icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पानी नहीं बरसा, मराठवाड़ा के किसानों की सोयाबीन फसल बर्बाद, पुनः बुवाई संकट

Parbhani, Maharashtra:परभणी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी हातबाळ झाला आहे सेलू तालुक्यातील कुपटा शिवारातील शेतकरी श्रीराम कुलकर्णी यांनी आपल्या १८ एकर शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र पेरणी करूनही पाऊस पडत नसल्याने पीक करपो लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या अठरा एकर शेतातील सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे..रोटाव्हेटर फिरून आपल्या 18 एकर शेतीमधील पीक नष्ट केले आहे मशागतीसह पेरणीसाठी बियाणासाठी हजारो रुपये खर्च करूनही पिक करपो लागल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत परिसरामध्ये पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले असून येत्या दो-तीन दिवसांमध्ये पाऊस नाही पडला तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
0
0
Report
Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस को राष्ट्रीय हथमाग दिन के समारोह के लिए आमंत्रण मिला

Yeola, Maharashtra:व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप विणकर प्रकोष्टचे प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मयूर मेघराज यांच्या माध्यमातून निमंत्रण पत्र सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारंपरिक पैठणी शाल परिधान करून सत्कार करण्यात आला. विणकर समाजासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मयूर मेघराज यांनी दिली
0
0
Report

श्रीरामपूर में बढ़ती अपराधों के विरोध में बड़ा मोर्चा, हत्या के आरोपी गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यवसायिक अकाश दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.. हत्येतील तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.. मात्र मुख्य सूत्रधारांना देखील अटक करून मकोको कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.. आज याच मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शहरातील व्यावसायिक मोर्चात सहभागी होणार आहेत.. शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे..या मोर्चाबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

रायगड़ जिला परिषद 75% अनुदान पर बीज उपलब्ध कराएगी

Chendhare, Maharashtra:अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. रायगड जिल्हा परिषदेचा मदतीचा हात. ७५ टक्के अनुदानावर मिळणार बियाणे. योजनेच्या लाभासाठी ५० लाखांची तरतूद. ज्यांच्या शेतात पाणी साचून रोपवाटिकांचे नुकसान झाले त्यांना ७५ टक्के अनुदानावर भात बियाणे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी ५० लाखांची विशेष तरतूद करण्यात आल्याचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितलं. यातून साधारण १२ ते १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यंदा जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर भात रोप वाटिका करण्यात आल्या होत्या, त्यातील दोन हजार हेक्टर इतके क्षेत्र पाण्याखाली गेले होते.
0
0
Report

यवतमाल में भारी सूखा: वर्षा नहीं हुई, किसानों की फसलों पर संकट

Yavatmal, Maharashtra:गेल्या दहा ते बारा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला मात्र जुलै च्या पहिल्या आठवड्यात पावसाने खंड दिला. वार्षिक सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला असल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. दिवसा ऊन ताप लागल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेले पीक पाण्यामुळे आणि उष्णतेमुळे कोमेजू लागले आहे. आणखी पुढील चार ते पाच दिवस पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन कपाशी तूर ही पिके करपल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
0
0
Report

पंढरपुर के सरकारी रेत ठेके पर रंगदारी मांगे जाने के बाद कर्मी पर हमला, हालत गंभीर

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील शासकीय वाळू ठेक्यावरिल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अजून सोंड येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने शासकीय वाळू ठेका सुरू आहे. हा ठेका चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी तुषार उर्फ बालाजी नागटिळक आणि त्यांच्या साथीदारांनी याने मागितली होती. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात भरून त्याने व त्याच्या साथीदाराने बबन सोपान माने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये बबन माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून नागटिळक आणि त्याच्या साथीदाराकडून वाहनांचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

मालेगाव-नाशिक में बारिश से खरीफ फसल खतरे में, किसानों की चिंता बढ़ी

Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग ( नाशिक ) - मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा बळीराजाची चिंता वाढली.. - पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर.. - पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता... मालेगाव तालुक्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी पूर्ण केली. मात्र आता अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नव्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, लवकरच दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या मान्सूनचा कमकुवत टप्पा सुरू असल्याने अनेक भागांत पावसाची उघडीप दिसून येत आहे.
0
0
Report

तीन महीनों से आतंक मचाने वाला पट्टेदार बाघ आखिर वन विभाग ने जेरबंद किया

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, सावरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले. या वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि शेतमजूर भयभीत झाले होते. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात तसेच सालेबर्डी–सावरी मार्गावर अनेक वेळा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वनविभागाने रात्री रेस्कु करून वाघाला जेरबंद केले...
0
0
Report

नागपुर-जबलपुर NH 44 पर पवनी के पास अज्ञात वाहन ने बाघ को मार डाला

Nagpur, Maharashtra:नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्गावर पवनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ४४ वर पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत काल पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने नर बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत बिबट्याचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून वन विभाग आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र: नकली बीज घोटाला, किसानो को धोखा देने वाले बूस्टर प्लांट जेनेटिक्स के खिलाफ एफआईआर

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाभुळगाव पोलीस स्टेशन मध्ये बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स' कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार येथील 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा. लिमिटेड' या कंपनीला दणका देत बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांनी रीतसर कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीने बियाण्यांच्या बॅगवर "BEST QUALITY GUARANTEED 100% SATISFACTION" असा मोठा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात हे बियाणे 'अप्रमाणित' असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी संबंधित कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून कृषी अधिकारी प्रत्येक कृषी केंद्राकडून पैसे उकळतात असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे.
0
0
Report

राम मंदिर निधी पर सवाल: खेड में शिवसेना के नेताओं का तीखा विरोध

Shirur, Maharashtra:अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणग्यांवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. श्रीराम मंदिर ट्रस्टने हजारो कोटींच्या निधीचा आणि भक्तांनी दिलेल्या सोन्या-चांदीच्या दानाचा कोणताही हिशोब ठेवलेला नाही, असा गंभीर आरोप करत खेड तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सामान्य जनतेच्या पैशांवर आणि श्रद्धेवर हा एक प्रकारे दरोडाच टाकण्यात आलाय, असा घणाघात करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्थानिक हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून या सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. 'आमच्या श्रद्धेचा आणि पैशांचा हिशोब द्या', अशी मागणी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top