445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा में अरुण लखानी की जीत अब केवल औपचारिक
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानीय स्वराज्य संस्थे के विधान परिषद में बड़ी घडामोड सामने आई है. कांग्रेस उम्मीदवार शैलेश कुमार अग्रवाल और अपक्ष उम्मीदवार सुधीर कोठारी ने अपनी उमेदवारी वापस लेने की घोषणा की. इसके परिणामस्वरूप अब भाजपा उम्मीदवार अरुण लखानी का विजय केवल औपचारिकता बाकी है. शैलेश अग्रवाल और सुधीर कोठारी दोनों चंद्रपूर जिलाधिकारी कार्यालय में दाखिल होकर आधिकारिक माघार लीं. अग्रवाल ने कहा कि पार्टी के वरिष्ठ नेताओं से चर्चा के बाद यह निर्णय लिया गया. सुधीर कोठारी ने भी राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेताओं के आग्रह पर संयुक्त महायुती में बने रहने का निर्णय लिया और उमेदवारी वापस लेने की बात कही.0
0
Report
कर्ज़माफी की कड़क शर्तें: किसान बोले, किडनी बेच दूँगा—सरकार के खिलाफ प्रदर्शन
Buldhana, Maharashtra:BREAKING: 'आमچی किडनी घ्या, पण कर्जमाफी करा!' - बुलडाण्यात शेतकऱ्यांचे थेट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र Anchor - कर्जमाफीच्या जाचक अटींना कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांनी चक्क आपली किडनी विकण्याची तयारी दाखवली आहे. "आमची किडनी घ्या, पण कर्जमाफी करा," अशी उद्विग्न मागणी करत या शेतकऱ्यांनी थेट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञानपत्र लिहून सरकारकडे पाठवले आहे. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील शुभम घोंगटे आणि अमोल देशमुख या युवा शेतकऱ्यांनी हे अनोखे आणि संतापजनक आंदोलन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या कर्जमाफीमध्ये सरकारने अनेक कडक आणि जाचक अटी टाकल्या आहेत. वास्तविक पाहता, सततची नापिकी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. त्यातच बियाणे आणि खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफी तर जाहीर केली, पण अटींमुळे हजारो शेतकरी यातून बाद होणार आहेत. दरवेळी कर्जमाफीची केवळ घोषणा होते, पण अटींमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही, असा आरोप आता शेतकरी करत आहेत. याच जाचक अटीांचा निषेध म्हणून या शेतकऱ्यांनी थेट स्वतःची किडनी विकून कर्ज फेडण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. या आंदोलनामुळे आता प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.0
0
Report
नितेश राणे की पहल से कोकण विधान परिषद बिनविरोध, बाल माने ने उमेदवारी वापस
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध! नितेश राणेंच्या पुढाकाराने ठाकरे गटाच्या बाळ मानेंची उमेदवारी मागे.. मविआवर केला 'घोडेबाजारा'चा आरोप.. कोकण विधान परिषद निवडणुकांत अत्यंत नाट्यमय घडामोड घडली असून आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे, मंत्री नितेश राणे हे स्वतः बाळ मानेंना सोबत घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.. अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. अनेकवेळा मागणी करूनही मित्रपक्ष आणि घटक पक्षांनी मला सूचक म्हणून सह्या दिल्या नाहीत. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले. अशी संस्कृती कोकणाची नाही, म्हणूनच मी विचार करून अर्ज मागे घेतला, असे बाळ माने यांनी स्पष्ट केले आहे. नितेश राणेंच्या या पुढाकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महायुतीची सरशी झाली आहे.. मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय.. महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उपस्थित आहे.. आज सब कुछ देव भाऊ अशीच परिस्थिती आहे.. सगळ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळलेल आहे राज्याला पुढे घेऊन जायचं असेल किंवा आम्हाला आमचं भविष्य घडवायच असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही.. बाळमानींना बरं वाईट काय हे सर्व माहिती आहे.. वरिष्ठ पातळीवरती जो काही निर्णय ठरला होता त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मी करतोय.. मी कलेक्टरांकडून माहिती घेतली की सगळ्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेले आहेत.. नितेश राणे..0
0
Report
Advertisement
वाशीम नर्सिंग कॉलेज के छात्रों ने गर्मी में ठिया आंदोलन, शुल्क-धमकी पर हंगामा
Washim, Maharashtra:वाशिम विद्यार्थ्यांनी आज भर उन्हात ठिय्या आंदोलन केलं असून कॉलेज प्रशासनानं आमच्याकडून अतिरिक्त फी घेतली तसेच या संदर्भात समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कॉलेज बंद करण्याची धमकी दिल्या जातं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. कॉलेज प्रशासनानं मात्र हे आरोप फेटाळून लावले असून कॉलेजमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने फक्त कार्यालयाला तात्पुरत्या स्वरूपात कुलूप लावल्याची माहिती कॉलेज प्रशासनाकडून दिलीये.0
0
Report
Yavtamal विधान परिषद चुनाव निर्विरोध: दुष्यंत चतुर्वेदी की जीत पक्की
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूक अवरोध झाली आहे, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पर्यंत निवडणूक रिंगणातील पाच उमेदवारांपैकी चौघांनी आपले नामांकन मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांची निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपाचे नितीन भुतडा यांच्या बंड शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साजिद बेग तसेच अपक्ष उमेदवार फारुक सय्यद यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. काँग्रेसचे साहेबराव कांंबळे यांनी देखील नाट्यमय रित्या कालच माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.0
