Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

किशोर जोरगेवार ने सुधीर मुंगंतीवार के बयां पर तीखा प्रहार, भाजपा कार्यकर्ताओं का अपमान

AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 06:31:30
Chandrapur, Maharashtra
पक्षाने माझी ताकद कमी केली या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया, अशा प्रकारचा वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी मंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. आमच्याकडे मंत्री पद असताना देखील आम्ही अनेक नगरपरिषदांमध्ये पराभूत झालो, मंत्रीपद असताना दोन वेळा आम्ही लोकसभा देखील पराभूत झालो.  चंद्रपूर जिल्ह्याकडे सलग पाच वर्षे मंत्रीपद असताना देखील पराभूत झालो असेही ते म्हणाले. शोभाताईं फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कौटुंबिक असून त्यांनी पक्षासाठी कष्ट केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे, असेही आ. जोरगेवार म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 07:52:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन ठाकरे काँगेस युती प्रयत्न - आघाडी संदर्भात अधिकृत बोलणीला आज सुरुवात करीत आहोत.. प्राथमिक बोलणी झालेली आहे. वंचित, शरद पवार यांची राष्ट्रवादीशी देखील आमच्याशी बोललेले आहे. यापूर्वी मागच्या काळात देखील बोलणी झाली आहे. अंतिम बोलणीसाठी प्रयत्न सुरू आहे. - चर्चा चालू आहे, सगळ्यांना सांगून चर्चा होत नसते. सगळ्या गोष्टी येणाऱ्या दिवसात स्पष्ट होतील. ऑन कालचा निकाल.. - आमचे सैन्य लढले, जेवढे लढाई द्यायचि तेवढी लढलो, साधनाची कमतरता होती, १०- १० हजार वाटले गेले... - सगळ्या गोष्टींचा अंत ठरलेला आहे. अगोदर कुणीतरी पैशे वाटप करत होते आता भाजप करत आहेत. ऑन उद्धव ठाकरे यांच्यावरील सभा न घेतल्याची टीका. - आमचा पक्ष केडर बेस आहे, लीडर बेस नाही... एक एक शिवसैनिक लढला. कित्येक सभा तुमच्या वांझोट्या ठरलेल्या आहे. हेलिकॉप्टरमध्ये सभा घेतल्या का? फडणवीस यांच्या पैठण व इतर ठिकाणी सभा झाल्या, मात्र उमेदवार पडल्या ना..*एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडून स्ट्राईक रेट बघा,क्रिकेट खेळा...* त्यांनीच एकमेकांची अडवली आणि जिरवली.... ऑन रोहित पवार विधान. - अशोकराव चव्हाण यांनि कही लोक उभे केलेम्म्म - मनपा निवडणुक या मोठ्या आहेत. नगर परिषद आणि मनपा निवडणुकीत लोकसंख्येचा मोठा फरक आहे. ऑन मोहन भागवत विधान. - हिंदूंसाठी भारत देश आहे हे सत्य आहे. मात्र बाकीच्या देशातील हिंदूकडे देखील लक्ष दिले पाहिजे. बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाला जाळले गेले तेथे देखील पंतप्रधान यांनी लक्ष घालावे.. - संघाने भाजप व त्यांचे अलायन्स सोडून इतर कोणाचा प्रचार केलेला तुम्ही कधी पाहील का? - मी देखील संघाचा आहे.मला अभिमान आहे मी संघाचा असल्याचा.आजची भाजप मत विकत घेते हे संघाला मान्य आहे का? ऑन नितीन गडकरी विधान. - नितीन गडकरी मोठ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतात. मात्र, त्यांचं ऐकतो कोण..? जी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराने लटपट झाले आहे त्यांना सांगा... ऑन मनगुंटीवर. - हे होणार आहे.माझ्या घरात कोणी घुसले तर स्वस्त वाटते.आता भाजपचे जूने नेते बोटावर मोजण्या इतपत राहिलेले आहे. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे. ऑन संभाजीनगर प्रचार. - 26 तारखेपासून संभाजीनगरमधे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनपा प्रचाराला सुरुवात होईल...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 07:48:39
kolhapur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे बाईट देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी मेहनत घेतली आम्ही 51 टक्के मतं मिळाली.. दोन तृतीयांश जागा मिळाल्या महापालिका,जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2/3 जागा जिंकू महायुती अजीत पवार काही ठिकाणी आमची अजितदादांशी चर्चा सुरू आहे.. मात्र काही ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहे.. पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते खूप जास्त आहे.. तिथे ऍडजस्टमेंट होत नाही. महायुती महत्वाची आहे.... तीन पक्षांच्या समन्वय समिती मिळून निर्णय घेऊ MIM ला चांगलं मत मिळाले आहे.. काही ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदी निवडून आले आहे... पूर्वी विदर्भात एवढे स्थान नव्हतं ज्यांना भारतीय जनता पक्षात याच्या त्यांना आम्ही थांबवू शकत नाही.... जे आले त्यांचा पक्ष प्रवेश केला.. अजित दादा पवार यांच्या पक्षाच्या कोणाचाही अधिकृत प्रवेश झालेला नाही... यापूर्वी जे राष्ट्रवादीत राहिले असेल त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल.. डायरेक्ट