Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

खैरे आत्महत्या मामले में शिंदे ने परिवार से मुलाकात; राजनीति नहीं, संवेदना संदेश

ABATISH BHOIR
Nov 22, 2025 17:15:35
Kalyan, Maharashtra
अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी खैरे कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन राजकीय पक्षांनी या घटनेचे राजकारण करू नये
135
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 22, 2025 16:33:18
Baramati, Maharashtra:কृषिमন্ত্রী दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर श्रीराम सोसायटी इंदापूर नगरपरिषद प्रचार सभा. इंदापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभे करता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी परिसरात पहिली जाहीर सभा घेतली यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 उमेदवारांचे चिन्ह घड्याळ आहे त्याला मतदान करा. मतदान रुपी आशीर्वाद द्या. आजची सभा ही पहिली सभा आहे. घड्याळाला मतदान करणे गरजेचे आहे हे अनेकांनी सांगितले. 2014 तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं.याचा उपयोग मी इंदापूर शहरासाठी प्रामाणिक पणे 11 वर्ष काम केलं. जास्तीचा निधी कसा आणता येईल यासाठी काम केले. ही काय जादूची कांडी नाही यासाठी खूप मोठ कष्ट घ्यावे लागते. मागील चार वर्षात अंकिता शहा यांनी देखील इंदापूर शहरासाठी प्रामाणिकपणे काम केले. एक निवेदनात अजित पवार यांनी शिरसोडीचा पूल मंजूर केला हे जगातील पहिले उदाहरण असेल,यामुळे इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे बाजारपेठ पाच पट बदलणार आहे. मागे 20 वर्षात हे काम झाले नाही हे मला विरोधकांना विचारायचे आहे. 61 कोटी रूपये आपण शहरात बंदिस्त गटार साठी दिले. रस्त्यांसाठी आपण 88 लाख रुपये दिले. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी आपण 10 कोट रूपये दिले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गरीब मुलांसाठी आपण 5 कोटी रुपयांची एक अभ्यासिका मंजूर केली आहे. ऊर्जा प्रकल्प आपण मंजूर केला आहे. शॉपिंग मॉल साठी आपण 100 कोटी रूपये दिले त्याचे काम चालू आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेत आपण साडेनऊ कोटी रूपयाचे काम सुरू आहे. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे काम सुरू आहे चांद शहावली बाबांच्या दर्गा चे काम सुरू है. विरोधकांना मला विचारायचे आहे की तुम्ही सत्तेवर होता मग तुम्ही हे का करू शकला नाही. पोलिस स्टेशनची इमारत आपल्याला नव्याने करायची आहे. मी मुंबई ला जायचो तो फिरण्यासाठी नाही तर इंदापूर साठी काही आणता येईल यासाठी जायचो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सहकार्य आपल्यालाही त्यामुळे हे काम आपण करू शकतो. विधानसभा निवडणुकीत अनेक लोकांनी गमती जमती करण्याचा प्रयत्न केला, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरत शहा माझ्या पाठीशी उभे राहिले माझा प्रचारक केला. ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्या आभार मानतो कौतुक करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध विहाराच्या बाबतीत काही सूचना मांडल्या. तालुक्याचा आमदार महत्त्वाचा असतो,तो डिपीडिसी मध्ये असतो त्यामुळे तोच निधी देतो भविष्यात तुम्हाला जो निधी मिळणार आहे पुढचे चार वर्षे मीच आमदार आहे त्यामुळे विकासासाठी जे राहील आहे ते मीच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देणार आहे. लाडक्या बहिणींना एकच विनंती लोक येतील जोरात भाषण ठोकतील भाया सारून बोलतील पण मी काम करणारा माणnisse आहे काम करीत आलो आहे काम करणार आहे. भविष्यात या तालुक्याचा भरत शहा आणि नगरसेवकांच्या मदतीने चेहरा मोहरा बदलण्याशिवाय राहणार नाही तो पर्यंत हा दत्तात्रय भरणे स्वस्त बसणार नाही. आमचे नगरसेवक कमी बोलणारे आहे पण कामाचे आहेत. मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो तेव्हा या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी शहरात एक स्विमिंग टँक असावा यासाठी शेवटच्या दिवशी 56 कोटी रुपये मंजूर करणार हा तुमचा मामा आहे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहायचे की बच्चन गिरी भाषणे गिरी करणाऱ्याच्या पाठीशी राहायचे याचा विचार करा.
