Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबईमध्ये 18 तास पाणीपुरवठा बंद, नागरिकांची चिंता वाढली!

SNSWATI NAIK
Jul 17, 2025 03:32:02
Navi Mumbai, Maharashtra
story slug - शुक्रवारी 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार शुक्रवार को 18 घंटा पानी रहेगा बंद ftp slug - nm water shut down shots- reporter - swati naik navi mumbai anchor - मोरबे धरणाची नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार18 जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून शनिवारी 19 जुलै रोजी पहाटे 04.00 वाजेपर्यंत 18 तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी 1700 मि.मी. व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरुळ सेक्टर-46, अक्षर बिल्डींगजवळ वारंवार गळती होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार. 18 जुलै केलं जाणार आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी संध्याकाळचा व शनिवारी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसंच 19 जुलै रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात आलं आहे. gf-
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top