Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ में संजय राठोड के साथ शिवसेना ने कांग्रेस को बड़ा झटका

SRSHRIKANT RAUT
Mar 21, 2026 05:32:37
Yavatmal, Maharashtra
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वणी आणि झरी पाठोपाठ घाटंजीतही काँग्रेसला खिंडार पाडले आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद व बाजार समितीमध्ये वर्चस्व गाजविणारे युवा नेते आशिष लोणकर व अभिषेक ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पुढील धक्का हा आर्णीत देऊ असा ईशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. तर येथील भाजप आमदाराला जेवढा विकास निधी दिल्या जातो तेवढा विकास निधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या लोणकर व ठाकरे यांना दिल्या जाईल असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 05:19:20
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 1 हजार 547 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान - सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका - अवकाळी पाऊस, वादळी वारा, तसेच गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल - अवकाळीमुळे 1 हजार 547 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, केळी, आंब्याच्या बागा उध्वस्त - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माळशिरस, सांगोला अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला मोठा फटका - अवकाळीग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी - जिल्ह्यातील शेतकरी महापुराच्या संकटातून बाहेर येत असतानाच शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा अवकाळीचे संकट
1008
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 04:50:06
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग – मंत्री आशिष शेलार ने अवकाळीग्रस्त भाग का निरीक्षण किया; मंत्रियों को देखकर किसानों के आंसू छलक पड़े। जानकारी तकनीकी शिक्षा मंत्री आशिष शेलार ने उत्तर सोलापूर तालुक के नुकसानग्रस्त भाग की निरीक्षण की। उत्तर सोलापूर तालुक के पडसाळी गाँव के द्राक्ष उत्पादक किसानों की दो दिनों पहले हुई बारिश के कारण द्राक्ष की बगिया बर्बाद हो गई। मंत्री आशिष शेलार ने किसान अंकुश शिरसाट के साड़े तीन एकड़ क्षेत्र की भुईसपाट द्राक्ष बाग का निरीक्षण किया। मंत्री आशिष शेलार ने नुकसानग्रस्त किसानों की व्यथा जान ली। मंत्री के समक्ष किसानों को आंसुओं का ढलान आया।
1025
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 21, 2026 04:47:58
Kolhapur, Maharashtra:अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीसह सर्व उपनद्या गाळाने खचाखच भरून जाण्याची भीती रुरकी समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यास महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढून महापूर प्रदीर्घकाळ कोल्हापूर आणि सांगलीसह नदीकाठच्या गावांमध्ये राहू शकतो, परिणामी गावांचे अस्तित्व देखील धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी साडेआठ ते दह फुटांनी वाढ होते. जर धरण 524 मीटरने भरल्यास धरणाचे बॅक वॉटर थेट 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली पर्यंत येते. त्यामुळे आणखी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा বॅकवॉটার वाढून नदीपात्रातील गाळ आणखी वाढायला सुरुवात होईल, त्यामुळे रुरकी समितीने यावर निष्कर्ष काढत अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलय.
1013
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 21, 2026 03:49:41
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उसाच्या शेतात गांजाची अवैध लागवड उघड... ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत... लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे... स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत शेतात गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक केली आहे... लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील राजकुमार देशमुख यांनी स्वतःच्या शेतात उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती... या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला... आणि या कारवाईत तब्बल १०८ गांजाच्या झाडे आढळून आली... जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५ लाख २२ हजार ७५ रुपये इतकी असून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे... या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे...
1009
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 21, 2026 03:49:29
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या कपाशीतून क्विंटल मागे सात ते आठ किलो कट्टी ग्रेडर काढून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेजारील तेलंगणा राज्यातून आलेला कमी दर्जाचा कापूस या खरेदी केंद्रावर खरेदी केला जातोय. तसेच व्यापाऱ्याचा कापूस देखील अनेक शेतकऱ्यांच्या नावे खरेदी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. या कापूस खरेदी केंद्रावरील काळाबाजार थांबवावा, संबंधित ग्रेडरची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
928
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 21, 2026 03:34:41
Amravati, Maharashtra:जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर, रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह अँकर :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील अपघातकक्ष २४ तास कार्यरत असतो. येथे अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील तसेच विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र अशा संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडक फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच एक भटका कुत्रा बेडजवळ फिरताना दिसला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः जखमी रुग्णांसाठी अशा अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. स्थानिक नागरिकांच्या मते, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नियंत्रण नसल्याने भटकी जनावरे सहज आत येतात. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून अपघात कक्षात कुत्र्यांचा वावर नियमितपणे दिसत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अपघात कक्षासह संपूर्ण रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करणे, स्वच्छता राखणे आणि भटक्या प्राण्यांचा प्रवेश रोखणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
1098
comment0
Report
Advertisement
Back to top