icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

निलंगा तालुक्य में आठ दिनों में चार किसान आत्महत्या: कर्ज और आर्थिक संकट गहरा

Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यात आठ दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या.... शेतकरी संकट पुन्हा ऐरणीवर... कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना आणि पेरणीसाठी पैशांचा तुटवडा... चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर.... लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाचा वाढता बोजा, पेरणीसाठी पैशांची चणचण आणि आर्थिक विवंचना यामुळे या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या सलग आत्महत्यांमुळे शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, प्रशासन आणि सरकारच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
0
Report

रिसोड में खेत से चोरी: 69,500 रुपये के माल की चोरी, तीन आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:रिसोड जिल्ह्यातील हराळ येथील शेतकरी अजिंक्य विलास खैरे यांच्या घरातून चोरीला गेलेला 69 हजार 500 रुपयांचा शेतीमाल रिसोड पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोयाबीनची 7 पोती आणि तुरीची 2 पोती असा एकूण 9 क्विंटल माल चोरीला गेला होता. तपास दरम्यान पोलिसांनी हराळ येथील गजानन कुंडलीक सरकटे, अमोल माणिक सरकटे आणि दीपक नामदेव सरकटे या तिघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेला संपूर्ण शेतीमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरातील शेतमाल चोरीच्या इतर घटनांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

राहुरी में निजी स्कूल बस पलटने से 20–25 छात्राएं घायल, जान की हानि नहीं

Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत काल सायंकाळी खासगी शाळेची विद्यार्थिनींना घेऊन जाणारी स्कूल बस अचानक पलटी झाल्याने २० ते २५ विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरी शहरातील एका खासगी शाळेची स्कूल बस सायंकाळी विद्यार्थिनीांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. रेल्वे स्टेशन, तांदूळवाडी, कोंढवड आणि शिलेगाव परिसरातील सुमारे ५० ते ५५ विद्यार्थिनी बसमध्ये होत्या. दरम्यान त्याचवेळी बसचा रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत २० ते २५ विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमी विद्यार्थिनींना राहुरीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
0
0
Report

सोलापुर महापालिका के लिपिक पर SIR कार्य में लापरवाही का मुकदमा दर्ज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - SIR च्या कामात हलगर्जीपणा केल्याने सोलापुर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल SIR च्या कामात हलगर्जीपणा केल्याने सोलapur महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR च्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत लिपिकविरोधात गुन्हा सोलोलापुर महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले रविकिरण मधुकर ढाले यांच्या विरोधात गुन्हा नोंद सोलापुर महापालिकेत सध्या SIR प्रक्रिया सुरु आहे, रविकिरण ढाले यांच्याकडे देखील SIR ची जबाबदारी आहे 27 जून रोजी त्यांना SIR साठीचे इन्यूमरेशन फॉर्म मतदारांना वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र ढाले यांनी हे फॉर्म ताब्यात घेतले नाहीत, वारंवार फोन करून देखील ते प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे रविकिरण ढाले यांनी निवडणूक राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद सहायक मतदान अधिकारी रामचंद्र माळी यांनी पोलिसांत दिली आहे
0
0
Report

वाशीम के जल प्रकल्पों में पानी बढ़ा, मानसून अभी राहत की कुंजी

Washim, Maharashtra:जून अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील जल प्रकल्पांतील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 131 मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील 160 लघु व 2 मध्यम अशा एकूण 162 प्रकल्पांतील पाणीसाठ्यात 2.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 100 मिमी कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी 10 टक्के जलसाठा असला, तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात चांगला पाऊस होणे अत्यावश्यक असून, नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.
0
0
Report
Advertisement

मतदाता पुनरीक्षण में 16 बीएलओ कर्मी गैरहाजिर, नोटिस के साथ कड़ी कार्रवाई की तैयारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमात संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १६ जणांनी अद्याप कामावर रुजू न होता टाळाटाळ केली आहे. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १४ मेपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१ अंतर्गत बीएलओंची नियुक्ती केली होती. प्रशासनाकडून ३० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी १४ जण बीएलओ म्हणून रुजू झाले आहेत. मात्र, उर्वरित १६ कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधूनही रुजू झाले नाहीत..
0
0
Report

