Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904
वन विभाग ने मोगरकसा-लेंडेजरी बछड़ा मृत्यु मामले में 6 सदस्यीय चौकशी समिति गठित
PTPRAVIN TANDEKAR
Jan 03, 2026 02:17:53
Bhandara, Maharashtra
मोगरकसा वाघ बछडा मृत्यु प्रकरणात अद्याप अटक नाही. मुख्य वनसंरक्षकांकडून ६ सदस्यीय चौकशी समिती गठीत. नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र आणि भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी संवर्धन क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या दिवशी एका पर्यटकाला बछड्याचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्या दिवशी त्याचा केवळ एक पाय सापडल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकांनी नागपूर मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास प्रतिबंधित पर्यटन क्षेत्र असलेल्या लेंडेझरीच्या कक्ष क्रमांक ३६ मध्ये पर्यटक हार्दिक राठोड यांना वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन बछड्याचा त्याच्या आईसोबतचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मृतदेह सापडला ते क्षेत्र पर्यटनासाठी पूर्णतः प्रतिबंधित आहे. अशा परिस्थितीत पर्यटक हार्दिक राठोड तेथे कसे पोहोचले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हार्दिक राठोडांनी जिप्सी चालक व गाईड यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊ नये, अशी ताकीद दिल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी स्थानिक टूर ऑपरेटर ऋतुराज जयस्वाल यांनी मृत बछड्याचे छायाचित्र मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. त्यानंतर वनविभाग हालचालीत आला, मात्र अद्यापही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणारे पर्यटक हार्दिक राठोड आणि ऋतुराज जयस्वाल यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच वाघ मृत्यूची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणालाही उशिरा देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वनविभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे काय, अशी शंका व्यक्त होत आहे. वेळेत निष्पक्ष चौकशी न झाल्यास हे प्रकरण थंड्या बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जाते. आता चौकशी समिती सत्य बाहेर काढते की प्रकरण हातातून निसटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणातील दिरंगाईमुळे वनविभागाच्या भूमिकेवर बोट ठेवले जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 03, 2026 04:16:12
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर मनपा निवडणुकीत भाजपातील बंड कायम... 28 पैकी 16 निष्ठावंत रिंगणात ठाम... मनधरणीला न जुमानता 16 बंडखोरांचे अर्ज कायम... भाजपसमोरील आव्हान वाढले... AC ::- लातूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा मधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भाजपमध्ये बंडखोरीचे सावट अद्याप कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपकडून एकूण 28 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पक्षाने बहुतांश बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी राजी करण्यात यश मिळवले असले, तरी 16 निष्ठावंत बंडखोरांनी मनधरणीला न जुमानता आपले अर्ज कायम ठेवल आहेत. उमेदवारी कायम ठेवलेल्या या 16 जणांमुळे भाजपसमोरील राजकीय डोकेदुखी वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पक्षांतर्गत असंतोष आणि बंडखोरीमुळे लातूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, अधिकृत उमेदवारांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 03, 2026 04:16:00
Kolhapur, Maharashtra:सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर साऊंड सिस्टिम लावून ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल गणेश मंडळाच्या चौघा जणांना एक वर्षाची कैद आणि 15 हजाराचा दंड सुनावण्यात आला आहे. राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांना एक वर्षाची साधी कैद आणि प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली. तात्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक भारत कुमार राणे यांनी हा गुन्हा दाखल केला होता. 2016 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याची सुनावणी झाल्यानंतर साऊंड सिस्टिम लावून प्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांना चांगलाच चपराक बसला आहे. इतर गणेश मंडळाची सुनावणी अद्याप बाकी आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 03, 2026 04:07:30
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या जास्त असली तरी बहुतांश जागी महायुती विरुद्ध शिव शाहू विकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट 18 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. महायुतीमध्येच 18 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही जागांवर दुरंगी तर काही जागांवर तिरंगी लढत होणार आहे. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 153 उमेदवारांनी माघार घेतली. माघारी नंतर निवडणूक रिंगणात असणाऱ्या पक्षीय उमेदवारांची संख्या पाहिल्यास भाजपा 56 जागांवर निवडणूक लढवत आहे, महायुती मधील शिवसेना शिंदे गट 10 जागांवर उभा आहे. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्ष 12 जागेवर आपला उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष एकूण 18 जागा लढवत आहे. शिव शाहू आघाडी एकूण 65 जागांवर उमेदवार उभे करून महायुतीला तगडे आव्हान दिलय. तर परिवर्तन आघाडी 9 जागा लढवीत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 03, 2026 04:03:25
