445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
NEET पेपरफुटी: लातूर के प्राध्यापक कुलकर्णी पर CBI जांच शुरू
Latur, Maharashtra:लातूर PKG NEET पेपरफुटी प्रकरणात CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर..... लातूरच्या निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप... CBI कारवाईनंतर कुलकर्णी यांच्या घराला कुलूप... कुटुंब अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा... ज्या व्यक्तीवर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती... त्याच व्यक्तीवर पेपरफुटीचे आरोप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे... सीबीआयच्या कारवाईनंतर निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या लातूरमधील घराला सध्या कुलूप असून, कुटुंबातील कोणताही सदस्य येथे दिसून येत नाही... कुटुंब अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे... दरम्यान, या प्रकरणाच्या विरोधात आता विद्यार्थ्यांचा संतापही रस्त्यावर उतरला आहे... काँग्रेसच्या वतीने आज लातूरमधील खासगी क्लासेस परिसरात मोठं निदर्शने आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे... एकीकडे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत... तर दुसरीकडे, ज्यांच्यावर परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी आहे त्यांच्यावरच आता गंभीर आरोप होत आहेत... त्यामुळे केवळ NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेवर नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे... या प्रकरणात सीबीआयचा तपास अजून सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...0
0
Report
उष्णते के बीच अकोला जिला परिषद ने हिरवी नेट से दी राहत
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णत��ची तीव्र लाट कायम असून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला असल्याने नागरिकांना कडक उन्हाचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी अभिनव पुढाकार घेत परिसरात हिरवी नेट उभारली आहे.जिल्हा परिषद परिसरात लावण्यात आलेल्या या हिरव्या नेटमुळे उन्हाची दाहकता कमी होत असल्याचा अनुभव कर्मचारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. दुपारच्या वेळेत कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना या नेटखाली काहीसा गारवा मिळत असल्याचा अनुभव घेतला जातो. तसेच, वाहनधारक देखील आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने या नेटखाली उभी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेत जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली ही व्यवस्था नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने अशा उपाययोजना इतर शासकीय कार्यालयांमध्येही राबविण्याची मागणी होत आहे.0
0
Report
शंभूराज देसाई ने गोरे से व्यक्तिगत रिश्ते और राजनीति अलग रखने की बात कही
Satara, Maharashtra:जयकुमार गोरे यांनी मला निमंत्रण दिल मी देखील यापुढे स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण देईन...आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्रीचे आणि वैयक्तिक नाते वेगळे...त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सळ मिसळ करू नये... शंभूराज देसाई सातारा -साताऱ्यात काल राजकीय सरप्राईज पाहायला मिळालं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार केला होता.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत हे नेहमी हसतच स्वीकारले असतो. जयकुमार गोरे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही. राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असते कारण त्याचा पक्ष वेगळा आणि माझा पक्ष वेगळा आहे.त्यांना देखील महोत्सवाचं निमंत्रण दिलं होतं मात्र मी वैयक्तिक फोन केला नव्हता.यापुढे जय भाऊंना मी स्वतः फोन करेन. मी जसा त्यांच्या शब्दाला मान दिला तसा त्यांनी देखील द्यावा. प्रोटोकॉल प्रमाणे मी कार्यक्रमाला हजर होतो. जयकुमार गोरे यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी मला स्वतः फोन केला. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्रीचे आणि वैयक्तिक नाते वेगळे असते.त्यामुळे व्यक्तिगत संबंधाची राजकीय सळ मिसळ करणे योग्य नसल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. बाईट - मंत्री शंभूराज देसाई मनोज जरांगे पाटील हे सातारा गॅझेटियर बाबत आग्रही असून आणि इतर मागण्यांसाठी येणारा 30 मे पासून ते आंदोलनाला बसणार आहेत यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये... मनोज जरांगे पाटील यांचा सातारा गॅझेटियर बाबत सर्वात जास्त आग्रह होता.. चंद्रकांत दादा आणि मी त्या समितीवर असल्यामुळे याबाबत आम्ही पाठपुरावा केला होता. जस्टिस शिंदे यांची समितीची नेमली होती त्याला मुदतवाढ दिली होती. अजूनही त्या समितीला मुदतवाढ अस्तित्वात आहे... हे काम धीम्या गतीने होत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत असतील तर या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोबत चर्चा करून ते योग्य अशा सूचना त्यांच्या विभागाला देतील असा विश्वास यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे बाईट: मंत्री शंभूराज देसाई0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के एपीएमसी मसाला मार्केट में आग, दुकान 12 जलकर राख; दमकल ने नियंत्रण पाया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केट मध्ये लागली आग. मसाला मार्केट मधील शॉप नंबर 12 ला लागली आग. आगीच कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. दुकानातील ड्रायफूट माल जळून खाक.0
0
Report
नीट पेपर फोड़ मामले में आमदार खोत की मांग: ऑनलाइन परीक्षा लागू होनी चाहिए
Sangli, Maharashtra:नीट पेपर फुटी मध्ये मोठी साखळी असून सरकारने, ( NTA ) राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करावी,अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना नव्हे,तर मूळ सूत्रधारांना कडक शिक्षा झाली पाहिजे,तसेच भविष्यात पेपर फुटी टाळण्यासाठी परीक्षेची पद्धत बदलुन"नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे,अशी मागणी देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते.0
