icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Kolhapur के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह निजीकरण के प्रस्ताव पर कलाकारों का भारी विरोध

Kolhapur, Maharashtra:Kolhapur के ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह को دوبارہ रंगभूमि पर लाने की तैयारी चल रही है। पुनर्बांधणी और नवीनीकरण का काम अंतिम चरण में है और जल्द उद्घाटन की योजना नगर पालिका की ओर से बनाई गई है। हालांकि उद्घाटन से पहले ही इस नाट्यगृह के निजीकरण के निर्णय पर नया विवाद खड़ा हो गया है। शाहू महाराज ने स्थापित की गई इस ऐतिहासिक वास्तु को निजी संस्थान के हाथों में देने को रंगकर्मी विरोध कर रहे हैं। कोट्यवधी रुपये खर्च करके बने इस नाट्यगृह को किराये पर चलाने के निर्णय को शाहू महाराज की पहचान के साथ जोड़कर देखा जा रहा है, और रंगकर्मी सड़कों पर उतरने की तैयारी में हैं। इस बीच महापालिका ने रंगकर्मी की भूमिका सुनने का दावा किया और समाधान निकालने का आश्वासन दिया गया है। नाटकगृह के प्रशासनिक नियंत्रण को लेकर सवाल उठते रहे हैं और कुछ प्रश्न अब भी unresolved हैं।
0
0
Report

बीड़ में पंकजा मुंडे के जन्मदिन पर-banner चर्चा का केंद्र, जनता के मन में मुख्यमंत्री

Beed, Maharashtra:‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’... पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये झळकला चर्चेचा बॅनर; राजकीय वर्तळात रंगल्या चर्चा ANC - राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. मात्र बीड शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर "पंकजा मुंडे... जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा ठळक उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बीड येथील शासकीय विश्रामगृहासमोर लावण्यात आलेल्या या आकर्षक बॅनरवर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो, मंत्री पंकजा मुंडे यांचे मोठे छायाचित्र तसेच शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकत आहेत. विकास ढोरमारे आणि साहस आदोडे यांनी हा शुभेच्छा फलक उभारला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा उल्लेख केल्याने या बॅनरची राजकीय अर्थाने चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बॅनरकडे राजकीय निरीक्षक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले असून, बीडच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. बाईट: साहस आदोडे
0
0
Report

मेळघाट के चार आदिवासी आश्रम विद्यालयों में भोजन से विषाक्रण, 143 छात्र प्रभावित

Amravati, Maharashtra:मेळघाटात चार आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण १४३ विद्यार्थी बाधित झाले आहेत. सुरुवातीला टीटबा आदिवासी आश्रम शाळेतील ७०, त्यानंतर बिजूधावडी आश्रम शाळेतील ४०, सुसरदा आश्रम शाळेतील ३ आणि सावलीखेडा येथील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धवट शिजवलेले अन्न जेवणात दिले जात असल्याने विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून पालकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळांना सेंट्रल किचनद्वारे जेवण पुरवले जाते. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान धारणी पोलीस स्टेशनमध्ये sेंट्रल किचनच्या मालकासहित सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

महाबळेश्वर में भारी बारिश, किसानों की फसलें रंगीली, पर्यटन भी तेज

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वरमध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसाने आपली दीड शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. गत दहा ते बारा दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच پाऊس पुढील काही दिवस राहिल्यास हा पाऊस हा दीडशे इंचाचा टप्पा लवकरच पार करेल. सध्या दाट धुकं कडाक्याची थंडी संततधार पावसात देखील पर्यटक येथे येत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. तसेच जोरदार वाऱ्यामुळे मुख्य बाजारपेठेत काही ठिकाणी दुकानांचे फलक पडून नुकसान झाल्याची माहिती मिळाली तर परिसरात झाड कोसळण्याचेही प्रकार घडत आहेत.महाबळेश्वर तालुक्यात यंदा पावसाने काहीशी संथ सुरुवात केली आहे. अर्धा जून महिला कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगला जोर धरला. यानंतर ०१ जून ते ०१ जुलैपर्यंत ४७०.२८ मिमी १८.५२ इंच पावसाची नोद झाली. त्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसाने अवघ्या ६ दिवसात २० इंच त्यानंतर १५ इंच अशी उच्चांकी पावसाची नोंद झाली. यानंतर दुसऱ्याच आठवड्यात वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला.यानंतर दुसऱ्याच आठवड्यात पावसाने १०० इंचाचा टप्पा सहज गाठला. यानंतर तिसऱ्या आठवाड्यात पुन्हा महाबळेश्वरमध्ये जोरदार सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार इंच दररोज पावसाची नोंद होत असून आता या पावसाची दीडशे इंचाकडे वाटचाल सुरु आहे. या पावसाने शेतीच्या कामांना देखील वेग आला असून भातशेती जोरदार सुरु असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन सुरू झाले असून वीकएंडला पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
0
0
Report

