Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!

Oct 08, 2024 08:32:04
Yavatmal, Maharashtra

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 06:21:46
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा बनला आहे. “नागरिक चोरीचं पाणी पित आहेत” असा आरोप अनेक उमेदवारांकडून होत असून हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेक वर्षांपासून शहराला हक्काचा पाणीपुरवठा न झाल्याची समस्या आता निवडणुकीत ज्वलंत ठरली आहे. बार्शीटाकळी येथे यंदा नगराध्यक्ष पद महिला आरक्षित आहे. 20,947 मतदारांपैकी नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार स्पर्धेत आहेत. शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई. अकोला शहराला काटेपूर्णा धरणातून जाणारी मुख्य पाइपलाईन बार्शीटाकळी मार्गे जाते, मात्र शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक बेकायदा पाईपलाईनला जोडून पाणी घेतात. अकोला महापालिकेने अनेक वेळा कारवाई केली असून त्यामुळे स्थानिकांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे आणि प्रत्येक उमेदवार ‘हक्काचा पाणी’ मिळवून देण्याचा दावा करत आहे. रूपाली गोल्डे, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार; वनमाला मुळे, शिवसेना (यूबीटी) उमेदवार; समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार. बार्शीटाकळी नगरपंचायत अद्यापही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयूची सुविधा नाही, एमआयडीसी नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या सर्वांपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर असून त्याच्या निराकरणाचा दावा सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. पाणी समस्या गंभीर असल्याचे सत्ताधारी काँग्रेस पक्षही मान्य करतो. निवडून आल्यास शहरातील पाणीटंचाईसह महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे काँग्रेस उमेदवार सांगत आहेत. समीना अंजुम, काँग्रेस उमेदवार.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 06:05:23
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे भाजपला अनुकूल वातावरण है...नगरपालिका निवडणुकीत 51 टक्के मतं महायुतीला मिळेल (राज ठाकरे-गाफिल) इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे... कुठंलीच निवडणूक शेवटची नसते... मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय स्तरासारखं विकसित करणे.. 2029,2035 आणि 2047 चा विकसित मुंबईचा आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला जात, पंथ, धर्म करून मत मिळणार नाही तर विकसित मुंबईच्या नावावर मत मिळतील (on अजित पवार मतं.. निधी) अजीत दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निधीचा निर्णय घेतात... एक न एक पैसा विकासाकरता जातो... आमचे तिन्ही नेते एकत्र बसतात... त्यांनी जे विधान केले ते कोणत्या कारणाने केले माहिती नाही.... कुठलाही विकास निधी समन्वयाने वाटप होत असतो. मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात... निवडणुकीच्या प्रचारात ते कुठेतरी बोलले असतात काँग्रेसला पराजय दिसत आहे... विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.... यावेळी ज्या ज्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप झाले त्यावेळी महाराष्ट्राने क देवेंद्र फडणवीस यांना जिंकले आहे.. *दोन तारखेला किंचित काँग्रेस झालेली दिसेल* (on गडचिरोली वक्त्यव्य बावनकुळे) मी एवढेच म्हटले आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या.. त्यांना पन्नास शंभर चा एखादा पेंडॉल टाकला असता तर आम्ही निवडणूक आयोगाला त्याचा खर्च हिशोबा दिला असता या कार्यकर्त्याने चूक केली.. प्रदेश म्हणून खर्च देऊ आम्ही.. निवडणूक आयोगाला खर्चाचा हिशोब देऊ.. आणि मी नियमाच्या बाहेर करणार नाही हिशोब देऊ (मुंबई महायुती ) अजून तिथल्या निवडणुका लागली बसू.. आणि तिथ महायुती म्हणूनच लढू ( अन पंकजा मुंडे -Pa ) पंकजां मुंडे यांनी पोलिसांना नियमात आणि कायदेशीर कारवाई करायला सांगितले आहे (on MVA वेळ मागितली ) हे विकासावर बोलत नाही खोट्या पद्धतीने narretive करत असतात (2047 भाजपा) -- महाराष्ट्र आम्ही एक कोटी मताने जिंकले... 2029 ची निवडणूक आम्ही दीड कोटी मताने जिंकू 2034शी निवडणूक 2 कोटी मताने आणि 2039 ची निवडणूक आम्ही अडीच कोटी मताने... अजून मताने वाढेल कारण आम्ही विकासासाठी काम करतो (on चित्रा वाघ-मटण) भाषणात असे वक्तव्य केले की लोक टाळ्या वाजवत असतात (on शहाजी बापू आरोप ) निवडणूक संपली की अशा आरोपाचे लोक दखल घेतात... असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू ( ऑन महायुती कटूता ) मी महायुतीचा समन्वयक आहे एकदम एकत्र आहे... देवेंद्रजी कटूता न ठेवणारे नेते.. शिंदे दिलदार नेते आहे... सगळे एकदम एकत्र आहे
49
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 24, 2025 06:04:56
61
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 24, 2025 05:21:02
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये भाजप–शिवसेना आमने-सामने! युती फिस्कटली, शिवसेना आक्रमक चार नगरपालिकांत शिवसेना थेट भाजपविरोधात रणसंग्रामात भाजपविरोधी प्रचाराची शिवसेनेची जोरदार तयारी धाराशिव – नगरपालिका निवडणुकांत भाजप आणि शिवसेना थेट आमने-सामने आल्याने धाराशिव जिल्ह्यात राजकीय तापमान चढलंय. भुम, परांडा, धाराशिव आणि उमरगा—या चार महत्वाच्या नगरपालिकांमध्ये शिवसेना भाजपाच्या विरोधात उतरलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच युती फिसकटल्याने शिवसेनेने भाजपविरोधात रणशिंग फुंकलं. शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी पदाधिकारी–कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराची रणनीती आखली असून शिवसेनेने भाजपविरोधात जोरदार प्रचारालाही सुरुवात केलीय.
