icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में एक्सपायर्ड दवाओं के खुले में फेंकने से पर्यावरण और स्वास्थ्य खतरा

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम शहरातील विविध मेडिकल चालकांकडून एक्सपायरी झालेल्या औषधांच्या गोळ्या,इंजेक्शन तसेच अन्य वैद्यकीय साहित्य उघड्यावर फेकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर येत आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बायो मेडिकल वेस्ट संकलनासाठी वाहन शहरात नियमितपणे फिरत असतानाही काही मेडिकल चालकांकडून एक्सपायरी औषधांचा साठा उघड्यावर टाकला जात असल्याने पर्यावरण प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरून वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

अकोला के गौरक्षण रोड पर तेल फैलाने से सड़क हादसों की भारी संभावना

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील साई शील पेट्रोल पंप ते जुन्या आयकर कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरत असून काही वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.रस्त्यावर तेल सांडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून अनेक जण घसरून पडत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही जागृत नागरिकांनी घटनास्थळी थांबत वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहने हळू चालवण्याचे आवाहन केले आहे.मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्यावरील तेल साफ करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

शिर्डी में साईं भक्त ने 3025 किलो आम दान किया, आमरस तीन दिन

Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येणारे साईभक्त साईंच्या झोळीत रोख रकमेसह मौल्यवान वस्तू दान करतात..मात्र पुणे जिल्ह्यातील नारायणबाग येथील रवी नारायण करगळ या शेतकरी साई भक्ताने साईंच्या चरणी साडेतीन हजार किलो केसर आंब्यांचे दान केलंय.. साई संस्थानने प्रसादालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केलाय.. साईभक्तांना पुढील तीन दिवस आमरसाची मेजवानी देण्यात आल्येली.साईभक्तांनाही आमरस पुरीचे जेवन द्यावे, या हेतुने साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यातील साईभक्त करगळ यांनी देणगीच्या माध्यमातून साईंच्या चरणी दान म्हणून जवळपास ३०२५ किलो आंबे दान केले भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे.३०२५ किलो आंब्यातून सरसरी ८० ते ८५०० हजार भाविक आमरसाच्या मेजवानीचा लाभ घेतील.पुढील तीन दिवस हजारो साईभक्त या गोड मेजवानीचा लाभ घेणार आहेत.साई संस्थानच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report
Advertisement

मंचर बारव-दर्गा विवाद शांत, शहर में कड़ी सुरक्षा व्यवस्था

Shirur, Maharashtra:मंचर बारव-दर्गा वाद: वाद निवळला, पण शहरात तणावपूर्ण शांतता; कडेकोट पोलीस बंदोबस्त पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्ग्यावरून निर्माण झालेला वाद काल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर काहीसा निवळला आहे. बकरी ईदनिमित्त दर्ग्यामध्ये नमाज पठण न करण्याचं आवाहन प्रशासनाने केल्यानंतर संभाव्य तणाव टळला आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला जनआक्रोश मोर्चाही सध्या स्थगित करण्यात आला आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून मंचर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील भागांत पोलिसांची गस्त सुरू आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे。
0
0
Report

राजे गट ने शिवसेना के साथ जुड़कर फलटण में पार्टी ताकत बढ़ाई

Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथे 'राजे गटा'च्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावून फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली, तरी आता संपूर्ण ‘राजे गट’ अधिकृतपणे पक्षासोबत आला आहे. या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले. काही मतदारसंघांमध्ये ‘माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही’ अशी भाषा काही लोक करत आहेत. मात्र शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मक्तेदारी चालणार नाही. शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल, तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही.यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेली छुप्या जवळीकतेवर बोट ठेवत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले स्टेज बाईट: मंत्री उदय सामंत
0
0
Report
Advertisement

अमरावती में रोहयो क्षेत्र की मजदूरी बकाया: 3.17 करोड़ रुपये, 17,765 मजदूर प्रभावित

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत; १७ हजार ७६५ मजुरांना फटका अमरावती जिल्ह्यात रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ३ कोटी १७ लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. जिल्ह्यात सध्या ६२३५ विकास प्रकल्प सुरू असून १७ हजार ७६५ मजूर कार्यरत आहे त्यामुळे या मजुरांना फटका बसल्याच पाहायला मिळत आहे. मजुरांना दररोज सरासरी ३९७ रुपये मजुरी मिळते मात्र देयकांमध्ये मोठा विलंब होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर ५३७० कामे सुरू असून विविध यंत्रणांमार्फत ८६५ प्रकल्प राबवले जात असून वरूड तालुक्यात सर्वाधिक ७४१६ मजूर, चिखलदऱ्यात २४०७ तर धाणीत १६४८ मजूर कार्यरत आहे. मजुरी वेळेवर न मिळाल्याने अनेक कामगारांना कर्ज काढून घरखर्च भागवावा लागत असून उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी थकीत मजुरी तात्काळ खात्यात जमा करण्यासह वेतन वितरण प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

