Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213
अंबेडकर नगर में प्रेस कॉन्फ्रेंस के बाद RSS मोर्चा, मोदी पर आरोपों की लहर
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 10:01:56
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पॉईंटर मुंबईच्या प्रेसमध्ये काँग्रेस आप डाव्या पक्षांचे लोक होते. आम्ही 23 मार्च ला RSS च्या हेडकॉर्टरवर मोर्चा आयोजित केला आहे. आम्हाला विचारण्यात येत आहे की नागपुरला मोर्चा का काढत आहात. स्वातंत्र्य लढ्यात RSS ची कोणतीही भूमिका नव्हती त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने भूमिका घेतली. मोदी पूर्णपणे कॉमप्रोमाईज झालेले असून देशविरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.एफस्टिन फाईलमध्ये मोदी यांचे नाव आले आहे.आम्ही सांगू तेच भारत करेल असं अमेरिका करत आहे नरेंद्र मोदी नासत आहे अशी परिस्थिती आहे.मोदींना पंतप्रधान करण्यात RSS ची भूमिका, एफस्टीन फाईलमध्ये लहान मुलींचा खेळ करण्यात आला.मुली पळवण्यात आल्या.मोदी त्याचं प्रतीक आहे. एफस्टिन फाईलमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा आरएसएसने मोदींवर कारवाई केली नाही.त्यामुळे आम्ही 23 तारखेला RSS मुख्यालयावर मोर्चा काढत आहोत कॉमप्रोमाईज झालेल्या पंतप्रधानाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आम्ही रसकार्यालया समोर धरणे धरणार आहोत गॅस टंचाई हे सर्व थांबवायचं असेल. तर मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून हटवाव गॅस तुटवडा वाढला तर भाजप आमदारांच्या नगरसेवकांच्या घरासमोर आम्हाला जेऊ घाला आंदोलन लोकांनी सुरू करावे नरेंद्र मोदी हा डान्सिंग क्वीन आहे अमेरीकेने नाच म्हणाला की नाचतो. RSS कार्यालयावरील मोर्चात राहुल गांधींना बोलवायचं की नाही हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगावं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गृहमंत्र्यांना कोर्टासमोर बोलवावं. या अर्जावर सुनावणी झाली यात कोर्टाची ऑर्डर काय देते ते बघू एफस्टीन फाईल खोट्या नेरेटीव्ह मध्ये लोकांनी अडकू नये. मध्यम वर्गीयांना माझं आवाहन आहे त्यांनी मोदींवर विश्वास ठेवू नये.या फाईलमध्ये सर्वात मोठं सेक्सयूएल रॅकेट झालेलं आहे.पण उद्या हे उच्चभ्रू वर्गात रॅकेट सुरू झालं तर मध्यम वर्गीयांवर मोठा परीणाम होईल हरीदिप पुरी इन संसद मंत्र्यांवर विश्वास ठेवू नये. Shiv Sena कुणाची सुनावणी सतत लांबणीवर जात आहे माझ्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने आधी शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. आतापर्यंत कोर्टाने त्यांचा एखादा निर्णय उलटा दिलेला आहे का?. आधी दिलेला निर्णय हाच शेवटचा निर्णय असेल.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 11:05:43
Chandrapur, Maharashtra:शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात ग्रेटा ग्रीन स्टील और न्यू इरा क्लीनटेक नामक दो बड़े कोल गैसिफिकेशन प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. चंद्रपूर जिला कोयला उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु कोळशापासून मिथेन, युरिया व अन्य वायूंची निर्मिती होणार आहे. देशासाठी अत्यंत महत्वाचा असलेले हे प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी दहा वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला आहे. येत्या काळात विदर्भात आणखी दोन मोठ्या प्रकल्पांसह 100 मिलियन टन कोळसा उद्योगांच्या कामी आणला जाणार असल्याची माहिती उद्योग संघटनांनी दिली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 10:49:38
58
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 10:47:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पोलीस भरतीचा अंतिम टप्पा, १५ मार्चला लेखी परीक्षा, पोलिस प्रशासनाने केली जय्यत तयारी आंकर:- चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा येत्या रविवारी पार पडणार आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
29
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 10:19:18
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात बुलेट गाड्या चोरीचे सत्र सुरू असून बुलेट मालक धास्तावले आहेत. जिल्ह्यातील लोणी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावसह अनेक ठिकाणाहून बुलेट चोरीचे गुन्हे दाखल झाले असून पोलीसांसमोर चोरांना शोधण्याचे आव्हान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, श्रीरामपूर, कोपरगाव आणी लोणी येथून बुलेट चोरीच्या घटना घडल्या आहेत. खास म्हणजे चारही ठिकाणच्या सीसीटीव्हीत साधर्म्य असलेले चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी दिवसा ढवळ्या बुलेट चोरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व ठिकाणच्या दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला असून बुलेट चोरी करणारी एखादी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.
