445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिति चुनावों में तकनीकी गड़बड़ी, 729 सदस्य प्रभावित
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... तब्बल ९ वर्षांनंतर जाहीर झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा तांत्रिक घोळ समोर आला आहे. तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत पैकी फक्त १८ ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानासाठी पात्र ठरले असून, ७८ ग्रामपंचायतींचे सुमारे ७२९ सदस्य मतदानापासून वंचित राहिले आहेत. मतदार यादीसाठी १ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक होता, ज्या दिवशी हे सर्व सदस्य पदावर होते. मात्र, २३ आणि २४ फेब्रुवारीला त्यांची मुदत संपल्यामुळे, गटविकास अधिकारी (BDO) यांनी २ मार्च रोजी यादी पाठवताना अर्हता दिनांकाचा विचार न करता या ७२९ सदस्यांची नावे वगळली. प्रशासनाच्या या चुकिmुळे लोकप्रतिनिधींवर अन्याय होत आहे. त्यामुळे या सदस्यांची नावे तातडीने मतदार यादीत समाविष्ट करावीत आणि या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिरूर हवेलीचे माजी आमदार अँड अशोक पवार यांनी केली आहे. यासंदर्भात पवारांनी मुंबई हायकोर्टात याचीका दाखल केलीय.0
0
Report
शिंदे का ताजा दावा: आनंद परांजपे अब शिवसेना में, राष्ट्रवादी में नहीं
Nanded-Waghala, Maharashtra:आनंद परांजपे आता राष्ट्रवादीत नाहीत शिवसेनेत आहेत अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी नांदेडमध्ये दिली. आनंद परांजपे यांना महामंडळ देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादीतून होते या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांनी हे उत्तर दिले. यावर अधिक बोलण्याचे श्रीकांत शिंदे यांनी टाळले.0
0
Report
बारिश में गोंडपिपरी में भूमि-अधिग्रहण विरोधी मोर्चा, विजय वडेट्टीवार ने नेतृत्व किया
Chandrapur, Maharashtra:भर पावसात गोंडपिपरी येथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघाला भूमी अधिग्रहणाविरोधात मोर्चा. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे आज भर पावसात भूमी अधिग्रहणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी, धानापूर, लिखितवाडा, वडोली आणि आजूबाजूच्या 12 गावांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांच्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठी शासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून स्थानिक ग्रामस्थांचा या भूमी अधिग्रहणाला कडाडून विरोध आहे. विशेष म्हणजे या बारा गावांपैकी एक असलेलं करंजी हे विजय वडेट्टीवार यांनी आज गोंडपिंपरी येथे भूमी अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेला हजेरी लावली आणि त्यानंतर गोंडपिंपरी SDM कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ते सहभागी झाले.0
0
Report
Advertisement
नीट पेपर फूट के बाद 11-12वीं में बायोमेट्रिक हाजिरी अनिवार्य, निजी क्लासेस पर विवाद
Pune, Maharashtra:नीट पेपर फूट के बाद 11-12वीं में बायोमेट्रिक हाजिरी अनिवार्य, निजी क्लासेस पर विवाद असंयमहीन पक्षलेखन जारी रहा। शिक्षण विभाग ने राज्य के 11-12वी कॉलेजों में बायोमेट्रिक हजेरी लागू करने का प्रस्ताव मंजूर किया है, जिसे पालक और विद्यार्थी वर्ग ने स्वागत किया है। परंतु IMPLEMENTATION को लेकर संदेह बना हुआ है। यह इंटिग्रेटेड पैटर्न क्या सचमुच शिक्षा का बाज़ार बन गया है? पार्श्वभूमी में NEET पेपर फूट मामलों के बाद निजी क्लास चालकों की भूमिका सामने आई है। मेडिकल- इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया NEET, JEE, CET मार्क्स पर आधारित होने के कारण 11वीं-12वीं की वर्षगाँठ पहले से ही कमजोर थी। हाल ही में कुछ निजी क्लास चालकों ने कॉलेजेस को अपने पक्ष में लाकर यह पैटर्न चलवाने शुरू कर दिये। कम से कम लाख दो लाख भरकर प्रवेश और कॉलेज जाना नहीं होगा, परीक्षा फॉर्म वह व्यक्ति-समुच्चय भर देगा। इस इंटिग्रेटेड पद्धति पर चर्चा और चिन्ता दोनों बढ़ी हैं। प्रवक्ता के अनुसार अब बाकी सब खबरों के साथ यह भी बताया गया कि बायोमेट्रिक हजेरी के साथ शासन ने निगरानी के लिए पत्थर भी उठाने चाहिए ताकि इस अवैध पद्धति पर रोक लग सके।0
0
Report
अंबरनाथ तहसील कार्यालय में पानी की बर्बादी, सरकारी गाड़ियाँ धोने के लिए पानी का दुरुपयोग
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ तहसील कार्यालयात पाण्याचा अपव्यय पाण्याची टंचाई असतानाही धुतल्या जात आहेत सरकारी गाड्या0
0
Report
बुलढाणा पुलिस की लापरवाही: मृत बेटी के हत्या से पिता-भाई जेल, शिवानी अभी जीवित
