Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना

Aug 27, 2024 03:44:19
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करण्यात आली. "जय कन्हैया लाल की" अशा गजरात आणि शंखनादात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक कुटुंबांत शेकडो वर्षांची श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, आणि या दिवशी सुंदर देखावे विशेष आकर्षण ठरतात. मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होतात, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होणार आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Nov 18, 2025 12:06:06
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे Slug - निवडणूक आयोगाच्या दोन वेगवेगळ्या आदेशानी अर्ज छाननीत बाधा Anc - नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरताना पर्यायी उमेदवाराबाबत निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल 17 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशातील सूचनानुसार नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र निवडणूक आयोगाने काल म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी काढलेला आदेश रद्द करत असल्याचा नवा आदेश आज काढल्याने नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या राज्यातील अनेक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद होणार आहेत. त्यामुळे निवडणूक लढू इच्छिणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे।
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 18, 2025 11:54:15
Navi Mumbai, Maharashtra:वांद्र्यातील किल्ल्या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. त्यात मद्य वितरण करण्यात आल्याचं विडीओ समोर आला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज किल्ल्याच्या गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चा चे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. सुरुवातीला पोलिसांनी किल्ल्यावर जाण्यास मनाई केली होती. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि किल्ल्यावर जाऊन शुद्धीकरण करणार असल्याची भूमिका घेतली. तसेच मद्यबंदीचे बॅनर लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना आत सोडून फलक लाऊ दिले. याचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांशीconversation केली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 18, 2025 11:27:20
Nashik, Maharashtra:शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आय हिरे आपल्या समर्थकांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे मालेगावातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असून, हा शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच भाजपकडून जिल्ह्यात इनकमिंग सुरू झाले आहे. मालेगावात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्याचवेळी अद्वय हिरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अद्वय हिरे यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर आज त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. श्री. हिरे यांच्याबरोबर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पवन ठाकरे यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात मंत्री महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला प्रवेश सोहळा होईल. अनेक हिरे समर्थक रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत.
83
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 18, 2025 10:53:13
Kalyan, Maharashtra:शिवसेनेला शिंदे गटाला धक्का.. शिसेनेचे तीन माजी नगरसेवकांचा भाजप मध्ये प्रवेश.. महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर.. रवींद्र चव्हाण. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांचा भाजपात प्रवेश... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही शिवसेना भाजपा मध्येच रस्सी खेच सुरु आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी चा प्रवेश सुरु आहे तर भाजपा चे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश सुरु आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकांतील युतीचा महापौर होणार असं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं
82
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 10:32:58
