icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर 57 हजार किसानों के लिए दुर्घटना बीमा योजना शुरू

Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ च्या उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील 57 हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. स्वातंत्र्य सैनिक स्व. बंकटलालजी भूतडा ट्रस्टच्या माध्यमातून प्रति शेतकरी दोन लक्ष रुपये प्रमाणे 1140 कोटी रुपयांचा हा अपघात विमा 22 ऑगस्ट पर्यंत काढण्यात येणार आहे. यातील 100 शेतकऱ्यांना 'विमा करार पत्राचे वितरण आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. शेती काम, रस्ता अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश आणि विंचू दंश अशा सर्व प्रकारच्या अपघाताचा समावेश या योजनेत आहे. या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
0
0
Report

अंधेरी वेस्ट में संदिग्ध बैग मिला, सुरक्षा टीमें पहुंची, जांच शुरू

Mumbai, Maharashtra:मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर बेवारस बॅग आढळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची नाकेबंदी करून बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर बॅगेमध्ये कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement

मनचर थाना में अजित पवार की जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम

Ambegaon, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्यातही जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंचर पोलीस ठाण्यात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान, प्रशासनातील कामकाजाची शैली आणि जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
0
0
Report

जालना में BJP-Congress भिड़ंत: कल्याण काळे के कार्यालय के पास प्रदर्शन

Jalna, Maharashtra:जालना : काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालया समोर भाजपचं आंदोलन जंतर मंतर वरील आंदोलनाला कॉंग्रेसची फुस-गोरंटयाल भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते आमने-सामने दोन्हीही पक्षां कार्यकर्त्यांच्या एकमेकांविरोधात घोषणा अँकर : जालन्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या जालन्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते समोरा समोर आले.यावेळी दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते समोरे समोर आल्यानं दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधी घोषणा बाजी केली.त्यामुळे काहीसा तणाव काळे यांच्या कार्यालया समोर पाहायला मिळाला.काळे यांच्या कार्यालया समोर भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फुल्या मारलेल्या प्रतिमा हातात घेऊन आंदोलन केलं.तसेच काँग्रेस नेते आणि पक्षाविरोधात जोरदार आंदोलन केलं.तसेच जय श्रीराम अशी घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासाबाहेर कॉंग्रेसने काल केलेल्या आंदोलनाचा जाहीर निषेध नोंदवला.दरम्यान जंतर मंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने फुस लावल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे.कॉंग्रेसचे कार्यकर्ते पप्पू असल्याचं सांगत लोकसभेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याऐजी पंतप्रधानांच्या घरासमोर यांनी आंदोलन केलं.त्याचा आम्ही निषेध करत असल्याचं गोरंटयाल म्हणाले. बाईट : कैलास गोरंटयाल माजी आमदार बाईट भास्कर दानवे, महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा
0
0
Report
Advertisement

राहुल गांधी की नौटंकी पर भाजपा नेताओं का तीखा हमला

Nagpur, Maharashtra:नागपूर - आ परिणय फुके - भाजप नेते नागपूर - आ परिणय फुके - भाजप नेता का बयान नागपूर - आज का कार्यक्रम संदीप जोशी यांच्या माध्यमातून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. हजारो ماڻهو शुभेच्या आणि आशिर्वाद देण्यासाठी आलेत. आजचा दिवस सेवा दीन म्हणून साजरा होतोय.. राज्यात बहुजन समाज और ओबीसी समाजाच्या हितासाठी आतापर्यंत 56 जीआर निघाले त्यापैकी 54 जीआर देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत.. म्हणून ते बहुजन नायक आहेत.. ते नेहमी बहुजन समाजासाठी झटत असतात.. राहुल गांधी आंदोलन - काँग्रेसचे अस्तित्व आज संपुष्टात आला आहे.. राहुल गांधींची ही नौटंकी आहे.. काँग्रेसकडे क्षमता, नेता, कार्यकर्ता आणि त्यांचा विश्वास संपलेला आहे.. त्यांनी विद्यार्थ्यांचा सहारा घेऊन नौटंकी करत आहेत.. त्यांची क्षमता असती तर ते स्वतः आंदोलन उभारून स्वतः पुढाकार घेतला असता.. जेव्हा विरोधी पक्ष संपुष्टात येतो तेव्हा असे काहीतरी स्वयंपूर्तिने विषय घेऊन विरोधक आंदोलन करतात.. हा राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षांचा अपयश आहे.. उद्धव ठाकरे केजरीवाल भेट - उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचं राजकीय अस्तित्व संपला आहे.. तीन खासदार घेऊन दुसऱ्या आंदोलनाचा सहारा घेऊन स्वतः चर्चेत राहण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.. मला त्यांची दया येते.. अशा आंदोलनातून कोणताही फायदा होणार नाही.. केजरीवाल हे आंदोलनातून समोर आले आहे.. भ्रष्टाचाराचा आरोप करत ते स्वतः भ्रष्टाचारात विलीन झाले.. म्हणून अशा आंदोलनाचा मतदानात काही फरक पडत नाही..
0
0
Report

