icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
444601
ADANIRUDHA DAWALE19 Feb 2026, 05:35 am

बडनेरा में बोगस डॉक्टर पर मनपा की कड़ी कारवाई; बिना डिग्री इलाज पर मामला

Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बडनेऱ्यात बोगस डॉक्टरवर अमरावती मनपाची कारवाई; मनपा कडून गुन्हा दाखल, खोटी डिग्री लावून करत होता उपचार बडनेरा परिसरातील एका कथित बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केली. बोगस डिग्री लावून बडबेरा शहरातील नगीना मशिदीजवळील आठवडी बाजार परिसरात गेल्या १२-१५ वर्षांपासून डॉ. इंद्रजीत श्रीराम सरकार हे मुळव्याध व भंगदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होते. ते आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करत असल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार डॉ. रुपेश खडसे व डॉ. इमरान शहा यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. तपासणीनंतर संबंधिताकडे कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आढळले नाही. २४ तासांची मुदत देऊनही कागदपत्रे सादर न केल्याने बडनेरा पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. विविध औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त करण्यात आले. बडनेरा पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही असा इशारा मनपेकडून देण्यात आला.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Hindi headline

Chandvad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या निमोण गावाने यंदा पाणीटंचाईवर यशस्वी मात केली आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या या गावाने आता टँकरमुक्त गावांच्या यादीत स्थान मिळवले आहे गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य नियोजन करत विविध स्वयंभू उपक्रम राबवले ग्रामपंचायत आणि ‘राहा फाउंडेशन, मुंबई’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक एकर क्षेत्रावर साठवण तळे उभारण्यात आले या तळ्यात सुमारे सव्वा कोटी लिटर पाण्याची साठवण करण्यात आली असून हा साठा चार महिन्यांसाठी पुरणार असून तसेच गावातील दोन विहिरींच्या माध्यमातून दर चार दिवसांनी नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे ज्यामुळे ग्रामस्थांची पाण्याची गरज भागवली जात आहे निमोण गाव टँकरमुक्त झाल्याने शासनाचा देखील मोठा आर्थिक फायदा झाला असून दरमहा सुमारे दीड लाख रुपये खर्च वाचत आहे चार महिन्यांत एकूण सहा लाख रुपयांची शासनाची बचत झाली आहे.
0
0
Report

शिर्डी पुलिस के समक्ष दीपक लोंढे और अशोक खरात पर जांच शुरू

Shirdi, Maharashtra:दिपक लोंढे शिर्डी पोलिस ठाण्यात हजर. भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी हजर. एक तासांपासून दीपक लोंढे याची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. अशोक खरातसह दिपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याचा लोंढे यांच्यावर आरोप. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती. खात्यांवरून कोट्यवधींच्या व्यवहार. तर खरात पती पत्नीच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांवर लोंढे यांची देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांना संशय. शिर्डी पोलिसांकडून दिपक लोंढेंची चौकशी सुरू. लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष...
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में तीन बस स्टेशनों का उद्घाटन, परिवहन मंत्री सरनाईक ने स्थिति का गहरा आकलन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर के तीन ठिकाणी हमने बस स्थानक के उद्घाटन करने वाले हैं। प्रमुख द्वारा प्रत्येक निगरानी में प्रत्येक स्थान पर क्या-क्या कमी हैं.. बसों की संख्या कितनी है.. बसों की कितनी जरूरत है इसकी जानकारी परिवहन मंत्री के रूप में हम ले रहे हैं.. कोल्हापुर की प्रगति बढ़त चालली आहे. यहाँ बस सेवा अधिक होनी आवश्यक है. उपलब्ध डिपो उच्च गुणवत्ता का बनाने को हमारा कर्तव्य समझते हैं. एसटी महामंडळ नुकसान में ही आता रहा है. नुकसान कैसे भरना है इसका प्रयास है... एसटी ना फायदा.. न असर... इस सिद्धान्त पर चलने की भूमिका राज्य सरकार की. देश के किसी भी ST महामंडळ लाभ में नहीं हैं क्योंकि उन्हें जनता को सेवा देनी होती है. लेकिन नुकसान ना बढ़े और ST ना फायदा.. न तत्त्व पर चलते रहें यह हमारा प्रयास. ज्या बालासाहेबांच्या नामावर त्यांना महापौर पद मिळाले. अब वे विपक्ष नेता के रूप में काम कर रहे हैं.. ऐसी पद्धति से सभागृह में चर्चा करते समय वे ऐसे बोलेंगे तो हर शिवसैनिक को उनका विरोध करना चाहिए. महापौर और सभी सदस्योंने उन्हें जवाब दिया है. अंत में जिसका खाने चाहिये वो मीठा अगर गलत वक्तव्य के लिए है तो उसका विरोध जरूरी है. रिक्षा परमिट भाषिक विवाद यह भाषिक विवाद आदि कुछ उत्पन्न नहीं हुआ है.. महाराष्ट्र में जिसे व्यापार करना है. महाराष्ट्र का रिक्षा चलाना है तो उसे मराठी आना ही चाहिए. महाराष्ट्र का परिवहन मंत्री होने के नाते नहीं बल्कि राज्य के नागरिक के रूप में जो अधिकार सरकार ने दिए हैं, उसके अनुसार यह उचित है. रिक्षा के बैच देते समय उस ड्राइवर से फॉर्म भरवाया जाता है, जिसमें स्पष्ट रूप से मराठी बोलना आवश्यक है ऐसा स्पष्ट लिखा है.
0
0
Report

