445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राज्यभर के शिक्षक अकोला में प्रदर्शन कर मांगों पर तत्काल कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:Anchor : राज्यभरातील शिक्षकांनी आज विविध प्रलंबित मागण्याांसाठी एल्गार पुकारला. शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले. टीईटी अनिवार्यतेबाबत न्याय्य निर्णय, बीएलओच्या कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता, संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघ, खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तसेच महानगरपालिका आणि नगरपरिषद शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.0
0
Report
आंबेगांव में दूध भेस़ळ रोकथाम: नागरिकों ने मंचर-भीमाशंकर रोड पर अभिनंदन फ्लेक्स लगाए
Shirur, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने ५ जिल्ह्यांत पसरलेलं दूध भेसळीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं, ज्याची पाळेमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात आढळली होती. या धडाकेबाज कारवाईनंतर आता प्रशासनाला थेट जनतेचा पाठिंबा मिळताना दिसतोय. आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द गावातील नागरिकांनी एकत्र येत थेट मंचर-भीमाशंकर रोडवर तुकाराम मुंढेंच्या अभिनंदनाचे आणि समर्थनाचे मोठे फ्लेक्स लावले आहेत. एका छोट्याशा गावातील नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार सध्या येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय.0
0
Report
नवविवाहित जोड़े ने ट्रेन सजावट कर रेल्वे के नियम तोड़े, मामला दर्ज
Jalna, Maharashtra:जालना :हनिमूनसाठी रेल्वेची बोगी सजवणे नवविवाहित जोडप्याला पडले महागात रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल जबाबदार रेल्वे अधिकारीही तडकाफडकी निलंबित-रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती नंदीग्राम एक्सप्रेसमधील सजावटीचा व्हिडिओ व्हायरल रेल्वे प्रशासनाची तातडीची कारवाई जालना कनेक्शन, सजावट करणाऱ्यावर रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल या प्रकारामुळे सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासादरम्यान अजहर शेख वाहेद नावाच्या व्यक्तीने जालन्यातील जोडप्यासाठी ही सजावट केल्याचे दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. सजावटीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. थोडक्यात, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि इतर प्रवाशांनाही अडचण झाली असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. चौकशी सुरू आहे आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल अशी माहिती नांदेड विभागाने दिली आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में अंतरराज्यीय वाहन चोर गिरोह का पर्दाफाश; 11 चोरी की bikes सहित दो गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। दोन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। चौकशीत आरोपींनी चंद्रपूर, वणी, भद्रावती, नागपूर आणि तेलंगणातील वाहनचोरीची कबुली दिली असून, चोरीच्या वाहनांचे बनावट नंबर लावून विक्री करण्याचा डाव उघड झाला आहे। ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी वरिष्ठ अधिकारीांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
चंद्रपुर में दुर्लभ घटना: एक साथ 34 घोणस साप पिल्ले और एक माँ सुरक्षित मुक्त
Chandrapur, Maharashtra:महाराष्ट्रात दुर्मिळ घटना, दो तोंडांच्या दोन्ही घोणस पिल्लांचा जन्म, चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी येथे ३४ पिल्लांसह मादी निसर्गमुक्त अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या 'स्वाब' वन्यजीव संस्थेने कन्हाळगाव येथे एकाच वेळी ३४ घोणस सापांची ( Russel Viper) पिल्ले आणि एका मादीला यशस्वीरीत्या निसर्गमुक्त केले आहे. या रेस्क्यूमध्ये दोन पिल्ले ‘दोन तोंडे’ असलेली आढळली आहेत. अशी नोंद पहिल्यांजाच झाली आहे. कन्हाळगाव येथील अब्दुल शेख यांच्या घराशेजारील लाकडाच्या ढिगाऱ्यात घोणस मादी आणि ३४ पिल्ले आढळून आली होती. स्वाब वन्यजीव संस्थेच्या टीमने या सापांना सुरक्षितпणे बाहेर काढले. दुर्दैवाने, दोन तोंडे असलेली ही पिल्ले अत्यंत अशक्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही. या रेस्क्यू मोहिमेत घोणसांव्यतिरिक्त नाग, मण्यार, धामण यांसारख्या अनेक सापांना पकडून वन विभागाच्या उपस्थितीत सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.0
0
Report
आषाढ़ी वारी के लिए पंढरपुर मंदिर मार्ग पर नो व्हीकल जोन, 25 जुलाई तक रोक
