icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लोहगड किले हत्या मामले में आरोपी के वकील का दावा: केतन की मौत दुर्घटना

Varsoli, Maharashtra:Anchor: लोहगड किल्ला खून प्रकरणात आरोपी चेतन चौधरी यांचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचे लग्न ठरले होते आणि दोघांमध्ये चांगले संबंध होते. लोहगड किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि हा प्रकार अपघाती असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. तसेच, केतनच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याचेही वकिलांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितलेली सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असून तपास यंत्रणा आता या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करणार आहे।।
0
0
Report
Advertisement

भाऊसाहेब वाकचौरे ने मतदारसंघ में प्रवेश के साथ बड़ा विकास वादा किया

Shirdi, Maharashtra:बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात समृद्धी महामार्गाच्या एक्झिट पॉईंटवर स्वागत उबाठाच्या इशाऱ्यानंतर वाकचौरे यांचे जोरदार स्वागत फटाक्यांची आतिशबाजी करत मतदार संघात स्वागत शिंदे गटाच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत बंडखोरी केल्यानंतर वाकचौरे प्रथमच मतदारसंघात साई दर्शन घेऊन निवासस्थानकडे होणार रवाना खासदार भाऊसाहेब वाकचौरे_byte_ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे मी घेतलेला निर्णय योग्य टीका करणारे थोडे आनंद व्यक्त करणारे जास्त मी मतदार संघात फिरणारच आणि पाय ठेवणारच आहे ठाकरे गटाला प्रतिउत्तर मतदारसंघाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी मी हे पाऊल उचलले मतदारसंघात अनेक प्रोजेक्ट आणायचे आहेत प्रलंबित प्रश्नांसाठी आता निधी आणता येईल निधी खर्च न केल्याच्या बातम्या चुकीच्या 9 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला त्यातील अनेक कामे प्रस्तावित डी पी डी सी आणि खासदार निधीतून अनेक कामे मंजूर आहेत पैसे कोण देतंय आणि कोण घेते हे आरोप करणाऱ्यांनाच माहीत असेल केले जाणारे आरोप धादांत चुकीचे आम्ही सहाजण मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत गेलो राजकारणात चांगलं आणि वाईट हे निवडणूक ठरवते हा मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांच्या कामासाठी प्रवेश केलाय माझ्या दृष्टीने हा विश्वास घात नाही Byte खा.भाऊसाहेब वाकचौरे
0
0
Report

विदर्भ में हल्की बारिश से गर्मी में राहत, अकोला समेत जिलों में रिमझिम बरसात

Akola, Maharashtra:नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातही विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही काहीशी घट झाली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

कल्याण-डोंबिवली में पहले ही दिन प्यास ने नाले-जलभराव मचा दिया; छात्र-चालकों को हुआ भारी नुकसान

Kalyan, Maharashtra:पावसाच्या पहिल्याच दिवशी कल्याण पूर्वेतील रस्ते जलमय दोन तासाच्या रिमझिम पावसाने रस्त्यात पाणी साचले.. पहिल्याच पावसाने केली नालेसफाईची पोलखोल कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळील रस्ता जलमय ... विद्यार्थ्यांचे हाल ,वाहनचालक त्रस्त .. कल्याण डोंबिवलीकरांची पावसाची प्रतीक्षा आज संपली . सकाळपासूनच कल्याण डोंबिवली मध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात पावसाची रिमझिम सुरू होती सायंकाळनंतर पावसाने काहीसा जोर धरला . मात्र या पहिल्याच दिवसाच्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईचे मात्र पोलखोल झाली. कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळ रस्ता जन्म झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले तर वाहन चालकांचे देखील तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जातो कोट्यवधी रुपया नालेसफाईसाठी खर्च केले जातात मात्र सालाबाद प्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसोपायची पोलखोल केली आहे
0
0
Report
Advertisement

अकोल्यात मामा-भाची ने आत्महत्ये का प्रयास, अस्पताल में भर्ती

Akola, Maharashtra:अकोल्यात मामा आणि भाचीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..वेळीच अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका पोहचल्याने दोघांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्यामुळे दोघांवर उपचार सुरू आहेत. गजानन मारुती जगदन आणि पल्लवी संतोष भुसारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत.. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही नात्याने मामा आणि भाची आहेत कौटुंबिक कारणामुळे दोघांनी आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केल्याच समोर येत आहे..या दोघांनी रेल्वे रुळाजवळ विष प्राशन केलं होतं..याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.. या घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे चालक मुकेश ढोके यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून या दोघांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्यात आले आहे.. दोघांवर सध्या उपचार सुरू असून पुढील तपास जीआरपी पोलिस करीत आहेत..
0
0
Report

अकोला के अकोट पंचायत में घरकुल लाभार्थी धरना, 50 हजार अनुदान शुरू, बाकी मांगें जारी

