Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

100 करोड़ का मानहानि दावा: राजू पाटील राजे ने विजय वडेट्टीवार पर निशाना साधा

GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 13:32:42
Washim, Maharashtra
वाशीम: अँकर:कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानि दावा दाखल केला आहे.28 डिसेंबर 2025 रोजी वडेट्टीवार यांनी नकली नोटा प्रकरणावरून राजू पाटील राजे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.हे आरोप खोटे असल्याचे सांगत पाटील राजे यांनी 3 जानेवारी 2026 रोजी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून 15 दिवसांत माफी मागण्यास सांगितले होते.मात्र,माफी किंवा खुलासा न झाल्याने 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला.या प्रकरणात वडेट्टीवार यांच्यासह आणखी चार जण आणि एका वृत्तवाहिनीचा समावेश असून न्यायालयाने दावा स्वीकारून संबंधितांना नोटीस बजावली आहे.असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 14:31:50
Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर महानगरपालिका की नवनीत महापौर ज्योति गाडे ने पालिका के स्कूल को अचानक दौरा कर विद्यार्थियों के लिए अध्यापन का कार्य किया है। महापौर बनने के बाद ज्योति गाडे ने पालिका के विभिन्न विभागों पर ध्यान देना शुरू किया है। सुबह दस बजे ही पालिका में उपस्थित रहने के बाद देर से आने वाले कर्मचारियों को चेतावनी दी गई और आज उन्होंने पालिका की स्कूल का अचानक दौरा किया। शिक्षकों से स्कूल की समस्याओं के बारे में जानकारी ली, और फिर वे कक्षा में घुस कर विद्यार्थियों को पढ़ाने लगे। आप शिक्षा शास्त्र में डिग्रीधारक हैं, लेकिन राजनीतिक सफर के कारण आपको पढ़ाने का अवसर नहीं मिला; पालिका की शालाओं को सुधारकर अधिक से अधिक विद्यार्थियों को पालिका की शालाओं में पढ़ाने के प्रयास किए जाएंगे, ऐसा ज्योती गाडे ने कहा।
778
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 23, 2026 14:21:30
Wardha, Maharashtra:वर्धा स्वर्गीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप - दत्ता मेघे यांच्याच शेतात अखेरचा निरोप अँकर- माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर आज भावना येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मान्यवरांनी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण केली. दरम्यान, पोलीस विभागाकडून दत्ताजी मेघे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार आणि विधीनुसार भावना येथील त्यांच्या स्वतःच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
1063
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 12:05:51
Yeola, Maharashtra:दिवसेंदिवस कांदा व मका पिकाचे कोसळत असलेले भाव यामुळे बळीराजा आक्रोश करत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिकच्या येवल्यात भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून येवला प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पुरणगाव येथून 50 ट्रॅक्टर एकत्र करून रॅलीला सुरुवात झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः या ट्रॅक्टर रॅलीत उपस्थित असून या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या ट्रॅक्टरला कांदा व मका पिकांनी सजवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे.
1094
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 23, 2026 11:53:21
Nanded, Maharashtra:दोन गावांन वाद झाल्याची घटना काही नवीन नाहीत. मात्र चक्क शाळा कोणत्या गावाच्या हद्दीत आहे या विषयावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आमनेसामने आले. हा वाद थेट पोलीसांच्या दारातही पोहोचला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द या दोन्ही गावात शाळेची वर्गखोली पाडण्यावरून वादाची ठिणगी पडली. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्दच्या सीमेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेपैकी जुनी झालेली खोली क्रमांक एक पाडण्यास काल सुरुवात झाली. पण वर्गखोली आमच्या हद्दीत असल्याचे सांगत खोली पाडण्यास लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थानी विरोध केला. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द दोन्ही गावातील ग्रामस्थ एकमेकांसमोर आल्याने परिस्थिती तणावग्रस्त बनली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगी नसताना वर्गखोली पाडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार लोणी बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेने अर्धापूर पोलीसात दिली. खोली पाडण्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले. लोणी खुर्द शाळेत प्रयोगशाळा बांधण्यासाठी निधी आला. त्या ठिकाणी जुनी वर्गखोली पाडण्यात येत होती. तसे आदेश आमच्याकडे असल्याचे लोणी खुर्द च्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गाव नमुना 8 मध्ये खाडाखोड करून दोन वर्गखोल्या लोणी बुद्रुकच्या ताब्यात असल्याचे दाखवण्यात येत असल्याचा दावा लोणी खुर्दच्या ग्रामस्थानी केला. याबाबत त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण लोणी बुद्रुक च्या हद्दीतील वर्गखोली पाडल्याचा आरोप लोणी बुद्रुक च्या ग्रामस्थानी केलाय. पाडकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून लोणी बुद्रुकचा रस्ताही अडवल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शाळेच्या विषयावरून दोन गावं एकमेकां विरोधात उभे टाकली आहेत.
