Back
रायगड पोल्ट्री शेतकऱ्यांचा आक्रमक विरोध, उपायुक्तांना घेराव!
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 18, 2025 09:34:48
Raigad, Maharashtra
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन उपायुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... कुक्कुट खाद्याच्या बँगांवर अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी उपायक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पोल्ट्रीतील पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
3
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 13:39:48Akola, Maharashtra:
Anchor : राज्य सरकारने दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ केली असून, त्यामुळे दिव्यांगांना आता दर महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना आर्थिक मदत मिळणार आहेय..प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहेय..या खुशीच्या प्रसंगी अकोल्यात प्रहार कार्यकर्त्यांनी जल्लोष केला..दिव्यांगांच्या हक्कांसाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहेय..
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:39:27Parbhani, Maharashtra:
अँकर- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाजीक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन केले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसूर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने परभणी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर म्हणाले की, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे. ही केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे. मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिलाय...
बाईट - धन्यकुमार शिवणकर,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस,
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 18, 2025 13:33:18Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: कोपरखैरणे पोलिसांनी 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त करत 5 जणांना केली अटक.
कोपरखेरने पुलीस ने पकडा गुटखा
ftp slug - nm koprkherne guthkhaa story
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: मानवी जीवितास हानिकारक असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केलाय. शासनाने प्रतिबंधित केले असतानाही विक्री करण्याच्या दृष्टीने स्वतःजवळ गुटखा बाळगणाऱ्या 5 आरोपीना अटक करुन त्यांच्याकडील 2 लाख 42 हजार रुपयांचा गुटखा कोपरखैरणे पोलीसांनी जप्त केलाय. कोपरखैरणे सेक्टर 1 येथील एका खोलीत छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली असून यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
gf-
===============================
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 18, 2025 13:12:34Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी केली अटक.
दुबई मे नोकरी करने के बहाने बलात्कार किया
ftp slug - nm vashi reap case
shots-
byet-police babasaheb sangle
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: दुबई मध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेवर जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या सिराज इद्रीस चौधरी, वय 55 वर्षे, राहणार मुंबई याला वाशी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.
बाईट -: बाबासाहेब सांगळे (पोलीस उपनिरीक्षक)
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 18, 2025 13:11:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
ब्रेकींग
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ अपघात
सताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकची धडक
अपघात तिघांचा जागीच मृत्यू
अपघातात एक जण जखमी
भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू
10 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू
घटनास्थळी पोलीस दाखल
अपघात एवढा भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी जीसीबीचा वापर
मयत गोपाल मंगुसिंग चंदनसे ४५ '
मुलगा रुद्र गोपाल चंदनसे ८ ,
मुलगी अनु गोपाल चंदनसे १० ,
जखमी पत्नी मीना बाई गोपाल चंदनसे ४०,
3
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:11:22Parbhani, Maharashtra:
ग्राम रोजगार सेवकाचा फोटो जोडला आहे...
assign by- vishal karole
अँकर- परभणी जिल्हात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, कुठल्या ही कार्यालयात जा पैसे दिल्याशिवाय नागरिकांचे काम होईनात,साबळे भोगाव येथे तर विहिरी न खोदताच पैसे उचळल्याच प्रकरण ताज असतांना आता पूर्णा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ग्राम रोजगार सेवकाने विहीर,गायगोठा,फळबागेला मंजुरीसाठी थेट फोनपे वरून पैसे स्वीकारण्याचा धडाका लावलाय, विशेष बाब म्हणजे पैसे स्वीकारून ही तो शेतकऱ्यांचे कामे पूर्ण करायला तयार नाहीये,
व्हीओ- परभणी जिल्हा परिषदेतील अनेक विभाग लाचखोरीच्या आरोपावरून चांगलेच गाजतायेत,त्यातल्या त्यात पंचायत विभागात सारा काही सावळा गोंधळ सुरू आहे, परभणी तालुक्यातील साबळे भोगाव येथे तर विहीर न बांधताच पैसे उचलल्याचे प्रकरण गाजत असतांना आता पूर्णा तालुक्यातील खडाळा गावच्या शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, गायगोठा आणि फळबाग योजनेतून अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते,पण योजनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी आणि कुशलचे बिल काढण्यासाठी 25 पंचवीस हजार रुपयांची मागणी ग्रामरोजगार सेवकाने साहेबांच्या नावाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. विशेष बाब म्हणजे या ग्राम रोजगार सेवकाने टप्याटप्याने हे पैसे थेट फोन पे वरून स्वीकारण्याचा पराक्रम केलाय.
