445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक- सिन्नर क्षेत्र में मोटरसाइकिल चोरी के आरोपी करण शर्मा गिरफ्तार, 5 मोटरसाइकिलें ضبط
Sinnar, Maharashtra:अँकर :- नाशिक व सिन्नर परिसरात मोटरसायकल चोरी करून तो मोकळ घालणाऱ्या सराईत मोटरसायकल चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे करण शर्मा राहणार नाशिक असे या मोटरसायकल चोरट्याचे नाव असून पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत0
0
Report
नाशिक के मध्यवर्ती सहकारी बैंक में चोरी की असफल कोशिश, सीसीटीवी में चोर पकड़ाए
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आहे; चोरीसाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लासलगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये ही बँक असून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी आधी कॉम्प्लेक्समधील वरच्या मजल्यावरील घरांना बाहेरून कड्या लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्यांनी बँकेचे शटर व कुलूप तोडले; मात्र काही कारणास्तव चोरी करण्यात त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
बारिश से अंगूर उत्पादन में 70% गिरावट, किसान संकट गहराने लगे
Niphad, Maharashtra:गेल्या वर्षभरात झालेला सततचा पाऊस तसेच त्यानंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा तब्बल 70 टक्क्यांपर्यंत द्राक्षांचे उत्पादन घटल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा आर्थिक कणा अक्षरशः मोडला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत यंदा युरोप व नॉन-युरोप देशांमध्ये सुमारे 35 टक्क्यांनी द्राक्ष निर्यात घटली आहे तर बांगलादेश आणि नेपाळ या प्रमुख बाजारपेठांमध्ये 70 ते 80 टक्क्यांपर्यंत निर्यात घट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे यंदाच्या हंगामात 8 हजार 382 कंटेनरमधून सुमारे 1 लाख 40 हजार 750 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली तर मागील वर्षी 11 हजार 20 कंटेनरमधून 1 लाख 55 हजार 961 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे फळ असून, उत्पादन घट आणि निर्यातीत झालेली घसरण ही चिंतेची बाब असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले सांगत आहे0
0
Report
Advertisement
Hingoli जिले में ऑनलाइन जनगणना आज से शुरू, 1–15 मई तक पंजीकरण संभव
Hingoli, Maharashtra: अँकर -कोरोनामुळे लांबलेली जनगणना आजपासून सुरू होणार असून हिंगोली जिल्ह्यांमध्ये नागरिकांना स्वागणांना करता येणार आहे 1 मे ते 15 मे पर्यंत शासनाने दिलेल्या पोर्टलवर नागरिकांना स्वतची गणना करता येणार असून 16 मे पासून प्रगनक घरोघरी जात ही जनगणना ऑनलाइन पद्धतीने करणार आहेत पहिल्यांदाच जनगणना ऑनलाइन पद्धतीने होणार आहे या जनगणनेसाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1978 प्रगनक आणि 343 पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे...0
0
Report
चांदोरी, निफाड में लश्करी अळी से मक्का की फसल में भारी नुकसान
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात यंदाच्या उन्हाळी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे या किडीचे प्रमाण अधिक वाढले असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतार आणि अनियमित वातावरणामुळे मका पिकाची वाढ प्रभावित झाली आहे. त्यातच लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढवल्याने पाने कुरतडली जात असल्याने उत्पादनात मोठी घट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.0
0
Report
नवापूर में बर्ड फ्लू से एक लाख चालीस हजार कोंबड़ें कलिंग, कंटेनमेंट ज़ोन घोषित
Dhule, Maharashtra:नवापूर येथील पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू च्या शिरकाव झाल्याने एक लाख ४० हजार कोंबड्यांचे किलिंग केले जाणार.... - तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत.... - एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्म ची आता सॅम्पल घेतले जाणार आहेत.... पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांची किलिंग केली जाणार आहे.... - एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सहा पोल्ट्री फॉर्ममध्ये एक लाख ४० हजार कोंबड्या आहेत त्यांच्या कलिंग होणार.... - येथे नवापूरच्या परिसरात दहा लाख कोंबड्या आहेत त्यामुळे या सर्व कोंबड्यांना आता धोका होण्याची शक्यता आहे.... - बर्ड फ्लू च्या शिरकाव होऊ नये यासाठी तीन किलोमीटरच्या कंटेनमेंट जॉन आणि पाच किलोमीटरच्या बफर झोन म्हणून मार्किंग करण्यात येणार आहे..... - बर्ड फ्लू च्या शिरगाव झाला आहे त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई होणार.... - ज्या पोल्ट्री फार्म च नुकसान होणार त्यांच्या माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार आहे....0
0
Report
Advertisement
कल्याण डोंबिवली महापालिका ने बल्याणी क्षेत्र के अवैध निर्माणों को ध्वस्त किया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी परिसरात आज अनधिकृत बांधकामांवर थोडक कारवाई करण्यात आली. यावेळी ६० पेक्षा जास्त अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याआधी या अनधिकृत बांधकामांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. अखेर आज ही बांधकामं जमीनदोस्त केल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
