Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में मोदी के बालपण पर बनी लघुपट ने हर दिल जीत लिया

AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 16:30:31
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1809ZT_CHP_MODI_FILM_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल :--- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'चलो जीते हैं' लघुपटाचे चंद्रपुरात स्क्रिनिंग, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अँकर : चंद्रपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित 'चलो जीते हैं' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन एमडीआर मॉल येथील मिराज सिनेमात करण्यात आले. या वेळी राज्याचे माजी मंत्री भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लघुपटाच्या कथानकातून प्रेक्षकांना प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे आणि लघुपट पाहून बाहेर पडल्यावर भारावून गेल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली. सामाजिक मूल्ये आणि संघर्षातून घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणाऱ्या या लघुपटाला चंद्रपुरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा लघुपट चंद्रपुरात 6 दिवस दाखविला जाणार आहे. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 18:01:38
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_LEOPARD_DARE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना , शोधकार्य सुरू, वनपथक घटनास्थळी      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.  ही घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे घडली. प्रशिल बबन मानकर असं इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा संध्याकाळी गावातच मस्कऱ्या गणपती निमित्त आयोजित महाप्रसादात जेवणासाठी काका सोबत गेला होता. घरी परत येत असताना गावातीलच एका उघड्या बाथरूममध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत काकाच्या हातातून मुलाला ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचा मोठा फौज-फाटा परिसरात दाखल झालाय. बेपत्ता मुलाचा आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेतला जात आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 17:31:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: सांगली ब्रेकिंग स्लग - गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील जहरी टीकेनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आक्रमक,सांगली आणि जत मध्ये उद्या पडळकरां विरोधात निदर्शने आणि मोर्चा. अँकर - सांगलीच्या जत मधील अभियंता आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय.पडळकरांच्या विरोधात नसांगली आणि जत मध्ये आंदोलन करण्यात येणार आहेत.सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या निषेधार्थ राजारामबापु पाटील स्मारका समोर निदर्शने करण्यात येणार आहेत त्याचबरोबर जत मध्ये महाविकास आघाडीचे नेते व इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील यांचे समर्थक एकत्रित जत मध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत.
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 16:33:09
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_LOWHEIGHT_BRIDGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.अशा परिस्थितीत देवठाणा बुद्रुक येथील चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.परिसरात थोडा जरी पाऊस झाला तरी पुल पुराच्या पाण्यात बुडतो आणि नागरिकांना धोकादायक पद्धतीने वाट काढावी लागते.या पुलाची उंची कमी असल्याने विशेषत: पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वारंवार गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो.गावकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे.मात्र अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून पुलाची उंची वाढवावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
7
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 18, 2025 16:32:52