43
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 10:18:30
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालयातून चेक चोरी करून तब्बल ५ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तींनी कार्यालयातील काही चेक चोरी करून त्याद्वारे विविध बँक खात्यांतून रक्कम काढल्याचे समोर आले आहे.ही रक्कम जवळपास पाच वेगवेगळ्या खात्यांमध्ये काढण्यात किंवा ट्रान्सफर करण्यात आली.हा प्रकार लक्षात येताच मालेगाव तहसील प्रशासनाने संबंधित बँक खाती तातडीने होल्ड केली.तसेच या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून चेक चोरी कशी झाली आणि पैशांची अफरातफर कशी करण्यात आली याचा तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील कागदपत्रे आणि चेकच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
184
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 10:07:41
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी दिले निवेदन, आगामी लग्नसराई हंगामात व्यावसायिक सिलेंडर मिळणार नसल्याने व्यवसायावर संक्रांत अँकर:-- आखाती युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी ची आवक घटल्याने त्याचा परिणाम देशातील सर्वच उद्योग व्यवसायावर पडू लागला आहे. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे केटरिंग व्यवसाय है. या व्यवसायाला मोठ्या संख्येत कमर्शियल सिलेंडरची गरज भासते. मात्र सध्या स्थितीत कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. चंद्रपुरात केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले आहे. आगामी लग्नसराई हंगामात व्यावसायिक सिलेंडर मिळणार नसल्याने व्यवसायावर संक्रांत आली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 15 ते 20 हजार कामगारांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. संकट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
109
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 09:55:04
Akola, Maharashtra:आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा फटका आता राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांनाही बसू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत होण्याचीभीती निर्माण झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात सध्या ४४९ शासकीय वसतिगृहे आणि ९२ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. अशा एकूण ५४१ संस्थांमध्ये सुमारे ५४ हजार मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत निवास, भोजन आणि शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. मात्र सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी स्वयंपाक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोल्यातील काही शासकीय वसतिगृहांमध्येही ही समस्या निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अकोल्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडून तातडीने गॅस पुरवठा करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र बुधवारी पत्र देऊनही दोन दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थींच्या भोजन व्यवस्थेत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी वसतिगृहांना तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
143
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 09:54:46
Baramati, Maharashtra:बारामतीतील गेट्झनर कंपनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषण पॉईंट गेट्सनेर कंपनी उत्पादन शुभारंभ एमआयडीसी येथे... आजचा दिवस बारामती करांच्या दृष्टीने आनंदाचा आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया संकल्पना आधारित आहे. यात विदेशी गुंतवणूक झाली आहे. इथे उत्पादित होणारी उत्पादने भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहेत. त्यामुळे विदेशी चलनाची बचत होणार आहे. याचा आर्थिक फायदा भारताला होणार आहे. बारामती उद्योग नगरी म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल. अजित दादांच्या दूरदृष्टीने ही कंपनी बारामतीत आली. बारामती एमआयडीसीचा यात मोठा सहभाग आहे. मात्र पर्यावरणाचा कुठेही हान होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन उद्योजकांना करते. शासन आपल्या पाठीशी उभा राहील. यामुळे बारामतीतील तळागाळातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इंदापूर येथील एमआयडीसीसाठी दादांच्या प्रयत्नाने 1000 एकर जमीन मिळाले आहे. पुरंदर विमानतळासाठी आदरणीय दादांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. नवीन दोन मोठ्या कंपन्या येत आहेत, ही गोष्ट खूप मोलाची आहे.