शहादा नगरपालिका की सभा में सत्ता पक्ष और विपक्ष के बीच गरमा-गरमी; 9 प्रस्ताव मंजूर, 2 स्थगित

Dhule, Maharashtra:शहादा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण ११ विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी ९ विषयांना मंजुरि देण्यात आली, तर दोन विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले. सभेदरम्यान शहरातील विकासकामे, स्वच्छता, रस्ता सुरक्षा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली. मात्र, काही विषयांवरून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह भाजप नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी नगराध्यक्षांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांना उद्देशून, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून मला कधीही पत्र देत नाही, तरीही प्रशासनाच्या कामकाजाबाबत तक्रारी करता, अशी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभेचे वातावरण काही काळ तापले होते. अखेर चर्चेनंतर बहुतांश विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषय पुढील सभेसाठी स्थगित ठेवण्यात आले.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर में जून से बारिश, अब तक 3 मौतें, नुकसान की रिपोर्ट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात १ जूनपासून започलेल्या पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसात नऊ पशुधनाच्या नुकसान झाले असून जवळपास ११० कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी आता ते जिल्ह्यात स्थिरावले आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्या आणि सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, मध्यंतरी दोन ते तीन वेळा झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागांत दाणादाण उडाली होती. १ जूनपासून जिल्ह्यात आतापर्यंत १२४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्याच्या १३९.९ मि.मी. या नियमित सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात दोन-तीन दिवस पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे...
0
0
Report
Advertisement

कास पठार में दुर्लभ सातारी वायतुरा पौधे का आगमन, जैव विविधता फिर से जागी

Satara, Maharashtra:सातारा - जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर दुर्मिळ 'सातारी वायतुरा' वनस्पतीचे आगमन झाले आहे. मर्यादित अधिवासामुळे जागतिक स्तरावर दुर्मिळ ठरलेल्या या वनस्पतीच्या आगमनाने कास पठारावरील जैवविविधतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. व्हिओ 1- 'सातारी वायतुरा' अर्थात Aponogeton satarensis ही वनस्पती केवळ सातारा परिसरातच आढळते. पावसाळ्याच्या दरम्यान उमलणारी तिची गुलाबी-पांढऱ्या रंगाची आकर्षक फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कास पठारावरील तलाव आणि ओलसर भागात ही वनस्पती फुलते. मर्यादित अधिवासामुळे तिचा जागतिक स्तरावर दुर्मिळ वनस्पतींमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दुर्मिळ वनस्पतीचे संरक्षण आणि कास पठारावरील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी वनविभागाकडून जाळीदेखील बसवण्यात आली आहे.पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कास भागात गर्दी होऊ लागली आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report
Advertisement

भीमा घाटे में बारिश न होने से उजनी डैम पानी 28% से नीचे, चिंता बढ़ी

Pandharpur, Maharashtra:भीमा नदीच्या खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनी धरण भरण्याबाबत चिंता वाढली आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा 28 टक्के 4इतकी खाली गेली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पर्जन्य न झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानातील बदल लक्षात घेता शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले असून, समाधानकारक पावस झाल्यासच उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
0
0
Report

धुळे में शिंदे गुट प्रवेश से ठाकरे गुट को बड़ा झटका

Dhule, Maharashtra:धुळ्यात ठाकरे सेनेला मोठ खिंडार पडले आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी ठाण्यात शिंदेशेनेचे मंत्री अरुण सरनाईक व शिंदेसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाल्याने धुळ्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे सेनेला राम राम ठोकत कार्यकर्त्यांसह पाटील यांनी शिंदे सेनेत पक्ष प्रवेश केला. रात्री उशिरा हा पक्ष प्रवेश सोहळा ठाण्यात पार पडला. शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडी कडन नाशिक विधान परिषद शिक्षक निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी चांगलंच वातावरण तापलं होतं.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top