Buldhana, Maharashtra:जिवंत मुलीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाला पाठवलं जेलमध्ये.. बुलढाणा पोलिसांनी मृत घोषित केलेली शिवानी जिवंत जळगाव जामोद पोलिसात हजर.. बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणाचा एक अजब नमुना समोर आला आहे. घटना अशी की वीस दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं.. या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला, विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता.. मध्य प्रदेशातील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर असे या मृत मुलीचं नाव असून तिचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असून ती विवाहित असून देखील प्रियकराची ओढ असल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणात जवळ आणून टाकला होता.. अशी उकल पोलिसांनी केली होती.. याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्या चा आरोप ठेवत पोलिसांनी शिवानी कळमेकर चे वडील बापूराव कळमेकर तसेच भाऊ यांना अटक करून आत दोघेही जेलमध्ये आहे .. मात्र शिवानी कळमेकर जिवंत असून तिने आज तिच्या प्रियकरा सोबत आज बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्याच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला असल्याच्या माहिती आहे .. तर काही वेळापूर्वीच शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून स्थानिक जळगाव जामोद पोलीस त्याचा जबाब घेत आहेत .. मात्र पोलिसांनी आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए तपासणी न करता शिवानी कळमेकर च्या वडिलांना व भावावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकल आहे.. त्यामुळे या प्रकरणात जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे.. मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता, ती नेमकी कोण , हा प्रश्न उपस्थित राहत आहे.. तर पोलीस या घटनेबद्दल बोलायला सध्या तरी तयार नाहीत..0
0
Report
Advertisement
विदर्भ के तापमान में अंधाधुंध बढ़ोतरी: सरकार ने समिति बनाकर अध्ययन का सुझाव दिया
Yavatmal, Maharashtra:विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, यंदाचे ऊन तर भयंकर है त्यामुळे आता पर्यावरणाकडे लक्ष दिले पाहिजे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारने नेमावी.0
0
Report
अलिबाग के विधायक दळवी ने तटकरे पर बरसाए, टिकट का सवाल गरम
Chendhare, Maharashtra:अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुनील तटकरेंवर बरसले. सुनील तटकरे यांना पक्षातच कुणी विचारत नाही. यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा निर्धार. तटकरेंची अवस्था पाहता त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल का? आमदार महेंद्र दळवी यांना शंका. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शांत असलेले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर बरसले आहेत. सुनील तटकरे यांना त्यांच्या पक्षातच कुणी विचारत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. आसन डळमळीत असलेल्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. आतापर्यंत सुनील तटकरे यांनी आपल्या घरात तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेल्या युक्त्या यशस्वी झाल्या. परंतु यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा असा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या सदस्यांनी केलाय. आज सुनील तटकरेंना पक्षात कुणी विचारत नाही आणि त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल ka याची त्यांनाच खात्री नसल्याचं आमदार महेंद्र दळवी म्हणाले.0
0
Report
हर्णे में दो गुटों के बीच भीषण बवाल, पुलिस तैनात
Ratnagiri, Maharashtra:Ratnagiri रत्नागिरी से बड़ी खबर: दापोली तालुका के हरने में दो गुटों के बीच जबरदस्त बवाल, इलाके में तनाव!.. किले में शराब पीने को लेकर विवाद; हरने क्षेत्र में हिंदू-मुस्लिम समुदायों के बीच संघर्ष! स्थिति को नियंत्रित करने के लिए पुलिस मौके पर तैनात.. रत्नागिरी जिले के दापोली तालुका के हरने में दो युवकों पर 40 से 50 लोगों की भीड़ द्वारा बेरहमी से हमला किए जाने की सनसनीखेज घटना सामने आई है.. हरने किला परिसर में शराब पी रहे लोगों को रोकने पर हुए विवाद के बाद चिन्मय गुरव और रघुवीर नाम के दो युवकों पर जानलेवा हमला किया गया, जिसमें दोनों गंभीर रूप से घायल हो गए हैं.. इस घटना के विरोध में दापोली के शिवप्रेमी और आक्रोशित नागरिक रात में डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर एकत्र हुए और जोरदार रास्ता रोको आंदोलन करते हुए यातायात बाधित कर दिया.. नागरिकों ने आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की है, जबकि पुलिस ने समय रहते मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रण में कर लिया है.. दापोली पुलिस थाने में मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है और क्षेत्र में कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है..0
0
Report
Advertisement
माणगांव में नाबालिग लड़की हत्या: 24 घंटे में आरोपी शुभम उतेकर गिरफ्तार