जालना में 40 मौसम केंद्रों में छेड़छाड़: प्रशासन ने कड़ी कार्रवाई की चेतावनी

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्यानं खळबळ निर्माण झाली आहे; जिल्हा प्रशासनाकडून दखल. यापुढे असे प्रकार घडल्यास दोषींवर कठोर कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांचा ईशारा. स्वयंचलित हवामान केंद्राच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात 49 स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. यातील 40 हवामान केंद्रांच्या उपकरणात छेडछाड झाल्याचं समोर आलं असून काही गावात गेल्या आठवड्यात पावसाचा अंदाज खोटा नोंद झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त आहेत. स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे वातावरणातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा आणि पावसाच्या अचूक, रिअल-टाइम मोजणारी अत्याधुनिक टेक्नॉलजी प्रणाली आहे. या माहितीचा उपयोग हवामान अंदाज, कृषी नियोजन, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींसाठी होतो; मात्र गेल्या अडीच ते तीन महिन्यांत या यंत्रणेत छेडछाड झाल्यानं शेतकरी चिंतातुर झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे; हा खोडसाळपणा स्कायमेट कंपनीच्या गलथान कारभारामुळेच घडला असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर स्पष्ट केले आहे की यंत्रणेत छेडछाड केल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि हवामान केंद्रांच्या सुरक्षेसाठी CCTV लावण्याचेही आदेश दिले गेले आहेत. 49 पैकी 40 केंद्रांत झालेल्या छेडछाड प्रकरणी 5 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल झाली आहे; मात्र गुन्हा अजून नोंद झाला नाही. अधिकाऱ्यांनी असे प्रकार पुन्हा घडले तर प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले."
0
0
Report

आदिती तटकरे कहतीं: पंद्रह सौ रुपये खरीद में नहीं बचते, गरीब महिलाएं परेशान

Mumbai, Maharashtra:आदरणीय संपादक साहेब आणि माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो आपल्यासाठी पॉइंटर... विषय: आदिती तटकरे म्हणतात पंधराशे रुपये सर्व "खरेदीमध्ये संपवू नका..." त्या वेळचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून गोरगरीब महिलांना किरकोळ खर्च भागविण्याकरिता त्यांचे राहणीमान उंचविण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आदिती तटकरे ताई म्हणतात सर्वच्या सर्व पंधराशे रुपये खरेदीमध्ये संपवू नका. माझ्याकडे व्यापारी वर्ग येतो आणि म्हणतो डीबीटी द्वारे पंधराशे रुपये वेळच्या वेळीच देत जा का ? तर म्हणे तुम्ही पंधराशे रुपये दिल्याबरोबर आमचा व्यापार वाढतो. व्यापाराला तेजी येते. परंतु सत्य परिस्थिती तशी नाही महिन्याकाठी पंधराशे रुपये आल्या बरोबर दारात वाणी उभा असतो, पेपरवाला उभा असतो, डॉक्टर आपलं बिल मागत असतात, तर मुलांच्या ट्युशन चे शिक्षक त्यांची फी मागत असतात. सरते शेवटी या माय भगिनींच्या हाती पंधराशे मधील पंधरा रुपये सुद्धा उरत नाहीत याची सुद्धा नोंद मंत्री महोदयांनी घ्यावी.
0
0
Report
Advertisement

NEET में कम अंकों से छात्रा ने की आत्महत्या, परिवार और प्रशासन में हड़कंप

Ahilyanagar, Maharashtra:NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे... दोन वेळेस परीक्षा दिली दुसऱ्या वेळेस दिलेल्या परीक्षेमध्ये कमी गुण आल्याने अंकिताने आत्महत्या केली आहे NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक अणुकिता सांगळे या विद्यार्थिनीने NEET ची परीक्षा दोन वेळेस दिली दुसऱ्या वेळेस तिला NEET परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले आहेत... अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती... बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले... अंकिताच्या आत्महत्यामुळे घरातील कुटुंब अस्वस्थ झाल आहे... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात गळफास घेऊन आत्महत्या केलीचे घरच्यांचे म्हणणे आहे... मात्र पेपरफुटीच्या आधी जे पेपर झाले होते त्यात तिला चांगले गुण मिळाले होते... खासदार निलेश लंके यांनी सांगळे कुटुंुबीयांची भेट घेतली अंकितांच्या पालकांचा सांत्वन केलं आणि या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे ... अंकिता च्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले आहे ... NEET पेपर फुटीमुला दिल्लीमध्ये झालेल्या तरुणांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे राजीनामा देण्याआधी देशात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मात्र कमी मार्क आल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा सत्र अजूनही थांबत नाहीये
0
0
Report

