Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

अतिवृष्टि से सोयाबीन फसल तबाह, एकड़ से सिर्फ 2–4 क्विंटल उत्पादन

GMGANESH MOHALE
Oct 16, 2025 06:15:48
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि अनियमित पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका एकरातून केवळ २ ते ४ क्विंटल इतकेच उत्पादन मिळत असून त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला केवळ प्रति क्विंटल ३५०० ते ३८०० रुपये इतका भाव मिळत आहे. नाफेडची खरेदी अद्याप सुरू नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विकावा लागत आहे. अतिवृष्टी आणि भावघटीचा दुहेरी फटका बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच डळमळीत झाली असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 16, 2025 11:20:02
Parbhani, Maharashtra:अँकर- ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे,पण तुम्ही ही ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे, हिंगोलीच्या कळमनुरी येथे ऑनलाइन शॉपिंग करणे एका तरुणाला चांगलेच महागात ओढलय,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी कोल्ड हॉट वाटर फील्डर मशीन ऍमेझॉनवरून ऑनलाईन पद्धतीने मागवली होती, याची घरी डिलिव्हरी झाली असता त्यांनी सदर बॉक्स फोडून पाहिला,तर या अपार्सलमध्ये लाकड आणि कचरा निघाल्याची धक्कादायक घटना संलर आलीय,यांचे व्हिडीओ राजू कांबळे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल करून लोकांना सावज होण्याचे आवाहन केले आहे...
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 11:19:39
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 11:07:41
Shirur, Maharashtra:- या लॉन्चमुळे महाराष्ट्रातील शाश्वत नवकल्पनामध्ये नेतृत्व पुढे येत आहे. - बॅटरी स्वैपिंग तंत्रज्ञानासह ब्लू एनर्जी मोटर्स चे मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक ट्रक आणि मुंबई-पुणे कॉरिडॉर भारताचा पहिला महामार्ग जो इलेक्ट्रिक झाला आहे, - हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी तसेच ग्रीन एनर्जी आणि भविष्यात स्वावलंबी होणार आहे - पर्यावरणीय शाश्वतता आणि औ‌द्योगिक विकास या दोन्ही क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक . - या ट्रकच्या लॉन्चमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला जाणार आहे. - पर्यावरणपूरक आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला चालना देणारा हा ट्रक उद्योग क्षेत्रात मोठा बदल घडवेल, - आजचा दिवस हा ब्ल्यू एनर्जी मोटर्स साठी मोठा असणार आहे - मेकिंग इंडिया 2024 मधील ऑटोमोबाईल मोबालीटी चा आम्हाला अभिमान आहे ही कंपनी महाराष्ट्रातील पुण्यात आहे - या कंपनी सोबत दहा हजार ट्रॅक चा सामंजस्य करार करण्यात आला आहे - बॅटरीचा किंमत कमी करण्याचे प्रयत्न आहे - त्याचसोबत त्याची लाईफ कशी वाढेल याकडे सुधा पाहिले जाणार आहे - भविष्यात एकदा ट्रक चार्जिंग केला तर तो 400 किलोमीटर पर्यंत चालणार आहे - यामुळे अपघात ची संख्या घटणार आहे अशी टेक्नॉलॉजी या वाहनात असणार आहे - अनेक वाहने ही ओव्हरलोड वाहतूक करत असतात कारण त्या ट्रकची डिझाइन तशी आहे - आता हा ट्रॅक सांगेल की ओव्हर लोड आहे का - पोलिसांना अशा वाहनावर कारवाई करणे सोपे जाईल - डिझेल ट्रॅक और इलेक्ट्रिक वाहने यांमध्ये फरक आहे - महाराष्ट्र सरकार हे इलेक्ट्रिक कंपन्यांना सहकार्य करत आहे - ग्रीन मोबिलिटी संकल्पना राज्यात आणायची आहे
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 10:47:39
Nashik, Maharashtra:नाशिक - रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष - आज उत्तर महाराष्ट्रात बैठकीसाठी आलो होतो - परंतु सांगायला आनंद होतोय - सामाजिक क्षेत्रात काम करणारे भरत कोकाटे यांची एक दोन वेळा भेट झाली - मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करावे असे त्यांना आमचे पदाधिकारी विनंती करत होते - विनंतीला मान दिला आणि भाजपात आज प्रवेश केला - ग्रामीण भागात प्रवेशामुळे त्या भागाला वेगळं बळ मिळेल - कोकाटे आणि सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो ऑन बैठक - पूर्वी देवेंद्रजिनी बैठक घेतली होती - जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने रचना करायची होती - फॉलोअप घेण्यासाठी बैठक घेतली - प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीला निवेदन केले - दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ऑन नारा - एक गोष्ट लक्षात घ्या - युतीबाबत निर्णय नेते घेतील - खाली असणारा कार्यकर्ता आहे - कार्यकर्त्यांनी निवडणूक त्यांनी लढली पाहिजे - दिवाळीनंतर आचारसंहिता घोषित होऊ शकते - कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर पार्टी जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल ऑन बोगस वोट - आपणही गेले अनेक वर्षे प्रत्येक पक्ष बोलतो - यादी चांगली असावी - नोंदणी आणि आक्षेप घेणे हा एक भाग आहे - आयोग कार्यक्रम देत असते - प्रक्रिया सुरू असतात - जाहिरपणे या गोष्टी होतात - उमेदवार 100 टक्के अभ्यास करतो - जे आक्षेप घेतो त्याचे ग्राह्य धरले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो - वस्तुस्थिती लक्षात घ्या - फेक नरेटिव्ह विरोधक तयार करत आहे - देवेंद्रजींनी सांगितले आहे - पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असतात
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 10:45:22
Nashik, Maharashtra:नाशिक @ भारत कोकाटे - राजकीय जीवनात काम करत असताना स्वतःला काय मिळेल यापेक्षा कार्यकर्त्याना काय देऊ शक्यतो हे महत्वाचे आहे - मी 4 वर्षांपासून त्यांना न्याय देऊ शकलो नाही - मोदी साहेब, फडणवीस साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल - छोट्या छोट्या समस्या असतात ते सोडवायच्या आहेत - रेशन कार्ड आणि इतर समस्या असतात - मी कुणावरही नाराज नाही - माझे बंधू यांच्याशी राजकीय मतभेद - कौटुंबिक कलह नाही - त्यांनी स्थान निर्माण केलं तसे मीही करेल - राजकारणात कोणीही इच्छू असू शकते - पक्षाचा आदेश मला मान्य असेल - उबाठात प्रवेश केला तेव्हा काम करता आला नाही - फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात तो आदर्श मी घेतला - त्यासाठी मी पक्षात प्रवेश केला
