445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मान्सून फिर सक्रिय: छत्रपती संभाजीनगर में 46 मिमी बारिश से शहर भिगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अवघ्या दीड दिवसात ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली धार बुधवारी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याने शहरासह परिसर चांगलाच भिजला. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत ३२.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी साढेआठ ते सायंकाळी साडेसहा या सुमारे १० तासांत आणखी १३.७ मिमी पाऊस झाला. त्यामुळे अवघ्या ३६ तासांत शहरात ४६ मिमी पाऊस कोसळला. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही. परिणामी, कमाल तापमान २५.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी हवेतील आर्द्रता १०० टक्के, तर सायंकाळी ९२ टक्के होती. त्यामुळे दिवसभर गारवा जाणवत होता.0
0
Report
कर्तव्याच्या पलते इंसानियत:Jरी पुलिस ने ड्यूटी के समय भी चालक की जान बचाई - मरणोत्तर वीरता
Navi Mumbai, Maharashtra:कर्तव्याची वेळ संपल्यानंतरही माणुसकीचे कर्तव्य पार पाडत रबाळे वाहतूक शाखेतील दोन पोलिस शिपायांनी प्रसंगावधान दाखवत बेशुद्ध कारचालकाचे प्राण वाचविल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. १७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या sुमारास रबाळे वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई सचिन ढाले आणि सचिन सुळ हे दोघे आपले नियमित कर्तव्य पूर्ण करून घरी जात होते. त्या वेळी रबाळे येथील रिलायन्स उड्डाणपुलाच्या बेलापूर लेनवर सुरुवातीला ५० मीटर अंतरावर MH-11-BV-8245 क्रमांकाची कार दुभाजकावर आदळलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे दोन्ही पोलिस अमलदारानी तत्काळ कारजवळ जाऊन पाहणी केली असता चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलिसांनी तात्काळ त्या चालकाला CPR दिल्यामुळे काही क्षणांतच चालकाला शुद्ध झाली. यानंतर त्यांनी विलंब न लावता चालकाला तातडीने रबाळे येथील गवळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान चालकाने आपले नाव सचिन बिचुकले असल्याचे तसेच ते सानपाडा येथील मोराज रेसिडेन्सीमध्ये राहण्यास असल्याचे सांगितले. बिचुकले हे वसई येथे लार्सन अँड टुब्रो कंपनीत नोकरीला असून सदर दिवशी ते ऑफिस वरून सानपाडा येथील घरी जात असताना, हा प्रकार घडला.0
0
Report
पैठण तालुक्यात डाळिंब चोरी के शक पर पारधी युवक समेत चार की बेरहमी पिटाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रूक येथे डाळिंब चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील एका मुक्या युवकासह चौघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत जातीवाचक शिवीगाळ करत गायरान जमीन खाली करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १९ वर्षीय मुक्या युवकासह एका व्यक्तीला डाळिंब चोरीच्या संशयावरून महालक्ष्मी मंदिरासमोर नेऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर घरी परतताना पुन्हा त्यांची मोटारसायकल अडवून लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.0
0
Report
Advertisement
वेरूल पोल्ट्री फार्म में भटकते कुत्तों ने तीन वर्षीय बच्चे की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारातील मधील एका पोल्ट्री फार्मवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सार्थक गजानन पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. सार्थकचे कुटुंब चार महिन्यांपासून वेरूळ शिवारातील पोल्ट्री फार्मवर राहते. या घटनेच्या वेळी वडील गजानन पाटील हे पोल्ट्री फार्ममध्ये कामात व्यस्त होते, तर आई घरातील कामे करत होती. सार्थक घराबाहेरील अंगणात एकटाच खेळत असताना काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याला फरफटत नेल्याचे लक्षात येताच, वडीलांनी धाव घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले, परंतु तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता.0
0
Report
शिराळा तालुक्य में तेज़ बारिश, चांदोली डैम पाणलोट क्षेत्र में अतिवृष्टि; डैम 75% भरा
Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे, तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासात ७८ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धरण ७५ टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणार धरणात जवळपास २६ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर चांदोली धरण क्षेत्रातल्या पाथरपुंज येथे गेल्या २४ तासात तब्बل १८१ मिलीमीटर पाउसाची नोंद झाली आहे.0
0
Report
नागपुर जरीपटका स्कूल में तीसरी क्लास के छात्र की मौत; परिवार प्रशासन पर सवाल उठाता है
Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूरच्या जरीपटका परिसरातील एका शाळेत तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू... - ही घटना जरीपटका येथील राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. - मृत विद्यार्थ्याचे नाव फनीत कटरे असून तो तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होता. - दुपारच्या सुट्टीच्या वेळी विद्यार्थ्याला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची शालेय प्रशासनाची माहिती.. - मात्र शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. - या दुर्दैवी घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतेय0
