445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सिंधुदुर्ग के चिपी हवाई अड्डे से 15 अगस्त से Navi Mumbai उड़ान शुरू
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून 15 ऑगस्ट पूर्वी सुरु होणार विमान सेवा... सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली घोषणा... चिपी ते नवी मुंबई विमानसेवा होणार सुरु.. 15 ऑगस्ट पूर्वी फ्लाय 90 आणि नंतर इंडिगोची सेवा होणार सुरु.. कोकणवासियांना मिळणार दिलासा0
0
Report
बारिश की कमी से खरीफ फसल संकट, कृषी विभाग ने किसानों को जरूरी उपाय बताए
Washim, Maharashtra:गेल्या १४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून उगवलेल्या पिकांवर विविध रोग व अळींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी सुरू केली आहे. पावसातील खंडामुळे पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पिके कशी वाचवावीत, कोणत्या उपाययोजना कराव्यात तसेच रोग व अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहेत. पावसातील खंडाच्या परिस्थितीत वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास पिकांचे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
मालेगाव पवारवाडी पुलिस ने 7 गावठी कट्टे समेत 8 जिंदा कारतूस के साथ 7 आरोपियों को गिरफ्तार किया
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगाव पवारवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत दोन इसम हे मुंबई आग्रा नॅशनल हायवे लगत ओवाडी नाला पुलाखाली काहितरी संशयीत शत्र बाळगुन आहे. त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुंबई आग्रा नॅशनल हायवे ओवाडी नाला पुलाखाली येथे सापळा रचुन गुन्हेगार नामे- 1) नवाज अशरफ सिराज अहमद वय-36 रा.स.नं. 113/2, फिरोजाबाद, पवारवाडी, मालेगाव. 2) मोहम्मद रेहान निहालुद्दीन वय-32 वर्षे रा. करीम नगर, ग.नं.02, घर नं. 29, मालेगांव यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ०२ गावठी कट्टे व ०३ जिवंत काडतूस मिळून आले. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी क्र. 3 नामे-हिफजु रहेमान मोहम्मद इद्रीस रा-नयापुरा, मालेगाव यांचे कडून सदर गावठी कटटे यांचे कडून विकत घेतलेले तपासात निष्पन झाल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली त्यानंतर सदर गावठी कटटे बाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे त्याने काढून दिले तसेच त्याने मालेगाव शहरातील साथीदार आ.क्र. ४) अन्सारी मोहंमद हुसैन मोहंमद याकुब ऊर्फ समोसा वय 27 वर्ष रा. सर्वे नं. 105/अ/1 प्लॉट नं. 87 गुलशने मासुम मोहनबाबा नगर मालेगांव यास ताब्यात घेवून त्याचे कडील ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले व आ.क्र. ०५) रिजवान मोहंमद उस्मान वय 31 वर्ष रा. नयापुरा ग.न. 5 घ.न.610 मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले व आ.क्र. ०६ समीर अंजूम शकिल अहमद ऊर्फ पानवाला वय 31 वर्ष रा. सर्वे नं.98 प्लॉट नं.40 बाग ए महेमुद संगमेश्वर मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले, व आ.क्र.०७ कासीम खान शकिल खान ऊर्फ कासीम घोडा वय 22 वर्ष रा. गुलशने इब्राहिम ग.न.04 साबेरा हाज्जीन मशीद जवळ मालेगांव याचे कडून ०१ गावठी कटटा ०१ जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले असे पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हयात एकूण ०७ गावठी कटटे व ०८ जिवंत काडतूस असे मालेगाव शहरात विक्री करणारा आरोपी क्र. 3 नामे-हिफजु रहेमान मोहम्मद इद्रीस रा-नयापुरा, मालेगाव हा या प्रकरणाचा मेन मोरखा आहे.0
0
Report
Advertisement
विदर्भ में बारिश नहीं, धान संकट; किसान टैंकर से पानी देकर फसल बचाने
Bhandara, Maharashtra:धानाचे परे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणा प्रयत्न.... धान परे वाचविण्यासाठी टँकरचा आधार.... गुरुदेव सेवा मंडळाचा शेतकऱ्यांना दिलासा.... विदर्भात पावसाने पाठ फिरवली असून भंडारा जिल्हात धान शेतीचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी धान पऱ्हाची लागवड केली असून धानाला अंकुर सुद्धा आले आहे. मात्र जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्यांनी मान खाली केली. धान पिकाची रोवणी केलेल्या शेतात तडे गेले असून भयावह स्थिती बघायला मिळत आहे. जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसून धान शेतीला पावसाची प्रतीक्षेत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील येनोळा,मांगली,वलनी, शिवनाळा, जुनोना या परिसरात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंचभाई यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेत शेतकऱ्यांना धान वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करत आहेत. धानाचे परे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.0
