icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर के चुनावी बवाल: बीजेपी- कांग्रेस पर आरोपों की राजनीती तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर बाईट - आ परीणय फुके, भाजप नेते घोडेबाजाराचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून का केले जात आहेत? काँग्रेसचे नेतेच बिकाऊ आहेत. जे बिकाऊ असतात, त्यांचीच किंमत बाजारात ठरवली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले सदस्य बिकाऊ आहेत, असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असते, तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते जनतेसमोर मांडले असते. हा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विविध प्रशिक्षण वर्ग राबविले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींनाही या प्रशिक्षणाचा लाभ दिला जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सामान्य नागरिक जसे पर्यटनासाठी जातात, त्याचप्रमाणे नगरसेवकही सहलीसाठी जाऊ शकतात. यात कोणतेही गैर नाही. विरोधी पक्ष कमकुवत झाला असून तो सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नाही. सध्या त्यांचे आंदोलन सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहिले आहे. इंडिया आघाडीला आता इतर नव्या राजकीय पर्यायांकडून स्पर्धा निर्माण होत असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडून अशा बैठका आणि प्रयत्न सुरू आहेत. दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्याबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यांनी अधिकृतरीत्या विनंती केली असती, तर त्यावर चर्चा झाली असती. त्यांनी खरोखर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असता, तर त्याबाबत पक्षाने गांभीर्याने विचार केला असता. मात्र, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांनी आपले पदही गमावले आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाची संघटना सातत्याने जनतेसाठी काम करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. हे सरकार सामान्य जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन-तृतीयांशपेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.
0
0
Report

इंडिया आघाडी बैठक: महंगाई और बेरोजगारी से देशभर में आक्रोश

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On इंडिया आघाडी बैठक - - इंडिया आघाडीचे आजची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे, देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं, देशात तरुणांमध्ये असलेला आक्रोश आणि आक्रोश, महागाईच्या विळख्यात हा संपूर्ण देश सापडला आहे, डिझेल पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे रिझर्व बँक खाली केली जात आहे, - अशा स्थितीत तरुण रस्त्यावर उतरला आणि जिकडेतिकडे देशात हाहाकार पसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या सगळ्यावर चर्चा करून या देशातून सगळ्यांना वाचवणार यासाठी इंडिया आघाडी कडून चर्चा केली जाणार आहे - विविध प्रश्नावर या ठिकाणी चर्चा होईल आणि इंडिया आघाडी एकत्रितपणे मजबुतीने राहुलजींच्या नेतृत्वात ती पुढे जाईल आणि या देशावर आलेल्या संकट आहे त्या संकटावर तोडगा काढण्याचे काम इंडिया आघाडी करेल, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे On सीएम सर्वपक्षीय बैठक मागणी - - आपण सगळे बघत आहोत की अल निनो मुळे प्रचंड भयावह परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती आहे, यावेळी पावसाचा अंदाज अत्यल्प दाखवण्यात आला आहे म्हणूनच या सगळ्यावर या परिस्थितीत देशापुढे पुढे जे काही प्रश्न आहेत - 22 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन आहे, मात्र आता कांद्यापासून अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांच नुकसान, मुंबईत दहा टक्के पाणी कपात सुरू झाले आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे सगळे विषय घेऊन एक तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि त्यावर चर्चा केली पाहिजे अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे On भुजबळ नाराजी - - ज्या परिस्थितीत भुजबळ आहेत त्यांना मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल, राष्ट्रवादीत काय सुरू आहे यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही, मात्र अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आला आहे - आज अशी राजकीय परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे, तो अधिकार त्या पक्षांकडे किती आहे यावर हे महाराष्ट्रात चर्चा आहे, सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदय घेतात, त्यांच्या नेत्यांना कुठे ठेवावे हे जबाबदारी द्यावी, कोणाला कुठे पाठवावं या परिस्थितीत भुजबळ साहेबांकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील तेच भुजबळ साहेबांना सुद्धा स्वीकारावा लागेल असं एकूण पूर्ण राजकीय वातावरण आहे On बच्चू कडू आमचा मुख्यमंत्री - - मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानेच हे सरकार आलं हे काही लपून राहिले नाही, त्यांनी लाडकी बहीण आणि विविध योजना आणल्या, सरकारी तिजोरीतून एका एका कुटुंबात 30 हजार 40 हजार तर कोणाच्या कुटुंबात लाख रुपये गेले - त्यावेळी सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा श्रेय होता कारण ते मुख्यमंत्री होते, पण आज जे काही सांगितलं जातं की मंत्र्यांना ठोकून काढा चुकलं तर, आमचे तर मंत्री नाही त्यांचेच मंत्री आहेत आणि त्याचा इशारा ते देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडून करावी On कर्जमाफी - - शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे, तीन लाख दिल्याशिवाय दोन लाख मिळणार नाही, अशा सगळ्या मध्ये फार तर पंधरा-वीस लाखाच्या घरात हा आकडा जाईल तो आकडा फोन सांगितला जात आहे या कर्जमाफीच्या फायदा शेतकऱ्यांना होणार नाही ही बनवाबनवी ची कर्जमाफी आहे - काल भाजपच्या प्रवक्त्याने सांगितलं की शरद पवारांकडे ते बोट दाखवतात, एका झटक्यात मनमोहन सिंह यांनी 76 हजार कोटींचा कर्जमाफ करून टाकला होता, कोणाच्या काळात कोणाची कर्जमाफी झाले हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे - सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा त्याचं ओपन ओक्शन करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा On एलपीजी दरवाढ - - हीच सरकारची उपलब्ध आहे की आधी चुली बनवून गॅसवर आणला, एक-दीड महिन्यात सिलेंडरचे हेच दर दीड हजारावर येतील, हे पुन्हा चुलीकडे आणतील, सामान्य माणूस चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धур घालून डोळ्यातील अश्रू पुन्हा वाहतील अशी On अशोक गेहलोत - - वरच्या लेव्हलचा विषय आहे, मला माहिती नाही, मी खालचा कार्यकर्ता आहे, ती परिस्थिती केंद्रस्तरावर काय झालं याचे उत्तर माझ्याकडे नाही
0
0
Report

