Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

सोशल मीडिया धमकियों से जालना के युवक ने दी आत्महत्या, माँगा कड़ी कार्रवाई

NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 08:16:14
Jalna, Maharashtra
जालना : जालन्यातील तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय, सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (पॅकेज) आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी अँकर : सोशल मीडियावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागूनही फोनवर सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यानं जीवन जगणं असह्य झालं आणि तरुणाने थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.जालन्यात ही घटना घडलीय.त्यामुळे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्टमधून. व्हिओ:१:जालन्यातील ढोकमळ तांडा येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षाचा महेश आडे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. त्यामुळे व्हायरल व्हिडिओनंतर सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानं या धमक्यांच्या वेदना असह्य झाल्यानं त्याने थेट गावाकडच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेनंतर महेशचं कुटुुंब हतबल झालंय. महेश आडेचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण नेमकं है तरी काय.? काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर छत्रपती संभाजीनगर असं नाव लिहिलेल्या बोर्डखाली दोन तरुण लघुशंका करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. लघुशंका करताना हे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं तेव्हा समोर आलं होतं. या व्हायरल व्हिडिओत लघुशंका करणाऱ्या तरुणांची नावं, त्यांच्या पत्ते आणि फोन नंबर देखील टाकण्यात आले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्हीही तरुणांनी माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. मात्र या तरुणांनी माफी मागूनही फोनवर तसेच इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. अशाच धमक्या महेश आडे याला देखील येत होत्या. त्यामुळे या धमक्यांना घाबरून महेशला त्याच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगरहुन गावाकडे बोलावून घेतलं. हा सर्व प्रकार त्याने कुटुंबियांना सांगितला. पण तरीही महेशला फोनवर तसेच इन्स्टाग्राम वरून धमक्या मिळणं सुरूच राहीलं .त्यामुळे आता जगणं अवघड झालंय.हे सगळं असह्य होतंय. त्यामुळे मि आत्महत्या करीन अशी खंत महेशने त्याच्या मित्रांजवळ बोलून दाखवली. अखेर महेश आडे या 28 वर्षाच्या तरुणानं गावाकडे असताना थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.दरम्यान माफी मागूनही महेशला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर अटकेच्या कारवाईची मागणी महेशच्या काकांनी केलीय बाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका (गळ्यात रुमाल आहे) व्हिओ :२:दरम्यान महेशच्या आत्महत्येप्रकरणी जालन्यातील आष्टी पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींना अटक करण्याची तयारी केलीय.सोशल मीडियावर पोस्ट करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनेची कदर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. तसेच सोशल मीडियावरून कुणालाही शिवीगाळ करू नये असंही आवाहन पोलिसांनी केलंय.पोलीस सध्या या प्रकरणात आरोपी निष्पन्न करण्याच्या कामाला लागले असून सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. बाईट :गणेश सुरवसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक,आष्टी पोलीस ठाणे व्हिओ :3:महेश आडे याने आत्महत्या केल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी महेश आडे याच्या कुटुुंबियांची भेट घेत कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा वाघमारे यांनी दिला आहे. बाईट : नवनाथ वाघमारे,नेते,ओबीसी व्हिओ :4:अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा व्हायरल व्हिडीओचा प्रकार समोर आला होता.पण माफी मागूनही धमक्यांचा ससेमिरा थांबला नाही.अखेरीस महेश आडे सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे जेरीस आला आणि त्याने मृत्यूला जवळ केलं.महेशच्या जग सोडून जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय.त्यामुळे सोशल मीडियावरील धमक्यांचं सत्र त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं असंच तरी पोलिसांकडून आता आरोपींवर काय कारवाई केली जाते याकडे कुटुंबियांचं लक्ष लागलंय । नितेश महाजन झी-२४ तास,जालना
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Nov 08, 2025 10:47:12
Amravati, Maharashtra:वडेट्टीवार पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले वडेट्टीवार हर्षवधन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहून गांधी यांचं तोंड पाहत नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे – चंद्रशेखर बावनकुळे यावेळी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करतांना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक लोक आमच्या पक्षात येत आहे काँग्रेसची हालत खराब आहे त्यामुळे नागपुरात वडेट्टीवार हे पटोले यांचे तोंड पाहत नाही आणि पटोले हे वडेट्टीवार यांचं तोंड पाहत नाही आणि हे दोघेही हर्षवर्धन सपकाळ यांचं तोंड पाहत नाही त्यामुळे हे तिघेही राहुल गांधी यांचे तोंड पाहत नाही असे बावनकुळे असे बावनकुळे म्हणाले आहे त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे म्हणून वडेट्टीवार पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साऊंड बाईट :- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 08, 2025 10:46:40
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असताना पालिकेनं अद्याप सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर केलेली नाही. यासाठी महाविकास आघाडीने अंबरनाथ पालिकेबाहेर आंदोलन करत सदोष मतदार यादीची होळी केली. निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. अंबरनाथ नगरपालिका च्या अंतिम मतदार यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती, मात्र तांत्रिक चुकीमुळे अनेक नावं दुसऱ्या प्रभागात गेली होती. सुमारे ३२ हजार मतदार इतर प्रभागात गेल्याचा आरोप झाला होता. ही चूक विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच पालिकेने यादीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. परंतु आता सोमवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असला, तरी अजून सुधारीत अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन करत मतदार याद्यांची होळी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजित काळे, संदीप पगारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, काँग्रेस शहर कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 08, 2025 10:46:20