0
Report
अकोला में किसानों की फसल बचाने के लिए तेज बारिश की मांग, महंगे खर्च से संकट
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात यंदा कृषी विभागाने सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तर काही भागात तिबार पेरणीची वेळ आली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून जमिनीतील ओलावाही झपाट्याने कमी होत आहे. बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली असून तातडीने पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी आणि वीजबिल माफ करून शासनाने तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही होत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बोडखा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.0
0
Report
तुमसर नगरपरिषद: अदालत ने स्वीकृत सदस्य वैध, भाजपा के अमरीश सानेकर व शैलेश मेश्राम निर्वाचित
Bhandara, Maharashtra:तुमसर नगरपरिषद यहाँ स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया अखेर पार पडली तुमसर जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली होती परंतु स्वीकृत सदस्यांची निवड नियमबाह्य झाल्याचे आक्षेप घेतल्याने हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेच्या प्रकरणात न्यायालयाने प्रमोद तितीरमारे राष्ट्रीय काँग्रेस यांची निवड वैध असून दोन स्वीकृत सदस्याचे निवड करण्याचे आदेश दिले. अखेर नगरपरिषद तुमसर येथे दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत स्वीकृत सदस्य म्हणून अमरीश सानेकर भाजपा, शैलेश मेश्राम भाजपा यांची निवडण्यात आली. स्वीकृत सदस्यांची निवड शांततेत पार पाडण्यासाठी नगरपरिषद येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.0
0
Report
Advertisement
येवला शहर के लिए 160.25 करोड़ रुपये की येसगाव पानी आपूर्ति योजना को अमृत 2.0 के तहत मंजूरी मिली
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरासाठी १६०.२५ कोटी रुपयांच्या येसगाव पाणीपुरवठा योजनेला अमृत २.० अभियानांतर्गत राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे २०५६ पर्यंत येवला शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असून नागरिकांना दररोज शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे व नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी दिली आहेत。0
0
Report
महाराष्ट्र के किसानों के लिए कर्जमाफी का वादा फिर से बहस में
Rui, Maharashtra:इंदापूर में माजी खासदार राजू शेट्टी और माजी मंत्री सदाभाऊ खोत के बयान। वीस वर्ष पहले देवेंद्र फडणवीस के अर्थसंकल्प पढ़ने पर एक किताब लिखी गई थी। किताब के प्रकाशन पर मैं खुद था... उस समय के विधानसभा अध्यक्ष ने वह किताब प्रकाशित की थी... मैं इसे याद दिलाता हूँ... देवेंद्रजी एक जानकार हैं... महाराष्ट्र की आर्थिक स्थिति के बारे में खडान खडा जानकारी थी। 2024 की विधानसभा चुनाव में महाराष्ट्र के शेतकों को सीधे तौर पर धोखा दिया गया है... आपका सातबारा कोरा करेंगे ऐसा कहा गया था... अगर हमें सत्ता मिली तो... किसानों ने प्रश्न उठाए... उन्हें बहुमत मिला। सातबारा कोरा करने की जिम्मेदारी उनकी होती... सातबारा कोरा का अर्थ खेती के लिए कर्ज लेते समय... सातबारा पर जो भी बोझ है... पी कर्ज का हो, मध्यमवर्ती का हो... दीर्घ मुद्दे का हो... सभी बोझ कम करना। सभी कर्ज की जिम्मेदारी सरकार ने उठानी चाहिए तब ही सातबारा कोरा होगा... वो एक बार बोले नहीं थे सातबारा कोरा कोरा कोरा। आश्वासन दिए पर पालन नहीं होंगे... तो ये कर्जमाफी कैसे... कुछ लोगों के लिए कर्जमाफी दी गई है... फक्त गांगोरा फिट करने के लिए दी गई कर्जमाफी है। माजी मंत्री सदाभाऊ खोत। ऑन कर्जमाफी प्रोसेस मुख्यमंत्री सत्कार। सरकार ने जो निर्णय लिया है उसके यादें नव्यانے तैयार हो रही हैं... जैसे यादियाँ सरकार के पास जमा होंगी किसानों के खातों में सभी के खाते में दो लाख रुपए सीधे जमा होंगे... ऑन सरकार से तारीख पर तारीख... देवा बहाऊनी दिया गया शब्द है.. महाराष्ट्र की जनता को मैंने सभागृह से कहा है कि हम कर्जमाफी कर रहे हैं... ये सरकार किसानों के साथ है...0
0
Report
बारामती में संत तुकाराम महाराज की पालखी पहुंची, जय पवार ने समाज आरती की
Rui, Maharashtra:संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल.. जय पवार यांच्या हस्ते समाज आरती* जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा बारामती शहरात दाखल झाला असून बारामतीतील शारदा प्रांगण येथे युवा नेते जय पवार सपत्नीक पालखीच्या समाज आरती घेण्यात आली. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम... च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. बारामतीतील विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.0
