Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

अंबरनाथ के विकास कार्यों की समीक्षा: नाट्यगृह का जल्द उद्घाटन

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 07, 2025 01:15:44
Ambernath, Maharashtra
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरથ शहरातील विकासकामांची पाहणी केली. शिवमंदिर परिसर, अटल उद्यान, नाट्यगृह अशा शहरातील प्रमुख प्रकल्पांना भेट देत त्यांनी स्थानिकांशीही संवाद साधला. तसंच कामं वेगानं पूर्ण करण्याचे आदेश दिले. अंबरथ शहरातील सर्कस ग्राउंडवर नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचं काम आता जवळपास पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून नाट्यगृहातील सर्व सोयीसुविधांची शिंदे यांनी स्वतः पाहणी केली. प्राचीन शिवमंदिराच्या कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक इथे भेट देतील, असा विश्वास याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:32:42
Nashik, Maharashtra:जुन्या रचनेप्रमाणेच 39 प्रभाग; निवडून येणार १२२ नगरसेवक नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २०१७ मधील म्हणजेच नऊ वर्षे जुन्या प्रभागरचनेलाच राज्य निवडणूक आयोगाने अंतिमतः मंजुरी देण्यात आलीये... आता पुढील दोन दिवसांमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण तसेच प्रवर्गनिहाय खुला आणि स्त्री आरक्षण सोडतीचा कार्यक्रमदेखील जाहीर होणार आहे. महापालिकेचे ३१ प्रभाग असून त्यामध्ये २९ प्रभागांमधून प्रत्येकी ४ तर २ प्रभागांमधून प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून येतील.. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारीत महापालिका निवडणूक होऊ शकते. त्यानुसार महापालिकेने गेल्या महिन्यात प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम अहवाल पाठविल्यानंतर काल अंतिम प्रभागरचना जाहीर झालीये.. यात ९ वर्षे जुने प्रभाग 'जैसे थे' असून हद्द निश्चितीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली आहे. २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे....
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:32:27
Nashik, Maharashtra:कुंभमेळा पूर्वीच कार्यान्वित होणार नाशिक विमानतळाची दुसरी धावपट्टी... ( ओझर विमानतळाचे व्हिज्युअल्स वापरा ) अँकर नाशिक विमानतळाची नवीन धावपट्टी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजे जून २०२७मध्येच कार्यान्वित होणार आहे. नवीन सुविधांच्या उभारणीमुळे कुंभमेळ्यात गर्दीच्या वेळी प्रति तास १ हजारपेक्षा जास्त प्रवासी हाताळण्याची क्षमता निर्माण होईल. विशेष म्हणजे, प्रयागराज येथे कुंभमेळ्याकरिता १५ विमाने पार्क करता येतील अशी व्यवस्था उभारण्यात आली होती. नाशिकमध्येही पाचवरून पंधरा पार्किंग वे उभारले जाणार आहेत. शासनाने विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत नाशिक येथे विमान पार्किंग हब विकसित केल्यास कुंभमेळयामध्ये हॉपिंग फ्लाइट्सची संख्या वाढून आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होऊ शकेल. राज्य शासनाच्या अखत्यारीतील विमानतळांवर पार्किंग हब विकसित करण्यासाठी नियोजन केले आहे. नाशिक विमानतळाच्या रनवेवर लायटिंग सिस्टिम, नाइट लैंडिंग, रडार आणि इतर सुरक्षा उपायांचा समावेश असलेल्या तांत्रिक आणि पायाभूत सुविधा आधीच उभारण्यात आल्या आहेत. ज्यामुळे विमानतळ २४ तास कार्यान्वित आहे....
