Back
नंदुरबार: १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले!
Dhule, Maharashtra
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांकडून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. २४ तास काम करून देखील तूटपुंजा पगार मिळतो आहे. त्यामुळे समान काम समान वेतन लागू करावा यासाठी चालक रस्त्यावर उतरलेत आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांनी कोरोना काळात केलेल्या कामांच्या मोबदला देण्यात यावा अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा दिला यावेळी देण्यात आला. गेल्या अठरा वर्षापासून १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा देत आहो. परंतु शासन तूतपुंजा पगारावर आमच्याकडून काम करून घेत आहे. त्यामुळे समान काम समान वेतन लागू करावं आणि कोरोना काळात केलेल्या कामाच्या मोबदला देण्यात यावा त्यासोबत २०१४ ते२०१७ या कालावधीत आमच्या पीएफ कापला गेला आहे. तो परत देण्यात यावा यासाठी अनेकदा शासनाचे दरवाजे ठोकवलेत परंतु शासनाकडून कुठलाही प्रत्युत्तर मिळालेला नाही आहे त्यामुळे नाईलाजाने आजपासून काम बंद आंदोलन करावं लागत आहे. कुठलाही रुग्णांना वेठीस धरलं जाणार नाही.परंतु रुग्णांची होणारे गैरसोय ही पूर्ण जबाबदारी आता प्रशासनाची राहणार आहे. त्यामुळे शासनाने आता तरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा १०८ रुग्णवाहिका चालकांनी दिला,
byte - आंदोलक चालक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME| 0107ZT_JALNA_ANDOLAN(2 FILES)
जालना | अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु
अँकर | जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळयातील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यातील 63 हजार शेतकऱ्यांना रखडलेलं 2024 चं अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यात यावं. शेतकऱ्यांना व्हिके नंबर देण्यात यावा अशीही मागणी आंदोलकांनी केलीय.जोपर्यंत प्रशासन या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय.
बाईट : गजानन उगले शेतकरी
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0107ZT_WSM_BAD_PANDAN_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम तालुक्यातील देपुळ-आसेगाव शेत पांदण रस्ता पावसामुळे जल व चिखलमय झाला आहे.या मार्गावरून रोज शेकडो शेतकरी शेतकामासाठी ये-जा करत असून, महिलांसह वृद्ध व लहान मुलांनाही चिखमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास काही शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागते, तर काहींना पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0107ZT_CHP_TADOBA_HIKE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणखी महागले ,सफारी दरात १ हजार रुपयांची प्रचंड वाढ , व्यवस्थापनाने ताडोबाचा कोअर भाग बंद होण्याच्या दिवशीच जाहीर केली दरवाढ, असंतोष टाळण्यासाठी केली चतुराई
अँकर:-- वाघांचे हक्काचे घर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प. मात्र या प्रकल्पात आता पर्यटन आणखी महागले आहे. व्याघ्र सफारीच्या दरात सरसकट १ हजार रुपयांची प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
आता एका फेरीसाठी
कोअर भागात सोम ते शनि प्रति जिप्सी 8800 रु.
शनिवार आणि रविवार 12,800 रु.
तर
बफर भागात
सोम ते शनि प्रति जिप्सी 6000 रु.
शनिवार आणि रविवार 7000 रु.