0
Report
प्रतापगड किले के नवीनीकरण में खराब काम, मंत्री ने पुनः कार्य कराने के निर्देश दिए
Satara, Maharashtra:सातारा: इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ल्यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनातील अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत किल्ल्यावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या किल्ल्यावर स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केला होता. याबात प्रत्यक्ष मंत्री शंभूराज देसाई यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत ज्या भागात किल्ला नूतनीकरणाचे काम खराब झालं आहे ते पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयीचा आढावा आणि पर्यटन मंत्री यांच्या सोबत बातचीत केले आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. जागतिक वारसास्थळात समावेश झालेला प्रतापगड किल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाचा वतीने केलं जात आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही ठिकाणी काम चांगले झालेले नाही ते काम पुन्हा करायला ठेकेदाराला करायला आहे आणि काम झाल्यानंतर ते काम पक्क होण्यासाठी कालावधी देणे गरजेचे असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. डॉ.विलास वाहने सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग0
0
Report
Advertisement
तुलस गाँव में श्री देव जैतिर उत्सव आज से शुरू, लाखों भक्त तळकोण पहुँचते हैं
Oras Bk., Maharashtra:लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच दक्षिण कोकणातील नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेले वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील श्री देव जैतिर उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. ११ दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवाची सांगता कवळासाने होते. मुंबई ,पुणे ,कोल्हापूर , बेळगाव तसेच जवळच्या गोवा राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात ह्या जैतिर उत्सवासाठी तळकोकणात येतात.0
0
Report
यवल्यात शनि जयंती और शन अमावस्या के दुर्लभ योग पर मंदिर में भक्तों की भीड़
Yeola, Maharashtra:शनेश्वर जयंतीनिमित्त येवल्यातील पुरातन आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या शनि मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. यंदा शनि जयंती और शनि अमावस्या हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षांनंतर आल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.0
0
Report
केनवड़ में बोरवेल तार चोरी: 35-40 किसान पानी संकट से जूझे, गिरफ्तारी की मांग
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nFile:1605ZT_WSM_MOTORWIRES_STOLEN\nरिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम \n\nअँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड परिसरात अज्ञात चोरट्यांनी 35 ते 40 शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व बोरवेलवरील मोटारींचे वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
त्रिपुरा वन विभाग भ्रष्टाचार के कथित घोटाले में नासिक के सरपंच गिरफ्तार
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील एका सरपंचाला तब्बल साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरा राज्यातील वन विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, अटकेत असलेला सरपंच हा डीएफओ गौरव वाघ यांचा मामा असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून... व्हीओ 1 : त्रिपुरा राज्यातील वन विभागामध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. येवला तालुक्यातील कोटमगावचे विद्यमान सरपंच राजेंद्र चिंतामण काकळीज यांना अग्रतळा रेल्वे स्थानकावर सुमारे साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केली. व्हीओ 2 : राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा राज्यात वन विभागात डीएफओ पदावर कार्यरत असलेल्या गौरव रवींद्र वाघ यांचे मामा असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वन विभागातील विविध प्रकल्पांमधून आर्थिक गैरव्यवहार करून कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय गौरव वाघ यांच्यावर व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काही दिवसांपासून गौरव वाघ यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होत्या. व्हीओ 3 : २५ एप्रिल २०२६ रोजी अग्रतळा रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचत राजेंद्र काकळीज यांना रोकडसह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एका वनरक्षकासह डीएफओंच्या सरकारी वाहन चालकाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. व्हीओ 4 : दरम्यान, डीएफओ गौरव वाघ यांच्या त्रिपुरातील शासकीय निवासस्थानी पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि एक ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्हीओ 5 : गेल्या वीस दिवसांपासून राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा पोलिसांच्या कोठडीत असून त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्य पोलिसांची विशेष शाखा आणि शासकीय रेल्वे पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हीओ 6 : तपास अधिकारीांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आणखी काही कनिष्ठ अधिकारीांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र तपासाच्या हितासाठी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.0
0
Report
चंद्रपुर में मिर्ची का बंपर उत्पादन, किसानों की जिंदगी में आई खुशहाली
