Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना

Aug 27, 2024 03:44:19
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करण्यात आली. "जय कन्हैया लाल की" अशा गजरात आणि शंखनादात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक कुटुंबांत शेकडो वर्षांची श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, आणि या दिवशी सुंदर देखावे विशेष आकर्षण ठरतात. मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होतात, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होणार आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 16:15:47
Baramati, Maharashtra:इंदापूर तालुक्यात थाई मांगूरच्या अवैध पालनावर धडक कारवाई.... कालठन नं. १ येथे अडीच टन बेकायदेशीर मांगूर जप्त... महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई.... इंदापूर तालुक्यातील कालठन नं. १ परिसरात थाई मांगूरच्या अवैध पालनावर मत्स्यव्यवसाय विभाग, बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पोलिसांनी संयुक्त कारवी करत तब्बल अडीच टन अवैध मांगूर मासे जप्त करून नष्ट केले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या या प्रजातीचे संवर्धन राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही बेकायदेशीर मांगूर शेती कर्मयोगी_sakhara_ कारखान्याचे संचालक_hanumant_jadhav_yanchya_shetat_ aadhlun_aali, तर त्यांच्या_bandhu_sandeep_jadhav_yanchavar_gunha_dakhhal_karlar_ahe. या महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई असून, मांगूर शेतीचे समूळ उच्चाटन होईपर्यंत धडक कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
239
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 15:30:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नाद करा पण आमचा करू नका हे म्हणायला का कोणाचे परमिशन काढावे लागते का..? ऑन बाळराजे पाटील विधान समर्थन निवडणुकीमध्ये ज्यावेळेस विजय मिळतो त्याावेळेस प्रतिस्पर्धी हा जिंकलेला असतो, त्यावेळी जिंकलेला योद्धा हा आनंदाने गर्जत असतो. नाद करा पण आमचा करू नका हे म्हणायला का कोणाचे परमिशन काढावे लागते का..? त्यामुळे मला वाटत तो आनंदउत्सव असतो आणि तो सगळेच साजरा करतात. याचा कोणाला का राग यावा, कारण विजयाच्या धुंदीमध्ये सर्वच नाचत असतात. गेली अनेकवर्षे विस्थापित हे प्रस्थापितांच्या विरोधात लढत होते, प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधा वरून बघत होते. आता पहिल्यांदा प्रस्थापितांना धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं, आम्ही पण सोसल आहे तस त्यांनी पण सोसून घ्यंव.. पुढचं मला ऐकूच आलेलं नव्हतं, फक्त नाद करा पण अनगरकरांचा करू नका एवढच मला ऐकू आलेलं होते. ही लढाई विस्थापितांची आहे, राजन पाटील यांचा मुलगा आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी आला याचा मला आनंद झाला, राज्यात विस्थापितांची गुढी उभारली पाहिजे.. तुम्ही सांगितल्यानंतर मला कळलं की कोणीतरी माफी मागितली, मात्र वाड्याच्या विरोधात कोणीतरी बोललं याचा मला आनंद झाला. त्यामुळे आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गावगाडा आहे. बाईट - सदाभाऊ खोट (माजी कृषी राज्यमंत्री)
223
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 28, 2025 15:00:16
272
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 28, 2025 14:46:49
Nanded, Maharashtra:महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकाकडून मला चक्रव्यूव्हात अडकवन्याचा प्रयत्न केला जात आहे, पण मला विश्वास आहे, जनता मला या चक्रव्युयुव्हातून बाहेर बाहेर काढेल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत केले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नांदेड मध्ये अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. दरम्यान भाजपच्या जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी हेमंत पाटील आणि प्रताप चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला. माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही असं चव्हाण म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही चव्हाण यांनी टीका केली. मी पण मुख्यमंत्री होतो तीन पक्षाचं सरकार मी पण चाललं आहे असे चव्हाण म्हणाले. मला कमजोर समजू नका, आलं अंगावर तर घेतलं शिंगावर एव्हढी ताकद जरूर आहे असे म्हणत टीका करणाऱ्यांना अशोक चव्हाण यांनी इशारा दिला.