1069
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 11:16:35
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली; मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कडाडून विरोध केल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी शहरातील वाढत्या डासांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी सभेत केली. मात्र विषय वेळेवर उपस्थित केल्याचे कारण देत हा मुद्दा पुढील सभेत घेण्याची विनंती करण्यात आली. यामुळे विरोधी नगरसेवक संतप्त झाले आणि काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांनी आरोग्य अधिकाऱ्याला प्रतीकात्मक स्वरूपात मच्छर अगरबत्ती आणि दूषित पाण्याची बाटली भेट दिली. या प्रकारामुळे सभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
1063
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 23, 2026 10:35:31
Ranbambuli, Maharashtra:बदलत्या हवामानाचा हापूस ला फटका; तळकोकणातील शेतकरी हवालदिल तळकोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीला राजू शेट्टी; चक्का जाम करत वेधले सरकारचे लक्ष पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेल्या तळकोकणातील बागायतदारांना मिळणार का न्याय? मागणी मान्य न झाल्यास देवाभाऊंच्या घरात मोर्चा काढण्याचा शेट्टींचा ईशारा फळांचा राजा म्हणजे देवगडचा हापूस आंबा.. खवय्याच्या तोंडाला नेहमीच पाणी आणणारा हापूस ह्यावर्षी मात्र बागायतदारांच्या तोंडच पाणी पळवीणारा ठरलाय.. त्याला कारणीभूत वातावरणातील बदल ह्यावर्षी आंबा पिकाचे तब्बल 90 टक्के नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी राजू शेट्टीनी थेट तळकोकणात जात रास्ता रोको केला. येत्या दोन दिवसात न्याय देण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आश्वासन दिलंय. मात्र दोन दिवसात आशिवेशनात घोषणा न झाल्यास थेट देवाभाऊंच्या घरावर मोर्चा नेण्याचा थेट इशाराच राजू शेट्टीनी दिला.. तळकोकणात वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम थेट हापूस आंब्यावर झालाय. अनियमित पडलेला पाऊस उशिरा पर्यंत असलेली थंडी आणि सकाळीच पडणारे दाट धुके यामुळे आंबा पिकाला आलेला मोहोर पूर्णतः जळून गेला त्यामुळे ह्यावर्षी चांगल पीक मिळेल हया आशेवर असलेल्या आंबा बागायतदारांना मोठा धक्का बसला शासनाची मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याने आता मदत कोणाकडे मागायची हया विचारात असलेल्या बागायतदारांना अखेर साथ मिळाली ती शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची.. एलगार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणाऱ्या शेट्टीनी सरकारला जाग आणण्यासाठी थेट चक्का जाम आंदोलन छेडले तब्बल तीन तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरतं शेट्टी यांनी रास्ता रोको केला आणि त्यांना साथ मिळाली ती ठाकरे गटाची ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तर सरकार शेतकऱ्यांच आंदोलन दडपण्याचा आरोप केला आंबा पीक कमी येणार असल्याने चिंता ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करावी लागेल अशी चिंता भेडसावू लागली बागायतदार शेतकरी राजू शेट्टी यांनी तळकोकणातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या चक्का जाम आंदोलनाची दाखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व येत्या दोन दिवसात आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याबाबत घोषणा करण्याचे आश्वासन दिले व तसें पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शेट्टी यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी आंदोलकांना आश्वस्त केले असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे सांगितले तळकोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या राजू शेट्टी यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिलीय येत्या दोन दिवसात अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही तर थेट देवाभाऊंच्या घराला म्हणजे वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देत आंदोलन स्थगित केलेय. कितीही संकट आली तरीही कधीच न डगमगलेला तळकोकणातील शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झालाय.. राजू शेट्टीच्या मदतीने आंबा बागायतदारांनी मोर्चाचे शस्त्र तर उचललेय पण येत्या दोन दिवसात राज्य कर्ते कोणता निर्णय देतात? किती नुकसान भरपाई मिळते? दिलेला शब्द सरकार पाळणार का? याकडे तळकोकणातील शेतकरी आता लक्ष देऊन आहे उमेश परब सिंधुदुर्ग
1037
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 10:30:23
Niphad, Maharashtra:नाशिक जिले के निफाड में २४ दिनों से लापता महिला का शव जुना देवपूर रोड के पास स्थित एक कुएं से मिलने से क्षेत्र में हलचल मच गई है. प्रारम्भिक जांच में माना गया है कि रिश्‍ते और पैसे के लेनदेन के विवाद के कारण यह हत्या होगी. रंभाबाई आनंदा काळे, उम्र ६०, मामलादार चौक, निफाड में स्थानीय अस्पताल में काम करती थीं और २४ फरवरी से लापता थीं. उनके भतीजे प्रवीण घायाळ ने निफाड थाना में शिकायत दर्ज कराई थी. शिकायत के बाद पुलिस ने तकनीकी विश्लेषण और मोबाइल सीडीआर के आधार पर संदिग्ध की गिरफ्तारी का प्रयास किया. जांच में अरुण बाजीराव ढेपले को संदेह के घेरे में लाया गया. पूछताछ के बाद उसने महिला की हत्या कर शव को कुएं में फेंकने का स्वीकार किया. रविवार शाम को पुराने देवपूर रोड के पास के कुएं से शव निकाल लिया गया. वहीं, संदिग्ध ने विष पी कर आत्महत्या करने का प्रयास भी किया, जिसे अभी निजी अस्पताल में उपचार चल रहा है. निफाड थाना के प्रभारी निरीक्षक गणेश गुरव आगे की जांच कर रहे हैं. इस घटना से निफाड क्षेत्र में भय का वातावरण है. आगे भी इस मामले में और धागे निकलने की संभावना पुलिस ने जताई है.
