Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

राजभवनात शेतकऱ्यांच्या जमिनींचा संघर्ष: राज्यपालांची महत्त्वाची बैठक!

KJKunal Jamdade
Jul 17, 2025 07:03:16
Shirdi, Maharashtra
Anc - शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी परत मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आज मुंबईतील राजभवनात एक महत्त्वाचे वळण घेतले. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शेतकरी नेते ॲड. अजित काळे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आकारी पडित जमिनीच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा केली. V/O - राज्यपालांसोबत झालेल्या बैठकी वेळी गेली अनेक दशके श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील आकारी पडीत शेतकरी आणि पद्मश्री स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी या जमिनींसाठी दिलेला प्रदीर्घ लढा आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊनही देखील जमीन वाटपास अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही त्या पार्ष्वभुमीवर राज्यपालांसमोर कायद्याचा विषय मांडण्यात आला. यावेळी राज्यपालांनी सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याच मत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी व्यक्त केलंय.. Bite - ॲड. अजित काळे, राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top