445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संभाजीनगर में बाबा फर्जन रोहिला गली के वाडे पर पुलिस दबिश, कुछ नहीं मिला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र चर्चेत असलेल्या कामगार नेता, ९० च्या दशकात दबदबा राहिलेल्या बाबा फर्जनच्या रोहिला गल्लीतील जुन्या वाड्याची पोलिसांनी झडती घेतली. वर्षभरापूर्वी फर्जनने सोडलेला हा अलिशान, जुन्या धाटणीत बांधलेला वाडा सध्या 'खंडहर' झाला असून तिथे घाणीने वेढा घातला आहे , फर्जनचा मुंबईत खासगी नोकरी करणारा मुलगा शहरात आल्यानंतर, त्याच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव व इतर पोलिसांनी तीन तास वाडा पिंजून काढला मात्र केवल गंजलेले जुने साहित्य, कारखान्यातील यंत्राचे अवशेष याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलें नाही...0
0
Report
कोल्हापुर के अंबाबाई मंदिर की छत से सीमेंट उखड़ना, संवर्धन कार्य पर मचे बवाल
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्या वेळी कोल्हापुरात सलग पाऊस कोसळत होता, त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर संवर्धनाचा भाग म्हणून अंबाबाई देवीच्या छतावरील सिमेंटचे भाग काढण्यात आले आहेत, दरम्यान शिखरांचेही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे, पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप काही नागरिक आणि संघटनांचा आहे. मंदिराचे संवर्धन करत असताना ग्रायंडरचा वापर केला जात असल्याचे देखील दिसून येत आहे. पुरातत्त्वीय नियमानुसार ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात नसल्याचे देखील अनेक भक्तांचे म्हणणे आहे.0
0
Report
वाशीम में मॉनसूनी देरी से फसल संकट, किसान बारिश का इंतजार कर रहे हैं
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.मात्र,गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरणी केलेली पिके करपू लागल्याने धोक्यात आली आहेत. पिकांच्या वाढीसाठी या टप्प्यावर पावसाची अत्यंत गरज आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे,ते पिके वाचवण्यासाठी विहिरी,बोअरवेल आणि तुषार सिंचनाद्वारे सिंचन करत आहेत.मात्र,सिंचनाची कोणतीही सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून,दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.याच परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी...0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में खाद्य तेल पैकिंग इकाइयों पर रेड, 2 करोड़ 93 लाख 35 हजार 603 रुपए का स्टॉक जप्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात अन्न व औषध प्रशासनाने शहरातील दोन नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग अस्थापनेांवर छापे टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील एक कंपनी, आणि शहरातील लक्ष्मण चावडी परिसरातील त्याच कंपनीच्या गोडाउनवर ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती सहायक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या अचानक तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवालानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल0
0
Report
रायगड में 8,914 पात्र किसानों को कर्जमुक्ति योजना का लाभ—जाँच पूरी
Chendhare, Maharashtra:जवळपास ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ .पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण .पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाचा निर्णय हा आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देणारा ठरणार असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून मोठा आधार मिळणार आहे.0
0
Report
शंभूराजे देसाई ने पिता की याद में भावुक श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया
Satara, Maharashtra:पाटण, सातारा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई हे आपल्या वडिलांच्या आठवणीने अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील मरळी येथील कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शंभूराजे देसाई यांनी वडिलांच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, समाजसेवेचा आणि दिलेल्या संस्कारांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. काही क्षण ते बोलूही शकले नाहीत. सभागृहातही भावनिक वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या कार्याला अभिवादन करताना शंभूरাজे देसाई यांनी त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा मार्ग कायम जपण्याचा निर्धार व्यक्त केला. स्टेज बाईट0
0
Report
Advertisement
यवला-नांदगांव मार्ग पर लग्जरी बस पलटी: एक की मौत, कई घायल; मार्ग बंद