दुर्गाडी किले आंदोलन पर शिवसेना-भाजपा में तू-तू मैं-मैं, लाज के बहाने आंदोलन

Kalyan, Maharashtra:भाजपाला लाजिरवाणे वाटत असल्यामुळे आंदोलनात सहभागी होत आहेत दुर्गाडी किल्ले आंदोलनात शिवसेनेचा भाजपाला टोला.. सरकार हा हिंदुत्ववादी संघटनेचा आहे त्यांना देखील आंदोलन करावे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.. उपनेते विजय साळवी दुर्गाडी किल्ले परिसरात बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याच्या निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून गेल्या ४० वर्षांपासून घंटानाद आंदोलन केलं जातं. यावर्षी भाजपाने देखील या आंदोलनात पहिल्यांदा सहभागी होण्याचा इशारा दिला होता. मात्र दुर्गाडीच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने भाजपवर जोरदार प्रहार केलाय. या आंदोलनात सहभागी होण्याची भाजपला उशिरा का होईना जाग आली. निवडणुकीच्या वेळेला हिंदूंच्या मताची भीक मागतो, म्हणून लाजिरवाला वाटत असल्याने ते आंदोलनात सहभागी होत आहेत, मात्र यात कोणीही राजकारण करू नये असा टोला शिवसेनेने भाजपला टोला लागवलाय. आतिश भोईर
0
0
Report

वाशीम समेत जिलों में ईद-उल-अजहा शांति और उत्साह के साथ मनाई गई

Washim, Maharashtra:वाशीम शहरासह रिसोड,मालेगांव, मंगरूळपीर, कारंजा,मानोरा तालुक्यात देखील हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. वाशीम येथील ईदगाहवर ईद उल अजहाची सामूहिक नमाज सकाळी पठण करण्यात आली. नमाज पठण केल्यावर जगात शांतता राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थना झाल्यावर मुस्लिम बांधवानी एकमेकांच्या गळाभेटी देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्यने ईदगाहवर मुस्लिम बाँडव उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ईदगाहसह शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0
0
Report
Advertisement

उदयनराजे भोसले फिर सक्रिय मोड में, सातारा राजनीति में नई हलचल

Satara, Maharashtra:साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा “राजे” ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे…जवळपास वर्षभर शांत असलेले छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करत संघटनेला नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या..जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा… सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहा आणि सातारा जिल्ह्यातील एकाही नागरिकाला अडचण येऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देत..जनतेची सेवा हेच प्रथम उद्देश असेल पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळालं, तर दुसऱ्या कडे या बैठकीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून…“उदयनराजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत का?” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.राजकीय शांततेनंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसलेले उदयनराजे… आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट फोकस…यामुळे आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
0
0
Report

सोलापुर सलगरवस्ती में सौ से अधिक देशी पेड़ अवैध तरीके से काटे, नागरिक भड़के

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सलगरवस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल सोलापुरातील सलगरवस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता ही झाडे तोडण्यात आली असल्याची माहिती खासगी जागेत असलेली जवळपास दीडशेहून अधिक झाडे विकासकांकडून तोडण्यात आली आहे झाडे तोडणार आणि विरोधात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून महापालिका प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात येते 70 ते 80 वर्ष जुनी असलेली ही देशी झाडे रातोरात तोडण्यात आलीत दरम्यान वनविभागाकडून गाडीत भरलेली झाडे ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे मात्र बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही
0
0
Report

पंढरपूर के बुरुड गल्ली में मैला मिला पानी, स्वास्थ्य संकट से स्थानीय परेशान

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील बुरुड गल्ली परिसरातील रहिवाशांच्या घरात मैला मिश्रित पाणी जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निमार्ण झाला आहे. सदर मैला मिश्रित पाणी त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या इमारती लगत बुरुड गल्ली परिसर आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षातील शौचालय मधील मैला मिश्रित पाणी येथील रहिवाशांच्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात तातडीने हे पाणी बंद करावे अन्यथा हेच पाणी नगरपालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे
0
0
Report
Advertisement

दर्गाड़ी किले में घंटानाद आंदोलन, हिंदू-मुस्लिम प्रार्थनास्थल पर विवाद, भारी पुलिस तैनाती

Kalyan, Maharashtra:शिवसैनिकांचा दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन,मोठा पोलीस बंदोबस्त बकरी ईद निमित्त शिवसेनेचे घंटा नाद आंदोलन कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.आज बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत.बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते,मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही.त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतात.शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय.या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे
0
0
Report

नांदेड के लोहा शहर में सड़क चौड़ाई के लिए मुस्लिम परिवारों ने भूमि दान

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिलेातील लोहा शहरात रस्ता मोठा करण्यासाठी नागरिकांनी मालकीची जागा स्वखुशीने दिली. विशेष म्हणजे हातावर पोट असणाऱ्या मुस्लिम कुटुंबानीही कुठलाही मोबदला न घेता जागा दिली. लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून जुन्या लोहा शहरात जाण्यासाठी छोटा रस्ता होता. काही दुकाने आणि घरांमुळे हा रस्ता खूपच अरुंद झाला होता. नगराध्यक्ष शरद पवार यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी जागा देण्याची विनंती केल्यानंतर तीन मुस्लिम कुटुंबानी आणि दोन इतर कुटुंबानी आपली छोटी दुकाने आणि पत्राच्या घराची जागा देण्यास संमती दिली. नारापरिषदेने दुकानं आणि घरं पडून रस्ता मोठा केला. रस्ता मोकळा झाल्याने जुन्या लोहा शहरात जाणाऱ्या नागरिकांचा दररोजचा त्रास कमी होणार आहे.
0
0
Report

सोनाळा जलप्रकल्प से शहर को बढ़े पानी का फायदा, किसानों की चिंता बढ़ी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेऊन सोनाळा प्रकल्पातून शहरासाठी वृद्धि पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. मात्र या निर्णयामुळे शेलुबाजार परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंताचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण सोनाळा प्रकल्पातील पाण्यावर शेलूबाजार,वनोजा, तऱ्हाळा तसेच परिसरातील अनेक गावांतील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे शहरासाठी अतिरिक्त पाणी वळवण्यात आल्यास शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा कमी होईल आणि आगामी हंगामात सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top