Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

वडगांव मावळ नगरपंचायत चुनाव: 28 निर्दलीयों के मैदान से विपक्षी नेताओं की प्रतिष्ठा दांव पर

CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 20, 2025 07:05:37
Pune, Maharashtra
Headline : वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी मावळ मधील नेत्यांचा कस लागणार तब्बल 28 अपक्ष उमेदवार वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात Anchor: वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत असल्याचं चित्र दिसत असलं, तरी प्रत्यक्ष रिंगणात, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेनेचे शिंदे आणि उबाठा गट देखील आहेत. यासोबत तब्बल २८ अपक्ष उमेदवार मैदानात उतरलेत. त्यामुळे बंडखोरांना मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके तसेच भाजप माजीमंत्री बाळा भेगडे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा कस लागणार आहे. अखेरच्या दिवशी झालेल्या अर्जांच्या तुफान सादरीकरणानंतर एकूण ८९ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी ६ आणि नगरसेवकपदासाठी ७१ अर्ज वैध ठरले. काही उमेदवारांचे दोन-दोन अर्ज असल्याने प्रत्यक्ष अर्जदारांची संख्या, नगराध्यक्षपदासाठी ५, तर नगरसेवकपदासाठी ६४ इतकी आहे. यात भाजप–शिवसेना युतीचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, तर वेगवेगळ्या गटांचे प्रत्येकी १-१ उमेदवार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष वेधत आहेत ते २८ अपक्ष उमेदवार. उद्या २१ तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, किती अपक्ष निवडणूकितून माघार घेतात वडगावची खरी निवडणूक कोणत्या दिशेने जाते याचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी आमदार सुनील शेळके आणि माजीमंत्री बाळा भेगडे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलीये, कारण की पंचवार्षिक मध्ये येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एकहाती होती..राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखेल का? की भाजप शिवसेना युती शिरजोर होईल हें निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल...
104
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 20, 2025 08:03:49
24
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 20, 2025 07:55:34
Nashik, Maharashtra:नाशिक : दादा भुसे, मंत्री, बाईट मुद्दे। ऑन बिबट्या शाळा वेळ - निश्चितपणे वन विभागाशी संवाद साधू - लवकर बिबट्या पकडून नियमाप्रमाणे विल्हेवाट लावावी - गंभीर परिस्थिती असेल, थंडी वाढली तर वेळ बदलतो - स्थानिक पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित - पालक और शाळांनी समन्वय साधावा ऑन शालार्थ आयडी - चौकशीत दोषी आढळून आले असेल तर कारवाई अपेक्षित - एसआयटी गठीत करण्यात आली आहे - जे चौकशीत समोर येईल त्याबाबत कारवाईयेईल - त्रुटी आणि बेकायदेशीर केलं असेल तर कारवाई ऑन मालेगाव कोंडी - प्रत्येक पक्षाला विस्तार करणे अधिकार - स्पष्टता देण्यात आली आहे - बहिष्कार वैगरे असे काही नाही - स्थानिक निवडणूकीला समोरे जाणार आहे - प्रत्येकाला त्यांचे अधिकार आहे - आम्हाला वाईट वाटायचे कारण नाही - सीएम डीसीएमच्या बैठक निर्णय झाला ऑन शिंदे आणि उदय सामंत - वेगळ्या विषयावर नेऊ नका - आमची विनंती - भाजपने ही वारीष्ठ पातळीवर सांगितले आहे - शिवसेना और भाजपा नैसर्गिक युती है - एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही - मालेगावचा उल्लेख करत आहे त्यांना पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे - आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषय नाही - मालेगावच्या जनतेने ज्याची त्याची जागा दाखवली आहे ऑन डोंगराळ घटना - 4 दिवसांपूर्वी गंभीर और निर्घृण घटना घडली - उसका संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केला - वेळी मी आळंदीला होतो - गावकऱ्यांच्या उपस्थित आरोपीला पकडले - गंभीर गुन्हा दाखल केला आहे - परवा मी ग्रामस्थ आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली - फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल ऑन अंजली दमानिया - मुख्यमंत्री यांनी समिती गठीत केली आहे - अहवाल आनेपर कारवाई ऑन संभाजीनगर शिवकालीन - जो मुद्दा समोर आणला आहे - शासन प्रतिनिधी और लोकप्रतिनिधीच्या कानावर टाकली जाईल - तो प्राचीन ठेवा जपला जाईल ऑन शिंदे निवडणूका सूचना - युतीने सामोरे जातो है - जिथं शक्य नहीं तिथं वेगळं लढतोय - समनव्यातुन सामोरे जातोय ऑन पुणे थंडी वृद्ध - लोकप्रतिनिधी और प्रशासनाला सूचना दिल्या जाईल
106