kolhapur, Maharashtra:नागपूर १२ वर्षीय मुलाला आई वडीलांनीच लोखंडी साखळी आणि दोऱ्याने घराबाहेर बांधून ठेवण्याची घटना नागपूरात उघडकीस आली आहे. राज्य सरकारच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करत बारा वर्षीय बालकाची सुटका करण्यात आली, तसेच पालकांविरोधात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून मुलाचे हात पाय लोखंडी साखळी आणि कुलपाने बांधल्यामुळे मुलाच्या हात पायावर जखमा झाल्या आहेत. अजनी परिसरात एका घरात एका लहान मुलाला गेले अनेक दिवस लोखंडी साखळी आणि कुलपाने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला 1098 या हेल्पलाइन नंबर वरून मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता, मुलगा भयभीत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सदर प्रकार बालहक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा असून, मुलाला मानसिक व शारीरिक त्रास देणारा असल्याने या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 03, 2026 04:01:50
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर नगर महापालिका चुनाव की 81 सीटों के लिए 325 उम्मीदवार चुनाव मैदान में हैं. नामांकन अंतिम दिन तक 495 उम्मीदवारों ने अपने नामांकन वापस ले लिया. वापस लेने के बाद भी कई निर्दलीय उम्मीदवार मैदान में बने हैं. 17 सीटों पर भाजपा और शिवसेना के सामने कांग्रेस के उम्मीदवार आमने-सामने हैं. वहीं 27 सीटों पर बहुरंगी लड़ाई हो रही है. पार्टी-वार उम्मीदवारों की संख्या: कांग्रेस 75 सीटों के लिए लड़ रही है, कांग्रेस के साथ ठाकरे की सेना 7, मनसे समर्थित 1. महायुति में भाजपा 36, शिवसेना 30, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 15. तीसरे आघाडी में राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 23, वंचित बहुजन आघाडी 12, आम आदमी पार्टी 14. चौथे आघाडी में जनसुराज्य पक्ष 29 सीटें लड़ रहा है.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 03, 2026 02:51:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी राजकीय घडामोडींना वेग आला. गेल्या दोन दिवसांत एकूण ५५४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता शहरातील २९ प्रभागांमधून ८५९ उमेदवार नशीब आजमावणार असून आजपासून शहरात प्रचाराला उमेदवारांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली. बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना काही अंशी यश आले असून ५५४ जणांनी माघार घेतल्याने अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. प्रभागनिहाय विचार करता, प्रभाग २६, २८ आणि २९ मध्ये सर्वाधिक १२४ उमेदवार रिंगणात आहेत, तर प्रभाग १८, १९ आणि २० मध्ये सर्वात कमी ७१ उमेदवार मैदानात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि एमआयएम Yांच्यात प्रामुख्याने लढत पाहायला मिळणार आहे. यासोबतच वंचित, बसपा आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 03, 2026 02:31:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्यात शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. सर्वच प्रमुख पक्षांना ग्रासलेली अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजप, शिवसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली. ही बंडखोरी रोखण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपद, विविध समित्यांवरील पदे, भविष्यातील राजकीय संधी आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे मोठे आश्वासन देतं अखेर बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश आले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बंडखोरी कायम असल्याचे देखील चित्र आहे. पाहू यात कोणत्या पक्षात किती बंडखोर कायम आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 02, 2026 12:05:12
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 02, 2026 09:15:13