बाईट- मोतीराम शिंदे- पीडित शेतकरी
बाईट- गजानन शिंदे- शेतकरी
व्हीओ- या गावात अनेक सिंचन विहिरी,गायगोठा आणि फळबागांना मंजुरी देण्यात आली आहे,या योजनेचे अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकाकडे असते, पैसे घेऊन ही विहिरींचे अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट परभणी जिल्हा परिषद गाठत पंचायत विभागाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली. सोबत यूपीआय मार्फत पठवलेल्या पैश्याचे तपशील ही सादर केलेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तर मंत्री मेघना बोर्डीकर यांचे विश्वासू तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुम्बरे यांनी जिल्ह्यातील बीडीओ पैसे घेतल्याशिवाय नागरिकांची कामच करीत नाहीत अशी जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. अश्या बीडीओवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे. आम्हाला आम्ही केलेल्या कामाचे अनुदान न मिळाल्यास आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारू असा ईशारा खडाळा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. याबाबत ग्राम रोजगार सोपान शिंदे यांच म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास नकार दिलाय.
बाईट- सुरेश भुम्बरे - जिल्हाध्यक्ष,भाजपा
बाईट- धोंडिबा शिंदे- पीडित शेतकरी
व्हीओ- मागच्या आठवड्यातच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात सिंचन विहिरी करून ही 2021 पासून अनुदान मिळत नसल्याने उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात बसून शेतकऱ्यांनी सलग चार तास बोंबमारो आंदोलन केले होते,बांबूच्या करनाम्याने या जिल्ह्यात विहिरी न करता पैसे दिले गेलेत मग ज्या शेतकर्यांनी खरोखर काम केलंय त्यांना अनुदान का मिळत नाहीये,याचा अर्थ येथे पैसे दिल्याशिवाय फाईली पुढे सरकतच नाहीत असा होत नाही का
गजानन देशमुख,झी 24 तास,परभणी
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 18, 2025 13:09:08Parbhani, Maharashtra:
अँकर- वन्यजीवांची शिकार करून त्यांचे मास विकणारी टोळी वनविभागाने परभणी अटक केलीय. परभणीच्या मांडाखळी परिसरातील इंद्रायणीच्या माळावर काही लोक काळवीट,डुक्कर आणि निलगायीची शिकार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती,त्यावरून परभणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली असता आरोपी जगदीपसिंग टाक आणि सावनसिंग टाक यांना अटक केलीय,त्यांच्याकडून 15 किलो मास जप्त केले असून पशुवैद्यकीय अधिकार्यांनी याचा पंचनामा केला असता काळविटाच्या पोटात बंदुकीची गोळी सापडलीय. वन्यजीव संरक्षण 1972 नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 18, 2025 13:07:46Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नायजेरियन महिलेकडून साडेतीन किलोचे अमली पदार्थ केले जप्त
पनवेल रेलवे स्टेशन पर नजेरीयन महिला के पास मीला ड्रग
ftp slug - nm nigariyan women drugs
shots- drudges
byet- police
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: मंगला एक्सप्रेस मधून फटीदाबाद ते पनवेल असा पनवेल रेल्वे स्थानक येथे झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अमली पदार्धांचा साठा एका नजेरीयन महिलेकडे आढळून आलाय. बेंगलोर नार्कोटिक्स विभागाला सदर महिलेकडे अमली पदार्थ असल्यासंबंधी माहिती मिळाली असता बेंगलोर पोलिसांनी सापळा रचत सदर महिलेची पनवेल येथे झडती घेतली असता अमली पदार्थाचा साठा मिळून आलाय. सदर नायजेरियन महिलेकडून साडेतीन किलोचे अमली पदार्थ आढळून आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 35 कोटी इतकी आहे. बेंगलोर नार्कोटिक्स आणि रेल्वे पोलीस संयुक्तरित्या याप्रकारणाचा अधिक तपास करत आहेत.
Byte -: प्रज्ञा जेडगे (dcp grp)
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 18, 2025 12:38:44Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1807ZT_TATKARE_JALNA(1 FILE)
जालना : विधिमंडळ आवारात झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
सुनील तटकरे यांची मागणी
ठराविक लोकप्रतिनिधींकडून घडलेल्या घटना दुर्दैवी
लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनीधींनी सुसंवादाने वागावे अशी जनतेची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
अँकर : विधिमंडळ आवारात काल झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतीमार्फत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केल्याचं देखील तटकरे यांनी नमूद केलंय.ठराविक लोकप्रतिनीधींकडून घडलेल्या घटना या दुर्दैवी असल्याचं देखील तटकरे म्हणालेत.
