Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड के विष्णुपुरी प्रकल्प से 12 दरवाजे खुले, गोदावरी में बाढ़!

SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 07:04:47
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेड शहराजवळील विष्णुपूरी प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूसही मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख 13 हजार क्यूसेक प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ------------
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 15, 2025 08:45:59
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_CHILD_STORY सातारा साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसावणार आहेत.मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे .कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला. बाईट:विकास खाकुर्डिया (वडील) बाईट: काजल खाकुर्डिया (बाळांची आई)
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 08:35:59
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_BAD_ROAD_CONDITIONS रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशीमच्या तामसी ते वाकद या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मार्गावरून शेतकरी आपला माल विक्रीसाठी नेत असताना खड्ड्यांमुळे वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत.आज तर मालवाहतूक करणारे एक वाहन रस्त्यातील खड्ड्यात फसले. ते बाहेर काढण्यासाठी दोन ट्रॅक्टरचा वापर करावा लागला.हा मार्ग वाशिमला शिरपूर जैनशी जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवासी वाहतुकीचेही मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. मात्र रस्त्याच्या खराब स्थितीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.फक्त शेतकरीच नव्हे, तर या परिसरातील पाच ते सहा गावांतील नागरिकही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या अडचणीत आहेत.स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 08:34:13
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_LEOPARD_CUBS ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरामध्ये झाडावर आढळली बिबट्याची 2 पिले, नागरिकांत दहशत     अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रोज संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रविवारी एक अनपेक्षित आणि धक्कादायक दृश्य बघायला मिळालं. सायंकाळी सुमारे ७ वाजता, एका झाडावर दोन बिबट्याची पिले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिक आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे मैदानात फेरफटका मारत असताना, अचानक काही जणांच्या नजरेस झाडावर हालचाल जाणवली. निरीक्षण केल्यावर बिबट्याचे पिल्ले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही जणांनी वनविभागाला माहिती दिली. बिबट्याची पिल्लं जरी लहान असली, तरी त्यांची आई आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 08:21:24
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिमूसळधार पाऊस होत असल्याने यापूर्वीच निम्मे पीक खराब झाली होती,आता हाता तोंडाशी आलेली सोयाबीन,उडीद,मूग,कापूस ही पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अति मुसळधार पाऊस होत आसल्याने पावसाचे पाणी शेतांमध्ये साचत असून पाऊस इतका जोराचा होऊ लागलाय की अक्षरशःहा पिकांना पान सुद्धा राहत नाहीयेत. वसमत तालुक्यातील आरळ,बोरी सावंत,माटेगाव हाता तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे भिजून नष्ट झाली आहेत. आज घडीला या शेतात गुडघाभर पाणी असून अतिमूसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा आणि पाणी तुटून पडली आहेत, सोयाबीनच्या केवळ काड्या उभ्या दिसत आहेत,यामुळे शेतकऱ्यांचा सर्व खरीप हंगामा वाया गेल्याने आता शेतकऱ्यांनी देणं घेणं,व्यवहार कसे करायचे याचा प्रश्न त्यांच्या समोर आव वासून उभा ठाकलाय, त्यामुळे आता मायबाप सरकारकडे कागदी ग्जोडे न नाचवत प्रत्यक्ष मदत करण्याची मागणी सरकारकडून केली जात आहे... बाईट- शिवाजी गोरे- शेतकरी बाईट- प्रभाकर कातोरे- शेतकरी
2
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 08:15:52
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- ग्रामपंचायत मधून नाहरकत ( NOC ) दाखले देण्यास दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामपंचायतींवर कारवाई होणार... मंत्री योगेश कदम यांचा ईशारा... गृह राज्य मंत्री योगेश कदम आहेत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर या दौऱ्यात सावंतवाडी मतदार संघात घेतला आढावा... या आढावा बैठकीत ग्रामपंचायत मधून नाहरकत दाखले मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.. यावर आक्रमक होत येत्या 15 दिवसात नाहरकत दाखले द्या अन्यथा दिरंगाईच नेमक कारण द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला सज्जड दम... पालकमंत्री नितेश राणे यांच्या नंतर योगेश कदम देखील आक्रमक झाल्याने अधिकारी वर्गात खळबळ...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 15, 2025 08:15:41