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 03:32:17
Nashik, Maharashtra:अँकर राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र नोंदणी तातडीने करून घेण्याचे आवाहन राज्यातील तहसीलदार प्रशासनाने केले आहे. शेतकरी ओळखपत्र नसल्यास नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप, हक्क सीड प्रक्रिया, पी.एम. किसान अनुदान, वारस नोंद, खरेदी-विक्री व्यवहार तसेच ई-पीक पाहणी यांसारखी महत्त्वाची कामे करता येणार नाहीत. राज्यात लवकरच ई-पंचनामा प्रणाली सुरू होणार असून, त्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन हे ओळखपत्र नोंदणी करून घ्यावी. यासाठी आधार कार्ड आणि त्यास लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे कार्यात आले आहे
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 07, 2025 03:32:07
Bhandara, Maharashtra:एका शिक्षकाच्या मेहनतीने, आणि गावाच्या सहकार्याने बंद होण्याच्या उंबरठ्यावरची शाळा पुन्हा जिवंत झाली..... 35 वर आलेली पटसंख्या पोहचली 105 वर कांद्री गावात असलेली जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काही महिन्यांपूर्वी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती. विद्यार्थ्यांची संख्या केवळ 35 वर आली होती. मात्र, मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांच्या कार्यकुशलतेने, लोकसहभागातून ही शाळा नव्या रूपात उभी राहिली असून आज या शाळेत तब्बल 105 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कधी काळी विद्यार्थ्यांच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेली कांद्रीची जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल आता विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे. मागील वर्षी फक्त 35 विद्यार्थी असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी हे रुजू झाल्यानंतर पालकांशी संवाद साधला, शाळेची भौतिक सोय सुधारली, डिजिटल शिक्षणाचे साधन उपलब्ध झाले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे यावरून असे लक्षात येते की गुरु जर चांगला असला तर विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाची आवड निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी आपली जबाबदारी सांभाळली तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी मावेनаси होणार हे मात्र निश्चित.... तर दुसरीकडे ज्या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. असा राज्यातील शेकडो शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आज या शाळेत 105 विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. गावातील लोकसहभागामुळे वर्गखोल्या आकर्षक बनल्या आहेत, डिजिटल शिक्षणाचे साधन उपलब्ध झाले आहे, तर मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढली आहे. यावी शाळेचे उदाहरण हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 07, 2025 03:21:40
Beed, Maharashtra:बीड : “कटेंगे नहीं, अब बटेंगे” चा नारा; राज्य मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पशुधन आणि अन्नधान्य कीटचे वाटप..! Anc- बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांचे तर अतोनात नुकसान झालेच, शिवाय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पशुधन देखील वाहून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधारच हरपला होता. अशा कठीण काळात मदतीचा हात पुढे करत राज्य मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थान पुढे सरसावले आहे. “कटेंगे नहीं, अब बटेंगे” हा संदेश देत संस्थेने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा उपक्रम राबवला आहे. गेवराई तालुक्यातील हिरापूर आणि पिंपळगाव परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना संस्थेकडून पशुधन म्हणजेच गाय-वासरे, बकऱ्या तसेच अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं दुःख वाटून घ्यायला हवं. धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे, हे आम्ही कृतीतून दाखवून देत आहोत. असे संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी म्हटलं आहे. दरम्यान कटेंगे नही, अब बटेंगे... या वक्तव्यावर वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.. बाईट: हाजी अरफात शेख, अध्यक्ष खाटीक समाज संस्था
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:21:15
Nashik, Maharashtra:नाशिक, राहुरीला होणार बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर अँकर मानवी हल्ले करणाऱ्या बिबट्यांना ओळखून त्यांना जेरबंद केल्यानंतर कायमस्वरूपी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठी नाशिकसह अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये लवकरच नव्याने रेस्क्यू सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांनी दिलीये...नाशिक तालुक्यातील वडनेरदुमाला तसेच सिन्नर, दिंडोरी तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांत चिमुकल्यांचा बळी गेला आहे. यानंतर संतप्त गावकऱ्यांचे वनविभागाच्या कार्यालयांवर मोर्चे येऊन धडकले होते....वनविभाग यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून नाशिक, राहुरी या दोन ठिकाणी बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर व्हावे, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या ठिकाणी मानवी हल्लेखोर बिबट्यांना कायमस्वरूपी पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवण्यात येणार आहे....
