445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में धारदार हथियार से युवक की हत्या, चार थाने की पुलिस तलाश में
Jalna, Maharashtra:जालना :धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील घटनेने परिसरात खळबळ. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना आज सकाळच्या sुमारास शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत शेख रफिक याला गंभीर जखमी केले होते. त्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या हत्येच्या घटनेने जालना शहर हादरले असून आरोपीच्या शोधार्थ चार पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.0
0
Report
इस साल स्कूल सामग्री की कीमतें 20-25% बढ़ीं, अभिभावकों पर बढ़ा भारी बोझ
Yeola, Maharashtra:नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीचं विद्यार्थ्यांच्या आवश्यक असलेल्या शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, पेन , पेन्सिल, रंगसाहित्य तसेच इतर स्टेशनरी वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. मात्र यंदा बाजारात वह्या आणि पुस्तकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.0
0
Report
नाशिक के त्रंबकेश्वर में हाथभट्टों पर दबिश, लाखों का माल नष्ट
Nashik, Maharashtra:नाशिक - - त्रंबकेश्वर तालुक्यातील गावठी दारूच्या हातभट्ट्या नष्ट - अवैध दारू निर्माण करणाऱ्या हातभट्ट्यांवर धडक कारवाई - नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - कारवाईत पाच लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला नष्ट - महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल0
0
Report
Advertisement
शिरूर में बिबटिए ने गोठे में हमला कर किसान की मौत कर दी
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील शेतकरी बाळासाहेब सदाशिव तांबे यांच्या गोठ्यातील तीन कालवडींवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे राहिले आहे.0
0
Report
रत्नागिरी जिले में पिछले साल 6000 से अधिक अदखलपात्र अपराध दर्ज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ६ हजारांहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद.. अँकर रस्त्यावरून जाताना किरकोळ धक्का लागला, दुचाकी घासली किंवा शेजाऱ्याशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली,तरी थेट पोलिस ठाणे गाठण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे.परिणामी,रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ६ हजारांहून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.बदलती जीवनशैली आणि कमी होत असलेली सहनशीलता यामुळे समाजात किरकोळ कारणांवरून वाद होण्याचं प्रमाण कमालीलं वाढलं आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी असल्याने दखलपात्र गुन्हे कमी नोंदविलेले दिसतात..0
0
Report
प्रकाश सोळंके का आरोप: जिले के कुछ नेताओं ने पिछले चुनाव में मेरे खिलाफ षड़यंत्र रचा
Beed, Maharashtra:बीड - आपल्याच जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात मागच्या निवडणुकीत षडयंत्र रचलं होतं- आमदार प्रकाश सोळंके ANC- मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. धनगर आणि मराठा समाजातील लोकांनी पुढे केलं गेलं. आणि काहींना निवडणूकीत उभं केलं गेलं असं वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे आ.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला. ते माजलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.0
0
Report
Advertisement
ईवीएम और धनबल का बड़ा खेल? शशिकांत चव्हाण का आरोप
Pandharpur, Maharashtra:सातारा - सांगली और सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी सदसदविवेक बुध्दीने मतदान करावे, परंतु सध्या ईव्हीएम मशीन और पैशाचा मोठा चमत्कार होण्याची शक्यता आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केला आहे. शशिकांत चव्हाण आज आमदार रोहित पवार यांच्या अन्न त्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आले होते. सरकारने आंदोलनावर लवकर तोडगा काढावा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटेल असा इशारा ही चव्हाण यांनी दिला.0
0
Report
ठाकरे गट के सांसद भाऊसाहेब वाकचौरे आज मुंबई में बैठक के संकेत
Shirdi, Maharashtra:ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल... भाऊसाहेब वाकचौरे यांचा काल सकाळपासून बंद... आज मुंबईत उद्धव ठाकरे घेणार पक्षाच्या खासदारांची बैठक... सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश... दुपारी साडेबारा वाजता बैठकीचे आयोजन... ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे ठाकरे गटाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष... शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मात्र सकाळपासून नॉट रिचेबल... पक्ष प्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीसाठी वाकचौरे उपस्थित राहणार की नाही..? तीन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत खा. वाकचौरे म्हणाले होते मौनम सर्वार्थ साधनम... याकडे लक्ष...0
0
Report
कांदा खरीद दर 1650 क्विंटल, फिर भी नाशिक के किसान निराश
Yeola, Maharashtra:केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा दर वाढवून 1,650 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयानुसारही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाऐवजी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.सरकारी खरेदी प्रक्रियेत मर्यादित प्रमाणात खरेदी केली जाते, नोंदणी आणि जाचक अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे ही खरेदी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा फायदा करून देत नसून ती फसवी योजना असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक कांदा उत्पादकांनी दिली.0