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 07:55:15
Yeola, Maharashtra:येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग येवला येथे संपन्न झाले. येवला नगरपरिषद निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम, EVM-VVPAT हाताळणी, मतदान केंद्रावरील शिस्त, मतदारांना मार्गदर्शन, तसेच निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
55
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 07:54:57
Washim, Maharashtra:वाशिम रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिममध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला.‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार’ आणि ‘तुमचे मतदान तुमचा अधिकार’अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. नगरपरिषद कार्यालयातून सुरू झालेल्या रॅलीत उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार निलेश पळसकर,मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांसह विविध अधिकारी सहभागी झाले.मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून मतदानाची शपथ घेतली तसेच सेल्फी पॉईंटद्वारे जनजागृतीचा संदेश दिला. एनसीसी विद्यार्थ्यांचे पथसंंचलन व मतदान जनजागृतीवरील पथनाट्य विशेष आकर्षण ठरले.‘एक मत देश घडवते’,‘मतदान न करणारा तक्रारीचा अधिकार गमावतो’ अशा संदेशांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.एनसीसी, स्काऊट-गाईड, विविध शाळांतील विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे रॅली उत्साहात पार पडली.शहरातील प्रमुख मार्गाने फेरी मारल्यानंतर रॅलीचा समारोप नगरपरिषदे येथे करण्यात आला.सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा करत लोकशाही बळकटीसाठी संकल्प व्यक्त केला.
57
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 07:49:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील बिकट रस्त्यांच्या विरोधात कोल्हापुरातील सजग नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. पण तत्पूर्वीच कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोल्हापुर शहरातील अनेक चौकामधील खड्डेमय रस्तांना गुळगुळीत करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 24 तारखेला लेखी म्हणून मांडण्याचे आदेश कोर्टाने दिल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. रस्त्याच्या दर्जाहीन परिस्थितीमुळे मणक्यांचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही सर्व परिस्थिती कोल्हापूरकर कित्येक वर्षापासून सहन करत आहेत. या संदर्भात कोल्हापुरातील नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन देखील दिले, पण या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यानंतर कोल्हापुरातील सजग नागरिकांनी कोल्हूर प circuito बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली. पण आता सुनावणी होण्याआधी रस्त्यांना वरवरची मलमपट्टी केलं जात असल्याच दिसून आल्यामुळे याचिकाकर्ते संतप्त झाले आहेत.
50
comment0
Report
SKShubham Koli
Nov 20, 2025 07:49:34
Thane, Maharashtra:Anchor:- ठाणे शहरातील कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबरपासून कार्यान्वित केलेल्या एआय आधारित आयटीएमएस सीसीटीव्ही प्रणालीने अडीच महिन्यांत वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल ३०,०८५ वाहनचालकांना ‘तिसऱ्या डोळ्या’तून टिपले असून सर्वांना ई-चलनद्वारे दंड पाठवण्यात आला आहे. या २४ तास कार्यरत हाय-डेफिनेशन कॅमेऱ्यांद्वारे १८,१६५ सिग्नल जंपर्स, १०,६११ विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ८१५ स्टॉप लाईन न पाळणारे आणि ४९४ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून मोटार वाहन कायद्यान्वये अंदाजे ३०.८५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आयटीएमएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून सप्टेंबरमध्ये १६,७०९, ऑक्टोबरमध्ये ९,०८२ तर १७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४,२९४ नियमभंगाच्या घटना नोंदल्या गेल्या. या आकडेवारीवरून ठाणेकरांमध्ये वाहतूक नियमांविषयी सजगता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
78
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 20, 2025 07:49:20
