Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

भीमाशंकर मंदिर पर विकासकार्य: तीन महीने बंद, एक महीने में खुलने को लेकर बैठक

HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 05:47:06
Khed, Maharashtra
भिमाशंकर मंदिर बंदला आज दोन महिने पुर्ण मंदिराचे काम संथ गतीने मंदिर बंदच्या मुदतीला महिना शिल्लक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला विकासकामांमुळे तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मंदिर पुन्हा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक असतानाही अनेक कामे अद्याप अपूर्णच असल्याचे चित्र समोर येत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात विविध कामे सुरू असली तरी कामाची गती संथ असल्याने प्रशासनाने दिलेल्या मुदतीत मंदिर भाविकांसाठी खुले होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात देवस्थान, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे भाविकांचे आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 10:01:56
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पॉईंटर मुंबईच्या प्रेसमध्ये काँग्रेस आप डाव्या पक्षांचे लोक होते. आम्ही 23 मार्च ला RSS च्या हेडकॉर्टरवर मोर्चा आयोजित केला आहे. आम्हाला विचारण्यात येत आहे की नागपुरला मोर्चा का काढत आहात. स्वातंत्र्य लढ्यात RSS ची कोणतीही भूमिका नव्हती त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने भूमिका घेतली. मोदी पूर्णपणे कॉमप्रोमाईज झालेले असून देशविरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.एफस्टिन फाईलमध्ये मोदी यांचे नाव आले आहे.आम्ही सांगू तेच भारत करेल असं अमेरिका करत आहे नरेंद्र मोदी नासत आहे अशी परिस्थिती आहे.मोदींना पंतप्रधान करण्यात RSS ची भूमिका, एफस्टीन फाईलमध्ये लहान मुलींचा खेळ करण्यात आला.मुली पळवण्यात आल्या.मोदी त्याचं प्रतीक आहे. एफस्टिन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा आरएसएसने मोदींवर कारवाई केली नाही.त्यामुळे आम्ही 23 तारखेला RSS मुख्यालयावर मोर्चा काढत आहोत कॉमप्रोमाईज झालेल्या पंतप्रधानाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आम्ही रसकार्यालया समोर धरणे धरणार आहोत गॅस टंचाई हे सर्व थांबवायचं असेल. तर मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून हटवाव गॅस तुटवडा वाढला तर भाजप आमदारांच्या नगरसेवकांच्या घरासमोर आम्हाला जेऊ घाला आंदोलन लोकांनी सुरू करावे नरेंद्र मोदी हा डान्सिंग क्वीन आहे अमेरीकेने नाच म्हणाला की नाचतो. RSS कार्यालयावरील मोर्चात राहुल गांधींना बोलवायचं की नाही हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगावं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गृहमंत्र्यांना कोर्टासमोर बोलवावं. या अर्जावर सुनावणी झाली यात कोर्टाची ऑर्डर काय देते ते बघू एफस्टीन फाईल खोट्या नेरेटीव्ह मध्ये लोकांनी अडकू नये. मध्यम वर्गीयांना माझं आवाहन आहे त्यांनी मोदींवर विश्वास ठेवू नये.या फाईलमध्ये सर्वात मोठं सेक्सयूएल रॅकेट झालेलं आहे.पण उद्या हे उच्चभ्रू वर्गात रॅकेट सुरू झालं तर मध्यम वर्गीयांवर मोठा परीणाम होईल हरीदिप पुरी इन संसद मंत्र्यांवर विश्वास ठेवू नये. Shiv Sena कुणाची सुनावणी सतत लांबणीवर जात आहे माझ्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने आधी शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. आतापर्यंत कोर्टाने त्यांचा एखादा निर्णय उलटा दिलेला आहे का?. आधी दिलेला निर्णय हाच शेवटचा निर्णय असेल.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 09:55:04
Akola, Maharashtra:आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा फटका आता राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांनाही बसू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत होण्याचीभीती निर्माण झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात सध्या ४४९ शासकीय वसतिगृहे आणि ९२ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. अशा एकूण ५४१ संस्थांमध्ये सुमारे ५४ हजार मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत निवास, भोजन आणि शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. मात्र सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी स्वयंपाक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोल्यातील काही शासकीय वसतिगृहांमध्येही ही समस्या निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अकोल्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडून तातडीने गॅस पुरवठा करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र बुधवारी पत्र देऊनही दोन दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थींच्या भोजन व्यवस्थेत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी वसतिगृहांना तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
122
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 09:54:46
Baramati, Maharashtra:बारामतीतील गेट्झनर कंपनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषण पॉईंट गेट्सनेर कंपनी उत्पादन शुभारंभ एमआयडीसी येथे... आजचा दिवस बारामती करांच्या दृष्टीने आनंदाचा आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया संकल्पना आधारित आहे. यात विदेशी गुंतवणूक झाली आहे. इथे उत्पादित होणारी उत्पादने भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहेत. त्यामुळे विदेशी चलनाची बचत होणार आहे. याचा आर्थिक फायदा भारताला होणार आहे. बारामती उद्योग नगरी म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल. अजित दादांच्या दूरदृष्टीने ही कंपनी बारामतीत आली. बारामती एमआयडीसीचा यात मोठा सहभाग आहे. मात्र पर्यावरणाचा कुठेही हान होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन उद्योजकांना करते. शासन आपल्या पाठीशी उभा राहील. यामुळे बारामतीतील तळागाळातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इंदापूर येथील एमआयडीसीसाठी दादांच्या प्रयत्नाने 1000 एकर जमीन मिळाले आहे. पुरंदर विमानतळासाठी आदरणीय दादांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. नवीन दोन मोठ्या कंपन्या येत आहेत, ही गोष्ट खूप मोलाची आहे.
59
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 09:54:08
Baramati, Maharashtra:बारामती में एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया का १६वां वर्धापन दिन कार्यक्रम से सुनेत्रा पवार ने लाइव भाषण दिया। बारामती के विकास में सभी ने दादांच्या मार्गदर्शनाखाली सतत भागीदारी की और फोरम ने क्षेत्र के विकास में अनेक काम किए। बारामती तालुक्यात २८ से अधिक गावों में जलसंधारण, नदी-ओढ़ा खोलीकरण जैसे काम Meghadoot प्रकल्प के माध्यम से किए गए और जलयुक्त शिवार जैसी पहलों से पानी की समस्या धीरे-धीरे कम हुई। डॉ. लहाने की सहायता से ६ हजार लोगों की मुफ्त शस्त्रक्रिया संभव हुई और महिलाओं में कैंसर जागरूकता बढ़ी। प्रतिबिंब व्याख्यानामाली के जरिये बारामती के लोगों को ज्ञान मिलता रहा, हर माह एक मान्यवर बारामती में बुलाए जाते रहे, जिससे जनजागृति बढ़ी। वनक्षेत्र में नवीन पाणवठे बनाने से الصيف में वन्यजीवों को पानी मिला। पर्यावरण संतुलन बनाए रखने के लिए नेहमीत उपक्रम चलाये जाते रहे और एक ही मौसम में १ लाख पौधे रोपे गए। मातीतल्या खेळातील जत्रा जैसे पारंपरिक खेलों को युवा पीढ़ी तक पहुँचाने के लिए आयोजन चलते रहे ताकि अगली पीढ़ी इन्हें समझ सके। विद्यार्थियों को केंद्र में रखकर फोरम ने काम किया और बारामतीकरांचा स्नेह हमेशा फोरम को प्राप्त रहा। वर्तमान में भी बारामती की दिशा में सभी का योगदान आवश्यक है ताकि दादां द्वारा सपने देखी गई स्वच्छ, सुंदर और हरित बारामती का निर्माण हो सके।
67
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 09:35:56
126
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 13, 2026 09:33:41
Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी वसुली निम्म्यावर, थकबाकीदार नागरिकांनी वेळेत कर भरावा अन्यथा थकबाकी फ्लेक्स वर लागेल नाव पंढरपूर नगर पालिकेची वार्षिक घरपट्टी पाणीपट्टी जवळपास 25 कोटी रुपयांच्या घरात वसूल करायची असते मात्र निम्मा मार्च महिना संपत आला तरी 47%च वसुली झाली आहे यामुळे नगरपालिकेच्या काम करण्यावर अडथळे येतात त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केला आहे की तातडीने घरपट्टी पाणीपट्टीचा कर नगरपालिकेत भरावा मार्च महिन्यापूर्वी जर हा कर भरला नाही तर दरमहा दोन टक्के दंडनीय व्याजाची आकारणी होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. पाण्याची जोडणी थांबवली जाऊ शकते. तसेच थकबाकीदारांच्या फ्लेक्स वर तुमचं नाव येऊ शकतं.त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कर भरण्याचा आवाहन केलं आहे ----
