Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना

Aug 27, 2024 03:44:19
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करण्यात आली. "जय कन्हैया लाल की" अशा गजरात आणि शंखनादात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक कुटुंबांत शेकडो वर्षांची श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, आणि या दिवशी सुंदर देखावे विशेष आकर्षण ठरतात. मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होतात, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होणार आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 03, 2025 03:48:55
Latur, Maharashtra:लातूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर ४४० आक्षेप अर्ज प्राप्त.... लातूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दोन डिसेंबर पर्यंत एकूण ४४० आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप अर्जाची छाननी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादीतील त्रुटी सुधारणे आणि अंतिम यादी अचूक बनवण्याच्या दृष्टीने हे आक्षेप अर्ज महत्त्वाचे ठरणार आहेत. आक्षेपांच्या छाननीनंतर स्थळ पाहणी होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे....
34
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:46:16
Washim, Maharashtra:वाशिम : रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील आडोळी परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सतीश इढोळे यांच्या शेतातील कोवळ्या गहू पिकावर रोही व हरणांनी रात्रीच्या वेळी हल्ला चढवून मोठा हाहाकार माजवला. परिणामी नव्याने उगवलेले गव्हाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. गहूं पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशा पसरली आहे. परिसरात दररोज रात्री वन्यप्राण्यांची वर्दळ वाढत असून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वन विभागाला तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना न झाल्यास हंगामाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
33
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:32:31
Washim, Maharashtra:ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या मनरेगा योजनेतील अनुदान वाढवूनही प्रत्यक्षात लाभार्थ्यांना निधी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. केंद्र सरकारने सिंचन विहिरीसाठीचे कमाल अनुदान चार लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविले असले, तरी प्रत्यक्ष निधी वितरणात तब्बल एक ते दीड वर्षाचा विलंब होत असल्याचे चित्र आहे. या विलंबामुळे मनरेगा अंतर्गत हाती घेतलीली अनेक वैयक्तिक कामे विहिरींचे खोदकाम, शेततळे, बांधकामे अडकून पडली आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली असली, तरी अनुदान न मिळाल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत आहे. अनुदान मिळण्यात होत असलेल्या या विलंबाबाबत शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने निधी वितरणाला गती द्यावी,अशी मागणी सातत्याने होत आहे.
138
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 03, 2025 03:31:56
112
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:31:01
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड,मंगरूळपीर,कारंजा नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत येथे झालेल्या निवडणुकीत काल शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण 65.47 टक्के मतदानाची नोंद झाली असून, चारही ठिकाणांपैकी सर्वाधिक मतदान रिसोड नगरपरिषदेत झाले.येथे तब्बल 71.22 टक्के मतदारांनी उत्साहाने हक्क बजावला.या निवडणुकीत ४ नगराध्यक्ष पदांसाठी एकूण २७ उमेदवार तर ९० नगरसेवक पदांसाठी तब्बल ३७४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्रांवर ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पडली.आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत. कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? विजयाचा गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली आहे.
146
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 03, 2025 03:02:26
Navi Mumbai, Maharashtra:पंकजा मुंढे के PA अनंत गर्जे की पत्नी गौरी ने आत्महत्या कर ली। उन्हें दो बार पुलिस कोठड़ी मिल चुकी थी, इसके बाद शिवडी न्यायालय ने 14 दिनों की न्यायिक कोठड़ी दी। पुलिस कोठड़ी के दौरान एफआयर में नामित अनंत गर्जे की पूर्व प्रेमिका के बयान वरळी पुलिस ने दर्ज किए। 2022 से मेरा अनंत के साथ कोई संबंध नहीं, ऐसा एक पुरुष ने बयान दर्ज कराया। गौरी के घर मिले कागजातों के बारे में मुझे कोई जानकारी नहीं। अनंत के शरीर पर कई जख्म थे, परन्तु अनंत का दावा है कि खिड़की से भीतर प्रवेश करते समय उसकी शरीर पर हल्की चोटें आईं। पोतदार अस्पताल जाते समय गौरी को लेकर, जब उसे मृत पाया गया तो उसने अपना सिर दीवार से टकराने का प्रयास किया, जिससे उसे चोट आई। पोतदार अस्पताल में अनंत खुद को मार लेने के प्रयास के CCTV फुटेज पुलिस के हाथ लगे। पहले कहा था कि मुझे खुद पुलिस कोठड़ी दी जाए, इस मामले में स्पष्टता पाने के लिए पुलिस कोठड़ी मांग थी। अब पुलिस ने खुद न्यायालयीन कोठड़ी मांगी है; पलिग्राफी टेस्ट और नार्को टेस्ट कराए जाने हैं, नए कानून के अनुसार उन्हें पुलिस कोठड़ी पुनः मिल सकती है। अनंत के शरीर पर जख्म: कुछ पुराने, कुछ उसी दिन के। 5.12 को वरळी की दिशा में जाना था, 5.22 को वरळी ऑफिस, 5.32 विमानतल दिशा, गौरी का फोन आया, लौटे, घर गए, दरवाजा खटखटाने पर दो महिलाएं आईं, गर्जे ने रेफ्यूज एरिया से घर में प्रवेश किया और गौरी को पोत्तदार अस्पताल ले गया; उसे पता चला गौरी चली गयी, इसके बाद उसने खुद को मार लिया; उसका जख्म CCTV फुटेज में है। जमीन अर्ज करने की बात: 14 दिनों की न्यायालयीन कोठड़ी मिली है; जल्द ही जमानत के लिए अर्ज करेंगे।