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते ठाणे लोकल में मराठी–हिंदी वाद से मराठी विद्यार्थी को मारहाणी की गई। मानसिक तनाव से 19 वर्षीय मराठी विद्यार्थी ने कल्याण में अपने घर आकर गळफास ले लिया। अर्णव खैरे नाम के इस विद्यार्थी की मौत के कारणों पर कोलशेवाडी पुलिस तहकीकात कर रही है। घटना के अनुसार ट्रेन में हिंदी में थोड़ा-forward बोलने पर चार-पाच युवकों ने उससे मराठी बोलना नहीं आता क्या? मराठी बोलने की लाज आती है क्या? जैसे शब्द कहे और उसके बाद उसे बुक्के मारहारे गए। अर्णव ने कल्याण से लोकल से कॉलेज के लिए प्रस्थान किया था और ठाणे स्टेशन पर उतरकर अगली लोकल से मुलुंड गया। घर पहुँचने के बाद उसने घबराहट से अपने परिवार को फोन किया। शाम को घर पहुँचने पर दरवाजा अंदर से बंद था, शेज़ारों की मदद से दरवाजा खोला गया तो अर्णव ने Oढ़नी से गला दबाकर आत्महत्या कर ली। डॉक्टरों ने अस्पताल में उसे मृत घोषित कर दिया। पिता जितेंद्र खैरे ने कल्याण कोळशेवाड़ी पोलीस थाने में मामला दर्ज कराया है और पुलिस मामले की जांच कर रही है। घटना से क्षेत्र में तनाव फैल गया है और परिवार ने कठोर कार्रवाई की मांग की है।
90
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 20, 2025 07:48:51
Nagpur, Maharashtra:On शिंदे शाह भेट * एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते कुठेही नाराज नव्हते.. काल ते अमित शहा यांना भेटले.. नगर विकास खातं तसेच केंद्र सरकार सोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एनडीएचे नेता म्हणून त्यांनी भेट घेतली.. Nda ची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात... * ते नाराज असल्याची बातम्या कपोल कल्पित आहे.. * महाराष्ट्रात महायुती 51 टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी भेट घेतली होती, तीच त्यांची भूमिका आहे.. On शिंदे नाराज * समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही.. मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहे.. * सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे... त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही... On डोंबिवली पक्षप्रवेश * डोंबिवली मध्येही शिंदे कडे किंवा भाजपकडे उमेदवारी मिळत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले आहे * एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. भाजपलाही आपला पक्ष वाढवायचा आहे.. * पक्षप्रवesha संदर्भातल्या नाराजी बददल ते अमित शहाकडे जातील असे वाटत नाही, त्याबद्दल त्यांना तक्रार करायची असेल, तर माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतील.. On आरक्षण मर्यादा याचिका * सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्या असे निर्देश दिले.. ओबीसींचा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.. * 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या जेव्हा सुप्रीम कोर्ट असे सांगतो, तेव्हा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे.. (On redevlopment संदर्भातील निर्णय) * राज्य सरकारने निर्णय घेतला की रीडेव्हलपमेंटच्या वेळेला 600 फुटापर्यंत भाडेकडूना घर दिल तर मुद्रांक शुल्क लागणार नाही.. मुंबई उपनगर परिसरातील सर्व भाडेकडून साठी हे अत्यंत दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आहे.. * 15/ 10 / 2024 पर्यंत ज्यांनी ज्यांनी लेआऊट मध्ये घर घेतले आहे, घर बांधले आहे.. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही तुकडे बंदी कायदा रद्द केला आहे.. या तारखेपर्यंतचे सर्व बांधकाम नियमित केले जाईल. कुठलाही शुल्क घेतला जाणार नाही साठ लाख कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होईल.. (on सेवानिवृत्त अधिकारी) * महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती केल्या आहे, मोठ्या संख्येने नायब तहसीलदार पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत पदोन्नती दिल्या आहे.. गेल्या अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढला आहे. साडेपाचशे पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे प्रमोशन केले आहे.. त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची आम्हाला गरज उरणार नाही... (on vertical 7/12) या राज्यात व्हर्टीकल सातबारा योजना लागू होत आहे. विधिमंडळासमोर कायदा आणणार आहोत... एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल... त्या जमिनीची मालकी मूळ जमीन मालकाकडे आहे आणि फ्लॅट ची रजिस्ट्री झालीय... अशा सर्व फ्लॅटधारकांना त्या जमिनीचा शेअर.. प्रत्येक फ्लॅटचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल... याची समिती आम्ही नेमली आहे..