0
Report
मिठी नदी में गाळ उपश पर आमदार नाराज़, अभियंता गैरहाज़र रहने से काम रोक दिया
Mumbai, Maharashtra:मिठी नदी गाळ उपशावर आमदारांचा संताप अभियंता गैरहजर राहिल्याने काम बंद पाडले मे महिना संपून जून उजाडला तरी मिठी नदीतील केवळ 75 टक्के गाळ उपसा झाल्याचे समोर आले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदारांनी क्रांतिनगर परिसरातील मिठी नदीतील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली 30 मेपर्यंत गाळ उपसा पूर्ण करण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते मात्र काम अपूर्ण असल्याने त्यांनी वरिष्ठ अभियंत्यांना घटनास्थळी बोलावले अभियंता उपस्थित न राहिल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी गाळ उपशाचे काम तात्पुरते बंद पाडले.0
0
Report
Advertisement
मालेगाव के महात्मा फुले शिक्षण संस्थान भर्ती घोटाला: पूर्व शिक्षा अधिकारी जमानत अर्जी खारिज
Nashik, Maharashtra:मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्था शिक्षक भरती घोटाळा प्रकरण. माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मालेगाव न्यायालयाकडून फेटाळला... मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेत बोगस शिक्षक, कर्मचारी भरती प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांचा मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने या घोटाळ्यात सहभागी असणारे गुन्हा दाखल असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या गुन्ह्यात माजी वेतन अधिकारी उदय देवरे, माजी शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव, काही शिक्षक यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल आहे.0
0
Report
हिंदी: खत वितरण के लिए फ्रेमवर्क शुरू, किसानों में ऑनलाइन पंजीकरण को लेकर विरोध
Kolhapur, Maharashtra:केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत आहे. या नव्या व्यवस्थेनुसार शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खताची मागणी नोंदवावी लागणार आहे. मात्र, शेती हा ऑनलाइनचा विषय नसून या नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढणार असल्याची भूमिका घेत शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. खतांचा गैरवापर रोखणे आणि अनुदानित खतांचे समन्यायी वितरण करणे हा या योजनेमागील उद्देश असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे मत याच्या अगदी उलट आहे. सरकारने शेतकऱ्यांवर नवनवे प्रयोग करण्याऐवजी शेतीतील वास्तविकता समजून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. पाऊस पडल्यानंतर तातडीने खताची गरज भासते. अशा वेळी ऑनलाइन प्रक्रियेत वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट खत उपलब्ध करून द्यावे असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामागे या संपूर्ण प्रक्रियेतील ऑनलाइन नोंदणीची किचकट पद्धत हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला खत मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया: - ॲपमध्ये आधार क्रमांक आणि ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागेल. - स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती भरावी लागेल. - पिकाचा हंगाम, आवश्यक खताचा प्रकार आणि गोण्यांची संख्या नमूद करावी लागेल. - जवळील नोंदणीकृत खत विक्रेत्याची निवड करावी लागेल. - स्वतः खत घेणार असल्यास स्वतःचा पर्याय, अथवा प्रतिनिधी पाठविणार असल्यास त्याची माहिती भरावी लागेल. - नोंदणी पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड आणि टोकन नंबर तयार होईल. - संबद्ध कृषी सेवा केंद्रात खताचा साठा पुढील तीन दिवसांसाठी राखीव ठेवला जाईल. - तीन दिवसांच्या आत दुकानात जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून खत स्वीकारावे लागेल, त्यानंतर विक्रेत्याकडून पावती घेणे आवश्यक असेल. पिक नोंदणीसारख्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे आधीच अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता खताची मागणीदेखील ऑनलाइन करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. शेतीमध्ये अनेक निर्णय तातडीने घ्यावे लागतात. पिकाला खताची गरज निर्माण झाल्यानंतर लगेच खत उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र, नव्या व्यवस्थेमुळे खत मिळण्यास विलंब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप स्मार्टफोन नसल्याने त्यांनी या प्रक्रियेत सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खतांचे लिंकिंग, वेळेवर उपलब्धता आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत खत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सक्ती केल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडेल, असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळेच कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पाला विरोध होत आहे. उद्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने प्रत्यक्षात ही व्यवस्था कितपत यशस्वी ठरते आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
अकोला के पुराने शहर की पुलिस ने 2 घंटे में 1 लाख 12 हजार रुपये की सोना वापसी कराई