183
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 09:54:08
Baramati, Maharashtra:बारामती में एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया का १६वां वर्धापन दिन कार्यक्रम से सुनेत्रा पवार ने लाइव भाषण दिया। बारामती के विकास में सभी ने दादांच्या मार्गदर्शनाखाली सतत भागीदारी की और फोरम ने क्षेत्र के विकास में अनेक काम किए। बारामती तालुक्यात २८ से अधिक गावों में जलसंधारण, नदी-ओढ़ा खोलीकरण जैसे काम Meghadoot प्रकल्प के माध्यम से किए गए और जलयुक्त शिवार जैसी पहलों से पानी की समस्या धीरे-धीरे कम हुई। डॉ. लहाने की सहायता से ६ हजार लोगों की मुफ्त शस्त्रक्रिया संभव हुई और महिलाओं में कैंसर जागरूकता बढ़ी। प्रतिबिंब व्याख्यानामाली के जरिये बारामती के लोगों को ज्ञान मिलता रहा, हर माह एक मान्यवर बारामती में बुलाए जाते रहे, जिससे जनजागृति बढ़ी। वनक्षेत्र में नवीन पाणवठे बनाने से الصيف में वन्यजीवों को पानी मिला। पर्यावरण संतुलन बनाए रखने के लिए नेहमीत उपक्रम चलाये जाते रहे और एक ही मौसम में १ लाख पौधे रोपे गए। मातीतल्या खेळातील जत्रा जैसे पारंपरिक खेलों को युवा पीढ़ी तक पहुँचाने के लिए आयोजन चलते रहे ताकि अगली पीढ़ी इन्हें समझ सके। विद्यार्थियों को केंद्र में रखकर फोरम ने काम किया और बारामतीकरांचा स्नेह हमेशा फोरम को प्राप्त रहा। वर्तमान में भी बारामती की दिशा में सभी का योगदान आवश्यक है ताकि दादां द्वारा सपने देखी गई स्वच्छ, सुंदर और हरित बारामती का निर्माण हो सके।
158
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 13, 2026 09:35:56
127
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 13, 2026 09:33:41
Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी वसुली निम्म्यावर, थकबाकीदार नागरिकांनी वेळेत कर भरावा अन्यथा थकबाकी फ्लेक्स वर लागेल नाव पंढरपूर नगर पालिकेची वार्षिक घरपट्टी पाणीपट्टी जवळपास 25 कोटी रुपयांच्या घरात वसूल करायची असते मात्र निम्मा मार्च महिना संपत आला तरी 47%च वसुली झाली आहे यामुळे नगरपालिकेच्या काम करण्यावर अडथळे येतात त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केला आहे की तातडीने घरपट्टी पाणीपट्टीचा कर नगरपालिकेत भरावा मार्च महिन्यापूर्वी जर हा कर भरला नाही तर दरमहा दोन टक्के दंडनीय व्याजाची आकारणी होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. पाण्याची जोडणी थांबवली जाऊ शकते. तसेच थकबाकीदारांच्या फ्लेक्स वर तुमचं नाव येऊ शकतं.त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कर भरण्याचा आवाहन केलं आहे ----
159
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 13, 2026 09:16:46
196
comment0
Report
Advertisement
Back to top