Palghar, Maharashtra:पालघर - पालघरच्या एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. स्फोटात एकाचा जागेचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत . पालघरच्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट झाला आहे . उत्पादन सुरुवात असताना स्फोट झाल्याची प्रशासनाची माहिती आहे. धातू आणि आम्लाच मिश्रण सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय . जखमींवर पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत . पालघर जिल्ह्यात एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . Bite - यतीश देशमुख - पालघर पोलीस अधीक्षक
5
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 18, 2025 16:31:12
Kalyan, Maharashtra:खासदार श्रीकांत शिंदे 27 गावाच्या विविध समस्या घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट 27 गावातील 499 कर्मचारी विषयी चर्चा होऊन त्यांना संबंधित विभागाशी बोलून त्या कर्मचारीला ज्या पदावर ते रुजू झाले आहेत त्यांना त्याच पदावरची रुजू कराची मागणी केली केली आणि शासनाने ती देखील मंजूर केली आहे 499 कर्मचाऱ्यांना 2010 मध्ये ज्या पदावरची स्थापना झाली होती त्याच पदावरती आज पुन्हा त्या पदावरती घेण्यात येईल असा नर्णय या बैठकीत झाला 180 कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या दिवशी कन्फर्मेशन लेटर पत्र त्यांना देण्यात येईल On संजय राऊत दिघे साहेबांना विरोध करायचं काम अशा लोकांनी केला आहे आत्ता जो रोज उठून शिव्या शाप देतात त्यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा काही करू शकत नाही अशा लोकांकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही On राज ठाकरे निवडणुकी आल्या तर नेते येत असतात प्रत्येक नेता आपला पक्ष वाढवण्याचा काम करत असतो तसेच राज ठाकरे देखील उद्या येत आहेत byte.. श्रीकांत शिंदे खासदार
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 18, 2025 16:30:18
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Contro Feed on - 2C ----------------------------- Anchor - एकमेकांच्या शाळेतून टी सी काढण्याच्या अर्जानंतर आता पुन्हा त्याच गावात मराठा ओबीसी मध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या रिसनगाव येथे मराठा आणि ओबीसी वाद पुन्हा पेटला. यात दोन्ही गटात हाणामारी होऊन तीन जण जखमी झाले. शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी हैदराबाद गॅझेट लागु केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामूळे रिसनगाव येथील धोंडे यांच्या शिक्षण संस्थेतील मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळेतून मराठा विद्यार्थ्यांची टीसी काढून घेण्यासाठी 21 मराठा पालकांनी अर्ज केला होता. त्यानंतर ओबीसी समाजाने देखील मराठा समाजाच्या शिक्षण संस्थेतील शाळेतून पाल्यांना काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आज रिसनगाव मध्ये आज एक बैठक होती. या बैठकीदरम्यान मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले . त्यांच्यात वाद होऊन हानामारी झाली. यात दोन्ही गटातील तीन जण जखमी झाले. दरम्यान मनोहर धोंडे त्यांनी या घटनेचा निषेध केला. तर भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तर हा दोन समाजातील व्यक्तींमध्ये झालेला अंतर्गत वाद आहे. याबाबत कुठल्याही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे ... Byte - सुरज गुरव - अप्पर पोलीस अधीक्षक. Byte - बालाजी एकलारे - जखमी Byte - मराठा आंदोलक Byte - मनोहर धोंडे Byte - अशोक चव्हाण --------------------------------
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 16:02:15
kolhapur, Maharashtra: Ngp Ajit pawar live u ने फीड पाठवले ----- नागपूर अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते ( ऑन चिंतन शिबिर ) --- राजकीय पक्ष काम करत असताना अधून शिबीर घेत असते --स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे... कोर्टाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका पूर्ण करायला सांगितले आहे --2022 लाच निवडणुका व्हायला हव्या होत्या... ----चार वर्ष गेली... कारण ओबीसीना त्याचे प्रतिनिधित्व मिळाले नव्हते....समाजात OBC मोठा आहे . त्यावेळेस राजकीय पक्ष, उद्धव ठाकरे सरकार कोर्टात गेले... त्यानंतर बराच काळ गेला -- ज्यांना आमदार/खासदार संधी मिळत नसते त्यांच्याकरता ZP, महापालिका यामध्ये काम दाखवायची संधी असते..