ताब्यात घेतली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, पुढील तपासात या वाहनाची निर्णायक भूमिका राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
0
0
Report

गोवा के छह युवक नदी के उफान में फंसे, जंगल में बचाव दल ने सुरक्षित निकाला

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेले गोवा येथील सहा युवक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोडामार्ग येथील जंगलात अडकून पडले होते. संपूर्ण रात्र जंगलात घालवल्यानंतर पहाटे वनविभाग और अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव मोहीम राबवून त्या युवकांची सुखरूप सुटका केली. दोडामार्ग येथील वझरा सकला धबधब्यावर हे तरुण आले होते. मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे युवक जंगलात अडकून पडले होते. नेटवर्क नसल्याने संपर्क ही तुटला होता. त्या युवकांनी आपला चित्तथरारक अनुभव व्हिडिओ द्वारे सोशल मीडियावर व्हायरल केलाय.
0
0
Report
Advertisement

वाशिम में खाद्य सुरक्षा अभियान का असर, 1031 नए आवेदन, 864 पंजीकृत

Washim, Maharashtra:राज्यात अन्नभेसळ आणि बेकायदेशीर खाद्यव्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा प्रभाव वाशिम जिल्ह्यातही दिसून येत आहे.कारवाईच्या धसक्यामुळे हॉटेल चालक,मिठाई व्यावसायिक,दूध विक्रेते व अन्य खाद्य व्यावसायिकांनी परवाना व नोंदणीसाठी मोठी गर्दी केली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात खाद्यव्यवसाय नोंदणीसाठी१,०३१ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यात ८६४ नोंदणीकृत व परवानाधारक खाद्य व्यावसायिक आहेत.अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणीशिवाय खाद्यव्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, व्यवसाय बंद करण्याचे आदेश,परवाना निलंबन तसेच न्यायालयीन कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
0
0
Report

आरोपी सिया गोयल के भाई साहिल गोयल को 10 करोड़ मानहानि नोटिस

Varsoli, Maharashtra:आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाई ची कायदेशीर नोटीस बजावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत," असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे. साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग में बारिश से भूस्खलन, वालावल गांव के घर पर पत्थर गिरा

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात मागील दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे कुडाळ येथील वालावल गावात डोंगर खचण्याची घटना घडलीय. वालावल मुहूर्तळी वाडीत रात्रीपासून डोंगराची माती कोसळत होती. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगरातील एक दगड थेट घरावर आला. त्यामुळे घरच्या भिंतीला तडे गेले. सुदैवाने कोणती जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. मात्र ज्या घरावर दगड आदळला त्या घरातील रहिवासी भयभीत झालेत. पावसामुळे डोंगर भाग खचत चालला असून त्यामुळे येथील रहिवाश्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लागलीच उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
0
0
Report

वाशिम में 61,736 वाहनधारक HSRP पंजीकरण नहीं कराए, 1 जुलाई से दंड लागू

Washim, Maharashtra:अँकर:वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)बसविण्यासाठी आज ३० जून अंतिम मुदत आहे.मात्र, वाशिम जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ७३६ वाहनधारकांनी अद्याप नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही.जिल्ह्यात १ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणीकृत सुमारे १ लाख २१ हजार वाहनांपैकी केवळ ५९ हजार २६४ वाहनधारकांनी एचएसआरपी बसविली किंवा त्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे.जिल्ह्यात एचएसआरपी बसविण्यासाठी १९अधिकृत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की,३० जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतल्याचा पुरावा वाहनधारकांनी जवळ ठेवावा.१जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या तसेच अपॉइंटमेंट न घेतलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top