Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109
संगमनेर में अतिवृष्टि से नुकसान, किसानों के लिए राहत की मांग तेज
KJKunal Jamdade
Oct 06, 2025 10:35:49
Shirdi, Maharashtra
संगमनेर / अहिल्यानगर माजी मंत्री बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स - ऑन अमित शहा नुकसान प्रस्ताव - राज्याने अतिवृष्टी संदर्भातील प्रस्ताव त्वरीत पाठवला पाहिजे... राज्य आणि केंद्र सरकारने भरीव मदत केली पाहिजे... शेतक-यांच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे... पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे मदत द्यावी अशी अपेक्षा शेतक-यांची आहे... त्याच बरोबर कर्जमाफी केली तर शेतकरी पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे... मदत हि मदत असते , ते नुकसान भरपाई नसते हे आम्हाला कळतं... मात्र मदत हि भरीव असावी हि अपेक्षा... ऑन फडणविस साखर कारखाने कारवाई - मुख्यमंत्रीचे अभिनंदन केलय , त्यांना खर दुखणं कळालय... योगय व्यासपीठावरून ते बोललेत , महाराष्ट्रात चांगला संदेश गेलाय... त्यांनी खुप काळजी घ्यावी... ऑन संगमनेर अतिवृष्टी नुकसान - संगमनेर तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीने नुकसान झालय ... त्यात सतत पाऊस पडत राहिला त्यामुळे पिके गेलीत हि वस्तुस्थिती... 2005 आणि 2006 साली देखील हिच परिस्थीती होती त्यावेळच्या सरकारने खुप काही मदत केली होती..संगमनेर आणि अकोले तालुक्याला ती अपेक्षा आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 12:06:53
Washim, Maharashtra:अँकर:अनंत चतुर्दशी नंतर आलेल्या भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चिमुकल्या मुलींच्या बाहुली उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सांगता पारंपरिकरित्या कोजागिरी पौर्णिमेला होते. मात्र यावर्षी मातीच्या बाहुल्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गणेश विसर्जनानंतर लगेचच बाहुली उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यंदा सतत झालेल्या संततधार पावसामुळे कुंभारांना मातीची मूर्ती तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी मातीच्या बहुल्यांच्या जोड्या 300 ते 400 रुपये दराने विकल्या जात आहेत. तसेच उत्सवात लागणारे ‘बत्तीस खाऊ’ देखील महागले आहेत. तरीही चिमुकल्या ‘लाडकीचा लाड’ पुरवण्यासाठी पालकांनी बाजारात उस, ज्वारीचे धांडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 12:05:55
Jalna, Maharashtra:जालना शशिकांत शिंदे: जरांगेंच्या आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग लागू नये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जरांगेंवर टीका जरांगेंनी सरकाकडून जीआर दुरुस्त करून घ्यावा अँकर- मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये.. मराठा समाजाचं वाटोळं हे शरद पवारांनी केलं असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. त्याला शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शरद पवार जेव्हा जरांगेंना भेटायला आले तेव्हा काय ऊर्जा आहे. असं जरांगे म्हणाले आता 1994 चा जीआर विषयी ते बोलतात. तर जरांगेंनी सरकारकून जीआर दुरुस्त करून घ्यावा. मात्र त्यांनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 12:04:50
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये आज मूळ आदिवासी समाजाने आदिवासी बचाव मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले होते. आदिवासी समाजातून येणारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेर्तृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. बंजारा जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे काढत असल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून आता आदिवासी समुदाय मोर्चे काढत आहे. तालुका स्तरावर मोर्चा काढल्या नंतर आज आदिवासी बांधवानी नांदेड शहरात मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्याल्यावर काही वेळात हा मोर्चा धडकला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले आहेत. ड्रोन दृश्यातून या मोर्चातील प्रचंड गर्दी दिसून आली. आदिवासी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण असून कोणत्याही समाजाचा समावेश खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार भीमराव केराम यांनी दिला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 06, 2025 12:03:19
Pune, Maharashtra:अहिल्यानगर यहाँ बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला...नगर शहरातील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरून हा मोर्चा निघाला होता... समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... या मोर्चात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली... अनेक वर्षांपासून या मागणीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अद्याप योग्य निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे आम्हांला हैद्राबाद गॅजेट नुसार ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे...यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले...दरम्यान सरकारने लवकरात लवकर मागणी पूर्ण केली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 06, 2025 11:50:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिला केंद्रीय सहकारी बँक चौकशी व नोकर भारती प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन बँकेच्या चौकशीच्या प्रक्रियेची पारदर्शकता आणि भर्ती प्रक्रिया पारदर्शकतेसाठी मागणी केली. बँकेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात सखोल चौकशी आणि भर्ती परीक्षा पारदर्शकतेसाठी आय.बी.पी.एस किंवा टाटा कन्सल्टंनसी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थाद्वारे भरती केली जावी, अशी मागणी आदल्या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 06, 2025 11:32:01
