445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नंदुरबार में भेसळयुक्त तेल के खिलाफ बड़ी छापेमारी: 1251 किलो जप्त
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. लाईट बाजार परिसरातील एका ऑईल मिलवर अचानक छापा टाकत तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणतेही अधिकृत ब्रँडिंग, पॅकेजिंग, उत्पादकाचे नाव अथवा बॅच क्रमांक नसलेले खुले स्वरूपातील खाद्यतेल आणि स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान तब्बल १२५१ किलो सैल सोयाबीन तेल आणि रंगवलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, या साठ्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हे तेल मानवी आरोग्यासाठी असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण साठा सील करण्यात आला आहे. तसेच तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विक्रेते किंवा दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.0
0
Report
सांगली में रविवार साइकिल रैली, फिट इंडिया संदेश के साथ स्वास्थ्य जागरूकता प्रचार
Sangli, Maharashtra:सांगली पोलीस दलाच्या वतीने सांगली मध्ये संडे सायकल रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल,हा संदेश घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,फिट रहा, हिट रहा, देशासाठी सदैव तत्पर रहा,असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.0
0
Report
12 वर्षीय आदित्य ओलेकार की स्कूल पूल में डूबकर मौत; परिजन प्रशासन पर आरोप
Sangli, Maharashtra:सांगली शहरातील एका नामवंत खाजगी शाळेमध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल मध्ये बुडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आदित्य विकास ओलेकर, वय वर्ष 12 असं या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप आदित्यच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाकडून आरोपाचे खंडन करण्यात आला आहे, या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. आदित्यला पोहता येत नसताना, स्विमिंग पूल मध्ये का नेलं?, पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले. शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. संजयनगर पोलीस ठाण्यात घटनेची पंचनामा झाली असून पुढील तपास पोलीस करणार आहेत. शाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आदित्यचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. शाळा व्यवस्थापक जिनेन्द्र पाटील यांनी आरोपांचे खंडन केला आहे. त्यांनी सांगितले की आदित्यला पोहता येतं का? विचारल्यावर हो म्हणण्यानंतरच त्याला पूल मध्ये सोडण्यात आले.0
0
Report
Advertisement
नंदुरबार के सातपड़ में सड़क नहीं होने से बारात चार किलोमीटर खांदे पर निकली
Dhule, Maharashtra:नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात काढण्यात आली. माळ ते बियामाळ गावांना जोडण्यासाठी रस्ता नातेवाईकांवर नवरदेव खांद्यावर नेण्याची वेळ आली. आदिवासी समाजात नवरदेवाला खांद्यावर बसून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे मात्र रस्ता नसल्याने थेट चार किलोमीटरची नवरदेवाला खांद्यावर घेऊन पायपीट करण्याची वेळ नातेवाईकांवर आली.... सातपुड्यात आजही विकासापासून वंचित दुर्गम गावे.... एकविसाव्या शतकात देश वेगाने प्रगती करत असल्याचे चित्र असले, तरी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. अक्कलकुवा तालुक्यातील माळ ते बियामाळ या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने एका लग्नसोहळ्यात नवरदेवाला तब्बल चार किलोमीटर खांद्यावर बसवून वरात काढावी लागली. या भागात वाहन तर दूरच, घोडाही पोहोचू शकत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली खांद्यावरून नवरदेव नेण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र, ही परंपरा असली तरी त्यामागे रस्त्याच्या अभावाची गंभीर वस्तुस्थिती दडलेली आहे. या घटनेमुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील विकासकामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
मालेगांव में केबल चोरी से किसानों को भारी नुकसान, पुलिस रवैया पर सवाल
Nashik, Maharashtra:मालेगावच्या माळमाथा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकुळ.. आठ दिवसांत दुसरी घटना, वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे शेतकरी संतप्त... 30 ते 40 शेतकऱ्यांच्या धरणावरील मोटारींच्या केबल चोरी - शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी कर्मचारी गुन्हाही दाखल करत नाही आणि कारवाई पण करत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.. नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे मालेगाव तालुका पोलिस पोलिस स्टेशन आता या प्रकरणामुळे पण चर्चेत.. मालेगाव तालुका पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह... ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पेरणी करायला पैसे नाहीत, आता केबल साठी कुठून आणायचे पैसे - शेतकऱ्यांची व्यथा...0
