Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

बच्चू कडू म्हणतात, 'आम्हाला गुन्ह्याची भीती नाही!'

ADANIRUDHA DAWALE
Jul 16, 2025 04:03:16
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_KADU_BYTE तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 जाणीवपूर्वक दबाव तंत्र वापरून गुन्हे दाखल केले आहे, आम्हाला त्याची भीती नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया अँकर :– बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढली होती या पदयात्रेचा समारोप नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भव्य सभा घेत केला. बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून धरल्याने महागाव पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावर बच्चू कडू यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला. तिथली परिस्थिती न पाहता गुन्हा दाखल करून आमच्यावर दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जिथे आम्ही सभा घेण्याचे ठरवले होते तिथे सभा घेणे शक्य नव्हतं तेथे वाईट घटना होण्याची शक्यता होती आणि म्हणून लोकांनी रस्त्यावर स्टेज केला. तिथे सभा घेतली असती तर वेगळ्याच प्रकारचा एखादी घटना घडली असती हे पोलिसांनी समजून न घेता जाणीवपूर्वक पूर्वक दबाव तंत्र वापरून केलेला गुन्हा आहे आम्हाला त्याची भीती नाही असे बच्चू कडू म्हणाले आहे. दरम्यान त्याच दिवशी राज्यपाल हरिभाऊ बागडे येऊन गेले तेव्हा चार रस्ते ब्लॉक केले. आणि चार रस्ते ब्लॉग केल्यावर लोकांचं शेतात जाणे सुद्धा बंद झाले. नेता आला तर त्याला वेगळा कायदा आमच्यासाठी वेगळे कायदे आहे याचा अर्थ हे कायद्याचं राज्य असं होत नाही. आता सर्व धर्मीय सर्व जातीय व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरले पाहिजे, हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांच कसं होईल हा प्रयत्न आहे त्यामुळे 24 तारखेला रस्त्यावर उतरून चक्काजाम होईल असे ही बच्चू कडू म्हणाले. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
12
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top