Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Sept 24, 2024 04:45:23
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Dec 25, 2025 03:05:42
Dhule, Maharashtra:सप्तपुडा जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये भगर अर्थात मोरबंटी या पारंपरिक धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात लागवड केली जाणाऱ्या भगर पिकाची कापणी सध्या वेगाने सुरू असून, अनेक ठिकाणी आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने मळणी करून भगर काढताना दिसत आहेत. सातपुडा परिसर हा राज्यातील भगर उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानला जातो. येथील आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या भगर लागवड करत असून, रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले जाते. त्यामुळे सातपुड्यातील भगरला विशेष दर्जा प्राप्त झाला असून देशभरातून या सेंद्रिय भगरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः उपवासाच्या काळात सातपुड्यातील भगर बाजारात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका भगर उत्पादनाला बसला आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी मेहनतीने काढणी आणि मळणीचे काम पूर्ण करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 25, 2025 03:05:28
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 25, 2025 03:04:17
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:03:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक, नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक किंवा समाजमाध्यमातून शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून तातडीने चौकशी करावी. विद्यार्थ्यांना छडी मारल्यास शारीरिक इजा झाल्यास शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत, विद्याथ्यर्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ पूर्णपणे प्रतिबंधित केला आहे. कान किंवा केस ओढणे, उठा-बशा काढायला लावणे, उन्हात किंवा अंगठे घरून उभे करणे, गुडघ्यावर बसवणे अशा सर्व प्रकारच्या शिक्षांना स्पष्ट मनाई केली आहे. तसेच विद्याथ्यर्थ्यांना शाब्दिक, मानसिक अपमान करणे, नाव ठेवणे, कमी लेखणे, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक स्थिती, अपंगत्व अथवा शैक्षणिक कामगिरीच्या आधारे भेदभाव करणे देखील योग्य नसल्याचे आदेशात म्हटले आहे, उल्लंघन केल्यास शिक्षकांवर कारवाई होणार आहे..
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 25, 2025 02:52:39
Parbhani, Maharashtra:अँकर-परभणी मनपाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदीवर इच्छुकांनी भर दिला. मात्र, दुसऱ्या दिवशीही अर्ज सादरीकरणाचा भोपळा मात्र फुटला नाहीये . त्यामुळे दोन दिवसात केवळ अर्ज खरेदीला उमेदवारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मनपाच्या प्रभाग समिती ब येथील कार्यालयात दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत नामनिर्नेशन पत्र दिले जात आहेत. हे अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवार येथे येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६५३ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली होती तर दुसऱ्या दिवशी ५०९ नामनिर्देशन पत्र विक्री झाले होते. परंतु दुसऱ्या दिवशी ही एकाही उमेदवाराचा अर्ज दोन दिवसात दाखल झाला नाहीये.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:49:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्य सरकारने तुकडेबंदीचा कायदा रद्द केला. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वीचेच तुकडे नोंदवण्याचे आदेश ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिले. तरीही छत्रपति संभाजी नगर जिल्ह्यात नव्या तुकड्यांची सर्रास नोंदणी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. रहिवासी वापर नसलेल्या, शेतजमीन म्हणून नोंद असलेल्या भूखंडांचेही तुकडे पाडले जात आहेत. या प्रकाराची तक्रार पुराव्यासह थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात यापूर्वीही बेकायदा तुकड्यांची नोंदणी झाली. दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:46:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचा कडाका आता अधिक तीव्र होणार असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी निरभ्र आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः २६ आणि २७ डिसेंबर रोजी किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देताना शहरवासीयांना हुडहुडी भरवणारा गारठा अनुभवावा लागेल. बुधवारी  शहराचे कमाल तापमान २८.० अंश सेल्सियस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा १ अंशाने कमी होते. तर किमान तापमान १२.४ अंश इतके राहिले. हवेतील आर्द्रता सायंकाळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरडा गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचे किंवा ढगाळ हवामानाचे कोणतेही संकट नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 25, 2025 02:46:27
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:46:08
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:31:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. छत्रपती संभाजी नगरात अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल ३,१७० उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. मात्र, तिकीट वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नसल्याने, हजारो अर्ज विकले गेले असले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस केवळ दोनच उमेदवारांनी दाखवले आहे. ३० डिसेंबर शेवटची तारीख असून दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने आणि काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित, एमआयएम आणि इतर पक्षांचे इच्छुक प्रतीक्षेत आहेत, आज उद्या जागा वाटप होईल अशी सर्वानाच शक्यता वाटतेय...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 02:17:27
Jalna, Maharashtra:जालना : युतीसाठी भाजपचे गोरंटयाल 40,शिवसेनेचे खोतकर 35 तर राष्ट्रवादीचे चव्हाण 5 जागांवर आडून जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रमुख राजकीय पक्षांमधील युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम इच्छुक उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होत आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील युतीबाबत बैठका सुरू आहेत. भाजपचे कैलास गोरंट्याल 40, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर 35, तर राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण हेसुद्धा 5 जागांवर आडून आहेत. दुसरीकडे 20 दिवसांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपली आहे. युतीबाबत घोषणा नसल्याने मतदार संभ्रमात पडलेले दिसतायत. भाजपचे लोकप्रतिनिधी युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, अशी भूमिका घेत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी भाजपवर निर्णयाची जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.दरम्यान युती न झाल्यास स्वबळावर निवडणुक लढवण्याची तयारी या पक्षांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top