0
Report
Advertisement
कळमनुरी में गोळीबार: 11 आरोपी गिरफ्तार, तीन दिन की पुलिस रिमांड
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या कळमनुरी शहरात बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला वेग आला असून अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुढीपाड प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर कळमनुरी पोलिसांनी एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अकरा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गोळीबारात मागील नेमके कारण काय आहे तसेच या गोळीबारात आणखी कोणी सहभागी आहे का इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत...0
0
Report
नासिक के पिंपळगाव बसवंत में दो बैलों की भीषण भिड़ंत, घंटों चलते संघर्ष
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे ऊंबरखेड रोडवर दोन वळूंमध्ये जोरदार झुंज सुरू झाली. ही झुंज तब्बल तासभर सुरू राहिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. शाळेत जाणारे विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालक भयभीत झाले. या वळूंच्या झुंजीमुळे परिस्थिती गंभीर होत असल्याने नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही वळूंवर पाण्याचा जोरदार मारा केला. त्यानंतर तासभर सुरू असलेली झुंज अखेर सोडविण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या वळुंचे बंदोबस्त करावे अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून जोर धरू लागली आहे0
0
Report
गोसेखुर्द बाँध के 13 गेट आधा मीटर खुले, 1609 क्यूसेक पानी छोड़ना शुरू
Bhandara, Maharashtra:भोंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांसून पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात सततधार पाऊस झालेला आहे.यामुळे धरण्याच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले असून १६०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेत टप्याटप्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे गोसेखुर्द प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकानं खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.0
0
Report
Advertisement
दिल्ली पेपरफुटी बयान पर खोत को लेकर शिवसेना पलूस में विरोध प्रदर्शन
Sangli, Maharashtra:स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडी मारून शिवसेनेचा निषेध... नीट पेपरफुटी प्रकरणी सुरु असलेल्या दिल्लीतल्या आंदोलनावरून आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून विद्यार्थ्यांबाबत केलेल्या आतंकवादी विधानाचा सांगलीच्या पलूस मध्ये निषेध नोंदविण्यात आला आहे.शिवसेना ठाकरे पक्षाकडून आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे.अंधश्रद्धा भाऊ खोत यांनी दिल्लीतल्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनातील विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणून संबोधला आहे,आमदार खोत यांच्या विधानावरून राज्यभर तीव्र पडसाद ऊमटत आहेत.पलूस येथील शिवसेना ठाकरे पक्षाकडून आमदार खोत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं, जोरदार निदर्शने करत आमदार खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून विद्यार्थ्यांना बाबत केलेल्या विधानाचा निषेध नोंदवण्यात आला आहे.0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी में कांग्रेस का आंदोलन; शिक्षा मंत्री व गृह मंत्री के इस्तीफे की मांग
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी NEET पेपरफुटी अन् दडपशाहीविरोधात चिपळूणात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; शिक्षणमंत्री व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी! शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, NEET पेपरफुटी आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसच्या वतीने सायंकाळी जोरदार आंदोलन करण्यात आलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध करत गृहमंत्री अमित शाह यांनीही राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरत निषेधाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या।0
0
Report
गर्भवती की दीड किलोमीटर स्ट्रेचर यात्रा: गडचिरोली में स्वास्थ्यकर्मियों ने बचाई जान