बाईट : सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 12:38:02Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_GAD_JANSURAKSHA
( single file sent on 2C)
टायटल:-- महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या जनसुरक्षा कायद्याची गडचिरोली काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होळी, हे जनसुरक्षा विधेयक विरोधकांचे दमन करण्यासाठी आणले असल्याचा काँग्रेसचा दावा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन
अँकर:-- महाराष्ट्र सरकारने अर्बन नक्षल निर्मूलनासाठी आणलेले जनसुरक्षा विधेयक व त्यातील तरतुदीबाबत काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले आहे. गडचिरोलीत या जनसुरक्षा विधेयकाची काँग्रेसने आज होळी केली. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नारेबाजी करत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. हे जनसुरक्षा विधेयक विरोधकांचे दमन करण्यासाठी आणले असल्याचा दावा काँग्रेसने केला. या विधेयका विरोधात सातत्याने लढा देण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.
बाईट १) महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 12:37:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचं शहरवासियांकडुन स्वागत...
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूर मध्ये स्वागत करण्यात आले आहे.इस्लामपुरच्या ईश्वरापूर नामांतराच्या निर्णयाचा इस्लामपूरकर नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
बाईट - भगतसिंह पाटील - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - पै.संग्राम जाधव -नागरिक -इस्लामपूर.
बाईट - प्रवीण परिट - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - शिवाजी खोत - नागरिक -इस्लामपूर.
बाईट - जगदीश पाटील - वकील,नागरिक -इस्लामपूर.
0
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 18, 2025 12:37:13Kolhapur, Maharashtra:
Kop Triboli Yatra
Feed :- 2C
Anc - कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी मोठा उत्साह अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळत असतो... जत्रेनिमित्त बकऱ्यांचा बळी देऊन यात्रा साजरी केली जाते. विशेष म्हणजे मंडळाच्या सर्वच सदस्यांना मटणाचे समान वाटे त्यांच्या घरी जाऊन वाटले जातात.. अशाच एका मटणाच्या वाट्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरातल्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये आशा पद्धतीने ही जत्रा साजरी करण्याची प्रथा आहे. आजही इथल्या नागरिकांनी ती परंपरा जपली आहे... मटणाच्या या वाट्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 18, 2025 12:30:39Shirdi, Maharashtra:
Rahta News Flash
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार येथे अपघात..
आयशर गाडीने सायकलस्वाराला उडवले...
गाडीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू...
राहाता तालुक्यातील कोल्हार गावातील घटना..
अपघातात सलीमभाई पेरूवाले यांचा दूर्दैवाने मृत्यू...
अपघातानंतर पळून जाणा-या वाहनाला गावक-यांनी पकडले...
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी...
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 12:09:55Akola, Maharashtra:
Anchor - अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव-डोणगाव मार्गालगतच्या वसाली बीटमधील वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या गुराख्याला अर्धवट पुरलेला मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुराख्याने तात्काळ स्थानिक पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हे ठिकाण चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चान्नीचे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक पाहणीत मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहावर निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, कमरेला पट्टा, डोक्यावर लांब केस, तसेच हातात पांढऱ्या कड्या असल्याचे आढळले. त्यामुळे मृत व्यक्ती महिला असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी घटनास्थळाजवळील मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून, संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी हत्या होऊन मृतदेह गाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, गुन्हा इतरत्र घडून मृतदेह येथे फेकण्यात आला की घटनास्थळीच गुन्हा घडला, याबाबत तपास सुरु आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 12:07:43Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_GAD_CONG_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई ,काँग्रेसने लक्ष वेधण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर केले घंटा नाद आंदोलन
अँकर:-- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई भासत आहे. यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर संकट ओढविले आहे. याशिवाय खत बी बियाणे यांच्यामध्ये भेसळ, लिंकिंग औषधे घेण्याची बळजबरी व ताज्या अतिवृष्टीचे पंचनामे व नुकसान भरपाई चा प्रश्न या सर्वांसंदर्भात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामुळे काँग्रेसने आज घंटानाद आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने दूर करा अन्यथा या पुढच्या काळात गुराढोरांसह कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसने दिला.
बाईट १) महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report