Back
बदलापूर पोलीसांनी २० हरवलेले मोबाईल परत केले, नागरिकांचे आभार!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 16, 2025 16:32:45
Ambernath, Maharashtra
बदलापूर पूर्व पोलिसांनी मिळवून दिले २० नागरिकांचे मोबाईल!
हरवलेले, चोरी झालेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द
नागरिकांनी मानले पोलीस दलाचे आभार
Bdl police mobile
Anchor : बदलापूर पूर्व पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले, चोरी झालेले २० मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले. यानंतर या नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
Vo : बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय. या पथकाने मागील काही दिवसात हरवलेल्या २० नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केले. हे मोबाईल बुधवारी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी आम्हाला हे मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षा नव्हती, परंतु पोलिसांनी आम्हाला ते मिळवून दिले, अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले. बदलापूर पूर्व पोलिसांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून दर महिन्याला असे २० ते २५ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले जात असल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
Byte : किरण बालवडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Byte : शर्मिला सांगल / शामली खरात / साईराज पावसकर (मोबाईलचे मूळ मालक)
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowJul 17, 2025 01:31:57Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1707_WARDHA_SENA_MELAVA
हिंगणघाट येथे शिवसेना उबाटा गटाची मोर्चेबांधणी
कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचे लक्ष
अँकर - नगर परिषद तसेच जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकाची मोर्चेबांधणी सर्वत्र सुरु झाली आहे. त्यासाठीच शिवसेना उबाटा गटासाठी गड मानल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेय. सहसंपर्क प्रमुख सीताराम भुते आणि शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आलाय. आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता हिंगणघाट येथे शिवसेना उबाटा गटा सक्रिय झालाय. मेळाव्यात पक्षात सदस्यसंख्या वाढविण्यावर भर दिलाय. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा वाढल्याने या दोन्ही पक्षात इनकमिंग देखील वाढले आहेय. शिवसैनिकांशी संवाद साधत एकजुटीने भाजपाला टक्कर देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आलाय.
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 17, 2025 01:31:40Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
प्लिज इनपुट हे EXCLUSIVE चालवा प्लिज....
स्किप्ट::- शेती परवडत नाही… म्हणून 'शेती विकणे आहे'चा फलक...
वयोवृद्ध शेतकऱ्याची वेदनादायक हाक….
पेरणी केली… पाऊस नाही… आता शेती विक्रीला...
कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्याची हतबलता….
AC::- ::- शेती परवडत नाही… पाऊस नाही… कर्जबाजारीपणा वाढतोय…
आणि म्हणूनच लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला शेती विक्रीसाठी बांधावर थेट फलक लावावा लागला आहे… गेल्या ३० दिवसांपासून पाऊस नाही… कर्ज काढून पेरलेलं पीक वाळून चाललंय. आणि शेती विकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत त्या शेतकऱ्यांनी आपली शेतीच विकायला काढली आहे… औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील ७० वर्षीय गोरोबा आडसुळे असं त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गोरोबा आडसुळे यांनी आपल्या शेताच्या बांधावर थेट 'शेती विकणे आहे' असा फलक लावला आहे… खाजगी सावकाराकडून उसनवारी करून पेरणी केली… पण आता मशागतीसाठी खिशात पैसे नाहीत…
आणि म्हणूनच… एका बैलाच्या जोडीसह स्वतःला औताला जुंपून गोरोबा आडसुळे शेतात राबतायत…
शेती परवडत नाही, कर्जबाजारीपणा वाढतोय…
आणि म्हणूनच 'शेती विकणे आहे' या फलकासोबत या शेतकऱ्याच्या वेदनाही लातूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत…याच संदर्भात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून त्या शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
WKT ::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर आणि शेतकरी
2
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 17, 2025 01:30:51Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला तालुक्यातील ऐतिहासिक अंकाई किल्ला सध्या हिरवाईने नटलेला असून, त्याचे सौंदर्य पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेला हा किल्ला, इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरत आहे.
