445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गड़चिरोली के सिरोंचा में आदिवासी पानी के लिए भटक रहे, बोरवेल भी सूने
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब-थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या गावात विहीरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकाही बोरवेलमध्ये पाणी नाही. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. नळ योजनांच्या नळात आजपर्यंत पाणी आलेच नसून झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजीगुडम टंचाईग्रस्त गावांच्या यादीत आहेत. झिंगानूर वासियांचे जल संकट कधी दूर होणार असा सवाल विचारला जात आहे. असीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली0
0
Report
नाफेड के तहत रबी मौसम में हरभरा खरीद; ऑनलाइन पंजीकरण 15 अप्रैल तक बढ़ा
Washim, Maharashtra:2025-26 च्या रब्बी हंगामातील हरभऱ्याची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत हरभऱ्याच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अधिकाधिक शेतकरी आता हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी करू शकणार आहेत.0
0
Report
नागपूर में डिटोनेटर्स बरामद, बारकोड मिटे, वितरक की पहचान प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या दोसर भवन चौकाजवळ एका घराच्या समोरील परिसरात बेवारस पिशवीत सापडलेले 50 डेटोनेटर्स आणि 15 जिलेटिन कांड्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. एसबीएल कंपनीशी संबंधित या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले आहे, त्यामुळे कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला हे स्फोटक पाठवण्यात आले होते, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. डॉ लांजेवार यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेतील बागेत एका बेवारस पिशवीत हे स्फोटक मंगळवारी सकाळी सापडले होते. प्रत्येक डिटोनेटरवर बारकोड आणि त्याचा सिरीयल नंबर छापलेला असतो; त्याच्या माध्यमातूनच उत्पादनक कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला ते पाठवण्यात आले होते आणि कुठून त्याची विक्री झाली होती ते स्पष्ट होत असते. आता या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले असल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. दरम्यान पोलीस दोसर भवन चौक तसेच सेंट्रल एवेन्यू वरील विविध सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून या ठिकाणी पिशवीत स्फोटक ठेवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.0
0
Report
Advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने गांव निजी दौरे पर हेलीकॉप्टर से पहुँचेंगे
Satara, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी येणार आहेत. आज दुपारी मुंबईवरून ते हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी येणार आहेत. हा त्यांचा खाजगी दौरा आहे. मात्र ते किती दिवस दरे गावी मुक्कामी असणार आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही0
0
Report
बारदाने नहीं मिलने से अमरावती में चना-तुरी खरीद बंद, किसान चालक बनाम महंगाई का सामना
Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बारदाना अभावी अमरावती जिल्ह्यातील शासकीय तुर व चना खरेदी बंद; खाजगी बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणी अँकर :- शासनाच्या हमीदराने होणारी चना व तुरीची शासकीय खरेदी बारदाण्याअभावी रखडली आहे. त्यामुळे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. खुल्या बाजारात चना व तुरीचे दर पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनाने पणन महासंघ नोडल एजन्सी नियुक्त करून शासनाच्याहमीदराणे खरेदी प्रारंभ केली मात्र अनेक शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने ही खरेदी बंद पडली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र खरेदी बंद असल्याने तूर हरभरा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रावर बारदाना पोहोचल्यावर आम्ही खरेदी सुरू करू असं आता सांगण्यात येत आहे. मात्र खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के जिला अस्पताल में रक्त का संकट, रक्तदान की अपील जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्हा रुग्णयालयात रक्त तुटवडा.. आरोग्य यंत्रणेकडून सामाजिक संस्थान आवाहन.. जिल्ह्यातील आरोग्य वस्थेसमोर सध्या रक्त तुटवड्याचे संकट ओढावले आहे.. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.. सध्या केवळ शंभर पिशव्यांचा साठा शिल्लक आहे.. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारासाठी रक्तपुरवठा कठीण होणार आहे.. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदात्यांनी बाहेर पडणे टाळल्याने स्वेच्छ रक्तदानाचे प्रमाण घटले असून रक्ताचा बॅक-लॉग वाढला आहे.. या गंभीर परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कडून सामाजिक संस्था,राजकीय पुढारी आणि तरुण मंडळांना रक्तदानाच्या आवाहन करण्यात येत आहे..0
0
Report
Advertisement
आक्षी में सैकड़ों ग्रामस्थ भाजपा में शामिल, मच्छी पालन योजनाओं की चर्चा
Chendhare, Maharashtra:आक्षीतील शेकडो ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश. राज्यचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं आहे. नितेश राणे यांनी इथल्या कोळी बांधवांसाठी कोट्यवधी रुपयांची मच्छीमार जेटी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रभावित होऊन आक्षीचे उपसरपंच आनंद बुरांडे यांच्यासह कोळी बांधवांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.0
0
Report
उजनी के कारंबा कालवे में ओवरफ्लो, सड़क पर पानी फैलाने से यातायात बाधित
Solapur, Maharashtra:सोलापूर - उजनीच्या कारंबा शाखेतील पाणी हिप्परगा पंपहाऊसपासून ओव्हरफ्लो, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी Anc : उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊस जवळ ओव्हर फ्लो झाले असून, ते पाणी थेट ओढ्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना कारंबा नाका ते भोगाव टोल नाका या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ओढया वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.0
