icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Kalamb Police Raid: 2 Officers Caught Bribing 36,000 in ACB Bust

Dharashiv, Maharashtra:कळंब पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; ३६ हजारांची लाच घेताना दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) मोठी कारवाई या प्रकरणी अशोक दादाराव करवर याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे फरार तक्रारदाराचा रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदारांनी हप्त्याच्या स्वरूपात ४० हजार रुपयांची केली होती मागणी पोलिस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये आणि दुय्यम अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये अशी झाली मागणी पडताळणीनंतर दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न तक्रारदाराकडून ३६ हजार रुपये स्वीकारताना अशोक करवर याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून ३६ हजार रुपयांची लाचेची रक्कम, ३५० रुपये रोख, एक मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
0
0
Report
Advertisement

आंबेगांव नागापूर में भक्ष के पीछे बिबट्या कुएं में गिरा; मंचर वन विभाग की रेस्क्यू टीम ने सुरक्षित बाहर निकाला

Ambegaon, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मानव आणि बिबट संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आंबेगाव नागापूर येथे भक्षाचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर मंचर वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.
0
0
Report

कोकण के बॉक्साइट-रेफायनरी-आणुऊर्जा प्रकल्पों के खिलाफ एकजुटता का बिगुल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी रत्नागिरीमध्ये प्रेस घेतली, फक्त 20 तारखेची जन सुनावणी पुढे ढकललेली आहे. ती फक्त पुढे ढकलली आहे; कॅन्सल केलेली नाही. त्यामुळे आपल्याला बेसावध राहून जमणार नाही. जोपर्यंत बॉक्साईट प्रकल्प कॅन्सल होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे आंदोलन चालूच ठेवावं लागेल. म्हणून तुमच्या आमच्या जीवाशी खेळणारे हे बॉक्साइट प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प हे केवळ आणि केवळ कोकणच्या माथी मारायचे आहेत आणि चांगलं, चांगलं असेल ते गुजरातला पाठवायचंय. ही जी काही काय घाणेरडी वृत्ती आहे ती hाणून पाडण्याचं काम आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहून करायचं आहे. आपल्यापाठी नव्हे तर आपल्यापुढे एक पाहून पुढे टाकून या प्रकल्पांना विरोध करण्याचे काम आम्ही करणारच आहोत.
0
0
Report

14 मई को कुलपति पद के लिए मुलाखत: शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर, 115 उम्मीदवार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 14 मे रोजी मुलाखती होणार आहेत. राजभवन मध्ये या मुलाखती होणार असून त्यामध्ये डॉक्टर आर.के. कामत, ज्योती जाधव, पी.एस.पाटील, स्मिता देशमुख आणि संजय ढोले या उमेदवारांचा समावेश आहे. कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्या 115 उमेदवारांनी शोध समितीकडे अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, संशोधनातील कामगिरी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला दिलेले योगदान तपासून उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू लाभावा अशी मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केली जात होती. त्यानंतर आता कुलगुरू पदासाठी अंतिम उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
0
0
Report
Advertisement

वर्धा के करोड़ों खर्च से बना हॉकर्स प्लाज़ा आज भी खस्ताहाल, रोजगार के दावे खोखले

Wardha, Maharashtra:वर्ध्यात कोट्यवधी खर्चून उभारलेला वर्ध्यातील हॉकर्स प्लाझा ओसाड - रोजगाराच्या उद्देशाने बांधलेला प्रकल्प बनला गैरप्रकारांचा अड्डा? वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालयासमोरील जागेवर सन 2018-19 मध्ये हॉकर्स प्लाझाचे बांधकाम करण्यात आले होते. वर्ध्याच्या सौंदर्यात भर पडावी तसेच बेरोजगार युवक आणि महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला होता. या कामासाठी तब्बल 1 कोटी 4 लाख 55 हजार रुपये खर्च करण्यात आले होते..हा प्रकल्प आजही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. सध्या हॉकर्स प्लाझा ओस पडलेला असून परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली दिसत आहे.रात्रीच्या वेळी येथे काही समाजकंटकांकडून दारू पार्ट्या आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
0
0
Report

