icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

एकनाथ शिंदे ने मेट्रो, पानी और इन्फ्रास्ट्रक्चर से ठाणे-डोंबिवली का मामला साफ किया

Kalyan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महापालिका मोठे निर्णय घेऊ शकत नाही हाऊसिंग मिनिस्टर आहे आपले समस्या सांगा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.. मेट्रो 5 ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर याच डिजाइन चेज केले थोडा वेळ लागेल भिवंडी रांजणोली ते डायरेक्ट महापे मेट्रो मुळे कल्याण डोंबिवली वाहतूक कोंडी संपवून जाईल आमने जवळून रस्ता जातो तो समृद्धी मार्गाला जोडून कल्याणला कामेट्टीविटी देणार.. आपल्याला पाणी समस्या आहे या करिता काळू धरण बांधतोय या साठी MMRDA ने 450 कोटी भरले आहे ते काम युद्धः पातळीवर सुरू आहे पाणी रस्ते वाढवले पाहिजे MCHI यांनी रस्ता बनवायला घ्या 2 FSI आम्ही देतो तुमचा आणि लोकांचा फायदा होईल बाकी दुसरा काही अजेंडा आमचा नाहीये आणि म्हणून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळामध्ये मी अनेक प्रकल्प केले आताही आमच्या माहिती सरकारचं काम सुरू आहे ही अडीच वर्षांच्या काळामध्ये आम्ही खूप निर्णय घेतले इन्फ्रावर आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देशांमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वन इन्फ्रा प्रोजेक्ट एक नंबर आहे लाडकी बहीण साठी आम्ही केलं लोक MHANALE कसा होणार महाराष्ट्र मोठा आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही नाही करणार कोणासाठी करायचा .. विरोध केला ते खड्ड्यात गले पंतप्रधान यांच्या 33% महिला आरक्षण आणलं मात्र विरोधकांनी विरोध केला लाडल्या बहिणी यांना पाडतील ठाण्याला जो निकष लावलाय जो निर्णय लावला आहे तो कल्याण डोंबिवलीला देखील लागला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्य सोबत बैठक घेणार
0
0
Report
Advertisement

सांगली में भारी ओलों की बारिश, आंधी-बारिश से शहर में अफरा-तफरी

Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगलीमध्ये गारांचा वर्षाव, वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट.. अँकर - सांगलीमध्ये प्रचंड अशी गारपीट झाली आहे. गारांचा वर्षाव जणू सांगली वर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटा हा गारांचा पाऊस पडला आहे. गारांचा वर्षाव होऊन रस्त्यांवर अक्षरशः गारांचा खच पडला होता. गारांच्या वर्षावामुळे रस्त्यांवर अक्षरशा गारांची चादर पसरल्याचं चित्र निर्माण झाले होते. सकाळपासून सांगली शहराचा परिसरामध्ये प्रचंड उखाडा निर्माण झाला होता आणि सायंकाळ नंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली होती. सांगली शहरांमध्ये मात्र प्रचंड अशी गारपीट झाल्याचे पाहायला मिळालेला आहे, सुमारे अर्धा तास या ठिकाणी गारपीट सुरू होती.
0
0
Report

जालना हत्या: आरोपी की गिरफ्तारी तक शव नहीं उठाने की धमकी, CID से जांच की मांग

Jalna, Maharashtra:जालना जिले के Daregaon शिवार वनविभाग क्षेत्र में एक मृतदेह मिला है। पुलिस ने मृत देह की पहचान कैलास दत्तू पवार के रूप में की है, जो जालना शहर के इंदेवाडी क्षेत्र से बताए जाते हैं। 17 अप्रैल से घर से बाहर गए थे और वापस नहीं लौटे। उनकी बेटी ने पहले भी उन्हें जीने की धमकी मिलने की बात कही थी। मौके पर एक गाडी मिली है और नंबर प्लेट से शव की पहचान पुष्टि हुई। शव को शवविच्छेदन के लिए अस्पताल भेजा गया है। घटना में कुछ संदिग्धों को हिरासत में लिया गया है, लेकिन मुख्य आरोपी की गिरफ्तारी तक शव नहीं उठाने का नातेवाईकों का ठोस موقف बना हुआ है। तालुका पुलिस थाने में माहौल तनावपूर्ण है। नातेवाईकों ने CID के जरिए गहन चौकसी की मांग की है और चार-पाँच लोगों के शामिल होने की आशंका जताई है। यदि न्याय नहीं मिला तो रस्ते पर उतरकर आंदोलन की चेतावनी दी गई है। आगे की जांच जारी है।
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के रालेगाव-केळापूर-कळंब में 34 युवतियों की खरीद-फरोख्त और धर्मांतरण का आरोप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव, केळापूर व कळंब तालुक्यातील 34 मुलींची राज्य व परराज्यात विक्री करून त्यांचे धर्मांतरण केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी केला आहे. हा प्रकार मानव तस्करी सोबतच बालविवाह आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण असल्याचाही गंभीर आरोप भाजपा ने केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात हिंदू मुलींचा छळ सुरु असून, दुर्गम आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींची विक्री केल्या जात आहे, लव्ह जिहाद च्या माध्यमातून त्यांचे धर्मांतरण होत आहे. असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या हिंदूविरोधी षडयंत्राचे केंद्रबिंदू राळेगाव असून येथील मजहर कुरेशी नामक व्यक्ती जो अनेक अवैध धंद्यांमध्ये लिप्त आहे, त्याने 200 ते 250 हिंदू मुलींचा छळ केला आहे. पुराव्या दाखल याबतची एक ऑडिओ क्लिप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी पोलिसांना दिली आहे.. या प्रकरणात मझहर कुरेशी हा मुलींची विक्री करण्याच्या धंद्यात सहभागी असून गो तस्करी, क्रिकेट वरील सट्टा, जुगार क्लब याशिवाय लव्ह जिहादच्या कृत्यांमध्ये देखील तो सहभागी आहे. असे भाजप ने सांगितले. तर सदर प्रकरणात मुलींचे लग्न लावून देऊन वरपक्षाची फसवणूक करण्याचा हा धंदा असल्याचे पोलिसांनी सांगितले. राळेगाव मध्ये एकच मुलगी मिसिंग असून बालविवाहाच्या एका गुन्ह्यात 5 आरोपी निष्पन्न झाल्याचेही अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी सांगितलं. यवतमाळ मध्ये देखील मुलींच्या छळ व धर्मांतरणचे आरोप सत्तेतील भाजपनेच केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
0
0
Report
Advertisement