200
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 22, 2025 16:32:53
Wardha, Maharashtra:*वर्ध्यात उबाठा गटात बंडाची ठिणगी - वर्ध्यात उबाठा गटात बंडाची ठिणगी - उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांचा राजीनामा - गटबाजी, तिकीट वाटपातील हस्तक्षेप आणि भाजपला फायदा मिळवून देण्याचा आरोप - पेन ड्राईव्हमध्ये मोठं गुपित,महाराष्ट्रात खळबळ उडणार - मातोश्रीच्या जवळ राहणाऱ्या नेत्यांचा नाडा ढिला झाल्याचा आरोप करीत दिला राजीनामा - उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरावे जमा;कुरघोडीच्या राजकारणावर पांडे यांचा थेट निशाणा - शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे नाव न घेता केले गंभीर आरोप नोट: वर्ध्याच्या राजकारणात आरोप, प्रत्यारोपांची मालिका वेगाने वाढत असून वातावरण चांगलेच तापलं आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटात मोठी घडामोड समोर आली आहे. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी तिकीटाची अपेक्षा व्यक्त केली असतानाही मुंबई आणि जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे अनेकांना ए–बी फॉर्म नाकारण्यात अल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर वर्धा उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहेय. व्हिओ - नेहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पांडे उबाठा गटातील काही नेते भाजपसोबत मिळून काम करत असल्याचा, तसेच निवडणुकीत भाजपला थेट फायदा होईल अशा दिशेने योजना रचली जात असल्याचा आरोप केला. निहाल पांडे म्हणाले की, उबाठामधील पायओढीच्या प्रवृत्तीला कंटाळून मी हा निर्णय घेतला. मुंबईतील एका जेष्ठ नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असून त्या नेत्याचा नाडा ढिला’ झालाय… आणि आता तो टाईट करण्याची वेळ आली आहेय. याचसोबत पांडे यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला, त्यांच्या म्हणण्यानुसार, उबाठा गटातील अनेक नेत्यांच्या कर्मकांडाचा पुरावा असलेली एक पेन ड्राईव्ह त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जमा केली आहे. या पेन ड्राईव्हमधील राज उघड झाले, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
158
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 22, 2025 16:32:33
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री वसंतराव व सुधाकरराव नाईक यांच्या कुटुंबातील दोन बंधू पुन्हा एकमेकांकडे उभे ठाकले आहे, अशात भाजपाचे माजी आमदार निलय नाईक यांच्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होऊ लागल्याने ते बंधुप्रेम दाखवितील की भाजपाचा सच्चा सेवक म्हणून काम करतील या चर्चांना उधाण आले आहे. पुसद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उमेदवार असलेल्या त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक व त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपाचे माजी आमदार निलय नाईक हे समोरासमोर आले. यावेळी मोहिनी नाईक यांनी निलय नाईक यांचे आशीर्वाद घेतले. निलय नाईक यांच्या नेतृत्वात भाजपा स्वतंत्र लढत आहे. असे असतानाही मोहिनी नाईक यांना मत द्या असे संभाषण असलेली निलय नाईक यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या क्लिप वरून निलय नाईकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान ही क्लिप म्हणजे खोडसाळपणाचा प्रकार असून राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका असा इशारा निलय नाईक यांनी दिला आहे. ही क्लिप उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांनी तयार केल्याचंही त्यांनी म्हटले आहे. मी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा नातू व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आहे. याआधीही काका मनोहर नाईक व भाऊ इंद्रनील यांच्याविरुद्ध मी निवडणूक लढवली आहे. नात्यात मोहिनी नाईक माझी मुलगी आहे, त्यांना माझे आशीर्वाद असले तरी भाजपाचा सच्चा सेवक म्हणून मी भाजपच्या उमेदवारालाच विजयी करून दाखवील असे निलय नाईक यांनी म्हटले आहे. पुसद हा तसा नाईकांचा बालेकिल्ला, विधानसभा निवडणुकीत येथे नाईक कुटुंबातीलच व्यक्ती विजयी झाला आहे. या आधीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या होत्या. आता त्यांच्या सून मोहिनी या निवडणूक रिंगणात उतरल्याने लढत चुरशीची निर्माण झाली आहे.