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग| ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया फॅमिली पॉलिटिक्सवरही दिली प्रतिक्रिया कुणी जात नाही, जे जात आहेत त्यांचं पोट भरलेला आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे मोठे झाले आणि सोडून जात आहेत म्हणजे स्वार्थासाठी ते गेलेले आहेत शिंदे गट असेल किंवा भाजपा असेल हे फक्त शिवसेना फोडण्याचे काम करत आहे, दुसरा काहीच त्यांचा उद्देश नाही,जे सोडून गेले त्यांची परिस्थिती नंतर वाईट होते मंत्रीालयातील एक जण मला भेटला होता, तर ती व्यक्ती मला म्हणत होती कुठेही पत्र आता मंजूर होत नाही, मुख्यमंत्री देखील करत नाही आणि उपमुख्यमंत्री देखील करत नाही त्यामुळे आता हे लोक परेशान झाले आहेत, पूर्वी शिंदे यांच्या काळात खूप पैसे वाटून झाले, ते फक्त शिंदे गटाला दिले भाजपाला दिले नाही आणि यावेळी आता भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे यांना निधी देत नाही, त्यामुळे आता कोणी जाणार नाही. शिंदे गटात गेलेली आमची नगरसेविका शिल्पा राणी हिने कंटाळून राजीनामा दिला, ती कुठलेही पक्षाचा जाऊ शकते शिंदे गटाचीच एक माजी जिल्हाप्रमुख राजपूत तोदेखील शिंदे गट सोडून आला, त्यामुळे शिंदे गटाला पण आता गळती सुरू होईल एकनाथ शिंदे ने उद्धव साहेबांना धोका दिला त्यामुळे आता त्यांना देखील लोक धोका देतील त्यामुळे शिंदे गटांनी भाजपमध्ये आमचे कोणी जात नाही जे जात असेल ते स्वार्थासाठी, त्यांचे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना अडचण होईल कुणी गेले तरी आम्हाला फरक पडत नाही शिवसेना ही अभेद आहे, संकट येतात आणि जातात उलट आमची शिवसेनाही वाढेल. आमच्यासारखे प्रामाणिक एकनिष्ठ आहेत ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केले आणि आता उद्धव साहेबांसोबत देखील काम करत आहे, आदित्य साहेबांसोबत देखील काम करतील हे तीन पिढ्या सोबत काम करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आम्ही सांभाळून घेतलं आम्ही त्यांना मोठं केलं, त्यानंतर मोठे पद मिळाले की काही गुणधर्म माणसातील बदलतात काही खोडसाळ कार्यकर्ते आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात स्थानिक नेतृत्व जबाबदार नाही, माझ्या काळात नगरपालिका आणि महानगरपालिका आली, जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, अनेक वेळा महापौर आपले झाले, स्थानिक नेतृत्वामुळे असं होत नाही, त्यांच्या स्वार्थामुळे ते जात असतात. वैजापूरला आमचे आर এম वाणीसारखे लोक एकनिष्ठ, कडवट आणि वरिष्ठ माणूस त्यांना त्यांच्या मुलाने सोडून दिलं त्यांचे विचार कसे होते आणि त्यांच्या मुलांचे विचार कसे आहेत, फक्त पैशांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये मुलाखती दिल्या, आणि भाजपाला तेच हवे मोठ्या मोठ्या लोकांचे पोरं फोडायचे यांना समजून येत नाही की आपण काय करत आहोत, जी वडिलांची एकनिष्ठता असते ती हे पाळत नाहीत. आमदार असतील खासदार असतील किंवा इतर माजी पदाधिकारी असतील ते आपल्या मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच अजून वातावरण खराब होतं. राजू शिंदे भाजप प्रवेश त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत नव्हता, आमच्याकडे त्यांचा पराभव झाल्यानंतर ते तातडीने सोडून गेले अशा माणसाला आम्ही प्रवेश दिला ज्याने आमच्या महापौरांना त्रास दिला, अनेकांचे विरोधात बोलला तरी अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षात घेतलं, तिकीट दिलं त्यानंतर ते पडले आणि पुन्हा परत गेले हरिभाऊ बागडे सोबत अनेक वेळा फोटो दिसत मला, त्यांचे आमच्याकडील एकही बैठकीला ते उपस्थित नसतात आमच्या कार्यकर्त्यांनी किती काम केले तुमच्यासाठी आणि त्यावर तुम्ही पाणी फिरवले अतुल सावे यांच्या विरोधात त्यांनी काम केलं होतं म्हणून आतापर्यंत त्यांना पक्षप्रवेश भाजपामध्ये मिळत नव्हता, अतुल सावेंच्या विरोधातील इम्तियाज जलील यांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं पण स्पष्ट सांगतो तो माणूस काही कामाचा नाही अनेक उद्योगात तो ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवतो मुळात त्याला आम्ही घ्यायला नव्हतं पाहिजे एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला तिकीट द्यायला हवे होते, पण शेवटी ते गेले शिंदे गट नाराज एकनाथ शिंदे यांचा कोणताही माणूस कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाहीत आता त्यांचे भांडण सुरू आहेत ही नियती आहे, उद्धव साहेबांनी त्यांना फ्रीहँड देऊन देखील त्यांनी उद्धव साहेबांना सोडलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी पक्ष फोडला त्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चुकीचे नाही तर चांगलं काम करत आहेत.