959
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 10:21:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑटोमोबाइल प्रमाणे संभाजी नगर कंडोम उत्पादनात ही अग्रेसर आहे, एकूण 6 कंपन्यांद्वारे उत्पादन होते, मात्र युद्धाचा परिणाम आयात निर्यातीवर झाला आणि या कंपन्यांना सुद्धा फटका बसलाय, कच्चा मालाचे भाव वाढल्याने याचा परिणाम कंडोम चे दर वाढण्यावर ही होऊ शकेल असे चित्र आहे... युद्धाचा फटका कंडोम उत्पादनाला, कच्चा मालाचे दरात 50 टक्क्यांची वाढ, कंडोमचे दर वाढणार, निर्यात ही मंदावणार. युद्धाचे परिणाम सर्वच स्तरावर होत आहेत, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज वसाहतीत कंडोम उत्पादन करणारे 6 उद्योग आहेत यांनाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, कंडोम साठी लागणारा कच्चा माल युरोप सह आखाती देशा पलीकडून येतो मात्र होमुर्ज समुद्रधुनी मूळ शिपिंग बंद आहे परिणामी माल अडकला, त्यामुळं उपलब्ध मालाचे दर गगनाला भिडले आहेत, Lubricants ( silicon oil 50 टक्के दर वाढले ), अल्युमिनीम फाइल 3 लेअर -- 35 टक्के दर वाढले, पॅकेजिंग मटेरियल 15 टक्के दर वाढले, तर लॅटेक्सचे दर 27 टक्क्यांनी वाढले आहे, बरं दर वाढूनही माल म्हणावा तसा मिळत नाहीय त्यामुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे शक्य होत नाहीय, त्यामुळे उद्योगच अडचणीत आल्याचं कंपनी कर्मचारी सांगताय, एकीकडे कच्चा माल आयात कमी होतोय त्यामुळं इथून 38 देशांना निर्यात होतेय त्यावर सुद्धा नियंत्रण आल्याचं कंपनी व्यवस्थापक सांगताय, तर याच कंपनीत देश अंतर्गत 50 वर ब्रँड साठी उत्पादन होतेय त्यावरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळं उद्योग प्रचंड अडचणीतून जातोय असे सांगण्यात येताय, एकीकडे कच्चा माल दर वाढले असल्याने किमतीवर परिणाम होणार, तर दुरीकडे माल मिळाला नाही तर थेट उपलब्धतेवर ही परिणाम होईल असे चित्र आहे त्यामुळं आता कंडोम उद्योग ही युद्धा मुळे धोक्यात आले आहे...
1042
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 10:17:34
Jalna, Maharashtra:जालना | जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद,एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, दोघे गंभीर जखमी (पॅकेज) अँकर : जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकाची धारदार Shस्त्राने वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडलीेये.तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान पोलिसांकडून आता या प्रकरणातील आरोपींची शोधाशोध पोलिसांनी आता सुरू केलीय. व्हिओ :१:जालन्यातील मोतीबाग परीसरात रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. मात्र टकरी लावताना दोन गटात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.28 वर्षीयरवी अशोक लाड असं मयत तरुणाचं नाव आहे.या मारहाणीच्या घटनेत ईतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात काल रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वाद मिटवण्याच्या उद्देशाने एका गटाने दुसऱ्या गटाला बोलावून घेतलं आणि दोन्हीही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यातील रवी लाड (वय  याच्या पोटात धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.आणि त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  मात्र उपचारादरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. बाईट- प्रेम अशोक लाड, जखमी व्हिओ :०२: या मारहाणीत  20 वर्षाचा प्रेम लाड आणि दुसरा 20 वर्षाचा तरुण नरेश अवघड  हे सुद्धा जखमी झाले.या तरुणांवर सध्या जालन्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाईट : डॉ उनगे मेडिकल ऑफिसर,जिल्हा शासकीय रुग्णालय,जालना निळा शर्ट व्हिओ :०३:दरम्यान रेड्यांच्या टकरीवरून झालेल्या या राड्या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.सध्या पोलीस आरोपींचा शोध घेतायत.जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून होणाऱ्या वाद सध्या चर्चेचा विषय बनलाय.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासीयांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
989
comment0
Report
Advertisement
Back to top