Back
मुख्यमंत्र्यांची भेट: विकास म्हात्रे यांची नाराजगी दूर!
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 12:34:57
Kalyan, Maharashtra
भाजप नगरसेवकाच्या मनधरणीला मुख्यमंत्र्यांना यश.
विकास म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट
Anc..भाजपा चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याची माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपा पदाचा राजीनामा दिला होता निधी मिळत नसल्याने आणि पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या कडे राजीनामा दिल्या नंतर विकास म्हात्रे यांचा पोलीस संवरक्षण काढुन घेतला होता अखेर मुख्यमंत्री यांची भेट घेऊन नाराजगी दूर झाली असल्याचे विकास म्हात्रे कुठेही गेले नाही ते भाजपातच आहेत -जिल्हा प्रमुख नंदू परब यांची माहिती सांगितले.
Byte :- नंदू परब ( जिल्हाध्यक्ष भाजप )
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 08, 2025 17:33:06Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0807ZT_GAD_BUS_FLOOD_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी रस्त्यावर एक एसटी आणि एक लक्झरी बस पुराच्या पाण्यात अडकली , गाढवी नदीचे पाणी वाढल्याने ठाणेगाव या गावाच्या आधी दोन्ही बसमधील सुमारे 80 प्रवासी अडकले, प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचत दिल्ली मदत, सर्व प्रवासी सुरक्षित
अँकर:-- एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. यामुळे खालच्या भागात गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या सर्वच नद्यांना पूर आलाय. पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एक एसटी आणि एक लक्झरी अशा 2 बस पाणी पातळी वाढल्याची माहिती नसल्याने ठाणेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. गाढवी नदीचे पाणी वाढल्याने या दोन्ही बसेस ठाणेगाव परिसरात अडकल्या आहेत. हा गडचिरोलीला येणारा मुख्य महामार्ग आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी येथून पोलीस निरीक्षक स्वतः हायवा वाहनात बसून प्रवाशांपर्यंत पोहोचले आहेत. ठाणेगाव येथे नागरिकांच्या निवास भोजनाची व्यवस्था प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. सर्वच प्रवासी सुरक्षित असून पाण्याचा प्रवाह वाहता नसला तरी रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाने सर्वच खबरदारी घेत प्रवाशांना मदत पोहोचविली आहे.
बाईट १) उषा चौधरी, तहसीलदात, आरमोरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
8
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 17:32:54Kalyan, Maharashtra:
माणुसकीला काळीमा फासणारी डोंबिवलीतील घटना...
डोंबिवलीत आजारी बापाला ट्रस्टकडे सोपवून बेपत्ता झालेल्या मुलाचा मानपाडा पोलिस शोध घेत आहेत..
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये वयोवृद्धवर उपचार सुरु..
Anchor – माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. आजारी आणि वयोवृद्ध बापाला ट्रस्टकडे सोडून स्वतः बेपत्ता झालेल्या मुलाचा सध्या मानपाडा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .
vo..प्रेमराज कुमार (वय अंदाजे ७० वर्षे) असे या वृद्धाचे नाव असून त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, या वृद्धाची स्थिती अत्यंत दयनीय होती – त्यांना ना अन्न दिले जात होते, ना पाणी. त्यांची कोणतीही जबाबदारी न घेता त्यांचा मुलगा त्यांना तेथे सोडून गेला होता.जेव्हा ट्रस्टच्या कर्मचार्यांनी चार दिवस वृद्धाच्या सिंग यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले मात्र मुनगा चार दिवस आलाच नाही तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी त्वरित पुढाकार घेत प्रेमराज कुमार यांना केडीएमसीच्या शात्रीनगर रुग्णालयात दाखल केले सिंग मात्र यांची प्राकृतिक खालवल्याने सिंग यांना सायन रुग्णालयात दाखल केले गेले तर पुन्हा शात्रीनगर रुग्णालय दाखल केले असून त्यांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जन्मदात्या बापाला पोटचा मुलगा सोडून गेल्याने सर्वत्र हळद व्यक्त केली जात आहे मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित मुलाचा शोध सुरू आहे. मुलावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
byte.. सुहास हेमाडे
सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली
byte..डॉ योगेश चौधरी
के डी एम सी रुग्णालय
7
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 17:00:53Kalyan, Maharashtra:
कल्याण खडकपाडा पोलिसांची दमदार कामगिरी
कल्याण जलदगती न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
विनयभंगप्रकरणी आरोपीला ३५ दिवसांत शिक्षा
१ वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड..
