icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोरेगांव के 20 हजार लाभार्थी अब घर-घर आधार-कार्ड पाएंगे, शिंदे का नया कदम

Mumbai, Maharashtra:मुंबई | गोरेगाव ज्या पद्धतीने नागरिक नाही विद्यार्थी सुद्धा शिवसेना जनतेच्या दारी शामिल झाले आहेत 20 हजार लाभार्थी याच दाखल्याच वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहे नागरिक विद्यार्थी यांच्या गरजा त्या शिवसेनेनी ओळखल्या आहेत गरजा थेट पोचवण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम इथे नाही थांबणार दर 3 महिन्यांनी हा उपक्रम होणर आधार कार्ड ,पण कार्ड ,उत्पन्नाचा दाखल या दाखल्यासाठी तहसीलदार ऑफीस कडे जाव लागत ते आता घरपोच करून देणार आहोत जनतेला हेच पाहिजे त्यांचा वेळ वाचावा आणि शासनाच्या दारी फेरफटका मारू नये शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम हाती घेतला आहे रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत भविष्यात ड लिमिटेशन झालं पक्षाने संधी दिली तर नकीच दिल्लीत जायला आवडेल ब्रेक सिद्धेश कदम यांचं खासदारकी बाबत मोठ विधान सिद्धेश कदम यांनी खासदारकी बाबत व्यक्त केली इच्छा गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांन सोबत संवाद साधताना व्यक्त केली इच्छा भविष्यात डीलिमिटेशन झालं पक्षाने संधी दिल्ली तर दिल्लीत जायला आवडेल रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत
0
0
Report

गणेशोत्सव से पहले चिपळूण पुल खुलने की उम्मीद धूमिल, अप्रोच रोड देरी में

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूण उड्डाण पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात; मात्र ॲप्रोच रोडमुळे गणेशोत्सवाची डेडलाईन हुकणार मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील वशिष्ठ नदीवरील आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बहादूर शेख नाका येथील अखेरचा ४0 मीटर लांबीचा गर्डर चढविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे संकेत दिले होते. मात्र पुलाचे मुख्य काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी ॲप्रोच रोडचे काम अद्याप रखडले असल्याने गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या पुलावरून डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे बंधुओं की विजय तिरंगा रैली को देशभर से समर्थन मिला

Yeola, Maharashtra:मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा खांद्यावर घेत काढलेल्या विजय तिरंगा रॅलीला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. या रॅलीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला शहरात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे स्वागत केले. धर्मेंद्र झाकी आणि नरेंद्र झाकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. येवल्यातील या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ठाकरे बंधूंयांच्या विजय तिरंगा रॅलीला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
0
Report
Advertisement

कण्हेर डैम 93% भरे, वेण्णा नदी में 3600 क्यूसेक विसर्ग से सतर्कता बढ़ी

Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. कण्हेर धरण 93 टक्के भरले असून धरणाचे दोन दरवाजे उघडून त्यांतून 3 हजार क्युसेक वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहातून 600 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील मान खटाव,या भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.याचाच कण्हेर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
0
Report

रत्नागिरी में 95% धान की रोपाई पूरी, इस साल उत्पादन की उम्मीद तेज

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत भातलावणी अंतिम टप्प्यात; ९५ टक्के लागवड पूर्ण कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भातलावणीची कामे काहीशी रखडली होती. मात्र जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीला वेग दिला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९५ टक्के भातलावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडही अंतिम टप्प्यात आहे. पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
0
0
Report
Advertisement

सातारा में टेस्ट ड्राईव के नाम पर थार चोरी: आरोपी गिरफ्तार

Satara, Maharashtra:सातारा :गाडी खरेदीच्या बहाण्याने महिंद्रा शोरूममधून टेस्ट ड्राईव्हसाठी थार गाडी घेऊन पसार होणाऱ्या सोहेल अफजल बागवान (वय २८, रा. सोलापूर) या आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने सोलापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून ३२ लाख रुपये किमतीच्या दोन थार गाड्या जप्त करण्यात आल्या असून सातारा आणि चाकण पोलीस ठाण्यातील फसवणुकीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ५ जुलै रोजी सातारा येथील शोरूममधून गाडी पळवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही धडक कारवाई केली. वाहन खरेदी-विक्री करताना नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0
0
Report

पवना के जंगल-झरनों में बारिश के बीच फिर से बहे धबधबे, पर्यटक खुश

Varsoli, Maharashtra:पवना परिसरात धबधब्यांचा मनमोहक धबधबे -डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालू लागले Anchor : पवना धरण परिसरात निसर्गाची मनमोहक उधळण! सध्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, पवना धरण 97 टक्के भरले असून त्यामुळे परिसरातील नैसर्गिक धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. डोंगरमाथ्यावरून खळखळून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातून खाली झेपावताना पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण एक हिरवेगार स्वर्ग बनले असून, लोणावळा हाऊस फुल्ल होताच पावसाळी सहलीसाठी हे उत्तम पर्याय ठरत आहे
0
0
Report
Advertisement

अकोला के मोहसीन शेख के निधन पर शिंदे ने संवेदना जताई, परिवार को सहायता

Akola, Maharashtra:Anchor : शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे अकोला जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि तळमळ पुन्हा एकदा समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी उपचाराबाबत सातत्याने आढावा घेत नागपूर येथे उपचारासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान मोहसीन शेख यांचे निधन झाले.या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहसीन शेख यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.संकटाच्या काळात कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.अकोला जिल्ह्याचे विशेष प्रभारी ललित वानखेडे हे या संपूर्ण घटनेत एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते..दरम्यान, मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांनी या अपघातप्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

डिंभे डैम ओवरफ्लो: घोड़ नदी में 4800 क्यूसेक विसर्जन शुरू

Shirur, Maharashtra:डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले घोड नदीपात्रात ४८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात ४८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

ठाकरे भाइयों की मुंबई जल्लोष सभा के लिए समर्थक कल्याण से ट्रेन रवाना

Kalyan, Maharashtra:कल्याणहून मनसैनिक शिवसैनिक ट्रेनने निघाले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्या नंतर ठाकरे बंधुंकडून मुंबईत जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने निघाले आहेत. कल्याणमध्ये मनसैनिक लोकल ट्रेनने जल्लोष सभेसाठी शिवतीर्थावर निघाले आहेत. आदेशाप्रमाणे पक्षाचा झेंडा न घेता फक्त तिरंगा घेऊन हे मनसैनिकांन निघाले आहेत. आपल्या देशातील विद्यार्थी आणि तरुणांनी या सरकारला नमवलं आणि त्यामुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये जल्लोष सभेचे आयोजन केलं आहे, त्या सभेला आम्ही मोठ्या संख्येने निघालो आहोत असं मनसैनिक सांगतात. शिवाय दोन्ही बंधू पुन्हा एकत्र असल्याने महाराष्ट्रात एक वेगळे चित्र निर्माण होईल अशी आशा या मनसैनिकांना आहे .सध्या हे सगळे सैनिक लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेला रवाणा झालेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top