Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

चवदार तळे सत्याग्रह 99 वर्ष पूरे: मुख्यमंत्री समेत दोनों उपमुख्यमंत्री 20 मार्च के कार्यक्रम में शामिल

PPPRAFULLA PAWAR
Mar 16, 2026 02:32:51
Varasoli, Maharashtra
चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मंत्री भरत गोगावले यांनी घेतला आढावा तयारीचा आढावा क्रांती स्तंभावर जाऊन केली पाहणी चवदार तळे सत्याग्रहाला यंदा 99 वर्षे पूर्ण अँकर ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला या वर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभुमीवर 20 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मंत्री भरत गोगावले यांनी शासनामार्फत सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेत कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 16, 2026 03:33:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'कृत्रिम कासव आकाराचा धबधबा' आणि 'रेनडान्स'चे लोकार्पण करण्यात आले, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी प्रस्तावित असलेल्या भव्य 'लेक व्ह्यू रिसॉर्ट'चे भूमिपूजनही करण्यात आले. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर आणि कागलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
36
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:33:03
Nagpur, Maharashtra:Ngp Vikas Thakre live u ने फीड पाठवले नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस नेते - एक महिना झाल्याशिवा, गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव आहे. प्रत्येक आस्थापनाजवळ रांगा लागले आहेत. घरगुती गॅसपासनं सामान्य माणूस वंचित आहेत. - जनतेची दिशाभूल कोणीच करत नाही आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला आहे. गॅस आस्थापनेजबळ रांगा लागलेल्या आहेत. गॅसच्या तुटवडा आहे हे आता सिद्ध होत आहे. - ऑन् हॉटेल बंद - विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली तर जरूर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील मुद्दा विधानसभेत मांडू. - विधानसभा अध्यक्ष बोलू देतात कोणत्या विषयावर बोलायचे आहे हा त्यांच्या अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष यांना वास्तविकता सांगू आणि संधी मिळाली तर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील विषय मांडू. - ऑन् नागपूर स्वीकृत नगरसेवक - काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. विषय पत्रिकेवर विषय येईल त्यावेळी चर्चा करून हा निर्णय घेऊ. - ऑन् खाजगी (ओएसडी महापौर) - ज्यांनी स्थायी समितीमध्ये, महापौराकडे काम केलं आहे. अनुभवाच्या हेतूने विरोधी पक्षा नेते यांना या संदर्भात विचारा लागेल.
107
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 03:31:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात सात बहिणी डोंगर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात पाच पर्यटक जखमी, स्वॅब संस्थेच्या स्वयंसेवकांनी राबविले मिशन रेस्क्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या सात बहिणी डोंगरावर मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल पाच पर्यटक जखमी झाले. हे लोक लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी आले होते. मात्र दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सर्व सैरावैरा पळू लागले. हा दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित पोचणे कठिण होत होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात सर्व जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले. जखमीना उपचारार्थ गोविंदपूर आणि तळोधी येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. पर्यटकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
62
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:31:02
Nagpur, Maharashtra:Ngp Ngp Patole live u ने फीड पाठवले नागपूर बाईट - नाना पटोले, कॉंग्रेस नेते. - देवेंद्र फडणवीस यांनी त्यात त्यांनी सांगितले कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध नाही. घरगुती गॅस उपलब्ध करून देऊ शकतो.. - *कमर्शियल गॅस देऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ गॅसचा तुटवडा आहे...हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं, सरकारच आता हे गॅसवर आलेली आहे.* - कोरोना काळात राहुल गांधी यांनी सर्व सीमा सील करा अस सांगितले होते...नाहीतर जीव जाईल.. पण नरेंद्र मोदी यांच्या हेडकपणामुळे कोरोना व्यवस्था झाली नाही. त्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले , हे पाप भाजपचे होते. - तुटवडा नाही असं सांगत मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहे - राज्यात उद्योग हॉटेल्स का? बंद झाले. विधानसभेत विचारणार आहे..वास्तविकता सरकारने मांडावी त्या पद्धतीचे अस्वस्थ कराव कोरोनातही खोटे बोलले.. ते करू नये. On राहुरी, बारामती बिनविरोध निवडणूक - अजून निर्णय झालेल्या नाही.. कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहे... त्यावर बसून निर्णय घेऊ.
