Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

Satara में एक मां ने एक साथ सात बच्चों को जन्म दिया!

TTTUSHAR TAPASE
Sept 15, 2025 08:45:59
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_CHILD_STORY सातारा साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसावणार आहेत.मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे .कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला. बाईट:विकास खाकुर्डिया (वडील) बाईट: काजल खाकुर्डिया (बाळांची आई)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Sept 15, 2025 10:37:34
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 10:35:35
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_RATHOD_BYTE(4 FILES) जालना | एका महिन्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र न दिल्यास मुंबई,दिल्ली जाम करणार आमदार राजेश राठोड यांचा ईशारा अँकर | बंजारा समाजाच्या वतीने आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.बंजारा समाजाला ST प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे,अन्यथा संपूर्ण मुंबई जाम करू असा ईशारा यावेळी विधानपरिषदेचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी दिला आहे.बंजारा समाज पूर्वीपासूनच आदिवासी प्रवर्गात येतात,त्यामुळे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेऊन तातडीने असा जीआर काढावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे. बाईट: आमदार राजेश राठोड(लाल कोट असलेले) बाईट : अविनाश चव्हाण,आंदोलक(काळा जॅकेट असलेले)
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 10:35:10
Nashik, Maharashtra:शरद पवार - - काळ्या आईशी इमान राखणारा भाऊ बहिण अस्वस्थ आहे - कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो - अतिवृष्टी झाला त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर झाला - संकट आल्यावर राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते - *जबाबदारी घ्यायला आजचे राज्यकर्ते तयार नाही* - *गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या* - शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो - *संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही* - म्हणून जीव देण्याचा विचार शेतकरी करतोय - मी शेती खात्याचा मंत्री होतो - माझ्या वाचनात आलो शेतकरी आत्महत्येची घटना वाचली - पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली - शेतकरी जीव देतो ते समजून घेतले पाहिजे - दिल्लीत बसून होणार नाही - जिल्ह्यात जाऊन समजून घेऊ असे सांगितले - पंतप्रधान सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती यवतमाळला गेलो - आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आम्ही भेट घेतली - शेतकऱ्यांची बायको ढसाढसा रडतेय - मी विचारलं का रडतेय - सोसायटीचे कर्ज काढले होते ते थकले - खाजगी सावकारकडील कर्ज थकले - भांडे घेऊन गेला, मालकाला सहन झालं नाही - रडता रडता जीव गेला - *कर्जबाजारी हा मोठा रोग* - *त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली* - नाशिकचा कांदा जगात जातो - पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो - त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली - किंमत देत नाही बाहेर विकू देत नाही - तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची - *राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही* - *देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुमचर पोस्टर लावले* - शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले - *शिवाजी महाराजांच्या काळात फाळ नव्हता त्याला सोन्याचा फाळ दिला होता* - बळीराजा उपाशी राहत कामा नये - *तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केलं नाही* - *राज्यकर्ते बळीराज्यकडे लक्ष देत नाही* - *शेतकऱ्यांचा मोर्चा दखल घेतली नाहीतर मोर्चा आणखी उग्र स्वरूपात होईल* - *नेपाळमध्ये काय घडलं आहे, त्याच्या खोलात मी जात नाही* - *देवाभाऊ शहाणपणा घेतील अशी विनंती* - मोर्चात सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार - *महिना दीड महिन्यात बघुयात काय घडतं*
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 10:33:22
