445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर में 30 तोला सोना चोरी, CCTV फुटेज से जांच तेज
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडवर अवघ्या काही क्षणांत 30 तोळे सोनं लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही चोरी एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे करण्यात आली आहे. रंकाळा टॉवर परिसरात राहणारे बंगाली कारागीर समीर पात्रा यांचा मुलगा सुबोजित पात्रा हा व्यापाऱ्यांचे दागिने देण्यासाठी गुजरीकडे निघाला होता. भेंडे गल्ली मार्गे ते भाऊसिंगजी रोडवर आल्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांनी त्याला हेरलं.. पहिल्या चोरट्यानं बंगाली भाषेत संवाद साधत सुबोजितला बोलण्यात गुंतवलं... तर दुसरा साथीदार आधीपासूनच गोल्ड सिल्वर ज्वेलर्स परिसरात थांबलेला होता. सुबोजितला बोलण्याच्या बहनाने गुंतवून ठेवत दोघांनी हातातील तब्बल 30 तोळे सोनं असलेली बॅग पळवली आणि काही सेकंदांतच दोघांनी पोबारा केला.. ही धक्कादायक घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून, घटनेनंतर सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास करत आहेत.0
0
Report
ईंधन बचत आह्वान पर अहिल्यानगर में नो व्हीकल डे, अधिकारी साइकिल पर
Ahilyanagar, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज 'हरित शुक्रवार, नो व्हेईकल डे' पाळला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक स्वतः सायकलवरून कार्यालयात दाखल झाले. या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यालयात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यापुढे देखील असाच पर्यावरणपूरक उपक्रम सुरु राहणार असल्याचे निवासी उप जिल्हाधिकाधिकारी दादासाहेब गीते यांनी सांगितले..0
0
Report
मावळ के विसापुर किले के आड़वाटे पर प्राचीन भुयार मिला, इतिहासकार चकित
Varsoli, Maharashtra:Anchor: मावळच्या ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा इतिहासाचा गूढ ठेवा समोर आला असून विसापूर गडाच्या आडवाटेवर एक प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळल्याने इतिहास अभ्यासकांसह दुर्गप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भटकंती करताना “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान”च्या दुर्गसेवकांना हे भुयार सापडलं असून आता या शोधामुळे मावळच्या इतिहासातील अनेक न उलगडलेले पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळातील विसापूर गडाच्या पायथ्यालगतच्या मालेवाडी परिसरातून दुर्गभ्रमंतीसाठी निघालेल्या दुर्गसेवकांना उभ्या कातळात कोरलेलं हे भुयार दिसून आलं. काही दुर्गसेवक आडवाटेने विसापूर गड चढत असताना हा अनोखा शोध लागला. विशेष म्हणजे हे भुयार पूर्णपणे कोरीव स्वरूपात असून त्यामध्ये छिन्नी आणि हातोड्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात. सुरुवातीला सरळ जाणारं हे भुयार पुढे खोल होत जातं आणि नंतर डाव्या-उजव्या बाजूने वळण घेत असल्याचं आढळून आलं. साधारण 3 बाय 3 फूट आकारमान असलेलं हे भुयार जवळपास 50 फूट लांब असून आतमध्ये पाणी आणि चिखलही साचलेला आहे. हे भुयार नेमकं कोणत्या काळात खोदलं गेलं असेल? त्याचा उपयोग पाण्याच्या शोधासाठी केला जात होता का? की ध्यानधारणा किंवा विपश्यनेसाठी हे ठिकाण तयार करण्यात आलं होतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.0
0
Report
Advertisement
पंढरपुर के भीमा नदी किनारे अवैध रेत खनन पर पुलिस ने महसूल विभाग की सहायता से दबिश डाली
Pandharpur, Maharashtra:पंढरपूरच्या भीमा नदीच्या काठावर होत असणाऱ्या अवैध वाळू उपसावर पोलिसांनी महसूल पथकाच्या साहाय्याने धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्येच पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे जवळ एक जेसीबी ट्रॅक्टर, टिपरच्या माध्यमातून 25 ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा होत असताना. पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आले आहे. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत.0
0
Report
सुनील तटकरे: अगले सप्ताह समाप्त होंगे मतभेद, महाराष्ट्र में राजनीतिक हलचल
Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे ऑन सुनील तटकरे सुनील तटकरे साहेबांनी काल जे वक्तव्य केले ते कुणालाही उद्देशून केलेले नाही त्यांनी पुढे हे देखील सांगितले आमच्या पक्षातील जे मतभेद दिसत आहेत ते आम्ही एकत्र बसून पुढील आठवड्यात सोडवून यापुढे महत्त्वपूर्ण हालचाली सुरू होणार आहेत असेही सुनील तटकरे यांनी सांगितला आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व मतभेद संपतील आणि पेल्यातील वादळ शांत होईल ऑन संजय शिरसाठ वक्तव्य संजय शिरसाठ हे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत महायुतीच्या समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे दर मंगळवारी आमची मिटींग होत असते गेल्या वेळी झालेल्या मीटिंगमध्ये उदय सामंत यांच्यासमोर मी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती आमच्या पक्षाबद्दल संजय शिरसाट कसे काय बोलू शकतात तुम्ही त्याना आवरलं पाहिजे असं सांगितलं होतं पण त्यानंतर देखील काल त्यांनी पुन्हा टीका केली त्यामुळे आम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या कडे तक्रार करणार आहोत ऑन शरद पवार आमदार भेट शरद पवार साहेबांना कोणीही आमदार भेटलेले नाहीत जे भेटले असतील ते पवार साहेबांच्या प्रेमा कुठे घेतले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व 42 आमदार आणि कार्यकर्ते सिनेप्रा वहिनी यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे कुणीही मनामध्ये कींतू परंतु आणू नये ऑन शरद पवार मोदी स्टेटमेंट शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांच्या बद्दल केलेलं वक्तव्य महत्वपूर्ण आणि योग्य आहे देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी साहेब प्रयत्न करत आहेत त्याचं कौतुक पवार साहेबांनी केले पण विलीनीकरणाबाबत सातत्याने प्रयत्न करणारी मंडळी विलीनीकरण होणार नाही असं सांगितल्यानंतर आम्ही देखील अचंबित झालो आमच्याही मनामध्ये याबद्दल प्रश्न निर्माण झाला असं असं काय होऊ शकतं सातत्याने विलीनीकरणाबबत बोलणारी ही मंडळी अशा पद्धतीने निर्णय का घेतला हे मी मुंबईत गेल्यानंतर माहिती घेईन विलीनीकरणाच्या चर्चा त्यांच्याकडूनच सुरू होता मात्र अचानक याला ब्रेक का लागला हा संशोधनाचा विषय आहे ऑन राहुल गांधी एकेरी भाषा राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्ष नेते आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी बोलणं आणि अशा भाषेत टीका करणे हे योग्य वाटत नाही त्याचवेळी पवार साहेबांनी मोदी साहेबांचे कौतुक केल्यामुळे त्यांनी उचललेले पाऊल हे स्वागतार्ह आहे ऑन विधान परिषद जागा वाटप विधान परिषदेसाठी आम्ही तीन जागांची मागणी केली होती रायगड ही जागा आमची आहेच आता आम्ही परभणी आणि हिंगोली ची देखील मागणी केली आहे तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे आम्हाला उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेला आमचे आमदार निवडून येतील ऑन पक्ष विलनीकरण विलनीकरण करण्याबाबत अजितदादांची इच्छा होती हे मी आधी बोललो आहे पण असं का झालं हे मी मुंबईत गेल्यानंतर माहिती घेईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या हातामध्ये मजबूत आहे, सुरक्षित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटित राहील आणि पुन्हा अजितदादांचा दबदबा कसा वाढेल याबाबत आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आमच्या मध्ये काही गैरसमज झाले होते मात्र ते पुढच्या आठवड्यात पूर्णपणे संपतील ऑन कॉकरेच पार्टी देशाचे सरन्यायाधीश यांनी तरुणांबद्दल कॉकरोच ही पदवी दिली होती त्यामुळे अपमानित झालेल्या तरुणांनी अशा पद्धतीची मोहीम चालवली सोशल मीडियावर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत या मुलांच्या मनामध्ये असलेली खदखद संपवण्याचे काम मुख्यमंत्री करतील आमच्या राज्यामध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही आमच्याकडे गावागावात संघटना मजबूत आहे दक्षिणेकडे सिने अभिनेत्यांचा जास्त प्रभाव आहे त्या ठिकाणी कोणत्याही संघटनेची गरज नसते विजय थलपती यांची लोकप्रियता प्रचंड होती, ते इतक्या जागा घेऊन मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं पण असं महाराष्ट्रात होण्याची शक्यता नाही ऑन मनोज जरंजे मनोज जरांगे पाटील यांनी या भूमिका मांडल्या त्याबाबत बरेचसे प्रश्न शासनाने सोडवले आहेत ज्या काही योग्य मागणी असते त्याबद्दल सरकार चर्चा करेल ऑन पक्ष अस्तित्व अजित दादा पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांचा पक्ष शेवटपर्यंत कसा व्यवस्थित राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ऑन कर्जमाफी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे ही प्रक्रिया अडकेल का अशी शक्यता निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन 30 जून पर्यंत कर्जमाफी होईल कारण नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हे कर्जमाफी मध्ये येत नाहीत दोन लाखापेक्षा जास्त