183
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 22, 2025 16:32:11
Satara, Maharashtra:असाईन - प्रताप नाईक सातारा - सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं खरं पण यामुळे दोन्ही राजेंची डोकेदुखी वाढली आहे. पाहूया यावरचा रिपोर्ट बाईट - खा.उदयनराजे भोसले विओ 2- मात्र असं असताना देखील अनेक बंडखोर अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. आम्ही अनेक वर्ष समाज कार्य करून देखील आम्हाला डावलले गेल्याचा आरोप या अपक्ष उमेदवारांनी केला आहे. बाईट - शिवानी ताई कळसकर अपक्ष उमेदवार ( खा.उदयनराजे समर्थक ) विओ 3- साताऱ्यात अनेक ठिकाणी खा.उदयनराजे भोसले यांच्या उमदेवारासमोर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याने अपक्ष उमेदवारी दिली आहे. तर अनेक ठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारा विरोधात खा.उदयनराजे समर्थकांनी अर्ज दिला आहे.यामुळे दोन्ही राजेंचं उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढलेली आहे. बाईट - संदीप राक्षे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विंडो 4- या दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं असले तरी खाली कार्यकर्त्यांचे मात्र मतमिलन झालं नाही त्यामुळे बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांचा फटका या दोन्ही राजेंना किती बसतो हे 3 डिसेंबरलाच समजेल...
193
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 16:31:54
Yeola, Maharashtra:येवला नगरपरिषद निवडणूक 2025 अत्यंत चुरशीची ठरणार आहे. नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध शिवसेना आणि शरद पवार गट असा सामना रंगला आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट… येवला नगरपरिषद निवडणूक 2025… शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. मंत्री छगन भुजबळ यांचा परंपरागत मतदारसंघ असल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरतेय. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन महायुतीच्या नावाने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. या युतीकडून उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने मात्र भाजप–राष्ट्रवादीच्या विरोधात स्वतंत्र ताकदीने मैदान गाजवण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाकडून रुपेश लक्ष्मण दराडे नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत. रुपेश दराडे हे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुतणे. दराडे कुटुंबाचा येवला राजकारणात दीर्घ वारसा आहे. विशेष म्हणजे… भुजबळांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शिवसेना उमेदवार रुपेशक दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे लढतीला नवीनच दिशा मिळाली आहे. येवला शहरात भुजबळ आणि दराडे गटांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आणि यावेळी दोन्ही बाजू एकमेकांवर मात करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहेत. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी केवळ दोनच उमेदवार उरले आहेत— महायुतीचे राजेंद्र लोणारी आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रुपेश दराडे. म्हणूनच येवला नगरपालिका कोणाच्या हातात जाणार… महायुती की विरोधी आघाडी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
211
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 22, 2025 16:31:24
Oros, Maharashtra:देशभरात दुबार मतदार यादी वरून सत्ताधारी आणि विरोधाक यांच्यात वाद सुरु असल्याचे आपण ऐकतोय.. आता हा वाद तळकोकणात देखील पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे हा वाद देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मित्र पक्षांमध्ये आहे... केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेले भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाद निर्माण झालाय. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र आमने सामने आलेत. भाजपाचे मंत्री नितेश राणे हे भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा प्रचार करत आहेत तर निलेश राणे हे शहर विकास आघाडीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा प्रचार करत आहेत. दोन्ही बंधू साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून.. भाजपा उमेदवार समीर नलावडे यांच्या घरात काही मुस्लिम मतदारांची नावे आढळून आल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलाय. भाजपाला मुस्लिम मत कशी चालतात असा थेट सवाल करत याबाबत आपण निवडणूक आयोगाला जाब विचारणार असल्याचे देखील निलेश राणे यांनी सांगितलेय. भाजपा उमेदवार समीर नलावडे यांनी या आरोपाचे खंडण करत माझी कणकवली मध्ये चार घरे असून त्यात भाडेकरू असतात. आणि त्यांची मतदार यादीतील नावे अधिकृत असल्याचा दावा समीर नलावडे यांनी केलाय. त्या सोबतच ज्या संदेश पारकर यांचा निलेश राणे प्रचार करत आहेत. त्यांनी नारायण राणे यांचा फोटो अक्षरशः कचऱ्याच्या पेटीत टाकला होता. असं सांगत निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना घेऊन मालवण मध्ये शहरविकास आघाडी का केली नाही असा सवाल नलावडेंनी केलाय... समीर नलावडे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करत संदेश पारकर यांनी देखील बोगस मत टाकून मतदार यादी फुगलेली असून निलेश राणे पुराव्यानिशी बोलत आहेत असे सांगितले... नारायण राणे यांच्या फोटो बाबत मात्र संदेश पारकर यांनी अस असेल तर सगळ्या जुन्या गोष्टी सुद्धा जनतेला सांगाव्या लागतील आणि विस्मृतीत गेलेले विषय घेऊन सहानुभूती मिळवू नये असा टोला समीर नलावडे यांना लगावलाय संदेश पारकर, शहरविकास आघाडी उमेदवार कणकवलीत बोगस मतदार असल्याचा आरोप करून आमदार निलेश राणे यांनी खळबळ माजवून दिलीय. निलेश राणे यांच्या बंधू नितेश राणे या सगळ्याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात कडे सर्वांच लक्ष लागलंय
127
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 22, 2025 16:17:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च.. अँकर - दिल्लीत घडलेल्या शौर्य पाटील,या दहावीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सांगलीच्या विटा येथे उमटलेले आहेत.शौर्य पाटील याच्या आत्महत्या प्रकरणी तपास करावा आणि शौर्य पाटीलला श्रद्धांजली वाहण्यासाठी विटा मध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. सर्वपक्षीय आणि विटेकर नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये लोकप्रतिनिधींसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.विटा शहरातल्या प्रमुख मार्गावरून हातात मेणबत्ती घेऊन हा कॅन्डल मार्च काढण्यात आला.18 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे दहावीत शिकणाऱ्या मुळ्या सांगलीचा असणारा शौर्य पाटील या विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.शिक्षकांच्या छळाला कंटाळून शौर्य याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे,यापर्यंत सखोल चौकशी करून शिक्षकांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
214
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:07:48
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भामपूर परिसरात 14 वर्षीय मुलाला शेतात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली आणि, तोला बैलगाडीला बांधून चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यां प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भामपूर गावातील दोन संशयितांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला शेतात पळवून नेऊन, त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चितामण उर्फ चिंटुभाऊ साहेवराव कोळी आणि त्याचा भाऊ सचिन उर्फ डॉक्टर साहेवराव कोळी या दोघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा हिमांशु आणि पत्नी वंदना हे रडत असल्याचे दिसले. मुलाच्या पाठीवर व हातावर भाजल्याच्या जख mannerा दिसल्याने त्यांनी संपूर्ण बाब विचारली. तो सकाळी दहा वाजता भामपूर येथील शिवाजी चौकात बसलेला असताना चितामण कोळी हा तेथे आला. त्याने मुलाला जबरदस्ती मोटारसायकलवर बसवून जळोद रस्त्यालगतच्या त्यांच्या शेतातील विटभट्टीजवळ नेले. त्या मुलाला बैलगाडीवर झोपून लोखंडी बैलगाडीखाली आग लावण्यात आली. आगीमुळे चटके बसू लागल्याने चटके बसत असल्यामुळे मुलगा आरडा ओरडा करत होता. अखेर जीव मुठीत घेऊन हिमांशुने भीतीपोटी “लाईट घरी कोठीत ठेवले आहे, आणून देतो” असे खोटे सांगितले. त्यानंतर चितामणने त्याची दोरी सोडली. यां घटनेनंतर वडील संतोष गवळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली असून मुलाला पळवून नेणे, मारहाण करणे, लोखंडी बैलगाडीला बांधून जाळण्याचा प्रयत्न करणे आणि जीवाला धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपींच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलावर झालेल्या अत्याचाराची ग्रामस्थांतून व्यापक निंदा होत आहे.