अजित दादांच्या कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांचा पक्षप्रवेश झाला नाही.. पण निश्चित आम्ही अजितदादांचशी चर्चा करू महाविकास आघाडी पुन्हा महाविकास आघाडीत मनभेद आहे... निवडणुकीच्या पराभावानंतर हे आत्मचिंतन करत नाही... चंद्रपूर मध्ये आम्ही आत्मचिंतन करत आहे मुजोरी जात नाही... आत्मचिंतन करत नाही कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही.... आला चेंडू मारला एवढेच करतात... ईव्हीएम निवडणूक आयोगालाच दोष देत राहतात मनसे --काँग्रेस एकत्र तो त्यांचा अधिकार आहे... काही ठिकाणी अजित दादा आमच्या सोबत लढणार आहे काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार आहोत पुणे पिंपरी चिंचवड मध्ये काही ठिकाणी वेगळे लढण्याचा निर्णय अजित दादा आणि आम्ही मिळून केला होता... मनसे -UBT यापूर्वी खूप वेळा घोषणा झाली आहे आमच्या शुभेच्छा आहे... पारिवारिक शुभेच्छा आहे... भाऊ एकत्र येणे राज्याकरता चांगले राजकारणा करता एकत्र नाही हा ढोंगीपणा राजकारणाकरता दोघे भाऊ वेगळे झाले होते भाजपा ब टीम --रोहित पवार रोहित पवार यांना काँग्रेस भाजपाची बी टीम वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडी तून बाहेर पडावे... हर्षवर्धन सपकाळ ठरवतील काय करायचे समीक्षा आज मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र बसणार आहोत निवडणुकबाबत समीक्षा करणार आहोत... अपेक्षित यश मिळालं त्याबाबत आत्मचिंतन करणार आहोत गडकरी बरोबरच आहे. विकासावरच लढले पाहिजे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 22, 2025 07:48:18
Mumbai, Maharashtra:Anchor, जगातील सर्वात मोठ्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती घाटकोपरच्या संघानी गार्डनमध्ये साकारण्यात आलेली आहे. भाजप आमदार राम कदम यांच्या हस्ते या तलवारीचं लोकार्पण करण्यात आलं. 17 फूट उंचीची जगदंबा तलवार असून गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर भवानी तलवारीचे लोकार्पण करून हा विजयोत्सव राम कदम यांनी साजरा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काळ महाराष्ट्र जिंकला छत्रपती महाराजांच्या आशिर्वादाने मुंबई महानगरपालिका जिंकू आणि या विजयाचा भगवा डौलाने फडकेल महाराजांची प्रिय तलवार ही जगदंब होती या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केली ही तलवार देशवासियांना प्रेरना देणारी आहे १२२ सेंटीमीटर ची मूळ जगदंबा तलवार आहे आणि त्याची प्रतिकृती ही घाटकोपर मध्ये आली आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 22, 2025 07:36:16
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर नगरपालिकेत थोरात - तांबे गटाने एकहाती ‌सत्ता मिळवत शिवसेना भाजप युतीला शह दिलाय... नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डॉ.मैथिली तांबे यांनी पदभार स्विकारण्यापूर्वीच हातात झाडू घेत स्वच्छता अभियानाला सुरूवात केलीय..संगमनेर बसस्थानक परिसरातील श्री दत्त मंदिरात अगोदर सामुहीक आरती केली.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात , माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे , सर्व नूतन नगरसेवक यांनी आरतीत सहभाग घेतला...तयानंतर नूतन नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि त्यांच्या सासूबाई दुर्गाताई तांबे , सर्व नगरसेवक यांनी बस स्थानक परिसरात स्वच्छता केली...शहर स्वच्छेतह नदी परिसराची स्वच्छता , वृक्ष लागवड हाती घेणार असल्याच डॉ.मैथिली तांबे यांनी बोलताना सांगितलं आहे...सासू माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नूतन नगराध्यक्षा सुन डॉ.मैथिली तांबे यांनी पहिल्याच दिवशी झाडू हातात घेतल्याने चर्चेचा विषय बनलाय...या ठिकाणाहून आढावा घेत डॉ.मैथिली तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 22, 2025 07:16:58
Kolhapur, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक मागची स्टोरी आता नाटकाच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच उलगडणार आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत लिखित हे नाटक द किरण माने शोच्या माध्यमातून रंगभूमीवर येत आहे.. अस्सल मराठी म्युझिकल स्टोरी या नाटकाच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. यापूर्वी अनेक नाटक, चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आले पण त्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहास म्हणावा तसा समोर आला नाही, तो दडलेला इतिहास नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रंगमंचावर येत असल्याचा दावा नाटकाचे लेखक इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि नाटकाचे निर्माते कलाकार किरण माने यांनी केला आहे..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 06:50:36