0
Report
Advertisement
संगमेश्वर के ऐतिहासिक वाडे की पुनर्बांधणी पर सरकार ने दिया बड़ा आश्वासन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील वाड्याची पुनर्बांधणी होणार; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाड्याची राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन, शासनाच्या वतीने या वाड्याची लवकरात लवकर भव्य आणि नवीन बांधणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून या वाड्याच्या कामाला गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केला.0
0
Report
कोकण में लोककला के लिए वित्तीय अनुदान दोगुना, नाट्यगृहे और सांस्कृतिक केंद्रों पर जोर
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी आशिष शेलार पत्रकार परिषद प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प उभारला; त्यांचे अभिनंदन. On उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन: जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत घेतलेले आणि यापुढे घेण्यात येणारे निर्णय चांगले घेण्याची सुबुद्धी रामरक्षा पठणातून मिळो On कोकणातील लोककला: कोकणातील दुर्लक्षित लोककलांच्या विकासासाठी अनुदान दुप्पट. नमन आणि जाकडी या लोककलांचा अनुदान योजनेत नव्याने समावेश. प्रत्येक लोककला प्रयोगासाठी ५० हजारांचे अनुदान दिले जाणार. On नाट्यगृहे: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यगृहांची गरज तपासली जाणार. मुंबईत बैठक घेऊन आवश्यकतेनुसार नवीन सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहे उभारली जाणार. On जयंत पाटील-फडणवीस भेट: दूध आणि दही एकत्र आले, ही चांगली बाब. On शरद पवार गट खासदार: अजून चर्चा सुरू आहेत, योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. कोकणात भाजपची ताकद जनसंघाच्या काळापासून असून सेवा हेच पक्षाचे ध्येय असल्याचे मत. On दरड दुर्घटना: कोकणातील दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. On मुंबई-गोवा महामार्ग: मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त.0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी: सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ने भास्कर जाधव के कार्यालय का दौरा किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधवांच्या कार्यालयाला भेट.. भास्कर जाधव यांच्या कार्यालयात आशिष शेलारंचं भास्कर जाधव यांचे स्विच सहाय्य यांनी केलं स्वागत.. रत्नागिरी दौऱ्यावर असलेक्या मंत्री आशिष शेलार यांनी चिपळूण मधल्या भास्कर जाधवांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली.. भास्कर जाधव अनुपस्थित..0
0
Report
Advertisement
पंढरपुर में VIP दर्शन के दौरान मंत्री के साथ धक्का- मुक्की, दर्शन बाधित
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश धुडकावत मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनीही घेतलं व्हीआयपी दर्शन आज पासून पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद झाले असतानाही श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी दरवाज्यातून आत धक्काबुक्की करत जात दर्शन घेण्यासाठी चढाओढ केल्याचं पाहायला मिळालं यामुळे मंदिर समितीने जाहीर केलेल्या व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा मंदिर अधिकाऱ्यांसमोरच उडालेलं दिसलं0
0
Report
आषाढ़ी वारी के पूर्व जलाभिषेक से पंढरपुर में रिकॉर्ड बारिश, श्रद्धालु मंत्रमुग्ध
Pandharpur, Maharashtra:आषाढ़ी वारी पूर्वीच पंढरपूर मध्ये वरून राजाचा जोरदार जलाभिषेक पंढरपूर शहरामध्ये आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची तारांबळ उडाल्याच पाहायला मिळालं. आषाढ़ी वारी पूर्वीच वरून राजाने पंढरीत जलाभिषेक केल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर पडणाऱ्या पावसाची सुंदर दृश्य वारकऱ्यांना पाहायला मिळाला0
0
Report
लातूर में डॉ. मेहुल राठोड की संदिग्ध मौत, स्वास्थ्य क्षेत्र में सनसनी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर शहरातील एम.जे. हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गालगत त्यांच्या चारचाकी वाहनात ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संशयास्पद मृत्यू म्हणून पाहिले जात असून, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन्न अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे。0
0
Report
Advertisement