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 03:21:01
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर होणार भोंगेमुक्त, सर्व धर्मीयांच्या पुढाकाराने शहरातील 99 टक्के धार्मिक स्थळावरील भोंगे काढून लावण्यात आले स्पीकर - सोलापुरातील धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले - सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी घेतला निर्णय - यामध्ये प्रामुख्याने 192 मस्जिद, दर्गा, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले - पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले. - मागील महिन्यात किरीट सोमय्या यांनी मोर्चाचं आयोजन केले होते मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती - त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंची चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं - धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली - मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भुंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले - त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली - पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या 99 टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत - मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये ही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे - तर 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे. - आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूं che आभार मानतो आणि अभिनंदन करतो.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 07, 2025 03:20:43
Akola, Maharashtra:शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने उपचार घेत असलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेश कात्रे (वय २८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कात्रे हे २२ सप्टेंबर रोजी आपल्या शेतात तुरीच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करत होते. त्या दरम्यान अचानक त्यांना चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी दर्यापूर येथून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खरीप हंगामात कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही Shेतकऱ्यांना फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या विषबाधेच्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात असून, फवारणीदरम्यान आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशी सूचना आरोग्य व कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 03:17:30
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पूरग्रस्तांच्या मदतीला धावले स्वामी समर्थ, अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपयांचे किट प्रशासनाकडे सुपूर्द - अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूरबाधित कुटुंबीयांना मदतीचा हात. - राज्यातील इतर देवस्थानाप्रमाणे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपयांच्या किटची पूरग्रस्तांना मदत.. - सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 5000 किटस पूरग्रस्तांना होणार वाटप - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सात गाड्या करण्यात आल्या रवाना - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं केलं होत आवाहन - जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साद देत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने घेतला पुढाकार - अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वात रबावला जातोय हा उपक्रम - अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सर्व मदत करण्यात आली सुपूर्त
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:17:13
Nashik, Maharashtra:ई-केवायसी ९९ टक्के पूर्ण; ३.४८ लाख शेतकऱ्यांना मिळाला २० वा हप्ता अँकर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आवश्यक असून नाशिक जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ६५२ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ४८ हजार ७५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. पीएम किसान समृद्ध निधी योजनेअंतर्गतचा ई-केवायसी कामाचा नाशिक पॅटर्न इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. अशा ३ लाख ४८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता पोहोचला आहे. आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ईकेवायसी पूर्ण झाल्याचा लाभ भरपाई तातडीने बँक खात्यात जमा होईल...परंतु ज्या एक लाख शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण केले मात्र इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केली नाही ते मात्र २० व्या हप्त्याच्या अनुदानापासून वंचित आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:17:01
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 07, 2025 03:16:51
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर १ हजार ३२९ वाहनांची नोंदणी, आरटीओला मिळालं ५ कोटींचं उत्पन्न उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची माहिती जीएसटीचे दर कमी केल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहनखरेदीत उत्साह पाहायला मिळाला. उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागात एकूण १ हजार ३२९ वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून ५ कोटी १ लाख ७८ हजार ३८२ इतका शासकीय महसूल आरटीओ कार्यालयास मिळाला आहे. त्यापैकी ४ कोटींहून अधिक नोंदणी शुल्क तर उर्वरित आकर्षक वाहन क्रमांकाच्या नोंदणीमधून उत्पन्न मिळालं आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.. दरम्यान सर्वाधिक नोंदणी दुचाकी, स्कूटरची झाली आहे..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 07, 2025 03:15:52
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 03:15:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ट्रक च्या धडकेत ४ महिला जखमी ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षातील चौघी जणी जखमी झाल्या. ही घटना गंगापूर - वैजापूर मार्गावर एका हॉटेलसमोर सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. गंगापुरच्या समतानगर येथील कामगार महिला वैजापूर मार्गाने रिक्षातून रात्री गंगापूरकडे येत असताना पाठीमागून आलेल्या आयशरने रिक्षाला जोराची धडक दिली. त्यात रिक्षामधील ज्योती जऱ्हाड, मीरा मोहिते, ताराबाई जाधव, लताबाई परमेश्वर या चौघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत हलवण्यात आले आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 07, 2025 03:06:35
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top