Yeola, Maharashtra:येवलं नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची संपन्न झाली येव्हेल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना यांच्यातच सरळ लढत पाहायला मिळाली होती दरम्यान वार्ड क्रमांक सहा ब मध्ये शिवसेनेकडून उभ्या असलेल्या मीनाक्षी सचिन अलगट यांचे पती सचिन अलगट यांचे प्रचारादरम्यान दुःखद निधन झाल्याने अलगट कुटुंबियांनी प्रचार थांबवायला दुसरीकडे मात्र रणधुमाळी सुरू होती याच वार्डात सोनल नाईकवाडे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभ्या होत्या राजकीय अनुमान पाहता सोनल नाईकवाडे विजय होतील असा अंदाज बांधला जात होता मात्र मीनाक्षी अलगट यांना मतदारांनी सहानुभूती दाखवत विजयाची माळ गळ्यात घातली पत्रकारांशी बोलताना मीनाक्षी अलगट या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 06:02:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 22, 2025 05:50:05
Washim, Maharashtra:वाशीम वाशिम वाशीम जिल्ह्यातील कारंजा नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय फेरबदल घडवून आणला आहे.या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केला आहे.या पराभवामुळे कारंजा विधानसभेच्या भाजपच्या आमदार सई डहाके यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.कारंजा नगरपरिषदेत एमआयएमने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. कारंजा नगरपरिषदेतील एकूण 31 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले असून भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे.राष्ट्रवादी (अप) पक्षाला एक व अपक्षाला एक जागा मिळाली आहे.वाशिम नगरपरिषदेतही एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी झाले असून, विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमचे वाढते वजन स्पष्ट झाले आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये एमआयएमच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा सुद्धा झाल्या होत्या. *नगराध्यक्ष : फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी (एमआयएम) **पक्षनिहाय नगराध्यक्ष,नगरसेवक संख्या : * एमआयएम – 16 * भाजपा – 13 * राष्ट्रवादी (अप) – 1 *अपक्ष :1
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 05:48:51
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांवर मोठी कारवाई बारा वाहनांसह सहा वाळू माफियांना घेतलं ताब्यात पंढरपूर शहरालगतच्या इसबावि भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि त्याची वाहतूक सुरू आहे. याबाबत पोलिसांनी पथक तयार करून वाळू उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईमध्ये 12 वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांनी जप्त केलीली आहेत या कारवाईदिकून बारा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आज पर्यंत पोलिसांना वाहने मिळत होती पण पहिल्यांदाच पोलिसांनी वाळूमाफीयांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील कौठाळी शिरढोण या परिसरात सुद्धा मोठ्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे त्यावर सुद्धा कारवाई होण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होते
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 22, 2025 05:39:01
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- चिपळूण नगरपरिषद में शिवसेना के उमेश सकपाळ ने रमेश कदमांचा पराभव कर आश्चर्यजनक विजय हासिल किया। चिपळूण नगर परिषद में शिवसेना-भाजपा युती के उमेश सकपाळ ने माजी आमदार रमेश कदमांचा पराभव किया और जीत हासिल की। रमेश कदम के प्रचार में उद्धव ठाकरे-सेना के आमदार भास्कर जाधव भी मैदान में थे। आपने कबड्डी खेलते समय जैसी चाल चली, वैसी ही परिणाम निकले। हमने किसी का होम-पिच नहीं देखा, जनता ने हमारे काम पर विश्वास दिखाया। एकनाथ शिंदे ने चिपळूण में मेरे प्रचार के लिए सभाएँ कीं और फायदा हुआ। उमेश सकपाळ एकनाथ शिंदे, उदय सामंत के समर्थक रहे हैं। उमेश सकपाळ के लिए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने चिपळूण में सभा ली। मेरे विजय के लिए उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपा नेता प्रशांत यादव ने मेहनत की। मैं सड़क पर का कार्यकर्ता हूँ, इसलिए कोई चुनौती नहीं मानी। पिछले 5 वर्षों में जनता की हर मुश्किल में मैं पहुँचा और आज जनता ने इसे मान्यता दी।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 22, 2025 05:38:52