145
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 14:45:19
Baramati, Maharashtra:इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा... भांग पाडण्याच्या मुद्द्यावरूनही दत्तात्रय भरणेवर ही केली टीका... या वयात सुद्धा मला केस आहेत तुम्हाला बाहेरून उसनी आणावी लागली... हर्षवर्धन पाटील यांची नाव न घेता दत्तात्रय भरणेवर टीका....\n\nराज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती इंदापूर मधील प्रचार सभेत टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला आहे.\n\nइंदापूर नगरपरिषदेच्या प्रचार सभेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भांग पाडण्यावरून नाव न घेता टीका केली होती, मी काम करायला आलेलो आहे चमकोगिरी करायला आलेलो नाही, मी निवडणुकीपुरता येऊन गप्पा ठप्पा मारणारा मी नाही असं म्हणत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना डीवचलं होतं. या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.\n\nआमच्या आई-वडिलांनी प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून माझी या वयात सुद्धा केस आहेत तुम्हाला बाहेरून उसनी केस आणावी लागले, मी भांग पाडला तो माझ्या केसावर पडला दुसऱ्याच्या केसांवर नाही अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता टीका केली आहे.\n\nकोण आमच्या जॅकेटवर बोलतो म्हणत जॅकेट कोणालाही चांगला दिसत नाही, काही नेते माझ्यावर जॅकेटच्या मुद्द्यावरून टीका करायचे एक दिवशी त्यांची आणि माझी व्हीएसआय मध्ये भेट झाली तेव्हा मी त्यांना विचारलं का हो आता तुम्ही जॅकेट घालताय गुलाबी आमचं जॅकेट काय तुम्हाला काय पसंत पडतंय का ? असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांवर निशाणा साधलाय....
162
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 28, 2025 14:33:31
Ambernath, Maharashtra:गणेश नाईक के बयान पर खासदार श्रीकांत शिंदे का पलटवार. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी प्रचाराकरीता आलेले वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टिका केली होती. प्रवासात कोणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ. गाडीत अडचण झाली तरी अडचणही सहन करु. परंतू कोणी बाप होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला बाप दाखवू अशी टिका केली होती.इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येणार असे बोलले होते. यावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, कोण काय बोलेले त्याला काही अर्थ आहे का ? लोक ठरवतील २ तारखेला. उगाच तोंडाची वाफ कशाला वाया घालवायची असा पलटवार केला है.
129
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 28, 2025 14:30:59
Virar, Maharashtra:ऑनलाइन डेटिंग अॅप मधून हनी ट्रॅप करणाऱ्या दोन तरुणींना अटक विरार येथील मांडवी पोलिसांची कारवाई चोरलेला मुद्देमाल जप्त अँकर - ऑनलाइन डेटिंग अॅप चा वापर करून शहरात ‘हनी ट्रॅप’ रॅकेटचा मांडवी पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून पुरुषांशी मैत्री करून त्यांना लॉजवर बोलावणाऱ्या दोन तरुणींना अटक करण्यात आली आहे. या तरुणी आधी डेटिंग अॅपवरून पुरुषांशी संपर्क साधायच्या… विश्वास जिंकल्यानंतर भेटीचं निमित्त सांगत त्यांना लॉजवर बोलावलं जायचं. तिथे दिलेल्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध मिसळून त्या पुरुषांना बेशुद्ध केलं जायचं… आणि त्यानंतर रोख रक्कम, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने यांसह मौल्यवान वस्तू लांबवून या दोघी पसार व्हायच्या. धक्कादायक म्हणजे… शहरातील अनेक प्रतिष्ठित पुरुष या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले होते. मात्र बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते… त्यामुळे तपासात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तथापि, कसलाही ठोस दुवा नसतानाही मांडवी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत दोन्ही आरोपी तरुणींना मालाड परिसरातून ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे डेटिंग अॅपच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे… आणि नागरिकांनी अशा प्लॅटफॉर्मवर सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे।
156
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 28, 2025 14:04:35
Kolhapur, Maharashtra:भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.. या सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही खायला घालता येणार नाही.. याची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही. खाऊ घालायचे असेल तर रीतसर अर्ज करून आहार क्षेत्राची निर्मिती करावी लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला केली सुरुवात. जाहिरात प्रसिद्ध करत आहार क्षेत्राची निर्मिती करू इच्छिणाऱ्याच्याकडून मागून घेतली माहिती. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्या मध्ये मोठी वाढ होत आहे.. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात नुकताच नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे ज्यांना ज्यांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचा असेल त्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.. जर कोणाला कुत्र्यांना खाऊ घालायचंच असेल तर महानगरपालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका त्यासाठी नागरिकांच्या अर्जानुसार विशिष्ट भागात कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाण निश्चित करणार आहे. दररोज अनेक श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना जिथे शक्य आहे तिथे खाऊ घालतात.. पण या भटक्या कुत्र्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना देत भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी मार्गदर्शक सूचना पारित केल्या आहेत.
