Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!

Oct 08, 2024 08:32:04
Yavatmal, Maharashtra

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 21, 2025 08:35:41
Kolhapur, Maharashtra:आरोगymmंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे On swine fever आफ्रिकन डुकरांमध्ये अशा प्रकारचा आजार आढळून येत आहे. नाशिकच्या कलेक्टर आणि त्या संदर्भात सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. क्वारंटाईन देखील केलंय. स्वाइन फ्लू हा विषय डुकरांच्या संबंधित आहे. माणसांना कोणताही प्रादुर्भाव होत नाही. तरीदेखील हा संसर्ग वाढू नये, यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारीांनी खबरदारी घेतली आहे Long Covid त्रास पोस्ट कोविड मध्ये असे प्रकार दिसत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आपण एक बैठक घेतली आहे. लोकांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातल्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. On भाजपा शिंदे गटा विरोधात भूमिका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, याला स्थानिक संदर्भ.. गटातटाचे राजकारण.. सर्वांना संधी देण्यासंदर्भात नेत्यांची होत असलेली कसरत त्याचाही तो भाग आहे. आपण पाहिले असेल शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर मध्ये तिथले विद्यमान आमदार माजी मंत्री यड्रावकर यांचे स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीचा समन्वय व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही, तसेच प्रसंग अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. स्थानिक संदर्भानेच अशा निवडणुका होत असतात.. तिथल्या संदर्भांना जिल्हास्तर आणि राज्य स्तरावर जोडण्याचा प्रयत्न झाला, तर वड्यावरचे तेल वांग्यावर करण्यासारख्या आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच होत असतात.. On कोल्हापूर जिल्ह्यातील 35 गावांना ब कार्ड ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे पाण्याची गुणवत्ता.. दूषित पाण्यामुळेच बहुतांशी सर्व आजारांना निमंत्रण दिले जाते.. त्यामुळे त्याच्यासाठी आरोग्य विभागाचे टीम सातत्याने काम करत असते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या CO यांनी जी माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी ज्या गावांना पिवळं कार्ड मिळाला आहे त्या गावातील ग्रामपंचायतींना पाण्या संदर्भात काळजी घेण्याची सूचना दिली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 21, 2025 08:21:06
Pune, Maharashtra:राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष पदाची निवड झाली आहे बिनविरोध झालेले नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचे नातलग असल्याचा देखील समोर आला आहे यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे अहिल्या नगरच्या राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका केली आहे लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार असताना सत्तेच्या माध्यमातून त्यांना मतदान न करून देण्याचा प्रकार सबंध महाराष्ट्र पाहत असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे
37
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 21, 2025 08:20:49
Ratnagiri, Maharashtra:अनेक जण आज उमेदवारी अर्ज मागे घेतील - सामंत समज - गैरसमजूत झाल्याने काही फॉर्म भरले गेले - सामंत फॉर्म मागे घेतल्यामुळे अनेक नगरसेवक बिनविरोध - सामंत आणखीन देखील काही जण फॉर्म मागे घेतील - सामंत नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार - सामंत बंडखोरी मागे घेण्याबाबतचे यश आले ते मी तुम्हाला सांगतोय - सामंत चिपळूण नगर परिषदेतील वस्तुस्थिती 3 नंतर कळेल - सामंत रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग मध्ये युती तुटण्यास जबाबदार असं निलеш राणे बोले नाहीत... सिंधुदुर्गातील राजकारणातील संकेत वेगळे - सामंत शेखर निकामी आणि आंधळा विश्वास कोणावर टाकला हे माहीत नाही... शेखर निकम माझे सहकारी - सामंत मित्रा पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे.. नौपाडा मारहाणीवर सामंत यांचं उत्तर दोन्ही बाजूंनी मानसन्मान मिळाला पाहिजे..आमची थोडीफार नाराजी होती ती आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगले - सामंत मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून आम्हाला पुढे जायचं आहे..