Back
गोंदियाच्या विमानसेवेतील मोठा बदल: फक्त 3 दिवस उपलब्ध!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 3006_GON_AIRPORT
FILE - 2 VIDEO
आता गोंदिया ते हैदराबाद विमान सेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस उपलब्ध असेल..येत्या २ जुलैपासून होणार सुरू...
मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ला असणारा विमान सेवा..
वेळेत मात्र बदल नाही...
Anchor:- गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे. २ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमान सेवा आठवड्यातून फक्त ३ दिवस धावतील. गोंदिया विमानतळ एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. विमानतळ संचालक गिरीश चंद वर्मा यांनी सांगितले की हा निर्णय इंडिगो ने घेतला असल्याचे सांगण्यात आले. इंडिगोच्या बिरसी विमानतळाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, इंडिगोची हैदराबादला जाणारी दैनंदिन विमानसेवा आता 2 जुलैपासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू होईल. विमानाच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3006ZT_WSM_RAIN_30JUN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.काल दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी बरसत होत्या.मात्र आज दुपारीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील उरलेली पेरणी खोळंबली आहे.शेतकऱ्यांना योग्य हवामानाची प्रतीक्षा असून, पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत. जमिनीची ओल वाढल्याने यंत्रसाधनांद्वारे पेरणी करणे कठीण झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पेरणीचे काम प्रलंबित आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - वहिवाटाच्या वादातून कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क टेम्पोत बसून,पाच दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण..
अँकर - सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाकडून चक्क टेम्पोमध्ये बसून गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथील जाधव कुटुंबाकडुन हे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.गावातल्या काही पक्षपाती लोकांच्याकडून घरासमोर तारेचे कंपाउंड घालण्यात आला आहे, त्यामुळे कुटुंबाला ये-जा करण्याची रस्ता बंद झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तारेचे कंपाउंड काढून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी जाधव कुटुंबाकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या टेम्पोमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केले आहे.
बाईट - संदेश जाधव - आंदोलक,जुळेवाडी.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME |3006ZT_JALNA_BUS_START(2 FILES)
जालना | मनसेनं आंदोलनाचा ईशारा देताच 8 वर्षांपासून बंद झालेली बससेवा झाली सुरु,रस्ता खराब असल्यानं बंद होती बस
अँकर | जालन्यातील नांदखेडा,किन्ही 8 वर्षांपासून बंद झालेली बससेवा पुन्हा मनसेच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे सुरू करण्यात आलीय.8 वर्षांपुर्वी किन्ही,नांदेखेडा गावामध्ये जाणारी बससेवा खराब रस्त्याअभावी बंद करण्यात आली होती.आता खराब झालेला रस्ता दुरुस्ती होऊनही बस सेवा बंद असल्यानं मनसेच्या वतीनं जाफ्राबाद परिवहन आगार प्रमुखांना आंदोलनाचा ईशारा दिला होता.त्यामुळे अखेर ही बससेवा सुरु करण्यात आल्यानं ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जातोय.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _
डहाणू तालुक्यातील गांगोडी कुंडपाडा या आदिवासी वस्तीतील विद्यार्थ्यां तसेच ग्रामस्थ पावसाळ्यात या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करीत असल्याचं भयाण वास्तव समोर आलय. कुंडपाडा येथे सुमारे १०० ते १५० घरांची लोकसंख्या असून बहुतांश नागरिक हे शेतमजुरी आहेत. येथील विद्यार्थ्यांना जवळील सायवन गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी गावातून रस्ता आहे. मात्र तो रस्ता एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावा लागत असल्याने सर्वजण याच मार्गाचा वापर करतात. उन्हाळ्यात नदी च पात्र खाली असल्याने काही अडचण येत नाही. मात्र पावसाळ्यात चार महिने या पाड्यातील सर्व जण याच जीव घेण्या रस्त्याचा वापर करत असतात.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3006ZT_JALNA_MORCHA(9 FILES)
जालना | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर ख्रिश्चन समाजाचा भव्य मोर्चा
ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा
अँकर |ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय.या मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजाचे लोक सहभागी झालेत.शहरातील महात्मा गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला.काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूंचा कोणताही संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत बक्षीस देण्याची भाषा केल्यानं पडळकर यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी केली.
