icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती में 35 दिन से बारिश नहीं: खरीप फसलों पर भारी असर

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात 35 दिवस पावसाची दडी; सहा तालुक्यांत सरासरीच्या 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 35 दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये केवळ 25 ते 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. 6 तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ 50 टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. सलग पावसाच्या खंडामुळे नगदी पीक असलेले सोयाबीन मोठ्या प्रमाणात हातचे गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा आता प्रामुख्याने कपाशी आणि तुरीला होणार आहे.. पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून तूर आणि कपाशीच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे. एकूणच पावसाच्या तुटीमुळे अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात सापडला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे..
0
0
Report

गोंदिया में गणेश उत्सव के उत्साह के बीच रूट मार्च से सुरक्षा का संदेश

Bhandara, Maharashtra:गोंदिया शहर पोलिसांचा रूट march शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन गणपती उत्सवानिमित्त गोंदिया शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरातील प्रमुख बाजार परिसरातील मुख्य मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच गणेश मंडळांच्या परिसरातून पोलिसांनी संचलन केले. गणपती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
0
0
Report

पाकिस्तानी हैंडलर से धमकियाँ देने वाले आरोपी की मुंबई में गिरफ्तारी

Satara, Maharashtra:सातारा: मुंबईतील एका व्यावसायिकाला धमक्या दिल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन या ३९ वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीचे पाकिस्तानमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'शी थेट संबंध असल्याचे उघड झाले असून, त्याचा भाऊ याच संघटनेत कमांडर आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलरशी संपर्क साधून धमक्या दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल व एक डायरी जप्त केली असून, या रॅकेटमधील अन्य सहकाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम के पांगरी-धनकुटे मार्ग की दुरुस्त नहीं, ग्रामस्थों ने प्रशासन विरोध किया

Washim, Maharashtra:वाशिम के मालेगाव तालुक्यातील पांगरी धनकुटे ते काटा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वेळा करण्यात आली, मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी टाकून रस्ता तयार करण्यात आला असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच जवळच रेल्वे स्टेशन असल्याने अनेक नागरिक या रस्त्याचा प्रवासासाठी वापर करतात. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावरच बसून प्रशासनाचा निषेध केला असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

अमरावती के आश्रमशाळेत विद्यार्थी की मौत: शवविच्छेदन के बाद सच उजागर होगा

Amravati, Maharashtra:26 दिवसांनंतर राजेश बेठेकरचा कुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर; राजेशच्या मृत्यूचे गूढ उलगडणार अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. तब्बल 26 दिवसांनी राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून या अहवालानुसार राजेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. राजेशच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचेही गंभीर आरोप झाले आहेत. अमरावतीचे अपर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत यांनी आश्रमशाळेची पाहणी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवास, शालेय गणवेश आणि औषधोपचार यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले होते. आता शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजेशच्या मृत्यूचे खरे कारण काय? आणि या प्रकरणात दोषी कोण? याचा उलगडा अहवालानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का याकडेही मृताच्या कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

धुळे में फिर बारिश से खरीफ फसलों को मिली नई उम्मीद; किसान उत्साहित

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने माना टाकलेल्या पिकांना काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध भागांत पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचले. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. पावसाअभावी अनेक भागांतील पिके कोमेजण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांच्या वाढीसाठी अद्यापही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाचे आता जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव के लिए एसटी बसों की कमी, मुंबई-ठाणे में यात्रियों को भारी देरी

Yeola, Maharashtra:मुंबई, ठाणे येथून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यातील विविध एसटी आगारांमधून मोठ्या संख्येने एसटी बसेस मुंबई और ठाणे परिसरात पाठवण्यात आल्या आहेत परंतु, या बसेस संबंधित आगारातून रिकाम्या पाठवण्यात आला एसटी बसेसची संख्या कमी झाल्याने अनेक मार्गांवर प्रवाशांना तब्बल एक ते दोन तास बसची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, वेळेवर इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण झाले तसेच याचा सर्वाधिक फटका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसत आहे. शाळा-कॉलेजला जाण्यासाठी तसेच सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनीही नाराजगी व्यक्त केली
0
0
Report

बुलढ़ाणा मंत्री के बयानों पर हंगामा, महिलाओं के सम्मान पर सवाल

Buldhana, Maharashtra:ऑन दुष्काळसदृश्य परिस्थिती.. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्यासोबत बैठक झाली. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होतील, असे वाटते. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसावरून आ. गायकवाड यांनी केलेल्या आरोपाबाबत आ. महाले म्हणाल्या की, या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन विद्याधर महाले यांच्या मित्र परिवाराने केले होते. मित्रपरिवार स्वतःच्या खर्चाने वाढदिवसाच्या सहभागी झाला, त्यामुळे कुठलाही खर्च झालेला नाही. ऑन बाप अजून मैदानात... कोण आहे बाप? माझ्यासाठी जनताजनार्दन मायबाप आहे. मी बुलढाण्याची सून तर चिखलिची लेक आहे. त्यामुळे बुलढाणाकराची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे. मला एकच सांगायचं आहे कुठल्याही, दडपशाहीला बळी पडू नका. ऑन बाप तो बाप रहेगा डान्स.. बाबा सारखं शरीर कोठून आणणार? हे महिलांबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे. तुम्ही आमदार जरी असले तरी तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार नाही.
0
0
Report
Advertisement

विरार में भारी बारिश से जलभराव, मुंबई-आहमदाबाद राजमार्ग पर पानी भर गया

Vasai-Virar, Maharashtra:विरार गणपती उत्सवासाठी विरारहून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुसळधार पडणाऱ्या पावसाने वाट अडवली विरार कडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे गुडघाभर रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहनांची गती मंदावली असून अनेक वाहने साचलेल्या पाण्यात अडकली आहेत वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पडायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे
0
0
Report

सोलापूर के दुष्काळ में किसान संकट, जिलाधिकारी ने खरीफ फसलों पर समीक्षा शुरू की

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरु, जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर - यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी मोठ्या संकटात - जिल्ह्यातील मुख्य तालुक्यांमध्ये खरीपाची पिके वाया - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने माहिती गोळा करण्यास सुरुवात - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी एकत्रितपणे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिकांची केली पाहणी - जिल्ह्यातील खरीपांची अवस्था बिकट असून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामाकडे लक्ष द्यावे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन - सरकारकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे आश्वासन अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top