Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

गणपतिपुले समुद्र में डूबने से मुंबई के युवक की मौत, दो बचाए गए

PPPRANAV POLEKAR
Nov 08, 2025 04:46:49
Ratnagiri, Maharashtra
गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात आलय.प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी अस या मृत तरुणाचं नाव आहे तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या दो तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी वाचवलेय.मुंबईतून पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले थे त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरता आला नाही समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ते समुद्रात खेचले गेले ही बाब स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ समुद्रात उडी मारुन या तिघांना बाहेर काढले मात्र यात एकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आलेय.या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Nov 08, 2025 09:37:00
Navi Mumbai, Maharashtra:मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता श्रेय वादाची लढाई समोर येत आहे विक्रोळी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात शिवसेनेने निदर्शने केली विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा फुले या पालिका रुग्णालयाचे नूतनीकरण हे शिवसेनेच्या प्रयत्नातून झाल्याचा दावा करत शिवसेनेच्या सुवर्णा कारंजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्यावर आरोप केले पक्षात असताना देखील आम्ही केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुनील राऊत या आधी करत होते आता देखील ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. यावेळी आमदार सुनील राऊत यांचा पुतळा शिवसैनिकांकडून जाळण्यात आला.
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 08, 2025 09:35:21
Thane, Maharashtra:तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू” — ubt नेते रोहिदास मुंडे यांचा इशारा दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेडा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबीयांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की “दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही.” “जर महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असे अ‍ॅड.रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 08, 2025 09:33:49
Oros, Maharashtra:ऑन महायुती ( राणे वाद ) -- महायुती मधील पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत विचारांसाठी नाही. त्यांची ताकद एकटे लढण्याची नाही. म्हणून ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील पण त्यांनी राज्यात राहिलेली नाही. ऑन शिंदे / ठाकरे सेना आघाडी --- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाहीत. मात्र कणकवली नगरपंचायत मधील झालेल्या भ्रस्टाचाराच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोचवू.. ऑन नारायण राणे ( युती झाली तर संबंध तोडू ) -- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राणेना विचारल्याशिवाय विशाल परब राजन तेली यांना वेगवेगळ्या पक्षात घेत आहेत. रानेंच्या शब्दाला आता राज्यात किमंत राहिलेली नाही त्यामुळे तुम्ही युती बाबत न बोललेलं बर ऑन राणे टीका ( उद्धव राज ) -- त्यांच्यात सत्ता मिळवण्याची क्षमता होतीच पण पक्ष फोडून सत्ता मिळवली उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल ते बघा ऑन महाविकास आघाडी --- सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवीणार आहेत. महाविकास आघाडी बाबत वरिष्ठसोबत बोलून जगवाटपाच निश्चित होईल शिंदे आणि भाजपाची युती होते कि नाही आणि त्यांचे उमेदवार कुठे जातात ते बघून निर्णय होईल ऑन वेंगुर्ला ( आघाडीत बिघाडी ) --- काँग्रेस ने त्याच्या स्तरावर उमेदवार उभा केलाय. उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे. सर्व एकत्र बसून एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करू ऑन संदेश पारकर ( उमेदवारी ) -- संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. भ्रस्टाचार दूर व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. ऑन युती --- शिंदेचे आमदार भाजपाच्या ताकतीवर निवडून आलेले आहेत. शिंदेचे कार्यकर्ते जी काही हवा भरत आहेत त्या पक्षाला कोणतेही भवितव्य राहिलेले नाही. त्यांची भूमिका ते जाहीर करतील आणि आम्ही आमची भूमिका जाहीर करू ऑन जिल्हा परिषद निवडणूक --- सत्ताधारी पक्षाने ज्या घोषणा केल्या त्यासाठी निधी आणलेला नाही रस्ते खड्डेमय आहेत. चिपी विमानतळ अपूर्ण आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही ह्यांच्या विरोधात जनता आहे जनता आमच्या सोबत राहील.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 08, 2025 09:25:51
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 08, 2025 09:25:29
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 09:04:55
