445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
योग दिवस पर सेवानिवृत्त कर्मचारी ने कालवती तालाब में योगासन दिखाकर संदेश दिया
Beed, Maharashtra:जागतिक योग दिनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पाण्यात 'योगसाधना'; अंबाजोगाई शहराजवळील काळवटी तलावातील थरारक प्रात्यक्षिके! ANC -नियमित व्यायाम आणि योगासनांमुळे आपले शरीर तंदुरुस्त व सुदृढ राहते, हा संदेश कृतीतून दाखवून देत अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र घोडके यांनी जागतिक योग दिनानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांनी येथील प्रसिद्ध काळवटी तलावात थेट पाण्यावर तरंगत विविध योगासने करून दाखवली. त्यांच्या या अनोख्या आणि थरारक योगसाधनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज सकाळच्या सुमारास हा उपक्रम पार पडला. वाढत्या वयातही आरोग्याचा संदेश देण्यासाठी घोडके यांनी काळवटी तलावाच्या संथ पाण्यात प्रवेश केला. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी पाण्यावर सहजपणे तरंगत योगासनांची अवघड प्रात्यक्षिके सादर केली. पाण्यात शरीराचा समतोल राखत केलेली ही योगसाधना डोळे दिपवणारी ठरली.0
0
Report
वाशिम को मिली बड़ी राहत: 153 अतिरिक्त वीज रोहित्र मंजूर
Washim, Maharashtra:वाशिम: अन्नमुखी खबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यासाठी अतिरिक्त वीज रोहित्रांना मंजुरी दिली आहे. कृषी पंपधारकांना सुरळीत वीजपूर्णवठा मिळावा यासाठी 100 केव्हीए क्षमतेची अतिरिक्त रोहित्रे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला 153 अतिरिक्त वीज रोहित्रे मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.0
0
Report
कोंढापुरी तलाब सूखा: 12 गावों में पानी संकट, किसानों का आरोप
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यात मान्सून लांबल्याने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव आटला असून, रांजणगाव शिक्रापूरसह १२ गावांवर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवले आहे. अँकर: राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाने ओढ दिल्याने पुण्याच्या शिरूर तालुक्यात दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. कोंढापुरी येथील मुख्य तलाव पूर्णपणे आटल्यामुळे रांजणगाव शिक्रापूरसह परिसरातील १२ गावांची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. चासकमान पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. याच कोंढापुरी तलावातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडेम यांनी.0
0
Report
Advertisement
नीट पेपर लीक से हड़कंप: री-नीट में विद्यार्थियों की संख्या घटे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नीट परीक्षेच्या पेपर लीकमुळे विश्वासालाच गेला तडा, जिल्ह्यात री - नीटला 1 हजार विद्यार्थी संख्येची घट - नीटचा पेपर लीकमुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या विश्वासालाच गेला तडा - जिल्ह्यात मागील परीक्षेच्या तुलनेत री-नीटच्या विद्यार्थी संख्येत तब्बल एक हजारांनी घट - गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेत 1 हजार 184 विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ - जिल्ह्यात तीन मे 2026 रोजी झालेल्या नीट परीक्षेत 5 हजार 691 विद्यार्थ्यांची नोंदणी तर यापैकी 5 हजार 566 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा - मात्र आज होणाऱ्या नीट परीक्षेसाठी 4 हजार 507 विद्यार्थ्यांनीच केली नोंदणी - मागील परीक्षेच्या तुलनेत एका केंद्रात वाढ मात्र तब्बल 1 हजार 184 विद्यार्थ्यांची घट0
0
Report
21 जून अंतरराष्ट्रीय योग दिवस: अकोला में 600 नागरिकों के साथ योगाभ्यास, स्वास्थ्य पर जोर
Akola, Maharashtra:Anchor removed: 21 जूनला दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून जगभर हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. आज राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकोल्यातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश दिला. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात अकोल्याचे पोलिस अधीक्षक, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 600 नागरिक सहभागी झाले होते. यावेळी सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून उपस्थितांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. योगामुळे निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते तसेच तणावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना उपस्थित योगसाधकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असून नियमित योगाभ्यास करण्याचा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.0
0
Report
वाशिम में रेलवे डिब्बे से गिरकर प्रवासी की मौत, पुलिस जांच शुरू
Washim, Maharashtra:जऊळका परिसरातील पुलाजवळ रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील कुंडलिक लक्ष्मण सावंत हे मुंबईहून घरकुलाच्या कामानिमित्त गावी येत होते. अकोल्याहून इंटरसिटी रेल्वेने प्रवास करत असताना ते डब्यातून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या मृतदेह समृद्धी पुलाजवळ आढळून आला. माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
तळकोण के किसान बारिश न होने से दुबारा बुवाई कराने पर मजबूर
Oras Bk., Maharashtra:तळकोकणातील बळीराजा वरुणराजाची आतुरतेने वाट बघतोय मात्र वरूनराजाने मागील 15 दिवस दडी मारलीय. शेतात पेरलेले वाचवण्यासाठी तळकोकणातील बळीराजाने शक्कल लढविलीय. पाऊसच नसल्याने विहीरच पाणी सिंचन करुन आपलं शेत वाचविण्याचा प्रयत्न तळकोकणातील बळीराजाने शक्कल लढविलीय. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळकोकणात पेरणी केली जाते. मात्र वरूनराजाने दांडी मारल्याने सिंचन करण्याची वेळ बळीराजावर आलीय. तळकोकणातील काही भागात तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
