Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304
श्री विठ्ठल-रुक्मिणी चंदनउटी पूजा के लिए ऑनलाइन पंजीकरण 13 मार्च से शुरू
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 07:31:49
Pandharpur, Maharashtra
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेची ऑनलाईन नोंदणी १३ मार्चपासून सुरू,चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र प्रारंभापर्यंत पूजेचा कालावधी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचेच चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.२१,०००/- व रु.९,०००/- इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करताना अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत मार्गदर्शन व नोंदणीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर पूजेबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी भाविकांनी दूरध्वनी क्र. ०२१८६-२९९२९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 08:50:53
Beed, Maharashtra:बीड: जर आपल्यावर कोणी हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाके यांचे चितावणीखोर आवाहन.... ANC -महाराष्ट्रात मेंढपाळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना आवाहन केले आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कोणी जर आपल्यावर हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असेही ते म्हणाले. माजलगाव तालुक्यात मेंढपाळांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रा. हाके यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीटे बंधूंचे आजोबा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगितले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. बाईट: लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक.. बाईट: पीडित कुटुंब
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 12, 2026 08:50:34
Pune, Maharashtra:मावळच्या इंद्रायणी तांदळाचा सुगंध सात समुद्रापार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवळतो. मात्र आखाती देशांतील युद्धाच्या काळ्या ढगांमुळे या सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर संकट ओढावू लागलं आहे. मावळ तालुक्यात पिकणारा इंद्रायणी तांदूळ आपल्या उत्कृष्ट चव, नैसर्गिक सुगंध आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. विशेषतः युनायटेड किंगडम आणि युनायटेड अरब अमिराती या देशांमध्ये या तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे मावळच्या इंद्रायाणी तांदळाच्या निर्यातीवर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ७७ टक्के तांदूळ युनायटेड किंगडमला तर जवळपास २३ टक्के तांदूळ युनायटेड अरब अमिरातीमध्ये निर्यात केला जातो. यामुळे मावळातील राईस मिल मधील काम देखील ठप्प पडल्याचे चित्र आहे. या राईस मिल चालकांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मात्र सध्या आखाती भागातील युद्ध परिस्थितीचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. निर्यात केलेला इंद्रायणी तांदूळ जेएनपीटी बंदरावर अडकून पडल्याने भात गिरण्या, व्यापारी आणि शेतकरी सगळेच चिंतेत आहेत. परिणामी पुणे मार्केट यार्ड आणि नवी मुंबईतील एफएमसी मार्केट यार्डमध्येही व्यवहार मंदावले असून बाजारपेठेत एक प्रकारची शांतता पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात या तांदळाची किंमत साधारण ५० ते ६० रुपये प्रति किलो असून, गुणवत्ता आणि पॉलिशिंगनुसार निर्यात बाजारात ती तब्बल १२५ रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र सध्या निर्यात बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. End Vo: मावळ भागातील हवामान आणि जमीन इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. त्यामुळे येथील शेतकरी सुमारे साडे बारा हजार हेक्टर क्षेत्रात हा सुगंधी, मध्यम आकाराचा आणि चिकट पोत असलेला तांदूळ पिकवतात. नैसर्गिक सुगंध, पौष्टिकता आणि फायबरयुक्त गुणधर्मांमुळे या तांदळाची मागणी देशासह परदेशात सातत्याने वाढत आहे. मात्र मावळच्या सुगंधी इंद्रायणी तांदळावर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींची सावली पडल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 12, 2026 08:47:47
Amravati, Maharashtra:Vo१: अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खारतळेगाव येथे ही घटना घडली. मंगेश देविदास गोटे, वय 45 वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश गोटे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. यामुळे घरामध्ये पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुन्हा एकदा दारूच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीमुळे मंगेश गोटे यांची प्रकृती गंभीर बिघडली आणि त्यांची मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पत्नीने पतीला मारहाणीची कबुली दिल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी वलगाव पोलीस अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. Vo२: घरगुती वाद आणि दारूच्या व्यसनातून घडलेल्या या घटनेमुळे खारतळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वलगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 08:47:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीच्या मिरज पंचायत सभापती निवडणुकी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याच्या झालेल्या अपहरणाच्या निषेधार्थ बुधगाव सह आसपासच्या सहा गावांमध्ये बंद पाळत निषेध नोंदवण्यात आला आहे. बुधगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेना शिंदे पक्षाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचा सभापती निवडीच्या आदल्या दिवशी अपहरण करण्यात आलं होतं आणि यानंतर त्यांचे सभापती निवड झाल्यानंतर सुटका करण्यात आली होती.या प्रकारामुळे मिरज पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली,त्यामुळे भाजप-सेना युतिचे सभापती निवडून येऊ शकले नाहीत,मिरज पंचायत समितीमध्ये महायुतीला सभापती पदापासून मुकावे लागलं,असा आरोप करत अपहरण प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने बुधगाव सह आसपासच्या गावात आज बंद पापुकारण्यात आला होता,त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला,यावेळी शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने यावेळी निदर्शने देखील करण्यात आली. बाईट - पांडुरंग इंगळे - अपहरण झालेले पंचायत समिती सदस्य. बाईट - बजरंग पाटील - जिल्हािपुः शिवसेना शिंदे पक्ष,सांगली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 12, 2026 08:46:47
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 08:34:55
