Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

ढाणकी के शिक्षक पर अल्पवयस्क से अत्याचार, गर्भपात और मौत; नागरिकों में आक्रोश

SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 08:51:29
Yavatmal, Maharashtra
AVB यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील शिक्षकी पेशातल्या नराधमाने शिकवणी वर्गातच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळी घेतला आहे. संदेश गुंडेकर असे या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक शिकवणी वर्गातच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता. यात तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकरने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, ज्या तिची प्रकृती बिघडली, तिला पुसद येथील रुग्णालयात नेले असता, अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थिनीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. खासगी शिक्षकाच्या विकृतीची विद्यार्थिनी शिकार ठरल्याने समाजमन्न सुन्न झाले आहे. संतप्त नागरिकांनी आज ढाणकी बंद ठेवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी व सदरचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी केली आहे. बाईट : नागरिक
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 10:34:16
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2309ZT_JALNA_BOMB_MARO(12 FILES) जालना | "ओला दुष्काळ जाहीर करा",अंबड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ढोल ताशांच्या गजरात बोंब मारो मोर्चा हातात आसूड घेऊन शेतकरी पोहचले तहसिल कार्यालयात. अँकर :जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं अंबड तहसिल कार्यालयावर 'बोंब मारो' मोर्चा काढण्यात आलाय.शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी.ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फिस माफ करावी.2018 साली मंजूर करण्यात आलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांचच्या खात्यात जमा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.ढोल ताशांच्या गजरात बोंब मारत तहसिल कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मोसंबीच्या फळांचा हार देखील गळ्यात घालून हे आंदोलन करण्यात आलं. बाईट - शरद सोळुंके, शेतकरी.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 10:23:02
Parbhani, Maharashtra:feed on office whatsapp अँकर - परभणी जिल्ह्यात अति मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पीक अक्षरशहा उद्ध्वस्त झाली आहेत, परभणी तालुक्यातील शिर्शी बुद्रुक येथील केदार कुंडलीक स्वप्ने या प्रयोगशील शेतकऱ्यांने 50 हजार रुपये खर्चून फुलकोबीचा प्लॉट पिकवला होता,भाव ही यंदा 60 रुपये किलो मिळत होता,कोबी तोडणीचा येताच मागील आठ दिवस धोधो पाऊस झाला आणि स्वप्ने यांच्या सर्व स्वप्न मातीमोल झाली आहेत, त्यामुळे अखेर शेतकर्यांनी हा प्लॉट उपटून टाकायला सुरुवात केली आहे. आता तरी मायबाप सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकयांमधून केली जात आहे.. बाईट- केदार स्वप्ने- शेतकरी बाईट- रमेश रायमाले- शेतकरी बाईट- आदिनाथ लवंदे- शेतकरी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 23, 2025 10:22:54
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 10:17:46
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 23, 2025 10:02:03
Thane, Maharashtra:Thane flash *मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे byte pointer* *ऑन संजय राऊत* - भांडुपचा भोंगा नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीतरी बरळला - महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा असतो - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला आमदार त्या मंत्रिमंडळात असला पाहिजे हा सर्वस्वी निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार घेत असतात - प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल भाई पटेल असतील हे सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणी त्या मंत्रिमंडळात जावं निर्णया घेत असतात - आपला पक्ष काँग्रेसच्या चरणी ज्यांनी गहाण ठेवल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिकवायची गरज नाही - दिल्लीला इंडिया आघाडीच्या बैठकीला ज्यावेळेस आपण जाता त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठे बसवलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे - त्यामुळे राष्ट्रवादीचे निर्णय हे सर्वच अजित दादा पवार साहेबच घेत असतात - शिवसेना उभाठा या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब राहिले की मलिकाजुन खर्गे साहेब राहिले हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या जनतेस आहे - राऊत साहेबांनी दसरा मेळावा कसा होईल गर्दी जमवण्यासाठी किती वेळा शिवतीर्थावर जावे लागते मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरेंना भडव्यांनी शिवसेनाप्रमुखांना घेरले म्हणून शिवसेना सोडावी लागली त्यांच्याकडेच तुम्हाला आता पक्ष उभारी आणण्यासाठी जावे लागते याचा आत्मचिंतन मननराव साहेबांनी केलं तर