icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ATS ने महाराष्ट्र में 40 ठिकानों पर छापेमारी, 21 आरोपियों पर गिरफ्तारी जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि 'आयएसआय'चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे असे कळतंय, दरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठवाड्यातील १९ जण होते त्यात (छत्रपती संभाजीनगर १३, बीड २, नांदेड २, जालना १, लातूर १), आहेत.. यातील सगळ्यांना चौकशी अंती सोडल्याचे सूत्रांची माहिती आहे
0
0
Report

हिंगणा तालुक के तलाव में डूबकर नागपुर के दो युवक की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा हिंगणा तालुक्यातील सलाईमेंढा तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू - पोहताना खोल पाण्यात गेले असतांना बाहेर येता न आल्याने मृत्यू - आदित्य चांदे आणि अभिषेक सिरसाम अशी मृतकांची नाव आहेत.. - तलावाच्या मध्यभागी चिखलात अडकल्यान बाहेर निघू न शकल्याने अखेर बुडून मृत्यू - सायंकाळी तलावावर गेले असताना घडली दुर्घटना - माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी, हिंगणा पोलिसांची शोधमोहीम सुरू केली.. - अग्निशमन विभागाची तातडीने धाव, शोधमोहीम सुरू केली, - दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले... - परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; हिंगणा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद..
0
0
Report

येवला बस अड्डे का राजस्व रिकॉर्ड, 20 दिनों में 1.61 करोड़ रुपए

Yeola, Maharashtra:अँकर : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली संख्या येवला बस आगारासाठी लाभदायक ठरत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २२ एप्रิล ते ११ मे या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत येवला आगाराला तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या येवला आगारातून दररोज ४२ बसेसद्वारे सुमारे २४० फेऱ्या करण्यात येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी येवला आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली असून नागरिकांनी एसटी आगारातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

राज्य आदेश के बाद महापालिका आयुक्त ने चार अधिकारियों का विदेश दौरा रद्द किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपावर १२०० कोटींचे कर्ज असताना ४ अधिकारी त्सुनामी आणि - भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी - स्वित्झरलंड आणि फ्रान्स दौऱ्यावर जाणार होते. यावर टीका झाली त्यानंतर याची दखल घेत आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार, हा दौरा महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे.. शहरात आतापर्यंत ३.३ रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. समुद्र जवळ नसल्याने त्सुनामीचा प्रश्नच नव्हता. तरी देखील मनपातील नगररचना उपसंचालक मनोज गजें, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब सिरसाट आणि नगररचनाकर कौस्तुभ भावे १६ ते २३ मे दरम्यान जर्मनीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. मात्र, राज्यातील सद्यःस्थिती पाहता शासनाने अधिकाऱ्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी चारही अधिकाऱ्यांचा आगामी दौरा अधिकृतरीत्या रद्द केल्याची माहिती दिली.
0
0
Report

अमरावती में किसान को हनी ट्रेप कर 70 लाख ठगे, पति-पत्नी आरोपी

Amravati, Maharashtra:अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप; बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 70 लाख अँकर :- अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून तब्बल 70 लाख रूपये उकळले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल रिचार्ज दुकानातून या हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्याने आधी एका महिलेला दहा हजार रुपयांची उसनवारीवर दिली त्यानंतर हा शेतकरी संबंधित महिलेच्या संपर्कात आला त्यानंतर महिलेने या शेतकऱ्याला आपल्या मायाजालामध्ये अडकवून शेतकऱ्याचे ब्लॅकमेलिंग सुरू केल्याने हे बिंग फुटले आहे. यामध्ये शेतकऱ्यांने या महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अकोला में गर्मी के दबाव में पानी आपूर्ति शेड्यूल बदला गया; पांचवें दिन पानी मिलेगा

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात घटता जलसाठा आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता अकोला महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. शहरात तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बंद करून आता पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या २६.३२ दलघमी म्हणजेच ३०.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि तीव्र उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी वाढत असून धरणातील साठ्यात सातत्याने घट होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
0
0
Report