134
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 10:09:10
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची कार अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी समुद्राच्या आतपर्यंत कार नेल्याने ती वाळूत रुतून अडकण्याची घटना घडली. भरती येण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी तत्परतेने मदत करत कार बाहेर काढण्यात यश मिळवले. समुद्रकिनाऱ्यावर कार नेऊ नका, असे वारंवार आवाहन करूनही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा फटका त्यांना स्वतःलाच बसत असून अशा घटना वाढताना दिसत आहेत. या फसगतीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ... पर्यटकांच्या बेफिकीर वागण्यावर टीका होत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
113
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 18, 2025 10:03:09
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस नेते। हिडमा खात्मा गडचिरोली पुलिसांचे हे यश आहे, एक चांगला अधिकारी लाभतो तेव्हा परिणाम चांगला येतो हे स्पष्ट झाले. हीडमाचा खात्मा होणे म्हणजे नक्षलवादांचा कणा मोडणे असे संकेत आहेत. 60 जवान मागील 20 ते 22 वर्षांपासून वनत आहेत, काहींच्या नावाने नक्षली घाबरत होते, निलोत्पल चांगले काम केले, पोलीस दलाचे अभिनंदन, शहाजी बापू भाजप टीका सांगोल्यात झालेली ही सुरुवात आहे, भाजप हा कोणालाच सोडणार नाही असा पक्ष आहे.. ज्याची साथ घेते त्यालाच पहिले गिळतात भाजप काम अजगरासारखे आहे... लहान मोठे साप घेऊन गिळणे यांना काँग्रेसच्या लोकांची गरज पडत आहे. यातूनच हे दिसत आहे की शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना त्यांचे दुःख मनातून आलेलं आहे. आता त्याची कळ भारी आहे. हे शिंदे सेनेला दिसत आहे, ते असह्य होईल तेव्हा उपचारासाठी बाहेर पडावे लागतील... कॉंग्रेस स्वबळाचा नारा, - सामना आम्ही उबाठा बरोबर युती करायला तयार आहे. तिसरा पार्टनर नको अशी आमची भूमिका होती. आम्ही पवार साहेबांसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करायला अडचण नाही.. आजही तयारी आहे. नवी पार्टनर तुम्ही जोडून वाटा देऊ नका, ते आम्हाला मान्य नाही. कार्यकर्त्याला ही संधी मिळाली पाहिजे. सबुरी ठेवून काम करत आहे... नागपूर कॉंग्रेस गटबाजी हे फार आता गंभीर आहे, हे नको व्हायला नको होतं. प्रदेशाध्यक्षांच्या कानावर याबाबत टाकलेल आहे. त्याची चर्चा होईल. आज या परिस्थितीतून पक्ष जात आहे. गटबाजी संपुष्टात आणून एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वरिष्ठासोबत चर्चा करू नागपूर ग्रामीणच्या विषय, अनेक ठिकाणी काँग्रेस कमजोर झाली. लोकं जाणं येत असतात सत्ता आणि पदे साठी जर पक्षाबरोबर जात असतील त्याला काही इलाज नाही. पद आलं, गेलं याचा फरक पडत नाही..आज जे काही जात आहे ते पदासाठी जात आहे. असा त्याचा अर्थ धरून... नागपूर ग्रामीण मध्ये पक्ष मजबूत आहे या संदर्भात अंतर्गत नेत्यांसोबत चर्चा करून भविष्यात झालेल्या गोष्टी पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊ. विषय हायकमांड पत्र पक्षात काही म्हणणं असेल तशा पद्धतीचे पत्र व्यवहार केले जात असतात याचा अर्थ दिल्लीत विषय गेला असा सांगण्यात अर्थ नाही... चर्चा झाली किंवा कमी जास्त झालं असेल काही वाद असेल न्याय मिळत नसेल, त्यावेळी दिल्लीला पत्र व्यवहार करत असतात. दिल्ली त्याची गंभीर घेत असतात...