Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

मोदी–मातोश्री विवाद: पवार ने किसे फोन किया? खुलासा

SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 09:15:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_padalkar स्लग - मोदी व फडणवीसांच्या मातोश्री प्रकरणी शरद पवारांनी कोणाला फोन केले होते का ? गोपीचंद पडळकर. अँकर - देवेंद्र फडणीस यांच्या मातोश्रीवर शरद पवारांनी खालच्या पातळीवर टीका केली होती, तेव्हा त्यांनी फोन केला होता का, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री बाबतीत AI च्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केला,त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का ? असे असेल तर सांगा मी बोलेन,अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करत जयंत पाटलांवर केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी ठाम असल्याचा स्पष्ट केला आहे,राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या टीकेनंतर जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहेत यावरून पडळकरांनी अधिकचं बोलणं टाळले आहे. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार ,भाजपा.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 19, 2025 11:51:23
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी nm airport opening prparation FTP slug - nm airport preparation shots- reporter - swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात रस्त्यांचे डांबरीकरण, रंगरंगोटी, फुटपाथांचे सुशोभीकरण या कामांना आला वेग. येत्या 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्यास जवळपास शिक्कामोर्तब. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे होणार उद्घाटन. उद्घाटन झाल्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंम्बर मद्ये प्रवासी वाहतूक होणार सुरू. उद्घाटन निश्चित असलं तरी नामांतराचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. उद्घाटन झाल्यावर स्थानिक भूमिपुत्र काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे. gf-
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 11:46:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_BURNING_CAR_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर अचानक कारने घेतला पेट, शहरातील आनंदवन चौकातील घटना अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर कारने अचानक पेट घेतला. ही घटना शहरातील आनंदवन चौकातील घडली. काही क्षणातच धूर व नंतर ज्वालांनी संपूर्ण कार ची राख रांगोळी झाली.  अचानक आग लागल्याने सर्वत्र पळापळ झाली. आगीचे कारण मात्र अज्ञात आहे. थोड्या वेळासाठी या महामार्गावरील वाहतूक  विस्कळीत झाली होती. पोलीस आणि अग्निशमन पथकांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ---- बर्निंग कार चे vis----- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 19, 2025 11:30:43
Pandharpur, Maharashtra:19092025 Slug - PPR_RAIN_CROPLOSS file 05 Anchor - काय झाडी काय डोंगर या डायलॉगने प्रसिद्धी मिळालेल्या शहाजी बापू पाटलांच्या सांगोल्यात ढग फुटी सदृश्य तुफान पाऊस , 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 170 मिलिमीटर पाऊस झाल्याने 60 हजार हेक्टर शेतीचे नुकसान प्राथमिक अंदाज सांगोला तालुका तसा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. येथील कडलास, निजामपूर, वाटम्बरे, राजुरी या गावात रात्री 7 ते 11 या काळात तुफान पाऊस झाला आहे. याच्या नुकसानीची परिस्थिती आज समोर येऊ लागली आहे. कडलास गावात एक वस्तीत पाणी घुसल्याने तेथील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांचे धान्य कपडे संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. या ढगफुटी सदृश्य पावसावर जवळपास 60 हजार हेक्टर वरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज दिवसभर शेताच्या मधून पाणी वाहत होते. द्राक्ष बागा डाळिंब बागा, मका, बाजरी, ज्वारी , अशा पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यातील काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई देताना वेगळे निकष लावण्याची मागणी शिवसेना नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यानी केली आहे. ----- Byte 1.वन टू वन माजी आमदार शहाजी बापू पाटील 2. शेतकरी बाईट्स
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 19, 2025 11:22:23
