445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पार्लेमंत्री चंद्रकांत पाटलांनी जेजुरी दुर्घटनेतील वारकऱ्यांच्या कुटुंबांना धीर दिला
Sangli, Maharashtra:पालखी सोहळ्यातील मृत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली सांत्वनपर भेट. पालखी सोहळ्या दरम्यान जेजुरी येथे ट्रक अपघातात मृत झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून भेट घेण्यात आली आहे. कसबे डिग्रज,कवलापूर आणि मालगाव येथील तीन महिला वारकऱ्यांचा जेजुरी येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. चंद्रकांत पाटलांनी मृत कुटुंबांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मृत भोसले कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दरमाह वैयक्तिक पाच हजार रुपये मदत देण्याचं जाहीर करत शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची गव्हाही देत अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेंतर्गत 4 लाख रूपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 1 लाख रूपये असे एकूण 5 लाख रूपये त्वरीत मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.0
0
Report
सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे के बयानों से भू-माफिया पर राजनीति गर्म
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे on जयंत पाटील ( भुमाफिया ) --- भू माफियाची व्याख्या मला जयंत पाटील साहेबांनी समजून सांगावी... जयंत पाटील सांगलीत जमिनी विकतात तेव्हाच भू माफिया बोलत नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक जे स्वतःच्या जमिनी स्वतःच विकत आहेत त्यांना भुमाफिया म्हणतात ऑन अरविंद सावंत ( मंदिराचा जिहाद केलाय ) --- हिंदू समाजात वाईट प्रवृत्तीला आम्ही समर्थन करत नाही मात्र मुस्लिम समाज एकटवतो.. अरविंद सावंत यांना कदाचित हिंदू धर्म कळलेला नाही.. त्यांनी कुराण बाजूला करुन भगवत गीता परत परत वाचावी.. चुकीला चूक म्हणणं ह्यालाच हिंदू धर्म म्हणतात.. कुरान और इस्लाम मध्ये होणाऱ्या चूका ते मानणार आहेत का? हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंत यांनी तिकडे पण दाखवावी पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मस्जिद बांधत आहेत. तिकडे पण घोटाळा झाला होता तेव्हा का उल्लेख केला नाही.. जिहाद्यांची भाषा अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी ह्यांनी घेतली आहे. ऑन जयंत पाटील ऑन वर्ष --- वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे पण राज्यात सबकुछ देवा भाऊ आहेत ज्यांना आयुष्य सुखकर हवयं आता त्यांनी देवा भाऊंकडे यावं पहिला राज मार्ग सागर पर्यत होता आता तो राज मार्ग है वर्षा पर्यंत ऑन सुप्रिया सुळे --- मतदार पुनररचना होणं गरजेचे आहे सुप्रिया सुळे ताईंनी सकारात्मक भूमिका घेतली असेल तर त्यांच्या आभार और अभिनंदन करतो ऑन काँग्रेस ( राम भक्त आस्था जागर ) -- जिहाद्यांची भाषा बोलणारे मुस्लिम लीगची कपडे घालून सर तन से जुदा बोलणारे राम देवते जवळ येत असतील तर त्यांचं स्वागत करू.. घरवापसी करणाऱ्या प्रत्येकाच मी स्वागत करीन काल त्यांना सर तन से जुदा शिवाय काय सुचत नाय होते. त्यांना आज जय श्री राम सुचत असेल तर हिंदू म्हणुन मला ह्याचा अभिमान आहे. काँग्रेस उबाठा असेल ज्यांना ज्यांना आपल्या धर्माकडे परत यायचं असेल हात पुढे करुन आम्ही त्यांचं स्वागत करू ऑन संजय राऊत --- त्यांचा गाडीचा ड्रायव्हर आहे का सामनाच्या संपादकाची नोकरीं सोडून एकनाथ शिंदे यांचा संजय राजाराम राऊत हा नवीन ड्रायव्हर असू शकतो0
0
Report
बोगस बीज के खिलाफ किसान संघ प्रदर्शन; मुआवजे और दोषियों पर कार्रवाई की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आपल्या आंदोलनाचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर पैशांच्या नोटांची उधळण करत अनोखे आंदोलन केले, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर तातडीने कारवाई करावी, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली0
0
Report
Advertisement
गडचिरोली में गर्भवती महिला की प्रसूति के बाद मौत, इलाज में देरी से
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कोसमी गावात एका गरोदर महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नवजात बालिका सुखरूप असून तिच्या जन्मानंतर आईच्या मायेपासून पोरकी झाली आहे. आरोग्य विभागाने वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने उपचारास विलंब झाल्याचे समोर आले आहे. अमरिका महेश मडावी (वय २७) ही नऊ महिन्यांची गरोदर होती. प्रसूतीची संभाव्य तारीख जवळ आल्याने ८ जुलै रोजी बेडगाव येथील आरोग्य सेविका रेखा पेंदरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कोरची ग्रामीण रुग्णालयात आधीच दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र कुटुंबीयांनी नकार दिला. १२ जुलै रोजी आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांनी पुन्हा घर टूळून प्रकृतीची चौकशी केली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अमरिका मडावी यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याऐवजी