icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

खरीप हंगाम के समय डीजल संकट से चंद्रपूर के किसान परेशान, पंपों पर रातभर कतार

Chandrapur, Maharashtra:खरीप हंगाम पुढ्यात असताना पेट्रोल डिझेलच्या टंचाईने शेतकरी त्रस्त, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास पंपांवर लागत आहेत लांबच लांब रांगा खरीप हंगाम पुढ्यात असताना पेट्रोल डिझलच्या टंचाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास पंपांवर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. शेतीमध्ये चालविली जाणारी उपयोगी वाहने पंपावर आणणे शक्य नसल्याने शेतकरी विविध उपायाचा अवलंब करत आहेत. मात्र पेट्रोल डिझेलच्या टंचाईने शेतकरी हतबल आहेत. हंगामाच्या पुढ्यात यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना प्राधान्याने पेट्रोल डिझेल देण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

करमाळा तालुक्यात केळी लागवड 3204 हेक्टर घट, इस साल सिर्फ 20768 हेक्टर पर सीमित

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट ; लागवड 3 हजार 204 हेक्टरने कमी केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात यंदा केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची अनास्था पाहायला मिळत आहे. चालू हंगामात तालुक्यात केळीचे क्षेत्र तब्बल 3 हजार 204 हेक्टर घटले असून, यंदा केवळ 20 हजार 768 हेक्टरवरच केळीची लागवड झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही मोठी घट मानली जात आहे.मागच्या वर्षी 23,972 हेक्टर करमाळयात केळीची लागवड होती.करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यात गेल्या वर्षी आणि चालू वर्षी झालेल्या लागवडीची तुलना केली असता, चित्र चिंताजनक आहे
0
0
Report
Advertisement

आमदार चिखलीकर ने नांदेड की सीट राष्ट्रवादी कांग्रेस को सौंपने की मांग की

Nanded-Waghala, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपण तशी मागणी केल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील , तो निर्णय मान्य असेल. मात्र राष्ट्रवादीची ताकद देखील जिल्हयात आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे असं चिखलीकर म्हणाले. नांदेड जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक भाजपाचे सदस्य आहेत त्यामूळे या जागेवर भाजपचा दावा आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडन्याची मागणी चीखलीकर यांनी केल्याने युतीत धुसपुस होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत सर्व चांगले, पक्ष फुटणार नाही - चिखलीकर राष्ट्रवादी मध्ये कुठलीच धुसपुस नाही आमच्या पक्षामध्ये इतर लोकांनी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं नाही अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. पक्षात नाराजी असेल तर एकत्र बसुन दूर करू असं सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे, पक्ष फुटणार नाही , पुर्ण राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहे , असं चीखलिकर म्हणाले.
0
0
Report

भीमाशंकर के कायापालट के लिए 172 करोड़ की नई आदर्श ग्राम योजना मंजूर

Shirur, Maharashtra:पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या कायापालटासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भीमाशंकरच्या विकासासाठी तब्बल १७२ कोटी २२ लाख रुपयांच्या 'आदर्श ग्राम विकास आराखड्याला' मंजुरी देण्यात आली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणं, पर्यावरणपूरक EV शटल बस सुरू करणं आणि भाविकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्याचा निर्णय यात घेण्यात आलाय. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक मंत्री प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

अकोला में खरीप सामग्री की सप्लाई सुनिश्चित करने के लिए कड़ा नियोजन; कालाबाजारी पर सख्त कार्रवाई की चेतावनी

