445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव संगमेश्वर में SIR शिबिर: मतदाताओं की रिकॉर्ड भीड़
Nashik, Maharashtra:मतदारांची गर्दी... मालेगाव संगमेश्वरात SIR शिबिरात मतदारांची मोठी गर्दी शिवसेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन.. राज्यात, संपूर्ण देशात SIR प्रणालीचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग आज मालेगाव शहरातील माळी मंगल कार्यालयात मंत्री दादाजी भुसे व युवा सेनेचे आविष्कार भुसे यांच्या मार्गदर्शनाने व नरेंद्र सोनवणे, लताताई घोडके, मीनाताई अहिरे आणि नितीन झालते या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने SIR प्रणालीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला संगमेश्वर वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यात 50 च्या वर बी एल ओ यांनी देखील मोठे सहकार्य केल्याने हजारोंच्या संख्येने मतदारांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी आभार देखील व्यक्त केले.0
0
Report
वाडेगाव स्मशानभूमी के टिनशेड की शीघ्र दुरुस्ती की मांग, बरसात में अंत्यविधि कठिन
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील स्मशानभूमीतील टिनशेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. टिनपत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा पावसाच्या पाण्यामुळे चिता विझण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मृतदेहाचा सन्मान राखला जात नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाडेगाव येथील स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेले टिनशेड सध्या पूर्णपणे जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी टिनपत्रे फुटली असून पावसाचे पाणी थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी पार पाडणे अत्यंत कठीण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसात चिता पेटविणे आणि ती कायम ठेवणे अवघड होत असून काहीवेळा चिता विझण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात अडथळे निर्माण होत असून नातेवाईकांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. स्मशानभूमीतील टिनशेडची तातडीने दुरुस्ती करून नवीन टिनपत्रे बसवावीत, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.0
0
Report
मिरज पंचायत समिति की नयी इमारत उद्घाटन को लेकर सांसद विशाल पाटल के बयान पर मंत्री जयकुमार गोरे और भाजपा विधायक सुरेश खाडे की तीखी टिप्पणी
Sangli, Maharashtra:सांगली के खासदार विशाल पाटील के विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे और मिरजे के भाजपा आमदार सुरेश खाडेंकडुन खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका किया गया है। मिरज पंचायत समिती के नूतनीमारती के दोनों बार उद्घाटन हुए हैं। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासकीय उद्घाटनाला डावलण्यात आल्याचा आरोप करत शासकीय उद्घाटनाच्या आदल्या दिवशी नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पाडला, यावेळी खासदार विशाल पाटलांनी शासकीय निधीवरून प्रशासनावर गंभीर टीका करत थेट प्रशासनाचा बाप काढला..यावरून प्रशासनाकडुन आयोजित उद्घाटन समारंभाच्या सभेतून भाजप नेत्यांनी खासदार विशाल पाटलांनी जोरदार टीका केली. इमारतीसाठी तुमच्या बापाने चेक, डीडी, का ऑनलाइन पैसे पाठवले होते, असा सवाल करत उद्घाटन करायची, एवढीचं खूमखुमी असेल तर खासदार फंडाच्या बाहेरून एक रुपयाचा निधी आणून विकास करून मग रूबाब करा, असा टोला लगावला आहे. तर आपल्या बापाच्या वैशिनाथ बिल्डिंग बांधली नाही शासकीय निधीतूनच बिल्डिंग बांधली गेलीये, पण यापुढे तुम्ही तुम्हाला तुमच्या बापाच्याच पैश्यांनी विकास करावा लागेल..असा विधान माजी मंत्री सुरेश खाडेंनी विशाल पाटलांवर केला आहे.0
0
Report
Advertisement
FDA के नए दूध नियम: 3.2 फैट और 8.3 SNF से किसान संकट में
Shirur, Maharashtra:FDA च्या दुध खरेदीच्या फॅट आणि SNF च्या नव्या नियमांमुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या नियमावलीनुसार stateात कोणत्याही डेअरीने ३.२ फॅट आणि ८.३ SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. जर दूध या निकषांवर उतरले नाही तर ते कंपन्यांना परत करावे लागेल, ज्यामुळे दूध संकलन कमालीचे घटण्याची शक्यता आहे. या जाचक अटींमुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, या निर्णयाचा दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम होईल, अशी चिंता वळसे पाटील यांनी व्यक्त केलीय.0
0
Report
यवत में संत तुकोबाराय की पालखी का आगमन, काळभैरवनाथ मंदिर में मुक्काम
Rui, Maharashtra:संत तुकोबारायांचा पालखी सोहळा यवत मध्ये दाखल.... यवत मधील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये तुकोबारायांची पालखी मुक्कामासाठी असणार आहे. या ठिकाणी समाज आरती पार पडेल आणि त्यानंतर भाविक या ठिकाणी संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतील. विठ्ठल नामाच्या जयघोषात यवतनगरी दुमदुमून निघाली असून यवतकरांकडून वारकऱ्यांना पिठलं भाकरीचा बेत देखील आखण्यात आला आहे.0