पावसाळी वातावरणामुळे किल्ल्यावर आल्हाददायक थंडी, धुके आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या संदर्भात किल्ला परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 17, 2025 01:30:41Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 1707_WARDHA_MACB
- वर्ध्यात लाईनमॅन करंट लागून मृत्यू
- वायगाव येथील धक्कादायक घटना
अँकर- वर्ध्याच्या वायगाव येथील रहवासी सौरभ शेंडे यांचा करंट लागून मृत्यू झाला आहेय..तो गावात लाईनमॅनचं काम करीत होता..गावातली लाईट गेल्याने तो महावितरणच्या पोलवर चढला होता..अचानक त्याला करंट लागला आणि तो पोलवरच चिटकून राहिला..या घटनेचा धक्कादायक विडिओ समोर आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहेय..
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 17, 2025 01:30:29Yeola, Maharashtra:
अँकर :-
येवला तालुक्यातील वडगाव येथील येथे गिर गाईंच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार केल्या जात असून, या उपक्रमातून सुमारे 40 ते 50 महिला व पुरुषांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे या मूर्तींना महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
कापसे फाउंडेशनने या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण रक्षण व ग्रामीण विकास या दुहेरी हेतूने केली. गिर गाईच्या शेणाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती नैसर्गिकरित्या विघटनशील असून, पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे मूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण टाळता येते.
या उपक्रमात स्थानिक महिलांना मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, रंगकाम, मोल्डिंग आणि शेवटच्या टप्प्यांपर्यंत सर्व कामं गावातच होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर आदी शहरांमधून मागणी होत आहे.......
बाईट :- वंदना कापसे, संचालिका कापसे फाउंडेशन , वडगाव,
बाईट :- सुवर्णा जाधव, मूर्तिकार वडगाव,
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 17, 2025 01:30:18Yeola, Maharashtra:
अँकर :- येवला शहरातील कोपरगाव रोडवर असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणवर रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच दररोज शालेय विद्यार्थ्यांना साफ करण्याची दुर्दैवी वेळ येत असते. या क्रिडांगणाला तळीरामाने आपला अड्डा बनवला असून विद्यार्थ्यांच्या मनावर याचे वाईट परिणाम होत आहे या तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार शाळा प्रशासनाकडून करण्यात येते मात्र या मागणीकडे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असून या तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
0
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 16, 2025 17:32:19Mumbai, Maharashtra:
anchor : टागोर नगर विक्रोळी मार्केट मध्ये असलेल्या लकी मेडिकल शॉप मध्ये काम करणाऱ्या प्रेमसिंग देवडा
या तरुणाने मराठी आणि महाराष्ट्र बाबत अपशब्द स्टेटस ला ठेवले होते. या वर मनसेचे नेते विश्वजीत ढोलम आणि पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी या दुकानदाराला दुकानाच्या बाहेर बोलवून माफी मागण्यास भाग पाडले. त्याला दुकानातून पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आले. या ठिकाणी त्याला माफी मागण्यास सांगितली. मात्र या मुळे विक्रोळी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
बाईट विश्वजीत ढोलम मनसे कार्यकर्ते
13
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 16, 2025 17:04:15Kalyan, Maharashtra:
काम धंदा नाही पैसै पण नाहीत घर चालवायचे कसे?
कल्याणमधून रिक्षा चोरी करुन तिच रिक्षा चालवित करीत होता उदरनिर्वाह
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रिक्षासह आरोपी आशिष मोरेला केली अटक
Anc काही काम धंदा नाही. पैसेही नाहीत. घर कसे चालवायचे. या विवंचनेतून एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडला. कल्याणमधील रस्त्यात उभी असलेली रिक्षा चोरी केली. रिक्षा चोरी केल्यानंतर कल्याणमध्ये चोरी केलेली रिक्षा चालवून प्रवासी भाडे भरत होता. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आशीष मोरे या २३ वर्षीय तरुणाला रिक्षासह रंगेहात अटक केली आहे. आशिष हा कर्जतनजीक भिवपूरी येथे राहतो या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस करीत आहे.
byte... कल्याणजी घेटे
सहाय्यक पोलीस आयुक्त
13
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 16, 2025 15:36:10Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: ओला उबेर कार चालकांचा संप, संपकऱ्यांनी रस्त्यावर उतरत संप असताना सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांना अडवले.
