Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Sept 24, 2024 04:45:23
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Jan 06, 2026 07:08:35
kolhapur, Maharashtra:चंद्रशेखर बावनकुळे - आज मैं पिम्परी चिंचवड़ और पुणे के हमारे उम्मीदवारों के प्रचार के लिए जाता हूँ मुझे विश्वास है पुणे और पिंपरी चिंचवड के महापौर दो तृतीयांश बहुमत से विजयी होंगे देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र के एकमेव नेता हैं। दीड़ कोटी सदस्य वाले भाजपा को देवेन्द्र एकमेव आधार हैं। हमारे पक्ष में गुटबंदी वाला राजनीति नहीं हमारा पक्ष देवेन्द्र जी के नाम से एकजुट है। कांग्रेस में जैसी स्थिति है, वैसी पार्टबद्दल बोला जा रहा है। इससे वे हमारे छुपे युद्ध के प्रयास कर रहे हैं सर्व पक्ष देवेंद्र फडणवीस के पीछे खड़े हैं सुधीर मुनगंटीवार कभी भी देवेंद्र जी के बारे में नाराज नहीं रहते। मतभेद नहीं। कुछ उनके स्थानीय स्तर पर नाराजी देवेन्द्र जी बोले जो शब्द पक्ष के लिए अंतिम हैं। हमारे पक्ष में गुट-बंट संभव नहीं आनंद व्यक्त करने के लिए होंगे। उसमें भीड़ का क्या संबंध है। महिलाओं ने अपना आनंद व्यक्त किया होगा छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास सभी को ज्ञात है ठाकरे बंधु की मुलाकात… इसका मतलब यह है कि उन्होंने उन्हें लिखकर दिया है, और वे उन्हें लिखकर दे देंगे। इतना ही नहीं। उस मुलाकात को कोई गंभीरता से नहीं लेता: उसकी उत्सुकता खत्म हो गई है मुख्यमंत्री से चर्चा हो चुकी है अब партия अध्यक्ष उनके प्रवेश के बारे में निर्णय लेंगे (मनसे धुरी) बिनविरोध चुनाव होना यह अच्छी लोकतंत्र की निशानी हैः स्थानीय नेतृत्व पर विश्वास करके विकास के मुद्दों पर बिनविरोध होते हैं ज्यादा से अधिक चुनाव बिनविरोध होकर होने चाहिए नागपुर में मेरी 20 सभाएं हैं शिंदे जी उन्हें विकास समझते हैं इसलिए उनका प्रचार-प्रसार है (ठाकरे बंधु सभा अनुमति) भावनात्मक तरीके से विपक्षी राजनीति करते हैं। हर किसी के लिए। सभा करने का अधिकार है विकास मतलब देवेंद्र फडणवीस है। इसलिए भाजपा की बड़ी जीत होने वाली है
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 07:08:18
kolhapur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखती नागपुरात होत आहेत... आठ तारखेला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रकट मुलाखत होईल... याबाबत झी २४ तासने अगोदर वृत्त दिले होते. हॉटेल सेंटर पॉइंट येथे ही प्रकट मुलाखत होईल.. एकीकडे राज्याची राजधानी मुंबईत ठाकरे बंधुंची मुलाखत होत असताना राज्याच्या उपराजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत लक्षवेधी ठरणार आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील प्रकट मुलाखती शिवाय राज्यातील आणखी तीन शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखती होणार आहे...विशेष म्हणजे ठाण्यातही एक मुलाखत होणार असल्याची माहिती आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 06:01:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हे प्रकरण वाढेल असे दिसतंय, फोनो वगरे घेता येईल... ANC : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या वेशात राजकीय सौदेबाजी करून आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दानवेंनी केला. २२ जून २०२४ पर्यंतचेच नियुक्ती आदेश असतानाही सुक्रे पदावर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून गुन्हा दाखल व निलंबनाची मागणी केल्याचे दानवेंनी केली होती