भाजपचा 100 जागा मिळण्याचा सर्व्हे यावरती सामंत यांचं उत्तर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजा शिष्टाचार वेगळा असतो.... एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी दूर झाले नाही यावरती सामंत यांचे उत्तर एकनाथ शिंदे एनडीए मधील तीन नंबरचे नेते - सामंत जे टीका करतात ते सहाव्या सातव्या रांगेमध्ये बसतात... शिंदे साहेब हे अमित शहा आणि मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात - सामंत मित्रपक्ष म्हणून सन्मान ठेवला पाहिजे... युतीमध्ये अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ.. पार्थ पवार यांचे प्रकरण सुनील तटकरे यांनी बाहेर काढले.. असं थोरवे बोलले होते.. या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर मी काही भाजपमध्ये गेलो नाही..काहीजणांना पोटशुळ उठतो...मी माझ्या मर्यादा सोडल्या नाहीत... सुषमा अंधारे यांना गांभीर्याने घेता कामा नये - सामंत पार्थ पवार प्रकरणांमध्ये चौकशी करा असं मुख्यमंत्री बोलले आहेत... त्यामुळे मी काहीही बोलणे उचित नाही - सामंत Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री लोकेशन - रत्नागिरी
22
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 08:09:30
Pandharpur, Maharashtra:शहाजी बापू पाटील आदर्शवत आहेत. मैत्रीपूर्ण लढत व्हावी हा त्यांचाच प्रस्ताव होता. सांगोल्यातील नगरपालिका निवडणूकित सुरू असलेल्या घडामोडी वरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले स्पष्ट शब्दात उत्तर मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही शहाजी बापू पाटील यांनी युती मध्ये लढण्याचा प्रस्ताव दिला नाही. एकदा भेटले तेव्हा त्यांनी मैत्रीपूर्ण लढू अशी भूमिका त्यांनी घेतली. शहाजी बापू जवळचे मित्र आहेत सहकारी आहेत. गावातली परिस्थिती बघून व्यथित झाले आहेत. निवडणुकीत आणि त्यानंतरही आमचे संबंध चांगले राहतील. ते काल ही आमचे मित्र होते उद्याही राहतील. अशी भूमिका घेऊन शहाजी बापू पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला
125
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 08:04:00
Satara, Maharashtra:सातारा - तपोवन मधील झाडे तोडून कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवाची गोष्ट आहे. याला खूप विरोधच करावा लागणार आहे. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावणार असे फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडू नये यासाठी 100 माणसे मारू पण एक झाड तोडून देणार नाही.. सरकार आपला असून सुद्धा ते बेजबाबदार वागत आहे माझ्या तोंडात शिव्या येत आहेत अशा शब्दात आपला राग व्यक्त अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे . नागपूरला 45 हजार झाडे तोडणार आहेत,कर्जत मध्ये झाडे तोडणार आहेत. आपल्या डोळ्यासमोर जी झाडे तोडणार आहेत ती आपल्याला वाचवायचे आहेत. नाहीतर माणसं पेटून उठतील मी फक्त निमित्त पात्र आहे. राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजे, झाडे लावलेल्या हिशोब द्या तर देणार.. तुम्ही काय आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो पाहिजे त्याला बोलता आले पाहिजे .. ढोंगी सर्व पक्षातील लोक बोलायला लागले आहेत.. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपले खंत मांडली.. बाईट - सयाजी शिंदे
68
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 07:55:18
89
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 07:50:29
Amravati, Maharashtra:काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नजरकैद केल्याने यशोमती ठाकूर आक्रमक; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या विरोधात होणार होते आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पोलिसांवर संतापल्या असून पोलिसांच्या नजर कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना यशोमती ठाकूर यांनी स्वतःच्या गाडीत बसवत परत आणलं आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार–शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार होहो. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा फायदा घेऊ नये पोलिसांना आम्ही घाबरत नाही अमरावतीमध्ये आमदार संजय खोडके यांची दादागिरी चालली आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी आमदार संजय खोडके यांच्यावर केली आहे. खोडके यांना महापालिकेतील खुली जागा हरपायची आहे त्यामुळे हे सगळं ते करत आहे. तसंच आम्ही पोलिसांना घाबरत नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घाबरले त्यामुळे ते सत्तेत गेले मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहे.