दखल घेतली तर चर्चा होईल आणि चर्चेत बसून मार्ग काढला जाईल. कामठीतील व्यक्ती 5 वर्ष नगराध्यक्ष राहिल्यावर. त्यांनी पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली दिली नाही म्हणून सोडून गेला ही पक्षाची गद्दारी आहे. आरक्षण कोर्ट सुप्रीम कोर्टात दोन न्यायाधीशाचा खंडपीठाने त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारला सुनावले सुद्धा आहे. जो आदेश दिला त्याचा विपर्यास करून निवडणुका घेतल्या जात आहेत. इतर भागात प्रचंड नाराजी आहे. घटनापिठाचे आदेश आहे, राज्य सरकारने दुर्दैवाने विपर्यास केला... आणि आपली पाठ थोपटून घेत असताना 27% आरक्षण देतो अशी खोटी आवई उठवली..लोकांची फसवणूक केली दिशाभूल केली. हे आरक्षण 50 टक्के तेव्हा देता येत नाही.... ट्रिपल टेस्ट आणि घटना पीठाचे दोन निर्णय आहे त्या निर्णयाला धरूनच निवडणुका होणे अपेक्षित होत्या. उद्या챠च निवडणुका रद्द झाल्या तर फटका सर्वांना बसणार आहे... उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. आमच सरकार असताना आरक्षण कमी होत होत. तर धुळे, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीसाठी दोन किंवा तीन जागा राहिल्या. तिथे 40 टक्के ओबीसी आहे... अशा पद्धतीने ओबीसीच्या जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे तो निर्णय लागलेला नाही. यावेळेस मात्र महायुती सरकार आहे, यांनी कोर्टाने आदेश काढला, त्याला अधीन राहून निवडणुका घ्यायच्या होत्या, उद्या निवडणूक रद्द करण्याची पाळी येऊ नये, लोकांना सरकार मूर्ख बनवत आहे, कोर्टाने वेगळा निर्णय दिला, इंपेरीलाल डेटा लक्षात घेऊन निवडणुका घ्या सांगितले, हा गंभीर विषय होईल, बारामती अजित दादा काळी जादू अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर काळा जादู लागू झाली. विश्वास ठेवायला लागले का? राज्य सरकारने यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा केला होता. तो कायदा कडक केला पाहिजे. यावर जर बातमी होत असेल अजित दादांना विचारलं पाहिजे की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता ka? हे नींबू राजकारण खराब करण्यासाठी आणलाय की? पार्थ पवारांनी जमीन घोटाळा केला त्यातून सुटकेसाठी तर हा प्रयोग आपणच केला तर नाही ना? कॉंग्रेस सरकारने केलेले कायदे कडक करून त्याचे अंमलबजावणी करा नाहीतर आम्हाला विश्वास ठेवणार नाही.. प Pune जमीन तो तहसीलदार येवले चोर आणि बदमाश माणूस आहे....त्याने अनेक जमिनीचे घोटाळे केले. त्या सर्वे नंबर झाला... सगळे मोकाट फिरत आहे, सांडासारखे.. कलेक्टरांना माहित नाही का?. हे सगळं राजकीय दबावापोटी झालेला आहे. एवढे करूनही व्यवहार रद्द झाला नाही सरकारने कारवाई केली पाहिजे, कोर्टात धाव का घेतली...महसुलमंत्री जिल्हाधिकारी का कारवाई करत नाही... हा मोठा घोटाळा आहे...यात कोणीही सुटता कामा नये..आम्ही अधिवेशनात याचं काय उत्तर मिळते कां ते बघणार आहोत. एकमेकाला हे वाचवण्याचा काम करत आहे..सगळे चोर मोवस भाऊ एकमेकांना मिळून खाऊ अशी लूट महाराष्ट्रात या जमिनीची सुरू आहे. Am Media company मुदत वाढ मुदतीत पैसे भरले पाहिजे... मुदतीत दंडासकट पैसे भरले पाहिजे.. तर पैसे भरत नसेल तर त्यात सरकारने कारवाई केली पाहिजे....महसूल मंत्री दबावत आहे. ते आपले निर्णय वारंवार बदलत असतील तर, तेही दबावत आहे. सत्तेपुढे कधी कधी नरमाई घ्यावी लागते. बावनकुळे यांच्या भूमिका काय करणार ते बिचारे ठरत आहे...