त्याच्यातून विधानसभा, लोकसभा याकरता उमेदवार मिळतात --- आता समाधान आहे देर से आहे दुरुस्त आहे... या निवडणूक होत आहे (On गोपीचंद पडळकर) --- आमचं महायुतीचे सरकार आहे... भाजपाच्या लोकांच्या चुका होत असेल तर त्याची दोन भाजपने घेतली पाहिजे.. राष्ट्रवादी ची होतं असेल तर आम्ही घेऊ -- याबाबत मला काही माहित नाही... पत्रकार मित्र आम्हाला माहीत नसताना अचानक असे प्रश्न विचारतात --- कोणी कोणत्याही पक्षात असला तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे.. संस्कृती आहे... --- प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना कोणतेही स्टेटमेंट करत असताना वेदना देणारे स्टेटमेंट करू नये --- समाजात सलोखा राहील.. वातावरण चांगला राहील त्याबद्दलचा प्रयत्न राहील (On छगन भुजबळ ) -- मला त्याबद्दल माहिती नाही... त्यांना विचारून बोलेलन... त्यामागे त्यांची भूमिका काय आहे काय माहिती आहे हे जाणून घेईल (On गाडी खरेदी ) --- काही आपल्याला माहिती नाही कोणत्याही बातम्या पसरवतात ---मागे एक सरकार असताना गाड्या योग्य condition नसल्याने अपघात झाला होत्या =-गाड्या 12 लाखाच्या आहे.... गाड्यानी दुर्गम भागात, पूर असलेल्या भागात जावे लागते --उद्या त्या गाड्या जाऊ शकल्या पाहिजे,नाही जाऊ शकली तर तिकडून तुम्ही बोलाल --बोलेरो गाड्या आहेत... पोलीस, महसूल विभाग, कलेक्टर याबाबत काही सूत्र ल दिले आहे आणि या गाड्या बारा ते 30 लाखापर्यंत आहे हे खर आहे -(on मुंबई महापौर ) -- वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, प्रमुखांनी काय भूमिका मांडयची हा त्या पक्षांचा अधिकार आहे -- त्यांनी त्यांची भूमिका मांडली (On राहुल गांधी ) --याला काही अर्थ नाही... लोकसभेत MVA ला 31 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या... त्यावेळी EvM आणि इतर सगळं चांगले... हरल्यानंतर हे म्हणतात ते नवीन मुद्दा आणतात..... कर्नाटक हिमाचल, तेलंगणामध्ये ते जिंकले.... बंगालमध्ये ममता तीन वेळा जिंकल्यात... -- हरल्यानंतर हे गडबड झाल्याचे आरोप करतात --- ते विरोधी पक्ष नेता आहे काय बोलायचं आहे त्यांचा अधिकार आहे --- लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठी किंमत मोजली आहे.. मात्र पुढील पाच सहा महिन्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या चांगल्या योजना आणल्या --- सविधानचा फेक नेरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत चालला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा चालला नाही (On स्थानिक स्वराज्य ) -- स्थानिक लेवलवर प्रत्येक प्रदेशाची परिस्थिती वेगळी असते... नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहे... त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक आहेत.... *विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालेकिल्ला राहीलचं असं काही*.. -- मी राजकराणात अगदी नवा होतो.. त्यावेळी तालुका स्तरावर काम करायचो. तेव्हा काँग्रेसचा आय चे अनेक उमेदवारांना अपेक्षा नसताना यश मिळाल आहे... वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या जणांना यश दिले हा इतिहास आहे --प्रत्येक जण आप आपल्या परीने काम करत आहे.... गडकरी, फडणवीस इथे काम करताय.. त्यांच्या कार्य कर्त्यांच्या अपेक्षा आहे.. आमच्याही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहे.... आम्ही समन्वयाने सोडवू --
2
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 18, 2025 15:07:00
Nala Sopara, Maharashtra: Date-18sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA CCTV Feed send by 2c Type - AV Slug- नालासोपाऱ्यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद भिंत कोसळल्याने पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान अँकर - नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसरात बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. पूजा पॅलेस या इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भिंतीला लागून पार्क केलेल्या अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून असून त्यात भिंत काही क्षणातच कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. या इमारतीच्या आसपास नेहमीच लहान मुले खेळत असतात. मात्र भिंत कोसळली तेव्हा मुले जवळ नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेबाबत सुरक्षा दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे ...
