Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

सांगोलाः बाबासाहेब देशमुख बनाम शहाजी पाटील, चुनावी जुगलबंदी तेज

SKSACHIN KASABE
Feb 03, 2026 04:31:34
Pandharpur, Maharashtra
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख विरुद्ध शिवसेना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामध्ये आता जुगलबंदी रंगली आहे. आमदार शहाजी पाटील माझ्या कार्यकर्त्याला तुरुंगात घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे. मला तुरुंगात घालून दाखवा असे जाहीर आव्हान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी पाटलांना दिला आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील सभेमध्ये माजी आमदार शहाजी पाटील यांनी शेकाप कार्यकर्त्याला निवडणुकीनंतर एक अर्ज दिला तर तुला तुरुंगात जावं लागेल असा इशारा दिला होता यानंतर आक्रमक झालेल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी थेट शहाजी बापू पाटलांना आव्हान दिलय मी गणपतरावांचा नातू आहे. माझ्या कार्यकर्त्याला तुरुंगात काय घालता मलाच तुरुंगात घालून दाखवा असं आव्हान दिले
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Feb 07, 2026 14:01:06
Thane, Maharashtra:भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर.. महापौर पदाच्या निवडणुकीत नवा वळण... अँकर.. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांना शनिवारी भिवंडी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांमध्ये निवडणुक निकालानंतर जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे ५१ जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून कोणार्क विकास आघाडीतील एकूण २३ जणांना तर भाजपच्या ३ जणांना अशा एकूण २६ जनांना भिवंडी न्यायालयातून जामीन मंजूर झाले आहे. माजी महापौर विलास पाटील यांना जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 07, 2026 13:47:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भरधाव क्रेटा कारमुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि विवाहित मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार तब्बल दहा ते पंधरा फूट दूरफेकले गेले, तर अपघातग्रस्त क्रेटा कार घटनास्थळीच उलटी झाली. राजारामपुरी आठव्या गल्लीत राहणारा 19 वर्षीय मयुरेश पाटील हा क्रेटा कार घेऊन शाहू मिल चौकाच्या दिशेने येत होता. शाहू मिल चौकात आल्यानंतर वाहनावरील त्याचा ताबा सुटला आणि कार थेट विरुद्ध दिशेला गेली. त्यामुळे समोरून तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना क्रेटा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दीपक वावगे (वय 72) आणि त्यांची विवाहित मुलगी भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय 30) यांना क्रेटा कारची जोरदार धडक बसली. दोघेही घटनास्थळावरून दहा ते पंधरा फूट दूर फेकले गेले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींवर कोल्हापूरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भाग्यश्री लक्ष्मण गवळी या मूळच्या गगनबावडा तालुक्यातील रहिवासी होत्या. वकिली व्यवसायानिमित्त त्या आपल्या पतीसह कोल्हापुरात वास्तव्यास होत्या. आज काही कामानिमित्त त्या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. दरम्यान, अपघातापूर्वी चालक मयुरेश पाटील याचा कुटुंबीयांशी वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर कोणालाही न सांगता तो क्रेटा कार घेऊन घराबाहेर पडल्याचे समोर आले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 07, 2026 13:30:39
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 07, 2026 13:16:52
Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळालेय. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खाजगी-लोकसहभागातून सुरु केला जाणार आहे. सदर प्रकल्प उभारण्याकरिता साधारण 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 07, 2026 13:16:06
Shirdi, Maharashtra:कोपरगाव बस स्टेशन में आज सायंकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचे अचानक नियंत्रण सुटले. ही बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याने स्टेशन में एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी बस स्टेशनात प्रवासी और विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. अचानक समोर आलेल्या बसमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस स्टेशनात मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, एसटी बसच्या देखभालीबाबत आणि दुरावस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची चौकशी होणार का, असा सवाल आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 07, 2026 12:07:26
Malegaon, Maharashtra:मालेगाव महापालिका में महापौर पद के चुनाव में इस्लाम पार्टी के नसरीन बानो शेख खालिद ने जीत हासिल की। उपमहापौर पद पर शान ए हिंद निहाल अहमद की नियुक्ति हुई। भाजपा व एमआयएम के नगरसेवक तटस्थ रहे। महापौर नसरीन शेख ने लता घोडके (शिवसेना) को 25 मतों से हराया, उनके पक्ष में इस्लाम पार्टी के 35 मत, समाजवादी पार्टी के 5 व कांग्रेस के 3 कुल 43 नगरसेवकों ने मतदान किया। उपमहापौर चुनाव में शान ए हिंद निहाल अहमद ने शिवसेना के निलेश काकडे को हराया। महापौर व उपमहापौर चुनाव के दो दिन पहले एमआईएम के मौलाना मुफ्ती इस्माईल ने शिवसेना के मंत्री दादा भुसे से मुलाकात की चर्चा बनी थी। भक्तिपरक उत्साह में समर्थकों ने आतिशबतियां फूटीं और इस्लाम व समाजवादी पार्टी के ध्वज लहराकर जश्न मनाया। उद्घाटन के बाद नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो ने भावुक होकर अपने ससुर, पूर्व विधायक व पूर्व महापौर रशीद शेख की यादें साझा कीं और सेक्युलर फ्रंट समेत सभी दलों के प्रति आभार व्यक्त किया। लिफ्ट दुर्घटना में इस्लाम पार्टी के नेता आज़िफ शेख समेत कुछ नगरसेवक और अधिकारी बाल-बाल बचे। पूरे राज्य में इस्लाम पार्टी का विस्तार व प्रदर्शन चर्चा का विषय बना रहा।
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 07, 2026 11:36:33
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक विमानतळाचा विस्तार केला जात असून या संदर्भातील सामंजस्य करारावर उद्या रविवारी विमानतळावरच स्वाक्षरी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरकार आणि एचएएल प्रशासनामध्ये हा करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत एचएएलला कराराचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. नव्याने उभारण्यात येणारी नवी टर्मिनस इमारत व सुविधा एचएएलकडे हस्तांतरित करण्याची तरतूद यात असणार आहे ओझर विमान तळाच्या विस्तारीकरणासाठी ५५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.....