Akola, Maharashtra:पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या जमिनीची बातमी सर्वप्रथम झी २४ तासने उघडकीस आणल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. या व्यवहारात केवळ १ टक्का वाटा असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र ९९ टक्के वाटा असलेल्या पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, यामुळे प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप होत आहे.या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ‘या प्रश्नाचं उत्तर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील’ असे म्हणत जबाबदारी झटकली. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी शितल तेजवानी आपल्या पतीसह विदेशात फरार झाल्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी ‘हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनीच शोधून आणावे’ असे वक्तव्य केले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवार यांचे हे उत्तर पार्थ पवारांवरील आरोपांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 08, 2025 09:03:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: मोहळ के पूर्व विधायक यशवंत माने ने उमेश पाटील और विधायक राजू खरें पर गंभीर आरोप लगाए। मोहळ नगर परिषद के पार्श्वभूमि पर राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील वाद फिर से पेटला। उज्वला थिटे नामक महिला ने अपने ऑफिस में आकर यह खुलासा किया, ऐसा यशवंत माने का आरोप। वहीं उस महिला ने कहा कि मुझे बोलने से रोकने के लिए एक इनोव्हा गाड़ी और 10 लाख रुपये खाते में भेजने की मांग की गई। मैंने यह सब एक वर्ष बाद बोल रहा हूँ क्योंकि अगर उस समय यह खुलासा किया होता, तो मैं उस महिला के विरुद्ध आरोप कर देता। इसलिए आप लोग इस तरह की बातें नहीं सुनें और पैसे देकर झूठ बोलने वालों पर विश्वास न करें।
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 08, 2025 08:52:11
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात साप पकडण्याच्या प्रयत्नात 40 वर्षीय प्राणीमित्र समीर इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साप पकडताना त्यांच्या हाताला साप चावल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर काही तासातच समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सावेडी भागात एक साप दिसल्याची माहिती मिळताच समीर इंगळे तिथे पोहोचला आणि नेहमीप्रमाणे साप पकडण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, या दरम्यान सापाने त्यांच्या हाताला चावा घेतला. तातडीने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समीर इंगळे हा शहरातील परिचित प्राणीमित्र म्हणून ओळखला जात होता. रस्त्यावर एखादा जखमी किंवा आजारी प्राणी दिसला तर ते त्याची काळजी घेत, उपचार करून त्याचा सांभाळ करत असत. त्यांच्या निधनाने नगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे...
2
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 08, 2025 08:32:46
Kolhapur, Maharashtra:Kolhapur के खांडसरी क्षेत्र से शिंगणापूर रोड पानी की टँकी तक नव दम्पति संकेत माने और पूजा माने की वरात ने शुक्रवार रात सबका ध्यान खींचा। खास यह कि वरात के लिए दुल्हा- दुल्हन को 'जेसीबी की बकेट' में बैठाया गया था। रिश्तेदार और मित्रों की मौजूदगी में डीजे की धुन पर यह वरात घर तक निकाली गई। संकेत माने आर्किटेक्ट हैं और पूजा माने ने बी. फार्मसी की डिग्री प्राप्त की है; संकेत के पिता राजेश दत्तात्रय माने चार जेसीबी के मालिक हैं; सिर्फ शौक के लिए इन में से एक जेसीबी वरात में इस्तेमाल की गई। नागरिकों ने वरात की तस्वीरें और वीडियो सोशल मीडिया पर शेयर कीं; इस अनोखी वरात ने लोगों का ध्यान आकर्षित किया।
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 08:16:14
Jalna, Maharashtra:जालना : जालन्यातील तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय, सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (पॅकेज) आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी अँकर : सोशल मीडियावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागूनही फोनवर सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यानं जीवन जगणं असह्य झालं आणि तरुणाने थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.जालन्यात ही घटना घडलीय.त्यामुळे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्टमधून. व्हिओ:१:जालन्यातील ढोकमळ तांडा येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षाचा महेश आडे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. त्यामुळे व्हायरल व्हिडिओनंतर सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानं या धमक्यांच्या वेदना असह्य झाल्यानं त्याने थेट गावाकडच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेनंतर महेशचं कुटुुंब हतबल झालंय. महेश आडेचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण नेमकं है तरी काय.? काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर छत्रपती संभाजीनगर असं नाव लिहिलेल्या बोर्डखाली दोन तरुण लघुशंका करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. लघुशंका करताना हे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं तेव्हा समोर आलं होतं. या व्हायरल व्हिडिओत लघुशंका करणाऱ्या तरुणांची नावं, त्यांच्या पत्ते आणि फोन नंबर देखील टाकण्यात आले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्हीही तरुणांनी माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. मात्र या तरुणांनी माफी मागूनही फोनवर तसेच इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. अशाच धमक्या महेश आडे याला देखील येत होत्या. त्यामुळे या धमक्यांना घाबरून महेशला त्याच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगरहुन गावाकडे बोलावून घेतलं. हा सर्व प्रकार त्याने कुटुंबियांना सांगितला. पण तरीही महेशला फोनवर तसेच इन्स्टाग्राम वरून धमक्या मिळणं सुरूच राहीलं .त्यामुळे आता जगणं अवघड झालंय.हे सगळं असह्य होतंय. त्यामुळे मि आत्महत्या करीन अशी खंत महेशने त्याच्या मित्रांजवळ बोलून दाखवली. अखेर महेश आडे या 28 वर्षाच्या तरुणानं गावाकडे असताना थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.दरम्यान माफी मागूनही महेशला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर अटकेच्या कारवाईची मागणी महेशच्या काकांनी केलीय बाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका (गळ्यात रुमाल आहे) व्हिओ :२:दरम्यान महेशच्या आत्महत्येप्रकरणी जालन्यातील आष्टी पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींना अटक करण्याची तयारी केलीय.सोशल मीडियावर पोस्ट करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनेची कदर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. तसेच सोशल मीडियावरून कुणालाही शिवीगाळ करू नये असंही आवाहन पोलिसांनी केलंय.पोलीस सध्या या प्रकरणात आरोपी निष्पन्न करण्याच्या कामाला लागले असून सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. बाईट :गणेश सुरवसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक,आष्टी पोलीस ठाणे व्हिओ :3:महेश आडे याने आत्महत्या केल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी महेश आडे याच्या कुटुुंबियांची भेट घेत कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा वाघमारे यांनी दिला आहे. बाईट : नवनाथ वाघमारे,नेते,ओबीसी व्हिओ :4:अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा व्हायरल व्हिडीओचा प्रकार समोर आला होता.पण माफी मागूनही धमक्यांचा ससेमिरा थांबला नाही.अखेरीस महेश आडे सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे जेरीस आला आणि त्याने मृत्यूला जवळ केलं.महेशच्या जग सोडून जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय.त्यामुळे सोशल मीडियावरील धमक्यांचं सत्र त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं असंच तरी पोलिसांकडून आता आरोपींवर काय कारवाई केली जाते याकडे कुटुंबियांचं लक्ष लागलंय । नितेश महाजन झी-२४ तास,जालना
4
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 08, 2025 08:04:33
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग उदय सामंत बाईट मुद्दे..... उदय सामंत ऑन युती शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. काल रत्नागिरी संदर्भात रवींद्र चव्हाण यांच्याशी बैठक झाली रत्नागिरी मध्ये युतीवर निर्णय झालाय. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी ही आमची नैसर्गिक युती आहे त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे असा निर्णय आमचा झाला आहे. सिंधودुर्ग बाबत नितेश राणे यांनी मैत्रीपूर्व लढत होण्याचे म्हटले आहे तशी आमची सुद्धा तयारी आहे. ऑन ठाकरे शिंदे शिवसेना एकत्र भाजपला रोखण्यासाठी सिंधुदुर्गातच काय तर महाराष्ट्रात देखील शिवसेनेकडून प्रयत्न होणार नाही. आम्ही भाजप सोबत मैत्रीचा हात कायमच पुढे केलेला आहे. आपल्याला युती करूनच पुढे जायचे आहे. सावंतवाडी मध्ये सुद्धा आम्ही युतीचा ऑप्शन ओपन ठेवला आहे. युती नाही झाली तर आम्ही लढणार नाही असं होणार नाही. चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे असतील आणि धनुष्यबाणावर आम्ही लढू. काल सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत आमची बैठक झाली यामध्ये आम्ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी ठरवली आहे. आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे. असं नाही की आमची ताकद नाही तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे 50% पेक्षा आमची ताकद जास्त आहे. तरीदेखील आम्ही सांगतो आहे की आम्हाला संयमाने घ्यायचा आहे. युती करून लढायचे आहे त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली आहे. तशी आम्ही सुद्धा केली आहे मैत्रीपूर्ण लढत झाली तर मैत्रीपूर्ण लढू अन्यथा स्वतंत्र लढू ऑन मुख्यमंत्री भेट मी आणि दीपक केसरकर यांनी युती संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका दाखवली नाही. चव्हाण साहेबांनी सुद्धा युती होण्यासाठी प्रयत्न केला मात्र पालकमंत्री यांचा निर्णय असेल मैत्रीपूर्ण लढायचा त्याचा निर्णय भाजप घेईल आमचा निर्णय