Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे: शंकरराव चव्हाण यांना विनाकारण बदनाम केले!

SMSATISH MOHITE
Jul 15, 2025 05:02:17
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Governer Feed on - 2C ------------------------- Anchor - बाबरी मशीद प्रकरणात शंकरराव चव्हाण यांचा काही दोष नसताना त्यांची विनाकारण बदनामी झाली असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. खासदार अशोक चव्हाण यांच्या मातोश्री कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती पुरस्कार कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. कल्याणसिंग यांचे भाजपचे सरकार असल्याने बाबरी वाचवायची असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करा असा आग्रह शंकरराव चव्हाण यांचा होता. पण मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी विरोध केला. शरद पवार यांनी 356 लागू करू असे सांगितले. 356 ही लागू केली नाही आणि बाबरी पडली असे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले. ते सांगण्यासाठी शरद पवार पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे गेले मात्र त्यावेळी नरसिंह राव पूजा करत होते आणि बाबरी पडेपर्यंत त्यांची पूजा आटोपलीच नाही असे राज्यपाल बागडे म्हणाले. Sound Byte - हरिभाऊ बागडे - राज्यपाल राजस्थान ------------------------------ पिओके ला लॉर्ड माउंट बॅटन जबाबदार, त्यांचे हे पाप अजून भोगतोय - राज्यपाल Anchor - पिओके ला कुणी जबाबदार असेल ते लॉर्ड माउंट बॅटन आहेत आणि त्यांचं हे पाप अजून आपण भोगतोय असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा दाखला त्यांनी यावेळी दिला. Sound Byte - हरिभाऊ बागडे ------------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top