icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई-गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात ठप्प, हजारों यात्री फँसे

Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. दहा तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, दहा तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रात्र होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली असून, वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
0
0
Report

कृषि मंत्री ने किसानों के कर्ज माफ़ी की राशि जल्द खातों में जमा करने की पुष्टि की

Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पॉईंट On कर्जमाफीची 30 जून तारीख दिली होती... नंतर 5 जुलै तारीख दिली होती...* विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे... पुरवणी मागणीला बजेटमध्ये ज्या काय मागण्या मांडल्या आहेत.... त्या येथे मंजूर झाल्यानंतर राज्यपाल मोदयांची लवकरात लवकर सही होईल.... लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होईल... ऑन शेतकरी इन्कम टॅक्स 100% माहिती घेतली पाहिजे त्याची पडताळणी केली पाहिजे... शेवटी याचा लाभ गरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.... ठीक आहे चार दोन दिवस उशीर झाला तर... उशीर होतो हे आम्ही मान्य करतो... संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केले... कोणतीही चूक होऊ नये... म्हणूनच आम्ही काळजी घेतोय.... राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांचे आभार मानले पाहिजेत... अडचणीच्या काळामध्ये कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा... अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे.... या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्री म्हणून आभार मानतो... 30 जून तारीख दिली होती मात्र काही अडचणी असतात... लवकरच दूर करून.. येणाऱ्या थोड्या दिवसात ही रक्कम माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल.... ऑॉन कोणत्या अटी... पहिले जे निकष आहेत त्या निकषात जे पात्र आहेत... त्यांना कर्जमाफी देतोय... यामध्ये काय दुरुस्त करणे गरजेचे आहे... शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत कुठल्या आठ घातली पाहिजे... शेतकरी संघटनेच्या काय मागण्या आहेत... त्यांच्या सूचनेचे आदर करून... त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देता येईल...
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के आर्णी बोरगांव में स्मार्ट मीटर शुरू भी नहीं हुआ, 1070 रुपए का बिल आ गया

Yavatmal, Maharashtra:राज्यात स्मार्ट मीटर लावण्यावरून मोठा विरोध होत असताना त्याचप्रमाणे मीटर बसविणाऱ्या संबंधित कंपनीच्या गलथान कारभारराबाबत तक्रारी पुढे येत असताना आता या स्मार्ट मीटरने कमालच केली आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्या पूर्वीच त्याला विजेचे बिल पोहोचले आहे. सुरेश आडे या ग्राहकाने तीन महिन्यांपूर्वी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला, घरी स्मार्ट मीटर आणण्यात आले. मात्र मीटर अद्याप सुरूही झालेले नसताना, कुठल्याही विजेचा वापर केला नसताना त्यांच्या नावावर तब्बल 1 हजार 70 रुपयांचे वीज बिल आल्याने ते आश्चर्यचकित झाले आहेत. मीटर सुरूच झाले नाही, मग विजेचा वापर केला कोणी आणि बिल आले कसे? असा संतप्त सवाल आडे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
0
0
Report

सातारा के स्कूल के नववीं कक्षा के छात्र स्वप्नील आवकिरकर की हृदयाघात से मौत, गाउँ में शोक

Satara, Maharashtra:सातारा: ठोसेघर येथून शिक्षणासाठी दररोज पहाटे क्लासला जाणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयातील नववीचा विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकिरकर याचे अवघ्या 15 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घालामुळे आवकिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालेय वयातील उमद्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात आणि विद्यालयात तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report

भीषण बारिश से वेण्णा तालाब पूरी तरह भर गया, महाबळेश्वर-पाचगणि में पानी समस्या समाप्त

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरु आहे. या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.आज सायंकाळी चार वाचण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आणि नौकावiharासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

उच्चदाब टॉवर के लिए खोदे खड्डे में डूबे एक मजदूर की मौत, वसई

Vasai-Virar, Maharashtra:उच्चदाब टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू वसई पश्चिमेच्या मधुबन परिसरातील घटना वसई पूर्व च्या मधुबन येथील सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात एका भीषण अपघातात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक २० वर्षीय मजूर बुडून मरण पावला. मृताची ओळख सुमित कुमार सुरेश मंडल (२०) अशी असून, तो मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील होता. सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात उच्चदाब टॉवर बसवण्यासाठी एमएसईबीच्या (MSEB) डीसीएल (DCL) कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सुमित मंडलचा मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ, रितेश कुमार सुरेश मंडल (२४) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, सुमित कंपनीच्या साइटवर काम करत होता आणि कर्तव्यावर असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसई तालुक्यात पावसाचा हा दुसरा बळी आहे ..
0
0
Report

चंद्रपूर शहर महापालिका की आमसभा रद्द करने के निर्णय पर भाजपा के दो गुटों के बीच टकराव, किशोर जोरगेवार की प्रतिक्रिया

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपाची आमसभा रद्द करण्याप्रकरणी मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी करण्यात आली, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपचं दोन गटांच्या राड्या संदर्भात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्यावरून भाजपचे दोन गट चंद्रपूर महापालिकेतच भिडले. मूळ मुद्दा स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ स्वीकृत सदस्यांची दोन नावे मर्जीतील नव्हती म्हणून सभा रद्द करण्याची कृती म्हणजे मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी केली असे म्हटले. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

राम मंदिर ट्रस्ट के कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी पर आरोप, परिवार दावा मजबूत

Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून सुरू झालेला स्वामीजींचा आध्यात्मिक प्रवास नेमका कसा घडला. या स्पेशल रिपोर्ट ... बेलापूरच्या साध्या घरातून सुरू झालेला प्रवास देशातील सर्वात मोठ्या धार्मिक प्रकल्पाच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचला. आजही आपल्या मूळ गावाशी जोडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर आरोपांचे सावट असले तरी सत्य काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरच्या मातीतून घडलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज आज राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे धार्मिक नेतृत्व मानले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव जितका मोठा आहे, तितकीच सध्या त्यांच्याभोवती सुरू असलेली चर्चा देखील महत्त्वाची ठरत आहे. आता तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top