251
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 18, 2025 09:52:27
Nashik, Maharashtra:ठाकरे सेनेचे अद्वैय हिरे भाजपात प्रवेश बंधू अपूर्व हिरे आधीच भाजपात मालेगावात भाजपाची ‘हिरे’ शक्ती वाढली मालेगावात शिंदे गट नेते दादा भुसे यांची कोंडी? बंडू बच्छावही करणार भाजपात प्रवेश – राजकीय गणितात उलथापालथ मालेगावचे समीकरण बदलणार? Anchor स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्ताने मालेगावमध्ये पुन्हा एकदा राजकीय वारे जोरदार वाहू लागले आहेत. ठाकरे सेनेतील अद्वैय हिरे यांचा भाजपात प्रवेश केल्या भुसे विरुद्ध हिरे लढा प्रबळ होणारे. त्यांच्या भावाने—अपूर्व हिरेंनी—काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. आता दोन्ही भाऊ एका पक्षात येणार असल्याने स्थानिक राजकारणात मोठा भूकंप मानला जातोय. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रबळ नेते दादा भुसे यांच्या राजकीय समीकरणांना यातून मोठा धक्का बसू शकतो. VO 1मालेगाव.. हिंदू मुस्लिम विद्वेषाने होणाऱ्या दंगली आणि तेथील वैमनयांच्या राजकारण... समाजवादीचे निहाल अहमद यांच्यापासून ते आजवर मालेगाव मध्य मध्ये आधारित हिंदुत्वाच्या कार्डवर ठाकरे शिवसेनेने मालेगाव बाह्य ला आपला किल्ला बनविला आहे. मात्र आता शिवसेनेकडून हिसकावून घेतलेले हिंदुत्व आता भाजप इथेही ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.गेल्या दोन दशकांपासून आमदारकीच्या अढळपदी असलेल्या दादा भुसे यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. अपूर्व हिरे यांच्यानंतर त्यांचे बंधू अद्वैय हिरे यांना प्रवेश देत भाजपाने चक्रव्युवाह तयार करण्यास सुरुवात केलीय Byte अद्वैत हिरे Vo 2 खरंतर दादा भुसे हे शिंदेंचे खास मानले जातात. पहिल्या फळीतील असलेल्या या नेत्याची मालेगाव साह संपूर्ण जिल्ह्यावर संघटनेत हुकूमत आहे. ही पकड घालविण्यासाठी भाजपाने ‘हिरे कार्ड’ सोबत भुसे यांचे खास निकटवर्तीय बंडू बच्छाव यांना देखील भाजप प्रवेशासाठी आवतण दिले आहे. येत्या 28 तारखेला गाजावाजा करत ते भाजपात दाखल होणारे. मालेगाव बाह्य मतदारसनघात विकास आणि नव्या समीकरणांच्या राजकारणात हिंदुत्वाच चित्रण नव्याने रेखाटलं जात आहे. Byte 2 सुनील बच्छाव जिल्हाध्यक्ष भाजप Vo 3 आधीच शेजारी असलेले आमदार सुहास कांदे आणि भुसे यांचे सेनेत फारसे सख्य नाही. महाजन यांना भेटून कांदे यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला आहे. त्यामुळे भुसे यांच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या संघर्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चुणूक दिसणार आहे. यात विजयी कोण ठरतो हे येणारा काळच सांगेल
67
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 09:51:54
Vasai-Virar, Maharashtra:वसईतील जि. प. शाळेला ग्रामस्थानी ठोकले टाळे शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांचे आंदोलन अँकर - वसईतील कामण जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांच्या टंचाईमुळे आज पालक आणि ग्रामस्थांचा रोष शिगेला पोहोचला. तब्बल 1046 विद्यार्थ्यांची शाळा केवळ 9 शिक्षकांवरच चालत असल्याने, शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी वारंवार केली होती. शाळेसाठी किमान 19 शिक्षकांची आवश्यकता असूनही नियुक्ती न झाल्याने संतप्त पालकांनी आज शाळेला टाळे ठोकत आंदोलन छेडले. माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी यापूर्वी गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या