Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वासई के देवदळ में नकली ब्रांड उत्पाद बनाने वाले कारखाने पर पुलिस कार्रवाई

PTPRATHAMESH TAWADE
Dec 04, 2025 09:23:39
Vasai-Virar, Maharashtra
नायगाव पुलिस स्टेशन क्षेत्र के देवदळ में एक गैल्ट में नकली ब्रांडेड उत्पाद बनाने का व्यवसाय चल रहा था. वहाँ हर्पिक, डेटॉल, विम जेल और साबुन जैसी नामी-brand कंपनियों की नकली वस्तुओं की निर्मिती हो रही थी. पुलिस ने छापा मारकर एक بڑے कारखाने पर बेहतरीन कार्रवाई की. छापेमारी में बड़ी मात्रा में तैयार माल, कच्चा माल, नकली लेबल्स, स्टिकर्स, बोतलें और उत्पादन की उपकरणं जप्त की गईं. मामला कॉपीराइट कानून के तहत दर्ज किया गया है और आगे की investigation जारी है. ऐसी नकली prod her ग्राहकों के स्वास्थ्य को जोखिम में डालती थी, यह इसे बजार में कैसे पहुँचा रहा था इसका भी पता लगाने की जाँच जारी है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Dec 04, 2025 10:06:13
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळानदीच्या पुलाखाली चार ते पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.. चिमुकल्याची ओळख पटवून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि मृतदेह पुलाखाली कसा आला याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.. आज सकाळी घारगाव नजीक असणाऱ्या मुळानदीकडे गेलेल्या काही लोकांना पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय.. संबंधितांनी पोलिसांना माहिती देताच घारगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असला तरी या चिमुकल्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.. हा चिमुकला नेमका कोण? त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आणि मृतदेह पुलाखाली कसा आला? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.. कुणाला याबाबत काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन घारगाव पोलिसांनी केले आहे..
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 04, 2025 09:48:47
Kalyan, Maharashtra:श्रमजीवी संघटनेची केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगार व वाहन चालक कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध श्रमजीवी रयत कामगार संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणारे सफाई कामगार हा कल्याण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावतात, परंतु कामगारांना कामगार हक्क कायदे Prosper? मसल? (सूचना खाली) सवलत मिळत नाही, कामगारांना कामांच्या ठिकाणी महानगरपालिका व सुख सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन मिळत नाही, कामावर सुट्टी नाही, ओवर टाइम कामाचा मोबदला नाही, पगारात तफावत आढळतात. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर धडक देत बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे
96
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 09:47:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर दादा भुसे पीसी टीईटी हा विषय सुप्रीम कोर्टातून आलाय,  2010 पूर्वीचे शिक्षक बाबत येणाऱ्या काळात कसे मार्गक्रमण करता येईल याबाबत शासन निर्णय घेईल, या आधी ही शिक्षक सोबत  बैठक झाल्या आहेत,देशपातळीवर चा हा टीईटी निर्णय आहे इतर राज्य काय भूमिका घेताय यावर आपले लक्ष आहे... विधी व न्याय विभाग संवाद सुरू आहे , मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरुय शिक्षकांना विनंती आवाहन आहे आम्ही याबाबत गंभीर आहोत सकारात्मक निर्णय करू,  आपण आंदोलन उद्या करू नये,  शासन सकारात्मक आहे, मग असे असताना आंदोलन कशाला आम्ही संवाद साधू शकतो ओन कोल्हापूर शिक्षक घोटाळा कोल्हापूर मधे जे काही प्रयत्न केला जात होता त्यात चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. - एस आय टी मार्फत अपेक्षित असलेला डाटा कलेक्ट केलेला आहे. आणखीन तीन महिन्याची मुदतवाढ या एस आय टी दिले आहे. - प्राथमिक पातळीवर चुकीचं काम केले जात होते तेथेच कारवाई करण्यात आली आहे. ऑन त्रिभाषा अहवाल. पाठीमागच्या काळात त्रिभाषा संदर्भात विचार झाला. समिती नेमण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या विभागाशी संवाद साधून चर्च करीत आहेत. त्याचा अहवाल येईल. समितीला जे अपेक्षित आहेत तसे कार्य करीत आहेत. समितीचा अधिकारी आहे. - कुठलीही शाळा बंद होणार नाही, पटसंख्या काही वाढेल याचे नियोजन सुरू आहे. ऑन बदली. - ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जी प शिक्षकाच्या बदल्या होतात, कुणाच्या चुकीच्या पद्धतीने बदली होत असेल, तसे आढळले तर कारवाई केली जाईल. ऑन ठाणे जिल्हाप्रमुख आरोप. - या संदर्भात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापातळीवर बैठक संपन्न झाली आहे. ही युती नैसर्गिक युती आहे. दोन्हीही एकमेकाचे कार्यकर्ते घेणार नाही, दोन्ही पक्ष अंमलबजावणी करतील. - एकमेकांचे कार्यकर्ते घेण्याच्या अशा घटना होत असतील तर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊ - एकनाथ शिंदे यांचे आम्हाला स्पष्ट आदेश आहेत.की युतीच्या माध्यमातून निवडणुकीत सामोरे जायचे आहे. - महायुतीच्या पक्ष एकमेकांसमोर पण निवडणुका झाल्या आहेत हे देखील मान्य करेल... ऑन सपकाळ आरोप - ज्या निवडणूक झालेल्या बघितल्या.. आता जे बोलायला लागले त्यातील एकही निवडणुकीत नव्हता... पराभव होणार हे माहिती होते, म्हणून प्रचाराला विरोधक फिरकले नाही.