2
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 15:00:22
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- भरत कराड आत्महत्या प्रकरण...भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली कराड कुटुंबीयांची भेट.... पंकजा मुंडे यांच्या हस्तक्षेपानंतर गावकर्याचे उपोषण मागे.... AC :: - ओबीसी आरक्षण संपेल या भीतीतून भरत कराड यांनी दहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर वांगदरी ग्रामस्थांनी न्याय आणि मदतीच्या मागणीसाठी सुरू केलेले साखळी उपोषण आज अखेर स्थगित झाले आहे. अचानक वांगदरीत दाखल झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कराड कुटुंबीयांना भेटून काळजी करू नका, मी पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी दिला. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 14:20:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - स्पेशल 26 चा कारनामा करणारी तोतया आयकर टोळी अखेर गजाआड.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये स्पेशल 26 चा कारनामा करणारी तोतया आयकर टोळी 48 तासात सांगली पोलिसांनी गजाआड केली आहे.एका महिलेस आहात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटीतील 15 लाख रोकड आणि 410 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1 कोटी 20 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.3 दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ मधील डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकण्यात आला. त्यानंतर कोट्यावधींचे सोन्याच्या दागिन्यांचा रोकड लंपास करण्यात आली होती,या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती,या प्रकरणी सांगली पोलीसांनी गतीने तपास करत तोतया आयकर टोळीचा छडा लावत, सात जणांचा पर्दाफाश केला असून बोगस आयकर छापा टाकणारे सर्वजण उच्चशिक्षित असल्याचा पोलीस तपासात समोर आले आहे. बाईट - संदीप घुगे - पोलीस अधीक्षक - सांगली.
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 14:18:33
kolhapur, Maharashtra:Ngp OBC Bhujbal Melava live u ने फीड मिळेल -------* नागपूर -- समता परिषदेच्या कार्यकर्ता संवाद बैठकीला सुरवात झालीय.. --- छगन भुजबळ करणार मार्गदर्शन.. समता परिषदेच्या वतीने नागपूरच्या महात्मा फुले सभागृहात या ओबीसी मेळाव्याचे आयोजन --- राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे असणार लक---------- नागपूर - (अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,कार्यकर्ता संवाद बैठक) छगन भुजबळ,भाषण - - जेव्हापासून हा जीआर लागू झाला आणि त्याचे अर्थ स्पष्ट झाला - माता,भगिनी,मुलांच्या भविष्याला धक्का लागत आहे - आमच्या 7-8 लोकांनी चिट्ठी लिहून जीवन संपवले - या लोकांनी आत्महत्या करून बलिदान दिले - आपण आहे त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिट उभे राहावे (श्रद्धांजली अर्पण करण्यात आली) - माध्यमांना विशेष सांगायचे आहे की हायकोर्टाने मराठा आरक्षण विरुद्धची तक्रार फेटाळली आणि मराठा समाजाचा विजय झाला अश्या बातम्या येत आहेत - हा जीआर निघाल्यावर अनेकांनी हायकोर्टाकडे धाव घेतली - त्यातील काही लोकांनी PIL केलं - आम्ही त्यांना सांगितले की हे चुकीचे होईल - आम्ही त्यावर चारचा करत आहेत - आम्हाला PIL नाही करायचे,रिट करायचे आहे - कोर्टाने सांगितले की pil नाही,तुम्ही रिट करा - आतापर्यंत आम्ही विविध समाजाच्या माध्यमातून रिट याचिका केल्या आहेत - अतिशय काळजीपूर्वक रिट याचिका केल्या आहेत - चांगले वकील नेमलेले आहेत - मला खात्री आहे,आमची मागणी आहे की हा जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा - मंडल आयोगाच्या पूर्वी विविध राज्यांनी आपापल्या परीने विविध समाजाला आरक्षण