Chendhare, Maharashtra:माणगाव पोलिसांनी २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या; हत्या करून मृतदेह जंगलात फेकला ..... माणगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येचं प्रकरण ....... गुन्ह्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात ...... अल्पवयीन मुलीच्या हत्येने गावात संताप ....... माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. निधी राकेश उतेकर (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. निधी ही आपल्या कुटुंबासह मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती. ती सेंट जेव्हियर्स शाळेत शिक्षण घेत असून नुकतच इयत्ता नववी उत्तीर्ण झाली होती. उन्हाळी सुट्टीसाठी सुमारे आठ दिवसांपूर्वी ती आई-वडील आणि भावासह मूळ गावी घरोशीवाडी येथे आली होती. सोमवार, २५ मे रोजी रात्री सुमारे नऊच्या sुमारास निधी ही वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरात सर्वत्र शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र तिचा काहीच मागमूस लागत नव्हता. दरम्यान, बुधवार, २७ मे रोजी घरोशीवाडी लगतच्या डोंगराळ आणि जंगल परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर निधीच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले असता मृतदेह निधीचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर संपूर्ण माणगाव तालुक्यात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह निर्जन जंगल परिसरात आढळून आला होता. तिच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली होती. मोबाईल कॉल डिटेल्स, परिसरातील हालचाली, स्थानिकांकडून चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी शुभम उतेकर याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी आणि मृत मुलगी एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, त्यामागे वैयक्तिक वाद होता की अन्य कोणते कारण, याबत पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. बाईट १ - राकेश उतेकार, मुलीचे वडील बाईट २ - संजय बांगर पोलिस निरीक्षक , माणगाव0
0
Report
उल्हासनगर गोलीकांड: आठ आरोपी गिरफ्तार, दो युवकों की मौत
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक झाली आहे. गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. उल्हासनगर कैलास कॉलनी चौकात झालेल्या गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. जुन्या वादातून रक्तरंजित घटनेत अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. शेखर बिराजदार आणि अजय राव अटक झाले, अजित शेखला Hillline पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन आरोपी न्यायालयात हजर झाले असता त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर सागर पाटील यालाही अटक झाली. पुढील तपासात 26 मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली.0
0
Report
Kalyaan में शादी के नाम पर 55 लाख की ठगी: दो महिला गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:दोन महिलांनी व्यवसायिकाला लग्नाचे आमिष दाखवत घातला 55 लाखांना गंडा दोन्ही भामट्या महिलांना अटक, Anc..कल्याण शहरात लग्नाचे आमिष दाखवत एका नामांकित व्यावसायिकाची तब्बल ५५ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Vo..कल्याण पश्चिमेतील एका दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा ही एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे सांगत तिने संबंधित व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून विश्वास संपादन करण्यात आला.यानंतर रोमा परदेशी हिने इन्शुरन्सच्या नावाखाली व्यावसायिकाकडून लाखो रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पॉलिसी सुरू करण्यात आली नव्हती. काही दिवसांनंतर जयश्री पाटीलच्या माध्यमातून रोमा हिने संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी होकार मिळाल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली.या दोघींनी मिळून त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल ५५ लाख रुपये घेतले होते. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.या प्रकरणात पोलिसांनी रोमा परदेशी, व जयश्री पाटील या दोघीना अटक करण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
सोलापुर अस्पताल परिसर में निजी वाहन में आग लगने से हड़कंप
