Back
भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग: पर्यटकांची गर्दी!
KJKunal Jamdade
FollowJul 03, 2025 12:34:54
Shirdi, Maharashtra
Akole News Flash
भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग...
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस...
11 टिएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक...
धरणातील जलसाठा 7 टिएमसी असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग ...
भंडारदरा धरणातुन प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग...
स्पिल - वे तून पाणी सोडल्याचे दृष्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowJul 19, 2025 04:30:33Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1907ZT_BARAMTIAJI
FILE 4
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर..... बारामती मधील सिद्धेश्वर मंदिरात घेतलं महादेवाच्या पिंडीचे दर्शन
Anchor_ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील विविध ठिकाणच्या विकास कामांची पाहणी केली आहे.
बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेत अजित पवार यांनी विकास कामाच्या पाहणीची सुरुवात केली आहे मंदिर परिसरातील विकास कामांबद्दल ही अजित पवार यांनी वेळी काही सूचना केल्या आहेत.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 04:30:22Nashik, Maharashtra:
नाशिक
* आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील घरी चोरी..
* घरातील मोलकरणीने कपाटातून चोरले एक लाख रुपये..
* नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन मोलकरणीला अटक..
* याच मोलकरणीने वेळोवेळी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 04:30:16Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1907_BHA_FREE_STYLE
FILE - 2 VIDEO
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानीच केली गावातील युवकाला जबर मारहाण... शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात फ्री स्टाईल
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथील शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरुन राडा झाला, गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतावर रोवणी करण्यासाठी मागील सुमारे ७० वर्षांपासून प्रभाकरजी कडव यांच्या घराजवळुन आपल्या शेतावर शेतीचे रोवणी करण्यासाठी दर वर्षी जात असतात. मात्र रस्त्यावरून शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात हाणामारी झाली आहे... आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
0
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 19, 2025 04:03:52Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_THEFT
14 घरफोडी करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद,धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Anchor:धाराशिव शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.धर्मेंद्र उर्फ काळ्या विलास भोसले अस आरोपीच नाव असुन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने धाराशिव जिल्ह्यातील मुरूम लोहारा नळदुर्ग व तुळजापूर परीसरात घरफोड्या केल्याचे त्याने कबुल केले.दरम्यान पोलिसांनी पोलिस गुन्हे अभिलेख तपासले असता त्यांच्याकडुन घरफोडीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.तसेच चोरी केलेल्या मुद्देमालामधील 6 लाख 30 हजारांची सोन्याची लगड देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 04:03:35Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KALAMBI
सातारा - साताऱ्यातील खटाव तालुक्यात कळंबी ते लक्ष्मीनगर या सुमारे ३ किमी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या आधारे वडूज येथील नायब तहसीलदार तथा दंडाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसह निवेदन दिले. नकाशात रस्ता नोंद असूनही प्रत्यक्षात अडथळ्यांमुळे रस्ता वापरणे कठीण झाले आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता खुला करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. निवेदन देताना ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 19, 2025 04:03:09kolhapur, Maharashtra:
2c ला दोन साउंड बाईट जोडले आहे...
-------
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय...त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते.
भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
-----
नागपूर
नितीन गडकरी, पॉइंटर...
- *आर्टिफिशियाल इंटेलिजन्सवर काम करत आहे... यात झाडाला उत्तम वाढ करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल काम करत आहे..अमेरिकेमध्ये लागलेल्या सॅटॅलाइटच्या माध्यमातून शेतात असलेल्या संत्राच्या झाडाची परिस्थिती काय आहे हे कळणार आहे... तेही मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी प्रत्यक शेतात मध्ये आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आहे. तो खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे, याची यंत्र हे सॅटेलाईट सोबत कनेक्ट असणार आहेत. त्यावरून झाडाला तहान लागली आहे, हे कळेल आणि लगेच AI च्या माध्यमातून डीप इरिगेशनने पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल*.
- *झाडाला कुठल्या विटामिन्स कमी आहे. हे कळणार आहे. त्या झाडावर कुठला रोग येणार आहे आठ दिवसापूर्वीच कळेल त्यामुळे त्या माध्यमातून स्प्रे करता येईल*.
