Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा बामणी में रात्री पूजा: धान कीड़ें रोकने अंधविश्वास भारी

PTPRAVIN TANDEKAR
Sept 20, 2025 02:16:26
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2009_BHA_FARMER_PUJA FILE - 3 VIDEO, 4 IMAGE धान पिकावरील खोडकिडा हाकलण्यासाठी भंडाऱ्याच्या बाम्हणीत मध्यरात्री मांत्रिकाकडून उतारा.....विज्ञानयुगातही अंधश्रद्धेचा बाजार.....शेतकऱ्यांनी गाव बंद करून उरकला विधी..... ANCHOR :- विज्ञानाच्या युगात आताही शेतकरी बुवाबाजीत अडकला आहे. धान पिकावरील रोग औषधीने नाही तर अघोरी पूजेने जाणार त्यासाठी तुमसर तालुक्यातील बामणी गावातील नागरिकांनी रात्रीच्या सुमारास गावातील मंदिरात पूजा केली.... आता ही चर्चा संपूर्ण जिल्हाभर पोहचल्याने प्रशासनाने देखील गावाला भेट दिली आहे... Vo :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या बाम्हणी येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करवून उतारा करून घेतल्याची माहिती मिळतात सर्वत्र खळबळ उडाली. या पूजेत बाधा येऊ नये, यासाठी गावाचे दोन्ही रस्ते पूजाकर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले होते. विज्ञानयुगात वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या या कृत्याची वार्ता दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत पसरल्याने एकच खळबळ माजली आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १,७०० असून ४५० शेतकरी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे खोडकिडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी फवारणी आणि कीडनाशकाचा वापर करण्याचा मार्ग सोडून, असा अघोरीप्रकार केला. या पूजेसाठी गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या वर्गणी सुद्धा गोळा केली होती. बाहेरगावाहून मांत्रिकाला पाचारण केले. त्याला मानधन देऊन मंदिरात मध्यरात्री मंत्रोच्चारासह पूजन केले. या पूजेनंतर मांत्रिकाने, लवकरच कीड नष्ट होईल असे गावकऱ्यांना वाटले. पण या संदर्भात तालुक्यात वार्ता पसरल्याने प्रशासन खडबडून जागा झाला. तहसीलदार, उप विभागीय अधिकारी गावात पोहचत नागरिकांना योग्य मार्गदर्शन केलं जर असा प्रकारे अंध श्रद्धेमुळे पूजा केली असेल तर नक्की कारवाई केली जाणार असल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं आहे.... BYTE :- गणेश दिघे, तहसीलदार तुमसर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 03:45:55
Yavatmal, Maharashtra:WKT यवतमाळ जिल्ह्यात झालेला अति पाऊस आणि पुरामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस अशी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने ही पिके सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या काड्या दिसत असून शेतशिवारांची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे दृश्य आहे. मोठे परिश्रम करून आणि खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि आता हातातोंडाशी आलेली ही पिके मातीत गेल्याने तसेच शेतजमिनी ही खरडून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 20, 2025 03:31:41
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:31:14
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:31:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn imtiyaj jalil av Use jalil file shots छत्रपती संभाजी नगर च्या साजापूर येथील इनामी जमिनीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले  आहे,  इम्तियाज यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याची त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत इम्तियाज यांनी, पोलिस प्रशासनाने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला असला तरी मी लढत राहील, अशी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी नोटीस देऊनही इम्तियाज जलील चौकशीसाठी हजर झाले नव्हते. आता दोषारोपपत्र दाखल झाले आहे त्यामुळे इम्तियाज यांना कोर्टात हजर राहावे लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 20, 2025 03:30:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn water supply av Feed attached नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी  शटडाऊन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र पावसामुळे जलवाहिनीच्या जोडणीचे काम रखडले आहे. त्यामुळं  शहरातील अनेक भागांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत असल्यामुळे हा उत्सव संपल्यानंतर पुन्हा शटडाऊन घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे... शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीसाठी नऊशे मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेवर शटडाऊन घेण्याचे नियोजन महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सलग सहा दिवस शटडाऊन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु याच दरम्यान पैठण परिसरात मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम शटडाऊनवर झाला. ज्या जलवाहिनीची जोडणी करायची ते काम अजूनही प्रलंबित आहे..  
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 20, 2025 03:17:11
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_APP साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲप चे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले.. पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून. शाळा आणि महाविद्यालयांना या ऍपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिलीये. बाईट: सोमनाथ जाधव (ऍप डेव्हलपर)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 03:17:01
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ढग फुटी सदृश्य पाऊस सातत्याने होत असून यामुळे लाखो हेक्टर वरील पीक बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांनी पैश्याची जमवा जमाव करून घेतलेले पीक मातीमोल झाली आहेत. मागील आठ दिवसा पासुन पडत असलेल्या पाऊसामुळे उरली सुरली पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या अस्मानी संकटाला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन मात्र गांभीर्याने घेतांना दिसत नाही. राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेली १२८ कोटीची मदत हि अत्येत तुटपुंजी आहे, मागील वर्षी नुकसानीची रक्कम ५४८ कोटी एवढी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी मदत आहे,बदलल्या निकषामुळे पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाहीये,पिकांचे भाव गडगडले असून परिणामी शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपनीच्या नियमात केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व N.D.R.F. च्या निकषा प्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 03:01:03
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 02:47:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार, आजपासून तिकीट बुकिंगला सुरवात - सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार - मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला - आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार - मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला - बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु - केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती - 15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ - तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा - या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे - काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय - त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरू साठी देखील विमानसेवा सुरु होतं असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद पाहायला मिळतोय Byte : देवेंद्र कोठे ( भाजप आमदार, सोलापूर मध्य)
0
comment0
Report
Advertisement
Back to top