Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जायकवाडी धरणात ७७.१७% पाणीसाठा, पाण्याची सोडणी सुरू!

VKVISHAL KAROLE
Jul 17, 2025 02:33:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi av Feed attached पैठण येथील जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामासाठी उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेक बुधवारी  पाणी सोडण्यात आले.. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात यावर्षी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे सिंचनासाठी धरणाच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याची मागणी विविध आमदारांनी केली होती. त्यानंतर मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यात सायंकाळी पाच वाजता १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले.  या पाण्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांमधील जवळपास २ लाख ४० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे तज्ञ सांगताय...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top