Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

कणकवली में विकास आघाडी: राणे बंधु आमने-सामने, नारायण राणे की भूमिका गहरी चर्चा

UPUmesh Parab
Nov 20, 2025 01:18:13
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- अखेर कणकवली नगरपंचायत साठी राणे बंधू आमने सामने.. संदेश पारकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार आणि नारायण राणे यांचे जेष्ठ पुत्र कणकवलीच्या मैदानात... भाजपा विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी केलीय शहरविकास आघाडी.. या आघाडीला शिंदेच्या शिवसेने दिलाय पाठिंबा... संदेश पारकर आणि इतर सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निलेश राणे यांनी केलाय निर्धार... नितेश राणे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्या बंगल्यावर रात्री उशिरा पर्यंत रंगली खलबते... राणे बंधू येणार आमने सामने... खासदार नारायण राणे नेमकी कोणती भूमिका घेणार सर्वांचेच लागले लक्ष सिंधुदुर्ग आमदार निलेश राणे भाषण पॉईंटर शहर विकास आघाडीसाठी एवढी मोठी गर्दी जमविणे हे संदेश पारकर यांचे कौतुक राजनीतीतील नाक म्हणजे कणकवली होय आज कणकवलीला विकासाची गरज असून नगरविकास खात्याकडून मोठा निधी कणकवली शहरासाठी देणार संदेशजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी. संदेश पारकर तुमचा विजय निश्चित कणकवलीत झेंडा शहर विकास आघाडीचा लागणार गुलाल आपलाच उडणार; फटाके आपलेच फुटणार मी एकटा जिंकलो नाही, माझ्या माणसांमुळे जिंकलो कान, हात, पाय म्हणून उद्यापासून संदेश पारकरसाठी माझी इमेज माझ्या सहकाऱ्यांनी बदलली दाढीवाल्यांची आज चलती आहे. मी निवडणुकीत जिंकल्या नंतर माझ्या विरोधी उमेदवाराला सुद्धा शुभेछा दिल्या. इथे संदेशजी तुमचे सगळे आहेत राणे कुटुंबाला या जिल्ह्याने सर्व दिले. निलेश राणे भांडतो कुठे? कोकणसाठी सिंधुदुर्गसाठी, सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे आपली चर्चा विकासासाठी हवी.
145
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 20, 2025 02:33:56
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 02:32:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात यंदा थंडीचा दररोज नवा रेकॉर्ड होतो आहे. 10 दिवसांत किमान तापमान तीन अंशांनी घसरले आहे. शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. नोव्हेंबर महिन्यात रोज किमान तापमान घसरण्याचा रेकॉर्ड होतो आहे. मंगळवारी दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, तर कमाल तापमान 27.7 अंशांवर होते. काल किमान तापमान 10.5 अंशावर गेले. कमाल तापमान 30.2 अंशांवर होते. या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान काल नोंदविले गेले. सकाळी थंड वाऱ्यासह हुडहुडी भरते आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे, तर सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. 22 ते 23 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 02:31:57
Bhandara, Maharashtra:तो सहायक शाखा व्यवस्थापक म्हणतो, कर्ज फेडण्यासाठीच घातला दरोडा... आरोपीची कबुली... भंडारा जिल्ह्यात स्वतः कार्यरत असलेल्या बँकेतच सहायक शाखा व्यवस्थापकाने केला हात साफ. ऑनलाइन गेमींग, बेटींग व शेअर ट्रेडींगच्या नादात लाखोंचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी सीतासावंगीतील कॅनरा बँकेत आपण चोरी दरोडा घातला, अशी कबुलीच पोलिसांच्या तपासात बँकेच्या शाखा सहायक व्यवस्थापक मयुर नेपाळे याने दिली. शाखा सहायक व्यवस्थापक याला ऑनलाइन गेर्मीग, बेटींग व शेअर ट्रेडींगचा नाद जडला होता. याच नादात त्याच्यावर तब्बल ८० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठीच त्याने दरोड्याची योजना आखली. दरोडा घालताना त्याने रोख रकमेसह बँकेतील डिव्हीआर मशीनही चोरून नेली होती. दरम्यान त्याच्याकडून ९६ लाख १२ हजार रोख व अन्य साहित्य जप्त केले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 02:31:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अतिवृष्टी नुकसाननंतर शासन मदत वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी रक्कम मिळते त्यापेक्षा जास्त रक्कम ही पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाली आहे, त्यांच्या आणि आमच्या जमिनी तितक्याच असताना आमच्यावर अन्याय झाला असल्याचं शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले. या उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार अनुदान हा अन्याय आहे आणि त्यातच प्रशासन निजामाच हस्तक असल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी वागतय असा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 20, 2025 02:17:26