मंत्री छगन भुजबळ ने महाराष्ट्र दिवस पर शुभकामनाएं दीं
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांच्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा0
0
Report
गोकुळ दूध संघ पर प्रशासक लगाने की तैयारी: विधायक शिवाजी पाटील ने जमकर उठाए सवाल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सुमारे 1200 संस्थांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत या संस्थांची चौकशी होऊन निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यमान संचालक बोर्डाला मुदतवाढ देता येणार नाही, हे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोकुळ मधला भ्रष्टाचार आता बाहेर पडायला सुरुवात झाली आहे.. प्रशासक आल्यानंतर हसन मुश्रीफ यांना कशाची भीती वाटते? आपल्या सरकारवर विश्वास नाही का? असा सवाल आमदार शिवाजी पाटील यांनी केला आहे.. गोकुळ मध्ये हसन मुश्रीफ सोडून आम्हाला कुणाशीही युती झाली तरी मान्य असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलं आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी संस्था वाढवल्या असून कागल, करवीर आणि राधानगरी तालुक्याच्या पलीकडे गोकुळचे संचालक वाढले नाहीत. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप संपवण्याचे काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही ही सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून गोकुळमध्ये मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर गोकुळ मधील काही संचालकांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये करणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के नए पुलिस आयुक्त डॉ. डी.एस. स्वामी की नियुक्ति; 21 वरिष्ठ अधिकारी तबादले
Nashik, Maharashtra:एंकर: नाशिक के पुलिस आयुक्त बालासाहेब पाटील की अचानक तबदीली हो गई है, उनके साथ मेळगाव के तेगबीर सिंह संधू की भी तबदीली की गई है. गृह विभाग के अंतर्गत Police Establishment Board-1 की सिफारिश पर राज्य के 21 वरिष्ठ पुलिस अधिकारियों के तबादले किए गए हैं. नाशिक के नए पुलिस आयुक्त के रूप में डॉ. डी. एस. स्वामी की नियुक्ति की गई है; नासिक के मौजूदा पुलिस आयुक्त बालासाहेब पाटील को मुंबई शहर के पुलिस उपायुक्त के स्थान पर स्थानांतरित किया गया है. साथ ही मेळगाव के अपर पुलिस आयुक्त पद पर सुरज गुंजाळ की नियुक्ति की गई है, जबकि मौजूदा अपर पुलिस आयुक्त तेगबीर सिंह संधू को जालना के पुलिस अधीक्षक के पद पर नियुक्त किया गया है. यह बदली आदेश शासन की सचिव सुग्रीव धपाटे के हस्ताक्षर से पारित किया गया है.0
0
Report
महाराष्ट्र दिवस पर राष्ट्रवादी के वरिष्ठ नेता दिलीप वळसे पाटील का बयान
Shirur, Maharashtra:महाराष्ट्र दिना वरती राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा बाईट0
0
Report
महाराष्ट्र दिन पर कृषि मंत्री दत्तात्रय भरणे की शुभकामनाएं
Washim, Maharashtra:1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छा बाईट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा0
0
Report
Advertisement
वाशीम में कृषि मंत्री दत्तात्रय भरणे ने आम के बाग का दौरा किया; नेताओं की मौजूदगी
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना आंब्याचा मोह आवरता आला नाही. दौऱ्यादरम्यान त्यांनी वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या घरातील बागेला भेट दिली. या वेळी बागेत असलेल्या आंब्याच्या झाडावर लगडलेले आंबे पाहून त्यांनी विशेष रस दाखवला. आंब्याची पाहणी करत त्यांनी त्या झाडाच्या प्रजातीबाबत तसेच वयाबाबत कुतूहलाने विचारणा केली. या प्रसंगी शिवसेना खासदार संजय देशमुख, भाजप आमदार श्याम खोडे आणि नगराध्यक्ष अनिल केंदळे उपस्थित होते.0
0
Report
कांग्रेस के विरोध पर भाजपा महिला मोर्चा ने सिंधुदुर्ग में निकाला आक्रोश प्रदर्शन
Oras Bk., Maharashtra:अँकर ------ जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताच काही होत असेल तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले..नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे आक्रोश निषेध पदयात्रा सिंधुदुर्गातील कणकवली मध्ये काढण्यात आली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व जिल्ह्यातील महिला भगिनींसह जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केल. यावेळी शेकडो महिला या निषेध पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कणकवली जाणवली नदी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली.0
0
Report
गडचिरोली के जिलाधिकारियों का दुर्गम बीनागुंडा-लाहेरी दौरा, नागरिकों ने सड़क-वीज सुविधा की मांग की
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनाागुंडा और लाहेरी भागात दीर्घ काळानंतर प्रत्यक्ष जिल्हा अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी खुलेआम संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्वांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यावा, कारण या ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाइल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. वनपट्टेधारकांना फार्मर आयडीचे वितरण झाले. लाहेरी-बीनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी दोमहिनेांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कामात दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.0
0
Report
Advertisement