Akola, Maharashtra: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बी-बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अचूक नियोजन करावे, तसेच निविष्ठांचा काळाबाजार अथवा लिंकिंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला आहे. 1: अकोल्याचे पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, तालुकानिहाय बियाणे व खतांची मागणी, उपलब्धता आणि नियोजनाची अचूक माहिती प्रशासनाने सादर करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे, जेणेकरून राज्यस्तरावर योग्य पाठपुरावा करता येईल. जिल्ह्यात कुठेही निविष्ठांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निविष्ठांचा काळाबाजार, लिंकिंग किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणारे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी जिल्हा वॉररूमसारख्या यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.आपत्तीच्या काळात पंचनामे अचूक व पारदर्शक व्हावेत, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महावितरणने वितरण रोहित्र संच तालुकास्तरावर उपलब्ध ठेवावेत, जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाला गती देऊन पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बियाण्यांची उगवण न झाल्यास संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, कापूस लागवडीसाठी ७ लाख २५ हजार बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच विविध खतांचे एकूण मंजूर आवंटन १ लाख १४ हजार २०० मेट्रिक टन इतके आहे.
0
0
Report
Advertisement

मेळघाट के चिखलदरा में भीषण पानी संकट, 9 गावों को 20 टैंकर पानी पहुँचा रहा है

Amravati, Maharashtra:मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाई; ९ गावांसाठी २० टँकरने पाणीपुरवठा सुरू अँकर :- अमरावती जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पाणीटंचाईची समस्याही गंभीर बनली आहे. विशेषतः मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांना सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत टँकरग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाल्यानंतर चिखलदरा तालुक्यातील २५० हून अधिक गावांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून मे महिन्याच्या मध्यावरच परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गेल्या वर्षीही चिखलदरा तालुक्यातील १९ गावांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेळघाटात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement

ATM रिजेक्ट नोटों से नकली मुद्रा रैकेट का भंडाफोड़, गडचिरोली में चार गिरफ्तार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली शहर में ATM में पैसे जमा करते समय मशीन ने रिजेक्ट की गई कुछ सौ रुपए की नकली नोटों के बारे में बड़े नकली मुद्रा रैकेट का भंडाफोड़ किया। गडचिरोली पुलिस के जांच के अनुसार नागपुर के एक फ्लैट में शुरू हुए इस बनावट नोटों के मिनी प्रिंटिंग प्रेस का खुलासा हुआ, जिसमें गडचिरोली के दो उच्च शिक्षित भाइयों समेत चार लोग गिरफ्तार गए। गडचिरोली के कारगिल चौक क्षेत्र के Bank of Maharashtra के ATM में कुछ संदेहास्पद नोट जमा करने का प्रयास किया गया। मशीन ने नोट स्वीकार नहीं किए, जिसके बाद बैंक अधिकारियों ने जाँच की तो नोट नकली पाए गए। स्थानीय अपराध शाखा की जांच से प्रमोद कोवे तक इस नकली मुद्रा मामले का लिंक मिला। पूछताछ में प्रमोद कोवे ने आदित्य रेचनकर से यह रकम प्राप्त करने की कबूल की। इसके बाद रिकॉर्ड नागपुर की तरफ बढ़े और पुलिस ने मध्यरात्रि को दबिश देकर पूरी योजना का पर्दाफाश किया। नागपुर के किराए के फ्लैट में नकली नोटों के छपाई केंद्र से 50, 100 और 200 रुपये के नकली नोट, हाई-टेक कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटिंग सामग्री और अन्य उपकरण जप्त किए गए। इस कार्रवाई में मयूर डोईजड और आदित्य डोईजड, ये दोनों सगे भाई, को गिरफ्तार किया गया। एक व्यक्तिCivil Engineer और दूसरा Mechanical Engineering की शिक्षा ले रहा है। पिछले चार वर्ष से वे नकली नोट छाप कर बाजार में जारी कर रहे थे, यह पुलिस ने शक जताया है। न्यायालय ने आरोपियों को छह दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है और आगे तZZपचल द्वारा विस्तृत जाल के बारे में जांच जारी है।
0
0
Report