28
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:20:08
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात का याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून अद्याप या संदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. - मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकांना बिनविरोध व्हाव्यात असे आवाहन केले होते. आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. बिनविरोध झाल्यास ते योग्यच ठरेल, पण याबद्दल आधी चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोधचा विचार केला होता, मात्र सत्ताधाऱ्यांनी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे त्यांची भूमिका तपासून पाहू, - ‘नमो शेतकरी स्वाभिमानी योजना’साठी राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांचा निधी वापरणार केला. सरकारकडून समाजकल्याण आणि आदिवासी विभागासाठी मोठे बजेट दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी समाजकल्याण विभागाचा केवळ सुमारे ४५ टक्के निधी खर्च झाला, तर आदिवासी विभागात केवळ सुमारे ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला. - सरकार बजेट फुगवून दाखवत असून नंतर तो निधी इतर योजनांकडे वळवला जातो, यामुळे ज्या घटकांसाठी निधी मंजूर केला जातो त्यांनाच त्याचा लाभ मिळत नाही - धर्मांतरासंदर्भातील कायद्याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करून मतांची राजकारण करण्यासाठी असे कायदे आणले जात आहे. यासाठी काही विषारी मंत्री पोसले जात आहे. ( नितेश राणे यांच्यावर टीका ) त्यांनी घेतली झाली शपथ याचा अर्थ तरी त्यांना कळतो का?
36
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 03:18:04
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष २५ ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण दुमदुमले नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले. शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
159
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 03:17:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मध्ये आज आणि उद्या बाल मराठी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. हे संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र (साने गुरुजी बालनगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या भव्य संमेलनासाठी ‘स्व. दि. बा. पाटील मुख्यमंच’ आणि ‘डॉ. जयंत नारळीकर उपमंच’ असे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून, दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
55
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 16, 2026 03:16:26
Yeola, Maharashtra:एकीकडे गोण्याअभावी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शासकीय हमीभावाने मका खरेदी केली जात नसतांना दुसरीकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेड येथील शासकीय हमीभाव केंद्रावर चक्क निफाड तालुक्यातील मक्का खरेदी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विक्रीसाठी आलेल्या मकाच्या ट्रॅक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय गोण्यांही आढळून आल्याने शेतकरी आता मक्का बरोबरच शासकीय गाण्यांचे उत्पादन करायला लागला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील हिवरखेडयेथील शासकीय हमीभाव मक्का खरेदी केंद्रावर निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील ट्रॅक्टरमधून आलेला मक्का खाली होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली असता. प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व तहसीलदार व महसूल यंत्रणेला माहिती दिली. दरम्यान शासकीय यंत्रणेने हिवरखेडे येथील शासकीय खरेदी केंद्रावर छापा मारला असता याठिकाणी खरेदी केंद्रावरील अधिकारी तसेच खरेदीदार गैरहजर असल्याचे निदर्शनात आले विशेष म्हणजे मका विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरमध्ये मकाच्या खाली चक्क शासनाच्या हमी भाव खरेदीसाठी असलेल्या गोण्या आढळून आल्या. एकूण सहा ट्रॅक्टर मका विक्रीसाठी आले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विक्रीसाठी आलेल्या सहापैकी पाच ट्रॅक्टर मक्यासह ताब्यात घेतले असून ,शासकीय धान्य गोडाऊन जप्त केले आहे.याबाबत अधिक तपास केला जात आहे.विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून हा मका विक्रीसाठी आणला होता त्या ट्रॅक्टर चालकांना कुठलीही माहिती नसल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले आहे.
115
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 03:15:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये  १० दिवसांपासून उद्योगांचा गॅस पुरवठा बंद आहे. आखाती देशांतून पेट्रोलियम पदार्थाची होणारी आयात युद्धामुळे बंद आहे. परिणामी, औद्योगिक वसाहतींमधील ४०० हून अधिक उद्योग संकटात आहेत. त्या उद्योगांना गॅसपुरवठा करण्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. ५ मार्चपासून उद्योग व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद आहे. उद्योगांकडे जेवढा साठा आहे, त्यावर त्यांचे उत्पादन सध्या सुरू आहे. साठा संपल्यानंतर उद्योगांना बंद करण्याशिवाय पर्याय नसेल. ऑटोमोबाइल्स, ब्रीव्हरेज, बॉटलिंग, फार्मा या उद्योगांवर गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने १३ मार्च रोजी पाठविलेल्या परिपत्रकानुसारच सध्या गॅसचा पुरवठा सुरू आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे...
88
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 03:01:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अनुदानित, विनाअनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, नववीची परीक्षा २३ मार्चपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीची परीक्षा २४ मार्चपासून सुरू होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी  आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही असे सांगितले आहे, तर  द्वितीय सत्राच्या परीक्षा ४ एप्रिलला संपत असताना पायाभूत चाचणी थेट २२ एप्रिलपर्यंत गेल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते आणि त्यामुळं ग्रामीण भागात पाण्याची समस्या जाणवत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळं शिक्षक संघटनांचा विरोध आहे,  शिक्षण विभागाने या विरोधावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शाळांच्या शैक्षणिक वर्षासाठी ठरलेल्या तासिका पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेनंतर निकाल वेळेत लावण्याच्या सूचना एससीईआरटीने दिल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रकात कोणताही बदल करणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाने ठामपणे सांगितले. गेल्या वर्षीही अशीच मागणी करण्यात आली होती, मात्र नियमांचे कारण पुढे करत ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळं आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे...
94
comment0
Report
Advertisement
Back to top