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समिती कार्यालयावर आज सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी, युवक व नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. घरकुलाचे प्रलंबित हप्ते, मोफत वाळू, घरकुल मजुरीची थकीत रक्कम, वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडला आहे. आंदोलकांनी कवले हातात घेऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलांचे बांधकाम सुरू केले आहे, मात्र हप्ते वेळेवर न मिळाल्याने घरे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी वाढीव ₹५० हजार अनुदानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याबद्दल शासन व प्रशासनाचे आभार मानले. मात्र उर्वरित मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
0
0
Report
Advertisement

मुरतिजापुर में किसान अन्नत्याग आंदोलन: 17,500 रुपये पिक बीमा, ऋण माफी और तुरंत वितरण की मांग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. Vo : मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रगती शेतकरी मंचाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. विमा भरलेल्या तसेच विमा न भरलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना १७ हजार ५०० रुपयांची पीक विमा मदत तातडीने देण्यात यावी, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, आगामी खरीप हंगामापूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे सुरळीत वाटप करावे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार ४०० रुपयांचा प्रोत्साहन निधी त्वरित वितरित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.कालपासून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. दरम्यान, कडक उन्हात आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन अथवा निर्णय मिळाला नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा प्रगती शेतकरी मंचाने दिला आहे. Byte : राजू वानखडे, अध्यक्ष, प्रगती शेतकरी मंच. Vo 2 : दरम्यान, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनीही या आंदोलनाची दखल घेत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. Sound Byte : हरीश पिंपळे, भाजपा आमदार.
0
0
Report

नालेसफाई में बाल मजदूरी, पोकलेन बकेट में बच्चों को बैठाकर किया गया स्टंट—आरोप

Ambernath, Maharashtra:बालसुरक्षेला तिलांजली?; नालेसफाई करताना पोकलेनच्या बकेटमध्ये बसून अल्पवयीन मुलांना फिरवले नालेसफाई की स्टंट ? अल्पवयीन मुलांना पोकलेनच्या बकेटमध्ये बसवून जीवघेणा स्टंट व्हिडिओने उघडला नालेसफाईतील धक्कादायक कारभार; कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी  Anchor उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामातील संतापजनक प्रकार समोर आला असून, मोठ्या नाल्यात अल्पवयीन मुलांना उतरवून त्यांच्याकडून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसवून खेळविल्याचे व्हिडिओ समोर आल्याने बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर तात्काळ निलंबन आणि फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.उल्हासनगर शहरात पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला असतानाच उल्हासनगर-१ येथील राजीव गांधी नगर परिसरातील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामात बालकामगारांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
0
0
Report
Advertisement

विधान परिषद चुनाव में कांग्रेस- महाविकास आघाडी को बड़ा नुकसान, नांदेड समेत जिलों में पलटा

Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाल्याचे दिसून आले. एकेकाळी गड असणा-या जिल्ह्यातही काँग्रेसची वाताहत सुरु आहे. आता डॅमेज कंट्रोल साठी प्रदेशाध्यक्ष प्रयत्न करताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सर्वच जागी पराभव झाला. लोकसभा निवडणुकांनंतर विशेषता काँग्रेसची राज्यात पिछेहाट सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वाधिक मतदार असताना काहीठिकाणी काँग्रेसने योग्य वाटाघाटी केल्या नसल्याचीही चर्चा आहे. नांदेडमध्येही त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसकडे 92 नगरपालिका असताना एववेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन ऑपरेशन टायगर मध्ये नाव असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकार यांचे सुपुत्र कृष्णा पाटील ला उमेदवारी दिली. काँग्रेसने कृष्णा पाटील यांना मतदान करण्याचा व्हीपदेखील काँग्रेसने काढला होता. पण उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी गळ घातल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यातून काँग्रेसची फसगत तर झालीच शिवाय उद्धव ठाकरे यांचा विश्वासघाती झाल्याचे सपकाळ म्हणाले. विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी ही मर्यादित निवडणूक होती. या निवडणूकितून जो काही निकाल आलाय तो जय आणि पराजय मानला नाही पाहिजे असे मला वाटते असेही सपकाळ म्हणाले. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी सर्व नऊ आमदार आणि विधान परिषदेचे आमदार हे आघाडीचे होते. पण चव्हाण भाजपात गेले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णता ढासळला. आज जिल्हा सर्वांना आमदार माहितीचे आहेत तर विधान परिषदेवर महायुतीच्याच उमेदवाराचा विजय झालाय. पण नांदेड जिल्हा काँग्रेसचा विचारणा मानणारा जिल्हा आहे काँग्रेस यातून उभारी घेईल असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. महायुतीच्या लाटेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना दिसत आहे. या लाटेत टिकून राहण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top