प्रथम मोहोगाव टोला येथील एका मांत्रिकाकडे नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरिका मडावी यांना मोहोगाव टोला येथून कोरची ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना तातडीने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. गडचिरोली येथे पहाटे त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यावेळ बालिकेचा जन्म झाला. मात्र प्रसूतीनंतर अवघ्या काही मिनिटांतच अमरिका मडावी यांचे निधन झाले. नवजात बालिका सध्या सुखरूप असून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वेळीच रुग्णालयात दाखल झाले असते तर परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता होती. उपचारासाठी उशिरा आणल्याने गुंतागुंत वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.0
0
Report
वाशीम जिला अस्पताल से मोटरसाइकिल चोरी; CCTV में चोरी का दृश्य
Washim, Maharashtra:वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून मोटारसायकल चोरी गेल्याची घटना समोर आली असून विशेष म्हणजे चोरटा मोटारसायकल घेऊन जात असतांना एक पोलीस कर्मचारी समोर येतो त्यावेळी चोरटा काहीवेळा थांबून पोलीस गेल्यानंतर लगेच मोटारसायकल घेऊन पसार होतो.या संपूर्ण घटनेचा सिसिटीव्ही समोर आला असून भर दिवसा वरदळीच्या ठिकाणावरून अगदी पोलिसांच्या समोरून मोटारसायकल चोरी होत असल्यानं कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दिसून येतंय.0
0
Report
राज्यव्यापी अन्न सुरक्षा अभियान: अकोला में बड़ी कार्रवाई, प्रतिष्ठान बंद
Akola, Maharashtra:राज्यात अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर खाद्य व्यावसायिकांच्या आस्थापनांची तपासणी सुरू असून, अकोल्यातही या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज शहरातील जठारपेठ परिसरातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टची अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. यानंतर संबंधित प्रतिष्ठानला तात्काळ व्यवसाय बंद करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचे तसेच नियमांचे पालन करूनच पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर: मोरभवन डिपो के चालकों ने लंबित मांगों के समाधान के लिए आंदोलन शुरू किया
Nagpur, Maharashtra:नागपूर 'शहर बससेवेतील आपली बस'चे चालक व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मोरभवन डेपो येथे काम बंद आंदोलन पुकारले. अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बस ऑपरेटरांकडून सातत्याने मानसिक व आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली मोरभवन, हिंगणा आणि वाठोडा डेपोतील चालक व कर्मचारी एकत्र आले. यावेळी बस सेवा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलन सुरू होऊन बराच वेळ उलटल्यानंतरही मनपाकडून कोणताही अधिकारी चर्चेसाठी आला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.0
0
Report
संजय राऊत की रामनगर राम मंदिर यात्रा: ट्रस्ट से अहम चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत रामनगर येथील राम मंदिरात दाखल झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांना राम मंदिरातील राम रक्षा पठाण संदर्भातील पत्र देण्यात येणार आहे. यावेळी सभास्थळाबाबत ट्रस्टशी चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रस्तावित सभास्थळाची संजय राऊत प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आगामी सभेच्या तयारीचा आणि नियोजनाचाही ते आढावा घेणार आहेत.0
0
Report
सोलापूर के टेंभुर्णी कुर्डूवाडी बार्शी कुसळंब मार्ग के चौपद्रीकरण DPआर को मंजूरी की मांग
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी कुर्डूवाडी बार्शी कुसळंब मार्गाच्या चौपद्रीकरणाच्या डीपीआरला मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील मधील विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या दळणवळण रस्त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्यासमोर मांडली0
0
Report
Advertisement
श्रीगोंदा से दिंडी पंढरपूर: हिन्दू-मुस्लिम ऐक्य की मिसाल
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के श्रीगोंदा से संत श्री महंमद महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शेख महंमद महाराजांची दिंडीला अनेक वर्षांची परंपरा आहे। संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन सुफी संत होते। या दिंडीत जवळपास दो हजार भाविकांनी सहभाग घेतलाय। एकीकडे राज्यात आणि देशात हिंदू-मुस्लिम वादाच्या घटन घडत आहेत तर दुसरीकडे अशा पद्धतीने एका मुस्लिम सुफी संतांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असल्याने समाजापुढे एक वेगळा आदर्शच या निमित्ताने ठेवला गेलाय。0
0
Report
अमरराती के राजेंद्र कॉलनी हत्या: सीसीटीवी फुटेज सामने, चार आरोपी