0
Report
Advertisement
धारावी पर कब्ज़े को लेकर महाराष्ट्र में सियासी घमासान, मराठी समुदाय घिरा
Mumbai, Maharashtra:धारावी के बारे में कहा गया कि बाबुराव माने माझ्या बाजूला खड़े हैं, माजी आमदार हैं, अस्वस्थ हैं. धारावी वाचवण्याचा हमारा प्रयास है. यह 30 से 35 वर्ष पुरानी व्यायाम शाळा है. कोई नोटिस नहीं है, उसे रातोरात गिरा दिया गया. अब उसकी शाळा तोड़कर मैदान पर कब्ज़ा करने की कोशिश है. मांग रहती है कि महाडाने लिजवार दी गयी जगह पर कब्ज़ा लिया जाए. मुख्यमंत्री क्या है, मराठी लोगों के दिल में तेज धार चुभ रहा है. धारावी ताब्यात लेने के लिए पाकिस्तान से गुंडे लाए गए क्या? मुझे जानकारी है, उध्दव ठाकरे को बताऊँगा. मोदी फ्रांस गए हैं वहां आदानी पहुंचेंगे टेंडर लेने के लिए. कल अगर रक्त का एक बूँद भी होगा तो प्रश्न पूछिए. कल दो बजे हम विमान-पोर्ट जाएँगे, वहां मेळावा है, वहां स्मग्लिंग शुरू है. मराठी आदमी का संघर्ष शुरू होगा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ में 106 मरे थे, 1006 मरेंगे. भाजपा में अगर मराठी माता-पिता होंगे तो उन्हें बुलायें. ऑपरेशन टायगर: हम यह ऑपरेशन लांडगा करेंगे. सभी लांडगे वहीं गए हैं. उसकी लायक़ी है क्या? पळकुटे और ठेकेदारों के दलाल हैं. शिवसेना चे सालगिरह पहली बैठक है 19 जून को. अमित शाह सत्ता में आने पर उनके चड्डी के नीचे आएंगे. वे पुलिस और पैसे की ताकत से हमसे लड़ना चाहते हैं. हिम्मत है गौतम अडाणी के सामने खड़े रहने की, हमारी हिम्मत है. यह सांसदों की बैठक है. पहली बार क्या होता है? आज कुछ सांसदों के घर कार्यक्रम है वे ऑनलाइन उपस्थित रहेंगे. ऑन पांढरी पट्टी: मराठी आदमी का वर्चस्व रहेगा, मराठी रहने को हम लड़ते रहेंगे. ऑन राज ठाकरे वाढदिवस: राज ठाकरे मेरे पुराने मित्र हैं. कुछ समय राजनीती में अलग होता था, पर फिर एक साथ आए. राज ठाकरे और उद्धव ठाकरे ने मिलकर देश का नेतृत्व करना है.0
0
Report
पंढरपुर में रोहित पवार के आंदोलन पर चर्चा से समाधान की मांग
Kolhapur, Maharashtra:पंढरपूर येथे सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे आंदोलन चर्चेने संपावे अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे सरकारने हे आंदोलन आज चर्चा करून संपवावे अन्यथा हे आंदोलन राज्यभर पसरेल असा इशारा शरचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शशिकांत शिंदे पंढरपुरात आंदोलन स्थळी आल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
समृद्धि महामार्ग पर प्रतिबंधित अफ्रीकी मांगूर मछली तस्करी का मामला सामने
Washim, Maharashtra:वाशीम: अफ्रिकन मांगूर माशांची तस्करी समृद्धी महामार्गावर उघडकीस आली. वाशिम जिल्ह्यातील पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर माशांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी झाल्याने हा प्रकार समोर आला. संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारा ट्रक महामार्गावरील चॅनल क्रमांक 190 जवळ अपघातग्रस्त झाला. ट्रकमधील तीन टन माशांचा खच रस्त्यावर पडला होता. तपासणीदरम्यान हे मासे प्रतिबंधित आफ्रिकन मांगूर जातीचे असल्याचे आढळून आले. घटनेनंतर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने मृत माशांची विल्हेवाट लावली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाचा वापर प्रतिबंधित माशांच्या तस्करीसाठी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में एक ही दिन दो हत्या: कानून-व्यवस्था पर बड़ा सवाल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात एका दिवसात घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील आलेगाव येथे आणखी एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील यश गिऱ्हे (वय १७) या युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अकोला शहरात मध्यरात्री झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर अवघ्या काही तासांत आलेगाव येथे घडलेल्या दुसऱ्या हत्येमुळे जिल्हा हादरला आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.0
0
Report
गडचिरोली के आष्टि में डॉक्टर पर विवाह का झांसा देकर यौन शोषण का आरोप
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, डॉ. विजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल अँकर: गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी डॉ. विजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आरोपी डॉक्टरने संबंधित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या आधारवर त्याने तिच्याशी वारंवार संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.0
0
Report
वाशीम में 836 नुकसानग्रस्त किसानों को 50 लाख राहत निधि मंजूर
Washim, Maharashtra: जिल्ह्यातील ८३६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.१ ते ४ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७ गावांमधील २९१.६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनामे व अहवालाच्या आधारे राज्य शासनाने मदतीस मंजुरी दिली आहे.खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक अडचणीतून सावरण्यास मदत होणार आहे.0
0
Report
Advertisement