125
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 14:03:32
Baramati, Maharashtra:इंदापूर प्रचार सभेत भाजप नेते प्रवीण माने यांचा गंभीर आरोप... 2017 मधील माणिक जगदाळे यांच्या आत्महत्येला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे जबाबदार... इंदापूर तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण माने म्हणाले की, 2017 साली माणिक जगदाळे यांनी आत्महत्य केली आणि त्या आत्महत्येला हनुमंत कोकाटे जबाबदार आहेत. या प्रकरणी 306 तसेच 302 कलमांनुसार केस कोर्टात सुरू आहे. माने यांनी पुढे आरोप करत सांगितले की माणिक जगदाळे यांनी बावडा पोलीस ठाण्यात कोकाटे यांच्या विरोधात सावकारकीची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर जबरदस्तीने जमीन व्यवहार करवून घेतल्याचे, तसेच त्यांच्या घरातून ट्रॅक्टर आणि नांगर घेऊन गेल्याचेही त्यांनी सभेत म्हटले. या सर्व मानसिक दडपणामुळेच माणिक जगदाळे यांनी पहाटे तीन वाजता आत्महत्या केली, असा गंभीर दावा भाजप नेते प्रवीण माने यांनी केला.
169
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 28, 2025 14:02:49
Oros, Maharashtra:पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे यांनी भाजपविरोधी उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात केलीय.. नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची चिन्हे धूसर झाल्याने शिंदेच्या शिवसनेने शहरविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदوار असल्यामुळे निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्यासाठी प्रचारात उडी घेतलीय. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळख असलेले समीर नलावडे हे रिंगणात उभे असून त्याच्या विरोधात निलेश राणे थेट मैदानात उतरलेत. निलेश राणेनी नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन कणकवली शहरातून प्रचalat फेरी काढली लोकांच्या गाठभेटी घेऊन संदेश पारकर यांचा प्रचार सुरु केलाय.
162
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 14:02:31
175
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 28, 2025 13:35:18
76
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 28, 2025 13:17:03
Navi Mumbai, Maharashtra:पूर्व उपनगरातील वाहन चालकाना दिलासा देणारी बातमी आहे. गेले अनेक वर्ष साकीनाका ते कुर्ला ४४ फूट रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कुर्ला अंधेरी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या या रस्त्यावर अनेक बांधकामे उभी राहिल्याने हा रस्ता अगदी अर्धा झाला होता.त्यामुळे या मार्गावरून वाहन चालक ये जा करणे टाळत होते. मात्र आज स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी स्वतः जेसीबी वर उभे राहून ही बांधकामे तोडली. हा रस्ता पूर्ण झाल्यावर कुर्ला ते साकीनाका चालत २० मिनिटात गाठता येईल तर वाहने त्या ही पेक्षा लवकर इथून जातील आणि मोठी वाहतूक कोंडी कमी होईल अशी शक्यता आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
163
comment0
Report
Advertisement
Back to top