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दुर्गम کوئیंदूळ गावात प्रसूतीवेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली. पक्का रस्ता आणि वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे घडलेल्या या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुरक्षित प्रसूती झाली असून माता आणि नवजात बालिका दोघींची प्रकृती स्थिर आहे. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोईंदूळ गावातील पुष्पा सुनील परसा (३०) यांना सोमवारी सकाळी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य पथक तातडीने गावात दाखल झाले. मात्र, गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने तसेच वाटेत नाला असल्यामुळे रुग्णवाहिका थेट पोहोचू शकली नाही. परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुष्पा परसा यांना स्ट्रेचरवरून दीड किलोमीटर अंतर पार करून रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोईंदूळ, रेकनार, गडदापल्ली आणि गुंमडी ही चार आदिवासीबहुल गावे पावसाळ्यात अक्षरशः संपर्कविहीन होतात. कसनसूर किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना दोन मोठे आणि तीन लहान असे एकूण पाच नाले पार करावे लागतात. मुसळधार पावसात हे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो आणि आरोग्य सेवांसह दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.0
0
Report
Advertisement
दिल्ली के लाठीचार्ज के विरोध पर देशभर में आक्रोश, संगमनेर में मोर्चा
Shirdi, Maharashtra:दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झाल्या लाठीचार्ज विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय... संगमनेर शहरातून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला.. संगमनेर बसस्थानकातून निघालेला मोर्चा शहरातून मार्गक्रमण करत महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ घेण्यात आला...0
0
Report
सरकार के दखल से छात्रों के आंदोलन पर लोकतंत्र खतरे में: जाधव का आरोप
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. भास्कर जाधव यांचा सरकारवर थेट हल्ला: लोकशाही आणि संविधान धोक्यात; विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवणारे सरकार अहंकारी.. विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन.. जंतर-मंतरवर आंदोलन करणारी मुले या देशाची भावी पिढी होती. त्यांनी कोणताही कायदा हातात घेतला नव्हता किंवा दहशतवादी कृत्य केले नव्हते.. सरकारकडून चिथावणी आणि उचकवाउचकवी.. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उकसवण्याचे आणि चिथावणी देण्याचे काम थेट सरकारनेच केले.. चर्चेचा मार्ग नाकारला.. लोकशाहीचा मुख्य आत्मा 'चर्चा' हा आहे, मात्र सरकारने विद्यार्थ्यांशी कोणतीही चर्चा न करता हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.. पोलिसांचा गैरवापर आणि दगड भरलेले डंपर.. गंभीर आरोप करताना जाधव म्हणाले की, आंदोलनाच्या ठिकाणी नेमप्लेट आणि युनिफॉर्म नसलेले पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांना दगड भरलेले डंपर पुरवण्याचे काम राज्यकर्त्यांनीच केले.. राज्यकर्त्यांचा अहंकार.. 'आम्ही ठरवू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण' असा अहंकार सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्था व प्रशासनावर टीका.. कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यकर्त्यांना प्रेरणा मिळत आहे.सध्या न्यायव्यवस्था कोणाची तरी बटीक झाल्यासारखी आणि प्रशासन जुलमी कारभार करणाऱ्या गुंडांसारखे वागत आहे.. संविधान आणि लोकशाही धोक्यात.. देशातील लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सध्या पूर्णपणे धोक्यात आले आहे.. अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांना 'आतंकवादी' लेबल.. हे आंदोलक आतंकवादी, नक्षलवादी की विदेशी गुंड होते हे शोधायला सरकारला २०-२१ दिवस लागले का? स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांवर दहशतवादी असल्याचा ठपका ठेवत आहे.. सरकार तात्काळ बदलण्याची मागणी.. मारहाण करण्यापूर्वी सरकारने चर्चा का केली नाही? हे सरकार अत्यंत अहंकारी झाले असून ते तात्काळ बदलले पाहिजे. मोदींना असं वाटतंय मी म्हणजे विश्वगुरु..0
0
Report
रामदास कदम की मजाकिया टिप्पणी से उद्धव ठाकरे के दिल्ली दौर में हलचल
Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी.. उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतर आंदोलनातील उपस्थितीवर रामदास कदमांची मिश्किल टीका;बाळासाहेबांच्या विचारांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान.. *दिल्ली दौऱ्यावर मिश्किल टोला..* शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या जंतरमंतरवरील आंदोलनातील सहभागावर मिश्किल शब्दांत टीका केली.. *राजकीय आयुष्यातील पहिलेच आंदोलन..* उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात ते प्रथमच एखाद्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले,असे म्हणत कदमांनी चिमटा काढला.. *'दिल्ली तुम्ही सांभाळा...'* राहুল गांधींना उद्धव ठाकाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यावर प्रश्न उपस्थित करत, "दिल्ली तुम्ही सांभाळा, महाराष्ट्र आम्ही सांभाळतो," असा टोला रामदास कदम यांनी लगावला.. *विचारसरणीवर स्पष्टतेची मागणी..* राहुल गांधींना पाठिंबा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ते सहमत आहेत की नाही,यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली.. *राम मंदिर मुद्द्यावरून आव्हान..* प्रभू श्रीराम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याआधी उद्धव ठाकरेंनी स्वतःचा नैतिक अधिकार सिद्ध करावा, असे कदम म्हणाले.. *राजकीय संघर्ष तीव्र होणार..* उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे..0
0
Report
Advertisement