थकबाकी असेल तर वरची रक्कम भरल्यानंतर दोन लाखाचे कर्ज माफ होईल दोन वर्षे नियमित कर्ज परतफेड केली त्याला पन्नास हजार रुपये अनुदान या दोन गोष्टी सध्या आहेत ऑन अजित पवार राष्ट्रवादी पक्ष ताकद अजित पवार गटाची ताकद किती आहे ते येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये दिसेल आता सध्या कोणती निवडणूक पण आमच्या पक्षाबद्दल इतर कोणीही चिंता करण्याची गरज नाही ऑन आमदार शिवाजी पाटील आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर व्यक्तिगत बदनामी केली होती टीका केली होती मी पुरावे द्या म्हणून शिवाजी पाटील यांना सांगितलं होतं मी दिलेली मुदत संपली आहे आता मी कायदेशीर सल्ला घेऊन मला पुढचा मार्ग अवलंबवावा लागेल ऑन गोकुळ फॉर्म्युला गोकुळ बद्दल लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतं अजून मतदार यादी तयार झाली नाही महायुतीमध्ये कुणाला किती जागा याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील गोकुळ निवडणुकीसाठी आम्ही महायुती म्हणून समोर जाऊन जिंकणार आहोत0
0
Report
नागपुर से उड़ानें 1 जून से बंद, कई रूटों पर उड़ानें स्थगित
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरहून उडणारी अनेक विमानं एक जूनपासून बंद विमानाचा संचालन खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर पोहोचल्याने नागपुरहून उडणारी अनेक विमानं बंद होणार अनेक विमानं बंद होणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बंगरुळुला जाणाऱ्या चार फ्लाईट अनिश्चित काळासाठी होणार बंद एअर इंडियाची नागपूर बंगरुळु रात्रीची फ्लाइट बंद तर इंडिगोची बंगरुळु रात्रीची फ्लाइट १६ जूनपासून होणार बंद हैदराबादवरुन नागपूरात येणारी दुपारी ३.५०ची आणि नागपूरातील जाणारी ३.३५ ची फ्लाईट १६ जूनपासून बंद १ जूनपासून कोलकात्याला जाणारी फ्लाइट होणार बंद अहमदाबादमध्ये जाणाऱ्या रात्रीच्या फ्लाइटमध्येही कपात0
0
Report
Advertisement
चंद्रपूर के गुंजेवाही जंगल में तेंदुए के हमले में चार महिलाएं मौत के बाद की खबर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार परिसरात ही घटना उजेडात आली आहे. तेंदुपत्ता तोडण्यासाठी एकूण 13 महिला जंगलात गेल्या होत्या. यावेळी वाघाने केलेल्या हल्ल्यात 4 महिलांचा मुत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वन विभागाचे आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय. वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी चार महिलांच्या मृत्यूची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता आहे.0
0
Report
नागपुर में भीषण गर्मी के बीच कुलरों की मांग बढ़ी—गर्मी से राहत
Nagpur, Maharashtra:नागपूर संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेमुळे होरपळून निघत आहे... त्याच्यापासून थोडाफार दिलासा मिळतो तो कूलर पासून मिळणाऱ्या गारव्यामुळे.... त्यामुळे नागपुरात कुलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे... सुमारे अडीच ते तीन पट कुलरची विक्री वाढल्याची माहिती कुलर व्यावसायिक देत आहे... शिवाय पाणी साठवणुकीचे क्षमता जास्त असलेले कुलर मागणी जास्त आहे... वाढलेली प्रचंड उष्णता आणि त्यानंतर कुलरची वाढलेली मागणी याबाबत जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधी0
0
Report
लातूर ट्यूशन एरिया में अनधिकृत निर्माण पर आज जिल्हाधिकारी कार्यालय में सुनवाई—लाइव खबर
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज शिवराज मोटेगावकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाची तक्रार... जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुनावणी... ट्युशन एरियातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी... प्रशासन काय निर्णय घेणार ? कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी... ट्युशन एरियातील बांधकामाचा वाद चर्चेत... जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष.... लातूरच्या ट्युशन एरियामध्ये शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंधित कथित अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार करण्यात आली आहे... या प्रकरणात कारवाईची मागणी होत असतानाच आज संबंधित तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे... त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार... आणि पुढे काय निर्णय होणार... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...0
0
Report
Advertisement
खरीप नुकसान पर 978 करोड़ रुपये की भरपाई की मांग, विमा कंपनी पर आरोप