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग - मुंबई नाका पोलिस ठाण्यात जमावाची मोठी गर्दी - अल्पवयीन मुलाकडून विवाहित महिलेचा विनयभंग मात्र चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या अफवेने गर्दी - संशयित अल्पवयीन मुलाने महिलेवर अतिप्रसंग केल्यानंतर महिलेकडून आरडा ओरड - पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिलेसह नातेवाईकांची आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी - मुलीसह आईवर अतिप्रसंग केल्याचा तक्रारीत उल्लेख - पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पॉक्सोसह , विनयभंग आणि ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल - कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आव्हान
90
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 20, 2025 02:17:01
87
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 02:16:42
Bhandara, Maharashtra:आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक फोडून त्यांनी शिवसेनेंत प्रवेश दिला... भंडारा जिल्ह्यातून सुरू होऊन महाराष्ट्रभर चालत आहे... महाराष्ट्र में शिवसेना नेत्यांचे भाजपा में प्रवेश के कारण शिवसेना नेते नाराज हैं। तर यावर उत्तम देताना भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिंदे सेनेलाच धारेवर धरले आहे... शिवसेना शिंदे गटांनी याविषयी नाराजी व्यक्त करू नये हे सहाजिक आहे.. या पक्षातील लोक त्या पक्षात त्या पक्षातील लोक या पक्षात हे होणारच आहे याची सुरुवात भंडारा जिल्ह्यापासून झाली असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.. भारतीय जनता पार्टीचे लोक फोडून त्यांनी पक्षात घेतले इथपासून सुरुवात झाली असून ते महाराष्ट्रभर चालत आहे... एकदा तुम्ही एखादी गोष्ट केली तर दुसराही तसेच करतो ते साहजिक आहे。
107
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 02:15:42
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांसाठी मोठ मोठ्या घोषणा करायच्या पण शेतकऱ्यांना काहीही द्यायचं नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्याच अशी या सरकारची भूमिका आहे... नाना पटोले शेतकऱ्यांसाठी मोठ मोठ्या घोषणा करायच्या पण शेतकऱ्यांना काहीही द्यायचं नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्याच अशी या सरकारची भूमिका आहे.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तारिक पे तारीख देत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार करत आहे.. शेतकऱ्यांना द्याच की नाही एकदा त्यांनी सांगून द्यावा शेतकऱ्यांना आशेवर ठेवू नये.. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देणार नाही त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये करतील व नंतर शेतकऱ्यांना रांगेत ठेवतील .. 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यानं कर्ज भरावा लागतो. बँकेचा नोटीस देखील शेतकऱ्यांना येईल म्हणून 31 मार्च आधी कर्जमाफी करून सरकारने शेतकऱ्यांचा पूर्ण पैसा बँकेत भरला पाहिजे. या अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत असे वक्तव्य नानापटोले यांनी केले आहे...
126
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 02:04:22
Akola, Maharashtra:Anchor : आरोग्य सेवांमध्ये खासगीकरणाचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय खासगी भागीदारीत (पीपीपी) देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकोल्यासह लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी कंपन्यांकडे सोपवण्याची तयारी शासनाने सुरू केली असून, याबाबत आरोग्य विभागात हालचाली वेगाने सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलसाठी शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधात संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपनीकडे देण्याचा प्रस्ताव आहे. रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारीही संबंधित कंपनीमार्फत नियुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील सेवा रचना, नियंत्रण, तसेच रुग्णांवरील खर्च मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात चर्चेत आहे.शासन पीपीपी मॉडेलमुळे सेवा अधिक उच्च प्रतीची मिळेल, असा दावा करत असले तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचे काय होणार, हा प्रश्न गंभीरपणे पुढे येत आहे.दरम्यान, या निर्णयाला विरोध करत काँग्रेसने जोरदार भूमिका घेतली.अकोल्याचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी थेट रुग्णालयात जाऊन आंदोलनात्मक पद्धतीने विरोध नोंदवला. त्यांनी हा निर्णय रुग्णविरोधी असल्याचे सांगत शासनाने तत्काळ प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
