Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

Solapur में गैस कमी के बावजूद संस्थाएं निराधारों को मुफ्त भोजन दे रही हैं

AAABHISHEK ADEPPA
Mar 13, 2026 08:38:32
Solapur, Maharashtra
सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असताना देखील अनेक सेवाभावी संस्थांकडून अन्नदान करण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरूच स्व. विष्णुपंत कोठे सेवाभावी संस्थेच्या वतीने निराधार आणि वृद्धांना घरपोच मोफत देण्यात येते अन्नदानाची सेवा संस्थेकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक तर उद्यापासून चुलीवर स्वयंपाक बनवून निराधारांना पोहोचणार जेवणाचे डबे कोरोना सारख्या महाभयंकर काळात अन्नदानाची सेवा बंद केली नाही त्यामुळे अडचणींवर तोडगा काढून सेवा अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार दररोज 100 पेक्षा अधिक वृद्धांना आणि निराधारांना मोफत घरपोच जेवणाचे डबे देऊन बजावली जाते सेवा
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 09:35:56
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 13, 2026 09:33:41
Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी वसुली निम्म्यावर, थकबाकीदार नागरिकांनी वेळेत कर भरावा अन्यथा थकबाकी फ्लेक्स वर लागेल नाव पंढरपूर नगर पालिकेची वार्षिक घरपट्टी पाणीपट्टी जवळपास 25 कोटी रुपयांच्या घरात वसूल करायची असते मात्र निम्मा मार्च महिना संपत आला तरी 47%च वसुली झाली आहे यामुळे नगरपालिकेच्या काम करण्यावर अडथळे येतात त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केला आहे की तातडीने घरपट्टी पाणीपट्टीचा कर नगरपालिकेत भरावा मार्च महिन्यापूर्वी जर हा कर भरला नाही तर दरमहा दोन टक्के दंडनीय व्याजाची आकारणी होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. पाण्याची जोडणी थांबवली जाऊ शकते. तसेच थकबाकीदारांच्या फ्लेक्स वर तुमचं नाव येऊ शकतं.त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कर भरण्याचा आवाहन केलं आहे ----
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 09:16:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 13, 2026 09:06:00
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) वाहतूक कोंडीने मनमाडकर नागरिक हैराण... दहावीचे विद्यार्थी अडकले वाहतूक कोंडीत... विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची कसरत... वाहतूक कोंडी समस्या कायमची सोडविण्याची मागणी.. नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहन चालकांना भेडसावत आहे. गेल्या काही तासांपासून वाहतूक कोंडीत झाल्याने अनेक वाहनें या वाहतूक कोंडीत अडकून पडली विशेष करून आज दहावीचा पेपर असल्याने अनेक विद्यार्थीही या वाहतूक कोंडीत अडकले होते. पालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करून कसरत करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवावे लागले. कन्नड घाट बंद असल्याने अतिरिक्त अवजड वाहने या मार्गावरून जातात त्यातच रेल्वेचा अरुंद उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी होत असते. स्वतः पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 09:05:22
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 13, 2026 08:37:27
Pimpri-Chinchwad, Maharashtra:एलपीजी टंचाईचा हिंजवडी आयटी पार्कला फटका, कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना... हिंजवडी आयटी पार्क मधल्या बड्या कंपन्यांनाही बसू लागलाय... गॅस पुरवठ्यात खंड पडल्यान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना चक्क घरून डबा आणण्याचा सल्ला दिला आहे. गॅसअभावी नियमित स्वयंपाक करणे कठीण झाल्याने फूड कोर्टमध्ये सध्या मर्यादित पदार्थ उपलब्ध आहेत. रिटर्न टू ऑफिसमुळे हजारो कर्मचारी ऑफिसला जाते आहेत... कॅफेटेरिया मध्ये जेवण उपलब्ध होत अविवाहित आणि परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोना प्रमाणे वर्क फ्रॉम होम चा पर्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे...याच संदर्भात आयटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 08:20:40
Navi Mumbai, Maharashtra:हॉटेल मधील गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय.पण पदार्थ च्या किंमती वाढल्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झालाय. याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यवसायिकांवर आले. यातून मार्ग काढत काही हॉटेल व्यवसायिकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसचा पर्याय निवडलाय. इलेक्ट्रिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक गॅसामुळे हॉटेल व्यवसायिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर येतंय. त्यामुळे पदार्थच्या किमती मद्ये 10 रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहक प्रतिसाद देत नाहीत यामुले हॉटेलच भाडे आणि कामगारांचा पगार कसा द्यायचा हा मोठा प्रश्न hॉटेल व्यवसायिकानपुढे उभा राहिलाय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 08:04:21
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 13, 2026 08:02:59
Kalyan, Maharashtra:इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम; डोंबिवली MIDC मधील 100 हून अधिक कंपन्या संकटात इस्राईल -इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका आता स्थानिक उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जवळपास १०० हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यवसायावर आधीच संकट आले आहे. तसाच औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतका गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.या परिस्थितीत कंपन्यांना पुन्हा एकदा पर्यायी इंधनाचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र ते इंधन देखील मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने उद्योजकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयात-निर्यात व्यवहारांवरही परिणाम झाला असून उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांकडून करण्यात येत आहे. बाईट.. देवेन सोनी उदयोजक
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 08:01:14
Shirdi, Maharashtra:शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याच्या नावाखाळ्या 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. याप्रकरणी अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. संगमनेर येथे चौघांनी मिळवून शेअर मार्केटची कंपनी तयार केली होती.. या कंपनीच्या नावाखाल्यावर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहिन्याला 10% परतावा अधिक मिळेल असे सांगुन 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली.. नंतर आरोपींनी ही कंपनी बंद करून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. हा सर्व प्रकार डिसेंबर 2024 पासून सुरु होता.. याप्रकामणि महेश विश्वास मोरे, वैभव विठ्ठल काकड, राहुल शिंदे, विजय तबाजी काळे या चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर.. या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, ज्यांची फसवणूक झाली आहे अशा नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top