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- आमदार दिपक केसरकर byte --- on संजय राऊत --- काल झालेली क्रिकेट मॅच ही आशिया कप ची होती. भारत आणि पाकिस्तान ने आयोजित केलेली मॅच नहोती.. उगाच जनतेची दिशाभूल करायची.. आंतराष्ट्रीय स्थरावर त्यांच्या नियमनुसार सामने व्हावे लागतात.. त्याच्यावर राजकारण करुन वेडेवाकडे बडबडत राहायचं ह्याला अर्थ नाही. ह्यांचं डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे. पराभव पाचवण्याची ह्यांची ताकद नाही.. भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले पाहिजे on संजय राऊत ( कुंकू ) --- संजय राऊत तुमच्यात पाकिस्तान विरोधात ऍक्शन घ्यायची हिंमत नाही ?? ती हिमंत मोदी साहेबांनी दाखवलीय. त्याची थोडी तरी लाज बाळगा. काँग्रेसच्या काळात मंत्रालयावर हल्ला झाला तेव्हा काय ऍक्शन घेतली होती.. कुठल्याही फालतू गोष्टीची तुलना सैन्याच्या पराक्रमाशी करणं योग्य नाही
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 15, 2025 10:30:30
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ---- मंत्री योगेश कदम byte ---- ऑन संजय राऊत ( कोटींचा जुगार ) --- संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलाव. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी समोर आणावी. उगाच वायफळ चर्चा कराव्यात. सिन्दुर सारखं ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे.. जे आज पर्यंत कुणाला जमल नाही ते आपल्या सैन्याने केलंय. आपल्या भारताची बदनामी करायची पाकिस्तान ने सटयामध्ये किती कमवले ते हे बघायला गेले होते का?? वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हाच प्रयत्न संजय राऊत यांचा असतो. त्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही ऑन एकनाथ शिंदे --- आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागत. त्याची चर्चा आपण बाहेर करत नसतो. महायुती मध्ये एकत्र राहून राज्याचा विकास करायचा आहे. शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनाच पालन आमच्या कडून होईल. आणि महायुती अजून मजबुतीने समोर येईल. ऑन लक्ष्मण हाके --- प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. समाजाकरीता संघर्ष करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्या मागण्या लावून धरा त्याबाबत आमचं दुमत नाही. तक्रार नाही पण अन्य समाजाच्या भावना दुखावतील अस वक्तव्य कोणी करू नये. कायदा मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल . ऑन गिरीश महाजन --- प्रत्येक नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न करत असतात. कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार. पक्ष वाढीकरिता अन्य पक्षाचे कार्यकर्ते घेण्यास काही हरकत नसावी ऑन संजय राऊत ( बूट चाटणे ) --- दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा समोर आरसा ठेवून विचार करावा. 370 कलम हटविण्याची हिंमत कधी काँग्रेस ने नाही केली उलट ते हटवत असताना विरोध केला. त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का? काँग्रेस सोबत जवळीक बाळासाहेबांना मान्य होती का? ? याच उत्तर राऊत यांनी हो की नाही मध्ये द्याव Byte ---- योगेश कदम
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 10:16:45
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_DARU_BANDI रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावातील ग्रामस्थांनी गावात दारूबंदी लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठाणेदारांना निवेदन दिले असून ग्रामपंचायतीने देखील विशेष सभेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.गेल्या काही दिवसांपासून गावात दारू विक्री वाढल्याने तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली.त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणले.दारूबंदीशिवाय गावात शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यदायी वातावरण टिकवणे शक्य नाही,असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीने देखील ग्रामस्थांच्या या मागणीला पाठिंबा देत ठराव मंजूर केला असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 10:05:55
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_ON_Chavan Feed on - 2C ------------------------------ Anchor - 2010 नंतर कोणता एव्हढा त्रास दिला हे अशोक चव्हाण यांनी जगजाहीर सांगावे. 2010 नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष केले, बांधकाम मंत्री केले, तरीही असे वक्तव्य करत असतील तर काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत, जश्यास तसे उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलाय. 2010 नंतर मला खूप त्रास दिला असे वक्तव्य काल लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते त्यावर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. चव्हाण यांना जो वनवास भोगावा लागला तो आम्हालाही भोगायला मिळो असे काँग्रेस कार्यकर्ते म्हणत असल्याचा टोलाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला. Byte - खा. रवींद्र चव्हाण -------------------