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | किर्तनकाराचं कीर्तनात महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य, संतप्त जमावाची कीर्तन काराला मारहाण(पॅकेज) कीर्तनात कीर्तनकारांचं महिलेविषयी वादग्रस्त वक्तव्य,कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण, कीर्तनातील वक्तव्यावरून वाद; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावातील घटना कीर्तनामध्ये महाराजांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेच्या एका व्हिडीओवरून केलेल्या वक्तव्यावरून ही मारहाण करण्यात आली.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या गांधीली गावात एका कीर्तनकाराला संतप्त जमावाने बेदम मारहाण केलीय.कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर असं मारहाण झालेल्या कीर्तनकारांचं नाव आहे.महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक कीर्तन केलं होतं.या किर्तनात त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका महिलेच्या चंद्रग्रहणातील भाजी कापतानाच्या व्हिडीओचा दाखला दिला.चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी भाजी कापू नये असा समज मानला जातो.मात्र या महिलेचा भाजी आणि फळ कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं महाराजांनी तिची खिल्ली उडवत ती महिला आपल्या धर्माची नव्हती असं सांगत व्हिडीओमध्ये महिलेच्या पाठीमागे दिसणाऱ्या गौतम बौध्द यांच्या मूर्तीकडे अंगुली निर्देश केले साऊंड बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,(किर्तनाचा व्हिडीओ चालवावा) आमच्या धर्मावर आणि संतांवर कुणी आक्षेप घेतला तर सहन केला जाणार नाही असाही ईशारा महाराजांनी त्यांच्या कीर्तणातून दिला.त्यामुळे संतप्त जमावाने निवृत्ती महाराज वाडेकर यांचं घर गाठत घरावर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय. दरम्यान आपल्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण करण्यात आली असून ही मारहाण चुकीची असल्याच निवृत्ती महाराजांनी म्हटलंय.कीर्तनात केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्याबद्दल माफीही मागितल्याची कबुली महाराजांनी दिली बाईट : निवृत्ती महाराज वाडेकर,मारहाण झालेले महाराज दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात जाऊन आपल्याला वाद वाढवायचा नसल्याचं वाडेकरांनी म्हटलंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 08:30:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:गैस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे चूल आंदोलन.. अँकर - आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे भारतातल्या इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरचे झालेल्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सांगलीत चूल आंदोलन करण्यात आले. शहरातल्या स्टेशन चौक येतील गांधी पुतळ्यासमोर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. बाईट - राजेश नाईक - शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 08:21:28
Washim, Maharashtra:अँकर:इराण,इजरायल और अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची चर्चा होत असताना वाशिम जिल्ह्यातील गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्यााचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेडर मिळेल का नाही या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीवर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात गॅसचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅस नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळपासून अनेक नागरिक एजन्सीबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण तातडीने दूर करा किंवा ऑफलाइन नोंदणी करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 12, 2026 07:56:03
Nanded, Maharashtra:गोदावरी नदीचे नाभिस्थान असलेले नांदेड शहर. गोदावरी नदी म्हणजे नांदेड शहराची ओळख. पण नांदेड शहरातील सत्या नाल्यांचे घाण पाणी थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याने पवित्र गोदावरी नदीची गटारगंगा झालीये. नदीत नाल्यांचे पाणी मिसळू नये यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेली योजना काही दिवसातच बंद पडली. आता पुन्हा नव्याने सतरा कोटी रुपये खर्चून नवीन उपाययोजना केली जात आहे. पूर्वी नदीपत्राच्या जवळच पाईपलाईन टाकण्यात आल्याने ही पाईपलाईन नदीला पाणी आल्यानंतर गाळ साचून निकामी झाली होती. आता थोड्या वरच्या बाजूस नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. तीन नाल्यांसाठी पॉकेट एस टी पी करण्यात आलाय तर चौदा नाल्यांचे पाणी पाईपলাইन्​dद्वारे बोंधार येथील एसटीपी मध्ये नेला जाऊन घाण पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नव्याने करण्यात येणारी पाईपलाईन अत्यंत निकृष्ट दर्जाची असून काम पूर्ण झाले असतानाही नाल्यांचे पाणी नदीत मिसळत असल्याची तक्रार नगरसेविकेने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीये. नव्यानेच काम झालेले असतानाही घाण पाणी नदीत मिसळत असल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीये. परंतु काम संपत आले असून काम पूर्ण झाल्यानंतर घाण पाण्याचा एकाही थेंब नदीत मिसळणार नाही असा दावा प्रशासनने केलाय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 07:52:43
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 12, 2026 07:52:23
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 12, 2026 07:50:05
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यातील मटन खानावळ या राज्यात प्रसिद्ध असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये मटण खाण्यासाठी येवल्यात येत असतात मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमर्शियल गॅस चा पुरवठा बंद झाल्यामुळे खानावळी बंद ठेवण्याची वेळ हॉटेल मालकांवर आली होती दरम्यान बाहेर गावावरून आलेल्या खवय्यांचा हिरमोड होत असल्याने येवल्यातील हॉटेल मालकांनी आता सर्व स्वयंपाक चुलीवर सुरू केला असून कमर्शियल गॅस चा पुरवठा होईपर्यंत किमान घरगुती गॅस वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे या संदर्भात या मालकांसोबत conversation केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 07:34:43
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरातील हॉटेल व्यवसायिकांना गैस सिलिंडर पुरवठ्याचा फटका बसला आहे. या निमित्ताने कोविडच्या परिस्थितीची आठवण झाली आहे. होटल कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गैस सिलिंडर हॉटेल चालकांना मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्ये आता नवीन पदार्थ बनवणे बंद झाले आहे. स्वीट मार्ट आणि मिठाई तयार करणाऱ्या दुकानातील कामगारांना गैस सिलेंडर टंचाईमुळे सध्या नवीन पदार्थ बनवण्याचे काम नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका स्वीट मार्ट मिठाई दुकानदारांना बसला आहे. परराज्यातून विविध प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी कामगार आणले आहेत. मात्र व्यावसायिक गैस सिलिंडरचा पुरवठा नसल्याने हे कामगार बसून आहेत. याचा फटका स्वीट مار्ट चालकांना कामगारांनादेखील बसत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top