Beed, Maharashtra:बीड : मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दाखवला पत्रकार परिषदेत थेट मतदान करतानाचा व्हिडिओ काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता गंगाधर काळकुटे माझे चांगले मित्र आहेत.. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. ओबीसी मेळाव्यात मला गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता असा आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून केला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांचे खांदे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना चांगलंच उत्तर दिलं या त्यांनी चक्क लोकसभेला मी बजरंग सोनवणे यांना मतदान केलं मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फिरलो. लोकशाहीत मला देखील निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.. मी माझ्या समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही.. मी प्रामाणिक आहे असे म्हणत चक्क लोकसभेला मतदान केल्याचा व्हिडिओस त्यांनी माध्यमांना दाखवला. त्यामुळे गंगाधर काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता निवडणूक आयोग गंगाधर काळकुटेनी दाखवलेल्या व्हिडिओद्वारे त्यांच्यावर काय भूमिका घेऊन काय कारवाई करत ते पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 08, 2025 10:30:47
Washim, Maharashtra:नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतराणार असल्याची घोषणा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी केली आहे.वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात आज वाशिम येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली.खासदार देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना (उबाठा) ज्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची क्षमता अधिक आहे, त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.जनतेचे प्रश्न सोडविण्यास सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख व्यक्तीलाच आम्ही उमेदवारी देणार आहोत.महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.सर्व सेक्युलर आणि समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपाला पराभूत करण्याचा आमचा निर्धार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 08, 2025 10:06:17
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात ठाकरे सेनेला गळती थांबण्याचं नाव न्हय. श्रीवर्धन मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय. श्रीवर्धन मधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसेच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सर्वजण शिवसेनेत दाखल झाले. यामुळे आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांच्या मतदार संघात मंत्री भरत गोगावले यांच्या फेऱ्या वाढल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 08, 2025 09:37:00
Navi Mumbai, Maharashtra:मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता श्रेय वादाची लढाई समोर येत आहे विक्रोळी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात शिवसेनेने निदर्शने केली विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा फुले या पालिका रुग्णालयाचे नूतनीकरण हे शिवसेनेच्या प्रयत्नातून झाल्याचा दावा करत शिवसेनेच्या सुवर्णा कारंजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्यावर आरोप केले पक्षात असताना देखील आम्ही केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुनील राऊत या आधी करत होते आता देखील ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. यावेळी आमदार सुनील राऊत यांचा पुतळा शिवसैनिकांकडून जाळण्यात आला.
3
comment0
Report
SKShubham Koli
Nov 08, 2025 09:35:21
Thane, Maharashtra:तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू” — ubt नेते रोहिदास मुंडे यांचा इशारा दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेडा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबीयांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की “दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही.” “जर महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असे अ‍ॅड.रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
2
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 08, 2025 09:33:49
Oros, Maharashtra:ऑन महायुती ( राणे वाद ) -- महायुती मधील पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत विचारांसाठी नाही. त्यांची ताकद एकटे लढण्याची नाही. म्हणून ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील पण त्यांनी राज्यात राहिलेली नाही. ऑन शिंदे / ठाकरे सेना आघाडी --- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाहीत. मात्र कणकवली नगरपंचायत मधील झालेल्या भ्रस्टाचाराच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोचवू.. ऑन नारायण राणे ( युती झाली तर संबंध तोडू ) -- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राणेना विचारल्याशिवाय विशाल परब राजन तेली यांना वेगवेगळ्या पक्षात घेत आहेत. रानेंच्या शब्दाला आता राज्यात किमंत राहिलेली नाही त्यामुळे तुम्ही युती बाबत न बोललेलं बर ऑन राणे टीका ( उद्धव राज ) -- त्यांच्यात सत्ता मिळवण्याची क्षमता होतीच पण पक्ष फोडून सत्ता मिळवली उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल ते बघा ऑन महाविकास आघाडी --- सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवीणार आहेत. महाविकास आघाडी बाबत वरिष्ठसोबत बोलून जगवाटपाच निश्चित होईल शिंदे आणि भाजपाची युती होते कि नाही आणि त्यांचे उमेदवार कुठे जातात ते बघून निर्णय होईल ऑन वेंगुर्ला ( आघाडीत बिघाडी ) --- काँग्रेस ने त्याच्या स्तरावर उमेदवार उभा केलाय. उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे. सर्व एकत्र बसून एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करू ऑन संदेश पारकर ( उमेदवारी ) -- संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. भ्रस्टाचार दूर व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. ऑन युती --- शिंदेचे आमदार भाजपाच्या ताकतीवर निवडून आलेले आहेत. शिंदेचे कार्यकर्ते जी काही हवा भरत आहेत त्या पक्षाला कोणतेही भवितव्य राहिलेले नाही. त्यांची भूमिका ते जाहीर करतील आणि आम्ही आमची भूमिका जाहीर करू ऑन जिल्हा परिषद निवडणूक --- सत्ताधारी पक्षाने ज्या घोषणा केल्या त्यासाठी निधी आणलेला नाही रस्ते खड्डेमय आहेत. चिपी विमानतळ अपूर्ण आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही ह्यांच्या विरोधात जनता आहे जनता आमच्या सोबत राहील.
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 08, 2025 09:25:51
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 08, 2025 09:25:29
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 08, 2025 09:04:55
Akola, Maharashtra:पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या जमिनीची बातमी सर्वप्रथम झी २४ तासने उघडकीस आणल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. या व्यवहारात केवळ १ टक्का वाटा असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र ९९ टक्के वाटा असलेल्या पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, यामुळे प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप होत आहे.या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ‘या प्रश्नाचं उत्तर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील’ असे म्हणत जबाबदारी झटकली. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी शितल तेजवानी आपल्या पतीसह विदेशात फरार झाल्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी ‘हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनीच शोधून आणावे’ असे वक्तव्य केले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवार यांचे हे उत्तर पार्थ पवारांवरील आरोपांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
2
comment0
Report
Advertisement
Back to top