असे दर असतील.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कोअर भाग बंद होण्याच्या म्हणजेच 30 जून या दिवशीच ही दरवाढ जाहीर केली. पर्यटक- वन्यजीव प्रेमी आणि वाघ बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोअर भागातील पर्यटन आता थेट 1 ऑक्टोबर रोजी घडू शकणार आहे. अशा रीतीने असंतोष होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मात्र एक जुलै म्हणजे आजपासूनच बफर भागातील सहा प्रवेशद्वारातून होणारे पर्यटन नव्या दरानुसारच होणार आहे. व्यवस्थापनाने जिप्सी चालक आणि गाईड यांच्या सततच्या मागणीनुसारच ही दरवाढ तीही बैठक घेऊनच केल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींनी आता ताडोबात जाऊच नये पर्यटन करूच नये अशा पद्धतीची ही दरवाढ असल्याची टीका केली आहे. ही दरवाढ करू नका, सामान्य लोकांना कमी किमतीत व्याघ्र दर्शन घडू द्या अशी मागणी ही केली जात आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
बाईट २,)३) स्थानिक वन्यजीवप्रेमी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_UTTARAKHAND
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दहा ते बारा पर्यटक सहकुटुंब उत्तराखंड येथील चारधाम यात्रेसाठी गेले असून सध्या या ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या भागात 28 जून पासून अडकले आहेत.अनेक नदीवरील पूलांचे नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे.. जेवण खाण्याचं साहित्य कमी असल्यामुळे स्थानिक प्रशासन लवकरच यावर मार्ग काढू असा आश्वासन देत आहे मात्र यामध्ये महाराष्ट्र सरकारने देखील लक्ष घालून आम्हाला यातून सुखरूप बाहेर काढावे अशी विनंती पर्यटक करत आहेत
byte
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rada av
vdo attached
जास्त हॉर्न वाजवला म्हणून ज्येष्ठ नागरिकांसोबत मुलीला धक्का बुक्की केल्याचा आरोप
संताप्त जमावाने तरुणाला दिला चोप, निराला बाजार येथील घटना
अँकर: नागमोडी पद्धतीने वाहन चालवत असल्याने चार चाकी चालकाने समोरच्या वाहनाला हॉर्न दिला. यावेळी वाहन चालकाने जेष्ठ नागरिक व महिलेला धक्काबुक्की केली. संतप्त झालेल्या जमावाने ज्येष्ठ नागरिक व तरुणीला धक्काबुक्की केली म्हणून चांगलाच चोप दिला. ही घटना निराला बाजार येथे घडली. काही नागरिकांनी तरुणाला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करीत आहेत.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
PKG
Sng_tadkadtai_pkg
स्लग - आली रे आली तडकडताई.. काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी तड्कडताईची अनोखे परंपरा .
अँकर - आली रे आली तड्कडताई..भुताची आई, अशी आरोळी सध्या सांगलीच्या रस्त्यांवर ऐकू येत आहे..ही तडकडताई पाहून मुलं धावत सुटतात.. काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या तडकडताईच्या मागे पुढे हजारो मुलांचा गलका असतो,ज्यामध्ये या तडकडताईच्या सुपांचा प्रसाद मुलांना खावा लागतो..पाहूया काय आहे,या सांगलीच्या तडकडताईची परंपरा..
व्ही वो - सांगलीच्या रस्त्यांवर सध्या तडकडताई प्रकट झाली आहे,त्यामुळे बाल गोपाळांची पाळता भुई थोडी झाली.अंगावर काळी साडी,तोंडावर मुखवटा आणि हातात सूप,अशा रुपात प्रकट झालेली तडकडताई कोणा भुताचा अवतार नसून देवीचा अवतार म्हणून ओळखली जाते.दृष्टांचा संहार करणारी अश्या तडकडताईची ओळख आहे.
काय आहे तडकडताईची परंपरा..?
ग्राफीक्स इन
महिषासुर मर्दिनीचा अवतार म्हणून तडकताई ओळख आहे..
भावई यात्रेच्या निमित्ताने जोगण्या उत्सवाला सुरुवात होते.
जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्यनंतर सुरु होतो.
अमावस्येच्या दिवशी तडकडताईचा लग्न सोहळा पार पडतो.
त्यानंतर शहरातल्या गल्ली मधून तकडकड ताईचा संचार सुरू होतो.
अंगावर साडी,तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप असा तडकडताईचा अवतार असतो.
देवीचा अवतार आणि दैत्यांचा संहार करणारी म्हणून तडकडताईची ओळख आहे.
ग्राफीक्स आऊट
व्ही वो - तडकडताई भुताची आई,अशी आरोळी सांगली शहरातल्या गल्ल्या- गल्ल्यांमध्ये ऐकू येते आहे,हजारो मुलांचा गलका तडकडताईच्या मागेपुढे काळे म्हणत धावताना पाहायला मिळतो,काळी साडी, मुखवटा आणि हातात सूप घेऊन धावणारी ही तडकडताई मुलांना सुपांचा मार देखील देते.