बाईट : रेवयांग भालेराव,ख्रिश्चन धर्मगुरू(व्हाईट शर्ट असलेले)
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन..
अँकर - सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.शिराळा ते आष्टा राज्य
महामार्गाचे काम सध्या सुरू आहे,मात्र सुरू असलेले काम निकृष्ट पद्धतीचे सुरू असून रस्त्याच्या दूतर्फी असणारी झाडे देखील बेकायदेशीररित्या ठेकेदाराकडून तोडण्यात येत असल्याचा आरोप करत ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध
ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे,त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक सेवा देखील एसटी आगाराकडून बंद करण्यात आली आहे,त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,असा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात आला असून तातडीने राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन येथील,असा इशारा देण्यात आला आहे.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_TADOBA_LAST
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोअर भागातील सफारी पर्यटन आज होणार बंद ,एक जुलैपासून तीन महिने पावसाळ्याच्या काळात कोर भागातील पर्यटनावर असते बंदी
अँकर:-- चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोअर भागातील सफारी पर्यटन आज बंद होणार आहे. एक जुलैपासून तीन महिने पावसाळ्याच्या काळात कोर भागातील पर्यटनावर बंदी असते. गेल्या वर्षभरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण 4 लाख 6 हजार पर्यटकांनी भेट देत इथले वने आणि वन्यजीव वैविध्य अनुभवले. आता एक ऑक्टोबर 2025 रोजी कोर भागातील पर्यटन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 14 कोटी 20 लाख महसूल पर्यटनाच्या माध्यमातून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन कडे जमा झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अरुंद , निसरडे कच्चे रस्ते असलेल्या कोअर भागात अपघातांची शक्यता वाढते. याशिवाय ताडोबातील वन्यजीवांचा हा प्रजननाचा काळ मानला जातो आणि त्यामुळेच या भागातील पर्यटन बंद असते. असे असले तरी बफर क्षेत्रामधील पर्यटन मात्र सुरू राहणार आहे. आगरझरी, देवाडा ,जुनोना , कोलारा, बेलारा आणि अलिझंजा यासह नवेगाव या बफर क्षेत्रातील गेटवर वन्यजीव प्रेमींना सफारीचा आनंद घेता येणार आहे.
बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Naneghat Paddy Plants
File'02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पाऊस सुरू झालाय मात्र अद्यापही जुन्नर च्या पश्चिम आदिवासी भागात पाहिजे तसा पाऊस नसल्याने आदिवासी शेतकऱ्यांची भात शेतीची कामे रखडलीय सध्या या परिसरात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे तेव्हाच शेतकऱ्यांना भात रोपांची लागवड करता येणार आहे याचाच शेत शिवारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मिरजेत पेटबुल जातीच्या श्वानाचा बैलावर हल्ला,भर रस्त्यात बैलाच्या तोंडांचे तोडला लचका..
अँकर - सांगलीच्या मिरजेत एका पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला करत बैलाच्या तोंडाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.बैलगाडीला बांधलेला बैलावर हल्ला चढवत पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला चढवला आणि त्यानंतर अक्षरशः बैलाच्या तोंडाचे लचके तोडत त्याच्या मानेचा देखील चावा घेतला, कुत्र्याच्या तावडीतून बैलाला वाचवण्यासाठी यावेळी नागरिकांकडून प्रयत्न प्रयत्न करत बैलाची सुटका केली,त्यानंतर महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून कुत्र्याला ताब्यात घेण्यात आलाय,सदर घटनेमध्ये बैल गंभीर जखमी झाला आहे, दरम्यान प्रकरणी बैलाच्या मालकाने कुत्र्याच्या मालका विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
0
Share
Report
Rajapur, Maharashtra:
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील सागवे गावात ब्लॅक पॅंथरचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. घरातील अंगणात वावरत असणाऱ्या एका कुत्र्याची शिकार ब्लॅक पॅंथरने केली आहे. सर्व घटना घराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पँथरन कुत्र्याची शिकार केलीय.
0
Share
Report