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत हत्या झाल्याचे प्रकरण; हत्येचे सीसीटीव्ही झी 24 तास च्या हाती. अँकर: अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत हत्या झाल्याचे प्रकरणात सीसीटीव्ही पुढे आल्याने पुन्हा एकदा खडबड उडाली आहे. थेट हाताचा पंजा छाटत amaravatiच्या राजेंद्र कॉलनी तरुणाची हत्या करण्यात आली होती. मृतक आणि आरोपींमध्ये प्रेम प्रकरणातून काही दिवसापासून वाद सुरू होता. याच वादातून ही घटना घडल्याची पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी ही माहिती दिली आहे. प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी हे सर्व आरोपी आणि मृतक जमले असता चर्चेदरम्यान वादाचे रूपांतर थेट झाले. हत्तेत झाल्याने एकच खडबड उडाली आहे. मृतकाचे नाव शेख अफाख शेख अकिल वय २४ वर्ष राहणार ताज नगर येथील रहिवासी असून घटनेत एकूण चार आरोपी निष्पन्न, तीन आरोपी अल्पवयीन आहे. सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्याच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली आहे.0
0
Report
बेमुदत बंद स्थगित, आंदोलन जारी; चौथे दिन शहर पूर्वपद पर लौटेगा श्रीरामपूर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर बेमुदत बंद स्थगित... सर्वपक्षीय महामोर्चा नंतर बंदचा निर्णय मागे... छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर झालेल्या सभेत घोषणा... बंद स्थगित केला असला तरी विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार.. अखेर चौथ्या दिवशी शहर येणार पूर्वपदावर... महामोर्चात आजी माजी आमदारांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी सहभागी... मयत आकाशच्या नातेवाईकांनी केली होती बंद मागे घेण्यासाठी विनंती... बंद मागे घेतला असला तरी मकोका अंतर्गत कारवाई करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार...0
0
Report
Advertisement
श्रीरामपूर हत्या: बेग टोळीसह भूमिका पर नया बवाल, सागर बेग ने दी प्रतिउत्तर
Shirdi, Maharashtra:श्रीरामपूर शहरात 11 जुलैला दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबय्या हा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली.. या हत्येचे पडसाद गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर शहरात उमटत आहे.. गेल्या तीन दिवसांपासून शहर बंद ठेवत सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक एकवटले आहेत...वाढत्या गुन्हेगारीत बेग टोळीचा हात असल्याचा आरोप श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केल्यानंतर आता हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.. केवळ बेग टोळी नाव घेऊन आरोप करण्यापेक्षा आमदाराने बेग टोळीच्या सदस्यांची नावे सांगून त्यांचा संबंध या हत्याकांडात कुठे आला हे जाहीर करण्याची मागणी केली आहे... श्रीरामपूर शहरात 11 जुलैला व्यावसायिकाच्या हत्येनंतर गेल्या तीन दिवसांपासून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून आज महामोर्चा देखील काढण्यात येणार आहे... श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीत बेग टोळीचा हात असल्याचा आरोप स्थानिक आमदार हेमंत ओगले यांनी केला.. आणि हा आरोप करताना त्यांचा रोष होता श्रीरामपूर शहरातील हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्याकडे... यानंतर सागर बेग यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिलय.. सागर बेग पत्रकार परिषद मुद्दे शिंदे गटाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागर बेग यांच्या पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या आमदारावर गंभीर आरोप... व्यवसायिक आकाश दुबैया यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ भाजपच्या नेत्यांबरोबर... भाजपच्या नेत्यांवर कोणीही बोलणार नाही , मला ज्या पद्धतीने फोटो असल्यामुळे जबाबदार धरत आहात त्याच पद्धतीने त्यांच्यावर ही कारवाई करा... आमाडार बेग टोळी आरोप माझ्यावर गुन्हे नव्हते हे मी सांगणार नाही.. अनेक होते पण मी निर्दोष झालोय..माझ्यावर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल होते त्यात केवळ चार गुन्हे न्यायालयात प्रलंबित.. इतर गुन्ह्यात मी निर्दोष झालोय.. माझ्या भावावर देखील अवघे चार गुन्हे आहेत आज.. मी काही कुठला अतिरेकी नाही... आमदाराचा अभ्यास आहे तर केवळ बेग टोळी बेग टोळी आरोप करण्यापेक्षा सदस्यांची नावे सांगावी.. कोण लोक या घटनेशी निगडीत आहे.. कॉल झालेत काय आमचे आरोपींशी.. अस काही असेल तर आरोपी करा आम्हाला.. त्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांचे दोन नंबरचे धंदे... या घटनेत पकडलेल्या आरोपींशी माझा कुठेही संबंध नाही... मोर्चा काढल्यानंतर गाव उघडले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.. आजही ते करू शकलो असतो मात्र पुन्हा आमचे नाव येऊ नये म्हणून आम्ही ताकद वापरतो असा आरोप केला गेला असता.. या तीन आरोपींमध्ये एक भाजपच्या नेत्याच्या गाडीवर रॅलीत पूर्वी फिरला आहे.. मग त्या नेत्याला आरोपी करणार का ? आमच्या सोबत फोटो आला तर गुंड आणि तुमच्यासोबत असला की सुशिक्षित..? గ్రाफिक्स - कोण आहे सागर बेग.. सागर बेग गेल्या चार वर्षापासून हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख... मंत्री नितेश राणे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय... गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार.. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश.. आमदार संग्राम जगताप व सागर बेग यांची अनेक हिंदुत्ववादी आक्रोश मोर्चात एकत्र सभा... चार वर्षापूर्वी अनेक वेगवेगळे 18 गुन्हे दाखल.. त्यातील 14 गुन्ह्यात निर्दोष मुक्तता तर इतर गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेत... गेल्या चार वर्षांत कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख... महिनाभरापूर्वी पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची सागर बेग यांची माहिती...0
