icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक के तांडव- सर्जा ने हिंदकेसरी बैलगाड़ी दौड़ जीती, 300 मीटर में 19 सेकंड

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर येथील शरणापूर भागात भांगसी माता गडाजवळ हिंदकेसरी बैलगाडा शर्यत झाली. या शर्यतीत नाशिकचा 'तांडव' आणि हिंगोलीचा 'सर्जा' या बैलजोडीने हिंदकेसरीचा किताब जिंकला. या बैलजोडीने ३०० मीटर अंतर अवघ्या १९ सेकंदांत पार केले. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी हिंदकेसरी बैलगाडा शर्यत असल्याचा दावा केला जात आहे. या शर्यतीत ९०९ बैलगाड्या सहभागी झाल्या, तर १,८०२ बैल शर्यतीत धावले. ९० फेऱ्यांमधून बैलगाड्या अंतिम फेरीत पोहोचल्या. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बैलगाडा मालकही यात सहभागी होते. शर्यतीतील पहिले बक्षीस १.५१ लाख रुपयांचे, दुसरे बक्षीस १.२१ लाख रुपयांचे, तर तिसरे बक्षीस ९१ हजारांचे होते. या वेळी ३ लाख प्रेक्षक उपस्थित होते असा दावा करण्यात आला आहे.
0
0
Report

नीट तनाव से जालना में छात्रा ने की आत्महत्या; अम्बड क्षेत्र में शोक

Jalna, Maharashtra:जालना : नीट परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या,अंबड मधील घटना अंबड, जालन्यातील अंबड तालुक्यातील 19 वर्षीय मिसबाह खलील शेख ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिसबाहचे वडील शेख खलील गेल्या २० वर्षांपासून अंबड तालुक्यातील रुई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिसबाहने छत्रपती संभाजीनगर येथून क्लासेस केले होते आणि यापूर्वी दोनदा नीट परीक्षा दिली होती. पेपरफुटीच्या वादामुळे परीक्षा रद्द झाली, तिने रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर पुन्हा परीक्षा दिली. रात्री उशिरा उत्तरकिट तपासल्यानंतर अपेक्षेप्रमાણे गुण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ती मानसिक तणावात गेली. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तिची आई टेरेसवर कपडे आणण्यासाठी गेली असताना मिसबाहने रुममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंबड पोलिस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

अण्णा हजारे ने 5 जुलाई को आमरण उपवास की चेतावनी दी; नए RTI नियमों के खिलाफ आंदोलन तेज

Ahilyanagar, Maharashtra:अण्णा हजारे ने फडणवीस सरकार को 5 जुलाई को आमरण उपवास करने का संकेत दिया है। सूचना के अधिकार के 12 जून 2026 को लागू हुए नए नियमों के विरुद्ध आक्रामक रुख अपनाते हुए कहा गया है कि शुल्कवृद्धि, पहचान पत्र अनिवार्यता और एक विषय–एक अर्ज जैसी धाराओं से सूचना के अधिकार कमजोर हो रहा है। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इन नियमों को तत्काल रद्द करने के लिए पत्र लिखा है। वहीं मुख्य सूचना आयुक्त राहुल पांडेय से चर्चा हुई; वे दो दिनों में मिलने आ रहे हैं; अगर निर्णय सकारात्मक हुआ तो ठीक, अन्यथा 5 जुलाई से राळेगणसिद्धि में यादव बाबा मंदिर के पास बेमुदत उपवास शुरू करने की चेतावनी दी गई है।
0
0
Report
Advertisement

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर: दीर्घकालीन संवर्धन स्थगित, दर्शन सामान्य; उच्च न्यायालय में अपील सुनवाई

Pandharpur, Maharashtra:PPR_SAMITI_STAND.mp4 Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात समिती कडून अपील दाखल; मंदिर दर्शनासाठी नियमित खुले राहणार श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमाता यांच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरातत्त्व तज्ज्ञ, संबंधित अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, सल्लागार परिषद सदस्य व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार दिनांक २२ ते २४ जून या कालावधीत मूर्ती संवर्धनाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक कामकाज सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडता यावे यासाठी दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सदर मूर्ती संवर्धन प्रक्रियेसंदर्भात मे. दिवाणी न्यायालय, पंढरपूर येथे दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मा. न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश पारित केला आहे. मे न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून प्रस्तावित संवर्धनाची कार्यवाही सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मा. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरुद्ध संबंधित वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून त्या अपीलवरील सुनावणी दिनांक २३ जून रोजी होणार आहे. वरिष्ठ न्यायालयाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दिनांक २३ व २४ जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहील. याची वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
0
0
Report