Yeola, Maharashtra:येवला - नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटली... - एक जण जागीच ठार ; इतर प्रवासी किरकोळ जखमी.. - जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू - मध्य प्रदेशातील होती लक्झरी बस.. - अपघातावेळी बसमध्ये होते २० ते २५ प्रवासी असल्याची माहिती...आज पहाटेची घटना.. - लक्झरी बसवरील चालकाचे नियंत्रन सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती... - बस रस्त्यावरच आडवी झाल्याने येवला - नांदगाव रस्ता वाहतूक बंद... - येवला तालुका पोलीस घटनास्थळी दाखल क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू0
0
Report
मुंबई गोवा महामार्ग का माणगाव बायपास गणेशोत्सव से पहले खुला होगा
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गाची रायगडात रखडपट्टी माणगाव बायपास साठी नवीन डेडलाईन गणेशोत्सवापूर्वी बायपास पूर्ण क्षमतेने सुरू होणार कोलेटी पूल देखील पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत अँकर मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला हा बायपास गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होईल असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आधी ठेकेदारांची दिरंगाई त्यानंतर कोकण रेल्वेने विद्युत खांब हलवण्यात केलेला उशीर यामुळे या बायपासचे काम गेली ५ वर्षे रखडलं आहे. या बायपास सह महामार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी。0
0
Report
आगरी कोळी समाज भवन के भूमिपूजन से इलाके में एकजुटता की मांग
Kalyan, Maharashtra:आगरी कोळी समाज भवन साठी भूमीपुत्रांची एकजूट !! कल्याण जवळील मलंगगड रोड नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आगरी कोळी समाज बांधव एकवटले आगरी कोळी समाज भवनचे केलं भूमीपूजन शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधी कडे वारंवार पाठपुरावा करून देखील आगरी कोळी समाज भवनसाठी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कल्याण मलंगड नांदिवली परिसरात स्थानिक भूमिपुत्र आज एकवटले सर्वपक्षीय आगरी कोळी समाज बांधवांनी एकत्र येऊन नांदिवली तलावाजवळ जागेत आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन सोहळा केला . यावेळी नांदवली मधील सर्वपक्षीय आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रत्येक राजकीय पक्षाकडे कल्याण पूर्वेतील नांदवली परिसरात आगरी कोळी समाज भवन उभारण्याचे मागणी केली मात्र आजपर्यंत कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आमच्या जागा विविध विकास कामांसाठी गेलेत इतर समाजासाठी जागा देता मग आमच्यावर अन्याय का असा सवाल यावेळी आगरी कोळी बांधवांनी उपस्थित केला . त्यामुळे आज आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून या ठिकाणी आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन केल्याचे सांगितले0
0
Report
Advertisement
Vinayak Raut Accusations: Rane Says Won't Back Down – A War of Words in Sindhudurg
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, आमदार निलेश राणे ऑन विनायक राऊत --- असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. आता ते प्रकार त्यांच्या घरच्यानीच बाहेर काढलेत. आता ते दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. माणूस असा असूच शकत नाही अशी कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलीत. लाज वाटते ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याच नाव त्यांनी खराब केलंय. हे कोणी केलेलं षडयंत्र नाही तुम्ही केलेलं פाप आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांनी आपलं तोंड उघडू नये. एवढ्या खालच्या थराला राजकारणात कोणी गेलेलं नाही. विनायक राऊत हे ह्यापेक्षा खाली जाऊ शकत नाहीत त्याचं तोंड काळ झालेलं आहे. ऑन विनायक राऊत राणे टीका --- खरंच आहे. त्यांना नियतीने धडा शिकवलाय. काम करण्यापेक्षा त्यांनी आमच्यावर टीका केली. आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही. कायम त्यांनी राणेंना संपवण्याच टार्गेट त्यांनी केलेलं पण राणे संपले नाहीत. आम्ही असल्या धंद्यात नाही. अजून खूप काही आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार ज्यांनी तक्रार केली त्यांच्या कडे अजून बराच साठा आहे. आता विनायक राऊत यांनी आपली थोबड बंद करावीत. ऑन मनी लाँड्रिंग --- विनायक राऊत काळाबाजारी माणूस आहे. व्हाईट इन्कम आणि विनायक राऊत यांचा संबंध काय? राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होणार ह्या धंद्यात ते 10 वर्ष राहिलेत. मणी लाँड्रिंग चे 17 लाख मोजू नका 17 करोड पण होऊ शकतील. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. माझ्या आयुष्यात किंमत नसलेला माणूस आहे जे तपासात बाहेर येईल ते ठप्प करणारे असेल0
0
Report