२५०० रुपये देण्याचे फिर्यादी देणे तर सरकार २५०० रु सरकार जमा
Anchor – कल्याणमध्ये एका विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या ३५ दिवसांत दोषी ठरवत १ वर्ष सक्त कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात ३ जून रोजी एका महिलेने २९ वर्षीय ओंकार निकाळजे याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली. जलद तपास पूर्ण करून काही तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या गुन्ह्यातील साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी.एन.एस कलम ७४ अंतर्गत १ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच बी.एन.एस कलम ३२९ (३) अंतर्गत १ महिना साध्या करावासाची शिक्षा व ५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान दंडाच्या रकमेपैकी २५०० रुपये फिर्यादिला तर २५०० रुपये सरकार जमा करण्याचे निर्देश दिले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश शालिग्राम सपकाळे यांनी कामकाज पाहिले.
Byte :- अतुल झेंडे ( डीसीपी )
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 15:31:56Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:0807ZT_WSM_MNS_TOLL_RADA
WSM_MNS_District_President
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोल प्लाझाची तोडफोड केली. टोल प्लाझावर मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा न देता नियमित टोल आकारण्यात येत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर कनेरगावपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.मनसे जिल्हाध्यक्ष कडून सदर घटनेचे समर्थन करीत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांनी सांगितले.
बाईट:राजू किडसे, मनसे जिल्हाध्यक्ष
15
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 14:30:15Yavatmal, Maharashtra:
Anchor : माजी मंत्री बच्चू कडू यांची 7/12 कोरा कोरा ही पदयात्रा आज यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली असून, मेंढपाळ बांधवांसोबत ते मेंढपाळांच्या वेशभूषेत काठी घोंगडं घेऊन निघाले. लोही येथे त्यांची जाहीर सभा झाली त्यानंतर तरणोळी मार्गे माणकी येथे पोहोचले.
भर पावसात मेंढरं घेऊन ही पदयात्रा निघाली.
यावेळी बच्चू कडू यांनी मेंढपाळांशी संवाद साधला. शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचे प्रश्न तडीस लावायचे असून सरकारने त्यादृष्टीने धोरण ठरवावे याबाबत त्यांनी धनगर बांधवांना
आवाहन केले.
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 14:02:47Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- धस अपघात
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात घडला असून या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बाईट:- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक अहिल्यानगर
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 14:02:26Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0807ZT_WSM_BJP_FLAGS_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:बच्चू कडूंच्या संपूर्ण कर्जमाफी च्या मागणीसाठी सातबारा कोरा यात्रेला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपच्या कमळ चिन्ह असलेल्या झेंड्याची लागवड सरकार विरोधी अनोखे आंदोलन केले आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज देण्याच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडूंनी कर्जमाफी च्या मागणीसाठी सात बारा कोरा यात्रा काढली आहे.सदर यात्रा ही आज सकाळी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली होती.या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात भाजपचे झेंडे लागवड केले .त्याच बरोबर आता पेरणी करणे बंद एक तर गांजा अफूचे पीक नाहीतर पक्षाचे झेंडे अशा आशयाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे बैलगाडी चालवतानाचे बॅनर शेतात लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.या आंदोलनाची दखल बच्चू कडूंनी घेतली असून केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे घराघरावर भाजपचे झेंडे लावलेले आहेत.शेतात लावायचे बाकी होते आता तेही लावले.असेही शेतात पेरून फायदा नाही.पेरलेले उगवत नाही.उगवले तरी 4 क्विंटल सोयाबीन 15 हजाराचे होते.त्याले लागवड खर्च 80 हजार येते.मग पिक घेतल्यापेक्षा शेतात झेंडे लावलेले बर शेतात झेंडे आले की आम्ही वावरासगट भाजप मध्ये येतो असा उपरोधक टोलाही शेतकऱ्यांनी शेतात झेंडे लाऊन केलेल्या आंदोलनंतर बच्चू कडूंनी सरकारला लावला आहे.