चंद्रपुर नगर निगम में कांग्रेस गटनेता के नियुक्ति पर हाईकोर्ट ने तात्पुरती स्थगिती दी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदीनिर्जित सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीला मुंबई हाईकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची तात्पुरती स्थगिती. मुंबई हाईकोर्ट नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली है. नागपूर विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी दिलेल्या आदेशाद्वारे काँग्रेस गटनेतेपदी विजय वडेट्टीवार गटाचे राजेश अडडूर यांच्या हटवून प्रतिभा धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांच्या निवडीला मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाविरोधात तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत विभागीय आयुक्तांच्या १७ जूनच्या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देत प्रतिवादींना 6 जुलै पर्यंत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे अडडूर यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे तर अडबाले यांचे गटनेते बनण्याचे स्वप्न कायद्याच्या कचाट्यात आडकले आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला असून प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे. चंद्रपुरातील काँग्रेसच्या दोन ध्रुवांमधील राजकीय संघर्ष आता न्यायालयाच्या कक्षेत दीर्घकाळ प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0
0
Report

अहमदनगर-नासिक में भारी बारिश: चांदवड में स्कूल परिसर जलमय, दुकानों में पानी घुसा

Yeola, Maharashtra:अँकर-नाशिक जिल्ह्यात आज दुपारपासून सर्वदूर पाऊस होत असून,चांदवड तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसाने भाटगाव येथील प्राथमिक शाळेच्या आवारात पाणीच पाणी झाल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातूनच बाहेर पडण्याची वेळ आली,शाळेचा अख्खा परिसर जलमय झाला असून काही वर्गात पाणी घुसल्याचे सांगण्यात येतय, तर चांदवड शहरातील सखल भागातील दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले,पहिल्याच पावसाने मात्र चांदवड शहर व तालुक्याला मात्र चांगलेच झोडপून काढल्याचे पहावयास मिळाले
0
0
Report
Advertisement

गोंदिया में बस के टायर फटने से डिवाइडर पर चढ़कर पेड़ से टकराई, 40 यात्रियों में एक गंभीर घायल

Bhandara, Maharashtra:भरधाव ट्रॅव्हल्स अनियंत्रित झाल्याने झाडाला धडकली... बस मध्ये असलेल्या 40 प्रवाश्यांपैकी 10-12 प्रवासी किरकोळ जखमी.... गोंदिया जिल्ह्यातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील घटना.... रायपूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सचे समोरील टायर अचानक फुटल्याने अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. गोंदिया जिल्ह्यातील मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली गावाजवळ ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे, तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्रवाशांनी गच्च भरलेली खासगी ट्रॅव्हल्स 40 प्रवाशांना घेऊन रायपूरकडून सोलापूरच्या दिशेने जात होती. मुरदोली गावाजवळ महामार्गावर अचानक बसचा समोरील टायर मोठ्या आवाजासह फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडर व दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडून झाडावर जाऊन धडकली. झाडाला झालेली धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अर्शद राशिद अहमद (भिलाई) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे...
0
0
Report
Advertisement

अकोला आलेगाव में बारिश से पानी सड़कों पर, ग्राम पंचायत के कामकाज पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पातूर तालुक्यातील आलेगाव येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज झालेल्या पावसाने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिला.मात्र आलेगावमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.आज दुपारच्या सुमारास अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पातूर तालुक्यातील आलेगावमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर साचले. नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने नाल्यातील पाणी थेट रस्त्यांवर आणि काही ठिकाणी घरांच्या परिसरात शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
0
0
Report

उद्धव ठाकरे की बैठक के लिए संजय देरकर की गैरहाजिरी, पालखी यात्रा का कारण

Yavatmal, Maharashtra:मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या आमदारांच्या बैठकीला अनुपस्थित असलेले यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी त्यांच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले आहे. मतदार संघातील नागरिकांचे श्रद्धास्थान जगन्नाथ महाराज यांची पालखी असल्याने, आणि या पालखीला उपस्थित राहण्याची परंपरा गेल्या वर्षापासून सुरू आहे. जाऊ शकलो नाही शिवाय 27 जूनला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यवतमाळ मध्ये येत असल्याने सभेची तयारी देखील सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन करून मुंबईसाठी रवाना होणार असल्याचे संजय देरकर यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top