सातार में शिंदे की पहली सभा से पहले बैनर विवाद बढ़ा, फोटो नहीं दिखे

Satara, Maharashtra:सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यात पहिली जाहीर सभा होत असून या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. सभास्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पत्नीला अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनीच बॅनर्सवरून त्यांचे फोटो वगळल्याची चर्चा रंगली आहे. आता उद्याच्या सभेला आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का? ते व्यासपीठावर दिसणार का? की पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई होणार? याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. बॅट रणजीत भोसले यांनी सांगितले आहे.
0
0
Report

चंद्रपुर में भीषण गर्मी: सभी स्कूल-कॉलेज सुबह 11 बजे तक ही संचालित

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकालच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
0
0
Report

गडचिरोली में 44°C में महावितरण के ट्रांसफॉर्मर के लिए कुलर का सहारा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत चढत्या तापमानाचा असाही मुकाबला, ४४ अंश तापमानात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरलाही आता 'कुलर'चा आधार लविदर्भात उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून गडचिरोली जिल्ह्यात तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर महावितरणच्या तांत्रिक यंत्रणेलाही बसू लागला आहे. उन्हामुळे जिल्हयातील आल्लापल्ली येथील १३२ केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर (डीपी) लवकर गरम होत असल्याने, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी चक्क ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी मोठ्या 'कुलर'चा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. वाढत्या लोडमुळे ट्रान्सफॉर्मरमधील तेल तापून ते गरम होते. त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांच्या वर गेल्याने या यंत्रणेवर दुहेरी ताण पडत आहे. आल्लापल्ली येथील महावितरण आणि महापारेषणच्या परिसरात असलेल्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही बाजूंना मोठे लोखंडी कुलर लावण्यात आले आहेत. याद्वारे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उन्हाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्यास नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. हे टाळण्यासाठी आणि यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणकडून ही खबरदारी घेतली जात आहे. भर उन्हात माणसांप्रमाणेच आता यंत्रांनाही कुलरची गरज भासू लागल्याचे हे चित्र सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के राळेगाव खेळापुर में अल्पवयीन लड़कियों की तस्करी-धर्मांतरण रैकेट पर आरोप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव खेळापुर मतदार संघातील हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्या विक्रीचे तसेच त्यांचे धर्मांतरण करण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असून या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला कुठलीही चौकशी न करता सोडून दिल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी केला आहे. मझहर कुरेशी हा संशयित मुलींची विक्री करण्याच्या धंद्यात सहभागी असून गो तस्करी, क्रिकेट वरील सट्टा, जुगार क्लब याशिवाय लव्ह जिहादच्या कृत्यांमध्ये देखील तो सहभागी आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या बाबत सूचना पोलिसांना दिली, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही पाठीशी घालत सोडून दिले, त्यामुळे संबंधित पोलिसांना या तपासापासून दूर ठेवण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली आहे. दुर्गम भागातील आदिवासी व अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलींच्या विक्री रॅकेट प्रकरणातील एक धक्कादायक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी पुढे आणली असून, याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे.
0
0
Report

आ. सुधीर मुनगंटीवार ने बल्लारशाह व चंद्रपूर स्टेशन निरीक्षण कर सुरक्षा सुविधाओं के निर्देश दिए

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भेट देत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला. रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानकावरील सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रवाशी सुविधांची सद्यस्थिती तसेच नियोजित प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा बारकाईने ऊहापोह करण्यात आला. पाहणीदरम्यान काही कामांची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याचे स्पष्ट झाल्याने आ. मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करून कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालयांची सुविधा, तिकीट व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. या बैठकीत व्यापारी मंडळ, स्टेशन स्टॉल असोसेशन, चाईल्ड लाईन हेल्प सेंटर तसेच स्थानिक नागरिकांनी विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. बल्लारशाह–कुर्ला रेल्वेगाडी तसेच काजीपेठ–पुणे मार्गावरील गाड्या दैनिक करण्याबाबतच्या मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभाग यांच्यात समन्वय राखून प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची गुणवत्ता आणि गती यावर कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
0
0
Report

गडचिरोली में तेज गर्मी: दोपहर में ट्रैफिक लाइटें बंद, 42°C से नागरिकों को राहत

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. या उन्हात प्रवाशांना शहरातील प्रमुख चौकांमध्ये स Sig्नल लागल्यामुळे बराच वेळ थांबावे लागत होते. उन्हाच्या तीव्र झळा आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी दुपारी सिग्नल बंद ठेवण्याची निर्णय घेतला आहे. सायंकाळी ४ नंतर जेव्हा उन्हाची तीव्रता कमी होते आणि वाहनांची वर्दळ वाढते, तेव्हा सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या या संवेदनशील निर्णयामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top