चिपळुण में दूषित पानी के खिलाफ ग्रामीणों ने MPCB कार्यालय के बाहर प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसीतील दूषित पाण्याविरोधात चिपळूणमध्ये जनक्षोभ; एमपीसीबी कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या.. पावसाचा फायदा घेत लोटे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांनी दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कार्यालयावर जोरदार ठिय्या आंदोलन छेडले.. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.. आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत प्रदूषणकारी कंपन्यांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला..
0
0
Report
Advertisement

केसनंद ग्रामपंचायत के सामने कचरा मोर्चा; 2.11 करोड़ भ्रष्टाचार के आरोप पर प्रदर्शन

Shirur, Maharashtra:केसनंद ग्रामपंचायतीसमोर 'कचरा मोर्चा'; ढोल-ताशांच्या गजरात अजब आंदोलन Anc:​हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुमारे २.११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कचऱ्याचा मोर्चा काढला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा ओतून, तसेच ग्रामसेवक आणि प्रशासकांच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सातव यांनी केली आहे.
0
0
Report

माळशेज घाट मार्ग बंद, मुंबई के लिए वैकल्पिक मार्ग घोषित

Shirur, Maharashtra:माळशेज पुणे... पुणे अहिल्यानगरकडून मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघणार असाल, तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणेचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. काय आहे पर्यायी मार्ग? माळशेजघाट बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता आळेफाटा - नारायणगाव - खेड - चाकण - तळेगाव (MIDC) - लोणावळा - खोपोली - मुंबई अशा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुम्ही आज या मार्गाने प्रवास करणार असाल, तर कृपया नोंद घ्या आणि प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करा!
0
0
Report
Advertisement

सांयची सांगली में निर्माण विभाग के विरोधी ठिय्या आंदोलन: निधि घोटाले का आरोप

Sangli, Maharashtra:स्लग - बांधकाम विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन.. अँकर - सांगलीच्या मिरजेत बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्येच सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.महापालिका क्षेत्रात दलित वस्ती विकासासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नऊ कोटींचा निधी मिळाला आहे,मात्र हा निधी अन्यत्र वळवला जात असून निविदा प्रक्रिये मध्ये देखील गैरकारभार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांच्याकडून करण्यात आला है.सत्ताधारी नेते व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांکارून ही निविदा प्रक्रिया मॅनेज करण्यात आल्याचा आरोप करत,मिरजेतील बांधकाम विभागाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात झाले.तत्पूर्वी गांधीगिरी मार्गाने बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत, निधी अन्य ठिकाणी न वळवता,निविदा प्रक्रिया रद्द करावी,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

कर्नाटक के साई भक्तों ने चांदी 2 लाख रुपये कीमत की मूर्ति अर्पण किया

Shirdi, Maharashtra:साईंच्या चरणी भाविक आपल्या भक्तीभावातून विविध स्वरूपातील दान अर्पण करत असतात. अशाच एका अनोख्या आणि भावपूर्ण देणगीतून कर्नाटकातील उडपी येथील साईभक्तांनी श्री साईबाबांप्रती असलेली निस्सीम श्रद्धा व्यक्त केली आहे. तब्बल एक किलो 204 ग्रॅम वजनाची, साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिमात्मक चांदीची मूर्ती आज श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली. सुमारे 2 लाख 14 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या या आकर्षक चांदीच्या मूर्तीने साई मंदिर परिसरात भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
0
0
Report

शिर्डी में गुरुपौर्णिमा उत्सव: लाखों भक्तों की भीड़, मंदिर रातभर खुला

Shirdi, Maharashtra:लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरातून अनेक पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. यंदाही गुरूपौर्णिमा निम्मित साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या पायी शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झालीय. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 28 जुलै ते 30 जुलै या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत असून या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलंय. V/O - श्री साईबाबा हयातीत असल्यापासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. श्री साईबाबांवर श्रध्‍दा असणारे लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी गुरुपौर््णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात व या उत्‍सवास हजेरी लावतात. तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून सोमवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. बुधवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिलीये..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top