रत्नागिरी में भीषण गर्मी से जल भंडार घटे, जलसाठे संकट में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उन्हाचा 'ताप',पाण्याची 'वाफ'.. जिल्ह्याची चिंता वाढली! संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवर होऊ लागला आहे.. वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अत्यंत वेगाने होत आहे.. यापुढे तापमानात वाढ अधिकच होणार असल्याने जलसाठे अधिक वेगाने आटू लागण्याची शक्यता वाढली आहे.. जिल्ह्यात एकूण 46 लघु प्रकल्प आहेत..गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52 टक्के इतका उपयुक्त पाण्याच्या साठा होता,मात्र यंदा तापमान वाढले असल्याने या सर्व लघु प्रकल्पांमध्ये यंदा 36.94 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 58 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे..
0
0
Report
Advertisement

परंडा तहसील में अवैध बालू माफियाओं पर बड़ा राडा, तहसीलदार को धमकी

Dharashiv, Maharashtra:परंडा तहसील कार्यालयात वाळू माफियांवरून राडा, तहसीलदारांना थेट जीवे मारण्याची धमकी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू प्रकरणावरून मोठा राडा झाला आहे. तक्रारदाराने थेट तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवून “आत्ताच कारवाई करा, नाहीतर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. यावेळी तक्रारदार आणि तहसीलदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली असून, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.दरम्यान, या प्रकारानंतर महसूल विभाग आक्रमक झाला असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत तात्काळ अटक न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशाराही महसूल संघटनेने दिला आहे. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

अलीबाग: नाबालिग छात्रा के साथ स्कूल वैन चालक पर विनयभंग, पॉक्सो तहत मामला दर्ज

Chendhare, Maharashtra:अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी रोजप्रमाणे व्हॅनने शाळेत जात असताना चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. मांडवा सागरी पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report

राष्ट्रवादी के विद्यार्थी नेता संकेत कदम ने भाजपा में किया प्रवेश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्यूटिव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते संकेत कदम यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर संकेत कदम यांच्या सहकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं यादव यांनी स्वागत केलं.. आगामी काळात काही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं..
0
0
Report
Advertisement

भिवंडी के इंदिरा गांधी अस्पताल में सुरक्षा कर्मी ने मरीज को मारहाण, आंदोलन तेज

Thane, Maharashtra:भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांना सुरक्षा रक्षकाची मारहाण...आदिवासी संघटनेचे ठिय्या आंदोलन...अँकर...भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कुत्रा चावल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी आला होता. यावेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांना रुग्ण मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचा संशय झाला, ज्यामुळे वाद अधिक चिघळला. या वादानंतर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने हस्तक्षेप करत रुग्णाला मारहाण केली. तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाच्या निषेद्र्थार्थ आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शांती नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संबंधित सुरक्षा रक्षक आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. बाईट :- संदीप वाघे ( रुग्ण ) बाईट :- किशोर हुमणे ( श्रमजीवी संघटना कार्यकर्ता )
0
0
Report

