Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम एपीएमसी 16 दिनों से बंद, किसान बोले- बाजार खोला जाए

GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 07:32:56
Washim, Maharashtra
वाशीम: अँकर:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने नाणेटंचाई व आर्थिक वर्षअखेरची कारणे देत 20 मार्चपासून बाजार बंद ठेवला आहे. पणनच्या नियमांनुसार सलग तीन दिवसांपेक्षा जास्त बाजार बंद ठेवता येत नसतानाही 16 दिवसांपासून बाजार बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊन त्यांना शेतमाल खाजगी बाजारात विकावा लागत आहे.या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघर्ष समितीचे पुरुषोत्तम जाधव यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Mar 30, 2026 09:04:16
Nanded, Maharashtra:Anchor - नांदेड शहरातुन तब्बल दिडशे मुलींना फूस लावून पळवून त्यांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा आमदार हेमंत पाटील यांनी अधिवेशनात केला. हेमंत पाटील यांच्या दाव्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये. Vo - यंदाच्या अधिवेशनात धर्म स्वातंत्र्य कायदा संमत करण्यात आला. या कायद्याच्या गरजेबाबत बोलताना विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी धक्कादायक दावा केला. नांदेड शहरातून गेल्या दोन वर्षात जवळपास दिडशे विद्यार्थिनींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याचे पाटील म्हणाले. नांदेड शहर कोचिंग क्लासेस चे हब बनले आहे. कोचिंग क्लासेसाठी राज्यभरातून इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. क्लासेसाठी येणाऱ्या दहावी बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनींना लक्ष्य करणारे टोळके त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्यासाठी फिरत असतात. मागच्या दोन वर्षात अश्याप्रकारे दिडशे मुलींना पळवून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये त्यांचे धर्मांतरन करण्यात आल्याच्या दावा पाटील यांनी केला. आपल्या एका मित्राच्या 14 वर्षाच्या मुकीला कलकत्याला पळवून नेण्यात आले. तिला कसेतरी परत आणण्यात यश आले. हे सर्व जाणीवपूर्वक सुरु असल्याचे पाटील म्हणाले. Sound Byte - हेमंत पाटील (अधिवेशनातील क्लिप) Vo - अधिवेशनातील या धक्कादायक दाव्याबाबत हेमंत पाटील ठाम आहेत. हा दावा नसून वास्तव असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. Byte - आ.हेमंत पाटील Vo - हेमंत पाटील यांच्या दाव्याबाबत पोलिसांनी कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले मात्र आकडेवारी दिली. मागच्या सहा वर्षात एकूण 690 मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारीची नोंद झाली. त्यापैकी 653 मुलींना शोधण्यात पोलीसाना यश आले. 37 मुली अजूनही मिसिंग असल्याची माहिती पोलीसांनी दिली. धर्मांतरन करण्यात आल्याची एकही तक्रार नसल्याचे पोलीसांनी सांगितले. आ.हेमंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे पालक वर्गात मात्र चिंतेचे वातावरण आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 30, 2026 09:00:36
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक, डॉक्टरांनी विनाशस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे काढले बाहेर अँकर:- लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षांच्या एका चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले. चंद्रपुरातील गॅस्टोएन्टेरॉलॉजी पोट, लिव्हर, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता, दुर्बिणीच्या साह्याने अत्यंत अचूकपणे हे लोहचुंबक बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिले आहे. चंद्रपुरातील सहा वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता. त्यावेळी त्याचे आई-वडील जवळ नव्हते. खेळता खेळता त्याने ते लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले. मुलगा रडत काही पोटात गेल्याचे पालकांना सांगितले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे हलविण्यात आले. विशेष म्हणजे, मुलाने घटनेच्या काही वेळ आधीच जेवण केले होते. अशा परिस्थितीत भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. मुलाची गंभीर स्थिती पाहता, डॉक्टरांनी वेळ न घालवता 'एंडोस्कोपी' करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही चिरफाड न करता आणि भूल न देता, केवळ २ मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने ते लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात आले. यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य शस्त्रक्रिया टळली. बाईट १) डॉ राहुल सैनानी, शल्यचिकित्सक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 30, 2026 08:48:53
Beed, Maharashtra:बीड: भाजपा आमदार सुरेश धस यांनी दीनदयाळ उपाध्याय अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पार पडले. या अभियानात भाजपा आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटातील गाणे गायले.. तुम तुम तारा रारा तुम तुम तारा.. या गीताचे बोल गायल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत दाद दिली. गीत गायनाबरोबर सुरेश धस यांनी स्वररंग कार्यक्रमात भीम गीतावर ठेका धरला. कडा येथील परमेश्वर मंगल कार्यालयात आष्टी आणि कडा मंडळाच्या आयोजनातील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महाभियान 2026’ अंतर्गत सांस्कृतिक सत्रात “स्वररंग” कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
589
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 30, 2026 08:46:08