दिले - देशात हजारो जाती आहेत,अपलीकडे 374 जाती आहेत - हा स्वातंत्र्यापासूनचा लढा आहे - मंडल आयोगाचा अहवाल आला,दहा वर्षे तो भारत सरकारकडून दाबण्यात आला - हा रिपोर्ट कमिशनच्या मान्य करत व्हीपी सिंग यांनी मान्य केला - त्यावेळी मी त्यांचे स्वागत केलं - त्यावेळी मी महापौर होतो - बाळासाहेब ठाकरे यांच म्हणणे होते की आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे - आरक्षण हे आर्थिक नाही तर सामाजिक निकशावर देण्यात आले - पाच हजार वर्षांपासून जे समाज मागासलेले आहेत त्यांना अरक्षणनाची गरज आहे - आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही - आजही झोपडपट्टी मध्ये दलित समाजच राहतो - मात्र समज करून दिला आहे की आरक्षणामुळे समाज पुढे गेला - गरिबी सगळीकडे आहे,पण गरिबी हटवण्यासाठी सरकार वेगवेगळे कार्यक्रम घेते - हे आरक्षण जाहीर झाल्यावर कोर्टात गेलं,सुप्रीम कोर्टाने 27 टक्के आरक्षण द्या सांगितले - ओबीसी ही जात नाही,जातीचा समूह आहे,मराठा एक जात आहे,ओबीसी मध्ये 374 जाती आहे म्हणून आम्ही म्हणतो जातीय जनगणना करा - जनगणना आयुक्त असतो,त्यांना खोटे सांगितले तर शिक्षा होते - मी अभिनंदन करतो की यावेळी जात जनगणना करणार आहे - हा केवळ डेटा नाही तर यामुळे ओबीसींना लोकसंख्येनुसार निधी मिळेल - काँग्रेस फुटली,त्यावेळी मी पवार साहेबांसोबत राहिलो - तायवाडे साहेब सुद्धा मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते - त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला - माझ्याकडे आले तेंव्हा राजीनामा देऊ नको असे सांगितले होते - शेवटपर्यंत लढले पाहिजे - मग त्या दुसऱ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितले - *सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नाही असे म्हटले* - *राजकीय दबावामुळे हे आरक्षण मिळता कामा नये असाही सुप्रीम कोर्टाने म्हटले* - *खोटी जात प्रमाणपत्र दिली जात आहे,त्याची चौकाशी करा आणि रद्द करा* - मोदी साहेबांनी एडब्ल्यूएस आरक्षण दिले - जे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्यात आले - एडब्ल्यूएस मध्ये 8 टक्के मराठा समाज आहे - 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलित आणि 7 टक्के आदिवासी,3 टक्के ब्राम्हण - मग आता किती राहिले? - *ते सांगतात आम्ही एवढे तेवढे,मग होऊ द्या जात जनगणना* - आमचे सुद्धा खूप आमदार मंत्री आहेत पण ते बोलत नाही असे म्हणतात - *आम्हाला ओपन मधून लढावे लागते,मराठा समाजाची मतं लागतात म्हणून आम्ही बोलत नाही* - कोणीतरी शाहण्या माणसाने सांगावे की फायदा कशात आहे - ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह,स्कॉलरशिप मिळत नाही,त्यांना मिळते - त्यांना देता तर आम्हाला पाहिजे उलटी मागणी आहे - आमचीही समिती करा - *समिती सुरू झाली,2 बैठक झाल्या,आता मोकळेपणाने बोलतो* - पवार साहेब यापूर्वी बोलले,आजही बोलले,त्यांनी आमहाला आरक्षण दिले,मी आभारी आहे - पण ते बोलतात ओबीसी समितीत एकाच जातीचे लोक आहेत - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळे मराठा समाजाचे नेते होते त्यावेळी का नाही म्हटले - 3 वर्षात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 25 हजार कोटी दिले - त्यांना आणखी द्या आमचे काहीच म्हणणे नाही - ओबीसी महामंडळाला 500 कोटी - हा भेदभाव का? - *जरांगे जेंव्हा 2 वर्षांपूर्वी उपोषण करत होते,त्यापूर्वी त्याने 25 वेळा उपोषण केलं त्यावेळी कोणी विचारले नाही - उपोषण सुरू असताना महिला बसल्या होत्या,महिला पोलीस आल्या होत्या - *रात्रीची मिटिंग झाली त्यात पवार साहेबांचे आमदार होते* - त्यांनी सांगितले त्यानुसार गच्चीवरून दगडांचा मारा सुरू झाला - महिला पोलिसांना त्रास झाला,84 पोलीस रुग्णालयात गेले - हे झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला,त्यात अनेकांना लागले - *पण पवार साहेबांना लाठीचार्ज झाल्याची वस्तुस्थिती माहिती होती* - *तरीही पवार आणि उद्धव ठाकरे तिथे गेले* - पण त्या स्थानिक आमदारांना घरी बसवण्याचे काम आपल्या ओबीसिंनी केलं - *पवार साहेब म्हणतात सर्वांनी एकत्र बसावे,मी यापूर्वी पवार साहेबांच्या घरी गेलो होतो,मात्र ते बैठकीत आले नाही,आता म्हणतात भुजबळ आणि इतरांनी एकत्र बसून चर्चा करावी* - कुणबी वेगळे,मराठा वेगळे - *मला जीआर कुणी दाखवला नाही,संध्याकाळी जीआर घेऊन गेले* - *शिंदे समितीने अहवाल सादर केला,तो मंत्रिमंडळाने मान्य केला तर मग हैद्राबाद गॅझेट कशाला* - ज्यांच्या नोंदी झाल्या नाहीं त्यांना कुणबी प्रमाणपत्र राबवण्यासाठी - चंद्रपूर किंवा नागपूरचा नातेवाईक असेल तो जातप्रमानपत्र देईल - जरांगेने पात्र शब्द काढून टाकण्याची मागणी केली,मंत्र्यांनी एका तासात काढून टाकला - मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत - आम्ही कोर्टात जाणार आणि लढणार - *हे खोडतोड केलेलं बोगस प्रमाणपत्र आहेत*(प्रमाणपत्र दखवले) - खोटी सर्टिफिकेट शोधण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली - जीआर मंत्रिमंडळासमोर ठेवला नाही,एका तासांत बदलला - शिंदे समितीने 2 लाख 41 हजार प्रमाणपत्र दिले,आता त्यांचे काय काम आहे - - *शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र घेणे हे कायद्याने कुठेही मान्य नाही* - ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही? धक्का लागेल - माझं मंत्री आणि सगळ्या पक्षालासुद्धा म्हणणे आहे की मतासाठी घाबरता - *निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो,जो जो जारांगेला समर्थन करेल त्यांना निवडणुकीत धडा शिकवा* - यावेळी माझे मतं कमी झाले,कारण एका बाजूला ओबीसी,दलित,मुस्लिम,मारवाडी,गुजराती तर दुसरीकडे मराठा - आपण सगळे ओबीसी आहोत - सगळ्या पक्षांना सुद्धा सांगायचे आहे,तिकडे जाऊन आमदार खासदार पाया पडत असाल तर आम्हीही तयार आहो - *मंत्रिमंडळात एकमेव आशेचा किरण देवेंद्र फडणवीस आहे,त्यांनी समिती दिली, समाजाला निधी दिला,देवेंद्र साहेब सांगतात ओबीसी DNA आहे,जेंव्हा ओबीसन्न सांभाळता तेंव्हा इतर सांभाळा,तुम्ही मासिहा व्हाल* - एकजूट कायम ठेवा,काहीजण मोर्चे काढताहेत, त्याला विरोध नाही -
3
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 18, 2025 14:02:57
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या गाऊन मार्केटमध्ये चोराला रंगेहाथ पकडलं ! हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Ulh theft arrest Anchor  उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात दोन चोरट्यांनी टेम्पोमधील पार्सल गाऊन चोरी केल्याची धक्कादायक घटना घडलीय,यावेळी नागरिकांनी चोरांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय, Vo  रवी आरकेरे आणि विष्णू इंगळे अस अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत,दोन्हीही आरोपी अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं बोललं जातय, बुधवारी सायंकाळी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात सुरेश शर्मा यांच्या टेम्पो मध्ये गाऊन नाईटी कापड जय काली गणपती मंदिर जवळ उभा असताना आरोपी यांनी संगनमत करून टेम्पो मधील गाऊन उचलून जात असताना नागरिकांनी रंगेहाथ पकडल,यावेळी त्यांची विचारपूस केली असल्याचं समजताच चोरीचा माल असल्याचं निदर्शनास आलं, तात्काळ हिललाईन पोलिसांना बोलावून चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय, आता ह्या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 18, 2025 13:45:17
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 13:18:46
6
comment0
Report
Advertisement
Back to top