0
Report
विद्यार्थी शिकायतों के बाद अमिगो एविएशन अकैडमी पर MSBVT से जांच की मांग
Mumbai, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर अमिगो एव्हिएशन अकॅडमी अडचणीत; मनविसेकडून चौकशीची मागणी मुंबई : विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, दिशाभूल करणे तसेच इतर गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अमिगो एव्हिएशन अकॅडमीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरचिटणीस अॅड. स्नेहल आडारकर यांनी विद्यार्थ्यांसह अकॅडमीच्या मुख्य कार्यालयाला भेट देत व्यवस्थापनाची जाब विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अकॅडमीच्या माजी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, विद्यार्थ्यांना दिलेली कथित दिशाभूल करणारी आश्वासने आणि संस्थेच्या कार्यपद्धतीबाबतही व्यवस्थापनाकडे कठोर शब्दांत खुलासा मागण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आता महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ (MSBVT) यांच्याकडे अधिकृत चौकशीची मागणी करणार आहे. यासोबतच महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सर्व एव्हिएशन प्रशिक्षण संस्थांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करून त्या शासनाच्या नियम व मानकांचे पालन करतात का, याची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक किंवा त्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही संस्थेला पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यक असल्यास कायदेशीर लढा आणि तीव्र आंदोलनही उभारले जाईल,” असा इशारा अॅड. स्नेहल आडारकर यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
यवत में सुप्रिया सुळे ने वारकर्स के लिए भाकरी बनाकर दिखाया सहयोग
Rui, Maharashtra:यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या. पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे. यवत मध्ये ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पिठलं भाकरी ची खास मेजवानी दिली जाते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यवतमध्ये श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावत या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी पिठलं भाकर खाण्याचा आस्वाद देखील घेतला आहे.0
0
Report
यवत में वारकरी अन्नदान: दीढ़ टन पिठलं और दीढ़ लाख भाकरी की भव्य मेजबानी
Rui, Maharashtra:अन्नदानाचा लावा मेळा । भुकेल्यांचा भरा घास पेला ॥॥ अन्न पूर्णब्रह्म जाणावे । प्रेमे सर्वांना वाढवावे ॥१॥ दारी आला जो भुकेला । विठ्ठल भेटे त्या रूपाला ॥२॥ सेवाभाव अंतरी ठेवा । दीनजनांचा धावा घ्या ॥३॥ दानामध्ये नाही अभिमान । तेथे वसे श्रीनारायण ॥४॥ तृप्त झाले जेवणारे । आशीर्वाद देते सारे ॥५॥ तुका म्हणे सेवा खरी । विठ्ठल भेटे अंतरी ॥॥ यवतमध्ये वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं, दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी; ८२ वर्षांची अखंड परंपरा यंदाही कायम... लोणी काळभोर ते यवत हा पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी तब्बल दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी आयोजित करण्यात आलीय. गावातील घराघरांत भाकऱ्या तयार करण्याचे काम सुरू असतानाच, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू झाली होती. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विशाल कढईंमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले. एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं बनविण्यात येत होते. त्याासाठी २० किलो बेसण तसेच सुमारे ४० किलो कांदा, मिरची, लसूण, तेल, मसाले व इतर साहित्य वापरण्यात आले. अशा एकूण १४ ते १५ कढईंमध्ये पिठलं तयार करून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या अन्नदानासाठी गावातील युवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. पिठलं तयार करणे, भाकऱ्या जमा करणे, भोजन वाढणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्या. ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी सेवाभावाची ही परंपरा पुढे चालवत समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यंदा पिठलं-भाकरीच्या भोजनासाठी वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जावेद मुलानी, झी 24 तास, दौंड0
0
Report
दारू के नशे में दोस्ती के कारण पर्यटक अक्षय जाधव की हत्या