Akola, Maharashtra:सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करत जुने शहर, अकोला येथील पोलिसांनी प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण दाखवले आहे. अमरावती येथील एका महिलेची रिक्षात विसरलेली १ लाख १२ हजार रुपयांची सोन्याची पोत जुने शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासातच शोधून काढून संबंधित महिलेला सुखरूप परत केली आहे. महिला ही ऑटोरिक्षाने भावाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या, मात्र घाईगडबडीत त्यांची सामानाची बॅग रिक्षातच विसरली. या बॅगेमध्ये ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १,१२,०००/- रुपये होती. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उद्या दोन तासातच शहरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून ऑटो रिक्षाचा पत्ता लावून महिलेला बॅग सुखरूप परत केली. पोलिसांच्या या तत्परतेचा सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती में ठाकरे गट को बड़ा झटका; जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे ने दिया इस्तीफा
Amravati, Maharashtra:अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पडोळे लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राजीनामाचा निर्णय झाल्याची माहिती असून पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर, मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती0
0
Report
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई की गाड़ी पर बंदर का कब्जा, पुलिस ने हटवाया
Sangli, Maharashtra:स्लग - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर वानराचा कब्जा ! अँकर - राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर एका वानराने ठाण मांडली होती. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मंत्री शंभूरাজ देसाई हे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर कार्यालयाच्या पोर्चमध्ये थांबलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर मात्र वानराने कब्जा केला. मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनासोबत असणाऱ्या पोलिसांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. पोलीसांनी वानराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला,मात्र दहा ते पंधरा मिनिटं वानराने मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनाच्या छतावरून ताबा सोडला नाही.अखेर वानराने स्वतःहून मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनाचा ताबा सोडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.0
0
Report
महायुती उम्मीदवार अनिकेत तटकरे: कोकण की सेवा के लिए फिर मैदान में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अनिकेत तटकरे बाईट.. महायुतीतील सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि मतदारांमुळे मला पुन्हा एकदा कोकणाची सेवा करण्याची संधी मिळते.. ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांनी मनाचा दिल्लरपणा दाखवून अर्ज पाठीमागे घेतले.. कोकणच्या प्रश्नांसाठी मी माझ्या कोकणातील अधिकच्या फेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न करेन.. मी माझा विजय माझे नेते दिवंगत अजित दादा पवार यांना समर्पण करतोय.. पुढच्या दहा दिवसात मी उमेदवार म्हणून सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेणार..0
0
Report
Advertisement
सांगली-सातारा परिषद चुनाव: शिवसेना शिंदे गुट ने उमेदवारी वापस ली; पाटील ने अर्ज वापस
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतील शिवसेनेचे बंड शमले ! सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीतून अखेर शिवसेना शिंदे पक्षाची उमेदवारी मागे शिवसेना नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत तानाजी पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे युती धर्म पाळण्यासाठी माघार घेतल्याचे मंत्री शंभूराजे देसाईंचे स्पष्टीकरण तर पक्ष आदेशानुसार अर्ज माघार घेतल्याचं तानाजी पाटलांचं स्पष्टीकरण बाईट - शंभूराज देसाई - पर्यटन मंत्री. बाईट - तानाजी पाटील - नेते शिवसेना0
0
Report
किसानों के लिए खतरा: कृषि बीमा के चार ट्रिगर फिर शुरू, नुकसानभरपाई प्रभावित
Akola, Maharashtra:राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी पीक विमा योजनेतील बंद करण्यात आलेले चार ट्रिगर पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना प्रहारने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्राचे प्रमाण मोठे असल्याने अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, तसेच काढणीपूर्व आणि काढणीनंतरच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरत असली तरी पूर्वी अस्तित्वात असलेले काही महत्त्वाचे ट्रिगर बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड के विषाक्त शराब कांड में अवैध घर पर नगरपालिका की कार्रवाई, 12 मौतें
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे और पिंपरी चिंचवड में विषाक्त शराब कांड: कर्नल सिंग विरखा के घर पर पिंपरी चिंचवड नगरपालिका ने हथोडा चलवाया। विरखा संजय नगर, फुगेवाडी के छोटे गल्लों से शराब का गुत्था चला रहा था; नगरपालिका ने नोटिस देकर 24 घंटे में घर की स्थिति स्पष्ट करने को कहा था, लेकिन घर अवैध पाया गया, इस कारण कार्रवाई की गई। विवादित घर ब्रेकर और मजदूरों की सहायता से तोड़ना शुरू किया गया, जिसके लिए नगरपालिका ने सुरक्षा तैनाती की थी ताकि किसी तरह का अनुचित घटना न हो पाए। इस दारू कांडा के मुख्य आरोपी योगेश वानखेडे ने मिथेन मिश्रित दारू दी और पिंपरी चिंचवड में 12 लोगों की मौत हो गई। विरखा का घर अंततः धराशायी हो गया; घटना पर संतोष व्यक्त किया गया।0
0
Report
Advertisement