Jalna, Maharashtra:जालना : आखाती युद्धाचा शेती क्षेत्राला चांगलाच फटका बसताना दिसून येतोय.डिझेलच्या तुटवडाअभावी शेतीमालांच्या मळणीच्या दरात वाढ झालीय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महागलीय.याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय. व्हिओ :१:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर परीणाम झाल्याचं चित्र भारतात पाहायला मिळतंय.याच युद्धाचा थेट फटका आता शेतीवर देखील झाल्याचं पहायला मिळतय. सध्या रब्बी पिकांची सोंगणी आणि मळणी करण्याचं काम वेगाने सुरुय.त्यात हवामान विभागानं 4 एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.त्यामुळे शेती पिकांच्या मळणीची जालना जिल्ह्यात एकच धांदल उडालीय.पण युद्धामुळे डिझेलचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसाठी कधी जवळून तरी कधी दूरवरून डिझेल आणावं लागतंय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महाग झालीय. बाईट :ज्ञानदेव गायके, शेतकरी, सोमठाणा(व्हाईट शर्ट) ग्राफिक्स व्हिओ :२: इंधन तुटवड्याअभावी शेतकऱ्यांना पिकांच्या मळणीसाठी लवकर ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर मिळत नाहीय.गेल्यावर्षी मका,हरभरा, ज्वारी,गहू पिकांच्या मळणीसाठी प्रति क्विंटल 250 ते 300 रुपये मोजावे लागत होते.यंदा याच पिकांची मळणी क्विंटलंमागे 100 ते 150 रुपयांनी महागलीय.यंदा ट्रॅक्टरद्वारे गहू मळणी करायचा असेल तर प्रतिक्विंटल 400 ते 450 ,हरभरासाठी 360,ज्वारीसाठी 350 ते 400 रुपये मोजावे लागतायत. तर हार्वेस्टरने गहू सोंगणी आणि मळणी करायचा असेल तर एकरी 3500 ते 4 हजार रुपये मोजावे लागत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. बाईट :दयाराम राठोड,मळणीयंत्र चालक(पिवळा शर्ट) बाईट : अनिल नागवे,शेतकरी(टी शर्ट असलेले ) व्हिओ :०३:इंधन टंचाई अभावी ट्रॅक्टरचालक आणि हार्वेस्टर चालक हतबल झालेत.त्यात पिकांच्या मळणीच्या भाववाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत.त्यामुळे इंधन तुटवड्याचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलीय.
647
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 08:21:02
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण चिपळूण दुय्यम निबंध कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा राडा चिपळूण तालुक्यात सावकारांकडून कर्जदारांकडून वाढीव व्याजदराने वसुली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पीडित कर्जदारांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालय गात्रत न्यायाची मागणी केली. दरम्यान, या घटनेवरून वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जोरदार राडा घातला. अधिकाऱ्यांना जाब विचारत सावकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वाढीव व्याजदराच्या जाचाला कंटाळलेले अनेक कर्जदार यावेळी एकवटले होते. संबंधित सावकारावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
995
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 07:19:58
Satara, Maharashtra:सातारा मिडिया ची जशी सूत्र असतात त्या प्रमाणे आमची सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे. सक्तीच्या रजेवर पाठवल आहे हे माध्यमांमध्ये देखील आले आहे. माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाहीत. त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे. या संदर्भात माहिती घेऊन आपल्याला वाटलंच तर प्रतिक्रिया देईन.. मीडिया नको तो भाग दाखवतो आणि बाकीची मुलाखत कट करतो असा अनुभव मला आहे. मीडिया सर्व निलंबना विषय दाखवणार असेल तर मी बोलतो. विधान मंडळामध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाचा निर्णय झाला. मात्र सभापती महोदयांनी हा निर्णय राखून ठेवला. उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली याबाबत सभापती महोदयांनी तज्ञांची माहिती घेऊन या प्रकरणावर निर्णय घेऊ.. उपसभापतींचे निर्देश माझ्या माहितीनुसार पारित झाले आहेत. मात्र सभापतींनी लावलेल्या तज्ञांचे निर्देश प्रलंबित आहेत. हे सर्व विधिमंडळाच्या कस्टडीत आहे. ज्यावेळेस कायदे तज्ञांचे निर्णय येतील त्यावेळेस सभापती महोदय निर्णय देतील.. या आधी याची चौकशी डिक्लेअर केली आहे. दोनन्ही विधिमंडळाने चौकशीचा अहवाल जो येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असं सांगितला आहे. माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या राजकीय अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू होते त्यावेळी त्या अधिकाऱ्याला त्या पदावर ठेवत नाहीत. त्याला जर ठेवले तर चौकशीत बाधा येऊ शकते. कदाचित ही चौकशी असेल त्यामुळेच त्यांना रजेवर जायला सांगितलं आहे。
1095
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 07:19:25
1099
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 30, 2026 07:05:07
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पाणीटंचाईमुळे म्हसळयातील ग्रामस्थ आक्रमक. खारगावच्‍या संतप्त ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा. सात दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्‍याचा इशारा. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हसला तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेले खारगाव खुर्दचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी म्हसला तहसील व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देत निषेध नोंदवला. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्‍या मतदार संघातील हे गाव आहे. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. या महिलांच्‍या डोक्‍यावरील हंडा उतरणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आंदोलनात एकही महिला सहभागी झाली नव्हती. आंदोलनाची धुरा महिलांनी खांद्यावर घेतली होती. पुढील 7 दिवसात पाणीपरवठा सुरळीत न झाल्यास गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
1084
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 30, 2026 07:03:37
1060
comment0
Report
Advertisement
Back to top