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 07, 2026 11:17:28
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खेळ आणि व्यायामाचे धडे दिले.. महापूर आला तर मी स्वतः उडी मारतो, बिबट्या आला तर मी जाळी घेऊन उभा राहतो.. नियमित व्यायामामुळे माझ्या मनगटात जोर आहे, त्यामुळे मला संकटमोचक म्हणतात असं वक्तव्य महाजन यांनी केलंय.. जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खेळ आणि व्यायामाचे महत्व सांगताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे..शरीरयष्टी चांगली ठेवली पाहिजे.. मी सुरुवातीपासून खेळाडू असून आजही एक तास व्यायाम करूनच कार्यक्रमाला उपस्थित झालोय.. व्यायाम करा, आवडेल तो खेळ खेळा.. व्यायामासोबत व्यसनमुक्त रहा.. मी लहानपणापासून कुस्तीसह विविध खेळ खेळायचो.. तेंव्हापासून मला दूध प्यायची सवय आहे.. मला आयुष्यात अजूनही चहा, कॉफीची चव माहित नाही.. दारूला तर मी कधी शिवलोही नाही.. तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, काहीच व्यसन नाही.. टेन्शन कमी करण्यासाठी कुठलेही व्यसन करण्याची गरज नसते.. मनगटामध्ये जोर असला पाहिजे.. मला संकटमोचन म्हणतात, कुठेही काही झालं की चाललो.. कुठे महापूर आला की मी उड्या मारतो.. नाशिकला बिबट्या निघाला, मी जाळी घेऊन त्याच्या समोर उभा राहिलो.. पोलिसवाले परेशान झाले, पण मी घाबरतच नाही.. खोपोलीला दरड कोसळली होती, तेंव्हा रात्री 2 वाजता भर पावसात एकटा आठ किलोमीटर वर चढून गेलो.. हजारोंचा मोर्चा असूद्या, नाहीत लाखोंचा, मी सामोरे जातो.. हे कशामुळे होतं?.. तर व्यायामामुळे.. खेळ तुम्हाला पराभव पचवायला शिकवतो.. विजय तुमच्या अंगी नम्रता आणतो.. संघभावना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवते.. खेळ शेवटपर्यंत झुंज देण्याची मानसिकता तयार करतो.. अशा स्पर्धांमधून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे.. खेळ आणि व्यायामातून आपल्याला चांगले प्रशासन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 07, 2026 11:16:44
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा खात्मा होण्याच्या दृष्टीने मोठी घडामोड, जिल्ह्यात आजवर झालेल्या चकमकीत सर्वात दीर्घकाळ चालणारी चकमक ठरली नारायणपूरची चकमक, तब्बल तीन दिवस चाललेल्या नारायणपूर चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचा झालाय मृत्यू, नव्यानेच छत्तीसगड सीमेवर उघडण्यात आलेल्या बिनागुंडा पोलीस मदत केंद्राचा अभियानात झाला मोठा फायदा अंतर्गत माहिती: गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा खात्मा होण्याच्या दृष्टीने मोठी घडामोड पुढे आली आहे. भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरशी जुळलेल्या जंगलात झालेली चकमक जिल्ह्यात आजवर झालेल्या चकमकीत सर्वात दीर्घकाळ चालणारी चकमक ठरली. तब्बल तीन दिवस चाललेल्या नारायणपूर चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या चकमकीत गडचिरोली नक्षल विभागाचा प्रभारी प्रभाकर याच्यासह सात सदस्यांना टिपले. या सर्वांवर होते एकूण 71 लाखांचे बक्षीस होते. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झालाय तर अन्य एक जवान जखमी आहे. नव्यानेच छत्तीसगड सीमेवर उघडण्यात आलेल्या बिनागुंडा पोलीस मदत केंद्राचा अभियानात मोठा फायदा झाला. तीन दिवस – तीन रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरुन 03 एके-47 रायफल, 01 एसएलआर व 01 .303 रायफल अशा 05 अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व नक्षल साहित्य जप्त झाले आहे. बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 07, 2026 10:49:12
Beed, Maharashtra:बीड : आनंदावर शोकाची छाया; अजित पवारांना अभिवादन करत माजलगावात पार पडला अनोखा विवाह सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात असताना, माजलगावमध्ये पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन थावरे यांच्या विवाहात वधू-वरांनी मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. आनंदाच्या क्षणीही आपले नेते विसरले नाहीत, अशा शब्दांत उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. शोक आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top