Thane, Maharashtra:कातकरी-आदिवासी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून दलाल मार्फत खरेदी विक्री... किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... चौघांना केली अटक... किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखलण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना पोलिसांना गुन्हयातील पिडीत बालिका व आरोपी दत्तात्रेय विठ्ठल वातेस, वय ५० वर्षे, याच्याकडे याबाबत चौकशी केली असता काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यांची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतांना देखील मध्यस्थी आरोपी प्रकाश मुकणे याचे मदतीने जय लक्ष्मण शिर्के, रा. बाबुलवाडे, ता-पारनेर, जि-अहिल्यानगर याचे सोबत जमवुन त्यासाठी मुलीच्या बदल्यात मुलीच्या आई-वडीलांना ५०,०००/- रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी १०,०००/- रुपये एक महीन्यापूर्वी आरोपीत जय लक्ष्मण शिर्के व लक्ष्मण नारायण शिर्के यांनी मुलीचे आई-वडील यांना दिले होते. शिर्के कुटुं आज उच्च जातीतील असल्याने त्यांनी पिडीत बालिका ही अल्पवयीन असल्याचे माहीत असुन देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेवुन पिडीत बालिके सोबत विवाह करण्याचे ठरवुन दिनांक ०५/१०/२०२५ रोजी पिडीत मुलीचे व आरोपीत कु.जय शिर्के यांचे लग्न लावुन देणार होते अशी माहिती तपासात पोलिसांनी निष्पन्न केली आहे. सदर गुन्हयास भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १४३(४), ३ (५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३ (२) (व्हीए) या कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 11:21:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईतील आरोपीकडून ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्जसह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत मुंबईच्या वसीम इमदाद खान (वय ३७) याला एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ५२८ ग्रॅम एम.डी पावडर, कार, मोबाईल व रोख रक्कम असा ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहरातील साखरवाही फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. आरोपीवर पडोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सन २०२५ मध्ये आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एनडीपीएस अधिनियमांतर्गत १५७ गुन्ह्यांमध्ये १९२ आरोपींवर कारवाई करून ८० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात विशेषतः गांजा, एम.डी ड्रग्ज व ब्राउन शुगर प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान, चंद्रपूर पोलीस दलाकडून "ड्रग फ्री चंद्रपूर" अभियान राबविले जात असून शाळा- कॉलेजमध्ये जनजागृती व्याख्याने, सायकल रॅली, पोस्टर स्पर्धा आणि नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास ११२ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले है. चंद्रपूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 11:21:17
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 06, 2025 11:20:20
Baramati, Maharashtra:बारामती पोलिसांची वाहतूक शाखा होणार अधिक सक्षम.... महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या माध्यमातून दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक. बारामती पोलिसांच्या वाहतूक शाखेला आता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ मिळाले असल्याने बारामती पोलिसांची वाहतूक शाखा आता अधिक सक्षम होणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून बारामती शहरात वाहतुक कोंडी सह अपघातांची मालिका सुरू होती, बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून आता दहा कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मिळालं असल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक शाखेला या कर्मचाऱ्यांची मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 11:17:07