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 16, 2025 10:18:20
Bhandara, Maharashtra:स्कूल व्हॅन उलटली... 10 विद्यार्थी जखमी...सुरेवाडा येथील घटना.... रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अपघात.... कारधा येथून मांडवी पर्यंत विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करणारी स्कूल व्हॅन उलटली 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.... कारधा येथील सावित्रीबाई फुले शाळेतून विद्यार्थ्यांना सुट्टी झाल्यानंतर घरी सोडून देत असतांना भंडारा जिल्ह्याच्या सुरेवाडा येथे उलटली. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून कारधा ते करडी पर्यतचा रस्ताची अक्षरशः फुटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निद्राअवस्थेत आहे. या मार्गावर दररोज अपघात होत आहेत....मारोती व्हॅन चालकाने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्न चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने सुरेवाडा येथील पुलावरून वाहन पुला खाली कोसळली यात जवळपास 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज हा अपघात झालं आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट बांधकाम विभाग पाहते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 16, 2025 10:14:30
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 16, 2025 09:58:32
Nanded, Maharashtra:यंदा अतिवृष्टीमुळे पीक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. दोन पैसे मिळतील ही अपेक्षा असताना अतिवृष्टीमुळे स्वप्नावर पाणी फेरल्यागेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न भेडसावत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील दुगाव येथील श्रद्धा भंडारे हिचीही अशीच कहाणी. श्रद्धा इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. गावात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने नायगाव मध्ये एका भाड्याच्या खोलीत राहून ती शिक्षण घेत आहे. तर श्रद्धाचा मोठा भाऊ साईप्रसाद बी टेक द्वितीय वर्षात शिकत आहे. पण त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा पेलावा असा प्रश्न वडिलांसमोर उभा ठाकलाय. वडील प्रल्हाद भंडारे यांना 2 एकर जमीन. यंदा त्यांनी आपल्या जमिनीवर सोयाबीन पेरले होते. पण अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक उध्वस्त झाले. पाण्यामुळे पूर्ण शेत खरडून गेले आहे. दोन पैसे मिळणे तर सोडाच उलट पेरणीसाठी उसनवारी घेतलेले पैसे कसे फेडावे असा प्रश्न प्रल्हाद भंडारे यांना पडलाय. शैक्षणिक साहित्य, ट्यूशन फीस इतर खर्च कसा करावा हा प्रश्न भेडसावतोय. तहसीलदार बनण्याच्या श्रद्धाच्या स्वप्नांना थोडे बळ देण्यासाठी आता तुमच्या मदतीची गरज आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 16, 2025 09:58:09
Amravati, Maharashtra:अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत 500 रुपयांच्या बनावटी नोटा; रहाटगाव मध्ये 26 हजार 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर नकली नोटा बाजारात आल्या असून नांदगाव पेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 26 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रहाटगाव मधून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची अंगझडती घेतल्यावर 500 रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे अमरावती शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात 500 रुपयाच्या नकली नोटा चलनात आहे का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 16, 2025 09:55:39
Akola, Maharashtra:राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना (शरद जोशी स्थापित) यांनी व्यक्त केली आहे. सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारे कृत्य असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागील अतिवृष्टीच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा यावेळची मदत अधिक तोकडी असल्याचं त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर दीड लाख रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत “जीआरची होळी” केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीचा विचार करता सरकारने तातडीने योग्य दराने मदत जाहीर करून ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी संघटनेने दिला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 16, 2025 09:55:19
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 16, 2025 09:22:09
Shirdi, Maharashtra:शिर्डी जवळील अस्तगाव येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत शिव महापुराण कथेची आज सांगता झाली...या पाच दिवसीय कथा सोहळ्याचा लाखो भाविकांनी लाभ घेतलाय...भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे मात्र या कथा सोहळ्याच्या समारोप प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनी सोबत फुगडी खेळल्याने उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या आहेत...स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कोल्हे आणि विखे यांचेत राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता...हा संघर्ष पक्षश्रेष्ठींपर्यंत देखील पोहचला होता मात्र शिव महापुराण कथा सोहळ्यात सौ.कोल्हे आणि सौ.विखे यांची फुगडी आता राजकीय वर्तुळात देखील रंगलीय...दरम्यान यावेळी धनश्री सुजय विखे पाटील यांनीही महिलांसोबत फुगडी खेळण्याचा लाभ घेतला...या सोहळ्यात संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे पहायला मिळालं
1
comment0
Report
Advertisement
Back to top