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - रुग्णाला दवाखान्यात दाखल करताच खाजगी वाहनाला लागली आग. गंभीर रुग्णाला उपचारासाठी सोलापूरच्या श्री मार्कडेय रुग्णालयात दाखल करून अवघ्या काही मिनिटांतच खाजगी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडलीय. एमएच-१३ एसी-०६५९ क्रमांकाची चारचाकी व्हॅन एका गंभीर रुग्णाला घेऊन श्री मार्कडेय रुग्णालयात दाखल झाली. चालकाने तातडीने रुग्णाला खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयाच्या ओपीडी विभागात पाठवले. रुग्ण आत गेल्यानंतर चालक बाहेर पडत असतानाच वाहनातून धूर निघत असल्याचे त्याच्या निदর্শणास आले. हा प्रकार लक्षात येताच रुग्णालय परिसरात एकच धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ रुग्णालय परिसरातून बाहेर काढली आणि भिंतीलगतच्या मोकळ्या जागेत उभी केली. काही क्षणांतच चालकाच्या सीटजवळ आग लागली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळ आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
68 वर्षीय डॉक्टर के खाते से नौ लाख रुपए की ठगी, आरोपी महिलाएं हिरासत में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anc :68 वर्षीय महिला डॉक्टरच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने तब्बल नऊ लाख रुपये लंपास केल्याची तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने डुप्लिकेट सही मारून चेकच्या माध्यमातून नऊ लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या घरातून नऊ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर यांनी दिली आहे.0
0
Report
Kolhapur की तृतीयपंथी आपदा टीम ने महापुर के लिए पहली प्रशिक्षण स्कीम शुरू की
Kolhapur, Maharashtra:Kop Transgender Rescue Team Pkg (‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ हे उगाच बोललं जात नाही… एखाद्या चांगल्या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून झाली की त्याची दखल राज्यासह देशभर घेतली जाते… आता कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी तृतीयपन्थीयांची विशेष रेस्क्यू टीम तयार करण्यात आली आहे… विशेष म्हणजे ही देशातीलच नव्हते तर जगातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम असल्याचा दावा केला जातोय… आपत्तीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने मदतीसाठी पुढे यावं, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे… जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून तृतीयपंथीयांची विशेष आपत्ती व्यवस्थापन टीम आता पूरस्थितीत बचावकार्य करण्यासाठी सज्ज होत आहे… जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत राजाराम तलाव येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष पूर व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं… ‘मैत्री’ तृतीयपंथीय संघटनेच्या सदस्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला… या प्रशिक्षणामध्ये मोटरबोट चालविणे, पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना प्रथमोपचार देणे, आपत्कालीन बोट तयार करणे, लाइफ जॅकेट आणि सुरक्षा साधनांचा वापर, तसेच आपत्तीच्या वेळी समन्वय कसा साधायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं… दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामुळे तृतीयपंथीय सदस्यांना प्रत्यक्ष आपत्ती काळात मदतकार्य करण्याचं कौशल्य प्राप्त होणार आहे… मयुरी आळवेकर - अध्यक्ष, मैत्री संघटना सुहासिनी देवमाने - सदस्य, तृतीयपंथी आपत्ती टीम कोल्हापूर जिल्ह्याने २००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुराचा मोठा फटका अनुभवला आहे… जिल्ह्यातील नदीकाठच्या ६० टक्क्यांहून अधिक भागाला पुराचा तडाखा बसला होता… जीवितहानी कमी झाली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती… आजही महापुराच्या आठवणीने अनेक कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा येतो… त्यामुळे संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कायम सज्ज असते… जिल्ह्यात तब्बल २ हजार ४०० आपदा मित्र आणि आपदा सखी कार्यरत आहेत… जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक काम करत आहेत… आता या टीमसोबत तृतीयपंथीयांची रेस्क्यू टीमही खांद्याला खांदा लावून काम करणार आहे… प्रसाद संकपाळ - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या करवीर नगरीत सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समतेची भावना नेहमीच जपली जाते… तृतीयपंथीयांना समाजात समान सन्मान आणि संधी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत… त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे तृतीयपंथीयांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये करण्यात आलेला सहभाग… डॉ. विजय राठोड - जिल्हाधिकारी, कोल्हापूर कोल्हापूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करा अस आवाहन तृतीयपंथीयांच्या या संघटनेने केलं आहे… आपत्तीच्या काळात माणुसकीच सर्वात मोठी ताकद असते… आणि हीच ताकद आता कोल्हापुरातील तृतीयपंथीयांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे… समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची नवी दिशा देणारा हा उपक्रम सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय… प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Advertisement