बाईट: बच्चू कडू,माजी आमदार
14
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 13:33:23Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये एक महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला घरात सात महिने डांबून त्यांच्यावर अघोरी उपचार करणाऱ्या एका भोंदू चा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी भोंदू महादेव पालवे याच्या घरी धाड मारली असता पोलिसही हादरले. कारण घरात जादूटोण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे दुकानाच सापडले.
VO 1 : यवतमाळच्या वंजारी फैल मध्ये राहणारा हा आहे महादेव उर्फ माऊली पालवे. शववाहिणीवर चालक असलेला महादेव हा भोंदूगिरी करायचा. त्याच्यासोबत त्याची पत्नी व मुलीचे वास्तव्य असून पोलिसांच्या धाडीत शेजारीच असलेल्या टीनाच्या शेड मध्ये एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी गंभीर अवस्थेत दिसून आल्या, सात महिन्यांपासून त्यांना शौच व लघुशंकेसाठीही बाहेर जाण्यास मनाई होती. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हा विधी त्यांना उरकावा लागत होता. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी तेथे होती. उपचाराच्या नावावर दोघींना गरम सळाखीचे चटके दिल्या जायचे. त्यामुळे दोघींच्याही शरीरावर अनेक जखमा आढळल्या. शिवाय घरात शेकडो बाहुल्या, धागे, गंडे, दोरे, नवरत्न, अंगठ्या देवी-देवतांचे फोटो व मूर्ती, एक शवपेटी व अनेक आक्षेपार्ह वस्तूंसह सात लाख रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली.
बाईट : रामकृष्ण जाधव : पोलिस निरीक्षक
VO 2 : पती पासून विभक्त असलेल्या या महिलेला दृष्टात्म्याची करणी झाल्याची बतावणी करून भोंदू महादेवने तिला जाळ्यात ओढले, तिला व तिच्या मुलीला उपचाराच्या बहाण्याने घरी आणून डांबले, घरातच खड्डे देखील खोदलेले आहे, गुप्तधनासाठी गुरु पौर्णिमेला या दोघी मायलेकींचा बळी देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारताच भोंदू महादेवने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पीडित महिला व तिच्या मुलीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. समाजात अजूनही भोंदूगिरी करणारे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे देखील कमी नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा बुवा बाबा भोंदूंपासून सावध राहणे गरजेचे आहे.
बाईट : कुमार चिंता : पोलीस अधीक्षक शशिकांत फेंडर : अनिस कार्यकर्ता
VO 3 : पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार महादेव पालवे विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र सरकारने 2013 साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. मात्र बोटावर मोजण्या इतकेच गुन्हे दाखल झालेत त्यामुळे या कायद्या विषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 13:32:36Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- धस अपघात
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात घडला असून या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
Wkt- लैलेश
14
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 08, 2025 13:10:12Navi Mumbai, Maharashtra:
story slug - शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण
रयत शिक्षण संस्था
ftp slug - nm shard pawar
byet- sound bhet
reporter - swati naik
navi mumbai
anchor - तळोजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या नावडे शाळेमध्ये स्व माजी आमदार दत्तूशेठ पाटील स्मारक व पूर्णकुर्ती पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले।यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी
आज शैक्षणिक क्षेत्रात होणारा बदल बाबत माहिती दिली, पूर्वी
प्राथमिक आणि माध्यमिक षिक्षण घेतल जात होत,नन्तरच्या काळात गुनवत्तेची चर्चा होउ लागली...