जालना बैंक धोखाधड़ी: 140 करोड़ रुकी रकम, ठेवीदार तीन साल इंतजार करेंगे

Jalna, Maharashtra:जालना :राजस्थानी, ज्ञानराधा, स्नेहश्रीमध्ये ५ हजार ७३ नागरिकांची फसवणूक ६ बँकांचे १४० कोटी गोठवले; ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळण्यास तीन वर्षे लागणार आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई अँकर : जिल्ह्यात विविध बँकांमध्ये अपहार झालेला आहे. यातून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन सहा बँकांची १४० कोटींची रक्कम गोठवली आहे. फसवणूक झालेल्यांना रक्कम परत मिळण्याच्या अनुषंगाने पाच बँकांचे ठेवीदारांचे हितसंरक्षण प्रस्ताव पाठवले आहे. मंजुरी, लिलाव, न्यायालय परवानगी, ठेवीदारांचे दावे पडताळणी याला जवळपास ३ वर्षे लागणार आहे. यामुळे घामाची रक्कम परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा अजूनही तीन वर्ष वनवास असणार आहे. सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय, शेतकरी, निवृत्त कर्मचारी, महिला बचत गटांना बसला आहे. अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी, तर काहींनी वृद्धापकाळाच्या आधारासाठी ठेवलेल्या ठेवी आता अडकून पडल्या आहेत. दरम्यान, काही बँकांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये आशेची भावना निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement

बदलापुर के व्हॉलीबॉल खिलाड़ियों के लिए 5% आरक्षण मांग, क्या मंजूर होगी घोषणा?

Ambernath, Maharashtra:सरकारी सेवेत व्हॉलीबॉल खेळाडूंना पाच टक्के आरक्षण द्या\n\nआमदार किसन कथोरे त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n\nबदलापुरातील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने केली मागणी\n\nयावेळी त्यांनी पूर्वी व्हॉलीबॉल खेळाडूंना पाच टक्के आरक्षण होतं मात्र त्यानंतर ते बंद झालं असं सांगत हे आरक्षण पुन्हा सुरू केल्यास खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.\n\nयंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बदलापूर शहराला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा मान मिळालाय. राज्य सरकारचा क्रीडा विभाग आणि बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा शानदार शुभारंभ आ. कथोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, व्हॉलीबॉल जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातील एकूण 32 संघ आणि जवळपास 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. 13 मे 17 मे असे पाच दिवस बदलापूर पश्चिमेकडील जिमखाना मैदानात ही स्पर्धा होणार आहे.
0
0
Report

पुणे में ज्ञानेश्वर पालखी भवानी पेठ में तय, देवस्थान ने समय-सारणी जारी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:याबाबत अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब दिलं. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करुन, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं असून तशी प्रक्रिया ही सुरु झालीये, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.
0
0
Report

डोंबिवली की भावना इमारत खाली कराने नोटिस से 29 परिवारों में सनसनी

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील भावना इमारत खाली करण्याच्या नोटिसीने रहिवासी हवालदिल, केडीएमसी मुख्यालयात धाव.. डोंबिवली पूर्वेतील मुखर्जी रोडलगत असलेल्या चार मजली भावना इमारत खाली करण्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिकेकडून बजावण्यात आल्याने 29 कुटुंबातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी इमारतीतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि लोकप्रतिनिधींना भेट घेत निवेदन सादर केले. 2002 मध्ये महापालिकेने इमारत तोडण्याची नोटिस दिल्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने इमारत तोडण्यास स्थगिती दिली होती. कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संबंधित व्यक्तीने मागे घेतल्याने उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द झाला.यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी इमारत खाली करण्याची नोटिस बजावली आहे. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला असून रहिवाशांनी १५ दिवसांत इमारत खाली न केल्यास पाडकामाचा खर्च वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलिस बळाचा वापर करण्यात येईल, तसेच वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे इमारतीतील 29 कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका आम्हाला बेघर करणार असेल तर आम्ही जायचे कुठे ? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top