अप्पर सचिव खर्गे आहे.. या सातबाराला व्हर्टिकल सातबाराला आम्ही अंतिम पूर्व असा आम्हाला दिसत आहे -- (On नागपूर काँग्रेस ) * वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, राजेंद्र मुळक यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, सुनील केदार यांच्या मतदारसंघातही पक्षप्रवेश झाले.. * भाजपमध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये समन्वय नाही, कोणी कोणाला विचारत नाही.. * वडेट्टीवार नाना पटोले यांना पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवार यांना विचारत नाही. दोन्ही मिळून सुनील केदारला विचारत नाही.. सर्व मिळून राहुल गांधींना विचारत नाही.. * काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहे, म्हणून ते मजबूत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक आहे, ते आपल्या तक्रारी नेत्यांसमोर सांगू शकतात. काँग्रेसमध्ये त्यांची अडचण होत होती.. * 2029 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात छोटी पार्टी राहील... On नवाब मलिक निवडणूक प्रमुख * राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या काय निर्णय करायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांना त्या संदर्भात सांगू शकत नाही.. नवाब मलिक यांना अजित दादा यांनी पक्षात घेतलं आहे, आता जबाबदारी देताना नवाब मलिक यांच्यावर कोणते आरोप झाले आहे, त्या संदर्भात नबाब मलिक योग्य निर्णय करतील... On उर्दू प्रचार पत्रक * जेव्हा आम्ही मुस्लिम उमेदवार उभा करतो, तेव्हा तो मुस्लिम मतदारांना आमचे मुद्दे समजले पाहिजे यासाठी काही पत्रक उर्दू भाषेमध्ये छापतात त्याला विरोध कसा करायचा... * कुणाला भाषेवरून थांबवता येत नाही.. स्थानिक उमेदवाराने केलेला तो प्रकार आहे... (On मुंबई रेल्वे स्थानक वायरल व्हिडिओ) * धर्मांतरण करण्यासाठी प्रवत्त करणे योग्य नाही. जो असे करत असेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला दिसून येईल की आम्ही कठोर पावले उचलली आहे... On शिक्षक मागणी * शिक्षकांच्या मागणी संदर्भात संबंधित मंत्र्यांना सोबत मी बोलणार आहे...
151
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 20, 2025 07:48:05
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात पक्ष सोडणाऱ्या भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले; त्यानंतर जिल्हा कार्यालयातून काढलेले फोटो पुन्हा सन्मानाने लावण्यात आले. भाजपच्या माजी नगरसेवक महेश सुखरामानी यांनी काही दिवसांपूर्वी सहकाऱ्यांसह पक्ष सोडून ओमी कलानी गटात प्रवेश केला होता. पक्ष सोडल्याच्या रागातून भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातील त्यांचा फोटो काढून त्यावर शाई ओतली. या घटनेबद्दल शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या; विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी काळे फासणाऱ्यांचा निषेध केला. फोटो पुन्हा जिल्हा कार्यालयात लावण्यात आले. जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा, राम चार्ली पारवानी यांनी पक्षात केले योगदान लक्षात घेऊन त्यांची फोटो लावण्यात आल्याची भूमिका वधारिया यांनी स्पष्ट केली.
125
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 20, 2025 07:47:22
Pune, Maharashtra:लोणावळ्यातील राजकारण दिवसेंदिवस नवे रंग दाखवत आहे. तिरंगी लढतीची चाहूल लागली असतानाच शिंदे गट आणि आरपीआयचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी प्रचारात वेगळाच रंग भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते २५ वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचाराची फाईल पुन्हा उघडत आहेत. स्विमिंग पूल प्रकरण उघड करत त्यानी “भ्रष्टाचार नाकापर्यंत पोहोचला होता” असा त्यांनी थेट आरोप केला. मात्र त्यांनी सर्वांना थक्क करत शहराच्या चौकात वॉशिंग मशीन ठेवून अनोखा राजकीय स्टंट केलाय. भ्रष्ट उमेदवारांना स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा त्यांनी थेट राष्ट्रवादी उमेदवार राजेंद्र सोनवणे आणि आमदार सुनील शेळके यांच्याकडे वळवला. तसेच भाजपला ही चिमटा काढत भाजपवरही त्यांनी सूचक टीका केलीये. भाजपकडे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार नव्हता का? नगराध्यक्षपदाचा उमेदवार गिरीश कांबळे यांचे चारित्र्य धुण्यासाठी हेच मशीन वापरलं जावं, असा तिरकस संदेश माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या भाजपला दिला. तसेच वाघमारे यांच्या या हटके प्रचारशैलीमुळे लोणावळाकरांचे लक्ष आता त्यांच्याकडे खिळले आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वाघमारे यांचं हे आंदोलन “फक्त राजकीय स्टंट” असल्याचं म्हणत टीका केली आहे. वाघमारे यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणूनच ते या पद्धतीच्या खेळी करत आहेत,” असा आरोप या दोन्ही पक्ष प्रमुखांनी केलाय.