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले में खरीप 2025-26 हंगाम में अतिवृष्टी से उद्ध्वस्त किसानों को तकनीकी मानदंडों के आधार पर पिक बीमा से वंचित रखने का दावा विमा कंपनी कर रही है। विधायक कैलास पाटील ने मुख्यमंत्री से मांग की है कि किसानों को खेत प्रति 30 से 35 हजार रुपये के हिसाब से कुल 978 करोड़ रुपये की नुकसान भरपाई मिलनी चाहिए। जिले की 14 तहसीलों को बीमा से बाहर रखने की कंपनी की कोशिश के बारे में कैलास पाटील ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात में शिकायत की।0
0
Report
सांगली कांग्रेस: विक्रम सावंत फिर जिलाध्यक्ष, राजेश नाईक शहर अध्यक्ष नियुक्त
Sangli, Maharashtra:सांगलीच्या काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार विक्रम सावंत यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक राजेश नाईक यांची वर्णी लागली आहे,नाईक यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून कार्यभार होता, मात्र आता त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. तर विक्रम सावंत यांची देखील जिल्हाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसकडून या निवडी करण्यात आल्या आहेत. निवडीनंतर आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत0
0
Report
रिसोड शहर में पानी की आपूर्ति संकट, केवल 10.94% पानी शेष
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरावर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात केवळ 10.94 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नगरपरिषद प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीपरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला असून आता नागरिकांना केवळ अर्धा तास ते एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में मतदाता पुनरीक्षण का तीसरा चरण घोषित, घर-घर सत्यापन शुरू
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपुर जिले के मतदाता सूची के विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एस आई आर मोहिमे का तीसरा चरण घोषित; जिले में सभी मतदाताओं की घर-घर जाँच कर सत्यापन किया जाएगा. अँकर: निर्वाचन मतदाता यादियाँ अधिक अचूक अद्यतन व त्रुटि मुक्त बनाने के लिए देश के 16 राज्यों में विशेष सखोल पुनरीक्षण (एसआईआर) कार्यक्रम चलाने का निर्णय लिया गया है. इस तीसरे चरण में महाराष्ट्र शामिल है और चंद्रपूर जिले में अब तक सभी मतदाताओं का घर-घर जाकर प्रत्यक्ष सत्यापन हो रहा है. मोहिम में बीएलओ घर-घर जाकर मतदाताओं की जानकारी सत्यापित करेंगे. आवश्यक परिवर्तन, विलोप और नई नामांकन प्रक्रिया भी लागू की जाएगी. मतदाता घर-घर गये दस्तावेज नहीं लिए जाएंगे, लेकिन मसौदा मतदाता सूची प्रकाशित होने के बाद नोटिस दी जाएगी. इस मोहिम हेतु जिल्ह्यात 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत रहेंगे. मतदाओं को पूर्व पुनरीक्षण नोंदी सत्यापित करने के लिए वोटर्स सर्विस पोर्टल पर खुद की जानकारी मिल सकेगी. बाईट 1) वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर; आशीष अंबाडे, ज़ी मीडिया, चंद्रपुर0
0
Report
म्हसला तालुक्य के टोंडसुरे में पाणी टंचाई: टँकर से पानी खरीदना मजबूरी
Chendhare, Maharashtra:टोंडसुरे गावात पाणी टंचाई पडली आहे. म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द आणि टोंडसुरे गावांमध्ये नैसर्गिक जलस्रोत सुकले असून विहीर पाण्याने कोरड्या ठिकाणी बदलले आहेत. पिण्यासाठी जंगलातील जलस्रोत आटले असून आता गावकरी विहिरीतून पाणी आणून पिण्यासाठी वापरत आहेत. पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे; काही ठिकाणी पाणी खरेदी करावं लागतंय. खरगाव खुर्द गावसुद्धा उन्हात 25 वर्षानंतर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. योजनांची बोजडं झाल्याने दुर्गम भागातील गावे पाण्यासाठी आक्रोशीत आहेत. मंत्र्यांच्या मतदारसंघातील हा भाग असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना अधिक त्रास होतोय. बांधकामाचे खर्च लाखो-करोड़ो असूनही जलसंकट कायम आहे.0
0
Report
रिसोड पुलिस ने महिला चोरी के आरोपी को गिरफ्तार किया; 6.12 लाख का माल बरामद
Washim, Maharashtra:रिसोड पुलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. रिसोड बस स्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिलेस ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून सोन्याच्या दागिनेसह मोबाईल असा एकूण ६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे。0
0
Report
Advertisement