मागणीसाठी पाठपुरावा केला, तसेच ही समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही मांडली होती. मात्र कारवाई न झाल्यानंतर अखेर पालक रस्त्यावर उतरले. घटनेची माहिती मिळताच ॲड. दिनेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मंगळवारपासून 5 नवीन शिक्षक रुजू होतील, अशी हमी मिळाल्यानंतर पालकांनी शाळेवरील टाळे काढत जल्लोष केला. कामण शाळेत शिक्षक वाढल्यानंतर शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
162
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 18, 2025 09:51:36
Akola, Maharashtra: वाळवंटात ही नंदनवन असाच काहीसा उदाहरण खरं करून दाखवल आहे अकोला जिल्ह्यातील मरोळा गावातील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल गावंडे यांनी... खारपाणपट्ट्यात गावंडे यांनी उत्तम पाण्याचं नियोजन करून शेती सुपीक केलीय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मरोळा गावचा विठ्ठल गावंडे नावाचा धडपडा शेतकरी खारपानपट्ट्यातही शेतीत मोठी क्रांती घडवून आणतोय.जिथं पाण्याचा लवलेश नाही, तिथंही विठ्ठलांनी ध्येय डोळ्यापुढं ठेवत 14 एकरात नावीन्यपूर्ण शेती उभी केलीय.पठार नदीतून लांबवर पाईपलाइन टाकून गोळ्या पाण्याची व्यवस्था केली, आणि त्यावर ठिबक लावून विविध फळझाडं, सावलीची झाडं आणि बहुवर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली.विशेष म्हणजे त्यांची ही संपूर्ण शेती ही सेंद्रिय आहे ते आपल्या शेतात कोणत्याही प्रकारचा रायनिक वापरत नाही.निसर्ग संवर्धन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधत विठ्ठल गावंडे यांनी कोरड्या आणि खारपाणी असलेल्या जमिनीतही शेतीचा नवा आदर्श घडवला आहे,आज या उपक्रमातून ते वर्षाकाठी लाखोंचं उत्पन्न मिळवतात, आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी वाट दाखवत आहे.
120
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 18, 2025 09:36:48
Kalyan, Maharashtra:शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये गेलेल्या माजी नगरसेवक महेश पाटील यांचा शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप पक्षप्रवेश करायला मी ठरवलं नव्हतं मात्र आमचीच लोक आमच्या विरोधकांना मोठं करतात माझा विरोधक मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला वाचवण्याचा आणि क्लीनचीट देण्याचं काम आमच्या पक्षातील लोकच सपोर्ट करतात मला व माझ्या मुलाची हत्या करण्याच्या कट ज्यांनी रचला त्यांना अटक करू नका त्याचा दबाव देखील आमच्याच पक्षातील लोकांनी टाकला आमच्या पक्षातील लोक त्यांना मदत करतात ही गोष्ट मला कळली तेव्हापासून दडपणा खाली काम करत होतो जी लोक आपल्या विरोधकांना सहकार्य करतात... त्यांच्यासोबत काम करू शकत नाही म्हणून मी भाजपमध्ये आलो दोन ठिकाणी राहुल अशा गोष्टी करत असाल तर मला हे जमणार नाही असे खासदारांना सांगून मी त्या ठिकाणी बाहेर आलो महेश पाटील यांचा विरोधक कुणाल पाटील आणि हत्याचा कट रचणारे त्यांचे काका वडार पाटील यांना पक्षातील लोकांकडून मदत होत असल्याचा आरोप करत .. भाजपमध्ये प्रवेश केल्याचे महेश पाटील यांनी केले स्पष्ट श्रीकांत शिंदे चा मला फोन आलेला दोन शिंदे असं करत असेल तर मला जमणार नाही माझ्या मुलाला आणि मला धमकी येतं असेल आणि तुम्ही समर्थन देत असाल तर तुमच्या कडे राहून काय करणार..
139
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 18, 2025 09:17:17
122
comment0
Report
Advertisement
Back to top