Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर: कर्जाच्या संकटात शेतकऱ्याची आत्महत्या, बाजारभाव संकटात!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 18, 2025 08:03:29
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज AC ::- पेरणी करून शेतकऱ्याने आभाळाकडे डोळे लावून वाट पाहिली… पण पेरणी झाल्यापासून पावसाने पाठ फिरवली… एकीकडे नापिकीचा धोका, दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि त्यातच शेतीमालाला मिळणारा अल्प बाजारभाव… या सगळ्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील 52 वर्षीय शेतकरी श्रीधर घोगरे असं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीधर घोगरे यांची शेती व कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून होता. यावर्षी पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पीक येईल का नाही आणि पेरणीचा खर्च आणि घेतलेलं कर्ज फिटेल का नाही या चिंतेत हा शेतकरी होता.या शेतकऱ्यांनी बँकेतून पीककर्ज घेतलं होतं आणि त्यासोबतच काही खासगी सावकाराकडून ही कर्ज घेतलं होत असं सांगीतले जात आहे. 
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top