चंद्रपुर के वेंडली से ओबीसी जाति जनगणना के लिए अभियान शुरू, आंदोलन की धमकी

Chandrapur, Maharashtra:जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जनजागृती अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली गावातून सुरवात, रामलीला मैदानावर आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली गावातून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे. जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक है. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

कोल्हापुर सर्किट बेंच के सामने गोकुळ के पूर्व निदेशकों की याचिका, चुनाव 90 दिन में

Kolhapur, Maharashtra:गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांनी पुन्हा एकदा कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली आहे. प्रशासकीय मंडळाच्या विरोधात ही धाव घेण्यात आली आहे. यापूर्वी गोकुळच्या संचालकानी कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात निवडणूक घेण्याच्या आदेश दिले आहेत. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने संचालकांना मुदतवाढ आणि प्रशासकीय मंडळाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. त्यानुसार गोकुळच्या संचालकांनी पुन्हा एकदा कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून सर्किट बेंच मध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिति में चाकू दिखाकर किसानों से लूट, 4 आरोपी गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याला लुटले, लुटमार करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखववत लुबाडणूक - बाजार समितीमध्ये कांदा घेऊन रात्री मुक्कामासाठी आलेल्या हनुमन्त कोळी या शेतकऱ्यांसोबत घडला धक्कादायक प्रकार - शेतकऱ्याला मारहाण करत काहीकाळ त्याला ठेवले ओलीस, त्यानंतर्रोख रक्कम काढून घेत यूपीआयद्वारे ऑनलाईन ट्रांजैक्शन करायला लावत केली लुबाडणूक - चार आरोपींना जोडभावी पेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर - एकीकडे कांद्याला दर नसल्याने शेतकरी प्रचंड तणावत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकाराने व्यक्त करण्यात येतोय संताप - घटनेचे गांभीर्य ओळखत कौशल्याने तपास करत पोलिसांनी चार आरोपींना तात्काळ अटक करत खाकी दाखवताच दिली गुन्ह्याची कबुली
0
0
Report

डोंगरगाव डिo परिषद स्कूल में प्राचार्य की गैरहाजिरी पर हंगामा, पालक कार्रवाई की मांग

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा खळबळ जनक प्रकार उघडकीस....प्रत्यक्ष हजर नसताना दोन दिवसाआधी लावली हजेरी.....पालक व चपराशांची तक्रार....कारवाईची मागणी.... भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसतानाही दोन दिवसांपूर्वीच हजेरी पुस्तकावर सही केल्याचे आढळून आले. आज सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेनंतरही कोणतेही शिक्षक किंवा मुख्याध्यापक शाळेत आले नव्हते. दरम्यान, चपराशाने काही वेळापूर्वीच शाळा उघडल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्याध्यापकांची हजेरी नेमकी कशी लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार केवळ डोंगरगावपुरता मर्यादित नसून इतरही जिल्हा परिषद शाळांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची चर्चा आहे. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांमध्ये नाराजी वाढत असून शिक्षण विभाग संबंधित मुख्याध्यापकांवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में महिलाओं की सुरक्षा को लेकर पदाधिकाऱियों का जिलाधिकारी कार्यालय पर प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना... पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना महिलांनी दिले निवेदन... dynesendivasa महिलां अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लहान चिमुकल्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नसल्याची भीती निर्माण झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अत्याचार आणि हत्या यांच्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा येथे महिला सशक्तिकरण संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात एका वृद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तेथीलच कर्मचाऱ्याकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालयासारखी सुरक्षित मानली जाणारी ठिकाणेदेखील महिलांसाठी असुरक्षित होत चालल्याची भावना महिलांमध्ये व्यक्त केली जात आहे. तसेच लाखनी तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केलेल्या अत्याचाराची घटना, शहरातील 29 वर्षीय तरुणी 11 दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना.. या सर्व घटनेच्या निषेधार्थ महिला सशक्तिकरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत कठोर कारवाईची मागणी केली. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top