445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरावती में 29-30 जून भारी बारिश से नुकसान, 3 मौत, 70 घर ढहे
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात २९ ते ३० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान; पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू ७० घरांची पडझड, ४१ पशुधन दगावले, ५ गोठ्यांची पडझड याचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार तालुक्याला बसला असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीत बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असल्याचे या पुरामुळे ४१ पशुधन दगावले असून त्यात १ गाय, २० बकऱ्या आणि २० कोंबड्यांचा समावेश आहे. दरम्यान चांदूर बाजार तालुक्यात ७० घरांची पडझड होऊन नुकसान झाले असून त्यापैकी ६५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे ५ गोठ्यांची पडझड झाली असून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे. अंतिम अहवालानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.0
0
Report
अलिबाग खंडाळा में गुटखा माफियाओं पर बड़ी रेड, पांच लाख का माल जप्त
Chendhare, Maharashtra:अलिबाग तालुक्यात खंडाळा येथे अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याच्या बेकायदेशीर साठ्यावर मोठी धाड टाकत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी एका घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या गोण्या आणि बॉक्स आढळून आले. संपूर्ण साठा जप्त करून प्रशासनाने तो ताब्यात घेतला. या कारवाईसाठी अलिबाग पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. सायंकाळपर्यंत जप्त मुद्देमाल हलविण्याचे काम सुरू होते, पंचनाम्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या धाडीनंतर जिल्ह्यातील गुटखा साठेबाज आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.0
0
Report
तळकोकण के सावडाव जलप्रपात मानसून में प्रवाही, पर्यटकों के लिए नया आकर्षण
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असलेला निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहीत झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित धबध्यांच्या यादीत सावडाव धबधबा येतो त्यामुळे लाखो पर्यटकांची पसंती ही सावडाव धबधब्याला असते. याश्या वर्षी थोड्या उशिराने प्रवाहीत झालेल्या सावडाव धबधब्याचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या नजरेतून टिपलय परेश कांबळी यांनी तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
यवतमाळ में भूमिगत गटर परियोजना धीमी गति से, सड़कें खोदने से नागरिक परेशान
Yavatmal, Maharashtra:यवतम ahaa ल शहरात भूमीगत गटार योजना चे काम संथ गतीने व नियोजन शून्य पद्धतीने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या_three वर्षांपासून अनेक भागातील रस्ते मधोमध खोदून त्यात माती मुरूम टाकला जात असल्याने हे रस्ते अवकाळी पावसामुळे चिखलमय झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये जा करणे अवघड झाले आहे, धुळीचा देखील प्रचंड त्रास वाढला आहे. वाहनांचे अपघात देखील वाढले आहे. त्यामुळे खोदकाम करून पाईपलाईन टाकल्यानंतर हे रस्ते नीट बुजवावे व वेळेत ते पूर्ण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.0
0
Report
खटाव के वडूज में नकली उर्वरक-कीटनाशक का बड़ा साठा जप्त
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 30 लाख 60 हजार रुपयांचा संशयित बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान सुमारे 99 हजार 450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, कीटकनाशके आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतिक दिलीप काळे यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, रासायनिक खते नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू झाला, याचा तपास पोलीस आणि कृषी विभागाकडून सुरू आहे. तसेच बनावट खतांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.0
0
Report
चंद्रपूर जिले के सिंदेवाही के पास गिट्टी भरे ट्रक और एसटी बस की भिड़ंत; 6 यात्री गंभीर, 18 घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सिंदेवाही के पास गिट्टी भरे ट्रक और एसटी बस की भिड़ंत; 6 यात्री गंभीर, 18 घायल0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में आधे घंटे की भारी बारिश से शहर जलमग्न, यातायात बुरी तरह प्रभावित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झाले. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. कस्तुरबा चौक, श्रीकृष्ण टॉकीज भागात नाले अवरुद्ध झाल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढणे कठीण झाले. तर महत्वाचा चौक असलेल्या कस्तुरबा चौकात सखल भागात पाणी साचल्याने पायी चालणारे नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली. तुकुम भागात पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ठिकठिकाणी जलकोंडी झाल्याने महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.0