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 02, 2026 09:08:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बंडोबांना थंड करण्याचा अखेरचा दिवस होता. भाजपकनेही जवळपास भाजप वर नाराज असलेले 86 अपक्ष उमेदवारांपैकी 90 टक्के अपक्षांना शांत केल्याचा दावा भाजप केलाय मात्र हे अपक्ष भाजपसाठी मोठं आव्हान नाही तर भाजपमधून इतर पक्षात गेलेले नाराज आणि उमेदवारी मिळवलेले भाजप कार्यकर्ते भाजपला आव्हान देताना दिसतात आहे, भाजपची अवस्था सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट भाजपात बंडखोरीला उधाण 40 वर नाराज भाजप कार्यकर्त्यांनी इतर पक्षातून मिळवले तिकीट हेच नाराज भाजपचे विजयाचे गणित बिघडवणार... तिकीट वाटपावरून भाजपमध्ये छत्रपती संभाजी नगरात झालेला राडा अवघ्या राज्याने पाहिला, महाराष्ट्रात कुठेही इतका उद्रेक झाला नसेल जितका छत्रपती संभाजी नगर भाजपात झाला, अगदी मंत्र्यांच्या गाड्यांना काळ फासण्यापासून शिवीगाळ करण्यापर्यंत कार्यकर्ते गेले... मात्र या सगळ्या नंतर आता भाजप समोर मोठा आव्हान आहे ते बंडखोरीचा, भाजपामधून 86 नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना समजण्यात भाजपाला यश आलाय मात्र यापेक्षा जास्त भाजपला डोकेदुखी ठरणार आहे ते म्हणजे भाजप सोडून इतर पक्षातून उमेदवारी मिळवलेले नाराज भाजप कार्यकर्ते, जवळपास 18 जणांनी शिंदे सेनेकडून तिकीट मिळवले आहे, 13 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत तर 8 जणांनी मशाल हाती घेतलीय... त्यामुळं प्रचारात ही लोक भाजपसाठी आव्हान उभे करू शकतात...भाजप मात्र काहीही फरक पडणार नाही असे म्हणाले... यावरूनच इतर पक्षांनी भाजपला टोले लगावले आहे भाजपमध्ये अनेक लोक जातात मग आता तुमचे लोक इतर पक्षात गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली तर तुम्हाला का झोम्बताय असा सवाल दानवे ने केलाय भाजपाच्या महत्त्वाकांक्षामुळे छत्रपती संभाजी नगरात युती तुटली असा आरोप होतोय , भाजपची ताकद वाढली असा भाजपचा दावा होता मात्र नाराजांची ही फौज आता भाजपची ताकद कमी करतीये या फौजेला भाजप प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कसं सांभाळणार यावरच भाजपाचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 02, 2026 08:30:28
Navi Mumbai, Maharashtra:anchor - पनवेल निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून, प्रभाग क्रमांक १८ नंतर आता प्रभाग क्रमांक १९ आणि २० मधूनही भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच पनवेल महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या घडामोडीमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १९ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी भाजपच्या स्टँडिंग नगरसेविका दर्शना भगवान भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून तक्का येथील रहिवासी दिव्या चांगदेव बहिरा यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र गुरुवारी दिव्या बहिरा यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दर्शना भोईर यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्याचप्रमाणे तसेच प्रभाग क्रमांक १९ मधून उबाटा अर्चना कुलकर्णी यांनी माघार घेतली यामुळे भाजप रुचिता लोंढे यांचा बिनवीरोध विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक २० अ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी भाजपकडून अजय बहिरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शेकापचे चागंदेव चंदर बहिरा यांनी अर्ज भरला होता. याच प्रभागासाठी दिव्या चांगदेव बहिरा यांचाही अर्ज दाखल झाला होता. मात्र गुरुवारी वडील-लेकीने दोन्ही ठिकाणांहून आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजय बहिरा हे देखील बिनविरोध नगरसेवक झाले. दिव्या बहिरा यांनी प्रभाग १९ अ आणि प्रभाग २0 अ येथून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर त्यांच्या वडील चांगदेव बहिरा यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या अचानक माघारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पक्षाची लढत देण्याची तयारी आणि अंतर्गत समन्वय यावर टीका होत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये रोहन गावंड यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आता १९ आणि २० या प्रभागांमध्येही शेकापकडून उमेदवार माघारी गेल्याने पक्षाला सलग धक्के बसले आहेत. यामुळे शेकापची निवडणूकपूर्व रणनीती कोलमडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात ठोस लढत उभी करण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे. निवडणूक होण्याआधीच चार नगरसेवक बिनविरोध मिळाल्याने भाजपला मानसिक आणि राजकीय आघाडी मिळाली आहे. प्रचार, संसाधने आणि संघटनात्मक ताकद यावर सकारात्मक परिणाम होणार असून, उर्वरित प्रभागांमध्येही भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. एकूणच पनवेल महानगरपालिका निवडणूक लढतीच्या आधीच भाजपची बाजू भक्कम होत असून, विरोधी पक्षांसमोर आव्हाने वाढताना दिसत आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 02, 2026 05:51:30
kolhapur, Maharashtra:नागपुर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय असलेल्या प्रभाग क्रमांक 22 मधून संघाचा एक स्वयंसेवक असलेल्या तरुणाने भाजपला आव्हान दिले आहे. निनाद दीक्षित असे त्याचे नाव आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर तो महापालिकेच्या आखाड्यात उतरला आहे... अवघ्या 25 वर्षाच्या या उमेदवाराने भाजपच्या नगरसेवकांवर निष्क्रेतेचा आरोप करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे... नागरिक समितीच्या माध्यमातून फॉरवर्ड ब्लॉक पक्षातर्फे तो मैदानात उतरलेल्या या स्वयंसेवक उमेदवारामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षांसमोर आव्हान उभे केलेय निनाद दीक्षित यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
Advertisement
Back to top