Dhule, Maharashtra:ANCHOR - लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत मात्र कोरडे पाषाण , हि म्हण आपण ऐकली असेल , अनुभवली असेल. नेते, अधिकारी , राज्य करते , विरोधक , सर्व शासकीय शाळामंध्ये मुलांना प्रवेश देण्यासाठी बोलघेवडेपण करताना दिसतात. मात्र स्वकृतीतून नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे . त्यांनी आपल्या स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं. आहे. VO - या आहेत नंदुरबार जिल्ह्याधिकारी मिताली सेठी , यांनी समाजापुढे आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे. नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना प्रवेशित केले आहे . विशेष म्हणजे त्या स्वतः मुलांना सोडायला अंगणवाडीत आल्यात. या चिमुरड्याने शिस्त लागावी, त्यांचा विरुंगुळा व्हावा या हेतूने सेठी यांनी आपल्या मुलाला या सरकारी अंगणवाडीत पाठवायला सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा सर्व साधारण समज. पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हा समज मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत टाकलं आहे. नंदूरबार शहरापासून ३-४ किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांना टाकलं आहे. या अंगनवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या झोळीची कल्पना आवडल्यानं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना टोकरतलावच्या अंगणवाडीत टाकले आहे. बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार VO - या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत. बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार VO - सामाजिक दायीत्वातून त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांना प्रेरणादायी आणि कौतूकास्पद म्हणाव लागेल. त्यांच्या यां निर्णयामुळे पालकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. इतकाच नव्हे तर सरकारी शाळांना दूषण देत न बसता, त्यांनी कृतीतून घालून दिलेला हा आदर्श इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
3
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 11:21:59
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कामठवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिल. शिक्षक द्या अशा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात शाळा भरविली. विद्यार्थ्यांनी केली प्रशासनाकडे मागणी. वर्गावर शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, आणखी एका शिक्षकाची वारंवार मागणी करून देखील शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकांनी देखील संताप व्यक्त केला. त्यामुळे अखेरीस शाळा सोडून विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागला.
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 11:21:46
Nashik, Maharashtra:nsk_panerpkg feed by 2c and live u 51 अँकर नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भेसळीच्या संशयावरून सिडकोतील दुकानावर छापा टाकत पनीर व खव्याचा तब्बल ४३ हजारांचा साठा जप्त केला आहे. Vo दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मालिका सुरू केली आहे. त्याच मोहिमेत शुक्रवारी नाशिकमधील सिडको, त्रिमूर्ती चौकातील विराज एन्टरप्रायजेस या दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२९ किलो पनीर (किंमत ३८,७०० रुपये) आणि ५,०४० रुपयांचा खवा असा एकूण ४३,७४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बाईट- मनीष सानप, सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन अधिकारी Vo 2 भेसळीच्या संशयाने नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून उर्वरित साठा नष्ट करण्यात आला. सणासुदीच्या काळात पनीर, खवा, मिठाई खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी अन्यथा याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात Byte डॉ सदानंद नायक स्किन स्पेशालिस्ट Vo 3 असे प्रकार कुठे आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. भेसळविरोधी माहिती टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 19, 2025 11:19:31
Kolhapur, Maharashtra:Kop iPhone 17 Vis Mhais Feed :-2C Anc:- सध्या मार्केटमध्ये आयफोन 17 घेण्यासाठी तरुणांच्या उड्या पडू लागले आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. नावेद मुश्रीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये खरे इन्व्हेस्टमेंट तेच जे आपल्याला भविष्यात उत्पन्न देतं.. लाखो रुपयांचा आयफोन खरेदी करण्यापेक्षा लाख रुपयांची म्हैस किंवा गाय विकत घेतली तर ती आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न देऊ शकते असं म्हटलय. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी केलेली सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनलाय.. नावेद मुश्रीफ यांनी केलेल्या पोस्टमध्ये एकीकडे आयफोन 17 चा फोटो आणि दुसऱ्या बाजूला कायमस्वरूपी उत्पन्न देणाऱ्या लाखाच्या म्हशीचा फोटो पोस्ट केलाय.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 19, 2025 10:52:50