Nashik, Maharashtra:Anchor हिरवेगार आणि निसर्गरम्य असलेले नाशिक शहर सध्या गुन्हेगारांचे नंदनवन ठरले आहे. गेल्या 9 महिन्यात 42 खून झाल्याने नाशिककराना असुरक्षित वाटू लागले आहे. सध्या प्रत्येक घरात हीच चर्चा असून पोलिसांची दहशत राहिली नसल्याची खंत व्यक्त होतेय. नाशिक शहर बनले आहे गुन्हेगारांचे नंदवन. सप्तेबर महिन्यात 7 खून. शहरात 9 महिन्यात 43 खून. चार गोळीबाराच्या घटना. या वर्षभरात गुन्हेगारांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खून करण्यासाठी कुणाचीही भीती नसल्यागत खुलेआम कोयते घेऊन फिरत आहेत. इंस्टाग्राम वर थेट लाइव्ह करत तर काही आपला बडेजाव मिरवीत धमक्या देत आहेत. पोलिस नंतर कारवाई करत असले तरी त्यांच्यात वाढत असलेला भाईगिरीचा आत्मविश्वास नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरतो आहे. आता पोलिसांवर या सर्वांवर तातडीने नियंत्रण करण्याचे आव्हान आहे. येत्या दोन वर्षात कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्थ चोख असणे आवश्यक आहे अन्यथा येत्या काळात विविध गुन्हेगारांच्या गँगचा धुमाकूळ शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दररोज सरासरी एक घरफोडी व राेज दाेन चाेरीच्या घटना. पंचवटीतील गोळीबाराचा घटनाक्रम. सन-२०१७ मध्ये निकम गँगच्या गोळीबारात संदीप लाड जखमी. सन २०२३-२४ पूर्वी निकम गँगच्या गोळीबारात विद्यार्थ्यांचा नाहक बळी. मार्च २०२३ मध्ये मायको दवाखान्याजवळील कालिकानगरात टोळीयुद्धातून गोळीबार. सन २०२४ मध्ये पेठरोड येथे अवैध सावकारीतून व्यक्तीवर गोळीबार. अक्टूबर २०२४ मध्ये मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ सराईतांचा हवेत गोळीबार. डिसेंबर २०२४ मध्ये आरटीओजवळ सोनवणे गँगचा पोलीस पथकावर गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये गणेशवाडी पोस्ट ऑफिससमोर दोन गटांचा गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये म्हसरूळ हद्दीतील कलानगरात बिल्डरच्या घरावर गोळीबार. जुलाई २०२५ मध्ये फुलेनगरात. तर तीन दिवसापूर्वी लेव्हल बार मध्ये खंडणीसाठी गोळीबार. टोळीयुद्धातून एकमेकांवर. शहरात तीन वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 06, 2025 11:09:26
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या महात्मा गांधीच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दारूची पार्टी पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील करंडे च्या फॉर्म हाऊस रंगली पार्टी वर्धा लगत असलेल्या भुगाव येथील एवोनिथ कंपनीच्या अधिकाऱ्यांची होती दारूची पार्टी पोलिसांनी छापा टाकत केली 13 जणांना अटक फॉर्म हाऊस मालक करंडे फरार असल्याची पोलिसांची माहिती हातात दारूचा ग्लास,स्विमिंग कुलमध्ये डीजेच्या तालावर होती सुरू दारूची पार्टी फॉर्म हाऊस च्या टेबलवर विदेशी दारुच्या पॅक बनवून धिंगाणा होता सुरू दारूच्या पार्टीत डीजेच्या तलवार धिंगाणा घालत मारला मटनावर ताव एवोनिथ कंपनीच्या 60 अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या पार्टी केल्याने आश्चर्य दारूबंदी जिल्ह्यात दारूची पार्टी रंगल्याने खळबळ दारूच्या पार्टीत कंपनीचे बडे-बडे अधिकारी असल्याची माहिती सावंगी पोलीसांनी कारवाईत बड्या अधिकारीांवर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर संशयाची सुई गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात चाललं तरी काय ? तीन विदेशी दारूच्या बॉटल,23 खाली दारूच्या शिश्या असा मुद्देमाल केला जप्त
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 06, 2025 11:09:14
Pandharpur, Maharashtra:06102025 कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, शासनाचे मार्गदर्शन प्राप्त, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते करण्याची परंपरा आहे. तथापि, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावर आज दि.06 ऑक्टोंबर रोजी शासनाने लेखी मार्गदर्शन केले असून, यंदाची कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्यानुसार मा. मंत्री महोदयांना मंदिर समितीच्या वतीने पुजेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 06, 2025 11:08:58
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_FARMER अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड! गुडघ्याभर पाण्यात उतरून सोयाबीनची काढणी सुरू! कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावातील बाळासाहेब शेळके यांचा संघर्ष! धाराशिव जिल्ह्यातल्या शिवारात शेरकऱ्यांच्या मेहनतीचं दृश्य डोळ्यांत पाणी आणणारं! अँकर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पिकं पाण्याखाली गेल्यानंतरही बळीराजा हार मानलेला नाही. कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावातील बाळासाहेब शेळके हे शेतकरी सध्या गुडघ्याभार पाण्यात उतरून आपल्या शेतात सोयाबीनची काढणी करत आहेत. अतिवृष्टीमुळे दोन एकर क्षेत्रावरील त्यांचं सोयाबीनचं पीक पूर्णतः पाण्यात गेलं, मात्र जेवढं वाचेल तेवढं तरी वाचवायचं — या निर्धाराने शेळके कुटुंब पावसातच काम करतंय. महिना भरापूर्वी जोमदार दिसणारं हे पीक आता पाण्याखाली आहे. मात्र शेळके यांची मेहनत आणि जिद्द पाहिली की "शेतकरी कधी हार मानत नाही" हे खरं वाटतं. संपूर्ण कुटुंब सकाळपासून शेतात उतरून ओलसर जमिनीत सोयाबीन तोडतंय. अजूनही पाण्याचं साचलेलं वातावरण असूनही शेळके कुटुंबाची ही झुंज सुरूच आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये अशीच दृश्यं दिसत आहेत — पावसाने मार खाल्लेलं पीक, पण बळीराजाची आशा अजूनही जिवंत आहे. हे दृश्य प्रत्येकाला सांगतं — पाऊस येतो, जातो… पण शेतकऱ्याची लढाई कधीच थांबत नाही! Byte बाळासाहेब शेळके शेतकरी
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top