36
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 07:32:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. मंत्री संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद. शिंदे नाराजी, उद्धव ठाकरे आरोप. गेल्या आठवड्यात काही मंत्री न गे्ल्याने महाराष्ट्रात जो वादळ निर्माण झाला होता त्यावर आता पडदा पडला आहे. काय केलं पाहिजे, काय नाही याची आचार सहिता ठरवावी असे होते. यात वाद आहे असे काही नाही. शिंदे यांनी पत्रकार परिषद मध्ये सर्व स्पष्ट केले आहे. शिंदे यांची भेट ही पूर्वनियोजित होती. मात्र काहीजण कविता करू लागले, काही ध्न्यांनी त्यावर बोलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी आहे. टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात. कविता करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे यांना भूमिका मांडायची असेल तर ते मिडिया समोर मांडतात. युतीत मिठाचा खडा पडेल असे बिलकुल नाही. ऑन नाराजी...नेत्यांची देहबोली. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जात असतात. फ्लाईट मध्ये ते नेहमी वेगवेगळे जातात.. चुकून कोणी पाहिले नाही तर त्याच बाऊ करू नये. उद्धव ठाकरे यांनी आता वयोमानानुसार मोठे प्रगल्भ व्हावं... दुसऱ्याचा वास घेणे एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. टोमणे मारणे बंद करा.. पक्ष संपतो ते बघण्यापेक्षा टोमणे मारणे योग्य वाटत असेल तर लखलाभ. शिंदे यांचे मोदी आणि शाह सोबत चांगले सबंध आहे. दानवे वक्तव्य. त्याचा संबंध महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी जोडणे योग्य नाही. सर्वांशी संबंध चांगले आहे. भांड्याला भांडे लागते, घर म्हंटल्यावर भांडे लागते. घटस्फोट सारखी परिस्थिती नाही. ऑन पार्थ पवार एफ आय आर. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, कुणालाही वाचवले जाणार नाही. भविष्यात जे काही कायदेशीर आहे. जे अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑन शीतल तेजवानी vip चौकशी. vip ट्रीटमेंट का दिली याबाबत कल्पना नाही. तेथील अधिकारी याचा उत्तर देऊ शकतील. ऑन बांगर हिंगोली. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊन आचार संहिता ठरली आहे. सर्वांना याची आचार साहित्याचे पालन करावे अशी सूचना सर्वांना दिली आहे. ऑन एकमेकांना चर्चा. इतका छोटा विषय ५० मिनिटांच्या भेटीत चालत नसतो... एवढ्या छोटा विषयावर चर्चा झाली की नाही. देशाच्या मीडियाचा माध्यमातून शहा पर्यंत ही बाब गेली असावी. ऑन बिनविरोध निवडणूक. छोट्या मोठ्या निवडणुकीत अनेक प्रतिनिधी बिनविरोध निवडून येत असतात. जे आरोप करताय त्यांच्याबाबत झालं नाही का, पवार साहेबांनी केले आहे, सगळ्यांनी केले आहे.... ऑन नगरसेवक पद लिलाव. मला कल्पना नाही, बोली लावून नगरसेवक असे पहिल्यांदा ऐकले. असे असेल तर राजकारणाला चांगले दिवस नाहीत ऑन आमदार अधिकारी उभे राहणे. लोकशाही मध्ये जो प्रक्रिया आहे त्यातील हा एक भाग आहे. हा प्रोटोकॉल आधीपासून आहे. काही अधिकारी स्वतःला मोठे समजता खुर्चीवरून उठत नाही. आचार सहित वगळता इतर वेळी लोकप्रतिनिधींचा सन्मान झालाच पाहिजे. ऑन लाडकी बहीण. असे प्रकार समोर आल्यानंतर सरकारने सांगितले होते, आपले नाव सरेंडर करून बाहेर पडा, अनेकजण बाहेरदेखील पडले होते. आता कारवाई करायची नाही... मात्र यावर गंभीर पाऊले उचलावी. ऑन मुंबई ट्रेन वाद तरुण मृत्यू. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. भाषेचा वाद इथपर्यंत जाऊ नये. डॉक्टरांच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू होणे म्हणजे हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक म्हणावं लागेल... ऑन विरोधक एकत्र निवडणूक मुंबई. शरद पवार यांनी आतापर्यंत सायलेन्स भूमिका घेतली आहे. मनसे ठाकरे एकत्र आल्यावर बोलले फक्त... कुणाचीही युती करा असे संकेत त्यांनी दिले आहे. काँग्रेसकडे त्यांचा कल आहे. असे झाले तर मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना बाहेर पडावे लागेल. ऑन ससून रुग्णालयात प्रकार. ससून होटेलच्या बाहेर बसविण्यात आले मी तातडीने दाखल घेतली जो कुणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहे. सहानुभूमीतने विचार करून माझ्या खात्याकडून काय करता येईल पाहू.. ऑन भाजप मुंबई सर्वे - चांगले आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, लोकांचे जन मत तयार होत नाही तो पर्यंत अशी सर्व्हे प्राथमिक असते. खरे सर्व्हे निवडणुंक जवळ असल्यावर असतात... ऑन सुनील तटकरे संपर्कात. ते कोकणातील असल्याने त्यांना राजकारण माहिती असेल मला काहीही माहिती नाही.. ऑन ओळखपत्र - टँकमध्ये ओळखपत्र कशाला टाकले, तेथून रॅकेट चालत असावे असे दिसत आहे. अत्यंत गांभीर्यपूर्वक याची चौकशी झाली पाहिजे. हे कुणी जमा केले कुणी काढले याची चौकशी झाली पाहिजे. ऑन उद्धव ठाकरे, काँग्रेस. हे दिल्लीला कुणाला भेटायला जात आहे. वेळ आल्यावर राहुलगंधीला सामानाच्या फ्रंट पेजवर छाप्याची खाज असते. राहुल गांधी सोनिया गांधी यांना विचारत नाही. आणि यांची कसली ताकत म्हणून यांना सर्व साथ घेऊन लढायचे आहे... झालेली चूक झाकण्यासाठी हे करतात. काँग्रेस आधीही कुणाची न्हवती, आजही नाही, उद्याही राहणार नाही... कसली ताकद आली, नाटकातील राजासारखा बोलतात, मेकअप केलेला चेहरा कधीतरी पुसा.... ताकद होती तर एवढे कमी आमदार कसे, नगरसेवक का नाही.. ऑन मनसे ठाकरे काँग्रेस - असेच एकमेकावर वर बोलतील याची आघाडी टिकणार नाही. पडळकर कार्यकर्ते भाजप प्रवेश... यातिनी नेते घेतील, याचा काय कार्यकर्ते ठरवतील...