146
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 20, 2025 02:03:58
Nashik, Maharashtra:साधुग्राम भूसंपादनावर आज महत्त्वाची बैठक मनपा शेतकऱ्यांसमोर मांडणार नवा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनंतर मनपा भूसंपादन प्रक्रिया गतीने पहिले टप्प्यात तपोवनातील 268 एकर जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याची तयारी साधुग्रामसाठी एकूण 1000 एकरची आवश्यकता सध्या 93 एकर अधिग्रहित, आणखी 283 एकर जमीन बाकी भाडेतत्त्वाऐवजी कायमस्वरूपी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे निर्देश पूर्ण भूसंपादनासाठी लागणारा खर्च सुमारे 4000 कोटी मनपाचा प्रस्ताव: 50% रोख + 50% TDR तरीही 2000 कोटींची तूट — चार टप्प्यांत निधी देण्याचा पर्याय आज निवडक शेतकऱ्यांसोबत थेट वाटाघाटी साधुग्राम प्रकल्पातील पुढचा निर्णायक टप्पा आज ठरणार
85
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 01:45:52
Akola, Maharashtra:अकोলা जिल्हा स्त्री रुग्णालयात एका कंत्राटी कर्मचाऱ्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्या मध्ये एकच गोंधळ उडाला. तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रामदासपेठ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होता. पूर्णवेळ अनुभव प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्याने प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र अपेक्षित प्रमाणपत्र न मिळाल्याने तो आक्रमक झाला आणि रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित युवकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
195
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 20, 2025 01:19:12
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- आमदार निलेश राणे आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्या सोबत युती करायची नहोती, ज्यांना आमच्या सोबत युती करायची आहे त्यांच्या सोबत युती झाली. म्हणून मी प्रचारासाठी कणकवली मध्ये आलो. ऑन प्रचार सभा --- आमच्या स्टार प्रचारकांची 40 ची यादी आहे, कोणी येऊ शकतात. नाव नंतर जाहीर करू आम्ही शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत.. ऑन युती विरोध --- जिल्ह्यात युती होऊ नये म्हणून बाहेरून विरोध होता जिल्ह्यातून नहोता राणे साहेब अजूनही युती साठी आग्रही आहेत. आता युती होईल अस वाटत नाही आणि साहेबांनी ( नारायण राणे ) आता तुम्ही थांबू नका तुमचाही मोठा पक्ष आहे अस सांगितलं आहे. वेळोवेळी किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आणि किती बैठका घ्यायच्या त्याला काही तरी मर्यादा आहेत. जे उत्तर आलं ते समाधान कारक आले नाही. शिवसेनेला जिथे चांगलं वातावरण आहे तिकडे आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार ऑन निकाल --- कणकवली मध्ये शहर विकास आघाडी आणि इतर तीन ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागणार ऑन नारायण राणे युती तोडणार -- राणे साहेबांचं मी अस स्टेटमेंट ऐकलं नाही, अस राणे साहेब बोलले नाहीत.. राणे साहेबांची आणि शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. लपून छपून नाही ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी जेवढ योगदान द्यायचं आहे तेव्हढ देणार ऑन प्रचार --- संदेश पारकर जिकडे बोलावतील तिकडे यावं लागणार हा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो ऑन निलेश राणे कौतुक ( नितेश राणे ) --- जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झाला नाही ते ( नितेश राणे) पालकमंत्री आहेत. नात नात असतं ते तुटत नाही तुटणारही नाही. भाजपाच्या वरच्या स्तरातून निर्णय घेतले गेले. राणे साहेबांना सांगून आम्हीं हा निर्णय घेतलाय ऑन निवडणूक मुद्दे --- शहर हे 21 व्या शतकातील दिसलं पाहिजे. मागच्या 10 वर्षा पेक्षा जे बघितलं त्यापेक्षा चांगलं काय देऊ शकतो आमचा तो प्रयत्न राहील. ऑन फोन करा ( धमकी फोन ) आणि --- धमकीच्या अनुषंगाने घेऊ ना इतर गोष्टीतही कार्यकर्त्यांना गरज लागेल ऑन स्वबळाचा नारा ( भाजपा ). -- त्यांच्या पार्टीत काय होत ते मी बघायला आत बसलो नाही पण आम्ही ज्या नेत्यांसोबत संपर्क साधला असता आम्हाला जे थांबवलं गेल त्यावरून आम्ही समजलो हे जिल्ह्यातून नाही बाहेरून होतय.. ऑन प्रचार सभा --- आज शिवसेनेची प्रचार सभेची सुरवात झालीय बाकीच नियोजन बद्द प्रचार करू आमदार निलेश राणे
186
comment0
Report
Advertisement
Back to top