बाईट - संजय चव्हाण - नागरीक,सांगली.
व्ही वो - सांगली शहरातल्या गावभाग येथील
कुंभार कुटुंबाकडून तडकडताईची परंपरा वर्षानुवर्ष जोपासली जात आहे,जेष्ठ महिन्यात अमावस्येला भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते.अमावास्यच्या दिवशी तडकड ताईचा जोगत्या त्याबरोबर विवाह पार पडतो आणि त्यानंतरही तडखळता येईल शहरातल्या कल्याणमध्ये संचार करू लागते.
बाईट - पार्वती कुंभार - परंपरा जोपसणारे कुटुंब - सांगली.
व्ही वो - खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपने प्रसाद देते,या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते, अशी अख्याइका आहे.अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते.तडकडताईचा दरारा हा खूप मोठा आहे.अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात.
बाईट - राहुल बोळाज - नागरिक - सांगली.
व्ही वो - तडकडताईची अश्या या परंपरेला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा,मात्र संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आज २१ व्या शतकातही सांगलीकर मोठ्या उत्साहात जोपासता आहेत.
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Deadbody
Feed on - 2C
-------------------------
Anchor - नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील नालित एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोन दिवसापासून हा मृतदेह नालीत पडून असल्याचा अंदाज आहे. पण दोन दिवसापासून या मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. नवीन मोंढा रस्त्यावरील नालित हा मृतदेह दुपारी आढळून आला. अंदाजे 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह आहे. या मृतदेहाच्या हातात प्लास्टिकचे हातमोजे आहेत. त्यामुळे बायो मेडिकल कचरा उचलणारा सफाई कर्मचारी असल्याचा अंदाज आहे. पण अजून मृतादेहाची ओळख पटली नसून पोलीस तपास करताहेत.
------------
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित, जमिनीच्या अधिग्रहणासाठी मोजणीकरिता आलेल्या महसूल आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवित माघारी पाठवले, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे आज मराठवाड्याच्या विविध आंदोलने ही करण्यात आले आहे...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..AVBB
Anchor : हिंदी सक्ती करावी हा मसनेकर समितेचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी स्वीकारला होता तर त्यांच्या स्वाक्षरीने हिंदी पहिला वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करावी याला मान्यता उद्धव ठाकरे यांनी दिली होती तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्यासाठी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली असल्याची खोचक टीका केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहेय..आपल्या अकोला दौरा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते..तर दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत सोबत येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न असून महायुती ही निवडणूक जिंकणार असल्याचं ते म्हणाले..ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाकरिता शेतकरी स्वतः जमीन देतील आणि राज्य सरकारही या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला..
Byte : प्रतापराव जाधव, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री..
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slug - PPR_65_HECTOR
feed on 2c
file 03
------
Anchor - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या मुक्कामासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने चंद्रभागेच्या पूर्व किनाऱ्यावर विकसित केला भक्ती सागर परिसर, तीन ते साडेतीन लाख वारकऱ्यांच्या मुक्काम सोयी साठी झटत आहेत सर्व कर्मचारी.
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी यंदा 18 ते 22 लक्ष वारकरी दाखल होतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे या सर्वांचीच राहण्याची सोय दिंड्या मठ अशा ठिकाणी होत नाही. त्यांच्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भक्ती सागर परिसर विकसित केला आहे. या ठिकाणी जवळपास तीन ते साडेतीन लाख वारकरी राहू शकतात. अशी सुसज्ज व्यवस्था नगरपालिका प्रशासन करत आहे.
याठिकाणी स्वच्छ बाटली बंद पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी पाणी, कायमस्वरूपी आणि तात्पुरती शौचालये , महिलांसाठी स्वतंत्र स्नान गृहे केली आहेत. तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र केले आहे. त्यातही भाविकांना सुविधा मिळणार आहेत.
------
Byte - महेश रोकडे, मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर
0
Share
Report