कांदिवली वेस्ट के लोखंडवाला में आइसक्रीम दुकान में रात हुई मारपीट, दुकानदार-कर्मचारियों में दहशत

Mumbai, Maharashtra:कांदिवली पश्चिमेतील लोखंडवाला परिसरातील नॅचरल आईस्क्रीमच्या दुकानात रात्री उशिरा घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानाचे मालक अनिल पई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एका ग्राहकाने आईस्क्रीम खरेदीसाठी दुकानात प्रवेश केला. मात्र त्याने मागितला फ्लेवर उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर संबंधित ग्राहक संतापला. कर्मचाऱ्याने माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही ग्राहकाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्राहकाने कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चित्रीत करत त्याचे गाव विचारले. कर्मचारी उत्तर प्रदेशातील असल्याचे समजताच ग्राहक अधिक आक्रमक झाला आणि त्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्याला मराठी भाषा येत नसल्याने तो काहीही बोलू शकला नाही. त्यानंतर ग्राहक दुकानाबाहेर गेला, परंतु काही वेळाने पुन्हा परत येत थेट दुकानाच्या स्टाफ रूममध्ये घुसला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दुकानाचे मालिक अनिल पई यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप या घटनेत एफआयआर नोंदविण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

नंदुरबार से धुळे जा रही शिवशाही बस में अचानक आग, शॉर्टसर्किट से लगी आग; कोई घायल नहीं

Dhule, Maharashtra:धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबार वरून धुळे्याकडे येणाऱ्या एका शिवशाही बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती वाहन चालकाने दिली. बस चालकाच्या प्रसंग अवधानामुळे सुदैवाने कोणतीही चिवित हानी झालेली नसली, तरी बसचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबांना तात्काळ पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
0
0
Report
Advertisement

ब्रेक फेल से BMW कार का हादसा; चालक समेत दोनों सुरक्षित

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. ब्रेक फेल झाल्याने नवशी पूल फाट्याजवळ BMW कारचा अपघात; दोघेही सुखरूप खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एका BMW कारचा आज सकाळी सुमारे १०:०० वाजण्याच्या सुमारास नवशी पूल फाट्याजवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील बॅरिगेटला जाऊन जोरदार धडकली. अपघातात कारचे नुकसान झाले असून वाहनात प्रवास करणारे दोघेही सुखरूप बचावले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
0
0
Report

देवेंद्र फड़णवीस के जन्मदिन पर मुंबई में 227 वार्डों में महिला कैंसर स्क्रीनिंग महाअभियान शुरू

Mumbai, Maharashtra:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे मुंबईच्या २२७ प्रभागांमध्ये ३० वर्षांवरील महिलांसाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे कर्करोग तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्तन कर्करोग प्राथमिक तपासणीसह वजन, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ’बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या ध्येयाने आयोजित या शिबिराचे घाटकोपर पूर्व येथे आयोजित शिबिराचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उद्घाटन केले. या वेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
0
0
Report
Advertisement