127
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:07:28
Dhule, Maharashtra:तापी पुलावरील थरारक घटना समोर आली आहे ,सेल्फी काढतांना युवक पुलावरून तापी नदीपात्रात पडला, तो पाण्यात बुडताना नागरिकांनी दोरखंडच्या मदतीने त्याला वाचवले. तापी पुलावर सेल्फी काढत असताना तोल गेल्याने युवक तापी नदी पात्रात पडल्याची घटना घडली. पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवासींना युवक पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तात्काळ मदतकार्य सुरु करत उपस्थितांनी दोरखंड टाकून त्या युवकाला मरणाच्या दारातून वाचवले आहे.उपस्थितांच्या सज्जकते मुळे युवकाचे प्राण वाचले आहे. हा संपूर्ण थरार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदो तापी पुलावर घडला आहे सावळदे तापी पुलावर साई पाटील हा युवक दुपारच्या सुमारास मोबाईलने सेल्फी फोटो काढत असतांना साई पाटीलचा तोल गेला आणि तो पुलावरुन थेट तापी नदीपात्रात कोसळला. तापीत बुडतांना पाण्यात हात पाय झटकत साई आपला जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत होता.या दरम्यानच या पुलावरुन जाणारे काही प्रवासींना तापी नदीत युवक बुडत असल्याचे आरडाओरड केली. त्यांनी तात्काळ साई पाटील याला वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू केले. पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली होती. साई पाटीलला वाचविण्यासाठी कोणी काय तर कोणी काय प्रयत्न करत होते.यावेळी एका वाहनातील दोरखंड घेत तो दोरखंड तापी नदी पात्रात फेकला तर सावळदे येथील पट्टीचे पोहणारे बोलवून तापी नदीपात्रात साईला वाचविण्यासाठी प्रयत्न केला यावेळी साई पाटीलने दोरखंड कंबरेला बांधून दोरखंड पकडला आणि उपस्थितांनी साईला वेळीच तापी नदीपात्रा बाहेर काढत तात्काळ शिरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपस्थितांनी मदतकार्यासाठी थोडाही उशीर केला असता तर साई पाटील हा पाण्यात बुडाला असता.काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना तापी पुलावर घडली आहे .
161
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:04:46
Dhule, Maharashtra:धुळे शहर में प्रारूप मतदाता सूची प्रकाशित की गई है। इस प्रारूप मतदाता सूची में पहली जाँच में 28 हजार मतदाओं के नाम दुबार होने की बात कही जा रही है। हरकतों को दर्ज कराने के लिए प्रशासन ने कम समय दिया गया है, इस पर शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने आरोप लगाए हैं। समय की कमी की भी मांग उठी है। शहर में पिछले सात वर्षों में एक लाख मतदाताओं की वृद्धि हुई है। आने वाले कुछ दिनों में महानगरपालिके의 चुनाव संभव है, इसलिए सभी मतदाओं की सूची की प्रतीक्षा जारी है। इच्छुक उम्मीदवार पहले से मतदाता सूची खरीदी कर रहे हैं और उनकी सत्यापन प्रक्रिया चल रही है। इस दौरान मतदाता सूची प्रकाशित करने की प्रक्रिया में तकनीकी त्रुटियाँ रहने से ठाकरे गुट नाराज है।
138
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:04:25
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका शांतता पार पाडवा यासाठी मतदान ते निकला दरम्यान तीन दिवस ड्राय डे ठेवण्यात आलेला आहे. मतदान आणि निकाल लागण्याच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखावी यासाठी हा तीन दिवसाचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक काळात शांतता व सुरक्षितता सुनिचित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश पारित केले आहेत. शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेर आणि शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी हा ड्राय डे असणार आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियान प्रशासनाकडून राबवला जात आहे. महिला बचत गट, युवक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यात करण्यात येत आहे. युवाशक्तीचा सहभाग हा लक्षणीय असून, युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असं आवहान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 1 डिसेंबर पर्यंत हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासन या अभियानांतर्गत विविध स्तरावरील नागरिकांना आणि विशेषता युवा मतदारांना सहभागी करून घेत नियोजन करीत आहे. लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक बळकट व्हावी हा प्रयत्न प्रशासनाचा या माध्यमातून आहे。
149
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 22, 2025 15:45:25
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेच्या 31 नगरसेवक पदांसाठी 109 उमेदवार निवडणणिकेच्या रिंगणात आहे..तर नगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आज कराडमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचां शुभारंभ करण्यात आला. कराडच्या बाजार पेठेतून मंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. कराडमध्ये शिवसेना यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव आणि शरद पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येऊन कराड नगरपरिषद निवडणुक लढवत आहेत. कराड नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी भाजपच्या विरोधात हात मिळवणी केली आहे. त्यामुळे या कराड येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. असं देसाई यांनी सांगितले आहे.
213
comment0
Report
Advertisement
Back to top