64
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 05:17:04
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिवलग मित्राने आत्महत्या केल्याचे समजताच दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्रानेही केली आत्महत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात घडली हृदयद्रावक घटना - जिवलग मित्राने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त कानावर येताच दुसऱ्या मित्रानेही शेतात गळफास घेत केला आयुष्याचा शेवट - गोरख भोई याने पहिल्यांदा स्वतःला संपवले तर हे दुःख सहन न झाल्याने सुरेश भोई या जिवलगाने देखील स्वतःला संपवले - पहिल्या मित्राचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसऱ्या मित्राने उचलले टोकाचे पाऊल - गोरख भोई आणि सुरेश भोई यांची मैत्री संपूर्ण गावात जय वीरूची जोडी म्हणून ओळखली जायची - संपूर्ण घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे
99
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 24, 2025 05:05:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:तारा वाघिणीसाठी चांदोलीच्या जंगलात तब्बल ७९ चितळ सोडले. सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतेच ताडोबातील चंदा अर्थात तारा वाघिणीला सोडण्यात आला आहे. त्या पाठोपाठ तारा वाघिणीसाठी खाद्य म्हणून चांदोलीच्या जंगलात एकूण ७९ चितळ सोडण्यात आली आहेत. चांदोली अभयारण्यासह सह्याद्री खोऱ्यात मुबलक खाद्य असल्याने चितळ येथे रुजण्याची अपेक्षा आहे. नुकतेच सोडण्यात आलेली तारा वाघीण आणि भविष्यात आणखी सात वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र सोडण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने त्यांच्यासाठी हे चितळ खाद्य म्हणून उपयुक्त ठरणार असल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रात्री उशिरा ७९ चितळ चांदोलीच्या अभयारण्यात यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून हे चितळ सोडण्यात आलेत.
152
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 24, 2025 05:04:50
Washim, Maharashtra:वाशिम जिले में चार नगरपरिषद और एक नगरपंचायत के चुनाव प्रचार में तेज़ी आई है. जिल्ह्यात महायुतीसह इतर पक्षांचे पारंपरिक समीकरण कायम असले तरी यंदाच्या उमेदवारीतील घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मालेगाव या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. या निर्णयामुळे प्रत्येक नगरपरिषदेत वेगवेगळ्या स्वरूपाची तिरंगी-चौरंगी लढत होणार आहे. विविध पक्षांनी जनसंपर्क मोहिमा, रॅल्या, पदयात्रा आणि घराघर भेटींचा वेग वाढवला असून स्थानिक पातळीवर थंडीच्या दिवसात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
77
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 24, 2025 05:03:16
Palghar, Maharashtra:पालघराच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंडर-16 फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे. सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, मात्र, या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
182
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 24, 2025 04:47:34
122
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 24, 2025 04:47:19
125
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 04:34:57
Akola, Maharashtra:Anchor : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक वेग आला असून त्यात मोठ्या नेत्यांच्या सभा रंगत आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा 25 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे आयोजित करण्यात आली आहे. हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा या त्रिन्ह नगरपरिषदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवरखेड हे अकोट आणि तेल्हारा नगरपरिषदांच्या मधोमध असल्याने ही सभा हिवरखेड येथे ठेवण्यात आली आहे.हिवरखेड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुलभा दुतोंडे, तेल्हारा नगरपरिषद येथील वैशाली पालीवाल, तर अकोट नगरपरिषरेतील माया धुळे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवाऱांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याच्या उद्देशाने भाजपकडून ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार वेग दिला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याने आणि मोठ्या नेत्यांची सभा होत असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे तिन्ही नगरपरिषदांमध्ये विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
70
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 04:34:35
Nagpur, Maharashtra:"--------- ड्रग्स मुक्त नागपूर" या उद्दिष्टासाठी नागपूर पोलीस आणि नागपूरकरांची संयुक्तरीत्या ड्रग्स (अमली पदार्था) विरोधात जोरदार लढाई सुरू आहे.. ऑपरेशन थंडर अंतर्गत गेल्या 18 महिन्यात नागपूर पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्क मधून मिळालेली गोपनीय माहिती तसेच जनतेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तब्बल 11 कोटी 34 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे... या सोबतच अमली पदार्थांच्या तस्करी, साठवणूक आणि विक्रीमध्ये लागलेल्या 1022 आरोपींना अटकही करण्यात आली आहे.. नागपूर पोलिसांनी ब्राऊन शुगर, चरस, एमडी, अफीम, गांजा इत्यादी अमली पदार्थांचा तब्बल 2300 किलो साठा जप्त केला असून त्यापैकी 1400 किलो साठा नियमानुसार नष्टही करण्यात आला आहे.. उर्वरित साठा.ही लवकरच नष्ट केला जाणार असून नागपूरकरांच्या मदतीने ड्रग्स तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरू राहणार असल्याचा विश्वासही पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.. नागरिकांनी कोणत्याही भीतीविना पोलिसांपर्यंत ड्रग्स विक्री संदर्भातली माहिती पोहोचवावी.. ज्या कुटुंबातील तरुण मुलं मुली ड्रग्सच्या आहारी गेले आहेत.. त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधावा.. त्या तरुणांच्या योग्य काउन्सलिंग आणि पुनर्वसनासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत..
175
comment0
Report
Advertisement
Back to top