0
Report
यवतमाळ घाटंजी में ATM चोरी: पुलिस ने आरोपी विजय मदावी को रंगे हाथ पकड़ा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. एटीएम फोडले जात असताना नियंत्रण कक्षातून सूचना मिळाली, त्यामुळे पोलिसांनी सर्च सुरू केला असता विजय मडावी हा संशयास्पद रित्या फिरत असताना सापडला. त्यानंतर पोलिसांनी एटीएम मधील सीसीटीव्ही तपासले त्यात विजय मडावी हा एटीएम फोडताना स्पष्ट दिसून आला. नियंत्रण कक्ष व घाटंजी पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. या कामगिरीसाठी ठाणेदार व पथकातील अधिकारी कर्मचारी यांना पोलीस अधीक्षकांनी प्रोत्साहन पर बक्षीस दिले.0
0
Report
Advertisement
सोलापुर के मूळेगाव तांडा में बुलडोजर से अवैध हाथभट्टी ध्वस्त, लाखों का माल नष्ट
Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग - मुळेगाव तांड्यावर अखेर बुलडोझर; हातभट्टीचे अड्डे केले जमीनदोस्त मुळेगाव तांड्यावर अखेर बुलडोझर; हातभट्टीचे अड्डे केले जमीनदोस्त एलसीबीची धडक कारवाई; जेसीबीच्या मदतीने साडेसात लाखांचा मुद्देमाल नष्ट, चौघांवर गुन्हे अँकर - solapurच्या मुळेग तांडा परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले.जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त करण्यात आली.या कारवाईत सुमारे ७ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून,चार सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कारवाई केली. दरम्यान हातभट्टी निर्मितीसाठी वापरली जाणारी चूल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक ड्रम, गूळमिश्रित रसायन तसेच मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण साहित्य जप्त केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.अवैध हातभट्टी निर्मितीसाठी साहित्य बाळगल्याप्रकरणी चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.0
0
Report
कराड में इंजीनियर लक्ष्मण मंडले की मौत: CCTV फुटेज से पूर्वनियोजित षडयंत्र का खुलासा
Satara, Maharashtra:सातारा - कराड शहराला हादरवून सोडणाऱ्या अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर पहाटेच्या सुमारास भरधाव कारने लक्ष्मण मंडले यांना उडवल्याचे दृश्य या फुटेजमध्ये कैद झाले आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र कराड शहर पोलीसांनी अवघ्या 12 तासांत तपासाची चक्रे फिरवत हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत अभियंत्याची पत्नी सुरेखा मंडले आणि मेहुणा संग्राम यांना ताब्यात घेतले असून, कौटुंबिक वादातून हा कट रचल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मृदू व जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे रहिवासी होते. आता समोर आलेल्या CCTV फुटेजमुळे या घातपाताची थरारक घटना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में अगले तीन दिन आंधी-बारिश से मौसम बदलेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा कडाका आणि असह्य उकाडा कायम असतानाच, आगामी तीन दिवस नागरिकांना अंशतः ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, ७ ते ९ जूनदरम्यान शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. पुढील तीन दिवस कमाल तापमान ३९ ते ४० अंशांच्या आसपास राहील. ७ आणि ८ जून रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे。0
0
Report
Advertisement
बैंक बचाने के लिए लड़ रहे राजेंद्र राउत, किसानों के बीच भारी समर्थन का दावा
Pandharpur, Maharashtra:Anchor सोलापूर जिल्हा बँकेत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, बँक वाचवण्यासाठी लढलो. ज्यांना घेतलेली कर्ज भरायची नव्हती त्यांना याचा शॉक बसलेला आहे. अशी टीका विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. विधान परिषदेच्या भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या जिल्हा बँकेतील गैरव्यवहार बाहेर काढण्यावरून मोहिते पाटील यांच्याकडून माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी शेतकऱ्यांची बँक वाचवण्याचा प्रयत्न केला अन्यथा ही बँक उध्वस्त झाली असती. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर अकलूज मधल्या विजयसभेत आपण या सर्व आरोपांचे उत्तर देऊ असा इशारा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील यांना दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाच्या मतदारांसह उबाठा मतदार सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आपला विजय होणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला0