- स्पेन मधील व्हॅलेन्शियां आहे हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहर आहे.... तिथे एका एकरात 340 झाडं लावतात आणि 30 ते 40 टन उत्पादन घेतात.. आपल्या एका एकरात फक्त शंभर झाडे लावली जाते आणि 3 ते 4 टन उत्पादन होत. संत्राहा दर्जनाने पॅक करून विकतात. पण आपल्या संत्र्याची लूट होते..
- तिथं या सगळ्याच शूट केलं आणि नागपूरला आलं यावर ऍग्रो व्हिजन च्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना दाखवलं..
- *दाखवताना फुकट देण्याची किंमत होत नाही. माझा अनुभव खराब आहे.. जरी राजकारणात असलो तरी विचार स्पष्ट आहे गरज असेल तर मत द्या नाहीतर देऊ नका... (दारू) हे पाजणार नाही, आणि ते(मटन) खायला देणार' नाही".
- अडीचशे रुपये तिकीट लावल्यावरही साडे सहाशे शेतकरी आले. साडेचार तास त्यांनी व्हॅलेंशीया मधील संत्रा उत्पादनाचा तंत्र समजून घेतलं आणि त्याचा अवलंब केला... याचा परिणाम झाल.. शेतकऱ्यांनी ते तंत्रज्ञान अवलंबला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढतील यासाठी प्रयत्नशील झालेले आहे.
- यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावल्यास उत्पादनात वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने तुकडोजी महाराजांचे कृषी आणि ग्रामीण विकासाच स्वप्न पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 04:02:46Nashik, Maharashtra:
*विशाल मोरे, मालेगाव*
Anc: मालेगाव शहरात दुचाकी तयार करून स्क्रॅप करण्याची मोठी टोळी कार्यरत आहे. अशीच दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांना मालेगाव पोलिसांनी पकडले आहे. मालेगाव पोलिसांनी पथक तयार करुन इसम नामे इरबाज मोहमद इम्रान व साद अख्तर आबिद अख्तर रयांना काल रात्री पकडले त्याच्याकडे गुन्हयातील गेलेली ७०,००० रुपये किमंतीची होन्डा युनीकॉन गाडी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी यापुर्वी देखील पवारवाडी पो.स्टे. गुन्हयातील २ व इतर मालेगाव शहरातील ७अशा एकुण १० मोटार सायकल त्यात ०२ यूनिकॉन, ४ बर्गमॉन, २ आरएनफाय, १ ड्रिमयुगा, १ एचएफ डिलक्स अशा गाड्या मिळून आल्या आहेत. गुन्हयाचा पुढील तपास API किरण पाटील हे करित आहे
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 19, 2025 04:02:31Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
मेळघाटातील खापरा नदीला पूर; पुरामुळे नदीवरील पुल गेला वाहून, अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही
अँकर :- गेल्या काही दिवसात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे खापरा नदीला अचानक पूर आला. या पुराने नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला असून मेळघाट मधील खडीमल, नवलगाव, बिच्छुखेडा, माडीझडप आणि चुनखडी या पाच गावात जाण्या येण्यासाठी वाहनांना रस्ताच उरला नाही. सोबतच सेमाडोह, धारणी, परतवाडा आणि चिखलदरा जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी या मार्गाचा उपयोग करावा लागत असल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. पुरामुळे वाहून गेलेला पूल आधीच लहान व कमकुवत होता याकडे स्थानिकांनी वारंवार लक्ष वेधले होते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अखेर खापरा नदिला पूर आला अन पुल वाहुन गेला. नागरिकांनी नवीन व मजबूत पुलाच्या तात्काळ बांधकामाची मागणी केली असून प्रशासनाने या मार्गाची लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात आणखी अडचणी वाढू नयेत म्हणून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:35:55Nashik, Maharashtra:
*मालेगाव ब्रेकिंग... विशाल मोरे*
मालेगावातील 16 वर्षीय तरुणी अत्याचार प्रकरण.
16 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकीलपत्र घेण्यास मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाचा विरोध...
आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आवाहन..
वकीलपत्र घेणाऱ्यांना वकिलाला हिंदुंच्या रोषाला सामोरे जावे लागेल..
ज्याने कुणी आरोपीचे वकीलपत्र त्या वकिलाचा फोटो लावून काळे फसणार..