रयत शिक्षण संस्थे मध्ये संगणक च शिक्षण देण्यात आले
आणि आता काळ कृत्रिम बुद्धिमतेचा आहे
शिक्षण ते कृषि प्रत्येक क्षेत्रात ए आय चा वापर होत असल्याचे सांगितले।
साउंड बाईट - शरद पवार- आद्यक्ष एन सी पी
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 08, 2025 13:08:40Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0807ZT_GAD_THALI_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या मलेरिया प्रकोपाविरोधात काँग्रेसने केले टाळी-थाळी वाजवा आंदोलन, थाळ्या वाजवून कोरोना सारखाच मलेरिया पळून जाणार असल्याचा दावा
अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या मलेरिया प्रकोपाविरोधात जिल्हा काँग्रेसने आज अनोखे टाळी-थाळी वाजवा आंदोलन केले. थाळ्या वाजवून कोरोना सारखाच मलेरिया पळून जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला. गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या एकाच महिन्यात हजारो मलेरिया रुग्णांची वाढ झाली आहे. काही रुग्ण उपचाराअभावी दगावले असून डॉक्टरांची रिक्त पदे, औषधांचा अपुरा साठा या परिस्थितीत भर घालत आहे. पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलेरियाचे वास्तव समजावे यासाठी भर पावसात जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढण्यात आला.
बाईट १) महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 08, 2025 13:05:13Raigad, Maharashtra:
स्लग – मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न ....... अलिबागच्या व्यापारयाची सोशल मिडियावर पोस्ट ....... मनसैनिकांनी हिसका दाखवताच व्यापारयाची माफी
अँकर – मुंबईत मराठी विरूदध अन्य भाषिकांमध्ये वाद सुरू असतानाच त्याचे पडसाद रायगडमध्येही उमटले. अलिबागमध्ये एका मारवाडी व्यापारयाने सोशल मिडियावर मराठी माणसाविरोधात स्टेटस ठेवत मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला मनसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला. मनसैननिकांनी या व्यापारयाच्या दुकानात जावून त्याला याबाबतचा जाब विचारला . त्यानंतर या व्यापारयाने माफी मागत सोशल मिडियावरील स्टेटस डिलीट केलं.
बाईट – सिदधू म्हात्रे , मनसे अलिबाग तालुका प्रमुख
साउंड बाईट - व्यापारी
14
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 08, 2025 12:32:47Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_FrodCase
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - शासनाची अन्न धान्य योजना असल्याचा बनाव करून एका बंटी आणि बबलीने आपल्या साथीदारांसोबत मिळून हजारो गोरगरिबांना गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांपासून हे बंटी बबली फरार होते अखेर त्यांना नांदेड पोलिसांनी अटक केली.
Vo - महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या आणि अशा शासनामान्य योजना असल्याचा बनाव करून गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली. केवळ अकराशे ते बाराशे रुपयात भरघोस अन्नधान्य, शिलाई मशीन, विधवाना वर्षभर 10 हजार रुपये प्रतिमाहीना पेन्शन, 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी असे अमिष दाखवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या ठगानी दुकाने थाटली. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नेमून गरिबांना जाळ्यात ओढले. शासनाची योजना असल्याचा समज झाल्याने हजारोच्या संख्येने गोरगरीबानी पैसे दिले.
ग्राफिक्स
:: 1100 रुपयांच्या मोबदल्यात 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहा
:: 1200 रुपयात 60 किलो गहू, 25 किलो तांदूळ
:: 2200 रुपयात शिलाई मशीन
:: 1200 रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना एक वर्ष प्रतिमाहीना 10 हजार रुपये
:: 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी
असे अमिष दाखवण्यात आले.
Vo - पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी लाभ मिळणार असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले. या सर्व रॅकेट चा सूत्रधार आहे बाबासाहेब सुतारे. गुन्हा दाखल झाल्यावर दोन वर्षांपासून सुतारे त्याची पत्नी सोनालीला घेऊन फरार होता. स्वतःची ओळख लपवून नाव बदलून हे बंटी बबली लातूरमध्ये राहत होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना लातूरमधून अटक केली.