25
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 04, 2025 09:37:06
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रातून स्वामींची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने सेवेकरी यात्रेत सहभागी झाले. श्री दत्त व स्वामींची आकर्षक मूर्ती असलेल्या पालख्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. दत्त जयंतीनिमित्त केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहा दरम्यान ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, मंडल स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, बली पूर्णाहुती, श्री दत्त जन्मोत्सव, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी शोभायात्रा काढण्यात आली.
29
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 04, 2025 09:34:43
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग – सोलापुरात प्रेम प्रकरणातून तृतीय पंथीयाची गळफास घेत आत्महत्या. सोलापुरातून धक्कादायक घटना समोर. प्रेम प्रकरणातून सोलापुरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने गळफास घेत केली आत्महत्या. प्रकाश कोळी असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीचे नाव. सुजीत जमादार नामक प्रियकर तृतीयपंथीय व्यक्तीला फसवून दुसऱ्या सोबत लग्न करत असल्याने घडली घटना. प्रकाश कोळी यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत मांडली व्यथा. सदर घटनेने सोलापुरात एकच खळबळ माजली असून शासकीय रुग्णालय परिसरात तृतीय पंथी यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
70
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 04, 2025 09:34:15
Nanded, Maharashtra:मतदार यादीत घोळ असल्याचे नवनवीन प्रकार दररोज समोर येत आहेत. नांदेडमध्ये तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेड महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार प्रारूप यादी जाहीर झालीये. या यादीत मध्ये धक्कादायक प्रकार आढळून आलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता हा खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा आहे. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक पाच ची प्रारूप मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसून आला. जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर IIB कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर जवळपास सहाशे ओळखपत्रावर RCC कोचिंग क्लासेस चा पत्ता आहे. तर चारशे मतदार ओळख पत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे. असे एकूण 2800 मतदार ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता आहे. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अश्याप्रकारे नोंदणी करण्यात आली. शेकडो ओळख पत्रात पत्ता, घर क्रमांक नाही. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले असा सवाल मनसेने उपस्थित केलाय. याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिलीये. जुना नांदेड शहरातील मतदार यादीतही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. जुना नांदेडमध्ये सराफ बाजारात पश्चिम बंगाल चे कारागीर आहेत. हे कारागीर इथले रहिवाशी नसताना जवळपास आठशे कारागीरांना इथले मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. जवळपास बाराशे दुबार मतदार आहेत. तर शोकडो मतदार ओळखपत्रावर पत्ताच नाही. याबाबत शिवसेना शिंदे गटाने तक्रार देऊन ही यादी दुरुस्त करण्याची मागणी केलीये. मतदार याद्यामध्ये अनेक चुका, गंभीर त्रुटी आढळत आहेत. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी हा हे झाले असेल तरी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता असलेले हे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यातूनही आलेले आहेत. त्यांनी महापालिकेसाठी मतदान केले तर याचा परिणाम निवडणूकवर होणार नाहीका हा प्रश्न आहे. शिवाय पश्चिम बंगाल मधील कारागीर इथले मतदार कसे होऊ शकतात हा देखील प्रश्न आहे. विरोधी आणि सत्ताधारीही हा प्रकार समोर आणताहेत. त्यामुळे निवडणूक आयोग या मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी काय कार्यवाही करते हे पाहावे लागणार आहे.