अधिक चांगलं होईल *ऑन महायुती धुसफूस प्रकरण* - तिने नेत्यांमध्ये उत्तम आणि चांगला संवाद आहे आणि त्याबाबत काळजी करायची काही गरज नाही *ऑन धनंजय मुंडे करुणा मुंडे* - त्यांच्या कौटुंबिक वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही *ऑन मराठवाडा पाहणी आरोप* - मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली ती इतिहासात देखील झाली नाही अशी झाली आहे - आजच्या बैठकीमध्ये अतिवृष्टी संदर्भात चर्चा होईल ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारच्या निवेदन तिथले स्थानिक आमदार करत आहेत - मंत्रिमंडळात ठोस असा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे - सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील उद्या स्वतः अजितदादा पवार साहेबांनी त्यांचे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते स्वतः जातायेत - जयकुमार गोरे साहेब सोलापूरला फिरत होते - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील धाराशिव मध्ये जातील - महायुतीचा सरकार शेतकऱ्यावर या कोसळलेल्या संकटात पूर्णपणे शेतकऱ्याबरोबर आहे *ऑन शेतकरी मदत* - मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीतरी चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल - महायुतीचा सरकार भक्कमपणे खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी आहे - जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला मिळावी हा महायुतीचा सरकारचा मानस आहे *ऑन मंत्री मेट्रोमध्ये व्यस्त सरकारच्या बांधांवर कोण जाणार* - अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी झाली - त्यांच्या मतदारसंघात होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोची चाचणी झाली - मंत्री आणि त्या विभागाचा आमदार आपण जर बघितला असेल त्यांनी त्या वेळेला 9 ते 14 मध्ये चे हाऊस बंद पाडायचा आंदोलन केलं होतं त्या वेळेचा फोटो त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिला - परिवहन मंत्री लवकरात लवकर कॅबिनेट बैठकीनंतर धाराशिवला पोहोचतील *ऑन ठाणे विक्री व बीड* - मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर लक्ष आहे - राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कायम जनतेमध्ये फिरणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे - डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी त्यांची प्रतिमा आहे त्यांना संजय राऊत यांच्या सल्ल्याची गरज नाही *ऑन पंतप्रधान पूरग्रस्त मदत* - एनडीआरएफ चे जे निकष आहेत ते संपूर्ण देशांमध्ये एकच आहे - पंजाबला वेगळे महाराष्ट्राला वेगळे गुजरातला वेगळे असं होत नाही - एनआरएफची केंद्रातून येणारी मदत सर्व राज्यांना समान निकषा पुढे मिळत असते - महाराष्ट्र सरकार सक्षम आहे महाराष्ट्रातील बळीराजाला मदत देण्यासाठी *ऑन पुणे राष्ट्रवादी गायकवाड पवार कुटुंब बॅनर* - असं आहे की कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केली. काय बॅनर लागला पुण्यामध्ये ते मला माहित नाही. - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्रातील एनडीए सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे. - महाराष्ट्र मध्ये महायुतीमध्ये आम्ही एक घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये आम्ही सामील झाले आहोत. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमची स्वतंत्र भूमिका आहे. ही भूमिका अशीच राहील.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:39:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_PLASTIC_ACTION ( single file sent on 2C)   टायटल:---- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची विविध ठिकाणी धाड,  प्लास्टिक साठ्यावर केली कारवाई, गोल बाजार आणि बिनबा गेटसह विविध ठिकाणी 425 किलो प्लास्टिक जप्त, 15 हजारांचा दंड केला वसूल. अँकर: चंद्रपूर शहरातील गोल बाजार भागातील चांदा प्लास्टिक या दुकानावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने धाड टाकून तब्बल 150 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे, बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामातून 125 किलो प्लास्टिक जप्त करून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, राजनूर सेलिब्रेशनजवळील एका दुकानातूनही 150 किलो प्लास्टिक जप्त करून आणखी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या तिन्ही कारवाईत एकूण 425 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून मनपाने एकूण 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नागरी प्रशासनाने इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा आढळल्यास अधिक कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांना पर्यावरणपूरक दृष्टीने कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. बाईट 1) डॉ.