kolhapur, Maharashtra:Ngp Shelar Ganpati Ngp Shelar Ganpati byte live u ने फीड पाठवले -------------- राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि आशिष जयस्वाल यांनी आज यांनी नागपुरात मस्क-या गणपतीचे दर्शन घेतले... या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून यावेळी शेलार यांनी घोषित केले... दरम्यान यावेळी आशिष शेलार आणि अशी जयस्वाल यांनी मस्कऱ्या गणरायाची आरती केली... ---------- बाईट --- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री (पॉईंटर ) नागपुर आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री) (On मस्कऱ्या गणपती दर्शन आणि भोसले भेट ) महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले.. यावर्षी देशात आणि परदेशात देखील गणेश उत्सव साजरे करण्यात आले.. मुधोजी राजे भोसले आणि मुंबईत भेट झाली..तेव्हा 238 वर्षाची परंपरा असलेला मस्कऱ्या गणपती जो नवसाला पावणारा आहे..त्या चरणी नतमस्तक व्हायला या असे म्हटले होते म्हणून मी आज आलो... (आशिष शेलार आणि आशिष जयस्वाल संघ मुख्यालय भेट ) दोन्ही आशिष ना संघाचा आशिष आहे.. तोच दृढ आहे एवढंच या भेटी मागील कारण.. (On संजय राऊत क्रिकेट मॅच टीका...) या दुर्दैवी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला..सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे.. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले..हे आपल्या तीनही सैन्यांचं शौर्य दाखवत.. जगभरातील एजन्सी आतंकवादी भारतातून पलायन झाले असा तर्क काढत होते.. त्यावेळी आपल्या सैन्याचा पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीतीमुळे आतंकवाद्यांना शोधून यम सदनात पाठवले.. हे सर्व शौर्य स्वाभिमानाने आपण जगासमोर केलेत.. कदाचित त्यामुळेच ऊबाठा गटाला पोटदुखी सुटली असेल.. *आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केल्यावर पाकिस्तानला जी पोटदुखी झाली तीच पोटदुखी संजय राऊत यना झाली आहे..* या पोट दुखीमुळे अतार्किक वक्तव्य उबाठा गट आणि संजय राऊत करत आहे.. पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे.. भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही.. ही भूमिका स्पष्ट आहे.. कालची मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत.. आंतरराष्ट्रीय सामने भारताने खेळू नये हे म्हणणारे संजय राऊत कोण..? ज्यांनी आपल्या परिवारातील लोक गमावले त्यांचा बदला घेण्याचं काम सरकार करत आहे.. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यावरून त्याची तुलना केली जात असेल तर संजय राऊत यांना माझं म्हणणं आहे.. पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे.. कदाचित उद्यापासून ते हे वाक्य वापरू शकतात.. की आजपासून महाराष्ट्रात आलेपाक खाऊ नका.. असं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत.. (On शरद पवार...) सामाजिक विंगवर शरद पवार बोलत असतील तर मला त्यांना सांगायचे की पुण्यात जाऊन तुम्ही हे वक्तव्य का केलं.. पुण्यात आता टिळकांची की फुलांची पगडी चालेल.. ही सामाजिक विन आणि तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायच.. आपल्या पक्षाकडून होणारे वक्तव्य कोणत्या ऐक्याचे वक्तव्य आहे.. म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये.. ओबीसींच किंचित न काढता मराठा समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही..ही सरकारची भूमिका आहे... (On evm ) पवार साहेबांचा पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर माझी पहिली मागणी आहे.. रोहित पवार, सुप्रिया सुळेचा राजीनामा घ्या त्यानंतर मतचोरीवर प्रश्न विचारा.. याच निवडणूक प्रक्रियेतून रोहित पवार ,सुप्रिया सुळे निवडून आले.. तर चांगलं आणि दुसरी निवडून आले तर मत चोरीचा प्रश्न विचारायच.. आपला तो बाबा आणि दुसऱ्यांचा काटा ही अशी भूमिका आहे.. On रामटेक -Film city सर्वाधिक शूटिंग आणि या शूटिंग सठी लागणारी सर्व यंत्रणा जास्तीत जास्त महाराष्ट्रात निर्माण कराव्यात ही सरकारची भूमिका आहे.. जगभरातून आणि देशभरातून या क्षेत्राचं केंद्र महाराष्ट्र बनाव.. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिशादर्शक मॅप बनवला आहे.. मुंबई प्रमाणे रामटेक येथे चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.... नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचा काम रामटेक सुरू होईल.. त्यानंतर विदर्भातील नागरिक ,विदर्भातील कलाकार आणि विदर्भातील तंत्रज्ञान यांचे रोजगारांचे केंद्र त्या ठिकाणी होणार अशी मी आज घोषणा करतोय.. On कबुतर खाना मंत्री लोढा हे बेकायदेशीर कृत्य करणार नाही.. आणि कायदेशीर कामाला कोणी विरोध करणार नाही..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 08:00:17
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_POTHOLES_1_2 ( 2 file sent on 2C)   टायटल :---- चंद्रपूर-नागपूर व हैद्राबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांना वाव, सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा  अँकर :  चंद्रपूर शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-हैद्राबाद महामार्गावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्ग शहरातून गेल्याने वाहतूक कोंडी व खड्ड्यांमुळे धुळकणजन्य प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे. पुढील सात दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आठव्या दिवसापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. बाईट १) अक्षय येरगुडे, शहर अध्यक्ष, जनविकास सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 07:51:03
Nashik, Maharashtra:Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* ... Anc: नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सगळ्या शेतकरी संघटना कांद्याच्या प्रश्नी एकत्र येत बागलाण मध्ये रस्त्यावर उतरल्या आणि रास्ता रोको केला. सर्व वाहतूक यावेळी ठप्प झाली असून डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, बागलाण शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना या चार संघटना एकत्र येत कांद्याला कमी दर, नाफेड nccf कडून शेतकऱ्यांची फसवणूक अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको केला. *तर ट्रक टार्न्सपोर्ट युनियनला यांना विनंती केली की तुम्ही नाफेड आणि nccf चा कांदा लोड करून नका अन्यथा ट्रक जाळण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.* *बाईट: शेतकरी*
1
comment0
Report
Advertisement
Back to top