Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

मुंबई उच्च न्यायालयाने 300 कनिष्ठ महाविद्यालयांची धक्कादायक स्थिती उघडकीस आणली!

AKAMAR KANE
Jul 16, 2025 03:31:43
kolhapur, Maharashtra
उच्च न्यायालयाचे संग्रहित शॉट जोडले आहे ---- राज्यातील 300 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही मात्र महाविद्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन तिजोरीतून कोट्यावधी रुपये जात असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेय.. एका बातमीचा दाखला देत न्यायालयाने ही याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेय. राज्यातील 300 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकही विद्यार्थी नाही.. मात्र या विद्यार्थ्यांचे अनुदानाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये नियमितपणे दिले जात आहे. हा धक्कादायक प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे. यामधून शैक्षणिक संस्थानांमधील व्यवस्थापनाची दुर्दशा समोर आली आहे असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. अशा महाविद्यालयांच्या स्थितीबाबत तसेच राज्य शासन याबाबत काय उपाययोजना करू शकते याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे
6
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top