अमोल शेळके, विभाग प्रमुख, स्वच्छता विभाग, महानगरपालिका चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 09:18:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn cotton farm wkt Feed by live u , शाम काकडे, मुलगा, मोतीराम काकडे वडील, मनीषा काकडे श्याम ची पत्नी ( यात ही महिला अत्यंत वेदनादायी बोलली आहे आम्ही पिकवला नाही तर खाणार काय किमान याचा तरी विचार करावा या अशयाने आहे पूर्ण वापरा वेगळी वेदनादायी स्टोरी पण लिहता येईल ) पैठण मध्ये अतुवृष्टीने बागा तर उध्वस्त झाल्या पण शेतकऱ्यांचा नगदी पीक म्हणजे कापूस तो ही या अतिवृष्टीत पूर्णतः उद्ध्वस्त झाला,  संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील हर्षी गावचे काकडे कुटुंबीय त्यांची चार एकर शेती करतात दोन एकरात कपाशी लावली दोन एकरात ऊस लावला मात्र पाण्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं आता यातूना काहीही मिळणार नाही अशी परिस्थिती , घरचे ज्येष्ठ तर इतकं नुकसान कधी पाहिलाच नाही असं सांगताय तर या घरातील महिलेने मांडेलेल दुःख सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहे या  परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 23, 2025 09:17:23
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय. गोदावरी धोक्याच्या पातळीने वाहत असून ओढ्याला आलेल्या पुराचा दोन गावांना वेढा पडलाय, सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव आणि लासीना अशी या गावांची नावे आहेत. सोनपेठ नगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी गावात दाखल झाली असून सुरक्षेचा उपाय म्हणून येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. आत्तापर्यंत थडी पिंपळगाव येथील सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून दिली आहे.तहसीलदार सुनील कावरखे पहाटेपासून गोदाकाठच्या गावात तळ ठोकुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 09:16:52
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2309ZT_CHP_KADU_PROTEST ( single file sent on 2C)  टायटल:-- माजी राज्यमंत्री आणि प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू चक्काजाम आंदोलनात सामील, बच्चू कडू यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे मांडला ठिय्या अँकर:-- माजी राज्यमंत्री आणि प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः चक्काजाम आंदोलनात सामील झाले आहेत. बच्चू कडू यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे ठिय्या मांडला. प्रचंड उकाडा आणि उन्हात आंदोलकांचा दीड तासांपासून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ठिय्यासुरू आहे. आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तासापासून पूर्णपणे ठप्प आहे. बच्चू कडू यांनी मागण्या मान्य होत पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय.  कडू यांच्या मते विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून धान ,सोयाबीन आणि कापूस पीक पूर्ण उध्वस्त झाले आहे. आणि जे पीक हाती आलय त्याला देखील भाव नाही।  पालकमंत्री उईके अजून कोणाच्याही नुकसानग्रस्त शेतात गेलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी अजून आढावा बैठक देखील घेतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी आणि हमीभाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असेच आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. बाईट १) बच्चू कडू, माजी आमदार आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 09:16:33
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_MOTI_DAM(12 FILES) जालना : मुसळधार पावसामुळे शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो; रस्ते जलमय,वाहनधारक त्रस्त सांडव्याचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान अँकर :जालना शहरात मध्यरात्री तीन ते चार तास मुसळधार पावसाने थैमान घातलय. या पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांचे मोठ नुकसान झाल असून, घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोक त्रस्त झाले आहेत. शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर वाहत जात नागरीकांच्या घरात शिरलं आहे. मात्र पाण्याचा प्रवाह वेगळ्या मार्गाने गेल्याने छत्रपती संभाजीने चौफुली परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला तलावाचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बारवाले कॉलेजसमोरील भागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.दरम्यान जालना शहरातील मोती तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत हा तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे सांडव्याच्या पाण्याचा दाब वाढून परिसरातील अनेक भाग जलमय झाला आहे.भवानीनगर, ख्वाजानगर परिसरात तलावाचे पाणी उलटल्याने घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. बाईट :नागरीक
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 09:15:40
Washim, Maharashtra:वाशिम: File:2309ZT_WSM_MNS_AGRI_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतीपिकांच प्रचंड नुकसान झाल्याने वाशिम जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल आहे.यात शेतकऱ्यांचे मुख्य सोयाबीन पिकांसह तूर उडीद,मूग कपाशी असलेल्या सोयाबीन पाण्यात गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी.या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top