भाजपा ने भास्कर जाधव को महायुति में शामिल होने का ऑफर दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भाजपा की राजनीति पर गूगली! प्रमोद जठार ने भास्कर जाधव को 'महायुती' में आने की खुली ऑफर दे दी; चिपळूण में एकत्रित वृक्षारोपण करते हुए संकेत दिए.. अन Tukर अँकर कोकण के वरिष्ठ नेता और ठाकरे गट के विधायक भास्कर जाधव की नाराजी के चर्चाओं से अब राजनीतिक माहौल गरम हो गया है. प्रमोद जठार ने भास्कर जाधव को सीधे भाजपा में (महायुती) आने की खुली ऑफर दी है. भास्कर जाधव वरिष्ठ विधायक हैं और कोकण के विकास के लिए उनकी सत्ते की जरूरत बताई जा रही है. साथ ही दिल्ली के जोंतर-मंतर पर चल रहे आंदोलन पर बोलते हुए उन्होंने कांग्रेस और विपक्षी दलों पर कड़ा निशाना साधा.. प्रमोद जठार के वक्तव्यों के प्रमुख बिंदु.. १. भास्कर जाधव को भाजपा की ऑफर और उबाठा समूह पर टिप्पणी.. *ज्येष्ठ नेतृत्व का सम्मान..* भास्कर जाधव महाराष्ट्र के राजनीति के एक वरिष्ठ विधायक हैं और उन्होंने अपने अलग स्थान बनाया है.. *उबाठा समूह से अन्याय..* वे ठाकरे गट में हैं, उन्हें कोई बड़ा काम नहीं दिया जा रहा, विपक्षी नेता भी उन्हें नहीं चुनते, जिसके कारण वे नाराज हैं.. *योग्य निर्णय की समय..* जाधव का आयु बढ़ रहा है; भविष्य के लिए सही निर्णय चाहिए. भाजपा में उनका स्वागत है.. *कोकण के लिए जरूरत..* कोकण के विकास के लिए इस समय ऐसे सक्षम नेताओं की सत्ता में जरूरत है.. *एकत्रित वृक्षारोपण से राजनीतिक संकेत..* हमने मिलकर चिपळूण में एक ही पेड़ लगवाया है; यह भविष्य में चिपळूण और संपूर्ण कोकण को विकास के फल देगा, ऐसा संकेत जठार ने दिया. *जंतर-मंतर आंदोलन और विरोधी दलों पर घणाघात..* यह दिल्ली का विषय है और हम अभी स्थानीय स्तर पर हैं, स्थानीय मुद्दों पर जोर दें.. *देश की भलाई प्राथमिकता..* भाजपा और हमारे शीर्ष नेता राष्ट्रहित के निर्णय लेते हैं. *विरोधियों के चेहरे बेनकाब..* देश में विपक्ष के पास आज कोई सशक्त चेहरा नहीं बचा; बेनचेहरे की गठबंधन के नेताओं को चेहरा बनना पड़ा है.. *राहुल गांधी पर निशाना..* राहुल गांधी के नेतृत्व से कांग्रेस खत्म हो गई है, पर उनके गठबंधन में शामिल सभी मित्र दलों ने भी उन्हें साथ छोड़ दिया.. *NEET परीक्षा और पीएम मोदी पर विश्वास..* NEET विवाद पर जो भी उचित कदम उठाने हैं, वह पीएम नरेंद्र मोदी ठीक प्रकार से करेंगे. मोदी देश जनता के प्यार में हैं और वे अच्छे निर्णय लेते रहते हैं. *देश को अस्थिर करने की साजिश..* जंतर-मंतर के आंदोलन फंडेड हैं और देश को अस्थिर करने की बड़ी साजिश है; आंदोलन में शामिल कई देश-विघातक तत्व भी शामिल हैं.
0
0
Report

Ajit Pawar के नेतृत्व पर Bhaskar Jadhav की सख्त टिप्पणी, पेपरफुटी पर कड़ा एक्शन

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण | रत्नागिरी भास्कर जाधव नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे On अजित पवार: अजितदादा पवार अत्यंत नेमस्त आणि सर्वसमावेशक नेतृत्व होते; त्यांनी कधीही पक्षभेद केला नाही बारामतीतील असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, अजितदादांनी सर्वांची कामे प्रामाणिकपणे केली अजितदादांसोबत काम करताना प्रशासन, लोकसंपर्क आणि निर्णयक्षमतेचे अनेक धडे शिकायला मिळाले On व्हॉट्सॲप स्टेटस; भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटसच्या संदर्भातही भूमिका केली स्पष्ट राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात नीतिमत्तेचे अधःपतन होता कामा नये नीट पेपरफुटी प्रकरणावर भास्कर जाधव यांची कठोर भूमिका. पेपरफुटी करणारे जितके दोषी आहेत, तितकेच पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेणारेही दोषी On अजित पवार विमान अपघात: स्व. अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका ही घटना केवळ अपघात होती, असे अनेकांना वाटत नाही विमान दुर्घटनेच्या तपासाची दिशा आणि गती पाहता घातपाताचा संशय निर्माण होत आहे दुर्घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावे बाईट: भास्कर जाधव
0
0
Report

रत्नागिरी जिले के लिए ऑरेंज अलर्ट, आज भारी से अति भारी बारिश की संभावना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आज सकाळपासून पावसाची तुरळक सरींवर बरसात मात्र आज दिवसभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज गेल्या 24 तासांत सरासरी 47.98 मिलिमीटर पावसाची नोंद उत्तर रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस खेडमध्ये 24 तासांत सर्वाधिक 86.71 मिलिमीटर पावसाची नोंद दापोली, चिपळूण, राजापूर या तालुक्यांतही 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट सरींवर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून जून पासून आज पर्यंत जिल्ह्यात 46.49 टक्के पाऊस
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top