उदय सामंत बोले: लाड़की बहन योजना बंद नहीं होगी, 3 करोड़ महिलाएं लाभ लेंगी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री उदय सामंत ऑन लाडकी बहीण योजना (अरविंद सावंत) — अरविंद सावंत यांचं तुम्ही मनावर घेऊ नका त्यांचा महाराष्ट्रात कोणीही मनावर घेत नाही. 92 लाख कमी झाले म्हणता मात्र 3 कोटी महिलाना आम्ही त्याचा फायदा देतो ते कोणच बोलत नाही. ज्यांनी दुसऱ्यासाठी कधीच काही केलं नाही त्या उबाठाच्या लोकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. पात्र महिलांची लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही .. ऑन विनायक राऊत — हा त्यांचा घरगुती विषय आहे. कोर्टाचा निर्णय आला की बोलू.. विनायक राऊत आंतरराष्ट्रीय विषय नाही ऑन आडाळी midc — नवीन उद्योजकांना जागा मिळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन midc बाबत योग्य जागा मिळाली तर निर्णय घेऊ ऑन अणुऊर्जा प्रकल्प — आम्ही लोकांसोबत आहोत. कुठलाही प्रकल्प आम्हाला लादायचा नाही.0
0
Report
आशा वर्कर्स के आंदोलन से अकोला में वेतन, पेंशन और सामाजिक सुरक्षा की मांग तेज
Akola, Maharashtra:अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटना (सीटू) यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. वाढीव प्रोत्साहनपर मानधनाची अंमलबजावणी, थकीत रकमेचा तातडीने भरणा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा और पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले. मार्च 2025 मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी केला. गेल्या एका वर्षाची थकबाकी तातडीने अदा करावी, यासंदर्भातील शासन आदेश त्वरित काढावा, निश्चित प्रोत्साहन रकमेवरील अटी रद्द कराव्यात तसेच आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन लागू करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.0
0
Report
Advertisement
देवकुंड घटना: 25 लोगों के खिलाफ मामला दर्ज, एजेंट-गाइड-पर्यटक शामिल
Chendhare, Maharashtra:देवकुंड अपघातानंतर पोलिस ॲक्शन मोडवर. २५ जणां विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. बुकिंग एजंट, गाइड आणि पर्यटकांचा समावेश. ऑनलाईन बुकिंगवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला.0
0
Report
ग्रामवासियों ने शिक्षकों की मनमानी के चलते स्कूल के द्वार पर उपवास शुरू किया
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक एल्गार: कामचुकार शिक्षकांच्या बदलीसाठी गावकरी रस्त्यावर! बुलढाण्यातील मंगरुळ नवघरे गावात शिक्षणाचा एक विसंगत चेहरा समोर आला आहे. जिथे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवत्तेमुळे खासगी शाळांनाही मागे टाकत आदर्श ठरली आहे, तिथे त्याच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल मात्र शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हायस्कूलमधील पाच शिक्षकांवर कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणाचा ठपका ठेवत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. वारंवार तक्रार करूनही सुधारणा न झाल्याने, आज १३ जुलैपासून ग्रामस्थांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे. दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई किंवा बदलीची मागणी करत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
गडचिरोली के भामरागढ़ में स्वास्थ्य सुविधाओं की कमी: मरीज खाट पर नदी पार कर इलाज के लिए आगे बढ़ा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत आरोग्य सुविधांसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गंभीर आजारी रुग्णाला खाटेची कावड वरून वाहून नेत टिनाच्या डोंग्यातून नदी पार करून उपचारासाठी नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंगाडी गावातील संतोष जेट्टी (२९) याला किडनीबाबत समस्या होती. अवयवात गंभीर संसर्ग झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाली. रात्रीचा अंधार, नदीत पाणी आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही वाहतूकची सुविधा नसल्याने गावकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राही. अखेर ग्रामस्थांनी संतोष जेट्टी यांना खाटेवर झोपवून नदीपर्यंत आणले. त्यानंतर जीव धोक्यात घालून त्यांना टिनाच्या डोंग्यात बसवून नदी पार करण्यात आली. नदी ओलांडल्यानंतर पुन्हा खाटेवरून त्यांचा प्रवास सुरू करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ रुग्णवाहिका गुंडेनूर नाल्यापर्यंत पाठविली. तेथून रुग्णाला घेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टर मिनल, गजेंद्र रंधये आणि संदीप गोटा यांनी रुग्णाची प्रकृति लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे रवाना केले. बंगाडी हे गाव लाहेरीपासून सुमारे ७ किमीवर असून येथे ३० ते ४० घरांची वस्ती आहे. दुर्गम भागातील नागरिकांनाही आजही आरोग्य, रस्ते आणि वाहतुकीच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.0
0
Report
Advertisement
