445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गृहराज्यमंत्री योगेश कदम ने परंडा के मृतक परिवार से मुलाकात कर सहायता की घोषणा
Dharashiv, Maharashtra:प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली भेट. प्रथमेशच्या कुटुंसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे मंत्री योगेश कदम यांचे निर्देश. प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत योगेश कदम यांनी जाणून घेतल्या अडचणी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूर येथील मयत प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज भेट घेतली. स्पर्धा परीक्षेतील अपयश आणि आर्थिक विवंचनेतून प्रथमेश देशमुख यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेऊन योगेश कदम यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत. तसेच घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करत कुटुंबाला शासनाच्या योजनांचा आणि मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही कदम यांनी दिल्या. विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना घडूनही एकही मंत्री प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या भेटीला आला नाही, अशी टीका सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली होती. त्यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.0
0
Report
गणेशोत्सव के चलते मुंबई-गोवा राजमार्ग पर भारी वाहन 16 दिन के लिए बंद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आजपासून बंदी आरटीओ विभागाकडून अवजड वाहनांची कसून चौकशी 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध, 16 दिवसांमध्ये 10 दिवस गणेशोत्सवामध्ये अवजड वाहतुकीसाठी बंदी खारघर ते सावंतवाडी पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर बंदी रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशी आरटीओ विभागाची सहा पथक 24 तास कार्यरत 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमतेच्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडी मुक्त व्हावा यासाठी राज्य शासनाचा निर्णय महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात अशी असेल अवजड वाहनांना बंदी... 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पाच दिवसांचे गणपतीचे विसर्जन 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर अनंत चतुर्दशी जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही0
0
Report
गणेशोत्सव के दौरान मुंबई-गोवा हाईवे पर भारी वाहनों की रोक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला होता.. या निर्णयाचे अंमलबजावणी करत असताना महामार्ग पोलीस मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.. 16 टन पेक्षा अधिक वाहनांना महामार्गावरती थांबवलं जात आहे.. महामार्गावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
इंदापुर में पेपर फुटी के विरोध में विद्यार्थियों ने तहसील कार्यालय के सामने मोर्चा निकाला
Rui, Maharashtra:इंदापूर मध्ये पेपर फुटी वरून विद्यार्थ्यांचं आंदोलन..... इंदापूर तहसील कार्यालयावर काढला मोर्चा.... Anchor _स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना आज पुण्याच्या इंदापूर मध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंदापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत पेपर फुटीचा निषेध नोंदवला. इंदापूर नगरपरिषद पासून इंदापूर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यात बहुसंख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते.0
0
Report
भेसळयुक्त बटर पर खाद्य सुरक्षा विभाग ने बड़ी कार्रवाई, 75,356 किलो जप्त
Ahilyanagar, Maharashtra:आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील एमआयडीसी भागातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न-औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा ताब्यात घेण्यात आला असून, या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे. ‘मधुरामा क्रीमी डिलाईट’ या ब्रँडच्या बटरच्या दर्जा आणि लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान विविध बॅचमधील चार बटरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर बटरचा दर्जा तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, संपूर्ण बटरचा साठा सुरक्षितपणे जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न-औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.0
0
Report
वाशिम में मानसून ठिठका: खरीप पिकें डरी, अधिकारी निरीक्षण के बाद राहत की उम्मीद
