Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपती संभाजीनगर में ठंडी ने दिया नया रिकॉर्ड, तापमान गिरने की चाल जारी

VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 02:32:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरात यंदा थंडीचा दररोज नवा रेकॉर्ड होतो आहे. 10 दिवसांत किमान तापमान तीन अंशांनी घसरले आहे. शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. नोव्हेंबर महिन्यात रोज किमान तापमान घसरण्याचा रेकॉर्ड होतो आहे. मंगळवारी दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, तर कमाल तापमान 27.7 अंशांवर होते. काल किमान तापमान 10.5 अंशावर गेले. कमाल तापमान 30.2 अंशांवर होते. या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान काल नोंदविले गेले. सकाळी थंड वाऱ्यासह हुडहुडी भरते आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे, तर सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. 22 ते 23 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत.
81
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 04:20:07
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 04:18:48
Niphad, Maharashtra:बिबट्याच्या दहशतीमुळे शाळातील पटसंख्या झाली कमी... पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी सुरू केला ' एक काठी स्वसंरक्षणासाठी' उपक्रम..... अँकर IN: निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या असताना, देवगाव येथील एका शाळेने अनोखा उपाय शोधत विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट… व्हॉइस-ओव्हर (V/O): नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात बिबट्याने तब्बल पाच वेळा मानवांवर हल्ले केले. तर पंधरा ते वीस पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यांमुळे पहाटे ते रात्रीपर्यंत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम थेट शिक्षणावर दिसू लागला. अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शाळांच्या उपस्थितीत मोठी घट झाली होती. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. अशातच देवगाव येथील शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला — ‘एक काठी स्वसंरक्षणासाठी’. विद्यार्थ्यांना शाळेत येताना हातात काठी देण्यात येते, तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे साधे तंत्र शिकवले जात आहे. बाईट:शिक्षक V/O (Visuals: काठी घेऊन जाणारे विद्यार्थी) या उपक्रमाचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा वाढ झाली आहे. V/O (Visuals: पिंजरा, बिबट्या पकडतानाचे फुटेज/फोटो) काही दिवसांपूर्वी याच शाळेच्या आवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. तर दोन दिवसांपूर्वी एका शिक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. बाईट: स्थानिक नागरिक बाईट :- विद्यार्थी व विद्यार्थिनी, अँकर OUT: एकीकडे बिबट्याचे वाढते हल्ले… आणि दुसरीकडे गावकऱ्यांची व शिक्षकांची धैर्याने केलेली तोंड देण्याची तयारी. देवगाव शाळेचा ‘एक काठी’ उपक्रम हा तात्पुरता उपाय असला तरी, सुरक्षिततेसाठी पावले उचळण्याचा तो एक प्रयत्न आहे. निफाड सह राज्यातील बिबट्यांची संख्या आणि दहशत कधी नियंत्रणात येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 04:17:27
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 04:16:58
Shirdi, Maharashtra:पक्ष विरोधी कारवाई केल्याने पक्षातून हकालपट्टी... उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निष्ठावान सैनिकांची हकालपट्टी... पक्षाने हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू.... पत्रकार परिषदेत शिवसैनिक ढसाढसा रडले... राहाता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , माजी नगरसेवक सागर लुटे , उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार... तर लुटे आणि सौ.होले नगरसेवक पदाचे उमेदवार... महाविकास आघाडीत सामिल न होता पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने कारवाई... एबी फॉर्म चोरल्याचा अनिल देसई यांचा पदाधिका-यांवर आरोप... राहाता - शिर्डी ठाकरे सेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप... ही ठाकरे सेना नाही तर KT सेना ( कोल्हे - थोरात सेना ) पठारे यांचा घणाघाची आरोप... गेल्या 30 वर्षापुंर राजेंद्र पठारे हे निष्ठावान शिवसैनिक.... जिल्हा उपप्रमुखासह अनेक पदे भुषवलीत.. विखे समर्थकांनी माझे घर जाळले , आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र पक्ष सोडला नाही... निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य... जिल्हयातील ठाकरे सेना संपवण्याचा थोरातांचा डाव... राजेंद्र पठारे यांची थोरातांवर घणाघाती टिका... bite - राजेंद्र पठारे , माजी उपनगराध्यक्ष
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:15:53
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 04:01:56
Ratnagiri, Maharashtra:ही निवडणूक कार्यकर्त्यांची ती ताकतीने लढणे गरजेचे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला पाहिजे या निवडणुकीमध्ये नाती आड यायला लागले...पण तुमचे आणि आमचे नातं महायुतीचं आहे... नात्यात अडकून राहिलो तर गडबड राजेश सावंत पार्टीचा भाग नाही राजेश सावंत यांचे स्टेटस बघणे सोडा भाजपने तुम्हाला काय दिले हे राजेश सावंत यांनी विसरता कामा नये... शिवाय त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी हे विसरता कामा नये महायुती विरोधात कुणी अर्ज भरला असेल तर ते मागे घ्या विरोधातला एखादा उमेदवार विजयी झाला तर काय होऊ शकते याचा विचार देखील झाला पाहिजे.. आपले उमेदवार जिंकले पाहिजेत
87
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:01:24
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांचा भाजपा प्रवेश रखडला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संदीप नाईक यांना मोठी ऑफर दिलेय. नवी मुंबई महापालिके बाबत संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उभे करण्यासंदर्भात पुढाकार घेतला तर मी त्यांचे स्वागत करेन अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेय. शिंदे यांच्या वक्ताव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालेली पहायला मिळत असून संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा सक्रिय होतात का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.
51
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 03:46:21
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात निचांकी तापमान 6.5° C नोंदवलं गेले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 6.5 अंशाच्या खाली आहे. सतत वाढणारी थंडी जनजीवन विस्कळीत करणारी ठरत आहे. राज्यातील थंड हवेच्या ठिकाण महाबळेश्वर आणि तोरणमाळ पेक्षा कमी तापमान धुळ्यामध्ये नोंदवल जात आहे. सायंकाळी आठ वाजेनंतर गार बोचरे वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण अधिकच वाढलेल आहे. अशा या काळाच्या थंडीमध्ये घराबाहेर पडणं कठीण बनलं आहे.या थंडीच्या लाट्यामुळे उबदार कपड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे, तर सुकामेवा, चहा याचीही विक्री प्रचंड वाढण्याच दिसून येत आहे. शाळांचे वेळ मात्र अद्याप प्रशासनाने बदलले नाही. तापमान कमी होत असताना शाळांची वेळ बदलावी अशी मागणी पालकांची आहे.
175
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 03:38:49
153
comment0
Report
Advertisement
Back to top