48 तासात आरोपीचे वकीलपत्र काढून घ्यावे अन्यथा जनक्रोशला सामोरे जावे लागेल असे दिले निवेदन
हिंदू जनआक्रोश मोर्चाचे मालेगाव मालेगाव वकील संघाला दिले निवेदन..
मालेगाव वकील संघाला निवेदन देत केली आरोपीचे वकील पत्र न घेण्याची मागणी..
*बाईट: डॉ चैतन्य देवरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धारकरी*
1
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:34:58Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, सटाणा ( नाशिक )*
image 2 vidoe 5
- ट्रक व स्कुटी अपघातात मुलीचा मृत्यू; भावास किरकोळ दुखापत
- नाशिकच्या सटाणा येथील घटना
Anc : सटाणा-मालेगाव रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सायंकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अजमीर सौंदाणे येथील मोक्षदा जगदीश बदान या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मोक्षदा ही आपल्या भावासह स्कुटीवरून जात असताना भरधाव ट्रकची धडक बसली. या धडकेत मोक्षदा ट्रकच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ कृष्णा याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा केला आणि रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत मार्ग मोकळा केला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघातग्रस्त कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 03:34:40Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1907_BHA_SAND_TRACTOR
FILE - 1 VIDEO
विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर रंगेहात पकडला...अंतरगाव ते झिरोबा मार्गावरील घटना
Anchor ;- भंडारा जिल्ह्याच्या चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आले आहे. ही घटना अंतरगाव ते झिरोबा मार्गावर घडली. या कारवाई अंतर्गत लाखांदूर पोलिसांनी लाखांदूर येथील सुरज जोशी (३८) नामक ट्रॅक्टर चालका विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ७ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:34:29Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, नांदगाव ( नाशिक )*
-
ANC :-शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार शिजविताना कुकरचा स्फ़ोट होऊन त्यात आहार शिजवीणाऱ्या दोन महिला जखमी झाल्याची खळबळ जनक घटना मनमाड शहरात घडली असून नशीब बलवत्तर होते म्हणून सुदैवाने या दोन्ही महिलांचा जीव वाचला.या घटनेमुळे पोषण आहार शिजविण्यासाठी देण्यात आलेले कुकरसह इतर भांडी किती जुनाट आणि धोकादायक झाल्या आणि जीव धोक्यात घालून महिला पोषण आहार शिजवितात हे या घटनेमुळे समोर आले आहे.
*बाईट: स्वयंपाक करणारी महिला*
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 19, 2025 03:33:59Nashik, Maharashtra:
*Big Breaking -*
- कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
- नाफेड आणि NCCF च्या केंद्रावर आता असणार राज्य शासनाचे नियंत्रण
- राज्यातील एकूण 13 केंद्रांवर समितीची स्थापना, समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश
- कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या शेतकरी संघटनांकडून शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रारी
_लाचलुचपत विभागही ठेवणार नजर
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 19, 2025 03:33:54Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात वकिलाने केला आपल्या पत्नीचा चाकूने गळा चिरून खून
- सोलापुरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर
- शहरातील वसंत विहार परिसरात राहणाऱ्या वकिल पतीने चाकूने गळा चिरत केला पत्नीचा खून
- ऍड. प्रशांत राजहंस खून करणाऱ्या वकिलाचे नाव तर भाग्यश्री राजहंस असे मृत पत्नीचे नाव
- मी पत्नीचा खून करून आलोय, असे म्हणत वकील पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
- सदर घटनेप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात असून खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक
1
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 19, 2025 03:31:57kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे
-----
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील
र मौजा सोनेघाट येथे शेतात काम करत असलेल्या महिलांवर वीज पडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. या घटनेत पाच महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे उपचार सुरू आहेत. शितलवाडी चारगाव रस्तालगतच्या शेतात या शेतात सुमारे महिला शेतीचे काम करत असताना दुपारी जेवणाची वेळ असताना अचानक वीज कोसळली. यात मंगलाबाई जीवन मोटघरे व वर्षा देवचंद हिंगे या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
तर पाच महिला जखमी झाल्यात..
सध्या सर्व जखमी महिलांवर उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे उपचार सुरू असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून मदतीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
1
Share
Report