0
Report
वाशीम में सेतु केंद्र चयन: 18 केंद्रों की मंजूरी रद्द, 20 नए केंद्र मंजूर
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशीम जिल्ह्यात सेतु केंद्र निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत सुरुवातीला 686 केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 80 आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्या. प्रशासानाने सखोल पडताळणी केल्यानंतर नियमभंग व त्रुटी आढळल्याने 18 केंद्रांची मंजुरी रद्द करण्यात आली. तसेच नवीन 20 सेतु केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवून निष्पक्ष चौकशीनंतरच हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.0
0
Report
Advertisement
अमरावती-परतवाडा मार्ग पर अदालत के आदेश के विरुद्ध पेड़ कटे, पर्यावरण प्रेमी नाराज
Amravati, Maharashtra:अमरावती–परतवाडा मार्ग पर मनाई धुडकाव कर पचास से अधिक पुराने पेड़ काटे गए; पर्यावरण प्रेमियों में नाराज़गी। अँकर: अमरावती–परतवाडा महामार्ग के चौपदरीकरण के कार्य के दौरान न्यायालय के स्पष्ट आदेश की अवहेलना कर पचास से अधिक पुराने पेड़ कटे थे। इस मार्ग पर 100 से 150 वर्ष पुराने कडुनिंब, चिंच, वड, पिंपळ आदि पेड़ बड़े पैमाने पर थे। अचलपूर-परतवाडा के बीच लगभग 6 किमी मार्ग का काम राष्ट्रीय महामार्ग विभाग को सौंपा गया था। कार्य शुरू करते समय इन पेड़ों के कटने का आरोप पर्यावरण कार्यकर्ताओं ने किया। पहले भी इन पेड़ों के कटने का मामला अदालत गया था और पेड़ न काटने के निर्देश दिए गए थे। फिर भी कटाई अदालत के आदेश के उल्लंघन को दर्शाती है, पर्यावरण प्रेमियों का कहना है। पुराने पेड़ कटना पर्यावरण के लिए बड़ा नुकसान है।0
0
Report
भावसिंगपुरा में घरेलू हिंसा से विवाहित महिला ने दी आत्महत्या; पति समेत सात गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीला आणि सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेचा पतीसह सासरच्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ईश्वरी अजय बनकर वय २५ असे मयत झालेल्या विवाहितेच नाव आहे. तर अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर अशी आरोपींची नावे आहेत.0
0
Report
सोलापुर जिला परिषद के विषय समितियों के लिए कई उम्मीदवार, नामांकन की चर्चा शुरू
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसाठी अनेक जण इच्छुक, नावांबाबत चाचपणीला सुरुवात Anchor - सोलापूर जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांच्या सदस्य निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध समित्यांसाठी अनेक सदस्यांनी इच्छुकता दर्शविल्याने वातावरण चांगले तापले आहे मात्र जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थायी, अर्थ, आणि बांधकाम या महत्त्वाच्या समित्यात संधी मिळावी यासाठी अनेक सदस्यांनी फिल्डिंग लावली आहे. महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण समित्यांमध्ये महिलांना संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र सर्व पदांच्या नियुक्ती बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.0
0
Report
Advertisement
एसटी भाड़े में 10% वृद्धि: अप्रैल से जून तक यात्रियों की जेब पर बोझ
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; दहा टक्के एसटीचे भाडे वाढणार महाराष्ट्र राज्य महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी प्रवासाच्या तिकिटाचे 10 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पेट्रोल डिझेल वाढले नाही तर भाडेवाढ कशासाठी असा सवाल प्रवासी करताय. 15 एप्रिल ते 15 जून हा सुट्ट्यांचा काळ आहे या काळात प्रवासी संख्या वाढते त्यामुळं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे आणि यावरून लोकांची नाराजी आहे... सुट्ट्यांच्या दिवसांमध्येच विद्यार्थ्यांना फिरायला घेऊन जावे लागते, लग्न समारंभ याच दिवसात असतात, याच सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये भाडेवाड करणे पूर्णपणे चुकीचे आहे हा एसटीचा चुकीचा निर्णय आहे अशा जनतेच्या भावना आहेत... संभाजीनगर वरून असे असणार नवीन दर * छत्रपती संभाजीनगर ते पुणे सध्याचे दर 393 रुपये, भाडेवाडी नंतर 432 रुपये * छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सध्याचे दर 645 रुपये, भाडेवाडी नंतर सातशे आठ रुपये * संभाजीनगर ते नाशिक सध्याचे दर 343 रुपये भाडेवाडीनंतर 3730
0
Report
पटाखे लोड ट्रक में आग, चालक सुरक्षित; पैठण रोड पर ट्रक दुर्घटना के बाद आग पर काबू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारातील बालानगर फाट्याजवळ बुधवारी फटाक्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये आग लागली. सुदैवाने, या घटनेत चालक आणि क्लीनर 두घेही सुखरूप बचावले असून एक मोठाअनर्थ टळला आहे. अहमदाबादेतून फटाके भरून लातूरकडे ट्रक जाताना बालानगर फाट्याजवळ खड्ड्यात आदळला. त्यानंतर आतल्या छोट्या फटाक्यांनी अचानक पेट घेतला आणि एकामागून एक स्फोट होऊ लागले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक काही अंतरावर नेऊन थांबवला; वाहकासहा दोघेही खाली उतरले. बघ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळात अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी ट्रकमधील आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे पैठण रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.0
0
Report
मानोरा बसस्टँड के पास मोटरसाइकिल चोरी CCTV फुटेज में कैद
Washim, Maharashtra:वाशीम: दुचाकी चोरीची घटना मानोरा बसस्थानक परिसरात घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कैलास भस्मे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मानोरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून वाशिम जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