0
Report
2 लाख टन प्याज खरीदी शुरू, मूल्य स्थिरीकरण के लिए नाफेड एनसीसीएफ
Lasalgaon, Maharashtra:केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदाही नाफेड एनसीसीएफ मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत खरेदी सुरू असून या खरेदी बाबत माहिती घेण्यासाठी व सूचना देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिव आणि नाफेड एनसीसीएफ चे जिल्ह्याचे मॅनेजर यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी थेट बाजार समितीत शासकीय खरेदी बाबत माहिती शेतकऱ्यांना समजावी यासाठी मोठा फलक लावावा तसेच बाजार समितीचे कामकाज संपल्यानंतरही शासकीय खरेदी ही सुरू ठेवावी असे सांगत बाजार समित्यांमध्ये कमी बाजारभावाने कांद्याची खरेदी सुरू होती त्यात 50 टक्के दर वाढवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले0
0
Report
नागपुर में होटल हेरिटेज के हुक्का पार्लर पर भारी छापेमारी, 45 गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील हॉटेल हेरिटेज येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) पथकाने मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत एकूण 45 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 36 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. * कारवाईदरम्यान 13 हुक्का पॉट्ससह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.. * या मुद्देमालाची किंमत सुमारे ₹23 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. * याप्रकरणी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखل करण्यात आला आहे. * तसेच घटनास्थळी ड्रग टेस्टिंग किटच्या साहाय्याने नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर महापौर ने अचानक आमसभा रद्द की; सदस्य चयन विवाद के कारण टला
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर महानगरपालिकेची उद्या होणारी आमसभा महापौर संगीता खांडेकर यांच्या आदेशाने अचानक करण्यात आली रद्द, स्वीकृत सदस्यांची होणार होती निवड चंद्रपूर महानगरपालिकेची उद्या होणारी आमसभा महापौरांनी आदेशाने रद्द केली आहे. सभा रद्द करण्यासाठी महापौरांनी काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद हायकोर्टात प्रलंबित असून या संदर्भात कोर्टाने दिलेला स्थगिती आदेश प्राप्त झालेला नाही आणि या संदर्भात स्पष्टता नसल्याचं कारण दिलं आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांना उद्या स्वीकृत सदस्य म्हणून मंजुरी मिळू नये म्हणून महापौरांनी आमसभा रद्द केल्याची चर्चा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक असलेले बलराम डोडानी आणि तुषार सोम या दोघांनी आज स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांची देखील सही आहे. उद्या होणाऱ्या आमसभेत बलराम डोडानी आणि तुषार सोम यांनाच संधी मिळण्याची शक्यता असल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या तंबूत खळबळ उडाली. त्यामुळे उद्याची आम सभा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.0
0
Report
नवी मुंबई अस्पताल में गर्भवती महिला की मौत, डॉ भावना पगारे का निलंबन
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या रुग्णालयात काल बुधवारी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ऐरोली माता बाल रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर बुधवारी दुपारी नेरुळ एल.पी. नाका इथं दोन विद्यार्थिनींना साचलेल्या पाण्यात विद्युत धक्का लागला. वीजजोडणीच्या मीटरमधून जाणाऱ्या आउटगोइंग केबलपैकी एका केबलचे इन्सुलेशन तुटलेले होते. या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने परिसर विद्युतभारित होऊन या विद्यार्थिनींना विद्युत धक्का लागला. हा पथदिवा वीजजोडणी व त्यावरील आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची व देखभालीखाली असून या प्रकरणाचा ठपका ठेवत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाढे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.0
0
Report
चंद्रपुर के भीतर भाजपा कलह: सुधीर मुंगंटीवार बनाम किशोर जोरगेवार, अजय सरकार को तड़ीपार की मांग
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात आ. सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. किशोर जोरगेवार यांच्या भाजपच्या अंतर्गत संघर्षाचं आणखी एक उदाहरण समोर आलं. आमदार किशोर जोरगेवार समर्थकांनी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून भाजपचे बंगाली समाज आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय सरकार यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली. अजय सरकार आहेत सुधीर मुनगंटीवार समर्थक. चंद्रपूर जिल्ह्यातील संघर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मुद्द्यावरून अजय सरकार यांना उमेदवारी देण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दोन तंबूत मोठा संघर्ष झाला होता. जोरगेवार समर्थकांनी पुन्हा एकदा अजय सरकार यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हवाला देत त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली. अजय सरकार यांच्यावर 33 गुन्हे दाखल असून त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील सामान्य नागरिक, विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप जोरगेवार गटाच्या नेत्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.0