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 10:05:42
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_BAUDDHA(8FILES) जालना |महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बौद्ध समाजाचा ठिय्या शहरातील मोती तलावात भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी अँकर- जालना महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बौद्ध समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलंय.. शहरातील मोती तलावात भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्यात यावी. अशी समस्त बौद्ध समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.. अनेकवेळा प्रशासनाला याचं निवेदनही देण्यात आलं.. मात्र अद्याप पालिका प्रशासन आणि आयुक्त संतोष खांडेकर यांना याबाबत कोणतेहि गांभीर्य नाही.. त्यामुळं बौद्ध समाजाच्या वतीने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय.. मागणी मान्य केली नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. बाईट- विजय लहाने,
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 10:05:33
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_ATIKRAM_HATAV_MOHIM रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रस्त्यावर बसलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमणाविरुद्ध कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून काही दुकानदार रस्त्यावरच माल ठेवून व्यवसाय करत होते.यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते.नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने वाशिम नगर परिषद अतिक्रमण पथक आणि पोलिसांनी आज सकाळी संयुक्त कारवाई केली.या कारवाईत रस्त्यावर ठेवलेला माल हटवण्यात आला.तसेच अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 10:00:20
Akola, Maharashtra:Anchor : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या जोरदार आणि वादग्रस्त टीकेनंतर आता शिवसेना (उबाठा) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) असा वाद उफाळून आला आहे.राऊत यांच्या वक्तव्यानंतर अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि स्थानिक कार्यकर्ते चांगलेच संतापले.या संतापाचा उद्रेक म्हणून आज अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचं दहन देखील करण्यात आलं.अमोल मिटकरी यांनी राऊतांवर जहरी टीका करत, "संजय राऊत यांच्या अंगात दाऊदचा डीएनए आहे, ते म्हणजे सौ टक्के दाऊद", अशा शब्दांत घणाघात केला. त्यामुळे आता राज्यात राऊत विरुद्ध मिटकरी असा थेट सामना रंगलेला दिसतोय. Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 15, 2025 09:51:19
kolhapur, Maharashtra:Ngp Shelar Ganpati Ngp Shelar Ganpati byte live u ने फीड पाठवले --------- राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज मस्क-यार गणपतीचे दर्शन घेतले... मस्कऱ्या गणपती उत्सव राज्य महोत्सव होणार असल्याचे त्यांनी घोषित केले... यावेळी सीनियर भोसला पॅलेसमध्ये मस्कऱ्या गणपतीचे आरतीही केली ------ बाईट -- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री ( पॉइंटर ) नागपुर आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री) (On मस्कऱ्या गणपती दर्शन) महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले.. यावर्षी देशात आणि परदेशात देखील गणेश उत्सव साजरे करण्यात आले.. मुधोजी राजे भोसले आणि मुंबईत भेट झाली..तेव्हा 238 वर्षाची परंपरा असलेला मस्कऱ्या गणपती जो नवसाला पावणारा आहे..त्या चरणी नतमस्तक व्हायला मी आज आलो... On संघ मुख्यालय भेट ( आशिष शेलार आणि अशी जैस्वाल आज संघ मुख्यालयात जाऊन आले ) दोन्ही आशिष ना संघाचा आशिष आहे.. तोच दृढ आहे एवढंच या भेटी मागील कारण.. On संजय राऊत क्रिकेट मॅच टीका... या दुर्दैवी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला..सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे.. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले..हे आपल्या तीनही सैन्यांचं शौर्य दाखवत.. जगभरातील एजन्सी आतंकवादी भारतातून पलायन झाले असा तर्क काढत होते.. त्यावेळी आपल्या सैन्याचा पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीतीमुळे आतंकवाद्यांना शोधून यम सदनात पाठवले.. हे सर्व शौर्य स्वाभिमानाने आपण जगासमोर केलेत.. कदाचित त्यामुळेच ऊबाठा गटाला पोटदुखी सुटली असेल.. *आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केल्यावर पाकिस्तानला जी पोटदुखी झाली तीच पोटदुखी संजय राऊत यना झाली आहे..* या पोट दुखीमुळे अतार्किक वक्तव्य उभाठा गट आणि संजय राऊत करत आहे.. पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे.. भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही.. ही भूमिका स्पष्ट आहे.. कालची मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत.. आंतरराष्ट्रीय सामने भारताने खेळू नये हे म्हणणारे संजय राऊत कोण..? ज्यांनी आपल्या परिवारातील लोक गमावले त्यांचा बदला घेण्याचं काम सरकार करत आहे.. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यावरून त्याची तुलना केली जात असेल तर संजय राऊत यांना माझं म्हणणं आहे.. पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे.. कदाचित उद्यापासून ते हे वाक्य वापरू शकतात.. की आजपासून महाराष्ट्रात आलेपाक खाऊ नका.. असं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत.. On शरद पवार सामाजिक विंगवर शरद पवार बोलत असतील तर मला त्यांना सांगायचे की पुण्यात जाऊन तुम्ही हे वक्तव्य का केलं.. पुण्यात आता टिळकांची की फुलांची पगडी चालेल.. ही सामाजिक विन आणि तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायच.. आपल्या पक्षाकडून होणारे वक्तव्य कोणत्या ऐक्याचे वक्तव्य आहे.. म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये.. ओबीसींच किंचित न काढता मराठा समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही..ही सरकारची भूमिका आहे... On evm पवार साहेबांचा पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर माझी पहिली मागणी आहे.. रोहित पवार, सुप्रिया सुळेचा राजीनामा घ्या त्यानंतर मतचोरीवर प्रश्न विचारा.. याच निवडणूक प्रक्रियेतून रोहित पवार ,सुप्रिया सुळे निवडून आले.. तर चांगलं आणि दुसरी निवडून आले तर मत चोरीचा प्रश्न विचारायच.. आपला तो बाबा आणि दुसऱ्यांचा काटा ही अशी भूमिका आहे.. On रामटेक फिल्म सिटी सर्वाधिक शूटिंग आणि या शूटिंग सठी लागणारी सर्व यंत्रणा जास्तीत जास्त महाराष्ट्रात निर्माण कराव्यात ही सरकारची भूमिका आहे.. जगभरातून आणि देशभरातून या क्षेत्राचं केंद्र महाराष्ट्र बनाव.. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिशादर्शक मॅप बनवला आहे.. मुंबई प्रमाणे रामटेक येथे चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.... नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचा काम रामटेक सुरू होईल.. त्यानंतर विदर्भातील नागरिक ,विदर्भातील कलाकार आणि विदर्भातील तंत्रज्ञान यांचे रोजगारांचे केंद्र त्या ठिकाणी होणार अशी मी आज घोषणा करतोय.. On कबुतर खाना मंत्री लोढा हे बेकायदेशीर कृत्य करणार नाही.. आणि कायदेशीर कामाला कोणी विरोध करणार नाही..
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 15, 2025 09:50:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राज्यातला विरोधी पक्ष बेरोजगार, मतांची पळवा-पळवी हा नवा रोजगार मिळालाय - चंद्रकांत पाटलांची विरोधकांवर खोचक टीका. अँकर - राज्यातल्या विरोधी पक्ष आता बेरोजगार झालाय,त्यामुळे त्यांना आता मतांची पळवा-पळवी हा नवा रोजगार मिळालाय,अशी खोचक टीका तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मत चोरी बाबत घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकेवरून चंद्रकांत पाटलांनी ही पोचक केली आहे त्याचबरोबर आता विरोधकांकडे कार्यकर्त्यांना काहीतरी काम द्यायचं म्हणून हे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 15, 2025 09:45:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - शिवसेना स्थापनेपासूनचा भूमिका लिहून काढा - चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला.. अँकर - भारत -पाक सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय,शिवसेना स्थापने पासून आजपर्यंतच्या 50 ते 60 वर्षाच्या कारकिर्दीतील त्यांची भूमिका त्यांनी एकदा नीट लिहून काढली पाहिजे,असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.त्यांच्या भूमिकेतला आंतर-विरोध कसा आहे,तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
Advertisement
Back to top