सातारा–पुणे महामार्ग पर मिनी बस और ट्रक की भीषण दुर्घटना, 2 मृत, 5 घायल
Satara, Maharashtra:सातारा: पुणे-बेंगलोर महामार्गावर डिमार्टसमोर आज पहाटे मिनी बस आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. कोल्हापूरहून जेजुरीकडे जाणाऱ्या मिनी बसचा हा अपघात झाला असून, स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.0
0
Report
सांगोलो के राजुरी ग्रामदेवत माता लक्ष्मीदेवी मंदिर से तीन चोरों ने लाखों के गहने चुराए, CCTV में कैद
Pandharpur, Maharashtra:चोरट्यांना देवाची उरले नाही भय, सांगोल्यात मंदिरात केली लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद सांगोल्या तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ४१ हजार रुपयांच दागिने चोरून नेले. मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा चोरट्यांनी नेला आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या मूर्तीवरील अंदाजे एक किलो वजनाचा, सोन्याचा मुलामा दिलेला आणि सोन्याचे डोळे बसविलेला सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला. याशिवाय सुमारे २२ हजार रुपये किमतीचे काळ्या मण्यांत ओवलेले सोन्याचे मंगळसूत्र तसेच ४ हजार रुपये किमतीचा पितळी पंचधातूचा घोडाही चोरट्यांनी लंपास केला. एकूण चोरीस गेलेल्या मालाची किंमत २ लाख ४१ हजार रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में योग दिवस उत्साह: पतंजली योग समिति व आर्ट ऑफ लिविंग ने किया आयोजन
Washim, Maharashtra:वाशिम : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा महिला प्रभारी दीपा वानखडे यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नगराध्यक्ष अनिल केंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. करा योग राहा निरोग असं अहवान पतंजली योग समिती कडून करण्यात आलं.0
0
Report
NEET परीक्षा के लिए देशभर में सुरक्षा के भारी बंदोबस्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशभर में आज NEET परीक्षा आयोजित हो रही है। प्रशासन ने तैयारी पूरी कर ली है। संभाजीनगर जिले के 50 केंद्रों पर यह परीक्षा होगी, 17700 विद्यार्थी भाग लेंगे। प्रत्येक केंद्र पर ड्यूटी मैजिस्ट्रेट तैनात होंगे और पुलिस के साथ पैरामिलिट्री फोर्स सुरक्षा के लिए तैनात किया गया है। पुलिस की बड़ी टीम सभी केंद्रों पर रहेगी। परीक्षा केंद्र पर छत्रपती संभाजीनगर शहर पुलिस दल द्वारा 02 उप आयुक्त, 04 सहायक आयुक्त, 17 पुलिस निरीक्षक, 50 सहायक पुलिस निरीक्षक, 582 पुलिस अमलदार का बंदोबस्त किया गया है। साथ ही CISF का भी manpower लाया गया है।0
0
Report
वन विभाग ने विहिरी में फँसे बिबटे को सुरक्षित बाहर निकाल कर नैसर्गिक आवास में छोड़ दिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घुसूर गावात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला يश आले आहे. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विशेष पिंजरा आणि आवश्यक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. या यशस्वी मोहिमेनंतर बिबट्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
हर्सूल तालाब से पानी उपसा जल्द बंद, जायकवाड़ी जलापूर्ति शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल तलावातील पाणी उपसा लवकरच बंद होणार आहे, आता जुन्या शहराला जायकवाडी धरणातील पाणी पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षी तुडुंब भरलेल्या हर्सूल तलावातील पाण्याचे महापालिकेने वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याने जून महिन्यातही तलावात तब्बल १९ फूट जलसाठा शिल्लक आहे. नक्षत्रवाडी ते हर्सूलदरम्यान टाकण्यात आलेली १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांत तलावातील पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या जलवाहिनीद्वारे शहरातील नागरिकांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध होणार आहे. हर्सूल तलावातील पाणी उपसा बंद झाल्याने परिसरातील भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होणार असून विंधन विहिरधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.0
0
Report
अमरावती में मानसून पूर्व बुवाई तेज, किसान बुवाई के लिए आशंका से जूझ रहे
Amravati, Maharashtra:अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात; शेतकऱ्यांना पेरणीचा हंगाम निघून जाण्याची भीती अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात झाली असून काही शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीने मान्सूनपूर्व पेरणी केली असल्याचे दिसत आहे. राज्यात जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी मान्सून दाखल झालेला नाही. समाधानकारक वर्षा झाली नसतानाही काही ठिकाणी पाऊस झाला नाही तरी पेरणी चालू आहे. कृषी विभागाने प्रलंबित अडथळ्यांमध्ये 70% पेक्षा अधिक पाऊस झाल्यास पेरणी करण्याचे निर्देश दिले, परंतु पेरणीचा हंगाम हातातून निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी पारंपरिक पद्धतीने कपाशीची पेरणी करत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावर आढावा आमचे प्रतिनिधी अनिरुद्द दवळे यांनी घेतला.0
0
Report
अण्णा हजारे के विरोध के बीच सूचना अधिकार कानून में बदलाव पर सरकार पर दबाव
Ahilyanagar, Maharashtra:माहिती अधिकार कानून बदलने के कारण सरकार पर नाराजगी व्यक्त करते हुए वरिष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ने फडणवीस सरकार को उपोषण का इशारा दिया है. राज्यभर के सूचना अधिकार कार्यकर्ता अण्णा हजारे की मुलाकात के लिए रालेगणसिद्धि पहुंच रहे हैं. अण्णा सरकार से पुरानी नियम लौटाने और बदलाव पर पुनः विचार करने की मांग कर रहे हैं.0
0
Report
Advertisement
