Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममधील पावसामुळे भाज्यांचे दर १००-१५० रुपयांपर्यंत वाढले!

GMGANESH MOHALE
Jul 08, 2025 09:07:39
Washim, Maharashtra
वाशिम: File:0807ZT_WSM_VEGETABLES_PRICES रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सततच्या ओलाव्यामुळे टोमॅटो, कोबी,भेंडी,गवार,वांगी,पालख,मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी, बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून, दरात मोठी वाढ झाली आहे.सध्या टोमॅटो, भेंडीसह इतर भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपर्यंत गेले आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात भाजीपाल्याची आवक वाढत असते, मात्र यंदा पावसामुळे परिस्थिती उलट झाली आहे. दरवाढीमुळे गृहिणींना घरगुती खर्चाचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top