इंदापुर में आंधी-बारिश ने केले केले के बाग तहस-नहस कर दिए; किसान मुआवजे की मांग

Rui, Maharashtra:वादळी वाऱ्याचा पावसाचा इंदापूरला तडाखा.... केळीच्या बागा जमिनीवरती झाल्या आडव्या..... शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू..... पुणे जिल्ह्यातील इंदापुरात शुक्रवारी झालेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं ओरबाडून नेला आहे, शेतकऱ्यांच्या केळी बागा जमिनीवर आडव्या झाल्या असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाला आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायेत इंदापूर तालुक्यातील सुरवड वडापुरी गावासह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करून आम्हाला या पिकांचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

काश्मिरी पहचान के कारण होटल से निकाले जाने का दावा वायरल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये काश्मिरी ओळखीमुळे शहरातील हॉटेलमधून बाहेर पडण्यास सांगितल्याचा दावा एका काश्मिरी व्यक्तीने सोशल मीडियावर केल्याने चर्चा रंगली आहे. साजिद युसूफ शाह यांनी 'एक्स' या माध्यमावर केलेली पोस्ट व्हायरल झाली. साजिद युसूफ शाह यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, 'महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर, माझ्या काश्मिरी ओळखीशी संबंधित चिंतांमुळे मला (एका तासानंतर) हॉटेल सोडण्यास सांगण्यात आले. हॉटेलचे मालक नम्र आणि स्पष्टवक्ते होते. त्यांनी कबूल केले की, हा निर्णय अन्यायकारक आणि दुःखदायक होता; पण ते सूचनांचे पालन करीत होते, असे सांगितले. मी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि कोणताही वाद न घालता निघून गेलो. महत्वाचे म्हणजे साजिद शाह हे काश्मीर मध्ये भाजपचे प्रवक्ते आहेत..
0
0
Report