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात लाल सुक्या मिरची ने शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा आणलाय. यंदा मिरचीचे बंपर उत्पादन झाल्याने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठी आवक बघायला मिळत आहे. महिनाभर आधी पहिल्या टप्प्यात 29 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता भाव खाली आला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात मिरचीची या हंगामात चंद्रपूर बाजारात आवक झाली आहे. मिरचीने हात दिल्याने शेतकरी सुखावला आहे. चंद्रपूर जिल्हा धान- कापूस -सोयाबीन यासाठी ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. राजुरा उपविभागात व वरोरा- भद्रावती या भागात उत्तम मिरची पीक घेतले जाते. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात मिरचीचे बंपर उत्पादन होत आहे. सुकी लाल मिरची याआधी नागपूर अथवा मध्यप्रदेशच्या बाजारपेठेत विक्रीस न्यावी लागत होती. तिला भाव देखील कमी मिळत होता. याशिवाय वाहतूक व निवास याचा खर्च वजा करता हा तोट्याचा सौदा ठरत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. मिरची व्यापार तेजीत असून दिल्ली -राजस्थान -मध्य प्रदेश -आंध्र प्रदेश -तेलंगणा या राज्यातून मिरची व्यापारी चंद्रपुरात दाखल होत आहेत. बाजार समितीने शनिवार हा दिवस मिरची लिलावासाठी निश्चित केला असून शेतकरी आपला माल या बाजारात आणत आहेत. व्यापारीवर्गाचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.0
0
Report
वाशीम में डीजल संकट: 60% पेट्रोल पंपों पर डीजल नहीं, किसान-व्यवसायी परेशान
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही डिझेल टंचाई कायम असून, जिल्ह्यातील जवळपास 60 टक्के पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी,वाहन चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझल काही प्रमाणात उपलब्ध रांगा लागल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे सुरू असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर व कृषी यंत्रणा ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में दूधगंगा डैम के पानी की कमी, अगस्त तक संकट गहरा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकटाचे सावट गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दूधगंगा धरणातील पाणीसाठ्यात यंदा कमालीची घट झाली आहे. सध्या धरणात केवळ साडेचार टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्यातील साडेतीन टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार आहे. या परिस्थितीमुळे पुढील काही महिने काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. दूधगंगा धरणावर राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. ऊसासह विविध पिकांसाठी देखील या धरणातील पाणी महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय कोल्हापूर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीसाठ्यातील घट ही शेतीसह नागरिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. याचाच दूधगंगा धरणावर जावून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
पिंपरी चिंचवाड़ के फर्नीचर शोरूम में गोलीबारी: लॉरेन्स बिश्नोई गैंग का नाम सामने, उद्यमी को धमकी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ के रावेत क्षेत्र में एक फर्निचर शोरूम पर गोलीबारी की घटना में लॉरेन्स बिश्नोई गैंग का नाम सामने आने से शहर में हलचल मची है। आमतौर पर सेलिब्रिटी टार्गेट करने वाले इस गैंग ने एक उद्यमी को निशाना बनाने का संकेत दिया है, जिससे कई सवाल उठ रहे हैं। घटना शुक्रवार रात करीब 9:30 बजे दुचाकी पर आए दो व्यक्तियों ने गोली चला दी। लॉरेन्स बिश्नोई गैंग के शुभम लोणकर ने इसकी जिम्मेदारी ली और कहा कि यह सिर्फ ट्रेलर है। शोरूम के मालिक को MD ड्रग्स के तस्कर और हवाला कारोबारी बताकर हत्या की धमकी दी। पुलिस ने मामले की गंभीरता से लेते हुए जांच शुरू कर दी है। आगे की जांच जारी है।0
0
Report
35 भोंदूबाबाओं के खिलाफ कार्रवाई, अंधविश्वास विरोधी समिति ने दावा
Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण दोन महिन्यात राज्यभरात ३५ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती अनेक ठिकाणी पोलिसांकडून भोंदू बाबांचे दरबार उद्ध्वस्त ग्रामीणसह शहरी भागातही भोंदूगिरीचे प्रकार उघड महिलांच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर खरात प्रकरणानुसार पीडित महिलांना पुढे येण्याची हिंमत मिळाल्याचा दावा विविध धर्मातील भोंदू बाबांवर कारवाई झाल्याने अंनिसचा मोठा दावा जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल अंनिसकडून राज्यभरातील ३५ प्रकरणांची यादी जाहीर सूची: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला 4) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे 5)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर 6)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे 7) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई 8) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई 9) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई 10) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड 16) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई 17) अनिल सोलोमन सिंग ( पादरी), पुणे 18)शिवराम पराश सावर, पालघर 19)अल्ताफ हसन मदारी, जळगाव 20)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर 21) पिंटू धुमाळ बारामती, पुणे 22) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा 23) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक 24) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर 25) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे 26)नवनाथ गवळी, खेड, पुणे 27) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण 28) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर 29) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड 30) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई 31)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड 32) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे 33) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे 34) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर 35) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे0
0
Report
Advertisement
