Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर शेतकऱ्याची हतबलता: 'शेती विकणे आहे' फलक लावला!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 17, 2025 01:31:40
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... प्लिज इनपुट हे EXCLUSIVE चालवा प्लिज.... स्किप्ट::- शेती परवडत नाही… म्हणून 'शेती विकणे आहे'चा फलक... वयोवृद्ध शेतकऱ्याची वेदनादायक हाक…. पेरणी केली… पाऊस नाही… आता शेती विक्रीला... कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्याची हतबलता…. AC::- ::- शेती परवडत नाही… पाऊस नाही… कर्जबाजारीपणा वाढतोय… आणि म्हणूनच लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला शेती विक्रीसाठी बांधावर थेट फलक लावावा लागला आहे… गेल्या ३० दिवसांपासून पाऊस नाही… कर्ज काढून पेरलेलं पीक वाळून चाललंय. आणि शेती विकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत त्या शेतकऱ्यांनी आपली शेतीच विकायला काढली आहे… औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील ७० वर्षीय गोरोबा आडसुळे‌ असं त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गोरोबा आडसुळे यांनी आपल्या शेताच्या बांधावर थेट 'शेती विकणे आहे' असा फलक लावला आहे… खाजगी सावकाराकडून उसनवारी करून पेरणी केली… पण आता मशागतीसाठी खिशात पैसे नाहीत… आणि म्हणूनच… एका बैलाच्या जोडीसह स्वतःला औताला जुंपून गोरोबा आडसुळे शेतात राबतायत… शेती परवडत नाही, कर्जबाजारीपणा वाढतोय… आणि म्हणूनच 'शेती विकणे आहे' या फलकासोबत या शेतकऱ्याच्या वेदनाही लातूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत…याच संदर्भात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून त्या शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी... WKT ::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर आणि शेतकरी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top