आम्ही घेऊ. ऑन नितेश राणे यांनी बोलताना भान ठेवावं सिंधुदुर्गाचा इतिहास बघितला तर दीपक भाई किती संयमी आहेत हे सर्वांना माहीत आहे. दीपक भाईनी अनेक वेळा कटूता बाजूला ठेवून राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा दुखावली जाते त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं. ऑन युती संदर्भात माशी शिंकली काल माशी कुठे शिंकली ती दीपक भाई नी क्लियर केलं. ज्येष्ठ असणाऱ्या दीपक भाईंच्या व्यक्तिमत्त्वाची कोणी अवहेलना करू नये आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत. दीपक भाई आणि निलेश राणे जो निर्णय जिल्ह्यामध्ये घेतील तो मला संपर्क मंत्री म्हणून मान्य असेल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीने काम करू. ऑन शिंदे शिवसेनेची भूमिका लवचिक का आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतः आमदार खासदार होण्यासाठी हा कटूता जी आहे ती भविष्यात आमदारकीला आणि खासदारकीला अशीच राहू शकते म्हणून आमची लवचिक भूमिका नाही नरमाईची भूमिका आहे आणि संयमी आहे. याचा अर्थ आम्ही आम्ही हतबल नाही आहोत आम्ही संयमाने युती करा असं सांगतो आहे. आमच्या भांडणांमध्ये आमचा विरोधक आहे त्याचा कुठे अस्तित्व नाही त्याला परत नवी संजीवनी मिळू नये अशी आमची भूमिका आहे ही नरमाईची नाही तर नम्रतेची भूमिका आहे. ऑन शहर विकास आघाडीला पाठिंबा ही शहर विकास आघाडी कोणत्याही पक्षाची नाही सर्व पक्षीयांची होते आहे. असं मी ऐकलं आहे त्यात शिवसेना म्हणून आमचा काही संबंध नाही कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे तिथे शिवसेना पुढाकार घेते आहे आणि युबीटी सोबत जात आहे अशी शक्यता नाही. युбиटी सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र शहर विकास आघाडी कुठल्या पक्षाची नाही. सर्वपक्षीय तिथे निर्णय होत आहे तिथे काय निर्णय होत आहे ते आपण बघूया. निकालानंतर दिसेल शिवसेनेचे अस्तित्व किती बीजेपीचा अस्तित्व किती आहे आणि बाकीच्यांचं किती आहे. कणकवलीच्या त्या सर्व घडामोडींमध्ये संपर्क मंत्री म्हणून माझा काही संबंध नाही एकनाथ शिंदे आणि दीपक भाई यांचा सुद्धा संबंध नाही. इथे स्थानिक लेवलला अशा घडामोडी घडत असतील आमच्या नावाचा उपयोग करत असतील तर आपण कोणाचा तोंड धरू शकतो? नावाचा उपयोग होत असेल तर माझा काहीही पर्याय नाही ऑन बाळा माने आरोप कोणाचा प्रश्न विचारताय चार वेळा लोकांनी त्यांना डांबर फासलय. त्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही 2004 आणि 2009 ला त्यांची हीच टेप होती त्यांनी 25 वर्ष हीच टेप वाजवली आहे. उदय सामंत काय आहे हे लोकांना माहित आहे. हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे. त्यामुळे असूया कोणाबद्दल असू नये. त्यांची मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील मोठं व्हावं कदाचित त्याने एमआयडीसीला फसवून कुठे प्लांट लावले असतील तरी मोठ व्हावं मी तिकडे लक्ष देणार नाही. माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केली आहे तरी मी लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्याला किती किंमत द्यायची आणि त्यांना किती मोठं करावं त्यामुळे त्यांना लोक किती किंमत देतात हे निवडणुकीत दिसतय. ऑन प्रताप सरनाईक वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईक यांच्यावर काय आरोप केले मला खरोखरच माहित नाही. त्याची मी माहिती घेतो अभ्यास करतो आणि तुमच्याशी बोलतो ऑन पार्थ पवार यांच्यावर उद्योग खात मेहरबान फेक नरेटिवला बळी पडण्याचा हा प्रकार आहे. पत्रकारांनी देखील थोडाफार प्रत्येक विभागाचा अभ्यास केला पाहीजे. माझ्या विभागाने 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये केली हे ऐकून मलाही धक्का बसला. माझ्या सही शिवाय कसं झालं? माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलं तहसीलदाराने केलेलं हे काम होतं महसूल विभागाचा हा विषय होता उदय सामंत यांचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेतलं असेल माझ्या खात्याचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही फक्त आयटी पार्क करणार असाल आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर त्याला हे हे कागदपत्र लागतात तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ याच्या पलीकडे आमचा काहीही संबंध नाही ऑन अजित पवार राजीनामा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला लोक घाबरतात हे सिद्ध झालंय ऑन पार्थ पवार गुन्हा दाखल का नाही एग्रीमेंट झालं होतं ते पुराव्यानिशी महाव्यवस्थापकाने दाखवला आहे. त्यामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाही पाटील नावाची व्यक्ती आहे त्याचंच नाव होतं ऑन आडाळी एम आय डी सी जागेचे दर कमी करून सुद्धा अडाळीची जमीन विकली जात नव्हती म्हणून गोल्फ कोर्स चा विषय आम्ही करणार होतो मात्र सरपंचांशी आणि दीपक केसरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिली आहे ऑन नारायण राणे भेट घेणार कोकणच्या जडणघडणीत नारायण राणेंचा सिहांचा वाटा आहे त्याच्यां सल्ल्याने निर्णय घेतले जातील. आज जर त्यांनी वेळ असेल तर त्यांची भेट घेणार
2
comment0
Report
Advertisement
Back to top