85
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 20, 2025 07:15:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीतलं राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सर्व विरोधक एकवटलेत तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांचे कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मात्र विरोधकां मध्ये फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या निवडणुकांची चर्चा जिल्ह्यात चांगलीचं रंगलीय.. व्ही वो - सांगलीचे उरूण-ईश्वरपूर आणि जत नगर परिषदेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये चर्चेचे विषय बनलय, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर. कारण या दोन्ही नेत्यांच्या मधला संघर्ष उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यांपासून पाहिला आहे. एकमेकांची ऊनी-दुनी काढण्यापासून खालच्या पातळीवर टीकेचा प्रयोग दोन्ही नेत्यांकडुन झालंय, त्यामुळे पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष टोकाला पोहोचला. व्ही वो - दोघांच्या मधल्या संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी गडद होईल, यातून जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांना घेरण्यासाठी प्रयत्न करतील. कारण जत मध्ये जयंत पाटलांची मोठी ताकद आहे. साथ महाविकास आघाडीची आणि पडळकरांचे स्थानिक कट्टर विरोधक माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी जयंत पाटलांचा असणारा सख्य, यामुळे पडळकरांसमोर जयंत पाटील मोठा आव्हान उभे करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. व्ही वो - मात्र,जयंत पाटलांना पडळकरांच्या विरोधात जत नगर परिषदेसाठी मोट बांधता आली नाही. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी प्रयत्न देखील केला. पण त्यात यश मिळालं नाही. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि पडळकर यांचे कट्टर विरोधक विलासराव जगताप यांनी देखील वेगळी चूल मांडली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जत तालुक्याचे नेते सुरेश शिंदे यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता विलासराव जगतापांच्या सोबत जाणं, पसंत केला. तर माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील काँग्रेसच्या माध्यमातून पडळकरांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली, त्यामुळे या ठिकाणी पडळकर यांना विरोधकांकडून जे आव्हान निर्माण करायचं होतं, ते होऊ शकलं नाही. त्यामुळे पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे. व्ही वो - मात्र दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांना सर्व विरोधकांनी घेरले आहे. जयंत पाटलांचा विरोधात उरुन ईश्वरपूर नगरपालिका महायुतीची वज्रमूठ झाल्याचे पाहायला मिळतंय. आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपा�े जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद पवार और जयंत पाटलांच्या सर्व विरोधकांनी एकत्रित येत भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय, याचे नेतृत्व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करताय. व्ही वो - इतकंच नव्हे तर जयंत पाटलांना विरोधकांकडून घेरलं जात असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस, जयंत पाटलांच्या सोबतीला उभी राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. काँग्रेसने ईश्वरपूर नगरपालिका मध्ये आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही,इतकंच नव्हे तर काँग्रेस कडून निवडणूक देखील लढवली जात नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत उरुण ईश्वरपुर मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पाटलांकडून काँग्रेस सोबत असल्याचा दावा केला जातोय. व्ही वो - जयंत पाटील यांना विरोधकांनी घेरलंय,याउलट गोपीचंद पडळकर यांच्यासमोर विरोधकां फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपापल्या बालेकिल्ल्यात आता आपलं अस्तित्व राखण्याच्या लढाईत जयंत पाटील विरोधकांचे चक्रव्यूह भेदणार की विरोधक त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार,हे निकालानंतरच स्पष्ट होईल.. ईश्वरपूर आणि जत नगरपालिका निवडणूक चांगलीचं रंगणार,हे नक्की..
189
comment0
Report
Advertisement
Back to top