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nअँकर:वाशिम जिल्ह्यात पावसाने मागील 45 दिवसापासून दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असून सोयाबीन, तूर, कपाशी,हळद करपून नष्ट झाली आहेत.या पार्श्वभूमीवर वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे,तामसी आणि पंचाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आमदार श्याम खोडे आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांची पाहणी करत त्यांनी पिकांची सद्यस्थिती आणि पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेण्यात आल्या.त्यामुळे या पाहणीनंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा मदतीबाबत काय निर्णय होतो,याकडे आता लक्ष लागलं आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा में बाघ हमले में किसान की मौत, गांव शव स्वीकारने से इनकार
Wardha, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; अठेचाळीस तास झाले अंत्यसंस्कार नाही शेतशिवारात शेतकरी भगवान धुर्वे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले. गावाकऱ्यानी रस्ता रोखून धरत वन विभागाचे वाहन अडवून धरले. दुसऱ्या दिवशी गावाने आणखी रोष व्यक्त करीत शव विच्छेदन उरकवून गावात ऍम्ब्यूलन्स ने आलेला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. जोवर या क्षेत्रातील आमदार तथा पालकमंत्री गावात येत नाही, ठोस आश्वासन देत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका गावाकऱ्यांनी स्पष्ट केली. गावात आज दुपारच्या सुमारात खासदार अमर काळे आणि काँग्रेस नेते अभ्यूदय मेघे पोहचले. गावाकऱ्यांनी संताप व्यक्त केली. खासदार अमर काळे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.0
0
Report
पोळा के दिन शिरपूर में बैलों का अचानक बेकाबू व्यवहार, किसान बचा—वीडियो वायरल
Washim, Maharashtra:वाशिम: शिरपूर में पोळा सणाच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. बैलपोळा फुटल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा आवाज होताच बैलजोड्या अचानक बिथरल्या आणि पळत सुटल्या. या वेळेला एका शेतकऱ्याला बैलाने चक्क फरफटत नेल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.0
0
Report
उमर्रा के द्वारका उत्सव में बैलों के रथ और नवस की अनोखी परंपरा
Akola, Maharashtra:बैलां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा...परंतु अकोला जिल्ह्यातील उमरा गावाने ही कृतज्ञता जोपासण्याची आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे. उमरा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलांना रथात बसवून शेतकरी स्वतःच रथ ओढतात आणि गावात मिरवणूक काढतात ... सुमारे ३५० वर्ष जुनी ही परंपरा....हा उत्सव "द्वारका उत्सव" म्हणून ओळखला जातो...चला पाहूया "द्वारका उत्सव" .. ऋषीनंतर कृषीला पुजणारी आमची संस्कृती... या कृषी संस्कृतीत बैलांचं स्थान खूप मोठं आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या सोबत मेहनतीने काळ्या आईची सेवा करणारा! याच वृषभऋणातून मुक्त होण्यासाठी अकोला जिह्यातील अकोट तालुक्यातील उमरा गावात आगळ्यावेगळ्या परंपरेचा जन्म झाला... गावातीलच वाकाजी महाराजांनी तीनशे वर्ष पूर्वी सुरु केलेली परंपरा आजही सुरु आहे .. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावात बैलांना रथात बसवून गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात येते ... वाकाजी महाराजांच्या मानाच्या बैलामागे इतर रथ असतात..ही परंपरा सुरु होण्या मागचं कारणही रोचक आहे.... 350 वर्षांपूर्वी गावात एक रोग पसरला आणि बैल मरू लागले..या संकटाच्या काळात शेतकरी वाकाजी महाराजांच्या शरणी आले...वाकाजी महाराजांनी बैलांना एक अंगारा लावण्यास सांगितले आणि अंगारा लावण्याने बैल रोगमुक्त झाले.. शेतकऱ्यांनी बैल बरे होण्यासाठी नवस केला आणि नवस फेडण्याच्या स्वरूपमध्ये या द्वारका उत्सवाला सुरुवात झाली.या सोहळ्यात सर्वच जाती-धर्माचे लोक सहभाग घेतात...0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में हथियारबंद डकैतों ने तमिलनाडु के व्यापारियों से 30 लाख का माल लूटा
Sangli, Maharashtra:जत तालुक्यातील भीवर्गी फाटा येथे तमिळनाडूतील व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवून दहा व्यापाऱ्यांकडील २० लाखांची रोकड, दोन तोळे सोने आणि मोबाईल, असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. तामिळनाडू सालेम येथील काही व्यापारी जत तालुक्यातील माडग्याळ येथील मेंढ्यांच्या बाजारात निघाले असताना उमदी जवळच्या भीवर्गी फाटा येथे स्कॉर्पीओ गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी गाडी अडवून, बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटले आहे. जत तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्यामुळे पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.0
0
Report
चंद्रपुर में अपराध रोकथाम के लिए विशेष प्रतिबंधक अभियान; 570 व्यक्तियों पर कार्रवाई