0
Report
अमरावती के दर्यापूर में तलवार से केक काटने वाले गैंग दबोचा; 13 लाख का माल जप्त
Amravati, Maharashtra:वाढदिवस के अवसर पर तलवार से केक काटने वाले टोळे अमरावती जिले के दर्यापूर में गिरफ्तार कर लिए गए हैं। अँकर के अनुसार यह घटना दर्यापूर में हुई है और आरोपियों ने सार्वजनिक स्थान पर तलवार से केप काटकर दहशत फैलाने की कोशिश की। पुलिस ने छह हुड़दंगीों को हिरासत में लिया, उनकी गाड़ियों को जब्त किया गया; हथियारों समेत कुल 13 लाख रुपये का माल भी जब्त किया गया और आगे की कार्रवाई जारी है।0
0
Report
चंद्रपुर में Ride for Bharat साइकिल रैली से पर्यावरण और सुरक्षा पर जागरूकता बढ़ी
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात "Ride for Bharat" सायकल रॅलीद्वारे पर्यावरण, नशामुक्ती, वाहतूक नियम आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर करण्यात आले जनजागृती चंद्रपूर जागतिक पर्यावरण दिन, जागतिक सायकल दिन आणि नशामुक्ती जागरूकता दिनानिमित्त आज शहरात "Ride for Bharat" सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये पर्यावरण, नशामुक्ती, वाहतूक नियमांचे पालन, सायबर सुरक्षा व पोक्सो कायदे याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. वन अकादमी पासून रॅलीचा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. शहरातील गांधी चौक मार्गे जात रॅलीचा पोलिस कल्याण सभागृहात समारोप झाली. या रॅलीचे आयोजन वन विभाग, पोलीस विभाग, लॉयड मेटल्स, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महानगरपालिका, शहरातील विविध सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले, रॅलीत शहरातील नागरिक, पोलीस जवान, सायकल क्लब आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला. समारोपाचा कार्यक्रम पोलिस कल्याण सभागृहात पार पडला. येथे उपस्थितांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.0
0
Report
Advertisement
परभणी के म्हाळसापूर में विद्युत तार से टकराकर किसान की मौत; महावितरण पर मरम्मत न करने का आरोप
Parbhani, Maharashtra:परभणी के म्हाळसापूर में शेतकरी आसाराम आवटे विद्युत ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. शेतकरी घराकडे जात असताना लोखंडी नागराची डंडी लोबकाळलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाल्यामुळे जोराचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरण ने पावसाळ्यापूर्वी विद्युत दुरुस्तीची कामे न केल्याने शेतकऱ्याचा नाहक बळी गेला.0
0
Report
संगमेश्वर जंगल में 18 साल बाद रॉयल बंगाल टाइगर की दृष्टि, कैमरे में कैद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत १८ वर्षांनंतर 'रॉयल बंगाल टायगर'चे दर्शन.. संगमेश्वरच्या जंगलातील कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद!. अँकर संगमेश्वर तालुक्यात तब्बल १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच 'रॉयल बंगाल टायगर'चे दर्शन झाले आहे.. तालुक्यातील एका खाजगी मालकीच्या जंगलात बसवण्यात आलेल्या गुप्त कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद झालाय.. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि 'एआरएफ' (AERF) संस्थेच्या गेल्या १८ वर्षांच्या सातत्यपूर्ण संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना हे मोठे यश आले आहे.. कोयना अभयारण्यातील पट्टेरी वाघ सोडल्यामुळे आणि वनविभागाने लावलेल्या छुपा कॅमेऱ्यांमुळे वाघांचे अस्तित्व आता अधोरेखित होऊ लागले आहे.. सुरक्षेच्या कारणास्तव वाघ आढळलेले अचूक स्थान किंवा गावाचे नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वन्यजीवप्रेमींमध्ये कमालीचा आनंदाचे वातावरण आहे..0
0
Report
यवतमाल में जिलाधिकारी ने धाड़ डालकर अवैध रेत खनन रोककर 100-150 ब्रास रेत जप्त
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील तांबा आणि वाटखेड रेती घाटांवर थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांनी धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी साठवून ठेवलेला 100 ते 150 ब्रास रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली آهي. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले, त्यांनी नायगाव जवळ रेती भरलेला एक ट्रक सुद्धा पकडला. महसूल विभाग तसेच पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देत रेतीचे साठे जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले.0
0
Report
Advertisement