त्यावर आरोपांची दखल आता छत्रपती संभाजी नगर निवडणूक विभागाने आज अंबादास दानवे आणि घाटी हॉस्पिटलचे डीन शिवाजी शुक्रे याना चौकशी साठी बोलावले आहे आरोपात काय तथ्य आहे ते शोधण्यासाठी आज या दोघांना बोलावून घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 06, 2026 05:08:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू ग्रुपचे समरजित घाटगे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामुळे घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काहीसा लांबला आहे. दरम्यान, 8 जानेवारी रोजी कागल येथे समरजित घाटगे राजे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतील राजे गटाची भूमिका काय असणार, याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 03:01:04
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 02:49:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्यारणधुमाळीत आता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. एमआयएम शहरात जातीचे विष पसरवत असून त्यांच्या प्रचारामुळे दंगली घडू शकतात, असा खळबळजनक आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सोमवारी आयोजित उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली, परिस्थिती त्यांनी खराब केली तर उत्तराला प्रतिउत्तर मिळेल असे ही संजय शिरसाठ म्हणाले, तर भाजप ने ही संजय शिरसाठ यांचीच री ओढली, पालकमंत्र्यांना परिस्थिती जास्त माहिती असेल असे सांगत असे काही झाले आम्हीही पालकमंत्री आणि शिवसेनेसोबत असू असे भाजप नेते बावनकुळे म्हणाले...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 02:33:41
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 06, 2026 02:00:12
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्नांचा मुद्दा प्रचारामध्ये ऐरणीवर आहे. इचलकरंजी शहरवासीयांच्या दृष्टीने संवेदनशील असणारा पाणी प्रश्नाचा मुद्दा कोणाला मारक ठरणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. इचलकरंजी शहराने औद्योगिक प्रगती केली असली तरी पाण्याचा मूलभूत प्रश्न अध्याप कोणाचाच पक्षाला सोडवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष सत्ता द्या पाणी प्रश्न मिटवू असे आश्वासन देत आहे. सत्ताधारी भाजप आमदार राहुल आवाडे आणि नेते केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपाचा महापौर आल्यास इचलकरंजीचा पाणी प्रश्न चुटकी सरशी मिटवू असे आवाहन केले जात आहे. तर शिव शाहू आघाडी केंद्रात राज्यात सरकार असताना अजूनही इचलकरंजीचा पाणी प्रश्न का मिटला नाही ? असा सावल उपस्थित करत महायुतीला कात्रीत पकडत आहे. आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा पाणी प्रश्न कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार निवडणूक निकालानंतर कळणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 14:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजधानी, या शहरात ज्याची सत्ता तोच मराठवाड्यात राज्य करतो असं म्हटल्या जातं आणि हीच सत्ता काबीज करण्यासाठी आता सर्वपक्षीय धडपड सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकांमुळे सर्वे पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत, महायुती झाली नाही महाविकास आघाडी विस्कटली त्यामुळे सगळेच एकला चलो च भूमिकेत आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षांना एकमेकांचं मोठा आव्हान असणार आहे. छत्रपती संभाजीनगरात कुणाची सत्ता महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांचा संघर्ष. छत्रपती संभाजीनगर एकेकाळी हा शिवसेनेचा गड मानला जायचा, शिवसेना भाजप युतीनं महापालिकेवर राज्य केले, अगदी 2015 च्या निवडणुकीत अखेरच्या सहा महिन्यातील वाद सोडला तर शिवसेना-भाजप सातत्याने सोबतच राहिले आणि या महापालिकेवर भगवा फडकत राहिला.. मात्र यंदा चित्र वेगळा आहे शिवसेनेचा विभाजन झालंय त्यामुळे दोन शिवसेना रिंगणात आहे, महायुती जमली नाही त्यामुळे भाजप एकटा रिंगणात आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात ताकद आजमावत आहे तर एम आय एम चा सुद्धा मोठा आव्हान आहे आणि या सगळ्यात महापालिकेवर कोणाची सत्ता हाच सध्या संभाजीनगर मधील चर्चेचा विषय आहे. गेली अनेक वर्षे संभाजी नगर मधील अनेक मुद्दे सुटले नाहीयेत. संभाजीनगरात अजूनही पाणी किमान 4 दिवसाआड येतेय, अनेक भागात अजुनही पाण्याची पाईप लाइन नाही. संभाजीनगरचे रस्ते लोकसंख्येच्या मनाने छोटे झालेत त्यामुळं वाहतूक कोंडी नित्याची. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने मूलभूत काम करण्यात महापालिका अपयशी ठरतेय. अनेक रस्त्यावर स्ट्रीट लाईट महापालिका लावू शकली नाही, रस्ते साफसफाई करणे, कचरा उचलणे यातही अनेक उणिवा कायम आहे. महापालिकेने रस्ते मोठे करण्यासाठी मोठी अतिक्रमण मोहीम राबवली, मात्र आता रस्ते बांधण्यासाठी पैसे नाहीत. या समस्या अजूनही सुटता सुटत नाही आहे. खरंतर संभाजीनगरचा प्रचार हा कधी विकासाच्या मुद्द्यावर झालाच नाही तुम्हाला खान हवाय की बाण, संभाजी नगर की औरंगाबाद हे दोनच मुद्दे प्रचारात महत्त्वाचे विषय असायचे आणि त्यामुळे विकास मागे पडल्याचं सांगण्यात येते, आता शहराच्या नामांतराचा विषय संपलाय, खान की बाण हा मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरे गटाने थेट मुस्लिम समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिल्याने मागे पडलाय. आता सर्वच पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं पुढे सांगताय मात्र समस्या सोडवणार कसा कदाचित याचे उत्तर कोणाकडे नाही, युती तुटल्याने शिवसेना भाजप ही आमने सामने आहेत त्यामुळं दोघांमध्ये युद्ध पेटणार असे चित्र आहे. शिंदे सेना मात्र टीका करण्यापेक्षा आम्ही विकास कामावर लक्ष देऊन निवडणूक लढू असे सांगताय तर भाजप ही आता विकासाचाच मुद्दा पुढे रेटते आहे. गळलेला गड शिवसेनेचा आहे शिवसेना इथल्या समस्या सोडवू शकते, बाळासाहेब ठाकरे वर प्रेम करणारे लोक इथं राहतात त्यामुळं जनता आम्हाला समर्थन देईल असा अंबादास दानवे यांचा दावा आहे. तर शिवसेना भाजप कोणीही या शहराचा विकास करू शकला नाही यांनी फक्त जातीय राजकारण केलं त्यामुळे या जातीय राजकारणाला एमआयएम संपवेल आणि या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करेल असे इम्तियाज जलील सांगतात आहेत. गेल्या निवडणुकीतील संख्याबळ शिवसेना भाजप युती कडे होते पाहुयात कसे होते संख्याबळ शिवसेना 29 भाजप 22 एमआयएम 25 काँग्रेस 10 बहुजन समाज पार्टी 5 एनसिपी 4 अन्य 20. 2015 अखेर महापौर शिवसेनेचा होता शेवटच्या 6 महिन्यात भाजपने पाठिंबा काढलेला तरी शिवसेना सत्ता कायम होती...मात्र यंदा आता चित्र वेगळे आहे सर्वच पक्ष एमकेकांची उनीदुनी काढताय, त्यात संभाजी नगरात ही लढत प्रामुख्याने चौरंगी रंगण्याचीच शक्यता जास्त आहे, शिंदे सेना , उद्धव सेना , भाजप आणि एमआयएम प्रमुख प्रतिस्पर्धी असतील आता यातील कुणाचा झेंडा महापालिकेवर फडकणार याचा निर्णय मात्र मतदार राजाच घेणार आहे. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
Advertisement
Back to top