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधक मोहीम, आतापर्यंत 570 इसमांवर प्रतिबंधक कारवाई अँकर:--- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधक मोहिमेचे (Preventive Action Camp) आयोजन करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये हे शिबिर घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये धडक कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 570 इसमांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहा उपविभागांपैकी केवळ एका उपविभागात या संबंधात कारवाई अपूर्ण असून तीही लवकरच पूर्ण केली जाणार आहे. समाजात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी चंद्रपूर पोलीस दल कटिबद्ध असून समाजकंटक तसेच उपद्रवी घटकांवर अशा प्रकारची कडक कायदेशीर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे।सांगितले जात आहे।0
0
Report
सांगली में ऊस आंदोलन शुरू, 5 हजार रुपये मांग पर स्वाभिमानी ने कारखाना रोका
Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी. स्लग - सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे. उसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्या, अशी मागणी करत वाळवा तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून वाघवाडी फाटा येथे सुरू झालेल्या एन डी पाटील शुगर जॅगरी कारखान्यावर धडक देत कारखाना प्रशासनाला धारेवर धरलं, त्याचबरोबर कारखान्यासाठी सुरू असलेले ऊस वाहतूक देखील स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकांची हवा सोडत रोखली. ऊसाला पाच हजार रुपये भाव द्यावा आणि त्या कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संघटनेकडून देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
संजय राऊत बोले: उद्धव सरकार गिराने के लिए पांच हजार करोड़ खर्च
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नांदेड मध्ये युबीटी कडून तुमसे ना हो पायेगा हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. सुरतच्या होटलचं बिल 120 कोटी, गुहाहाटी हॉटेलचं बिल 68 कोटी, गोव्याच्या हॉटेलचं बिल 58 कोटी आहे, हे सगळ सरकार पाडण्यासाठीचा खर्च आहे अस संजय राऊत म्हणाले. पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यासाठी निवडणूक आयोगाला त्यांनी साडे पाचशे कोटी रुपये दिले असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांनी आमच्या पक्ष आणि चिन्हाचा सौदा केला अस राऊत म्हणाले. सरकार नामर्द आहे, सरकार मेलं आहे, हे सरकार डेडबॉडी आहे - संजय राऊत. तुमसे ना हो पायेगा याचा अर्थ सरकार नामर्द आहे अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. हे नाही करायचं ते नाही करायचं, यांच्याने काही होणार नाही. खुर्सी खाली करो शिवसेना आ रही है असं राऊत म्हणाले. लोकांचे, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात सरकार नामर्द ठरत आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. सरकार मेलय, डेडबॉडी आहे, ही डेडबडी आता उचलायला पाहिजे असा घनाघात राऊत यांनी केला.0
0
Report
44 दिन बाद बारिश आई, पर किसानों को राहत नहीं मिली
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात तब्बल ४४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. कारंजा,धनज, मनभा तसेच मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि पारवा परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली.मात्र, महिनाभराच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कापसाची पिकं वाळून पिवळी पडली आहेत. पिकांना सावरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असताना केवळ रिमझिम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. ४४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला, मात्र तोपर्यंत हातातोंडाशी आलेली पिकं करपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.0
0
Report
मराठा आरक्षण के समर्थन में महिलाओं ने मुख्यमंत्री के कुलदैवत के सामने साकड़
Pandharpur, Maharashtra:मराठा समाजाचे आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळावी यासाठी मराठा समाजातील महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कुलदैवत लक्ष्मी नरसिंह चरणी साकडं घातलं आहे पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर लक्ष्मी नरसिंह हे मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत आहे. मागील काही दिवसांपासून जरांगे उपोषणाला बसलेत. सरकार कडून गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे माळशिरस तालुका व पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या महिला भगिनीनी नीरा नृसिंहपूर येथील भगवान लक्ष्मी नृसिंह देवस्थानात जाऊन साकडे घातले. यावेळी मनोज जरांगे यांना दीर्घायुष्य मिळावे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कुलदैवताने सुबुद्धी द्यावी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा असे साकडे घालण्यात आले0
0
Report
Advertisement