Pandharpur, Maharashtra:आषाढ़ी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मधील श्री विठ्ठل रुक्मिणी मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर नो व्हेईकल झोन करण्यात आला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांनी याबाबत आदेश काढले आहेत पायी चालणाऱ्या भाविकांना वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी 25 जुलैपर्यंत कोणतेही चार चाकी वाहन मंदिर परिसरामध्ये जाणार नाही0
0
Report
Advertisement
अकोल्यात सर्पमित्र चिकू इंगोले ने घोणस साप का रेस्क्यू कर 30-35 पिल्लों को बचाया
Akola, Maharashtra:अकोल्यात सर्पमित्र चिकू इंगोले यांनी अत्यंत विषारी घोणस प्रजातीच्या सापाचे धाडसी आणि सुरक्षित रेस्क्यू करून पुन्हा एकदा जीवसृष्टीप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, रेस्क्यूदरम्यान या मादी घोणस सापाने तब्बल 30 ते 35 पिल्लांना जन्म दिल्याने काही काळ घटनास्थळी उपस्थितांमध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आईसह सर्व पिलांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. या कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी चिकू इंगोले यांचे कौतुक केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू आणि इतर सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.पावसाळ्यात साप घरात किंवा परिसरात आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना माहिती द्यावी, तसेच रात्रीच्या वेळी बूट घालून बाहेर पडावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन सर्पमित्र चिकू इंगोले यांनी केले आहे.0
0
Report
अहिल्यानगर में शिक्षकों का बड़ा धरना, बीएलओ रोकने और नई भर्ती की मांग
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक रजा आणि धरणे आंदोलन करण्यात आले...शिक्षकांना बीएलओची कामे देऊ नये, कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र TET परीक्षा घ्यावी, तातडीने नवीन शिक्षक भरती करावी, शिक्षकांची ऑनलाइन कामे कमी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय...जिल्ह्यातील मोठ्या संख्येने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षिका या आंदोलनात सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचं शिक्षक आंदोलक म्हणाले आहेत...0
0
Report
शिक्षक संघटन का राज्यव्यापी धरणा, नाशिक में जिलाधिकारी कार्यालय के सामने मोर्चा
Nashik, Maharashtra:महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने कडून राज्यव्यापी Shाला बंद करत धरणे आंदोलन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यासमोर केले जात आहे. शिक्षक संघटना समन्वय समितीकडून कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी अट रद्द करा, शिक्षकांना बीएलओ व एसआर यांसारखी अशैक्षणिक कामे देणे याच्या विरोधात शिक्षक संघटना ही आक्रमक झाली आहे. गोल्फ क्लब मैदानापासून निघालेला शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
लातूर में दो युवकों ने बालिकाओं को छेड़खानी, भीड़ ने पकड़ा एक, दूसरा फरार
Latur, Maharashtra:लातूर शहर के पिव्हीआर चौक क्षेत्र में दो युवक बालिकाओं को छेड़खानी कर रहे थे, कई दिनों से यह घटनाक्रम चालू था। विरोधी प्रदर्शन के कारण संतापित भीड़ ने छेड़खानी करने वाले दोनों में से एक को पकड़ लिया, जबकि दूसरा भाग गया। पकड़कर भीड़ ने उसे बालिका का पीछा कर रहे युवक को बेदम मारहाण के बाद एमआईडीसी पुलिस थाने के हवाले कर दिया। अन्य के बारे में खोज जारी है और नागरिकों की कार्रवाई की मांग है।0
0
Report
पवार-शिंदे की मीटिंग सिर्फ योगायोग, कोई राजनीतिक मतलब नहीं: शिंदे
Satara, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. हाेई भेट केवळ एक योगायोग होती आणि त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना विनाकारण वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे. विधानभवनात सीमावादाच्या संदर्भात एक महत्त्वाची समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार हे देखील या बैठकीला हजर होते. बैठक संपल्यानंतर पवार साहेब तिथून निघाले असता काही वेळासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये शरद पवार थांबले असता प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. तिथे इतरही आमदार-खासदार उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. संजय राऊत यांनी गद्दारांच्या छتाखाली बैठक कशासाठी असा आक्षेप घेतला होता. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले विधानभवनात विविध पक्षांची कार्यालये वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. पवार साहेब ज्या केबिनमध्ये गेले होते ती विधिमंडळाची केबिन होती वैयक्तिक कोणाची नव्हती. राजकारणात अशा भेटीगाठ होतच असतात. पूर्वी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे साहेब एकाच विमानाने नागपूरला गेले होते. तेव्हा आम्ही कधीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे मविआ नेत्यांनी केवळ बातमी तयार व्हावी यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत. शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या सर्व चर्चांना शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत. चर्चांमध्ये तथ्य नाही: एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.0