Byte - उदय खंडेराय - पोलीस निरीक्षक, एलसीबी. (सिव्हिल ड्रेस वर असलेला byte)
Vo - पैसे देऊन तीन महिने उलटूनही अन्न धान्य मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या. हजारो लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. गोरगरिबांची फसवणूक झाल्याने काही संघटनानी मोर्चेही काढले. अखेर या प्रकरणी जून 2023 मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 1 कोटी 85 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली. प्रत्यक्षात चौदा हजार लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गोरगरिबांना ठगनाऱ्या बाबासाहेब सुतारे आणि त्याची पत्नी सोनाली या बंटी बबली पोलिसांनी अटक केलीये. त्यांची मलमत्ता आणि बँक अकाउंट सील करून पैसे वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक,नांदेड. (युनिफॉर्म वरील byte)
Vo - शासनाची कुठलीही योजना असेल तर त्याची प्रसिद्धी शासन अधिकृत वर्तमाणपत्र अधिकृत माध्यमाद्वारे करते. महसूल यंत्रणा योजना राबवते. त्यामुळे कोणत्याही योजनेला बळी पडण्यापूर्वी नागरिकांनी खात्री करून घेणे आवश्यक आहे. नाहीतर असे बंटी आणि बबली गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत राहतील.
सतीश मोहिते
झी 24 तास, नांदेड.
-------------------------
टीप - पती पत्नीचा फोटो टाकला आहे. महिला असल्याने पत्नीचा फोटो ब्लर करायचा का ठरवावे. ही फसवणूक ज्यावेळी झाली त्यावेळचे फाईल फुटेज 2 फाईल टाकल्या आहेत. त्याला फाईल वापरावे.
14
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 08, 2025 12:31:44Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती साठी पर्यायी जागेचा शोध ? assin by desk
FTP slug - nm apmc market shift story
Byet- apmc sachin, traders
Shots - apmc
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - चाळीस वर्षांपूर्वी मुंबई मधून नवी मुंबई मद्ये स्थलांतरीत करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबई शहरा बाहेर स्थलांतरीत होईल का याचा आढावा घेण्यात आहे , तशा सूचना सिडको, नवी मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत
यामुळे पुन्हा बाजार समिती स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।
Vo1- मुंबई मधून 80 ते 90 च्या दशकत
नवी मुंबई मद्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पाचही बाजारपेठा स्थलांतरीत करण्यात आल्या, यासाठी माथाडी आणि व्यापारी साठी एक लाख हुन जास्त घरे शासनाने कमी किमती मद्ये उपलब्ध करून दिले, परंतु आता पुन्हा नवी मुंबई मधून ही बाजार समिती देखेले बाहेर नेण्यासाठी आढावा घेतला जात आहे ,तशा सूचना शासनाच्या नवी मुंबई म्हापलेलीक दिल्या आहेत ,यात
,100 एकर चा भूखंड या मार्केट साठी शोधण्याचे सूचना शासनाने दिल्या आहेत,
यासंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सचिव बरोबर बेथक घेतली ,यात त्यांना जागा देखील सुचवण्यात आलाय यात नवी मुंबई महानगर पालिकेच्या ह्दडीत समाविष्ट झालेली 14 गावांची जमीन महापालिकेने सुचवली आहे ,बाजार समिती प्रशासनांने जागेबाबत व्यापारी आणि इतर घटकांचं आढावा घेण्याची सूचना दिल्या आहेत।
बाईट - पी. ऐल .खंडागळे- सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
Vo2- तर बाजार समिती एकीकडे रिडेव्हलपमेंट साठी निवडा मागवत आहे, असं असताना नवी मुंबई बाहेर मार्केट हलवल्यास व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असणार असल्यासागे एपीएमसी तीळ व्यापाऱ्यांनी सगीतेल आहे ।
बाईट - अशोक वाळुंज एपीएमसी व्यापारी
Vo3 - नवी मुंबई शहराच्या मद्यभागी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्या कारणाने या जमिनी वर सहविकास करण्याचा प्रस्ताव आहे , त्यात बाजार समिती हलवण्यासाठी देखील प्रयत्न सुरह आहेत ,यासाठी विमानतळ जवळील उलवा , आणि पालघर मद्ये देखील जागा बघण्यात येत आहेत पण जागा नवी मुंबई बाहेर असल्यास व्यापारी आणि माथाडी यांचा विरोध याला असणार असून, बाजार समिती स्थलांतरित केल्यास तेचढा कामगार वर्ग आणि व्यापारी वर्ग साठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागणार आहे,
बाईट - क्लोजिंग wkt
------------
14
Share
Report