पंढरपुर में जन्मदिन पर रिलस्टार महिला हत्या, प्रेमी ने गला घोंटकर दी मौत

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात वाढदिवसादिवशीच रिलस्टार महिलेची हत्या, अनैतिक संबंधातून प्रियकराने घेतला जीव पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील रिल स्टार महिलेचा मृतदेह पोलिसांना कालव्यात आढळून आला होता. सोशल मिडिया वर मोठ्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे खळबळ उडाली होती. विवाहित सोनाली नेताजी जाधव या महिलेचे तुकाराम गावंधरे सोबत प्रेम जुळले होते. यामुळे सोनाली आणि तुकाराम दोनघांचा पूर्वीचा संसार मोडला. यानंतर सोनालीची सोशल मिडीयात क्रेझ वाढली. त्यामुळे तिने तुकारामला वेळ कमी देऊ लागली. त्यात तिला नवीन मित्र भेटले. ती त्यांच्या सोबत फिरू लागली. यामुळे तुकाराम दुखावला त्याने सोनालीला संपवण्याचा कट केला. 6 एप्रिल रोजी सोनालीचा वाढदिवस होता. त्या दिवशी तुकारामने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने सोनालीला बाहेर नेले. यानंतर दोन दिवस सोनाली घरी आलीच नाही. 9 एप्रिल रोजी सोनालीचा मृतदेह रोपळे गावाजवळील कालव्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता तुकाराम गावंधरे याने सोनाली हिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. सोनाली साठी तुकारामचा संसार उध्वस्त झाल्याने सोनालीची हत्या केली.
0
0
Report

एनएमएमटी के कर्मचारियों के वेतन में 7000 रुपये की बढ़ोतरी; समिति का बड़ा निर्णय

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात (एनएमएमटी) ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरात अखेर वेतनवाढीचे दान पडले आहे. परिवहन समितीच्या बैठकीत चर्चेअंती, १३९८ कर्मचाऱ्यांच्या मानधनात ७ हजार रुपयांची सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महागाईने होरपळणाऱ्या चालक आणि वाहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे. या वेतनवाढीमुळे एनएमएमटी च्या व पर्यायाने महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाक्ठी कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा पडणार आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपुर में विधी विद्यार्थियों की दर्दनाक मौत, खड्डे में दुर्घटना

Nagpur, Maharashtra:नागपूर विधी विद्यापीठाचे दोन विद्यार्थी अपघातात ठार, वर्धा मार्गावर भीषण दुर्घटना सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के मृत, दोघेही २० वर्षीय विद्यार्थी एक न्यायाधीशांचा, दुसरा वकिलाचा मुलगा, विधी क्षेत्रात हळहळ ते दोघेही डोंगरावर शिवारात जेवणासाठी गेल्याची माहिती आहे... परत येत असताना खाणीचा खड्डा लक्षात न आल्याने आणि अंधार असल्यानं मदत मिळू शकलली नाही.. बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या sुमारास अपघात, बुलेटने परतताना दुर्घटना खाणीमुळे तयार खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली, अंधारामुळे खड्डा न दिसल्याची शक्यता रात्रभर जखमी अवस्थेत पडूनच राहिले, वेळीच मदत न मिळाल्याने मृत्यूची शक्यता सकाळी मित्रांच्या शोधातून घटना उघड, मजुरांना खड्यात दिसले दोघेही रक्तबंबाळ एम्समध्ये नेले असता मृत घोषित, पोलिसांकडून तपास सुरू वसतीगृहातून रात्री बाहेर कसे गेले? नेमके कुठे गेले होते याचा तपास पोलीस करणार आहे..
0
0
Report

चिखली के आदित्य लॉज पर छापा: 9 महिलाएं बचाईं, बांग्लादेशी युवती समेत 4 आरोपी गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिखली मधल्या आदित्य लॉजवर पोलिसांची धाड, 9 महिलांची सुटका; याր՞े एका बांगलादेशी तरुणीचा समावेश. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागानं चिखली मधल्या देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर छापा टाकला. या कारवाईत 9 पीडित महिलांची सुटका झाली; त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू होता, असे तपासात निष्पन्न झाले. सुटका झालेल्या 9 महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिची मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला यांना अटक केली. लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल उर्फ शाहीन मंडल यांच्या विरुद्ध IPC व PITA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top