Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

छत्रपती संभाजीनगर में गैस आपूर्ति 10 दिनों से बंद, 400+ उद्योग संकट में

VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 03:15:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये  १० दिवसांपासून उद्योगांचा गॅस पुरवठा बंद आहे. आखाती देशांतून पेट्रोलियम पदार्थाची होणारी आयात युद्धामुळे बंद आहे. परिणामी, औद्योगिक वसाहतींमधील ४०० हून अधिक उद्योग संकटात आहेत. त्या उद्योगांना गॅसपुरवठा करण्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. ५ मार्चपासून उद्योग व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद आहे. उद्योगांकडे जेवढा साठा आहे, त्यावर त्यांचे उत्पादन सध्या सुरू आहे. साठा संपल्यानंतर उद्योगांना बंद करण्याशिवाय पर्याय नसेल. ऑटोमोबाइल्स, ब्रीव्हरेज, बॉटलिंग, फार्मा या उद्योगांवर गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने १३ मार्च रोजी पाठविलेल्या परिपत्रकानुसारच सध्या गॅसचा पुरवठा सुरू आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 16, 2026 04:31:01
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 04:22:03
Shirdi, Maharashtra:मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे.. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केलंय.. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपूरे यांनी म्हटलंय.. दरम्यान बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशी इच्छा असून, आमच्यावर निवडणुका लादल्या तर आम्ही लढायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.. तर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचं अधोरेखित केले आहे.. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो.. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.. सुजय विखे, माजी खासदार भाजप माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
50
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:21:41
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) - नाशिकच्या मनमाड गुरुद्वाराने केली गॅस टंचाईवर मात... लंगरचा स्वयंपाकासाठी वापरतात वाफेची यंत्रणा... 8 ते दहा हजार भाविकांना दिला जातो अखंडित लंगर... Anc:- युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका जो देशभरातील देवस्थानाला बसला आहे.गॅस अभावी अन्नछत्र व महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्न सतावत आहे.मात्र नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर आधीच उपाय योजना करून ठेवली आहे.गुरुद्वारांमध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार होता.त्यासाठी लाकडे जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर या ठिकाणी पोळी, भाजी, दाल , भात असा लंगर तयार केला जातो.त्यामुळे गॅस टंचाई जरी असली तरी मनमाडच्या गुरुद्वारात दररोज 8 ते दहा हजार भाविकांना रोज अविरतपणे लंगर सेवा सुरू आहे. सुरजित सिंग, लंगर प्रमुख
63
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 04:05:11
110
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 16, 2026 04:03:13
Bhandara, Maharashtra:ऐन हंगामात शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक...शेतात उभा असलेला ट्रॅक्टर जळून खाक....6 लाख रुपयांचे नुकसान...कुडेगाव येथील घटना... शेतकऱ्याची कुडेगाव - गवराळा मार्गालगत मालकीची शेती आहे.या शेतात खरीप हंगामानंतर त्यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली होती. सध्या रब्बी पिकांची कापणी करून उन्हाळी धान पिकाच्या लागवडीपूर्वी ते आपल्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी दिवसभर आपल्या 'जॉन डिअर' कंपनीच्या ट्रॅक्टरने शेतीची कामे केली आणि रात्री ट्रॅक्टर शेतातच उभा करून ठेवला होता.मध्यरात्री ट्रॅक्टरला आग लागल्याने त्याचे इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले.शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात येताच पीडित शेतकऱ्याने स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
123
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 03:50:03
Amravati, Maharashtra:दरियापुरात सिलेंडर तपासणी दरम्यान हॉटेल व्यवसायाची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कारवाईदरम्यान गोंधळ, जप्त गॅस सिलेंडर जमावाने पळविले दर्यापूरात महसूल विभागाने हॉटेलवर सर्च मोहीम राबवली असून त्यामध्ये हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे स्पष्ट झाले. यावर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. दर्यापूर शहरातील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून अधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. मात्र कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आणि गोंधळ निर्माण झाला. काहींनी अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची घटना समोर आली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण घेऊन गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
160
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 03:33:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'कृत्रिम कासव आकाराचा धबधबा' आणि 'रेनडान्स'चे लोकार्पण करण्यात आले, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी प्रस्तावित असलेल्या भव्य 'लेक व्ह्यू रिसॉर्ट'चे भूमिपूजनही करण्यात आले. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर आणि कागलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
147
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:33:03
Nagpur, Maharashtra:Ngp Vikas Thakre live u ने फीड पाठवले नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस नेते - एक महिना झाल्याशिवा, गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव आहे. प्रत्येक आस्थापनाजवळ रांगा लागले आहेत. घरगुती गॅसपासनं सामान्य माणूस वंचित आहेत. - जनतेची दिशाभूल कोणीच करत नाही आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला आहे. गॅस आस्थापनेजबळ रांगा लागलेल्या आहेत. गॅसच्या तुटवडा आहे हे आता सिद्ध होत आहे. - ऑन् हॉटेल बंद - विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली तर जरूर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील मुद्दा विधानसभेत मांडू. - विधानसभा अध्यक्ष बोलू देतात कोणत्या विषयावर बोलायचे आहे हा त्यांच्या अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष यांना वास्तविकता सांगू आणि संधी मिळाली तर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील विषय मांडू. - ऑन् नागपूर स्वीकृत नगरसेवक - काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. विषय पत्रिकेवर विषय येईल त्यावेळी चर्चा करून हा निर्णय घेऊ. - ऑन् खाजगी (ओएसडी महापौर) - ज्यांनी स्थायी समितीमध्ये, महापौराकडे काम केलं आहे. अनुभवाच्या हेतूने विरोधी पक्षा नेते यांना या संदर्भात विचारा लागेल.
107
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 03:31:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात सात बहिणी डोंगर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात पाच पर्यटक जखमी, स्वॅब संस्थेच्या स्वयंसेवकांनी राबविले मिशन रेस्क्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या सात बहिणी डोंगरावर मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल पाच पर्यटक जखमी झाले. हे लोक लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी आले होते. मात्र दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सर्व सैरावैरा पळू लागले. हा दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित पोचणे कठिण होत होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात सर्व जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले. जखमीना उपचारार्थ गोविंदपूर आणि तळोधी येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. पर्यटकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
167
comment0
Report
Advertisement
Back to top