मराठी फिल्म महामंडळ की चुनाव की नई तिथि तय, 7 जून को मतदान, 8 जून को मतगणना

Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 7 जूनला होणार आहे. 17 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार असून 7 जूनला मतदान आणि त्यानंतर लगेचच 8 जूनला मतमोजणी होणार आहे. विविध कारणाने चित्रपट महामंडळाची निवडणूक रखडली होती. पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच च्या आदेशानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानाची प्रक्रिया कोल्हापूरसह पुणे आणि मुंबई केंद्रावर पार पडणार आहे. तर मतमोजणीची प्रक्रिया कोल्हापुरात पार पडणार आहे. या मतदानासाठी एकूण 3403 सभासद पात्र धरण्यात आले आहेत.
0
0
Report

गोपीचंद पडळकर बोले: मोदी समुद्र के नीचे पाइपलाइन से भारत का सवाल हलाएंगे

Sangli, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राचा खालून पाईपलाईन करून भारताचा प्रश्न मिटवणार - गोपीचंद पडळकर हुर्मुज ध्वनी बंद पडल्यावर भारताचा नव्हे तर अनेक राष्ट्रांचे तेल थांबले होते. त्यामुळे आता मोदी साहेब समुद्राचा खालून पाईपलाईन करून भारताचा प्रश्न कायमचा मिटवता येतोय का याचा विचार करत आहेत,असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे,तर ज्यांना ईश्वरपूर- सांगली रस्ता करारयाची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही,ज्यांना साधे खड्डे मुजवता आले नाहीत,ते समुद्राच्या खाली कधी जाणार,असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे,ते सांगली मध्ये आत्मनिर्भर परिषदेत बोलत होते.
0
0
Report
Advertisement

करजत के टोरेंट-पोशीर-शिलार बांधों के विरोध में विशाल आंदोलन, हजारों किसान-आडिवासी शामिल

Karjat, Maharashtra:सहा धरण प्रकल्पांविरोधात कर्जतमध्ये विराट आंदोलन…. टोरेंट, पोशीर, शिलार प्रकल्प रद्द करण्याची मागणी; हजारो नागरिकांचा सहभाग कर्जत तालुक्यातील टोरेंट, पोशीर, शिलार, कोंढाणे, पाली-भुतिवली धरण तसेच टाटा जलविद्युत प्रकल्पांविरोधात टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी, आदिवासी, पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. “जल, जंगल आणि जमीन वाचवा”च्या घोषणांसह सह्याद्रीच्या जैवविविधतेला धोका निर्माण करणारे हे प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला असून तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन स्वीकारले.
0
0
Report

नीट पेपर खरीद मामले में कदम परिवार पर CBI की आज पुणे पूछताछ

Nanded-Waghala, Maharashtra:नीट चा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या नांदेडच्या कदम कुटुंबाची आज पुन्हा पुण्यात सीबीआय कडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युत नगर भागात धाड टाकून कदम कुटूंबाची आठ तास चौकशी केली होती. कदम त्यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयात नीट चा पेपर विकत घेतला होता असा संशय आहे. कदम कुटुंबीय पुणेतील एका एजंटच्या संपर्कात होते तिथूनच त्यांनी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने कदम कुटुंबांच्या प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना पुणे येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज अकरा वाजता कदम कुटुंबीय पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर होणार आहेत.
0
0
Report

आंबेगाव के केले पर भीषण गर्मी का कहर, निर्यात-बाजार पर बड़ा असर

Ambegaon, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या महायुध्दाचा आधीच मोठा फटका जुन्नर आंबेगाव शिरूर च्या केळी उत्पादक शेतकय्रांना बसला असून केळीची निर्यात ठप्प झाल्याने केळी चे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असताना आता वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकय्रांची डोकेदुखी वाढलीय, वाढत्या तापमानामुळे केळी वरती दाग चट्टे पडून केळी मोठ्या प्रमाणात खराब झालीय परिणामी वाढत्या उष्णतेमुळे शेतकय्रांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय याचाच नुकसान ग्रस्थ शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top