तुळजाभवानी मंदिर में नकली पुजारी, भक्तों से धोखाधड़ी का बड़ा खेल सामने

Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजाऱ्यांचे जाळे? बनावट ओळखपत्रांच्या आधारे भाविकांची लूट? दोन दिवसांत पाच संशयित पुजारी जाळ्यात; मंदिर प्रशासन अॅक्शन मोडवर अँकर सोने-चांदी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय... पुजारी असल्याचे भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे भाविकांची फसवणूक केली जात आहे. मंदिर प्रशासनाच्या विशेष मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत पाच संशयित बोगस पुजारी जाळ्यात अडकले आहेत. नेमकं काय आहे हे बोगस पुजाऱ्यांचं रॅकेट... पाहुयात हा विशेष रिपोर्ट... VO 1 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काही जण स्वतःला अधिकृत पुजारी असल्याचे भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे धार्मिक विधी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. VO 2 या प्रकाराची दखल घेत मंदिर प्रशासनाने विशेष पथकाची नियुक्ती केली. सलग दोन दिवस राबवलेल्या मोहिमेत पाच संशयित ब bogस पुजारी पथकाच्या ताब्यात आले. त्यापैकी दोन जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून तिघांची चौकशी सुरू आहे. BYTE रामेश्वर वाले सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक VO 3 मंदिर परिसरात अनधिकृत पुजारी व्यवसाय, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा रोखण्यासाठी ही मोहिम सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र काही व्यक्तींना बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्रे मिळत असल्याचा आरोप पुजारी मंडळांकडून करण्यात येत आहे. FVO परंतु तीन पुजारी मंडळांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोने-चांदी घोटाळ्यानंतर आता बोगस पुजाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, मंदिर प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास धाराशिव.
0
0
Report

मृग किड़ा नक्षत्र के संकेत पर वाशीम के किसानों में पेराई तैयारी शुरू

Washim, Maharashtra:अँकर:वाशीम तालुक्यातील बाभुळगाव येथे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पारंपरिकदृष्ट्या पावसाचे सूचक मानला जाणारा ‘मृग किडा’ आढळून आला.मृग किड्याचे दर्शन होताच शेतकऱ्यांनी त्याचे पूजन करून चांगल्या पावसाची आशा व्यक्त केली.भारतीय कृषी परंपरेनुसार मृग नक्षत्राला विशेष महत्त्व असून, या काळात मृग किडा दिसणे हे समाधानकारक पावसाचे संकेत मानले जाते.त्यामुळे परिसरातील शेतकरी पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी अशा पारंपरिक नैसर्गिक संकेतांवर विश्वास ठेवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

धैर्यशील मोहिते पाटील ने गोरे के बयान पर जमकर हमला

Solapur, Maharashtra:Solapur ब्रेकिंग – संपलेल्या व्यक्तीवर मी चार चार वेळा बोलत नाही, धैर्यशील मोहिते पाटलांची राम सातपुते यांचे नाव न घेता सडकून टीका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रत्युत्तर. राम सातपुते यांच्यावर नाव न घेता सडकून टीका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पोस्टमन टीकेवर उत्तर. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका: जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत हे त्यांनीच ठरवावे. नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. माझे मतदार माझ्याबरोबर आहेत.. मतदारांबरोबर मी काम करतोय. सहाशे अदृश्य मतदार माझ्याबरोबर आहेत. राम सातपुते वक्तव्य: आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवले आहेत.. क्रॉस वेरिफिकेशन करावं. पालकमंत्री आणि ज्याचं नाव घेतलं, त्यांच्या प्रतिक्रिया बघा. दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आहेत. पालकमंत्री गोरे वक्तव्य: मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय आणि मतदारांना काय विकास होणार आहे ते सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी काय मदत केली है ते उघडपणे सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement

नाभिक महामंडळ ने दाढ़ी कटिंग दर 20% बढ़ाने की घोषणा की

Nagpur, Maharashtra:Ngp Saloon shots Ngp saloon Byte live u ने फीड पाठवले ------------ आता दाढी -कटिंगसाठी 20 टक्क्यांनी दरवाढ झालीय. नाभिक महामंडळ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती कार्याध्यक्ष श्याम आस्ककर यांनी दिलीय.सलून व्यवसायासाठी रोजच्या कामात वापरल जाणाऱ्या अनेक मटेरिअल पेट्रोलियम आणि केमिकलशी संबंधित आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी आपल्या प्रोडक्शन किमती वाढविल्यान दरवाढं केली.त्यामुळे सलून चालकांना स्थानिक पातळीवर दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ---------------- बाईट --- श्याम आस्ककर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश कार्याध्यक्ष
0
0
Report