0
Report
भेसळ रोकथाम से मुंबई- पुणे में शुद्ध दूध की मांग बढ़ी; गोकुळ को फायदा
Kolhapur, Maharashtra:राज्यात दुधातील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता बाजारपेठेत दिसू लागला. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये भेसळयुक्त दुधाचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांचा विश्वास दर्जेदार दुधाकडे वाढला आहे. त्याचा थेट फायदा शुद्ध दूध विक्री करणार्या संघाला होत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गोकुळ दुधाच्या मागणीत दररोज दीड ते दोन लाख लिटरची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे, वाढत्या मागणीचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. राज्यात सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे दूध व्यवसायात मोठे बदल होत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात भेळसयुक्त दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. याचाच परिणाम म्हणून ग्राहकांचा ओढा आता दर्जेदार आणि विश्वासार्ह दूध ब्रँडकडे वाढला आहे. त्यामध्ये एका गोकुळ दूध संघाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्या मुंबईत गोकुळचे दररोज १० ते ११ लाख लिटर, तर पुण्यात ५ ते ६ लाख लिटर दूध विकले जात आहे. गेल्या काही दिवसांत या विक्रीमध्ये आणखी दीड ते दोन लाख लिटरची भर पडली आहे. गोकुळ दूध संघाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही भविष्यात राज्यात दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत भेसळयुक्त दूध विकणाऱ्या अनेकांवर कारवाई झाल्यामुळे बाजारातील पुरवठा घटला आहे. त्यामुळे दर्जेदार दूध पुरवणाऱ्या सहकारी दूध संघांवर आता अधिक जबाबदारी आली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गोकुळसारख्या संघांना दूध संकलनात वाढ करावी लागत असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गोकुळच्या वाढत्या मागणीमागे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. मात्र उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना दूध दरात अपेक्षित वाढ होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. दर्जेदार दूध देण्यासाठी जनावरांचा चारा, औषधे आणि देखभाल यावर मोठा खर्च करावा लागत असल्यामुळे गोकुळच्या दुधाची मागणी वाढत असली तरी त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांनाही मिळायला हवा, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. राज्यात सध्या दुधाची मागणी उत्पादनापेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत भेसळमुक्त आणि दर्जेदार दूध नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर सहकारी दूध संघांचे संकलन वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर पैसे आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
डोंबिवली के शास्त्रीनगर अस्पताल में दवाएं उपलब्ध नहीं, गरीब मरीजों को राहत नहीं मिली
Kalyan, Maharashtra:"आमच्याकडे औषधं नाहीत... बाहेरून घ्या!" डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधं उपलब्ध नाही ? त्वचेच्या आजाराने त्रस्त दोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी डॉक्टरांनी लिहिली १२ औषधे रुग्णालयातील मेडिकलमध्ये एकही उपलब्ध नसल्याचा वडिलांचा दावा पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार समोर टिटवाळा परिसरात राहणारे जगदीश राठोड आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन आज डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आले . जगदीश यांचा दोन वर्षाचा मुलगा वेदांश याला त्वचेचा त्रास होता त्यावर उपचार करण्यासाठी जगदीश यांनी आपल्या मुलाला शास्त्रीनगर रुग्णालयात आणलं डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशाला तब्बल 12 औषध लिहून दिली ही औषधा घेण्यासाठी वेदांत चे वडील जगदीश हे रुग्णालयातील मेडिकलमध्ये गेले मात्र तिकडे यामधील कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने ही औषध बाहेरून घ्या असे सांगण्यात आले. गोरगरीब गरजू रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयांमध्ये साधा औषधांचा साठाही उपलब्ध नसल्याने आता रुग्णांमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येतोय .या घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार समोर आला जगदीश राठोड ( मुलाचा वडील )0
0
Report
Advertisement