0
Report
Advertisement
मनसे ने पालिका आयुक्त के दालनात प्रदर्शन किया; भावना पगारे को निलंबित किया गया
Navi Mumbai, Maharashtra:गर्भवती महिला सोनम डोंगरे मौत प्रकरणी आज मनसे ने देखील पालिका आयुक्त कैलास शिंदे के दालनात आंदोलन केले. यावेळी शर्ट काढून आयुक्तांकडे भीरकवण्याचा प्रयत्न केला तर शर्ट काढत ठिय्या आंदोलन केले. पालिका आयुक्तांनी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ भावना पगारे यांना निलंबित केले असल्याची माहिती दिली. तसेच इंजेक्शन देखील एफडीए ला देण्यात आले असल्याचे सांगितले. एकंदरीत हे इंजेक्शन आधी का बंद गेले नाही, मार्च महिन्यात देखील याच इंजेक्शन ने प्रतीक्षा खांडेकर या गरोदर महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनसे ने दिली. चार बळी जाईपर्यंत पालिका आणि सत्ताधारी वाट बघत असल्याचे आरोप मनसे ने केले असू न याबाबत बातचीत केले आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी0
0
Report
चार अल्पवयीन लड़कियाँ बेपत्ता, कल्याण पुलिस ने राजस्थान से सुरक्षित बरामद
Kalyan, Maharashtra:शाळेत गेलेल्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरण कल्याण बाजारपेठ पोलिसांनी मुलींचा घेतला शोध,मुली पोलिसांच्या ताब्यात Anchor- कल्याणमधील नॅशनल उर्दू हायस्कूल या शाळेतील आठवी आणि नववीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. २९ जूनला शाळेत गेल्यावर त्या सायंकाळी घरी परतल्याच नाहीत. Vo- त्यामुळे त्यांच्या पालकांनी बाजारपेठ पोलिसात या संदर्भात तक्रार दिली .पोलिसांनी तात्काळ या संदर्भाचा गुन्हा दाखल करून चार विविध पथक त्यांच्या शोधासाठी रवाना केली. याच दरम्यान रेल्वे स्थानक, स्टेशन परिसर,शाळेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या मुलींचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान या मुली राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकातून या चारही मुलींना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतलं. या चारही मुली अजमेर येथे देव देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळते आहे. मात्र तरी देखील विविध अंगांनी या संदर्भाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे कल्याणला परत आणल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जातंय. Byte-अशोक होनमाने(Acp)0
0
Report
संसद में किसानों के सवालों के लिए केवल दो घंटे, सरकार की निष्ठा पर सवाल
Shirdi, Maharashtra:राहाता / अहिल्यानगर खासदार अमोल कोल्हे बाईट पॉईंटर ऑन शेतमाल हमीभाव संसदेत शेतकऱ्यांचा प्रश्नांवर चर्चेसाठी अवघे दोन तास देण्यात आले... सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे? हे लक्षात येते... हमीभावाच्या गाजर दाखवले जाते, मात्र वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार होत नाही... हमीभावाची फेररचना झाली पाहिजे... ऑन कर्जमाफी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका... निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला... आश्वासनाची पूर्तता करा, हीच विरोधी पक्षांची मागणी... ऑन ऑफर वक्तव्य आणि संजय क्षीरसाठ महाभारतातला एक संजय ऐकला होता... दुसरे आमचे संजूभाऊ दिसताय, ज्यांना सगळच दिसतंय... गमतीने बोललो तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होते... कालचे वक्तव्य हे केवळ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत होते... जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र... विश्वगुरु म्हणवणाऱ्या भारताला ही गोष्ट का शक्य होत नाही?... कोणतीही विचारणा झाली नसल्याची माहिती GMRT च्या अधिकाऱ्यांनी दिलीये... रेल्वे मार्ग कुणाच्या हितासाठी बदलला जातोय..? हा प्रश्न आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशात इंफ्रामॅन म्हणून ख्याती... पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच व्हावी यासाठी त्यांनी ताकद लावावी... ऑन ऑपरेशन तुतारी राष्ट्रवादीचे आठही खासदार ठामपणे एकत्र... पवार साहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण, हेच आमचं सूत्र... जनता ने ज्या कारणासाठी आम्हाला निवडून दिलंय, त्यासाठी आम्ही कार्यरत... कुठल्याही चर्चा आणि वावड्यांना महत्व द्यायची गरज नाही... Byte - खा.अमोल कोल्हे , राष्ट्रवादी शरद पवार गट0
0
Report
Advertisement