87
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 07:18:43
Akola, Maharashtra:एकेकाळी एकत्र येत राजकारण करणारे दोन्ही पक्षांमध्ये आता कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणुक लढवण्याचा केलेला निर्णय मतदारांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे.या अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे हिवरखेडची निवडणुूक अधिकच उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे विचार जुळत असल्याने बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला असल्याचं येथील उमेदवार म्हणत आहे।नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच पक्षांनी येथे मोर्चेबांधणीला वेग दिला असून, प्रचार मोहिमा जोरात सुरू आहेत। भाजपनेही या निवडणुकीत दमदार तयारी करत जिल्हा परिषद सदस्या आणि अनुभवी राजकारणी सुलभा दुतोंडे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला असून, प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन भाजपकडून दिले जात आहे.हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात तब्बल २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष बूथ पातळीवर शक्तीझोत लावत असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाची झाली असलेली स्थानिक युती हे संपूर्ण निवडणुकीचे समीकरणच बदलणारे ठरू शकते. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी लढा देत अखेर हा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली पहिलीच निवडणुūk राजकीय दृष्ट्या अत्यंत रंगतदार बनली आहे. शिवसेना–प्रहार युतीचा प्रभाव की भाजपची संघटनशक्ती ,अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत。
130
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 07:17:50
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री) मैं आज यवतमाळ, पुसद, और वर्धा, देवळी इन स्थानों पर प्रचार कर रहा हूँ.. महाराष्ट्र की भाजपा के सभी विधायक, खासदार और नेताओं ने प्रचार की जिम्मेदारी संभाली है.. और महायुति 51% मत लेकर जीत जाएगी इसका मुझे विश्वास है.. Mumbai सर्वे हम भाजपा महायुती मिलकर इस बार मुंबई का महापौर बनवेंगे। मुंबई की जनता विकास के पक्ष में है.. और भाजपा के पक्ष में है.. ठाणे कानशिलात इस घटना की जिम्मेदारी लेकर उचित कार्रवाई की जाएगी.. भाजप धमकी -- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष के जिलाध्यक्ष ने आरोप लगाया कोई धमकी नहीं दी गई.. यह हमारे संस्कार और संस्कृति नहीं.. शितल तेजवानी स्पेशल ट्रीटमेंट.. क्या और कैसी ट्रीटमेंट दी गई यह पुलिस देखेगी.. परंतु इस घोटाले में जो भी आरोपी होंगे उन्हें हम सख्ती से सजा देंगे.. मालेगाव प्रकरण फासी की मांग.. जिन लोगों ने इतना बड़ा अत्याचार किया उन्हें फांसी होनी चाहिए।
104
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 07:10:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तुर्भेतील मिलेनियम पार्क, बिल्डिंग क्रमांक 03, तिसरा मजला येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून एक मोठा सायबर फसवणूक रॅकेट उधळून लावले. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष व अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये व्हायरस हल्ला करून मदतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील अक्षय शिर्के, गगन थापर सह १७ जणांना अटक करण्यात आली. तर शिव शर्मा हा मुख्य सूत्रधार फरार आहे. छाप्यादरम्यान The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services आणि Stock Vision या नावांनी चालणाऱ्या बनावट कंपन्यांमध्ये 97 युवक व युवती संगणकावरून व्हॉट्सअॅप ग्रुप्स व कॉलच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आढळले. संगणक तपासणीअंती फसवणुकीसाठी वापरलेले चॅट मेसेजेस, विविध बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रारीचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघड झालेल्या 71 बँक खात्यांपैकी 61 खात्यांतून तब्बल 12.29 कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण देशभरातून 31 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. याशिवाय World Solution या कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Malware/Ransomware Attack करून स्क्रीनवर Microsoft Error Code दाखवत बनावट Microsoft Customer Support च्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचेही उघड झाले. संपूर्ण कारवाईत 21 सीपीयू, 5 लॅपटॉप, 5 SSD, 38 मोबाईल फोन आणि GSM सर्व्हर असा मुद्देमाल जप्त केला. सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं. 55/2025 कलम 318(4), 319(2), 61(2) भा.दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला असून 20 आरोपींना 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा व्याप मोठा असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
134
comment0
Report
Advertisement
Back to top