गोदावरी प्रदूषण पर शिवसेना ठाकरे का रामकुंड मोर्चा

Nashik, Maharashtra:Nashik Breaking गोदावरी नदीत ड्रेनेज व दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून रामकुंडावर आंदोलन. दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात. भाविक स्नानासाठी येत असलेल्या गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप. पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन. शिवसेनेचे सर्व नगरसेवक आंदोलनात सहभागी. गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका. आठ दिवसाच्या आत गोदावरी नदी ही स्वच्छ केली नाही तर महानगरपालिकेवर शिवसेनेचा मोर्चा जाईल असा दिला इशारा... आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

तुळजाभवानी मंदिर में फर्जी पुजारियों के खिलाफ विशेष छापा, दो दिन में पांच गिरफ्तार

Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात बोगस पाच पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात. दोन पुजाऱ्यांना मंदिर संस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन तर तीन पुजाऱ्यांची चौकशी सुरू. बोगसगिरी करणाऱ्या संशयित पुजाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थान कडून माहिती. मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक और अनधिकृत पुजारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी संस्थानने केली विशेष मोहीम सुरू. मोहिमे अंतर्गत सलग दोन दिवसांत पाच पुजारी पथकाच्या जाळ्यात. काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे मंदिर संस्थानकडून पुजारी असल्याची ओळखपत्रे मिळवत असल्याचा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांचा आरोप तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची केली मागणी. मंदिर प्रशासनाकडून अनधिकृत पूजा, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा याविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत。
0
0
Report
Advertisement

सोलापुर में महाविकास आघाड़ी के भीतर टिकटों को लेकर गुटबाजी और हेवेदावे सामने

Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीला दोन खासदार आणि सहा आमदार निवडून दिले. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे हेवेदावे समोर येऊ लागले आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोके दुखी वाढली आहे. सोलापूर विधान परिषद साठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सभापती होत असताना आपल्या समर्थकाचे मत भाजप उमेदवाराला दिल. हाता तोंडाशी आलेला सत्तेचा घास वसंतराव देशमुख यांच्यामुळे गेला मग आता त्यांना मदत कशासाठी करायची असा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे. वसंतराव देशमुख यांची उमेदवारी देताना जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वासात घेतलं नाही आपल्याकडे मतदार असतानाही एकही सूचक घेतला नाही विरोधी पक्षाचे उमेदवार संपर्क करतात मात्र आपल्याच पक्षाचे उमेदवार अद्याप संपर्क करत नाहीत 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यावेळी शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या समोर ही वस्तुस्थिती मांडणार आहे मात्र तरीही वसंतराव देशमुख यांनी मागे झालेल्या कुरघोड्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच अभिजीत पाटील यांनी आता आपले जुने हिशोब चुकते करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांच्या हेवेदाव्या साठी महा विकास आघाडीची ताकद असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आमदारांनीच पक्ष कमकुवत करण्याची भूमिका घेतली आहे
0
0
Report

महाबळेश्वर बस स्टॉप पर अधिकारी के आरेरावी बर्ताव से यात्रियों में नाराजगी

Satara, Maharashtra:महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी बस स्थानकातील एका वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावी आणि उद्धट वर्तनामुळे प्रवासी तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. काल दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना करण्यात आली. या विलंबामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे आरक्षण असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर हा कर्मचारी चित्रीकरण का करताय असा जाब विचारत होता. त्यामुळे एकूणच या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे
0
0
Report

अकोला में खरीफ के लिए यूरिया-डीएपी की खरीद में किसानों की भीड़, टोकन वितरण शुरू

Akola, Maharashtra:राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला ७ हजार १०१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे. सध्या एका आधार कार्डवर पाच पोती खताचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन पद्धतीने खत वितरण केले जात आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर खत आणि बियाणे शेतात नेणे अवघड होते. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top