0
Report
धाराशिव में बोगस बीज से किसान बेहाल, दुबारा बुवाई की मांग तेज
Dharashiv, Maharashtra:बोगस बियाण्याचा धाराशिवच्या शेतकऱ्यांना फटका; अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलंच नाही. दुबार पेरणीचं संकट; कळंब तालुक्यात 20 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी. कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी, मात्र कारवाई नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप धाराशिव जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलंच नसल्याने दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. कळंब तालुक्यातील 20 हून अधिक शेतकऱ्यांनी बियाणे बोगस असल्याचा आरोप करत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात बोगस बियाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील 20 हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन उगवलंच नसल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. कळंब शहरातील शेतकरी तानाजी कापसे यांनी 15 एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पंधरा दिवस उलटूनही सोयाबीन उगवलं नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करूनही अधिकारी केवळ पाहणी करत असून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
अरबाज शेख ने निजी हॉस्पिटल की अनियमितताएं फिर से सोशल मीडिया पर साझा कर दीं
Solapur, Maharashtra:- सोलापुरातील नोबेल या खाजगी हॉस्पिटल संदर्भात सोशल माध्यमावर तक्रार केल्यानंतर अरबाज शेख याने पुन्हा एकदा सोशल माध्यमावर व्यक्त केली प्रतिक्रिया - खाजगी हॉस्पिटल मधील अनियमित्य संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता मात्र त्यानंतर असंख्य फोन मेसेज येत असल्यामुळे व्हिडिओ डिलीट केल्याची अरबाज शेखने दिली माहिती - माझे वडील आणि कुटुंलब याकडे लक्ष देणे मला जास्त गरजेचे वाटते त्यामुळे हा माझा विषय इथेंच संपल्याची सोशल माध्यमातून - यासोबतच कठीण काळात सोबत उभे राहणाऱ्या सर्वांचे मानले आभार0
0
Report
डॉक्टरों पर हमला: सरकार से कठोर कार्रवाई की मांग, अस्पताल में आक्रोश
Kalyan, Maharashtra:रुग्णालयात उपलब्ध सोयीसुविधानुसारच डॉक्टर उपचार करू शकतात अशा प्रकारचा हल्ला करण्यास मार्गांकडून हे अजिबात मान्य नाही हे चुकीचं आहे डॉक्टर हा माणूस आहे त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत वैद्यकीय शास्त्राला देखील मर्यादा आहेत आजपर्यंत आपत्कालीन परिस्थिती डॉक्टर नेहमी कार्यरत असतात डॉक्टरांवर कल्याण बाबत कठोर कायदा करा सरकार त्याकडे दुर्लक्ष करते , या हल्ल्यानंतर देखील सरकारला जाग आली नाही बाईट... डॉ मंगेश पाटे इंडियन मेडिकल असोशियन डोंबिवली माजी अध्यक्ष लोकप्रतिनिधीकडून असं काही होणं हे अतिशय दुःखद आहे महिला डॉक्टरला नर्सेस ला मारहाण करणे एका पुरुष डॉक्टरला देखील मारहाण करणे हे निषेधार्ह आहे ही घटना पाहून अत्यंत वाईट वाटलं कुठलाही रुग्णाचा वाईट व्हावं असं कधीच डॉक्टरच्या मनात नसते इतक्या भेटीचा वातावरणात कोणत्याही डॉक्टरला काम करणे शक्य नाही बाईट..डॉ अर्चना पाटे शास्त्रीनगर हॉस्पिटल0
0
Report
नाशिक की पंचवटी में माँ ने नाबालिग बच्चों की पिटाई, मामला दर्ज
Nashik, Maharashtra:अँकर नाशिकच्या पंचवटीत जन्म देत्या आईनेच मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा देखील आरोप करण्यात आला असून मुलांनी आपल्या आजीकडे व्यथा मांडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...दरम्यान मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले .. Vio: - नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या अश्वमेध नगर येथे पती पासून विभक्त राहत असलेल्या पूजा चौधरी नामक महिलेने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलांना मोबाईल गेमच्या रागातून चटके देत प्लास्टिक पाइप आणि चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली आहे या घटनेत या महिलेच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. या मुलांनी आपल्याला मारहाण झाल्याचे आणि चटके दिल्याची व्यथा आपल्या आजीकडे केल्यानंतर आजीने थेट पोलिसात धाव घेतली आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला महिलेसह तिच्या मित्राच्या विरोधात देखील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पंचवटी पोलिसांकडूनआईला अटक करण्यात आली असून मित्राविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालछळाच्या या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.. बाईट - नितीन आंधळे , पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे0
0
Report
Advertisement