ola,uber ,taxi stric
ftp slug - nm ola taxi strke
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: ओला, उबर कंपनीचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर कारचालकांनी राज्यात संप पुकारलाय. या संपाची झळ आज नवी मुंबईत देखील बसली. ओला उबेर चालकांनी कोपरखैरणे येथे रस्त्यावर उतरत ओला उबेरची सेवा सुरु ठेवणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या अडवल्या ज्यामुळे प्रवश्यांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. सरकारी मीटर रिक्षा व कॅब परमिट दर करण्यासोबतच रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा, महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा अशा प्रमुख मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून सलग दुस्र्या दिवशी संप सुरु असल्याने नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय.
gf-
============================
1
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 16, 2025 14:34:39Pandharpur, Maharashtra:
16072025
Slug - PPR_TEMBHURNI_KIDNAP
feed on 2c
file 02
-----
Anchor - माढा तालुक्यातील अरण गावातून शाळकरी मुलाचे अपहरण
अरण येथील कार्तिक बळीराम खंडागळे हा दहा वर्षांचा मुलगा शाळेच्या मैदानावर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
टेंभुर्णी पोलिस मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आहेत.
-----
Byte - नारायण पवार, पोलिस निरीक्षक टेंभुर्णी पोलिस स्टेशन
1
Share
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowJul 16, 2025 14:34:22Gulmarg, :
Continuous rains in Kashmir Valley for two days of continuous rainfall.The water level in the rivers is steadily rising
Rains have also dropped in temperatures
Department Meteorological predicted that 24 hours have also been red alert to most areas here where floods may be at risk.
People have been asked not to go to the river drains
Visual and PTC B A Sagar location GULMARG BARMULLA
3
Share
Report
KAKHURSHEED AALAM
FollowJul 16, 2025 14:33:23Kulgam, :
Kulgam..
Anchor... Rainfall continuously in South Kashmir flood like situation in River Vishow of Kulgam
4
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 16, 2025 14:33:10Akola, Maharashtra:
1 फाईल आहे..AVB
Anchor : आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहेय.. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली..भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केलीय तर ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य बाब म्हणून वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहेय..गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधानाला न मानणारे आणि आता संविधान बदलणारे आरएसएस-बीजेपी यांच्याबरोबर कधीही युती केली नसल्याचा वंचितने म्हंटलय..
आत्तापर्यंत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला व त्यांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहेय.. मात्र,आता वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला आहे, यापुढे आनंदराज आंबेडकर यांना व त्यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा देणार नाही अस जाहीर केलंय...
Byte : सिद्धार्थ मोकळे, प्रमुख प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.
5
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 16, 2025 14:07:45Pandharpur, Maharashtra:
16072025
Slug - PPR_PRAKSHAL_PUJA
feed on 2c
file 01
-----
Anchor-आषाढी वारीच्या काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज झाली प्रक्षाळ पूजा, विठुरायाच्या राजोपाचारास सुरुवात , १८ दिवसा नंतर आज थकलेल्या विठूरायाला मिळणार शांत निद्रा
आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना गेले १८ दिवस २४ तास दर्शन देवून थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा झाली .आज दुपारी १२ नंतर देवाला गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आले . याचवेळी संपूर्ण मंदिरही धुवून घेण्यात आले .
यापूर्वी देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पायाला पिठीसाखर लिंबू लावतात. दुपारी नंतर देवाला दुध दही सह सुगंधी केशर पाण्याने श्री विठ्ठला ला ब्रम्ह वृंदानीं वेद मंत्रांसह पवमान अभिषेक करण्यात आला . यांनतर देवाला सुंदर पोशाख केला मौल्यवान पारंपरिक दागिने परिधान करण्यात आले होते. थकवा जाण्यासाठी शेजारती वेळी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा दाखवला जातो.
या प्रक्षाळ पुजेची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु असून आजचा दिवस पंढरपुरातील घराघरात साजरा केला जातो . आज देवाला पुरणपोळी सह पंचपक्वानांचा महानेवैद्य दाखविण्यात येतो .
14
Share
Report