Akola, Maharashtra:Anchor : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर उपस्थित राहणार आहेत. या शिवार फेरीत विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधून लाखो शेतकरी भेट देणार आहेत. या फेरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पिकांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ११२ धान्य पिके, २७ भाजीपाला पिके, ४९ फुलवर्गीय पिके यासह कडधान्य, कापूस व इतर अनेक वाणांचा समावेश आहे.या निमित्ताने शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, नवनवीन वाण व शाश्वत शेतीविषयक माहिती थेट प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मिळणार आहे.शेतकरी बांधवांनी या तीन दिवसीय शिवार फेरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 19, 2025 10:51:09
Navi Mumbai, Maharashtra:story slug -: १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक. 12 साल के लडकी पर अत्याचार ftp slug - nm child girl crime shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नेरुळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलेय. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आलेय. मुलीची आई कामावर असताना मुलगी घरी एकटी असताना नराधम आरोपी लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत मुलीला त्याच्या घरी नेले आणि जर तिने आज्ञा पाळली नाही तर तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. धमकीच्या दबावाखाली, मुलीला तिचे कपडे काढण्यास भाग पाडले गेले आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरी परतल्यावर पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने ताबडतोब नेरुळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केलेय.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 19, 2025 10:32:19
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_MARCH एसटी आरक्षणावरून पारधी आणि बंजारा समाजात संघर्ष पेटला. एसटी आरक्षणात घुसू देणार नाही असं म्हणत पारधी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. Anchor "धाराशिवमध्ये आरक्षणावरून नवीन संघर्ष पेटला आहे... एसटी आरक्षणावर बंजारा आणि पारधी समाज रस्त्यावर उतरला आहे. एकीकडे बंजारा समाज आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरतोय, तर दुसरीकडे या मागणीला तीव्र विरोध करण्यासाठी आदिवासी पारधी समाजाने आज धडाकेबाज एल्गार केला आहे. हजारोच्या संख्येने पारधी बांधव पारंपारिक वेशभूषेत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन दाखल झाले. दोन तासांपासून ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी सुरू आहे. ‘बंजारा समाज उपरा आहे... त्याला आमच्या ताटातील आरक्षणात घुसू देणार नाही’ असा ठाम इशारा पारधी समाजाने दिला आहे. ओबीसी आरक्षणानंतर आता एसटी आरक्षणावरून बंजारा व पारधी समाजामध्ये संघर्ष उफाळू लागला आहे Byte सुनील काळे -
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 10:31:38
0
comment0
Report
Sept 19, 2025 10:03:36
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ : विदर्भ साहित्य संघ शाखा जांब-यवतमाळ व ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वे विदर्भ साहित्य संमेलन जांब येथे १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी उबंटू इंग्लिश स्कूलच्या परिसरात होणार आहे. संमेलन परिसराला राजानंद गडपायले साहित्य नगरी, व्यासपीठाला य. खु. देशपांडे, ग्रंथप्रदर्शनाला वा. ना. देशपांडे, प्रवेशद्वाराला शंकर बडे व ग्रंथप्रकाशन दालनास कलीम खान यांची नावे देण्यात आली आहेत. आयोजनाची जबाबदारी ईश्वर फाउंडेशनचे हेमंतकुमार कांबळे यांच्या समितीकडे सोपविण्यात आली असून यवतमाळच्या सांस्कृतिक भूमीत एक नवे साहित्यिक पर्व घडेल, असा विश्वास अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 19, 2025 10:03:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज...‌ स्किप्ट ::- अहमदपूरमध्ये भर चौकात दारुड्याचा तमाशा.... व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.... AC ::- अहमदपूर शहरात दारुड्याने भर चौकात धिंगाणा केलाय. अहमदपूरच्या सावरकर चौकात दारूच्या नशेत एका व्यक्तीने चक्क रस्त्याच्या मध्यभागी आडवा झोपून या महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवली त्यामुळे नांदेड–अंबाजोगाई मार्गावरील अवजड वाहनं, ट्रकसह इतर गाड्यांची लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळालं. चालकांनी त्याला बाजूला होण्याची विनंती केली, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण धक्कादायक म्हणजे, या सर्व गोंधळादरम्यान चौकात एकही वाहतूक पोलीस किंवा पोलीस कर्मचारी हजर नव्हता. याचाच फायदा घेत दारुड्याने भर चौकात बराच वेळ तमाशा केला. तमाशा केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. त्यामुळे  अहमदपूरमध्ये नेमकी कायदा-सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 19, 2025 09:51:18
1
comment0
Report
Advertisement
Back to top