Satara, Maharashtra:सातारा: दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे भिगवणच्या अक्षय रमेश जाधव या पर्यटक युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांबरोबर पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अक्षय याला मित्रांनी दारूच्या नशेत असल्याच्या कारणातून खोलीत कोंडून ठेवले असताना त्याने रूम बाहेर येऊन शेजारील एका घरात डोकावल्याने संबंधित मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला जीवघेण्य मारहाण केली. गंभीर जखमी अक्षयचा बारामती येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयित सूर्यकांत गोळे याच्यासह वाई परिसरातील चार आरोपींना अटक केली है.0
0
Report
Advertisement
अघोरी आरोपों की जांच तेज: फिरोज आदम शेख की गिरफ्तारी
Oras Bk., Maharashtra:माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुना गिरीजा गितेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपानंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला असून, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळून लावले आहेत. "आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अघोरी कृत्य केले जात नाही. येथे कोणाचे केस काढणे किंवा अशा प्रकारचे विधी होत नाहीत. फिर्यादी आणि संबंधित कुटुंबामधील वैयक्तिक वाद काय आहेत, याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. काल अचानक पोलीस आले आणि फिरोज आदम शेख यांना ताब्यात घेऊन गेले. ही कारवाई अन्यायकारक आहे," असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, आता पाहूया फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली...0
0
Report
विनायक राऊत के परिवार से जुड़े आरोपों की जांच तेज, फिरोज बाबा ताब्यात
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग अँकर : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले.0
0
Report
नेरूळ स्टेशन परिसर में शराबी ने ड्यूटी पर तैनात पुलिसकर्मी पर धारदार हथियार से हमला करने की कोशिश
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. नेरुळ स्टेशन परिसरात वर्दळीच्या ठिकाणी एका मद्यपीने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नेरुळ स्टेशन मध्ये असलेल्या वाईन शॉप मुळे मद्यपी थेट उघड्यावर मद्यपान करुन थिंगाणा घालत असतात. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलिसांवरच थेट हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अश्या मद्यपिंवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेय.0
0
Report
Advertisement
मिरज पंचायत समिति की नूतन इमारत का दो बार उद्घाटन, टकराव दिखा
Sangli, Maharashtra:स्लग - एकाच प्रशासकीय इमारतीचं झालं दोनदा उद्घाटन.. मिरज पंचायत समिती नूतन इमारतीचे महाविकास आघाडी पाठोपाठ प्रशासनाकडुन उद्घाटन.. अँकर - उद्घाटन झालेल्या नूतन इमारतीचा पुन्हा उद्घाटन करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन पार पडले आहे.मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे,आमदार सदाभाऊ खोत,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र पंचायत समितीचे सभापती व सत्ताधारी हे अनुपस्थित होते.विशेष म्हणजे प्रशासनाच्या या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच महाविकास आघाडी व पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी नूतन इमारतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला आहे. त्यामुळे एकाच इमारतीचा दोनदा उद्घाटन झाल्याचा प्रकार घडल्याने प्रशासन,भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी व महायुतीचे मित्र पक्ष असा संघर्ष पाहायला मिळाला आहे.0
0
Report
तुकोबाराय पालखी दौंड के यवत में पहुंची, जन संदेश से योजनाओं की पहुँच बनी व्यापक
Rui, Maharashtra:Anchor _ जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे. या वारीत राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत संवाद वारीच्या माध्यमातून लोकगीतांमधून शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम पोहोचवले जात आहेत. भारुडाच्या माध्यमातून शासनाच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना वारीत चालणारे वारकरी देखील तेवढेच तल्लीन होऊन यामध्ये सहभागी होत आहेत.0
0
Report
चंद्रपुर पुलिस का कड़ा संकेत: 198 जमानत पर बाहर आए आरोपियों की परेड
Chandrapur, Maharashtra:टायटल :--गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांचा कडक वचक , १९८ जामिनावरील आरोपींची ओळख परेड, अटी मोडल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा अँकर :-- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या तब्बल १९८ आरोपींची विशेष ओळख परेड घेण्यात आली. पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या वेळी सर्व आरोपींना न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटींचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे. याशिवाय, ज्या आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई झाली नव्हती, त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश चंद्रपूर पोलिसांनी या मोहिमेतून दिला आहे.0
0
Report
Advertisement