159
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 09:16:46
146
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 13, 2026 09:06:00
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) वाहतूक कोंडीने मनमाडकर नागरिक हैराण... दहावीचे विद्यार्थी अडकले वाहतूक कोंडीत... विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची कसरत... वाहतूक कोंडी समस्या कायमची सोडविण्याची मागणी.. नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहन चालकांना भेडसावत आहे. गेल्या काही तासांपासून वाहतूक कोंडीत झाल्याने अनेक वाहनें या वाहतूक कोंडीत अडकून पडली विशेष करून आज दहावीचा पेपर असल्याने अनेक विद्यार्थीही या वाहतूक कोंडीत अडकले होते. पालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करून कसरत करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवावे लागले. कन्नड घाट बंद असल्याने अतिरिक्त अवजड वाहने या मार्गावरून जातात त्यातच रेल्वेचा अरुंद उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी होत असते. स्वतः पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहे.
95
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 09:05:22
93
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 13, 2026 08:38:32
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असताना देखील अनेक सेवाभावी संस्थांकडून अन्नदान करण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरूच स्व. विष्णुपंत कोठे सेवाभावी संस्थेच्या वतीने निराधार आणि वृद्धांना घरपोच मोफत देण्यात येते अन्नदानाची सेवा संस्थेकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक तर उद्यापासून चुलीवर स्वयंपाक बनवून निराधारांना पोहोचणार जेवणाचे डबे कोरोना सारख्या महाभयंकर काळात अन्नदानाची सेवा बंद केली नाही त्यामुळे अडचणींवर तोडगा काढून सेवा अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार दररोज 100 पेक्षा अधिक वृद्धांना आणि निराधारांना मोफत घरपोच जेवणाचे डबे देऊन बजावली जाते सेवा
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 13, 2026 08:37:27
Pimpri-Chinchwad, Maharashtra:एलपीजी टंचाईचा हिंजवडी आयटी पार्कला फटका, कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना... हिंजवडी आयटी पार्क मधल्या बड्या कंपन्यांनाही बसू लागलाय... गॅस पुरवठ्यात खंड पडल्यान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना चक्क घरून डबा आणण्याचा सल्ला दिला आहे. गॅसअभावी नियमित स्वयंपाक करणे कठीण झाल्याने फूड कोर्टमध्ये सध्या मर्यादित पदार्थ उपलब्ध आहेत. रिटर्न टू ऑफिसमुळे हजारो कर्मचारी ऑफिसला जाते आहेत... कॅफेटेरिया मध्ये जेवण उपलब्ध होत अविवाहित आणि परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोना प्रमाणे वर्क फ्रॉम होम चा पर्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे...याच संदर्भात आयटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 08:20:40
Navi Mumbai, Maharashtra:हॉटेल मधील गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय.पण पदार्थ च्या किंमती वाढल्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झालाय. याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यवसायिकांवर आले. यातून मार्ग काढत काही हॉटेल व्यवसायिकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय निवडलाय. इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसामुळे हॉटेल व्यवसायिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर येतंय. त्यामुळे पदार्थच्या किमती मद्ये 10 रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहक प्रतिसाद देत नाहीत यामुले हॉटेलच भाडे आणि कामगारांचा पगार कसा द्यायचा हा मोठा प्रश्न hॉटेल व्यवसायिकानपुढे उभा राहिलाय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top