131
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 03, 2025 02:47:50
Nagpur, Maharashtra:कामठीचे कालचे व्हिडिओ वापरावे ------------- नागपूर - *नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेची निवडणूक रद्द करुन फेरनिवडणूक घेण्याची मागणी* - *कामठी नगर विकास कृती समितीने राजकुमार रामटेके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली याचिका* - ३१ ॲाक्टोबरला जाहिर केलेल्या अंतीम मतदार यादीत अनेक मतदारांचे अनुक्रमांक बदलल्याचा आरोप - *”अनुक्रमांक बदलल्यामुळे अनेक मतदारांना नावं मिळुन आली नाही, काहींना मतदानापासून वंचित रहावं लागलं*” - त्यामुळे २ डिसेंबरला झालेली कामठी नगरपरिषद निवडणूक रद्द करुन फेरनिवडणूक घेण्याची मागणी - या याचिकेवर आज सुनावणी होणार, - तसेच बेसा पिंपळा येथील रिपब्लीकन लोकशाही मोर्चा द्वारा समर्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती वानखेडे यांनीही बेसा पिंपळाची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. - बेसा पिंपळा येथील मतदान क्रमांक 15/1 आणि 17/2 बी यु, आणि सी यु हे जोडलेले दोन महत्त्वाचे भाग बदलल्या गेल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली आहे
89
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 03, 2025 02:47:22
Nashik, Maharashtra:मोबाइलसह रोकड हिसकवणाऱ्याला अटक नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बळजबरीने मोबाइल व आठ हजारांची रोकड हिसकावून घेत मोबाइलद्वारे ऑनलाइन १९ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडून जबरी लूट करून फरार झालेला आरोपी सौरभ साटोटे याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केलीये..मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत संशयित सौरभयाने गेल्या सप्टेंबरमध्ये एकाची जबरी लूट केली होती. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना तो नाशिकमधून फरार झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने आगरटाकळी भागातील समतानगरमध्ये सापळा रचला. तेथे सौरभ हा आला असता त्याला ताब्यात घेत वाहनात डांबले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध जबरी लूट, खुनाचा प्रयत्न, दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे...
183
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 03, 2025 02:46:40
Satara, Maharashtra:करण地方 स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील सुरू असलेल्या गोंधळावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गोदावूनमध्ये 15-16 दिवस पेट्या ठेवून सरकार घालमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कमी होत चालल्याचे सांगताना, कोर्टातही सरकार आपली बाजू नीट मांडू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजप सरकारने 73वे आणि 74वे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप करीत, देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही येण्याचा इशाराही त्यांनी दिला. निकाल पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवत, “100% चूक सरकारचीच” असल्याचे सांगितले.
162
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 03, 2025 02:30:43
Nashik, Maharashtra:नाशिकके सातपूर परिसरातील समतानगर भागात कृष्णकुंज नावाच्या बंद घरात सप्टेंबरमध्ये घरफोडी करून सुमारे १६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज लूटून फरार झालेला सराईत गुन्हेगार संशयित परबतसिंग सिकलीकर यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केलीय..या सातपूरमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२चे पथक करत होते...संशयित आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना हवालदार यांना सिकलीकरबाबतची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथक सज्ज करत नंदुरबारला रवाना केले. पथकाने साध्या वेशात सिकलीकर याच्याबाबत माहिती काढली. मिळालेल्या माहितीवरूनपथकाने सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यास नाशिक येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने सातपूरमधील दोन व उपनगरमधील एक अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली. दोन दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यास पुढील तपासाकरिता सातपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे....
209
comment0
Report
Advertisement
Back to top