Amravati, Maharashtra:चार फाईल आहे अंजनगाव सुर्जीत मतमोजणी मध्ये घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा यशोमती ठाकूरांचा इशारा अंजनगाव सुर्जी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणी मध्ये घोळ झाल्याचाआरोप काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आशा बानो रशीद खान यांचा पराभव झाल्याने काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. अंजनगाव सुर्जी च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अरेरावी करत घाईगडबडीने निकाल दिला या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटला गेला आम्ही फेर मतमोजणी मागितली होती पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नाही मतमोजणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नाही अंजनगाव सुर्जी मध्ये काँग्रेस विजयी झाली आहे पण आमच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने निकाल दिला असे आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 05:35:35
Akola, Maharashtra:राज्यातील महापालिकांमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकावला असला, तरी अकोल्यात या विजयाच्या गजरातच नाराजीचा आवाज तीव्र होताना दिसतोय. सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेला भाजप, पक्षातील असंतोष रोखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरत असल्याचं चित्र अकोल्यात उघडपणे समोर आलं आहे. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही आजी-माजी नगरसेवकांकडून ‘तिसरी आघाडी’ उभारण्याच्या हलचाली सुरू असल्याने आधीच पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली असताना, आता थेट पक्षाच्या तळागाळात मोठी भगदाडं पडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अकोला शहरातील खडकी भागातून भाजपला मोठा धक्का बसला असून, तब्बल राजेश घोगरे या माजी भाजप पदाधिकारी यांच्यासह २५० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपला रामराम ठोकत उबाठा गटात प्रवेश केला आहे. यामध्ये भाजप महिला आघाडीच्या माजी ग्रामीण उपाध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसलाही फटका बसला असून, काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडून उबाठामध्ये प्रवेश केला आहे. उबाठाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून, प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट आणि जळजळीत आरोप केले आहेत. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या लोकांना तिकीट दिलं जातंय, पक्ष वाढीसाठी घाम गाळणाऱ्यांना बाजूला सारून, सत्तेच्या गणितात बसणाऱ्यांना पुढे केलं जात आहे असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांना सोबत घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र दोन दिवसच उलटून पक्षाला गळती लागली आहे. एकीकडे ‘पक्ष संघटनेचा कणा मजबूत’ असल्याचा दावा करणारा भाजप, दुसरीकडे मात्र त्याच संघटनेतील कार्यकर्त्यांची नाराजी ऐकून घेण्यात अपयशी ठरत असल्याचं अकोल्यातील हे चित्र सांगत आहे. नगरपालिकेतील यशाचा जल्लोष सुरू असतानाच, पक्षातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची रांग भाजपसाठी येत्या निवडणुकीत किती महागात पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 05:20:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात भाजपने यश मिळवले असले तरी छत्रपती संभाजी नगरात भाजपला फक्त 1 नगराध्यक्ष निवडून आणता आला भाजपच्या हा पराभवामागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याचा चर्चा आता सुरु झाल्या आहेत आणि त्याच कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड मध्ये निवडून आल्या नंतरचे विधान भाजप नेते रावसाहेब दानवे याना टार्गेट करत सत्तार यांनी जालन्यातील भोकरदन मध्ये तुमचा सुपडा साफ केला असे विधान केले आहे , सोबतच छत्रपती संभाजी नगरातील फुलंब्री जो रावसाहेबांचा लोकसभा मतदार संघात येतो तिथं आणि कन्नड मध्ये जिथं रावसाहेब दानवे यांची मुलगी आमदार आहे तिथं ही आम्ही पराभव केला असे सत्तार यांचा विधानावरून स्पष्ट होतेय...फलंब्री मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नगर अध्यक्ष निवडून आलाय तर कन्नड मध्ये काँग्रेस चा नगर अध्यक्ष निबडून आलाय, तिथं भाजपच्या पराभवासाठी सत्तार यांनी काम केले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.. सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांचा आम्ही भोकरदनमध्ये सुपडासाफ केल्याचं सत्तार म्हणाले आहे. स्वतःचं गाव वाचवू शकत नाही, ते सिल्लोडमध्ये प्रचार करत होते असा खोचक टोलाही सत्तार यांनी दानवेंना लगावला आहे. तसेच फुलंब्री आणि कन्नडमध्ये देखील आम्ही गणित बिघडवले असा सत्तारांनी टोला लगावला. तर खुलताबाद मध्येही आमची भूमिका होती असे सत्तार म्हणाले निवडून आलेले सगळे माझे मित्र असल्याचं सत्तार म्हणाले.. त्यामुळं सत्तार यांची भाजप विरोधात भूमिका असल्या़ं पुन्हा एकदा दिसून येतंय..
0
comment0
Report
Advertisement
Back to top