93
comment0
Report
SKShubham Koli
Dec 04, 2025 09:04:47
Thane, Maharashtra:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक byte पॉइंटर नहीं रहा। ऑन लोकार्पण सोहळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकार्पण और भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे अनेक ठिकाणी विविध विकास प्रकल्प कामे होत आहेत. स्थानिक आमदार और मंत्री असल्यामुळे या विकास कामाच लोकार्पण शुभारंभ करत आहेत। ऑन निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणूक बैठक 10 तारखेला प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसारित होत आहेत। शक्य झालं तर साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान आचारसंहिता लागू शकते और 15 ते 20 जानेवारी दरम्यान निवडणुका लागू शकतात। आम्ही शिवसैनिक आहोत निवडणुका तोंडावरती घेऊन विकास करत नसतो 365 दिवस सर्वसामान्य जनतेपर्यंत 24 तास राहण्याचा काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अनुयायी करत असतो. निवडणुका आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही। शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरे जायला सज्ज असते. ऑनभरत गोगावले और तटकरे राडा निवडणुकीत तळागाळातला कार्यकर्ता नशीब आजमावत असतो. काही ठिकाणी एकत्र काही ठिकाणी वेगळे लढलो आहोत। संमिश्र प्रतिसाद मिळत आहे 21 तारखेला कळेल 75 टक्के पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार. ऑन कल्याण डोंबिवली भाजप शिवसेना पक्ष प्रवेश वाद उफाळला. या सर्व कटो कल्पित बातम्या आहेत। या फक्त बातम्या आहेत काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इथून तिथून पक्ष बदल करत असतात. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणेचा विकास केलाय अजून देखील उपमुख्यमंत्री काम करत असताना शिंदे यांनी विकास केलेला आहे जिल्ह्याचा. जनतेला न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहे। ऑनमंसे नेते अविनाश जाधव हजार कोटी निवडणुकीत वाटप. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तीनच नेते फिरत होते. देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे पायाला भिंगरी बांधून 53 सभा दहा दिवसात घेतल्या हा इतिहास आहे. कोणीही वल्गना करू नये. त्यांना जर बोलायचं असेल तर त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी कोण उतरल. कोणी काही बोलू नये. ठाकरे बंधू कुठे दिसले नाही शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते प्रचारात उतरले नाही. वाऱ्यावर सोडून दिलं होतं आम्ही आमच्या कार्यक्रम सोबत बळ दिले होते. त्या बळामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येणार. निवडून येण्यापूर्वी पैशाचा वापर वर्ग ना करत आहे 21 तारखेच्या नंतर कळेल. ऑन उद्धव ठाकरे आपापसात मारणारी आणि धाडी. निवडणुकीचा कौल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने असणार. प्रचारामध्ये उडी मारली असेल तर तो त्यांना नैतिक अधिकार होता. आता त्यांना तू अनैतिक अधिकार राहिलेला नाही. चुकिचं करत असतील तर धाड. असं काही नाही सांगोल्या मध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या घरावर आणि कार्यालय मध्ये धाडी टाकलेल्या आहेत. असं चुकीचं काही नाही निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. Evm मशीन सेफ. EVM मशीन सेफ आहे. लोकसभेमध्ये उमेदवारांना विजय मिळाला आणि जास्त टाकत मिळाली होती तेव्हा EVM मशीन योग्य होती आणि विधानसभा मध्ये उमेदवारांना कमी मत पडली. आमचा लाडक्या बहिणीमुळे मत मिळाली तेव्हा EVM मशीन लगेच चुकीची। एकावेळी वेगळा निर्णय घ्यायचा असं बोलणं योग्य नाही... ऑन ubt माजी नगरसेवक सुधीर भगत उमेदवार नाव निवडणूक यादी मध्ये नाव वगळले. यावर मला माहिती नाही असं जर घडलं असेल तर निश्चितपणे त्यांना न्यायालयात न्याय मिळेल. ऑन तपोवन और संतोष बांगर तपोवन बद्दல मला कोण काय बोलले ते माहिती नाही. संतोष बांगर व्हिडिओ बाबत मला माहिती नाही... मी ते बघितलं नाही..
187
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 04, 2025 08:51:56
154
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 04, 2025 07:53:14
Washim, Maharashtra:नगर परिषदच्या नगराध्यक्ष आणि सर्व 32 नगर सेवकांच्या जागांसाठी तसेच रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ या दोन नगर सेवकांच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. वाशिम च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आणि रिसोड नगर परिषदेच्या 02 नगर सेवकाच्या उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे या ठिकाणी निवडणूक लांबवण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना 10 डिसेंम्बर पर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्या नंतर 11 डिसेंम्बर रोजी निवडणूक चिन्ह नेमून देऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून 20 डिसेंम्बर ला मतदान पार पडणार आहे. या मतदानाची मतमोजणी तसेच जिल्ह्यातील रिसोड, मंगरूळपीर, कारंजा या 03 नगर परिषद आणि मालेगांव या एका नगर पंचायत साठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी ही 21 डिसेंम्बर ला पार पडणार आहे. वाशिम ची संपूर्ण निवडणूक आणि रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ च्या नगर सेवकांच्या जागेसाठी ची निवडणूक लांबल्याने उमेदवारांमध्ये नाराजी असून त्यांच्या निवडणुकीचा खर्च तसेच सलग 20 दिवस प्रचार आणि मतदारांच्या भेटी, रॅली या काढण्यासाठी प्रचंड तणाव येत आहे.
83
comment0
Report
Advertisement
Back to top