Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

रत्नापूरच्या रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांचा संताप!

SRSHRIKANT RAUT
Jul 17, 2025 02:30:23
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील रत्नापूर ह्या आदिवासीबहुल गावाला जोडणारा सावळी सदोबा ते तळणी मार्ग पूर्णतः चिखलमय झाला आहे. पावसाळ्यात या मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रत्नापूर येथून मोठ्या प्रमाणात गौण खनिज रेती चे उत्खनन होते, त्यातून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र या महसूलातून गावासाठी साधा पक्का रस्तासुद्धा तयार होऊ शकलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांना ये जा करताना प्रचंड हाल सोसावे लागत आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग वं जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्ता निर्मितीबाबत एकमेकांकडे बोट दाखवत आहे.
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top